Friday, April 17, 2020

एकस्रोत अधर्मी एवं रामायण

रामायण के परसोंं के एपिसोड में महाराज बिभीषण वैद्यराज सुषेण से कहते हैं:
धर्म और अधर्म की व्याख्या सदैव एक नहीं रहती। वैद्य का धर्म है, सबकी पीडा हरना एवं उनके प्राणो की रक्षा करना। वैद्यक किसीं एक के लिये नहीं, अपितु सारे मानवजाती की दुखदर्द की रक्षा का उपाय करने एवं उसकी पीडा हरने के लिये है। यही चिकित्सक का सर्वोपरी धर्म है।

वैद्यराज सुषेण कहते हैं: राजनीती का सिद्धान्त कहता हैं कि आपको मेरा विश्वास नहीं करना चाहीये। मैं शत्रूपक्ष का वैद्य हूं। आप के रोगी का अहित कर सकता हूं।

इसपर प्रभू श्रीराम कहते हैं:
वैद्य का कोई शत्रू नहीं होता, कोई मित्र नहीं होता। वैद्य और रोगी के बीच तो केवल विश्वास की एक अलौकिक डोर होती है। मैं अपने अनुज लक्ष्मण को आप को सुपूर्द करता हूं। राजभक्ती का पालन करने के लिये चाहे तो इसके प्राण ले लिजीये अथवा वैद्य का धर्म पालन करने के लिये इसे जीवनदान दे दिजीये, ये मैं आप पर छोडता हूं। आप पर मुझे पूरा विश्वास है।

प्रभू श्रीराम तो अपने शत्रू के वैद्यराज के हाथ अपने अनुज के प्राण रख देते हैं। तथा रावण जैसे असुर के राजवैद्य सुषेण भी लक्ष्मण की सुश्रुषा करने के लिये तैय्यार हो जाते हैं।


हमारे वैद्यराज एवं समस्त आरोग्य सेवकों ने इसी प्रकार अपने पराये का भेद किये बिना, समस्त रोगीयों की पीडा का उपाय एवं उनके जीवित की रक्षा कर रहे हैं। यह रोग तो ऐसा है कि रोगी पर उपचार करने वाले वैद्यक समुदाय को ही यह रोग होने की पूर्ण संभावना होती है। फिर भी हमारे समस्त वैद्यराज तथा आरोग्यसेवक यह सोचे बिना सारे रोगीयों की सेवा कर रहे हैं कि इनमें से कुछ रोगीयों में ऐसे असुरी मानसिकता के लोग हैं जिनके विचार कई शतकों से मानवता का विनाश ही करते आ रहे हैं, एवं भविष्य में भी करते रहेंगे ।

परंतु इसके उपलक्ष में उनपर कुछ एकस्रोत अधर्मी (sℹ️ngle s⭕️urce threat) पत्त्थर फेंकने का, वमन तथा थूत्कृत्य करने का, विवस्त्र होकर नग्नावस्था में नृत्य करने का दुःसाहस कर रहे हैं। इन्हें न मानवता की चिंता है न महिलाओं के सन्मान की। आज न तो ऐसे धर्मपालन करने वाले प्रभू राम हैं न तो ऐसे रोगी जिनके लिये वैद्यराज तथा आरोग्यसेवक अपने प्राण दांव पर लगा दें और न तो ऐसे धर्मपालक रोगी एवं उनके परिजन हैं जो शत्रू के हाथ अपने रोगी के प्राण विश्वासपूर्वक सुपूर्द कर दें।
इस अवस्था में हमारे वैद्र्यराज तथा आरोग्यसेवकों को स्मरण रहे, कि वैद्यों पर जो रोगी की रक्षा का दायित्व है, वो केवल उस समय तक है जब तक रोगी अपने धर्म का पालन करे। रोगी यदि अपनी व्याधी के कारण उत्पन्न भ्रम के चलते कोई असभ्य कृत्य करता है तो वह रोग का ही एक भाग होता है, तस्मात इस अवस्था में भी वैद्य अपने सुश्रुषा के धर्म का पलन करने के प्रति बाध्य होते ही हैं।

