Monday, December 27, 2021

मदर इंडिया - सिनेमा की प्रचारतंत्र?

अजूनही, अजूनही नवा सिनेमा लागला की लॉकडाऊनने कावलेले लोक कधी एकदा जाऊन थेटरात सिनेमा बघतोय असं करतात. मग दीड वर्षापूर्वीच बॉलीवूडला धडा शिकवायची शपथ घेतलेली सोयीस्कर विसरली जाते.

आज थोडं मदर इंडिया सिनेमाकडे नॅरेटिव्हच्या दृष्टीकोनातून बघूया.

Mother India Radha Meets Lala

मेहबूब प्रोडक्शन्सचं बोधचिन्ह डावीकडे बघा, अधिक काही सांगायची गरज नाही. प्रतीके वापरून लोकांच्या मनात द्वेष पेरणी कशी करावी, फॉल्टलाईन्सचा फायदा कसा घ्यावा याचं हे उत्कृष्ठ उदाहरण आहे. यासाठी एकच दृश्य उदाहरणार्थ घेऊया. या दृश्यात गावातला व्यापारी, सावकार "लाला", मदत मागायला आलेल्या गरीब "राधा"कडे वासनांध नजरेने बघतोय. राधा ओलेती, चिखलाने माखलेली दाखवली आहे, थोडक्यात कपडे पूर्ण घातलेले असले, तरी स्त्रीदेहाचा उभार व्यवस्थित दिसेल असं दाखवलं आहे. 

  • या दृश्यातला लाला हा 'लाला' आहे, शेटजी आहे तर त्याने एखाद्या ब्राह्मणासारखी शेंडी का ठेवलेली दाखवली आहे?
  • खांद्यांवर भगवी शाल कशासाठी?
  • दोघांच्या मधे बघा. फोकसमधे नसल्याने नीट दिसत नाही, पण राधाकृष्णाची तसबीर व्यवस्थित दिसते आहे. 

सिनेमाबद्दल जागृती आत्ता आत्ता निर्माण झाली आहे, पण तेव्हा भोळ्या मनांत (gullible minds) काय चित्र निर्माण झालं असेल या गोष्टी पाहून? 

"सावकारी पाश" हे ग्रामीण भागातील सत्य आहेच, पण त्याही पेक्षा शहरी भागातील कारखान्यात काम करणारे कामगारांत जबरदस्त दहशत असलेली "पठाण" नामक एक खाजगी सावकारी करणारी जमात मात्र हिंदी सिनेमावाल्यांना कधी दिसली नसावी. दिसली असणारच, मात्र या जमातीला व्यवस्थित दडवलं गेलं. आता हे पठाण कोण होते हे वेगळं सांगायला नको. त्यांना  कर्जवसूली करायला माणसं ठेवायची आणि कायदेशीरपणे वकील आणि पोलीस घेऊन गरजच पडायची नाही. कर्जाळू कामगारांच्या येण्याजाण्याचा रस्ताही त्यांना ठावूक असायचा आणि तारखेची आठवण करायला किंवा वेळेत न फेडल्यास  कर्ज घेणार्‍यांची गचांडी धरायला तो रस्त्यातच उभा असायचा (काही मराठी चित्रपटांत बघितल्याचं आठवतं, पण तिथेही तो कनवाळू दाखवायचे. आठवा: भावे साहेबांचा बालगंधर्व). 

असं असताना कम्युनिस्टांची लाल चादर पांघरलेल्या या सिनेमातल्या लांडग्यांना पठाण दिसलेच नाहीत, यात काही नवल नाही. किंबहुना, कुणाला ते दिसू नयेत, म्हणूनच लाल चादर पांघरली जायची. 

असेच जुने सिनेमे कधी बघाल, तेव्हा अशा विसंगती दिसतील त्याची नोंद ठेवा. आणि जमल्यास लिहा सुद्धा. 

© मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष कृ अष्टमी, शके १९४३



Tuesday, October 26, 2021

माझ्यापुरतं सांगायचं तर...

मी झब्बा आणि धोतर नेसलं की कपाळावर गंध लावतोच, पण धोतराऐवजी पायजमा आला तरी मी कपाळावर गंध लावतो. फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट घातली तरी माझ्या कपाळावर गंध असतंच. टीशर्ट-जीन्स घातली तरी कपाळावर गंध लावतोच आणि जीन्सची जागा बरमुडाने घेतली तरी कपाळावर गंध लावतोच. मला ते आवडतं आणि कूल सुद्धा वाटतं, आरशात पाहून एक प्रकारचा आत्मविश्वासही वाटतो. 

पाश्चात्य कपड्यांवर अर्थात वेस्टर्न आउटफिट्सवर कपाळावर गंध लावलेलं शोभून दिसत नाही ही कूल वगैरे दिसण्याच्या प्रेशरमध्ये स्वतःच्या मनाची मी समजूत घालून घेत नाही आणि मन मोडून तडजोड करत नाही.

मुळातच कूल म्हणजे काय हे जाहीरात कंपन्यांना आणि जाहीरातीतल्या मॉडेल्सना मी ठरवू देत नाही कारण एकदा ठरवू दिलं की मी कायम त्याला बळी पडत राहणार आणि एक एक करत आपली धार्मिक चिन्हे 'टाकत' जाणार. पण मी तसं करणार नाही.

हे मी माझ्यापुरतं तरी ठरवलं आहे. 

© मंदार दिलीप जोशी
अश्विन कॄ ६, शके १९४३

Wednesday, October 13, 2021

माझिया रक्‍तात थोडा ईश्वराचा अंश आहे

सृष्टीचा कुणीतरी एक निर्माता असला पाहीजे हा तर्क अनेकांना भावतो. याच्या समर्थनार्थ मुलांचा तोंडावळा आईबाबांसारखा कसा, किंवा राईहूनही  लहान असलेली एखादी बी पेरली तर त्याचा विशाल वटवृक्ष कसा होतो असे तर्क दिले जातात.  सर्वसाधारणपणे सरासरी आणि त्याहून कमी बुद्धीमत्ता असलेल्या लोकांना ते तत्काळ पटतातही कारण त्यांच्या मते कुणीतरी एक सर्वशक्तिमान जगड्व्याळ  विचारसरणी असलेला असेल तरच हे सगळं (सृष्टीची रचना) शक्य आहे. याचं एक कारण हे आहे की सर्वसामान्यपणे मनुष्याला अनेक प्रश्नांची उतरे हवी असतात पण त्याची उत्तरे शोधण्याचे कष्ट तो घेऊ इच्छित नाही. बहुतेक वेळा माणूस न्यूनगंडापायी हा विचार करतो की त्याची स्वतःची असा शोध घेण्याची किंवा विचार करण्याची क्षमता नाही.  अर्थात, काही प्रश्नांची उत्तरे शोधायला आयुष्यही कमी पडतं म्हणा अनेकदा. पण तो भाग वेगळा.

सर्व प्राणीमात्रांना जीव प्रिय असतोच, पण माणसाला त्याच्याही पुढे जाऊन मृत्यूपश्चात आपलं काय होईल हे जाणून घेण्याची ओढ नेहमीच अस्वस्थ करते आणि त्याला असहाय्य वाटू लागतं. याच असहाय्यतेची परिणिती उत्तराची आवश्यकता निर्माण होण्यात होते. 

जिथे मागणी आहे ती प्रत्येक जागा एक प्रकारे बाजारच असते आणि जिथे बाजार आहे तिथे व्यापारीही आलेच. मात्र, बाजारात उतरणारी प्रत्येक व्यक्ती प्रामाणिकच असेल असं नाही. जिथे हे प्रश्न आहेत तिथे तर उत्तरांचा व्यापार करणारेही असतातच आणि अनेकदा ते विधीनिषेधशून्य,  अर्थात ज्याला इंग्रजीत unscrupulous charlatan म्हणतात तसे असतात. असे लोक लोकांच्या असहाय्य मानसिक स्थितीचा फायदा घेऊन वाट्टेल त्या थापा उत्तर म्हणून फेकतात आणि स्वतःचा फायदा करुन घेतात. आध्यात्मिक क्षेत्रात असे अनेक गुरू आणि कॉर्पोरेट क्षेत्रात मार्केटिंग गुरू म्हणून असे लोक प्रसिद्धी पावतात. कधी कधी मात्र दोघांत फरक उरत नाही. कसा ते पुढे पाहूच.

सृष्टीचा एक निर्माता असणं हे साधारण बुद्धीमत्तेच्या मानवांसाठी एक epistemological मर्यादा आहे, कारण सरासरी किंवा त्यापेक्षा कमी बुद्धीमत्तेच्या मानवांच्या विचारांची झेप त्यापलीकडे जाऊ शकत नाही. पण सर्वसाधारण समाजाच्या नैतिकतेची परिमाणे ठरवण्यासाठी हा विचार, किंवा आपण ही  म्हणूया, खूप उपयुक्त ठरते.  

पण जेव्हा एखादा दुष्ट आणि धूर्त माणूस स्वतःला त्या सर्वशक्तीमान सृष्टीनिर्मात्याचा एकमेव आणि स्वयंघोषित अधिकृत एजंट म्हणून यात शिरतो आणि त्या जोरावर त्या निर्मात्याच्या नावावार पैसे उकळायला सुरवात करतो, आपल्या अनुयायांना त्या निर्मात्याला किंवा स्वतः त्या स्वयंघोषित एजंटला न मानणार्‍या लोकांच्या स्थावर जंगम मालमत्तेची,  त्यांच्या महिलांच्या अब्रूची लूट करायची संपूर्ण मोकळीक देतो, आणि यावर कडी म्हणजे या सर्व अनैतिक कृत्यांना त्या सर्वशक्तिमान निर्मात्याचंच नाव वापरून पापमुक्ती देतो, किंबहुना अशा कृत्यांना पुण्यकर्मांचेच लेबल लावतो तेव्हा मात्र मात्र या व्यवस्थेला आणि संपूर्ण जगालाच भयानक स्वरूपाच्या विकृतीची लागण होते. 

सत्याच्या शोधात मार्गाक्रमणा करत असताना घोळ झाला तो "कसं" (how) चं रुपांतर "कोण" (who) करण्यात आलं तेव्हा.  ज्ञान जिज्ञासा how विचारत विचारत पुढे घेऊन जाते, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेलच असं नसतं. पण या प्रकारे शोध घेताना कमीतकमी याची शाश्वती असते की उत्तराच्या नावाखाली धादांत असत्य तरी आपल्या गळ्यात मारलं जाणार नाही. पण मनुष्यस्वभाव असा असतो की काहीही करुन त्याला उत्तर हवंच असतं. प्रवासाचा आनंद न घेता काही लोकांना लवकरात लवकर गंतव्यस्थानाकडे पोहोचण्याची घाई असते त्याप्रमाणेच माणूस उत्तरांचा शोध घेता घेता मिळणारे ज्ञानकण वेचण्याऐवजी तत्काळ उत्तरं हवी म्हणून घायकुतीला येतो. अनेकदा स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्याच्या प्रयत्नात अशा स्वयंघोषित दलालांच्या नादी लागून त्यांच्या खोट्या उत्तरांवरही विश्वास ठेवतो.  

या अशा खोटारड्या दलालांकडे एक क्लुप्ती अशी असते की ते तुम्हाला विचारतात की तुमच्याकडे अमुक अमुक याचं उत्तर आहे का? तुमच्याकडे ते नसतं, म्हणून तुम्ही प्रामाणिकपणे म्हणता की बाबा नाहीये आमच्याकडे उत्तर. यावर त्यांच्याकडे उत्तर असल्याचं ते ठणकावून देतात. हाच तो क्षण असतो जिथे intelligent creationism नावाचा महाघोटाळा जन्म घेतो. याचा आधार म्हणजे एक निराधार प्रश्न असतो - हे सगळं कुणी निर्माण केलं? Who created all this? खरं तर प्रश्न असा हवा, "हे सगळं कसं निर्माण झालं?" प्रश्न चुक(व)ल्याने how ऐवजी whoच्या घोटाळ्याचा खेळ इथेच सुरु होतो. 

वर उल्लेख केल्याप्रमाणे ज्या लोकांना आपल्या अस्तित्वाच्या बाबतीत जाणून घ्यायची जी ओढ असते त्या भावनेला साद घातली जाते आणि त्यांना भीती घातली जाते की तुम्ही अमुक केलं नाहीत आणि तमुक असे वागला नाहीत तर तुमच्या मृत्यूनंतर तुमचे भयानक हाल होतील. आता काय हाल होतील त्याच्या थापा त्या स्वयंघोषित दलालाच्या मर्जीनुसार ठरतात.

सुरवातीला म्हटल्याप्रमाणे समाजाचा गाडा योग्य पद्धतीने सुरु रहावा म्हणून काही एक प्रमाणात श्रद्धेची आवश्यकता असते कारण मनुष्यप्राणी हा स्वभावतःच नैतिक वृत्तीचा नसतो. कुठल्याही श्रद्धेविना, आधिभौतिक शक्तीच्या भीती विना नैतिक आचरण असणारी व्यक्ती विरळाच असते. म्हणून श्रद्धा आवश्यक आहे आणि प्रत्येक धर्म/रिलिजन वगैरेंत मृत्यूनंतर मिळणार्‍या 'गती' विषयी भीती घातलेली आपल्याला दिसेल. याचं कारण म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला आपला एक ना एक दिवस मृत्यू होणार हे पक्कं ठाऊक असतं, म्हणूनच प्रत्यक्ष मृत्यूचं भय तितकं वाटत नसलं तरी मृत्यूनंतर आपलं काय होईल याची त्याला जास्त चिंता असते कारण त्याला किमान एवढी खात्री असते की मेल्यावर आपण अगदीच असहाय्य असणार आहोत. आणि याच भीतीला तो आपल्या वर्तमान अस्तित्वाशीच जोडतो. 

विचार करुन बघा, इनकम टॅक्समध्ये सवलत मिळेल म्हणून कुणी दान-पुण्य करत नाही. हा माणसाच्या मृत्यूपश्चात अस्तित्वासाठी काढलेला विमा असतो;[रत इंग्रजीत सांगायचं तर After Life Insurance असतो.

प्रत्येक रिलिजनची 'शिकवण'/तत्त्वप्रणाली बनल्याला आता काही हजार वर्ष उलटून गेलेली आहेत. तेव्हाचं विज्ञान आणि आज त्याच स्वरुपात नाही. भारताची परिस्थिती थोडी वेगळी आहे – आजचं विज्ञान हे तेव्हाच्या विज्ञानासारखं उरलेलं नाही – आणि खिलजी सारख्या क्रूर अडाण्यांमुळे प्राचीन काळी काही गोष्टी कशा बनल्या याचं ज्ञान त्या जळून खाक झालेल्या नालंदा विद्यापीठाबरोबरच काळाच्या उदरात अदृश्य झालं. म्हणूनच त्या गोष्टींच्या बाबत आज अनेक अविश्वसनीय गोष्टी पसर(व)ल्या गेल्या आहेत आणि त्यावरुन आज चेष्टा केली जाते. 

रिलिजन्सची चर्चा करताना एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की सगळ्याच धर्मात/रिलीजनमध्ये काही ना काही तर्काच्या आणि वैज्ञानिकतेच्या कसोटीवर अजिबात न पटणाऱ्या बाबी आढळून येतील.  म्हणूनच रिलीजनना वैज्ञानिकतेच्या कसोटीवर तपासून बघण्याऐवजी मानवतेच्या कसोटीवर तपासले पाहिजे की ते त्या त्या रिलीजनच्या अनुयायांना किती प्रमाणात विचारस्वातंत्र्य देतात, काळानुसार परिवर्तन होण्यास काही वाव आहे की नाही, आणि इतर समाजांशी कसा व्यवहार करावा याबाबत काय मार्गदर्शन केले आहे. 

या सगळ्यां धर्ममतांत सनातन धर्म सगळ्यांत कल्याणकारी  (benign) आहे कारण इतर सगळ्या बाबी बाजूला ठेवल्या तर धर्माची दहा लक्षणेदेखील कुणाही मनुष्याला योग्य मार्ग अनुसरण्यास प्रवृत्त करायला पुरेशी आहेत. त्यात इश्वराची कल्पना असली तरी ती अत्यावश्यक नाही आणि धर्मात गुरु करण्याची परंपरा असली तरी कुठलाही गुरू स्वतःला इश्वराचा एकमेव एजंट म्हणवून घेत नाही. आस्तिकता आणि इश्वरावर श्रद्धा असणे श्रेयस्कर असल्या तरी 'मी नास्तिक आहे' हे एखादा मनुष्य फक्त हिंदू धर्मातच निर्भयपणे म्हणू शकतो. प्रत्येक धर्माचे दोन भाग असतात. एक कर्मकांड आणि सामाजिक भाग (इतर धर्मीयांशी कशी वर्तणूक ठेवावी याची शिकवण). आणि हाच सामाजिक भाग प्रत्येक रिलिजनला स्वतंत्र अस्तित्व बहाल करतो. दुसरा महत्त्वाचा भाग हा की कर्मकांड ही सामाजिक भाग कसा असावा यासाठी मार्गदर्शक ठरतात आणि यातही हिंदू धर्मातली मार्गदर्शक तत्त्वे त्याला श्रेष्ठ ठरवतात.

आणि सगळ्यांत घातक (malignant) रिलिजन ते आहेत जे 'खतरे में' है ची घोषणा करत सतत घाबरवत ठेवण्याची आणि ऐकलं नाही तर हिंसा करण्याची शिकवण आणि वृत्ती राखून असतात, आणि दुराचारालाही इश्वराची आज्ञा म्हणतात - बाकी सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.


© मंदार दिलीप जोशी (मराठी संस्करण)
मूळ हिंदी लेख इथे असेपर्यंत वाचता येईल.

अश्विन शु. ८, दुर्गाष्टमी

Tuesday, September 7, 2021

Nokku Kooli (टक लावून बघण्याची मजुरी)

केरळात तुम्हाला तुमच्या घरातलं सामानही युनियन मार्फतच उतरवून घ्यावं लागतं. मोडतोड व्हायच्या किंवा अव्वाच्या सव्वा मजूरी मागितली जाण्याच्या भीतीने तुम्हाला तसं करायचं नाहीये? हरकत नाही, युनियनवाले लांबूनच तुम्हाला सामान उतरवून घेताना बघत बसतील.

Nokku kooli

तुम्ही पूर्ण सामान उतरवून घेतलंत की युनियनवाले येतील आणि मजुरी मागतील. काम नाही केलं म्हणून काय झालं, तुम्हाला सामान उतरवून घेऊ दिलं ना. दुरून बघितलं, मोडतोड केली नाही...सामान असो की तुमचं डोकं, उपकारच नव्हेत का ते? त्याचीच तर मजुरी मागत आहेत ते! त्यालाच मल्याळममध्ये nokku kooli म्हणतात. बंगालमधेही हेच व्हायचं

म्हणूनच केरळात फारसे उद्योग नाहीत, म्हणूनच केरळचं GST कलेक्शन हरियाणाच्या एक तृतीयांश आहे, म्हणूनच तिकडच्या मुली आयसिसमध्ये आनंदाने सामील व्हायला जात असतात.

कम्युनिझम/समाजवाद ही राजकीय/आर्थिक विचारधारा नाही, फक्त आणि फक्त गुंडगिरी आहे, म्हणूनच जे राज्य किंवा प्रदेश यांच्या नियंत्रणात येते त्याचा संपूर्ण सत्यानाश होतो. याचं कारण कुठल्याही गुन्हेगारी समाजाचा विनाशच होतो मग ते आपल्या विचारधारेला राजकीय म्हणोत की मजहबी.

विकली गेलेली माध्यमे आणि विचारजंत यांच्याकडून केरळमधली ही लाल गुंडगिरी उघड होण्याची अपेक्षा नाहीच, पण अशा गोष्टींची माहिती घेऊन हे आपल्या दारापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. 

आणि हो, केरळमध्ये मल्याळममध्ये ज्याला nokku kooli म्हणतात, त्याला महाराष्ट्रात 'खंडणी' म्हणतात, बरोबर ना?

🖋️ मंदार दिलीप जोशी



Friday, July 16, 2021

असंभव को संभव करेंगे स्वामी, बिगडने नहीं दिया यह वामी!

कॉम्रेड प्रकाश रेड्डी ने कुछ समय पहले पोस्ट किया है कि कॉम्रेड बाबूराव शेलार का नाम वो जिस चाल में रहते हैं वहीं पास के किसी रास्ते को दिया गया है । उस समय उनके घर पर एक छोटा सा रिसेप्शन रहा होगा यह फोटो तब कें हैं।

 

अब सोशल डिस्टेंसिंग, कई लोगों के चेहरे पर मास्क न होना आदि छोटी-छोटी बातों को छोडिये। मजेदार बात अलग है। 

प्रतिमा और पूजा रॉय इन दो बहनों को नासा में इंटर्नशिप के लिए चुना गया था। नासा ने उनकी फोटो सांझा करने की देर थी कि लड़कियां इतनी पढ़ी-लिखी होने के बाद भी अपने माथे पर क्या टिकी लगाती हैं और देवीदेवताओ की मूर्तियाँ या चित्र क्यूं रखती हैं आदि लिखकर उन्हें भारी मात्रा में ट्रोल किया गया।


परंतु वो भगवान पर विश्वास करती हैं तो ऐसा करना स्वाभाविक है। परंतु आदीवामपंथी मार्क्सबाबा कहकर गये हैं कि Religion is the opium of the masses (रिलिजियन अफीम की गोली है), तो आपके दो कॉम्रेडों में से एक के माथे पर तिलक एवं दूसरे के घर में देवी-देवताओं के चित्र कैसे दिखाई देते है? ये तो कुछ भी नहीं! महाराष्ट्र में एक स्वामीजी थे स्वामी समर्थ; तो जिस लकडी के फलक  पर देवीदेवताओं के चित्र रखे हैं उसके बायीं ओर "असंभव को संभव करेंगे स्वामी" एवं नीचे "डरो मत, हम तुम्हारे साथ है" ये उनके भक्तीपर वचन लिखे गये हैं!! अपने मूल भूलना सहज नहीं होता।   इसे निधर्मी वामपंथ की हार एवं आस्तिकता का विजय ही मानना पडेगा। 

तो लिब्रंडूओं और वामीयों, आप उन्हें विचारधारा के प्रति निष्ठावान न होने के कारण कुछ सीख नहीं देंगे? क्या आप उन्हें कुछ नहीं कहेंगे? देखिए, नीचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी के पोस्ट की लिंक है। खुला प्रस्ताव, आप को कॉम्रेड को सुधारना ही होगा! कॉम्रेड प्रकाश रेड्डी के पोस्ट की लिंक यह रही — https://www.facebook.com/prakash.reddy/posts/10225535914535407 

जाते जाते: कल एक फोटो देखी थी जिसमें साम्यवादी व्यवसायिक क्रांतीकारक चे ग्वेरा की एक बड़ी तस्वीर कूड़ेदान में फेंकी दिखाई देती है, वैसे ही बाबूराव के परिवारने जिस प्रकार घर में पूजापाठ कर के उनकी विचारधारा का कचरा कर दिया है उसी प्रकार उनके घर का कूड़ेदान यदि दिखाई दिया तो उसमें किस किस के फोटो मिलने की संभावना है ये सोचकर और हसीं आ रही है।

© मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. ७, विवस्वत सप्तमी


अशक्य ते शक्य करतील स्वामी, बिघडू न शकला हा वामी !

ही पोस्ट पाहून स्वामी भक्तांची स्वामी समर्थांवरील भक्ती आणखी दृढ होईल आणि तुम्ही त्या पंथातले नसाल तर नक्की स्वामी समर्थांवर विश्वास बसेल!

कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी काही वेळापूर्वी पोस्ट टाकली आहे. कॉ. बाबुराव शेलार यांचे नाव ते राहत असलेल्या भिकुमाळी चाळीतील नजिकच्या रस्त्याला देण्यात आले. त्यावेळी त्यांच्या घरी छोटेखानी सत्कार समारंभ वगैरे झाला असावा. आता सोशल डिस्टन्सिंग, अनेकांच्या तोंडावर मास्क नसणे, वगैरे क्षुल्लक गोष्टी सोडून द्या. खरी गंमत वेगळीच आहे.

प्रतिमा आणि पूजा रॉय या नासातील इंटर्नशिपसाठी निवड झाल्यावर नासाने त्यांचे फोटो शेअर करताच आपल्याकडील हुश्शार विज्ञानवाद्यांना आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांना फार्फार वाईट वाटले. मुली एवढ्या शिकलेल्या असून कपाळावर टिकली काय लावतात आणि देवादिकांच्या मूर्ती वा तसबिरी काय ठेवतात?! वगैरे वगैरे वगैरे लिहून त्यांना बरेच ट्रोल करण्यात आलं.     

रॉय भगिनींचा उल्लेख असलेली नासाची पोस्ट

पण त्या निदान देव मानतात तरी, त्यामुळे त्यांच्याकडे तसबीरी मूर्ती असणं अगदी स्वाभाविक आहे. पण मार्क्सबाबा सांगून गेलेत ना, Religion is the opium of the masses (रिलिजियन ही अफूची गोळी आहे), मग तसं असून तुमचे दोन कॉम्रॅडांपैकी एकाच्या कपाळावर लक्षात येईल असा टिळा आणि दुसर्‍याच्या घरी देवीदेवतांच्या तसबीरी कशा?  हे तर काहीच नाही, फळीवर देव ठेवले आहेत तिथे डावीकडे नीट बघा, चक्क स्वामी समर्थांची भक्ती करताना लिहीलं बोललं जाणारं वाक्य "अशक्य ते शक्य करतील स्वामी" असं लिहीलेलं दिसेल! आता फळीच्या खाली बघा, "भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे" असं लिहीलेलं दिसेल. शेवटी आपल्या मुळांना नाकारता येत नाही हेच खरं. आयुष्यभर कम्युनिस्ट पक्षाचे काम करुनही घरात देवपूजा होते आणि स्वामींवर श्रद्धा असते याला निधर्मी साम्यवादाची शोकांतिका आणि आस्तिकतेचा विजयच म्हणावा लागेल.

तर, लिबरंडू आणि लाल माकडांनो, अशा वामपंथभ्रष्ट कॉम्रेडांना त्यांना तुम्ही विचारधारेशी एकनिष्ठ न राहिल्याबद्दल काहीच बोलणार नाही? काहीच बोलणार नाही का तुम्ही त्यांना? बघा हं, खाली पोस्टची लिंक देतोय. खुल्ला ऑफर — https://www.facebook.com/prakash.reddy/posts/10225535914535407 

ता.क. परवा तो साम्यवादी व्यवसायिक क्रांतीकारक चे ग्वेव्हेराचा मोठ्ठा फोटो कचराकुंडीत फेकलेला दिसला तसं घरी देवपूजा वगैरे करुन यांच्या विचारधारेला बाबुरावांच्या कुटुंबियांनी जसं फाट्यावर मारलं तसं त्यांच्या घरातल्या कचराकुंडीत कुणाकुणाचे फोटो सापडतील असा विचार करुन आणखी हसू आलं. 

© मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. ७, विवस्वत सप्तमी




Saturday, July 3, 2021

मर्यादा/लिमिट

दोन गोष्टींना सीमा नाही: विश्व आणि मूर्खपणा; पण मला विश्वाबद्दल तितकीशी खात्री नाही - अल्बर्ट आईन्स्टाईन (Two things are infinite: the universe and human stupidity; and I’m not sure about the universe. –Albert Einstein).

लहान मुलांना हात लावणार्‍यांना (बॅड टच) काय शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटतं? तुम्ही काय म्हणत आहात ते इथे ऐकून येतंय मला, कुठलीही दिव्य शक्ती नसताना. पण तुम्हाला आम्हाला वाटून काय उपयोग? कायद्याच्या रक्षकांना तसं वाटत नाही ना! पण त्या आधी अमेरिकेतली एक गोष्ट सांगतो. बराच वामपंथी मूर्खपणा अमेरिकेत सुरु होऊन आपल्याकडे झिरपतो म्हणून अमेरिकेचंच उदाहरण देतो. काही महिन्यांपूर्वी एक बातमी वाचली होती, अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात संमत झालेल्या कायद्यानुसार तुम्ही साधारण साडेनऊशे डॉलरच्या आत उचलेगिरी केली (Shoplifting) तर तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करता येणार नाही. तुमच्यावर खटला दाखल करण्यासाठी सरकारी वकीलांना दुकानात शिरताना तुमचा हेतू चोरी करण्याचा होता हे सिद्ध करावं लागेल (जे जवळपास अशक्य आहे). थोडक्यात, दुकानात नेहमीसारखं शिरा, तुम्ही उचललेल्या वस्तूंची एकंदर किंमत साडेनऊशे डॉलरच्या वर जात नाही ना याची खात्री करा, आणि खुशाल बाहेर पडा. या व्हिडिओत हा माणूस आरामात चोरी करुन पळून जातोय आणि त्याला कुणीही रोखत नाहीये कारण जीवापेक्षा आणि नंतर होणार्‍या मनस्तापापेक्षा साडेनऊशे डॉलरचा चुना परवडला.


आहे की नाही गंमत. इंग्रजीत ज्याला extrapolation म्हणतात ते वापरून एक काल्पनिक उदाहरण पाहूया. उपरोल्लेखित कायदा म्हणजे असं झालं की तुम्ही कुठेतरी जात आहात आणि तुम्हाला एखादी मुलगी दिसली आणि (१) तुम्ही कोणत्याही वावग्या हेतूने तिथे जात नाही आहात आणि ती (२), मुलगी दिसल्यावर अचानक तुमच्या मनात इच्छा निर्माण होऊन तुम्ही तिची छेडछाड (eve-teasing) आणि विनयभंग (molestation) केलात, तर तुम्हाला शिक्षा होऊ शकणार नाही. पण अगदीच बलात्कार नको हं, नेमकं काय केलं की 'चलता है' च्या सीमेचं उल्लंघन होतं तिथवर अजून कायदा पोहोचला नाही आहे अमेरिकेतही हे सुदैवच म्हणायला हवं.

एखादी गोष्ट आक्षेपार्ह होण्याची मर्यादा नेमकी काय असते? एखाद्या गोष्टीची लिमिट आपण कशी ठरवायची? ज्याची त्याची वेगळी असं आपण म्हणू शकतो का, हल्ली नैतिकतेची व्याख्या वेगवेगळी असू शकते का? इथे एका मैत्रिणीची पोस्ट आठवली ज्यात तिने तिच्या एका मित्राशी झालेल्या संभाषणाबद्दल लिहिलं होतं. त्या मित्राने 'लिमीट' अर्थात 'मर्यादा' या शब्दाचे, संकल्पनेचे अत्यंत सुंदर विवेचन केलं आहे. तो म्हणतो की की मर्यादा किंवा लिमिट ही सर्वांसाठी एकच असते. आपण जसे जसे एक एक पाऊल पुढे टाकतो, तसतसे आपणच म्हणू लागतो की माझी ही इतकीच लिमिट आहे. सुरुवातीला दारूला स्पर्शही न करणारा ज्या दिवशी पितो, तिथेच लिमिट ओलांडलेली असते. "मी फक्त मित्रांबरोबर/ फक्त ऑफिस पार्टीमध्ये/ फक्त एकच पेग/ फक्त दोनच बाटल्या घेतो वगैरे हे काय खरं नाही...म्हणजे एकदा एक पायरी ओलांडली की मग त्याची सवय होई पर्यंत पुढची पायरी ही लिमिट असते असे आपल्याला वाटते!"

त्याचं म्हणणं खरंच आहे. म्हणजे असं पहा, की जी मुलगी/मुलगा म्हणते/म्हणतो की मी फक्त रात्री १० पर्यंत बाहेर असतो. १० ही आपली लिमिट. मग कधीतरी ते वाढून ११ होतात मग १२...तो ठाम असतो प्रत्येक वेळी की हीच आपली लिमिट!! गेल्या कित्येक वर्ष कॉलेजमध्ये, मग नोकरी करताना सामाजिक स्थित्यंतरे अनुभवली. मुलामुलींच्यात होणारे वैचारिक/सांस्कृतिक बदल पाहिले; 'ओझरता स्पर्श केला तरी चालतो' इथवरुन 'आता अफेअर असेल तर किस वगैरे चालतं'... आपली लिमिट आहे ती असं म्हणू लागले आणि तसं म्हणणारे हळू हळू 'प्रीकोशन' घेऊन करायचं इथवर आले होते. आणि आता लिमिट वाढली...पार्टनर स्वाईप पण चालू लागलं!!

माणसाने एकदा पायरी ओलांडली की पुढे अंत नाही. 

मला नेहमीच याचा विषाद वाटतो जेंव्हा पेपरमध्ये किंवा टीव्हीवर दर काही दिवसांनी अशा बातम्या येतात की नोकरीच्या आमिषाने दोन वर्ष बलात्कार केला, लग्नाच्या आमिषाने संबंध ठेवायला भाग पाडले (या प्रकारांना सरसकट लैंगिक शोषण, बलात्कार म्हटलं जातं. पण माफ करा पण मला हे यातलं काहीही वाटत नाही.) किंवा सिनेमात काम मिळावं म्हणून दिग्दर्शक, निर्माता, सहकलाकार वगैरेंनी अत्याचार केला.

यात पहिल्या प्रकारच्या बातम्या जास्त वाचनात येतात. इथे क्राईम पॅट्रोलमधे दाखवलेली एक गोष्ट आठवली. एक मुलगा एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करतो आणि मग आईवडील तयार नाहीत असं सांगून काही काळाने तिच्याशी संबंध तोडून टाकतो. ती मुलगी पोलीसात जाते, मग त्याचा बाप पोलीसच असतो तो त्याच्या ओळखी वापरुन तिचा खून करवतो, वगैरे वगैरे. थोडेफार तपशील सोडले तर "प्रेम"संबंध जुळणे, मग त्यातल्या मुलाने मुलीकडे शरीरसंबंधांची मागणी करणे, मग काही दिवसांनी हौस फिटल्यावर मुलाने संबंध तोडून टाकणे आणि मुलीने बलात्काराची केस टाकणे हा एकच पॅटर्न दिसून येतो. क्राईम पॅट्रोलमधल्या कथेत खूनही झाला इतकाच काय तो वाढीव फरक. आता हल्ली यात भर पडली आहे ती नेहमीच्या मथळ्यांना जोडून "इंटरनेटच्या माध्यमातून/फेसबुकवर जुळलेल्या प्रेमातून" या उपसर्गाची (prefix). अगदी आम्ही पेपर बंद केला म्हटलंत तरी आपण ऑनलाईन वर्तमानपत्र वाचतोच. त्यातून दृकश्राव्य मिडिया आहेच या बातम्यांना मसाला लावून सांगायला. मला एकच वाटतं, तुम्ही वाव का दिलात?? तुम्ही पहिल्याच स्पर्शाला ठाम विरोध का नाही केलात? एकदा मी ही फिल्म केली किंवा हा जॉब मिळाला की बास असे म्हटलं तरी लिमिट क्रॉस झालीच होती! आणि जर खरच कोणी सक्ती केली तर त्याच वेळी कायद्याचा आधार का नाही घेतलात? मिडिया ट्रायल होण्याची वाट का बघत बसलात? किंवा त्या मुलाच्या आईवडिलांकडे किंवा पोलीस तक्रार करुन तो मुलगा सुधारेल अशी खुळचट आशा ठेवून का होतात? अगदी त्या मुलाला शिक्षा जरी झाली, तरी त्याला कायद्याच्या कचाट्यात पकडून त्याला शिक्षा दिल्याचं मानसिक समाधान मिळेलही, पण त्या आधी या मुलींना त्यांनी स्वतःचं नुकसान करुन घेतलेलं आहे हे लक्षात का येत नाही? 

खरोखर अत्याचार होतो तेंव्हा चीड येतेच, आणि गुन्हा करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे याबद्दल दुमत नाही. 

प्रलोभनाचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. पण त्या क्षणी डोकं शाबूत ठेवून ठाम पणे ज्यांनी नाही म्हटलं त्यांना माझा साष्टांग नमस्कार. कारण तसं ठामपणे नकार द्यायला संस्कारांबरोबरच प्रचंड धीर आणि आत्मबळ लागतं. आपण कमकुवत असून चालत नाही. तुम्हाला नाही म्हणता आलं असेल, त्याचा अभिमान बाळगा. मला आहे अभिमान, अगदी दारू पिणार्‍यांबरोबर बारमध्ये जाऊन थम्प्सप पिऊन बाहेर येण्याचाही. जिथे आपण एकदा हो म्हटलं, तिथे आपण संपतो!! मग एकापाठोपाठ एक प्रलोभनं येऊ लागतात. आपलं लिमिट वाढू लागतं. तडजोड (कोंप्रोमाईज), करून आयुष्यात काही मिळवायचं म्हणून जर मूळ लिमिट तोडली असेल तर नंतर इतरांकडे बोट दाखवून त्यांना दोष देण्यात काय अर्थ उरतो? मुळात जिथे असे कोंप्रोमाईज करावे लागतात तिथे तुम्ही जाऊ नका, गेलात तर 'नाही' म्हणायचे बळ अंगी बाळगा, आणि मग तुम्हाला जे हवं ते आयुष्यात मिळालं नाही तरी पश्चात्ताप होऊ देऊ नका! 'या ना त्या मार्गाने' (By hook or crook) मध्ये आपलं ही नुकसान होत असतंच!! एक लाख ट्विट्स तुम्हाला समर्थन देणारे असतील तरी एकदा स्वतःच लिमीट ओलांडली की ती घसरण यांना कुठे घेऊन जाईल आणि काय भोगायला लावेल याची कल्पनाही करवत नाही! 

इंग्रजीत एक वाक्य आहे: Politics is the downstream of culture - Andrew Breitbart (राजकारण हा संस्कृतीचा परिपाक आहे - अँड्र्यू ब्राईट्बार्ट). असं मी अचानक का म्हणतोय. कारण त्या विचारांचे लोक कायदा करण्याच्या आणि अंमलबजावणीच्या क्षेत्रात शिरले की काय होतं याचा परिपाक असणारा सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आजच वाचला

  

२०११ साली शेख अहमद नावाच्या रिक्षाचालकाने घरी सोडण्याच्या बहाण्याने सेंट मेरी हायस्कूलच्या इयत्ता सहावीच्या १३ वर्षीय विद्यार्थीनीचे अपहरण केले होते आणि तिच्या वडिलांकडे २ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मुलीचे वडील खंडणी देण्यासाठी गेले असता पोलिसांनी मुलीला वाचवले होते.

जर अपहरणकर्त्याने अपहरण केलेल्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला नाही, त्याला जिवे मारण्याची धमकी दिली नाही आणि त्याच्याशी चांगले वर्तन केले तर अपहरणकर्त्यास भारतीय दंड संहितेच्या कलम ३६४-अ नुसार जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकत नाही असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. "कलम ३६४ अ (अपहरण आणि खंडणी) अंतर्गत आरोपींना दोषी ठरवण्यासाठी तीन गोष्टी सिद्ध करणे आवश्यक आहे. या तीन गोष्टी म्हणजे- एखाद्या व्यक्तीचे अपहरण करणे किंवा त्याला ओलिस ठेवणे, अपहरणकर्त्याला जिवे मारण्याची धमकी देणे किंवा मारहाण करणे, अपहरणकर्त्याकडून असे काही करणे की ज्यामुळे सरकार, इतर कोणत्याही देशाला किंवा कोणत्याही पीडित व्यक्तीला धोका होऊ शकते किंवा ठार मारले जाऊ शकते अशी भीती व्यक्त होणे. सरकारी संस्थेवर किंवा दुसर्‍या व्यक्तीवर खंडणी देण्यासाठी दबाव आणला गेला हे सिद्ध करावे लागेल" असे कोर्टाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या जन्मठेपेच्या आदेशाला आव्हान देत तेलंगाना येथील रहिवासी शेख अहमद याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेण्यात आली. या शिक्षेविरूद्ध अहमदची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावत त्याला आयपीसीच्या कलम ३६४ अ नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कलम ४६४ अ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा किंवा फाशीची शिक्षा ठोठावताना पहिल्या अटी व्यतिरिक्त दुसरी किंवा तिसरी अटदेखील सिद्ध करावी लागेल, अन्यथा एखाद्याला या कलमान्वये दोषी ठरवले जाऊ शकत नाही असे कोर्टाने सांगितले.

पीडित मुलीच्या वडिलांनी कोर्टात सांगितले होते की अपहरणकर्त्याने मुलीला कधी इजा करण्याची किंवा जिवे मारण्याची धमकी दिली नव्हती. इथे एक लहानशी शंका अशी की पैसे मिळाले नाहीत तर ठार मारायची शक्यता किंवा इच्छा नसेल, किंवा इतर अपाय करण्याचा इरादा नसेल, तर माणूस कुणाचं अपहरण का करेल? "तुमची मुलगी माझ्याकडे आहे, मला दोन लाख द्या" याचा अर्थ काय होतो? तर्क आणि एकंदर डोकं शाबूत असलेला कुठलाही माणूस अपहरण झाल्यावर खंडणीसाठी फोन आला की त्याचा, "तुझ्या मुलीला मी पळवलं आहे, जर तू मला दोन लाख दिले नाहीस तर तिचा खून करेन. आणखी काय काय करेन याची कल्पना करा" असा घेईल. थोडक्यात अपहरण करण्यातच  'शारिरिक व मानसिक शोषण' तसेच 'जीवाला इजा होण्याचा धोका असणे' या गोष्टी अध्याहृत आहेत. पण या प्रकरणात माननीय सर्वोच्च न्यायालयाला तसे वाटत नसावे. आपली पितृसुलभ भावना शमवण्यासाठी शेख अहमदने त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले आणि ती मुलगी आपल्याकडे ठेवण्याचा दोन लाख रुपये खर्च तिच्या जन्मदात्याकडे मागितला असा त्यांचा समज झाला होता की काय हे सांगता येणार नाही. इथे पीडित मुलीच्या वडिलांनी काय सांगितलं यापेक्षा 'अल्पवयीन मुलीचे अपहरण' हाच सगळ्यात मोठा गुन्हा ग्राह्य धरून त्यात 'शारिरिक व मानसिक शोषण' तसेच 'जीवाला इजा पोहोचवण्याचा इरादा' हे गृहित धरायला हवं. इथे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आलोचना योग्य ठरेल की नाही कल्पना नाही, पण  कायदा कितीही गाढव असला तरी त्याचा कायद्याचा अन्वयार्थ लावण्याचे (interperetation) काम हे त्या खुर्चीत बसलेली हाडामांसची माणसेच करत असतात आणि त्यांच्याकडून असा विचित्र निर्णय अपेक्षित नाही. 

पण... पण... पण... वर म्हटल्याप्रमाणे राजकारणाबरोबरच कायद्याचे क्षेत्र हे देखील संस्कृतीचा परिपाक असावा. There is no reason why the judiciary has also not become a downstream of culture. 

जाता जाता एकच सांगतो, की मला कायद्याचे ज्ञान नाही, पण शक्य असल्यास यावर कुणीतरी पुनर्विचार याचिका दाखल करणे आवश्यक आहे. त्याचे फलित काही येईल अशी आशा नाहीच, पण या गोष्टी अशाच वार्‍यावर सोडल्या, तर ही 'लिमीट' पुढे किती ओलांडली जाईल याची शाश्वती नाही. एका जुन्या लेखात म्हटल्याप्रमाणे If you are not ready to surrender everything, do not surrender anything.

एक व्यक्ती म्हणून, एक कुटुंब म्हणून, आणि एक समाज म्हणून आपणच एकदा लिमिट ओलांडली की पुढे जाऊन कोर्टाने असा निर्णय दिला तर कायद्याला आणि कोर्टाला दोष देण्यात काय अर्थ? अपहरण केल्यावर रावणाने सीतेला हात लावला नाही म्हणून तो चांगला हा युक्तिवाद करणारे लोक कायद्याचं शिक्षण घेऊन सर्वोच्च न्यायालयात गेले की असं होत असावं. अधिक टिप्पणी करणे धोकादायक आहे म्हणून इथेच थांबतो.

कसं आहे, की एक व्यक्ती, एक कुटुंब, एक समाज म्हणून आपणच एकदा मर्यादा लवचिक केली की पुढे जाऊन न्यायालयाने असा निर्णय दिला तर कायद्याला आणि न्यायालयाला दोष देण्यात काय अर्थ?

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. ९, शके १९४३

टीप: ही माझी वैयक्तिक मतं आहेत. मी अनेकांच्या दृष्टीने मागास विचारांचा असू शकेन, पण माझा तत्त्व, मूल्य, संस्कार, संस्कृती, आणि लग्नसंस्था यावर विश्वास आहे. मला तो टिकवावा अस वाटतं आणि मी प्रयत्न करतो. इतरांना माझी मतं बंधनकारक आहेत असं समजू नये!




Wednesday, June 16, 2021

डावे म्हणजे कोण रे भाऊ?

अनेक जण विचारतात डावे म्हणजे कोण, ते कसे ओळखायचे? याचं पुस्तकी उत्तर देता येतं, डावे उजवे या शब्दांची उत्पत्ती सांगता येते, पण या संज्ञेचा अर्थ पटकन समजायला हवा असेल तर गोष्टीरूपाने किंवा उदाहरणाला पर्याय नाही.

नोवाक जोकोविच (Novak Djokovic) यंदाची फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा जिंकला. रविवारी झालेला सामना संपल्यावर लगेचच त्याने त्याची रॅकेट समोरच्या म्हणजे पहिल्या रांगेत बसलेल्या सामन्यादरम्यान सतत प्रोत्साहन देणाऱ्या आपल्या एका छोटूशा चाहत्याला भेट दिली. आपल्या लाडक्या खेळाडूने आपल्याला त्याची रॅकेट भेट दिली आणि ती सुद्धा कुठली, तर ज्या रॅकेटने खेळून फ्रेंच ओपन स्पर्धेचा अंतिम सामना जिंकला ती हे पाहून तो लहानगा चाहता जवळजवळ वेडा व्हायचा शिल्लक होता. या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल झाला नसता तरच नवल होतं.

Novak Djokovic at French Open

अमेरिकेत हा व्हिडीओ पसरल्यावर तिकडचे वेडसर डावे आणखी पिसाळले आणि नोवाकला सोशल मीडियावर घाल घाल शिव्या घातल्या. त्यांच्या मते नोवाकने रॅकेट भेट द्यायला शेवटच्या रांगेतील "गरीब" मुला ऐवजी पहिल्या रांगेतल्या श्रीमंत मुलाची निवड करून फार मोठा सामाजिक गुन्हा केला होता.

एका दिलदार खेळाडूने त्याच्या लहानग्या चाहत्याप्रती दाखवलेल्या निर्व्याज स्नेहातही डाव्यांना भेदभाव दिसला. आता कळलं डावे म्हणजे कोण, किंबहुना डावी मानसिकता म्हणजे काय, ते?

आता जरा त्यांची चिरफाड करूया:

(१) पहिल्या रांगेत बसणारा मुलगा हा शेवटच्या रांगेत बसलेल्या मुलापेक्षा श्रीमंत कसा? अनेक आईवडील आपल्या मुलांना असा सामना बघायला मिळावा म्हणून कष्टाचे पैसे साठवून तिकीट विकत घेतात.

(२) एखाद्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं तिकीट काढायची ऐपत असणारी किंवा ते परवडणारी व्यक्ती, ती शेवटच्या रांगेतील तिकीट काढून बसली आहे म्हणून "गरीब" कशी काय ठरते?

(३) हे म्हणजे आयफोन ११ घेणारी व्यक्ती ही गरीब आणि आयफोन १२ घेणारी व्यक्ती श्रीमंत आहे असं म्हणण्यासारखं आहे.

या डाव्यांना वेळीच ठेचलं नाही, तर जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत विष पेरणी करून ठेवतील. डाव्यांच्या रक्तातच वीष आहे आणि त्यांच्या रंध्रारंध्रातून वीष पाझरतं असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. अशा प्रकारे प्रत्येक नात्यात दमन, भेदभाव, वर्णभेद, सूक्ष्मभेद, शोषण यांचा शोध लावून विषपेरणी करून  समाजाची, कुटुंबव्यवस्थेची वीण उसवायचं काम ते करत आहेत आणि करत राहतील. नसलेला अन्याय शोधून आणि समाजात फूट पाडून त्यांना रोजी रोटी आणि फेमिनिस्ट बेटी यांची प्राप्ती होत असते.

डाव्यांपासून स्वतःला आणि आपल्या मुलांना वाचवा, शक्य तिथे आणि शक्य त्या मार्गांनी त्यांना ठेचा.

दुर्लक्ष केलं तर एके दिवशी तुमच्यावर नाकात बोटं घालून मेकुड काढताना तुम्ही एका नाकपुडीत जास्त उत्खनन करून दुसऱ्या नाकपुडीवर अन्याय केला आहे असंही सांगतील.

म्लेंच्छ-शेषो-वाम-शेषश्च सेंट-शेषस्तथैव च |
पुनः पुनः प्रवर्धन्ते तस्माच्छेषं न रक्षयेत् ||

🖋️ मंदार दिलीप जोशी
जेष्ठ शु. ६, शके १९४३


Saturday, May 22, 2021

आपण सगळे यिगल येहोशुआ

Yigal Yehoshua

हा फोटो ज्या व्यक्तीचा आहे त्या व्यक्तीचं नाव यिगल येहोशुआ होतं. 'होतं' म्हणजे तुम्हाला वाटतंय तेच, आता यिगलचा फोटो भिंतीवर आहे. इस्राइलच्या Lod शहराचा नागरिक असलेल्या या व्यक्तीला तिथे राहणाऱ्या अरब तरुणांनी दगडांनी ठेचून मारलं. यिगल येहोशुआ इस्राइलचे एक सामान्य नागरिक होते, आणि त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी, संस्थेशी, किंवा उपक्रमाशी (वाचा: कांडाशी) काडीमात्र संबंध नव्हता. वेगळ्या भाषेत सांगायचं तर यिगलला 'तटस्थ' म्हणता येईल.  यिगलचा मृत्यू अशा प्रकारे झाला नसता आणि नंतर कधीतरी नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू पावले असते तर आज त्यांचं नावही कुणाला कळलं नसतं. 

मग यिगल येहोशुआ नामक व्यक्तीच्या हत्येबाबत तुम्हाला काय आणि महत्वाचं म्हणजे का जाणून घेणं आवश्यक आहे?

त्यांना का मारलं म्हणजे त्यांना असं मारण्याबद्दल अरब लोकांचं काय मत आहे हे विचारलं गेलं तेव्हा एका अरब तरुणाने सांगितलं की हसौना (Hassouna) नामक एका अरब युवकाला गोळी घातली गेली त्याचा बदला म्हणून यिगलची अशी हत्या झाली. आम्ही जशास तसे 'न्यायाने' असाच सूड उगवत राहू!

ही त्या बातमीची लिंक https://tinyurl.com/dudyyps8. असंही 'Yigal Yehoshua' हे शब्द टाकून तुम्ही शोध घेतल्यास अनेक संकेतस्थळांवर ही बातमी आणि हा फोटो तुम्हाला सापडतील.

आता आपण पाहूया की या सध्या भासणाऱ्या घटनेचे विश्लेषण आवश्यक का आहे. कारण खरं तर फार सोपं आहे, पण हल्ली सोप्या गोष्टीच उलगडून सांगाव्या लागतात, आणि कठीण विषयांबद्दल लोकांचं मत आधिच बनलेलं असत! तर, या सध्या भासणाऱ्या घटनेचे विश्लेषण अत्यावश्यक आहे कारण यिगल येहोशुआ जसे सामान्य व्यक्ती होते तितक्याच सामान्य असलेल्या तुमच्या आमच्यासारख्यांशी याचा थेट संबंध आहे. इथे हे सांगताना यिगलला एक उदाहरण म्हणून वापरावं लागतंय हे त्यांचं दुर्दैव आहे. 

आधी हे लक्षात घ्या की यिगल जिथे मारले गेले ती जागा आणि तो भाग त्यांच्या नेहमीच्या वावरातला होता. ते आपल्या घरी किंवा ऑफिसला जे काही असेल तिथे जात होते, सांगण्याचा उद्देश हा की ये त्यांच्या नेहमीच्या रस्त्याने जात होते. त्याच मार्गावर त्यांना ठार केलं गेलं. याने काय होतं की सगळ्या 'टार्गेट ऑडियन्स' ला हा संदेश जातो की 'तुम्ही' 'आमच्यापासून' सुरक्षित नाही; आमची तुम्हाला मारून टाकण्याची इच्छा झाली तर जिथे सापडाल तिथे ठार करु. म्हणून तुम्ही आम्हाला सदैव घाबरून, आमच्या पासून सदैव दबून राहण्यातच शहाणपणा आहे.

आता स्मरणशक्तीला जरासा ताण देऊन पहा, हे जे 'जिथे सापडाल तिथे ठार करु' कुठेतरी वाचल्याचं किंवा ऐकल्याचं वाटतंय का? तसं वाटत असेल तर तुमचं बरोबरच आहे, तेच आणि तसंच आहे ते. त्या शिकवणीचा सार्वकालिक संदेश, अशा हत्या करणारे आपल्या कृतीतून व्यवस्थित समजवतात की बघा, तुम्ही आम्हाला जिथे सापडाल तिथे खलास करू. म्हणून आम्हाला घाबरून, दबून रहा. या शिकवणीला कुणाच्यातरी आत्मचरित्रात जेव्हा दैवी उपदेश म्हणून खपवलं जातं तेव्हा वेळीच त्याचा नायनाट न केल्यास त्याचे परिणाम भयंकर महागात पडतात. 

आपल्याकडे एक श्लोक आहे:
अग्नि: शेषं ऋण: शेषं शत्रु: शेषं तथैव च ।
ते पुन: पुन: प्रवर्धेत तस्मात् शेषं न कारयेत् ।।

इथे जिझिया कसा घ्यावा याचा उल्लेख आहे अशा 9:29 क्रमांकाच्या दुसऱ्या एका तथाकथित दैवी उपदेशाला समजून घेणं आवश्यक आहे. यात स्पष्टपणे म्हटलं आहे की ज्याला शत्रू मानलं आहे त्याच्या स्वाभिमानाचा चेंदामेंदा करावा; त्याच्याकडून फक्त एखादा कर वसूल करणे नव्हे तर शत्रूला कायम अपमानित आणि कमकुवत मानसिक स्थितीत ठेवायचं आहे की तुम्हाला हवं तसं त्याला लुटू शकाल, जेव्हा हवा तेव्हा आणि हवा तसा त्याचा अपमान करू शकाल पण त्याच वेळी शत्रूला त्या विरोधात न्याय मागण्याचा हक्कच असू नये. त्याची एकदम हिटलर किंवा स्टालिनच्या गोष्टीतील कोंबडी करून टाका.

हा तथाकथित दैवी उपदेश वाचल्यावर हिंदी सिनेमातल्या एका टिपिकल कथावस्तूची आठवण येते ज्यात बलात्कार होण्यापासून हिरो त्याच्या बहिणीला वाचवतो आणि त्या हाणामारीत बलात्कार करणारा मारला जातो म्हणून त्याचा भाऊ हिरोच्या संपूर्ण  खानदानाला मारून टाकतो. का, तर त्याच्या भावाला हीरोने मारलं म्हणून. म्हणजे त्याचा भाऊ हीरोच्या बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न करत होता हा अपराध, पाप आहे वगैरे गोष्टींना त्याच्या लेखी शून्य महत्व असतं ― पण आपला भाऊ हीरोने मारला याचा सूड म्हणून त्याच्या पूर्ण खानदानाला ठार करणे हा त्याला न्याय वाटतो. त्याची हीच मानसिकता आहे आणि ही मानसिकता येते तथाकथित दैवी उपदेश क्रमांक 9:29 मधूनच येते. 'उमर का सुलहनामा' म्हणून ओळखला जाणारा एक शांतीकरार (खिक्) याच मानसिकतेचं एक्सटेन्शन आहे ― इब्न कसीर ची तफ़सीर बघितली तर हे पटकन लक्षात येतं. कुणीही शोधून वाचू शकतं, फुकट आहे!

या पार्श्वभूमीवर हे लक्षात घ्या की मारला गेलेला उपरोल्लेखित हसौना नामक अरब तरुण हा दंगलीत सहभागी असताना मारला गेला होता, त्याच्या घरात घुसून त्याला कुणी मारलेलं नव्हतं. हमासने सोडलेल्या क्षेपणास्त्रांचे प्रत्युत्तर इस्राइलने द्यायला सुरुवात केली म्हणून इस्राइली नागरिक असलेल्या अरबांनीच पहिल्यांदा दंगली सुरू केल्या. या दंगलींचा त्रास सामान्य इस्राइली नागरिकांनाच (वाचा: ज्यू) होत होता. म्हणजे आपल्याकडे मिनी-पाकिस्तान असतात तसे तिकडे मिनी-पॅलेस्टाइन आहेत. 

तर, अरबांनीच पहिल्यांदा दंगली सुरू केल्या, त्याचं प्रत्युत्तर इस्राइलने द्यायला सुरुवात केली, त्यात दंगलीत सामील असलेला तो अरब तरुण हसौना मारला गेला ― पण तरी तो दोषी नाही बरं का! तरी त्याच्या मृत्यूचा बदला कशाशी काही संबंध नसलेल्या एका निष्पाप इस्राइली नागरिकाला मारून घेतला जातो आणि त्या हत्येला न्याय म्हटलं जातं तेव्हा त्या विचारांच्या चारित्र्याचे विश्लेषण करून ते समजून घेणं आवश्यक ठरतं. आणि त्याला तथाकथित दैवी शिकवण म्हटलं जातं हा आणखी एक क्रूर विनोदच म्हणायला हवा.

हे सगळं जाणून घेणं आपल्याला का गरजेचं आहे? 

कारण आपण सगळेच यिगल येहोशुआ आहोत. 

अन्याय सहन करणारा, अन्याय करणाऱ्यापेक्षा मोठा गुन्हेगार असतो. 

एक प्रयोग करून पहा, यिगल येहोशुआ यांची हत्या हा अन्याय आहे असं एखाद्या मिश्र ग्रुपात बोलून पहा. याच्यावर प्रतिक्रिया नक्कीच आश्चर्यचकित करणाऱ्या नसतील हे नक्की. अपेक्षितच प्रतिक्रिया असणार आहेत. तुम्हाला इनबॉक्सात गाठून पोस्ट किंवा मेसेज डिलीट करायला सांगणारा एखादा मोदींवर हिंदूंसाठी काहीही न केल्याचा मोदींवर सतत आरोप करणारा कट्टर हिंदुत्ववादीच निघायचा!

आणखी एक, जेक गार्डनरला विसरू नका बरं!

🖋️ मंदार दिलीप जोशी
माघ शु. दशमी, शके १९४३

टाइम्स हॅव चेंज्ड अर्थात कालाय तस्मै नमः

नुकताच कोकणात गावी गेलो होतो काही कामानिमित्त. आमच्या आणि शेजारच्या घराभोवती फेरफटका मारताना एक गोष्ट एकदम अंगावर आली. त्या निमित्त त्या क्षणी हे वाटलं ते मांडतोय. ते चूक की बरोबर यापैकी काहीच नाही. फक्त ते वाटलं, ते आहे इतकंच. 

जुनी खिडकी नवी खिडकी

जुना काळ म्हणजे नेमका किती वर्षांपूर्वीचा? काळ बदलला असं कधी म्हणता येतं? Age is just a number अर्थात वय हा फक्त एक आकडा आहे या वाक्याचा नक्की अर्थ काय? 

शारिरीक वयावर आपलं नियंत्रण नाही पण मनाने आपण म्हातारे होता कामा नये असं म्हणतात पण काही गोष्टी बघितल्या की अचानक मनाने आपण एकदम वीसेक वर्ष तरी मोठे झालोय की काय असं वाटत राहतं. 

डावीकडची खिडकी जुन्या पद्धतीच्या घराची तर उजवीकडची खिडकी पडझड व्हायला आलेल्या जुन्या घराला पाडून नव्याने बांधलेल्या घराची. 

आधुनिकतेला कधीच विरोध नाही पण अशा गोष्टी बघितल्या की कुठेतरी गलबलतं हे नक्की. अशाच खिडकीत बसून आजी/पणजी आम्हा मस्तीखोर मुलांना ओरडत असे, शेजारच्या घरातील अशाच खिडकीत बसलेल्या समवयस्क सखीशी सुखदुःखाच्या, शिळोप्याच्या गप्पा मारत असे. त्यांच्या गप्पा सुरु असताना घरातली सून पलीकडच्या खिडकीतल्या आजीला आपल्या आजेसासूच्या "बघा ना, या मुंबईहून पाठवलेलं औषध वेळेवर घेतच नाहीत" अशा प्रेमळ तक्रारी सांगत असे. लपाछुपी खेळताना पटकन लपायला आमच्यापैकी एखादा या गवाक्षातून आत जायचा प्रयत्न करत असे.

असो, काय काय आठवेल सांगता येत नाही. त्या आज्या, त्या पणज्या कधीच गेल्या. त्यांच्या नातसुना आता त्यांच्या सारख्या दिसू लागल्या. हे बदल घडतानाही काही विशेष वैषम्य वाटलं नाही, जसा काळ पुढे सरकेल तसं हे होणारच असं म्हणून मनाने स्वीकारलं. मग या दोन खिडक्यांकडे पाहून एकदम भावुक व्हायला का व्हावं? 

विचार करता करता अचानक डॉ राजीव मिश्रा यांची एक पोस्ट आठवली. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की माणसं महत्वाची नाहीत, संस्कृती आणि सभ्यता (civilization) महत्वाच्या आहेत, आणि ही गोष्ट मानवी मनात पिढ्यानपिढ्या कोरलेली आहे. डाव्या फोटोतली जुन्या घराचा अविभाज्य भाग असलेली खिडकी ही याच संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते. कदाचित म्हणूनच माणसांच्या मर्त्य असण्यापेक्षा गावाकडच्या अशा घरांचं हे असं आधुनिक होणं अपरिहार्य असलं तरी कुठेतरी मनाला झटका देऊन अचानक वीसेक वर्ष पुढं ढकलतं असं वाटतं.

उजवीकडची खिडकी नव्याने बांधलेल्या घराची. या खिडकीतून आता आजी, पणजी डोकावणार नाही. फार फार तर तिचा खापरपणतू किंवा पणती मोबाईलला रेंज येते आहे की नाही बघायला येतील खिडकीत, गावाकडे कधी आलेच तर. असाही हल्ली अनेकांचा फक्त मालमत्तेवर दावा कायम ठेवण्यापुरता संबंध असतो गावाशी. त्यांच्या लेखी ते आपलं घर, आपली वाडी नसते, तर सतत सोयीनुसार आधुनिक करत राहण्यायोग्य आणि आपला क्लेम ठेवण्यायोग्य 'प्रॉपर्टी' असते. पण विषयांतर नको.

काळ पुढे सरकला, बदलला असं नेमकं कधी म्हणता येतं हे नाही ठाऊक, पण असे बदल बघितले की माझ्या तरी अंगावर येतात हे नक्की. आपण "शहरातून" "गावाकडे" येतो ते "गावात" रहायला. आपण आपल्या संस्कृतीच्या मुळांकडे आकर्षिले जात असतो. पण गावच आता शहर (खरेतर शहरी!) बनत चाललं आहे हे झेपत नाही.

गोष्टी घडल्या म्हणून काहीच बिघडत नाही, पण बघवतही नाही. गोष्टी आधीही बदलत होत्या, पण आता त्यात भावुकतेला स्थान नाही. 

खरंच आहे, टाइम्स हॅव चेंज्ड.

🖋️ मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. ९ (सीता नवमी), शके १९४३

Tuesday, April 13, 2021

मालिका, शब्द, आणि आपण

एका समूहावर कुणीतरी प्रश्न विचारला होता, तो साधारणपणे असा होता की त्रागा वगैरे ठीक आहे पण या मालिकांचा मनावर आणि प्रत्यक्ष आयुष्यावर परिणाम होतो का?

तर नक्कीच होतो. या संदर्भात विचार करत असताना मला कुणीतरी शेअर केलेली प्राजक्ता कणेगावकर यांची पोस्ट आठवली. त्यात त्यांनी मारी कॉंडो म्हणून एक जगप्रसिद्ध कन्सल्टंट आहे त्यांच्या बाबतीत लिहिलेला तपशील आठवला. 

"मारी कॉंडो लोकांना घर कसं आवरावं याचं कन्सल्टेशन देते. तिचं यावर एक छान पुस्तकही आहे, ज्यात तिने एक अप्रतिम किस्सा सांगितला आहे. एका क्लायंटचं घर तिनं छान आवरुन दिलं. काही दिवस गेल्यानंतर तिला क्लायंटचा फोन आला की घरात अशांत वाटतंय. मारी जरा चक्रावली. कारण असं याआधी कधी झालं नव्हतं. ती क्लायंटच्या घरी पोचली तेव्हा तिलाही घरातून अशांत व्हाईब्ज जाणवल्या. तिने घरभर हिंडून पाहिलं. पसाऱ्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी तिने घरातली कपाटं उघडली. मग तिला कळलं की अशांततेचं मूळ कुठे आहे ते. प्रत्येक कपाटातल्या प्रत्येक वस्तूवर, स्टोरेजचे बॉक्सेस, बरण्या, कंटेनर्सवर लेबल्स लावलेली होती. स्वयपाकघरात तर प्रत्येक भांड्यावर डब्यावर लेबल चिकटवलेलं होतं."

"मारीने ती सगळी लेबल्स काढायला लावली. तिने पुढे असं लिहिलं आहे की शब्द प्रत्यक्ष उच्चारला गेला नाही तरी तो वाचला जातो. नजर त्याची दखल घेते. मेंदू त्याचं प्रोसेसिंग करतो. ही जी प्रक्रिया अव्याहत चालू असते, त्याने नाद होतो, आवाज होतो, त्याने शांतता ढवळली जाते. घरात पसारा असेल तर हे शब्द ऐकू येत नाहीत कारण बाकीच्या गोष्टींच्या नादामध्ये त्यांचे नाद लपून जातात (पण असतात). घर रिकामं झाल्याने त्यांचा नाद, आवाज अधिक सुस्पष्ट ऐकू येऊ लागला इतकंच. त्यामुळे तिने लेबल्स काढली. क्लायंटने नंतर तिचं म्हणणं मान्य केलं."

सतत शब्द आदळत असतात आपल्यावर सगळीकडून. मालिकांतून तर आपल्यावर दुहेरी अत्याचार होत असतो, दृक्श्राव्य असा. अत्यंत हीन दर्जाचे संवाद असलेल्या, ज्यांत सतत कटकट, भांडणे, कारस्थाने, कुणीतरी कुणावर तरी सतत खार खाऊन आहे, सतत अतिरेकी आणि विकृत हावभाव करणाऱ्या आणि विचित्र कपडे वापरणाऱ्या व्यक्तिरेखा ज्यांत आहेत अशा मालिकांचा भडीमार इच्छुक प्रेक्षकांवर आणि अनिच्छेने बघणाऱ्या कुटुंबियांवर सुरू असतो. अनेक जण यावर अनेक उपाय सुचवत असतात त्यातला एक की आपण दुसऱ्या खोलीत जाऊन बसावं... मारी कॉंडोने पुस्तकात सांगितलेला किस्सा आठवला तर यातली गडबड लक्षात येते. ती म्हणजे दुसऱ्या खोलीत बसलं तरी घरात तो नाद जाणवत राहतोच. याच नकारात्मक नादाचा परिणाम हा कळत नकळत बघणाऱ्या प्रेक्षकांवर होतच असतो आणि त्याचा परिणाम इतरांशी त्यांच्या असलेल्या वागण्यात झाल्याचं दिसून येतं.

एका मालिकेत मामा आणि भाचीचं प्रेम प्रकरण दाखवलं होतं. आता यात एक गोम आहे. हे देशातल्या काही भागांत सामान्य आहे. पण सगळ्याच भागात नाही. पण याच्या पासून सुरवात करत हळू हळू हे इतर नात्यांपर्यंत वाढवत नेलं जाऊ शकतं. उद्या सख्खे भाऊ बहीण प्रेमात पडताना दाखवले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

कारण जवळजवळ प्रत्येक वाहिनीवर एखादी तरी मालिका अशी आहे की जिच्यात एखादी वाईट किंवा विचित्र गोष्ट (aberration) समाजात घडत असेल तर ती तशीच म्हणजे सामान्य किंवा नॉर्मल नाही हा संदेश जाण्याऐवजी त्याचं अशा प्रकारे सामान्यीकरण (normalisation) आणि त्या गोष्टीला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जोमाने सुरू आहे.

एका मालिकेत विवाहबाह्य संबंधांचं चित्रण होतं. मालिकेबाबत जास्त चर्चा नको, पण घटस्फोट देऊन नवऱ्याला लाथ मारून बाहेर काढायच्या ऐवजी जिच्याशी लफडं असतं त्या बाईला धडा शिकवायच्या नावाखाली तिच्याबरोबर एकाच घरात राहणारी बायको आणि तिला साथ देणारी सासू दाखवून झीने नक्की काय साधलं? विवाहबाह्य संबंध असतात समाजात, पण नवरा त्याच्या लफडयाबरोबर त्याच घरात एकाच बेडरूममध्ये राहतो आणि बायकोही मुलाबरोबर आणि सासुसासऱ्यांबरोबर त्याच घरात हळदीकुंकू, त्या लफडयाची चेष्टा करत मजा मजा करत राहतात हे काहींना बघायला विनोदी वाटत असलं तरी हे एका सामाजिक विकृतीचं उदात्तीकरण नव्हे का?

दुसऱ्या एका वाहिनीवर उंच, गोरी आणि सुंदर मुलगी आणि बुटका आणि अत्यंत सामान्य दिसणारा, फारसा कर्तबगार नसणारा मुलगा अशी जोडी दाखवली आहे. आणखी एका मालिकेत एक लग्नाळू मुलगा घरातल्या मोलकरणीशी सूत जमवून लग्न करताना दाखवला आहे.

ज्या सुबोध मालिकेची इथे अजूनही यथेच्छ चेष्टा सुरू असते, त्यात तरी वेगळं काय दाखवलं आहे? श्रीमंत पण चाळीशी केव्हाच उलटून गेलेल्या विधुराच्या जवळजवळ गळ्यात पडून लग्न जमवणारी विशीतली तरुणी. उद्या चांगल्या घरातल्या तरुणींना आपल्या आसपास एखाद्या बऱ्यापैकी पैसेवाल्या पण वयाने पंधरा वीस वर्षे मोठ्या असलेल्या पुरुषाला पत्नीवियोग झाल्याचं समजल्यावर त्या पुरुषात त्या मुली आपला भावी नवरा पाहू लागल्या तर त्याला जबाबदार असणाऱ्या कारणांत या मालिकांचा नंबर नक्कीच वरचा असेल.

मागे एका तरुणांच्या मालिकेत मुलं आणि मुली एकाच घरात भाड्याने राहत असल्याचं दाखवलं होतं. ही मुलं प्रामाणिक, उद्यमशील वगैरे दाखवण्याच्या आडून असं मुलामुलींनी एकत्र राहणं हे सामान्य असल्याचं किंवा सामान्य असायला हवं असं सुचवण्यात मालिकेने कोणतीही कसर सोडलेली नव्हती.

तीच तीच सासू सुनेची भांडणं दाखवून कंटाळा आला म्हणून की काय एकाच कुटूंबातले बाकीचे सदस्य पण एकमेकांच्या विरोधात उठता बसता सतत कारस्थानं करत असताना दाखवले जाऊ लागले. एकमेकांचा सत्यानाश करण्याच्या जेवढ्या योजना दर क्षणाला त्यांच्याकडे बनत असतात तेवढ्या तर राजकारणातले लोक सुद्धा करत नसतील. एका मालिकेत तर आजी नातवाचा जीव घ्यायला तत्पर असल्याचं दाखवलं होतं. त्याच मालिकेत बहीण बहिणीचा जीव घ्यायचा प्रयत्न करते, भाऊ भावाचा, आणि बरंच काही.

संत तुकाराम हा चित्रपट पाहून कुणी संत होत नाही, आणि एखादा डाकूपट पाहून कुणी दरोडेखोर होत नाही हे वाक्य डायलॉग म्हणून तोंडावर मारायला ठीक आहे, पण दृश्य माध्यमांचा परिणाम जनमानसावर किती होतो याची प्रत्यक्ष उदाहरणे आजूबाजूला घडताना पाहिलेली आहेत.

धर्मेंद्रचा जुगनू चित्रपट दोन डझन वेळा पाहून त्यातल्या दरोड्याच्या दृष्याबरहुकूम तसाच दरोडा आपण घातल्याची कबूली आरोपींनी पोलिसांना दिली होती. सैराट सिनेमा प्रदर्शित झाल्यावर नुकतंच मिसरूड फुटलेल्या अनेक किशोरवयीन मुलांनी घरातून पळून गेल्याच्या बातम्यांत वाढ झालेली होती.

सिनेमाचा परिणाम जो आणि जेवढा होतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक मालिकांत होतो, आणि होतही आहे. रोज त्याच गोष्टींचा मारा सुरू असतो, आणि कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी संपूर्णपणे तो यशस्वी होत नाही. दुर्दैवाने अशा मालिकांचा प्रेक्षकवर्ग अशा पिढीतला आहे की जी स्वतः कर्तबगार आहे पण मनोरंजनासाठी म्हणून सुरवात करून त्याचं व्यसन कधी झालं हे तिला कळलेलंच नाही.

समाजात संस्कृती, प्रकृती, आणि विकृती हे एका विशिष्ट प्रमाणात असतात. प्रमाण व्यस्त झालं तरी शेवटी विकृती ही विकृतीच राहते. दुर्दैवाने मालिकांत मात्र या विकृती किंवा विचित्र गोष्टींचं सामान्यीकरण सुरू असल्याचं दिसतं. याला हळूहळू प्रतिष्ठा प्राप्त होईल. एक प्रकारचं ब्रेनवॉशिंगच आहे, आणि त्यातून आपण लवकरात लवकर बाहेर पडायलाच हवं.

न्यायदेवता आंधळी असते कारण तिला निष्पक्षपणे विचार करायचा असतो, तसंच पण जरा वेगळ्या अर्थाने घराबद्दल म्हणायचं झालं तर वास्तूही आंधळ्या व्यक्तीसारखी असते, तिला हे कळत नसतं की आवाज कोणाचे आहेत, खरे आहेत की खोटे आहेत, टिव्हीतून येत आहेत की प्रत्यक्ष माणसांच्या तोंडून. म्हणून आपण घरात निव्वळ काय बोलतो इतकंच नव्हे तर टीव्हीवर काय बघतो हे देखील तितकंच महत्वाचं ठरतं.

स्टुडिओत आठ आठ तास घोटवून घेतलेल्या गाण्याला आपण गायकांची....नव्हे स्पर्धकांची गायकी समजतो आणि अर्धवट ज्ञानाने पिवळे झालेले परीक्षक ज्या तोंड फाटेस्तोवर स्तुतीपर स्क्रिप्टेड प्रतिक्रिया देतात त्यांना खरं समजतो, आणि कोण जिंकणार हे ही आधीच ठरलेलं असलं तरी खरोखर सुंदर गाणारा स्पर्धक जिंकला/ली नाही तर वाईटही वाटून घेतो आणि त्यावर हिरीरीने चर्चाही करतो. हा ही एक प्रकारचा नकारात्मक नादच नव्हे का?! शिवाय, आपण दर्जेदार गायनाला मुकतो आहोत आणि गेली अनेक वर्ष आपली अलिखित राष्ट्रीय पॉलिसी असलेले दोन शब्द 'चलता है' छाप गायकीचा सदोष नाद आपल्या मनात साठवत जात आहोत.

गेमिंग अर्थात कॉम्पुटर/मोबाईल गेम्समध्ये जी मानसशास्त्रीय क्लृप्ती वापरली जाते तीच थोड्याफार फरकाने मालिकांत वापरली जाते. गेमिंगमध्ये कितीही अवघड गेम असला तरी खेळणाऱ्या व्यक्तीला अधूनमधून लहानसहान विजयांचं गाजर दाखवून सतत गेम खेळायला भाग पाडलं जातं, तसंच मालिकांच्या जवळजवळ प्रत्येक भागाच्या शेवटी उद्या म्हणजे पुढच्या भागात काय होणार आहे याचं औत्सुक्य चाळवून त्यावर विचार करण्यास आणि पुन्हा पुढे बघण्यास प्रवृत्त केलं जातं. 

मालिकांच्या बाबतीत एका मानसशास्त्रज्ञाचं विधान आठवलं, ते हे की मालिका या चित्रपटापेक्षा जास्त धोकादायक असतात कारण त्याने मनाला क्लोजर मिळत नाही. सिनेमात कथेचं वर्तुळ पूर्ण झाल्याने प्रेक्षकांना क्लोजर मिळतं, ते असंख्य भाग असलेल्या मालिकांतून मिळणं अशक्य असतं. क्लोजर न मिळाल्याने मानसशास्त्रीय विसंगती निर्माण होते आणि त्यातूनच सतत तोच नकारात्मक नाद मनात घेऊन आपण दिवसाचा शेवट करत असतो. काम कितीही असो किंवा नसो आजकाल जाणवणाऱ्या प्रचंड स्ट्रेस किंवा मानसिक थकव्याचं हे देखील एक मोठं कारण आहे असं वाटतं.

यातून बाहेर कसं पडायचं हा मात्र अवघड प्रश्न आणि खोल विषय आहे. मालिका नव्हत्या तेव्हा लोक जे करत होते ती परिस्थिती आणि सामाजिक वातावरण आज उरलेलं नाही आणि आज ही अवस्था आहे की मुलांच्या जडणघडणीकडे लक्ष देण्यापेक्षा, त्यांच्याशी संवाद वाढवण्यापेक्षा इतरांची आई काय करते आणि आपल्या फिटनेसची काळजी करण्यापेक्षा मालिकेतल्या वजनदार मुलीचं लग्न का ठरत नाही याची काळजी लोक जास्त करत असतात. 

कणेगावकर त्यांच्या लेखात पुढे एक उदाहरण देताना म्हणतात की "सप्तशतीमध्ये शु़ंभ दैत्याच्या मृत्युसमयाचं वर्णन करताना एक खूप सुंदर वाक्य वापरलं आहे. दिग्जनित शब्द शांतावला असं. इथे शब्द कोलाहल या अर्थी वापरला आहे. Sound is indestructible असं असलं तरी शब्द शांतवण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचा मार्ग शोधणं म्हणूनच फार गरजेचं झालं आहे."

तर असा मार्ग शोधण्यासाठी गुढीपाडवा हा त्याची सुरवात करण्याचा दिवस ठरो अशा तुम्हाला या सणाच्या निमीत्ताने खूप शुभेच्छा.

🖋️ मंदार दिलीप जोशी
चैत्र शुक्ल प्रतिपदा, शके १९४३ अर्थात गुढीपाडवा

Sunday, March 28, 2021

इतिहासाचा मृत्यू

"For historians ought to be precise, truthful, and quite unprejudiced, and neither interest nor fear, hatred nor affection, should cause them to swerve from the path of truth, whose mother is history, the rival of time, the depository of great actions, the witness of what is past, the example and instruction of the present, the monitor of the future."

- Author Unknown

विशिष्ट अभिनिवेश व काही घटकांबद्दल द्वेष मनी धरून समाजात वावरणारे लोक यांचाच आवाज आज मोठा आहे आणि त्यांना राजकीय पाठिंबाही आहे. अशा लोकांची इच्छा सत्य जाणून घेणे नाही तर निव्वळ हुल्लडबाजी आणि गुंडगिरी करणे इतकीच असते आणि त्यांच्यासमोर डोकं आपटत बसण्यापेक्षा लिहिणं बंद करणं हा निर्णय आज अनेक चांगल्या इतिहास संशोधक व लेखकांनी घेतलेला आहे. आज खलनायकांना सद्गुणांचा पुतळा तर नायकांचं चारित्र्य संशयास्पद ठरवण्याची कारस्थानं व्यापक पातळीवर सुरू असताना सत्याचे आवाज एकामागोमाग एक असे बंद होणं या गोष्टीची किंमत केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला चुकवावी लागणार आहे.

तैलबुद्धी समोर बैलबुद्धी बलवान असण्याचाच हा समय आहे, दुर्दैवाने.

خردمندى را که در زمرة اوباش سخن ببندد شگفت مدار که آواز بربط با غلبهُ دهل بر نیاید و بوی عبیر از گند سیر فرو ماند 

खुर्दमंदी रा ‌के दर ज़मुरत ए औबाश सुखन बबंदद शिगुफ्त मदार के आवाज़ ए बर‌बत बा घलबीए दुहुल बर नियायद व बु ए अबीर अज़ गंद ए सैर फरु मांद

Don't be surprised by a wise man who is silenced by the vulgar, for the sound of a lute cannot compete with the boom of a drum, and the scent of ambergris is overwhelmed by the stench of garlic.

एखाद्या शहाण्या माणसाला मुर्ख आणि असभ्य माणसांनी गप्प बसवले तर त्याचे आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण ढोलाच्या कर्कश्य आवाजापुढे सतारीचे स्वर्गीय स्वर ऐकू येत नाहीत आणि कस्तुरी सारखा उच्च सुगंध देखील लसणाच्या घाणेरड्या आणि उग्र दर्पा पुढे मार खातो !

~ शेख सादी शिराझी याच्या 'गुलिस्तान' मधून

शेख शिराझी याच्या 'गुलिस्तान' मधून आणखी एक:

A great man was asked, "With all the superiority the right hand has, why do people put rings on their left hands!"
He replied, "Don't you know that the learned are always deprived ! "

एका महान माणसाला एकाने विचारले, "उजवा हात शक्तिशाली असून देखील लोक डाव्या हातात अंगठी का घालतात?"

यावर तो महान माणूस उत्तरला, "विद्वान माणसाची नेहमी उपेक्षा होते हे तूला ठाऊक नाही का?"

~ शेख सादी शिराझी याच्या 'गुलिस्तान' मधून

🖋️ मंदार दिलीप जोशी, सत्येन वेलणकर

Friday, March 26, 2021

स्टॅन स्वामी या शहरी नक्षलवाद्याला जामीन नाकारल्यावर चर्चच्या बुडाला का आग लागावी?

तीनच दिवसांपूर्वी शहरी नक्षलवादी स्टॅन स्वामीला नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (NIA) विशेष न्यायालयाने जामीन नाकारला

Ernakulam Angamaly Archdiocese

त्यावर स्टॅन स्वामीला जामीन नाकारणे हे धक्कादायक असल्याचे 'Ernakulam Angamaly Archdiocese' चे म्हणणे आहे. स्टॅन स्वामी या शहरी नक्षलवाद्याला जामीन नाकारल्यावर 'सथ्यदीपम' या 'एरनाकुलम अंगमली Archdiocese' प्रकाशित करत असलेल्या साप्ताहिकाच्या भावी संपादकीयात चर्चने गरळ ओकली असल्याचे समजते. चर्चची निष्ठा कधीच भारत व भारताच्या संविधानाप्रती नसून परदेशी कायदे आणि दस्तैवजांप्रती असते. चर्चने हीच परधर्जिणी वृत्ति दाखवून देत म्हटलं आहे की "नागरिक व नागरिकांचे हक्क हे सर्वप्रथम असून तसा उल्लेख १५ जून १२१५ रोजी प्रकाशित झालेल्या मॅग्ना कार्टा (Magna Carta of 1215) मध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे."

आता एरनाकुलम अंगमली Archdiocese उदाहरण देत असलेले Magna Carta काय आहे? ते भारतीय संविधान आहे का? तर नव्हे. राजेशाहीच्या अनिर्बंध अधिकारांच्या विरोधात काही सरदारांनी पुकारलेल्या बंडात इन्ग्लंडचा राजा जॉन याच्याकडून एका जाहीरनाम्यावर सही करवून घेण्यात आली त्या जाहीरनाम्याचं नाव Magna Carta होतं. आता इंग्लंडमध्ये आपापसात सुरु असलेल्या राजकीय/धार्मिक संघर्षाचा परिपाक म्हणून इन्ग्लंडच्या राजाने सही केलेल्या जाहीरनाम्याचा उल्लेख व उदाहरण हे भारतात एका शहरी नक्षलवाद्याला जामीन नाकारण्याच्या विरोधातला मुद्दा म्हणून चर्चने दाखवावा यातच त्यांची परधर्जिणी वृत्ती स्प्ष्ट होते. पण प्रकरण केवळ इतकंच नाही, तर Magna Carta मध्ये जी कलमं नमूद केलेली होती त्यातल्या एका कलमाकडे आपलं लक्ष गेलं पाहीजे. Magna Carta मध्ये अनेक गोष्टींच्या हमी राजाकडून घेण्यात आली त्यातली एक महत्त्वाची आणि पहिली म्हणजे "चर्चचे अधिकार अबाधित राहतील" ही होती. हे तथ्य वाचल्यावर चर्चचे दाखवायचे दात हे वरकरणी नागरिक व नागरिकांचे हक्क यांचे रक्षण हे असले तरी अंतस्थ हेतू हे चर्चच्या हितसंबंधांचे रक्षण हे आहे. आता नक्षलवाद्यांच्या बाजूने बोलल्यावर चर्चच्या हितसंबंधांचे रक्षण कसे होते यावर आंतरजालावर थोडं संशोधन केलं तरी वाचकांना हा मुद्दा स्प्ष्ट होईल. 

पुढे जाऊन चर्च म्हणतं — "भारतावर आता फॅसिस्ट विचारधारेच्या लोकांचे राज्य असून फॅसिस्ट राज्यात राष्ट्र हे सर्वप्रथम असतं आणि कायदे बनवण्याचा मूलभूत हेतू हा राष्ट्राचे सार्वभौमत्व राखणे हा असतो. अशा परिस्थितीत मतभिन्नतेचे मार्ग खंडित केले जातात."

ही वाक्ये वाचताच यातला फोलपणा आणि भंपकपणा लक्षात येतो. जणू काही राष्ट्र प्रथम हा काही गुन्हाच आहे आणि त्याच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणाची तरतूद करणं हा त्याहून मोठा गुन्हा असावा अशा थाटात हे लिहीलं गेलं असावं हे स्प्ष्ट आहे. 

यावर कोर्टाने स्टॅन स्वामीला जामीन नाकारताना काय भाष्य केलं आहे ते बघणं महत्त्वाचं ठरतं. जामीन नाकारण्याची कारणे देताना न्यायालय म्हणतं की "वैय्य्क्तिक स्वातंत्र्य / व्यक्तिस्वातंत्र्यापेक्षा समाजाचं व्यापक हित हे महत्त्वाचं आहे (‘Community interest outweighs right of personal liberty’). थोडक्यात, व्यक्तिस्वातंत्र्य हे समाजहिताच्या आड येत असेल किंवा समाजहिताला बाधा पोहोचवत असेल तर योग्य व कायदेशीर तरतूदींनुसार व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने घालणे हे न्यायसंगत ठरते असे न्यायालयाने स्प्ष्टपणे नमूद केले आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (NIA) विशेष न्यायाधिशांनी नोंदवलेल्या मतानुसार "आरोपीवर असलेल्या आरोपांचे गांभीर्य योग्य परिप्येक्ष्यात बघितलं तर असं म्हणण्यास कारण आहे की समाजहित हे वैयक्तिक स्वातंत्र्यापेक्षा महत्त्वाचं ठरतं, आणि म्हणूनच आरोपीचं खूप वय झालेलं असणं आणि त्याचा तथाकथित आजार हे या याचिकेवरचा निर्णय त्याच्या बाजूने जाण्यास पुरेसे ठरत नाहीत. न्यायालयाने पुढे असंही म्हटलं आहे की समोर आलेल्या पुराव्यांनुसार अर्जदार आरोपीवर असलेले आरोप हे प्रथमदर्शनी सत्य असल्याचे दिसते, तसेच स्टॅन स्वामी व इतरांनी "शक्ती प्रदर्शन करुन देशात अस्थिरता पसरवण्याचा व सरकार उलथवण्याचा कट रचला". तसेचसमोर असलेल्या पुराव्यांनी हे स्प्ष्ट होत आहे की अर्जदार हा निव्वळ बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) पक्षाचा सक्रीय सदस्यच होता असे नव्हे तर त्याने पक्षाची घातक ध्येयधोरणे पुढे नेण्याचाही प्रयत्न केला, आणि ते काम म्हणजे भारतीय लोकशाही उलथून लावणे हा होय. दुर्दैवाने न्यायालयाने कॅरॅवॅन या संकेतस्थळावर न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश मात्र दिले नाहीत., पण तो वेगळा आणि आणखी मोठा विषय आहे.

थोडक्यात:
(१) जामीन नाकारण्याच्या निर्णयाला विरोध करताना विदेशी जाहीरनाम्याचे उदाहरण देणे परधर्जिणेपणा अधोरेखित करते.
(२) त्या जाहीरनाम्यात 'चर्चच्या अधिकारांचे रक्षण' हे एक महत्त्वाचे कलम असताना शहरी नक्षलवाद्याची भलामण आणि चर्चचे हितसंबंध गुंतलेले आहेत याची अप्रत्यक्ष कबूली चर्चने दिली आहे.
(३) या पार्श्वभूमीवर चर्चवर चौकशी का बसवू नये यासाठी सरकारवर राष्ट्रवादी पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच हिंदू संघटनांनी दबाव टाकायला हवा.

आता ३१ मार्च रोजी 'सथ्यदीपम' या 'एरनाकुलम अंगमली Archdiocese' यांच्या साप्ताहिकात 'फॅसिझमचे भारतीय मॉडेल' ‘The Indian Model of Fascism’ या शीर्षकाखाली प्रकाशित होणार्‍या संपूर्ण संपादकीयाची विशेष अन्वेषण करुन चर्चची चौकशी आरंभ करावी अशी इथे केंद्रीय गॄह खात्याला विनंती. 

© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु १२/१३, शके १९४२

Wednesday, March 24, 2021

शहरी नक्षलवादी व त्याच्या चेल्यास पाठोपाठ अटक


काल तेलंगणा विद्या वंथुला वेदिकाचा माजी अध्यक्ष असलेला शहरी नक्षलवादी गुर्जला रविंदर राव याला झालेली अटक व पाठोपाठ त्याने एक्स आश्रय दिलेला माओवादी पक्षाचा वाराणसी सुब्रमण्यम आणि त्याची बायको यांना आज झालेली अटक हा घटनाक्रम वाचला आणि मी १० जानेवारीला लिहिलेल्या लेखाची आठवण झाली.


त्यातला हा परिच्छेद मला फार महत्वाचा वाटतो, कारण ज्या प्रमाणे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये हे वाक्य डाव्यांनाच चांगलंच समजल्याने ते आपल्या शहरी बापांना वाचवायचे प्रयत्न करताना वय वगैरे मुद्दे काढून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात.:

"या दोघांच्या शारीरिक अवस्थेचे वर्णन गोगटे साहेब "दोन वयोवद्ध व गंभीर आजारी असलेल्या.." असे करतात. क्षणभर असे गृहित धरू की हे दोघे खरंच मरणासन्न आहेत, पण त्यामुळे बहुसंख्य शांतताप्रिय जनतेला, गंभीर आरोपांत तुरुंगात असलेल्या वरावरा राव आणि स्टॅन स्वामी या दोन शहरी नक्षलवाद्यांच्या जहरी व कावेबाज विचार व शिकवणीमुळे निर्माण झालेला, होत असलेला, व होऊ शकणारा असलेला धोका हा कुठेही कमी होत नाही. कारण स्वतः सशस्त्र होऊन मैदानात उतरत नसले तरी इतरांची माथी भडकावून हातात शस्त्र घेऊन ४ महिन्याच्या बालकापासून निरपराध वृद्धांपर्यंत, व सशस्त्र दलांपासून पोलिसांपर्यंत कुणाचाही कशाही प्रकारे मुडदा पाडण्याला मार्गदर्शन करणारी, प्रोत्साहन देणारी, व अशा घटनांचे निर्लज्ज समर्थन करणारी ही विचारसरणी आपल्या शहरातल्या घरात राहून, विद्यापीठात शिकवत असताना, पुस्तके व इतर साहित्य निर्माण करत असताना आपले विषारी व विखारी विचार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पसरवण्याची ठाम शक्यता असते."

म्हणूनच कितीही वयाची कारणे दिली, तरी या थेरड्यांना तुरुंगातच ठेवावे.

या दोन्ही अटकांबद्दल तेलंगणा पोलिसांचे अभिनंदन.

© मंदार दिलीप जोशी

Wednesday, March 17, 2021

प्रेश्यावृत्ती मिडिया एवं वामपंथी दोगलापन


 

इस विडियों में कुछ त्रासदीयां एवं विरोधाभास समाये हुये हैं. त्रासदी यह है कि दशकों के वामपंथी शासन के बाद पश्चिम बंगाल राज्य की ये अवस्था है कि आज भी यहां मनुष्यों को रिक्षा खिंचनी पडती है. वामपंथ गरीब को गरीब बनाये रखता है, जिसके कारण जो रिक्षावाला कल खुद रिक्षा खिंचता था वो आज भी यही कर रहा है. पर्यटन के लिये आकर्षण का विषय होना एक बात है, परंतु उद्योगों के नष्ट होने के कारण एवं पीढी दर पीढी पेट पालने के लिये किसीको यह करना पड रहा है तो इसका दोष साम्यवादी व्यवस्था को ही जाता है. गरीब को गरीब ही बनाये रखना – वामपंथ की यही तो खासीयत है!

विरोधाभास यह है कि सदैव पक्षी तथा प्राणीप्रेम से ग्रस्त मिडिया की निद्रा केवल हिंदू उत्सवों के समय खुलती है, जैसे संक्रांत एवं दिवाली को. वामपंथी मिडिया को पतंग के डोर के कारण पक्षीयों को एवं पटाखों के कारण अनुष्का शर्मा के कुत्ते को होने वाली तकलीफ बहुत बडी दिखती है, परंतु प्रत्यक्ष कोई मानव आज भी रिक्षा स्वयं खींचने को विवश है, इसपर मिडिया ध्यान तो देती नहीं परंतु वो इसके मजे भी लूटते हैं. आप देख सकते है, सीएनएन न्युज १८ की पल्लवी घोष किस निर्लज्जता से मानवी रिक्षा के मजे लेते हुए यह बात कर रही हैं कि किस प्रकार पश्चिम बंगाल में चुनाव के मुद्दे हैं जय श्रीराम बनाम जय सियाराम, रविंद्रनाथ ठाकुर तथा सुभाषचंद्र बोस! 

चलो कम से कम यह मनुष्य मेहनत की कमा रहा है, परंतु क्या सीएनएन न्युज १८ पल्ल्वी घोष को यह असाइनमेंट नही दे सकते थे की उस रिक्षावाले का ही साक्षात्कार लें, उसकी व्यथाओं को जाने, यात्रिओं से लदी रिक्षा खींचने चकर लोगों के आवागमन मे सहय्यता करने की उसकी विवशता को सबके सामने लायें? क्या ऐसा इंटरव्यु लेकर जनता को यह ज्ञात क्यूं नहीं कराया गया कि किस प्रकार जैसे होस्ट के मरने पर परजीवी वायरस या जंतु दुसरे होस्ट को अपन घर बना लेता है, उसी प्रकार कम्युनिस्ट पार्टी के कार्यकर्ताओं ने....क्षमाप्रार्थी हूं....कम्युनिस्ट पार्टी के गुंडोंने पार्टी का राज समाप्त होने पर तृणमूल काँग्रेस मे स्थलांतर कर दिया था, वैसे ही कम्युनिस्ट पार्टी के नीतियों ने भी तृणमूल काँग्रेस के राज में भी अपना प्रभाव कायम रखते हुये गरीब को गरीब रखने की परंपरा कायम रखी है? 

परंतु वे ऐसा तभी करेंगे, वे इस रिक्षावाले की गरीबी एवं विवशता को तभी हाईलाईट करेंगे, जब कोई निजी बस चलाने की बात करेगा की देखीये निजीकरण के कारण कैसे इस गरीब की, जिसे गाडी चलाना नहीं आता, रोटी छीनी जा रही है, उसे गरीबी में जीने पर मजबूर किया जा रहा है. यदि पश्चिम बंगाल राज्य में चुनाव के माध्यम से वास्तविक क्रांती हो जाये और भाजप सत्ता में आ जाये, तो यही मिडिया इस रिक्षावाले को लेकर स्टोरी चलायेगा कि देखो कैसे सबका विकास करने की बात करनेवाले मोदी सरकार के राज में आज भी एक रिक्षावाले को स्वयं यात्रियों को ढोना पड रहा है. दुसरे किसी चॅनल पर ऐसा नॅरेटिव्ह चलाया जाने की पूरी संभावना है कि निजीकरण के कारण कैसे गरीब रिक्षावाले को गरीब रहना पड रहा है और यही बात उठाते हुए राहुल गांधी अदानी-अंबानी को कोसेंगे. यदि बसें सरकारी हों, तो यह भी हो सकता है कि मिडीया यह बात चलाये कि देखो बसे चली तो इंडिया और भारत के बीच की खाई और गहरी हो गयी. कैसे कैसे नॅरेटिव्ह चलेंगे इसकी संभावनाएं तो असंख्य हैं. 

तो वामपंथ एवं वामपंथ से ग्रस्त मिडिया की यही विशेषता है कि जो बोलो उसे स्वयं करो नहीं,  जो ना करने के लिये बोलो उसे घोष मॅडम की तरह निर्लज्जता से करो उपर से लोगों को वही बात करने पर अपराधगंड से ग्रस्त रखो. यही वामपंथ की पहचान है. 

अन्य राज्यों में, जहां पर वामपंथी सरकारें नहीं हैं, वहां पर मानवी रिक्षाओं के स्थान पर सायकिल रिक्षायें लायीं गयीं, और आज कई स्थानों पर सायकिल रिक्षाओं के स्थान पर मोटराइज्ड रिक्षायें चलती हैं. काम करने के लिये मानवी श्रम को कम करने का यशस्वी प्रयास वामपंथ कभी नहीं करता. 'नया दौर' लाना है तो टांगे के लिये शॉर्टकट सडक बनाने पर लोगों को अपना समय एवं श्रम बरबाद करने पर मजबूर करना विवेक नहीं है, अपितु मानवी श्रम कम करने की तकनीक आती है तो हुनर सीखकर आगे बढनें में ही भलाई है. 'नया दौर' साम्यवाद से नहीं आता, वो आता है व्यापार की स्वतंत्रता से जिसे बडे प्यार से वामपंथीयों ने पूंजीवाद का लेबल लगाया है.  

CNNNews18 Correspondent Pallavi Ghosh

© मंदार दिलीप जोशी

Monday, March 15, 2021

रनअवे ज्युरी आणि डाव्यांची चित्रपटीय लबाडी

२००३ साली आलेला हा सिनेमा अजून लक्षात आहे तो त्यात असलेल्या जीन हॅकमन आणि डस्टिन हॉफमन या दिगग्ज कलाकारांमुळे. चित्रपट साधारणपणे मसाला चित्रपट असतात तसा आहे, पण गंमत त्याच्या कथेत दडली आहे. किंवा असं म्हणणं जास्त योग्य ठरेल की त्याच्या गोष्टीने जे दडवलं आहे त्यात खरी गंमत आहे.

रनअवे ज्युरी पोस्टर

अमेरिकेत एका गोळीबारात ११ लोक मारले जातात. त्यापैकी एकाची पत्नी गोळीबार ज्या बंदुकीने केलेला असतो ती बनवणाऱ्या कंपनीवर नुकसानभरपाईसाठी खटला दाखल करते. खटला सुरू असताना दोन्ही पक्षाच्या वकिलांना एक फोन येतो की जो पक्ष त्याला, म्हणजे फोन करणाऱ्याला, १० मिलियन डॉलर देईल त्याच्या बाजूने तो ज्यूरीला निकाल द्यायला भाग पाडेल.

मग सस्पेस थ्रिलर जॉनर चित्रपटाला साजेशा काही घटना घडतात आणि शेवटी त्या बाईच्या बाजूने उभा असलेला वकील ते पैसे द्यायला नकार देतो वगैरे वगैरे. कथेच्या तपशीलात जाण्यात अर्थ नाही. हां एक गोष्ट म्हणजे ज्यूरीत एक माजी अमेरिकन मरीन असतो जो त्या बाईला नुकसानभरपाई देण्याच्या विरोधात असलेला दाखवलाय, आणि शेवटी त्या बाईच्या बाजूने निकाल लागून बंदूक बनवणाऱ्या कंपनीच्या वकिलाला ज्यूरीला लाच दिल्याच्या आरोपाखाली अटक होते इतका तपशील सद्ध्या पुरेसा आहे.

आता कथेतली गोम सांगतो. हा चित्रपट लीगल थ्रिलर म्हणजे कोर्टाच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या थरार कादंबऱ्यांचा लेखक जॉन ग्रीशॅम याच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. कादंबरीचं चित्रपटात रूपांतर करताना एक महत्वाचा बदल असा केला आहे की कादंबरीत सिगारेट कंपनी विरोधात खटला लढवणारी बाई फुफ्फुसांच्या कर्करोगाने दगावलेल्या नवऱ्याची बायको दाखवली गेली आहे, आणि चित्रपटात मात्र साफ बदलून शस्त्रास्त्र बनवणारी कंपनी आणि गोळीबारात गेलेल्या माणसाची पत्नी असा बदल केला गेला आहे.  

आता इथे जॉन ग्रीशॅमची किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांची कल्पकता तोकडी पडली होती का? तर नाही. मग कादंबरीत असलेली सिगारेट कंपनी सिनेमात आणता आणता बंदूक बनवणारी कंपनी का आणि कशी झाली?

इथे येते डाव्यांची लबाडी. पुस्तकापेक्षा सिनेमा या दृकश्राव्य माध्यमाची ताकद कुणी ओळखली असेल तर डाव्यांनीच. तुम्हाला वाटत असेल की बॉलिवूड म्लेंच्छ किंवा वामपंथी विचारप्रवाह म्हणजे नेरेटीव्ह चालवतात तर एक गोष्ट लक्षात ठेवा, बॉलिवूडच्या शंभर पटींनी हॉलिवूड हे डाव्या विचारांनी भारलेलं आहे. जे डावे मद्यपान, धूम्रपान, आणि इतर सगळ्या प्रकारच्या व्यसनांचा पुरस्कर करणारे डावे सिगारेट कंपनीच्या विरोधात सिनेमा कसा बनवतील? 

बनवतील सुद्धा, बनलेही (थँक्यू फॉर स्मोकिंग, १९९७), पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांना या कथेत बदल करताना बंदूका बनवणाऱ्या कपन्यांवर 'नेम धरला' हे आहे.

हॉलिवूडचे सिनेमे नीट बघितले तर आपल्याला एक समान धागा नेहमी दिसून येतो की एफबीआय, सीआयए, आणि सेना यांना बहुतेक वेळा भ्रष्ट आणि क्रूर दाखवलं जातं (आठवा: Jason Bourne मालिका. आठवा: रनअवे ज्युरी मधल्या जीन हॅकमनचाच एनिमी ऑफ द स्टेट हा सिनेमा ). अशा चित्रपटांतला नायक असलेला सैनिक नेहमी अन्यायग्रस्त असतो आणि आदेशांच्या विरोधात जाऊन नेहमी काहीतरी करत असतो. अनेक सिनेमात मुख्य तक्रारीचा सूर एका गोष्टीच्या विरोधात असतो ती म्हणजे म्हणजे अमेरिकन नागरिकांना त्यांच्याच घटनेने (म्हणजे संविधान बरं का) असलेला शस्त्र बाळगण्याचा अधिकार.

या पूर्ण डाव्यांच्या लॉबीला शस्त्र बाळगण्याच्या याच अधिकारावर आक्षेप आहे. वास्तविक त्यांना आशा प्रत्येक व्यवस्थेवर आक्षेप घेतात जी अमेरिकन नागरिकांना स्वतःसाठी किंवा देशासाठी लढण्यास प्रेरित आणि प्रवृत्त करते. अमेरिकेच्या घटनेच्या सेकंड अमेंडमेंटमध्ये अमेरिकन नागरिकांना शस्त्र (बंदुका) बाळगण्याचा आणि स्वसंरक्षणासाठी ती वापरण्याचा अधिकार दिलेला आहे. मान्य आहे की अधूनमधून अमेरिकेत रागाच्या भरात किंवा इतर कारणांनी केल्या गेलेल्या गोळीबाराच्या घटना घडत असतात, तरीही अमेरिकेत कुणीही शस्त्र बाळगण्याचा आपला हा अधिकार सोडण्याच्या मनःस्थितीत नाही.

सरळ साधा विचार करा, जेव्हा एखादा गुन्हेगार खुनासारखा एखादा गुन्हा करायला प्रवृत्त होतो तेव्हा तो कुठली मानवता पाळतो बरं? ज्या गुन्ह्यामुळे मृत्युदंडाची किंवा आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते, तो गुन्हा करणारा माणूस इतर कुठले कायदे पाळणार आहे.  मग शस्त्र बाळगण्याच्या अधिकाराला बेकायदेशीर ठरवण्यात आणि शांतताप्रिय सामान्य नागरिकांचा स्वसंरक्षणाचा अधिकार हिरावून घेऊन त्यांचा जीव धोक्यात घालण्यात काय हंशील?

गोळीबाराच्या घटना घडल्यावर प्रत्येक वेळी शस्त्र (बंदुका) बाळगण्याच्या विरोधात डावे अशा प्रकारचं भावनिक आवाहन करतात की जणू बंदूक स्वतःहून आली आणि गोळीबार करून गेली आहे. वर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला मृत्युदंड देण्यालाही त्यांचा विरोध असतो. म्हणजे गंमत बघा

  • जे शस्त्र बाळगून अमेरिकन नागरिक स्वसंरक्षण करू शकतील तो अधिकार काढून घेण्यासाठी लॉबीग करायचं.
  • बंदूक वापरणारा माणूस नव्हे तर बंदूक दोषी असा विचारप्रवाह चालवायचा (कुणाला रे गुरमेहर कौर आठवली? "पाकिस्तान डिड नॉट किल माय फादर, वॉर डिड" हाहा).
  • असे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींना जरब बसावी आणि गुन्हे कमी व्हावेत म्हणून असलेली मृत्युदंडाची शिक्षा द्यायलाही विरोध करायचा.

सूज्ञ वाचकांना यातली गोम किंवा पॅटर्न लक्षात आला असेलच. डाव्यांना तुम्ही ज्या ज्या प्रकारे स्वतःच संरक्षण करू शकाल असा प्रत्येक अधिकात हिरावून घ्यायचा आहे, इतकंच नव्हे तर अशी प्रत्येक संस्था नष्ट करायची आहे जी तुमच्या अधिकारांचं आणि पर्यायाने तुमचं रक्षण करू शकतील. याच बरोबर त्यांना कायदे हे गुन्हेगारांच्या बाजूने असा वाकवायचे आहेत ज्यायोगे कुठल्याही गुन्हेगाराला शिक्षा सुनावणं अत्यंत अवघड व्हावं आणि झालीच तर कमीतकमी शिक्षा व्हावी (कुणाला रे निर्भया केस आणि शिवणयंत्र आठवलं?).

यात डाव्यांचा फायदा काय? त्यांचं कुठलं उद्दिष्ट साध्य होतं? तर समाजावर संपूर्ण नियंत्रण. फक्त उत्पादनाची साधने आणि वितरण व्यवस्था यांवर ताबाच नव्हे तर हरप्रकारे संपूर्ण नियंत्रण. तुमच्या संसाधनांवर, तुमच्या विचारांवर, तुमच्या स्वातंत्र्यावर. यात नागरिकांच्या हातात जोवर बंदूक असेल, तोवर त्यांचं मनोबल पूर्णपणे तोडणं शक्य होणार नाही. हातात शस्त्र असलेला माणूस एका मर्यादेपलीकडे वाकणार नाही, संपूर्ण समर्पण करणार नाही. तुम्ही अमेरिकेत झालेल्या ब्लॅक लाईव्हज मॅटर वाल्यांनी केलेल्या दंगली आणि संबंधित घडामोडींवर लक्ष ठेवलं असेल तर त्यावेळी अशा घटना घडल्याचं तुमच्या लक्षात आलं असणार की काही ठिकाणी घरं आणि दुकानं जाळायला आणि फोडायला आलेला हिंसक जमाव हा तिथल्या नागरिकांच्या हातातल्या बंदुका नुसत्या पाहूनच पार्श्वभागाला पाय लावून पळाला होता.

ब्लॅक लाईव्हज् मॅटर अर्थात च्या दंगलखोरांपासून आपल्या मालमत्तेचं रक्षण करायला उभं असलेलं बंदुकधारी मार्क आणि पॅट्रेशिया मॅक्लॉस्की (Mark and Patricia McCloskey) हे दांपत्य

म्हणूनच अमेरिकेतील डावे अमेरिकन घटनेच्या (तेच ते, संविधान) सेकंड अमेंडमेंटच्या गेली अनेक दशके मागे लागलेले आहेत.

भारतात १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर इंग्रजांनी भारतीयांना निःशस्त्र केलं तो निर्णय मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर चाचा नेहरूंनी फिरवला नाही. त्याचा परिणाम असा आहे की जे गुन्हेगार वैयक्तिक किंवा सामूहिक प्रवृत्ती व शिकवणीने प्रेरित होऊन गुन्हे करतात ते कायदे धाब्यावर बसवून निर्भयपणे गच्चीवर दगड, घरात धारदार शस्त्रे, बंदुका वगैरे बाळगत असतात आणि योजना आखून हल्लेही करत असतात (कुणाला रे दिल्ली दंगल आठवली?) आणि सगळे कायदे पाळणाऱ्या नागरीकांना प्रतिकार करायला मात्र काहीच नसतं (याला आणखी अनेक कारणे आहेत पण निःशस्त्र करणारे कायदे हे एक मुख्य कारण नाकारता येत नाही). थोडक्यात, आपला हातात शस्त्र नसलेला जेक गार्डनर झालेला आहे. 

तेव्हा स्वसंरक्षणासाठी करायच्या तयारी बरोबरच शस्त्र बाळगण्याचे परवाने मिळणे सहज सुलभ होण्याच्या दृष्टीने संसद व न्यायालय या दोन्ही मार्गांनी लढा देणे आवश्यक आहे.

तस्मादुत्तिष्ठ!

प्रेरणा: डॉ राजीव मिश्रा

🖋️ मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु. २, शके १९४२


Thursday, March 11, 2021

द डेथ ऑफ स्टालिन (२०१७): साम्यवादी हुकूमशाहीचं विनोदी विच्छेदन

रशियाचे सम्राट झार निकोलस, त्यांची पत्नी, चार मुली, आणि राजकुमार अलेक्सी यांची निघृण हत्या करुन साम्यवादी बोल्शेविक क्रांतीने रशियातली राजेशाही संपवली आणि गरीब, पिडीत, शोषित, कष्टकरी (proletariat) जनतेचा प्रतिनिधी म्हणून गर्भश्रीमंत कॉम्रेड लेनिन सोवियत रशियाचा अध्यक्ष बनला आणि त्याच्या मृत्यूनंतर कॉम्रेड स्टालिन. याच स्टालिनच्या मृत्यू आणि त्या नंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर बेतलेला हा चित्रपट साम्यवादी हुकुमशाही व्यवस्थेची भयानकता आणि दहशत आपल्यापर्यंत चक्क विनोदाच्या माध्यमातून पोहोचवतो.

चित्रपट सुरु होतो तो रेडियो मॉस्कोच्या एका प्रेक्षागृहात सुरु असलेल्या एका वाद्यसंगिताच्या मैफिलीने. या मैफलीचे थेट प्रक्षेपण स्टालिन ऐकतो आणि प्रक्षेपण हाताळणार्‍या कर्मचार्‍याला फोन करुन "मला या मैफिलीचं ध्वनिमुद्रण हवं आहे, ते घ्यायला कुणालातरी पाठवतोय" असा आदेश देतो. हे ऐकल्यावर त्या कर्मचार्‍याचं धाबं दणाणतं. कारण या मैफलीचे फक्त थेट प्रक्षेपण केलेले असतं पण ध्वनिमुद्रण मात्र केलेलेच नसतं, मग स्टालिनला ध्वनिमुद्रण पाठवणार कसं? शिवाय फोन होईस्तोवर नुकतीच मैफल संपलेली असल्याने अर्धेअधिक प्रेक्षक बाहेर पडलेले असतात आणि कलाकारांची आवराआवर सुरु असते. त्याही परिस्थितीत मैफलीच्या थेट प्रक्षेपणासारखी वाटावरणनिर्मिती व्हावी म्हणून कलाकारांना पुन्हा गोळा केलं जातं, बाहेर पडत असलेल्या प्रेक्षकांना दम देऊन पुन्हा बसवलं जातं, आणि प्रेक्षकांच्या उर्वरित रिकाम्या जागा भरायला अक्षरशः रस्त्यावरुन जाणार्‍या आणि सापडलेल्या  कुणालाही आणून प्रेक्षक म्हणून बसवलं जातं. कुणालाही म्हणजे अक्षरशः कुणालाही, मग त्यात एक उलटी दोन सुलटी करुन स्वेटर विणणारी बाई, एक फळं हादडणारी बाई, आपल्या आयुष्यात प्रेक्षागृह न बघितलेलं आणि चेहर्‍यावर 'अजि म्या मार्क्स पाहिला' असे भाव घेऊन वावरणारं एक जोडपं अशी सगळी ध्यानं पाहून आपण फिसकन् हसायला सुरवात करतो. स्टालिनसाठी पुन्हा सगळा पसारा मांडून ध्वनिमुद्रण करायचं इथवर ठीक, पण ऐकलेल्या मैफलीत आणि ध्वनिमुद्रणात स्टालिनला फरक जाणवला तर काय या दहशतीने मैफलीचा मूळ संचालक म्हणजे कंडक्टर झीट येऊन पडतो आणि ध्वनिमुद्रण हाताळणार्‍या कर्मचार्‍यापुढे उपलब्ध वेळात नवा कंडक्टर शोधण्याचं नवीन झेंगट येऊन उभं राहतं. इथेही दुसर्‍या एका म्युझिक कंडक्टरला नाईट गाऊनमधेच उचलून आणतात आणि तसंच मैफल दिग्दर्शित करायला उभं करतात.

तर अशा रितीने मैफल संपते आणि ध्वनिमुद्रण हाताळणारा कर्मचारी स्टॅलिनपर्यंत पोचवण्यासाठी तयार झालेली ध्वनिमुद्रिका घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याच्या हातात ती ठेवत असतानाच संगीत मैफलीतली पियानोवादक ("मी पुन्हा पियानो वाजवायला हवा असेल तर माझा मेहनताना वाढव" असं सांगून ते कबूल करुन घेऊन मगच पुन्हा पियानो वाजवायला तयार झालेली) मारिया त्या ध्वनिमुद्रिकेच्या पाकिटात एक चिठ्ठी सारते. त्या चिठ्ठीमध्ये तिने स्टॅलिनवर बिनधास्तपणे जहरी टीका केलेली . ग्रामोफोनवर ध्वनिमुद्रिका लावून स्टॅलिन मैफलीचा आनंद पुन्हा लुटण्यासाठी सज्ज होत असताना त्याला खाली पडलेली ती चिठ्ठी दिसते ती वाचत असतानाच त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागतं आणि तो जागीच कोसळतो. सकाळी चहा घेऊन येणार्‍या सेविकेला स्टालिनची अवस्था दिसते आणि मग सुरु होतात अचाट प्रकार. सगळ्यात आधी तिथे पोहोचतो तो गृहमंत्री बेरिया. तिथे पोहोचताच तो स्टालिनच्या त्याही अवस्थेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवू पाहतो. मागोमाग तिथे पोहोचतो उपाध्यक्ष मेलेंकॉव्ह आणि त्यानंतर घाईघाईत नाईट ड्रेसवर कोट पँट चढवून धावतपळत आलेला सरचिटणीस निकिता क्रुश्चेव्ह. मागोमाग कामगार मंत्री कगानोविच, व्यापारमंत्री मियोकन, आणि (आपल्या विशिष्ट पद्धतीने ठेवलेल्या दाढीसाठी जगप्रसिद्ध असलेला) संरक्षणमंत्री बुल्गानिन तिथे हजर होतात. मग परराष्ट्रमंत्री मोलोटोव्ह, सैन्यप्रमुख फील्ड मार्शल झुकॉव्ह हेही या खेळात सामील होतात आणि जशीजशी 'पात्रांची' संख्या वाढते तसातसा गोंधळ वाढत जातो.


स्टॅलिनच्या अचानक मृत्यूने निर्माण झालेला राजकीय पेचप्रसंग, त्यातूनच त्याच्या या सहकार्‍यांना दिसणार्‍या विविध संधी, त्यात एकमेकांचा कल कुठे आणि कुणाकडे आहे याचा अंदाज घेत कुरघोडी करण्याची आणि आघाडी उघडण्याची सतत चालवलेली अगदी पार स्टालिनच्या अंत्यविधीपर्यंत आणि नंतरही चाललेली कटकारस्थानं, स्टॅलिनच्या कारकीर्दीत घडलेल्या घटनांचे हिशोब चुकते करणे, ठार मारण्यासाठी चिह्नित केलेल्या लोकांच्या यादीत सतत होणारे बदल, दीर्घकाळ स्टालिनच्या मर्जीने अत्याचार करत अनेकांचे जीव घेऊन आपल्या खुर्च्या आणि जीव अबाधित राखणाऱ्या त्याच्या सहकारी मंत्र्यांनी तो मेल्यावर अचानक आपण उदारमतवादी आहोत हे दाखवायची धडपड करणे आणि दिखाऊपणासाठी का होईना अनेक कैद्यांना सोडणे इत्यादी दयाळू धोरणे आखणे, स्टालिनची मुलगी स्वेतलाना आणि मुलगा वॅसिली यांना 'मॅनेज' करण्याची धडपड, अशा प्रसंगांमुळे परिस्थिती प्रत्येक क्षणाला कूस बदलते आणि आपली  उत्कंठा वाढवत नेत एका अंगावर येणार्‍या प्रसंगाने चित्रपटाचा शेवट होतो.

या रुक्ष घडामोडी घडत असताना यात विनोदनिर्मितीला वाव कुठे मिळणार हा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे. पण चित्रपट पाहताना लेखक डेव्हिड स्नायडर व इयान मार्टिन आणि दिग्दर्शक अरमांडो इयानुची (Armando Ianucci) इत्यादींना पहिल्या दृश्यापासून पुन्हा पुन्हा दाद द्यावीशी वाटते. सुरवातीपासून शेवटापर्यंत कुठेही आपल्याला कंटाळा येत नाही. उपरोल्लेखित संगीत मैफलीचे उदाहरण घ्या - स्टालिनची दहशत इतकी की सुरवातीला दारावर थाप पडल्यावर प्राण कंठाशी आणून 'आता नाही येणे जाणे' असे भाव चेहर्‍यावर आणत बायकोचा निरोप घेणारा, त्याला का बोलावलं जात आहे हे समजल्यावर बुचकळ्यात पडलेला कंडक्टर शेवटी त्याच्या मनासारखी मैफल पार पडल्याने सुटका झाल्याचे जे भाव चेहर्‍यावर आणतो तो क्षण चित्रपटाच्या त्या भागाचा परमोच्च बिंदू आहे. 


स्टालिन मेला आहे की नाही, नसेल तर पुन्हा कार्यरत होण्याइतका बरा होईल की नाही, हे ठरवायला डॉक्टर बोलवावेत तर मॉस्कोतल्या सगळ्या चांगल्या डॉक्टरांना मारुन टाकल्याने गोची झालेली असते, म्हणून मग मैफल हाताळणारा कर्मचारी जशी वाट्टेल ती माणसे प्रेक्षक म्हणून धरून आणतो तसे अक्षरशः 'ध्यानं' वाटतील अशा डॉक्टरांना आणि इतर वैद्यकीय स्टाफला धरून आणले जाते ती वेड्यांची मांदियाळी पाहून आपल्याला पोट धरधरून हसणं भाग पाडतं. अत्यंत गंभीर आणि गुंतागुंतीची परिस्थिती असलेले प्रसंग आणि प्रसंगांच्या मालिका विनोदाच्या माध्यमातून प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचतात. अगदी झाडाकडे तोंड करुन लघवी करणारा मेलेंकॉव्ह आणि त्याच्याशी गप्पा मारणारा लेवेरँटी बेरिया हे दृश्य सुद्धा त्याच्या खुसखुशीत संवादांमुळे आपल्याला हसवून जातं. आवश्यक तिथे तिरकस, हवे तिथे बोचरे, आणि जिथे हवे तिथेच असलेले संवाद ही या चित्रपटाची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे.  

साम्यवादी राजवटीत होणारी व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी; संपत्ती, जीव, आणि अब्रू यापैकी कशाचीच शाश्वती नसणे आपलं बूड शाबूत रहावं म्हणून सतत चालणारी नेत्यांची केविलवाणी धडपड आणि जनरल सेक्रेटरी (इथे स्टालिन) यांच्याशी एकनिष्ठ असण्याच्या शपथा घेणे; ठार मारावयाच्या व्यक्तींच्या याद्या स्टालिनच्या कार्यालयवजा निवासस्थानाबाहेर एनकेव्हिडी (NKVD) च्या अधिकार्‍यांच्या हातात ठेवताना बेरिया त्यांना देत असलेल्या सूचना ही दृश्ये प्रथम हसवत असली तरी चित्रपट जसजसा शेवटाकडे जाऊ लागतो तसतसं त्यातला थंड क्रूरपणा ठळकपणे जाणवू लागतो. स्टॅलिनच्या मृत्यूनंतर झालेल्या पार्टी मिटींगमधे विविध पदे आणि जबाबदार्‍यांचे वाटप इत्यादी बाबतीत 'एकमताने' घेतलेले निर्णय हे दृश्य साम्यवादी राजवटीत असलेला वास्तविक भंपकपणा दाखवतं., याखेरीज एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटात प्रमुख घटना किंवा मुख्य पात्रांच्या मागे पार्श्वभूमीवर सतत हिंसा दिसते. म्हणजे एकट्याने किंवा घोळक्याने लोकांना धरुन नेलं जात आहे, बंद दाराआडून ऐकू येणारा गोळीबार, ढकलून दिल्याने कुणीतरी जिन्यावरुन गडगडत खाली पडतंय, निव्वळ स्टालिन आजारी असल्याची बातमी घेऊन आलेल्या सैनिकाला झालेली अटक, इत्यादी प्रसंग संपूर्ण चित्रपटभर दिसत राहतात, आणि हे असं सतत दिसणारं थंडपणे चालणारं दमन हा कम्युनिस्ट कम्युनिस्ट हुकूमशाही राजवटीचा स्थायी भाव सतत चित्रपटभर अधोरेखित होत राहतो. म्हणूनच चित्रपटाच्या पोस्टरवर शेक्स्पिअरच्या 'कॉमेडी ओफ एरर्स'च्या धर्तीवर असलेले 'कॉमेडी ओफ टेरर्स' हे शब्द शोभतात. 

एखाद्या गोष्टीचं गांभीर्य चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचे अनेक मार्ग असले तरी चक्क विनोदाचा वापर करुन सादरीकरण प्रभावीपणे करण्यात यशस्वी ठरणारा कदाचित हा एकमेव सिनेमा असावा. चित्रपटाची लय आणि गती शेवटपर्यंत टिकून राहते याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. या आधी हुकूमशाहीवर विनोदी अंगाने टिप्पणी करणारे सिनेमे झाले नाहीत असं नाही, त्यातली चटकन आठवणारी नावे म्हणजे चार्ली चॅप्लिनचा द ग्रेट डिक्टेटर ते हल्ली हल्ली म्हणजे २०१२ साली आलेला साशा बॅरन कोहेनचा द डिक्टेटर हे दोन सिनेमे. मात्र या दोन्ही चित्रपटांत परिस्थितीवर भाष्य करायला विनोदाचा वापर करण्याऐवजी विनोदनिर्मितीकडे कल अधिक दिसून येतो. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर प्रेक्षकांना हसवणे हा प्रमुख उद्देश आणि त्याला तोंडी लावायला अनुक्रमे हिटलर आणि अरबी लष्करी हुकूमशहा हे हुकमी भावनिक पत्ते घेऊन दोन्ही सिनेमे बनवले आहेत असं वाटून जातं. या सर्व चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर साम्यवादी हुकूमशाहीची गोष्ट सांगण्याला प्राधान्य देणारा आणि तरीही विनोदनिर्मितीच्या योग्य जागा हेरून आपल्यापर्यंत योग्य तो संदेश पोहोचवणारा 'द डेथ ऑफ स्टालिन' ठळकपणे उठून दिसतो. 

पु. ल. देशपांडे आपल्या अंतु बर्वा या व्यक्तिचित्रात म्हणतात, "विशाल सागरतीर आहे, नारळीची बने आहेत, पोफळीच्या बागा आहेत, सारे काही आहे; पण त्या उदात्ततेला दारिद्र्य विलक्षण छेद देऊन जाते आणि मग उरते एक भयाण विनोदाचे अभेद्य अस कवच." हा चित्रपट त्याही पलिकडे जाऊन आपल्याला हसवत हसवत अंतर्मुख व्हायला भाग पाडतो, आणि म्हणूनच वेगळा ठरतो. नेहमीच्या हेरकथा आणि विनोदपटांनी कंटाळला असाल तर हा चित्रपट नक्कीच एक सुखद धक्का देऊन जाईल हे नक्की. 

म्हणूनच 'द डेथ ऑफ स्टालिन' बघायला विसरू नका!

© मंदार दिलीप जोशी
माघ कृ. १३, शके १९४२, महाशिवरात्री



Thursday, February 25, 2021

स्त्रीवाद अर्थात फेमिनिझम - महिला सशक्तीकरण नव्हे तर पुरुष अशक्तीकरण

हिंदू स्त्रिया आणि पुरुषांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की तथाकथित स्त्रीवाद हा हिंदू महिलांच्या सबलीकरणासाठी किंवा सक्षमीकरणासाठी नसून हिंदू पुरुषांचे म्हणजेच त्यांच्या वडील, भाऊ, पती आणि पुत्र असलेल्या पुरुषांचे आणि त्या योगाने संपूर्ण हिंदू समाजाचे अशक्तीकरण करण्याचा डाव्यांचे षडयंत्र आहे.

आज एकच मूल असलेल्या कुटुंबांत (हिंदू हे वेगळं लिहायला नको) एक मुलगी ही वेळप्रसंगी आईचे रूप धारण करु शकणारी कुणाची बहीण उरलेली नाही. मुलांचीही हीच अवस्था आहे; बहिणींचे रक्षण करायला किंवा तिच्याकडे हट्ट करायला आज अनेक घरांत बहिणीच नाहीत. अशी नाती उरलेलीच नसल्यामुळे आजची तरुण पिढी ही या नात्यांसोबत येणारी मजा, अधिकार, आणि जबाबदार्‍यांच्या तसंच त्या नात्यांच्या असण्याने आपसूक मिळणार्‍या शिक्षणापासून आणि सकारात्मक परिणामांच्या कोणत्याही जाणीवांशिवाय मोठी होत आहे. आजच्या पत्नी आणि आई असलेल्या स्त्रियांचा विचार करायचा तर पुरुषांसाठी आज फक्त मातृत्व ही एकच भावना शुद्ध स्वरूपात उरलेली आहे, कारण हल्ली प्रेयसी आणि पत्नीच्या नात्यांबरोबरच प्रेमाचं स्वरूप आज भावनिकदृष्ट्या प्रचंड व्यवहारी आणि कोरडं झालेलं आहे, आणि म्हणूनच वडील नामक व्यक्ती मुलींच्या आयुष्यात त्या नावाच्या अर्थासह असेलच असं नाही. याचं कारण शोधायला गेलं तर आजच्या तरुणींना नवरा आणि वडील या नात्यांना त्यांच्या पूर्णार्थाने अनुभवणं आणि स्वीकारणं हे कमीपणाचं वाटू लागलेलं आहे हे निदर्शनास येतं. 

इंग्रजीत एक म्हण आहे, 'Power corrupts, and absolute power corrupts absolutely' अर्थात सत्तेमुळे भ्रष्ट आचार निर्माण होतो आणि अमर्याद सत्तेमुळे अमर्याद भ्रष्ट आचार निर्माण होतोच. त्याचप्रमाणे आजचा स्त्रीवाद हा स्त्री आणि पुरुषांना कुठल्याही नात्यात एकमेकांना पूरक असण्याऐवजी स्त्रीला कुटुंबात अमर्याद अधिकार दिले गेले आणि त्याचा परिणाम म्हणून आजचे पुरुष स्त्रैण वाटावेत इतके बुळे बनलेले आहेत, किंबहुना बनवलेले गेले आहेत. त्यातही एकच मूल असल्याने त्याला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणं हे ओघाने आलंच. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर आजच्या तरुणांना नर्ड बनवण्याच्या नादात मर्द बनवायचं बाजूला पडलेलं आहे.

आजच्या स्त्रीला मिळालेल्या अमर्याद अधिकार आणि सत्तेमुळे तिला एक प्रकारची मानसिक नशा अनुभवायला मिळत असली, तरी असा कुठलाही अनुभव तिला जीवशास्त्राशी, जनुकीय प्रेरणांशी, आणि पर्यायाने निसर्गाशी उभा दावा मांडण्याची शक्ती देत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी स्त्रैण असलेला मुलगा जेव्हा पुढे जाऊन लग्नाच्या बाजारात उभा राहतो तेव्हा इतर बाबतीत अनुरूप असलेल्या मुलीला त्याला 'पसंत' करणं अवघड होऊन बसतं (लग्नाचा बाजार म्हणजे इथे जेव्हा प्रथम भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटू लागतं तेव्हापासून प्रत्यक्ष विवाह होईपर्यंतचा काळ). कारण कुठल्याही स्त्रीला अशा प्रकारचा स्त्रैण (emasculated) पुरुषाबद्दल प्रेम किंवा आकर्षण वाटणं शक्यच नसतं असा पुरुष आसपास असताना तिला (शारीरिक) सुरक्षितेची भावनाच निर्माण होत नाही. एक स्त्री म्हणून तिची अंतःप्रेरणा तिला काया, वाचा, मने अशाच पुरुषाकडे खेचूण नेते, अशा पुरुषाला शोधते जो तिचं संरक्षण करु शकेल. असा पुरुष तिला हल्ली कुठे मिळतो हे वेगळं सांगायला नको. 

इथे एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे लक्षात घेतली पाहीजे की स्त्रीमुक्तीचा भारतातला अर्थ हा हिंदू पुरुषांपासून स्त्रियांना मुक्त करुन इतरांसाठी त्यांना उपलब्ध करण्याची संधी निर्माण करणे हा आहे. स्त्रीमुक्ती या गोंडस नावाखाली ही एक निव्वळ वामपंथी चळवळ आहे जिने आपल्या देशात फक्त आणि फक्त हिंदूंचेच नुकसान केले आहे, आणि ह्या नुकसानाचा फायदा कोणाला होतो आहे ते ही दिसतच आहे, त्यामुळे डावे हे कोणाची ढाल बनले आहेत हे समजणे सोपे आहे. हे एकदा लक्षात आलं की या मागचं षडयंत्र लक्षात यायला वेळ लागणार नाही. पर्यायाने भारतातली डावी चळवळ ही हिंदूंच्या दृष्टीने विकत घेतलेले गारदी आणि पाळलेले पेंढारी ठरली आहे. 

द फेमिनिस्ट लाय - इट वॉज नेव्हर अबाऊट इक्वॅलिटी (The Feminist Lie - It Was Never About Equality) या आपल्या पुस्तकात बॉब लुईस सप्रमाण सिद्ध करतो की स्त्रीवाद म्हणजेच फेमिनिझम चळवळ ही समानतेबद्दल कधीच नसून उलट स्त्रीयांचा श्रेष्ठतावाद निर्माण करण्याचा उद्देश त्यामागे होता. हा अमेरिकन संदर्भ झाला, पण एक भारतीय म्हणून आपल्याला समानता नवीन नाही. एक सनातन संस्कृती म्हणून आपण अनेक राण्या पाहिल्या आहेत आणि शक्तिरुपेण संस्थिता अशा देवींचा आपलं रक्षण करावं म्हणून नेहमीच धावा केलेला आहे. आपली समस्या समानतेच्या नावाखाली, महिला सशक्तीकरणाच्या नावाखाली होणारे पुरुषांचे अशक्तीकरण, हतवीर्य होणं ही आहे. दुर्दैवाने हे अगदी राजरोस सुरु आहे आणि यावर आपल्याला लवकरात लवकर उपाय शोधावाच लागेल.


बॉब लुईसचे हे पुस्तक अत्यंत वाचनीय असून नेटवर विनामूल्य उपलब्ध आहे. 

आपल्याला इतिहासात अनेक उदाहरणे आहेत ज्यात जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आलेली आहे तेव्हा अनेकदा आपण देवींचा धावा केलेला आहे. महिषासुरमर्दिनी, नरकासुरमर्दिनी या देवीच होत्या. बाईचा सत्तांध बुवा आणि बुवाची अधिकारहीन बाई करणार्‍या स्त्रीवादी असुराचा वध करायलाही स्त्रियांनीच पुढाकार घ्यावा लागेल आणि त्यांना जी शस्त्रे लागतील त्याला पुरुषांना धार काढून द्यावी लागेल. फेमिनिझम हा राक्षसांची ढाल आहे, आणि राक्षसांना संपवायचं असेल तर त्यांची स्त्रीवाद ही ढाल आधी नष्ट करावी लागेल. 

🖊 मंदार दिलीप जोशी
माघ शु. १३, शके १९४२

टीपः ही पोस्ट स्त्रीवाद या विषयाकडे फक्त स्त्री नव्हे तर सर्व बाजूंनी विचार करणार्‍या लोकांसाठी आहे. "म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की...." छाप वक्तव्य करायची असतील तर कृपया पोस्टकडे दुर्लक्ष करावे.

--------------------------------------------------------------------------
संदर्भः English Version
--------------------------------------------------------------------------