परंतु यदि सामनेवाला केवल अपने धर्म का पालन नहीं करता अपितु वो एक महापापी विचार से षडयंत्र का भाग बनकर वैद्य समुदाय पर उनके दुष्कृत्यों से अत्याचार करता है, तो पुलिस, न्यायालय, एवं सरकार का यह कर्तव्य है कि वे वैद्यक समुदाय को मार्गदर्शन करें कि ऐसे अधर्मीयों से कैसे वर्तन करें तथा उन्हें ऐसे वर्तन के लिये यह अधिकार भी प्रदान करें जिससे उन्हें आगे चलकर समस्या न उत्पन्न हो।

प्रभू श्रीराम ने यह भी कहा था कि हमारी शरण में आनेवाले के प्राणरक्षण करना हमारा धर्म है। परंतु यदि कोई युद्ध की इच्छा से हमारे समक्ष उपस्थित होता है तो उससे युद्ध करना ही हमारा धर्म तथा कर्तव्य है। तो यह एकस्त्रोत अधर्मी हमारे वैद्यक समूदाय से जिस प्रकार का वर्तन कर रहे हैं, वह युद्ध ही तो है। इस कारण वैद्यक समुदाय को ऐसे मार्गदर्शन की नितांत आवश्यकता है।

प्रभू श्रीराम सबकी रक्षा करे। जय श्रीराम 🙏

© मंदार दिलीप जोशी

Tuesday, April 7, 2020

कलियुगातली भरत "भेट"

सद्ध्या रामायण मालिका सुरू आहे.

महाराज दशरथांनी माता कैयेयीला दिलेल्या दोन वरांची पूर्तता करायला राम अगदी सहज वनवास मान्य करुन अयोध्येतून निघून जातो. त्याच्यासोबत पत्नी सीता आणि धाकटा भाऊ लक्ष्मणही. आजोळी गेलेल्या भरताला हे कळल्यावर तो आईची कठोर शब्दांत निर्भत्सना करतो आणि रामाला आणायला सगळ्यांसोबत वनात जातो. रामाने नकार दिल्यावर तो त्याच्या पादुका अयोध्येत सिंहासनावर ठेवतो आणि रामाच्या वतीने राज्य करतो. धर्मपालन करण्याकरता, दिलेला शब्द पाळण्याची आपल्या कुळाची परंपरा आहे तिची प्र्तिष्ठा राखायला आपल्या हक्काचं असलेलं राज्य सहज दुसर्‍याला देऊन टाकणारा राम आणि आपल्या हक्काचं नसलेलं पण आयतं मिळालेल्या राज्याचा राजा म्हणून उपभोग घ्यायचं नाकारून ते रामाला परत द्यायला निघालेला आणि रामाच्याच पादुका सिंहासनावर ठेऊन त्याच्या वतीने राज्य करणारा भरत अशी देवमाणसे होती म्हणून आपलं राष्ट्र मोठं झालं.

भरत मिलाप आज: श्रीराम और भरत का हुआ ...

असं आजच्या काळात घडू शकेल का? असं आज कोण करेल? दोन घराच्या मधलं कुंपण एक इंच इकडे की तिकडे यावरुन पिढ्यानपिढ्या कोर्ट्कज्जे करणार्‍याया लोकांच्या काळात भरतासारखी वृत्ती कुणाची असेल? असा विचार मनात आला आणि लगोलग एका मित्राने सांगितलेला किस्सा आठवला. तो सांगतो आहे अशा पद्धतीने हा किस्सा तुमच्या समोर मांडतो आहे:

"मी आमच्या गावी हल्ली सहा सात वर्षांपासून नियमित जाऊ लागलोय. माझ्या जन्माच्या फार आधीपासून, म्हणजे साधारण २०-२५ वर्ष आधीपासूनच, आजीने घरचे संबंध तोडले होते किंबहुना तिला तोडायला लावले गेले असं म्हणणं संयुक्तिक ठरेल. साधारण १९६५ च्या दरम्यान घडलेली ही गोष्ट आहे. आजीचे आणि इतर घरच्यांचे काही गंभीर स्वरूपाचे वैयक्तिक वाद झाले आजीला बाबांच्या चुलत्यांनी घराबाहेर काढलं. आजीने फक्त जुजबी कपडे आणि तेव्हा दहा वर्षाच्या माझ्या बाबांना कडेवर घेऊन घर सोडलं आणि बदलापूरात निघून आली.

वडिलांचा मामा इकडे राहत असे, त्याने एक घर पाहून दिले, आजीला नोकरी लावून दिली. मग आजीने २०-२५ वर्ष नोकरी करुन बाबांना मोठं केलं. लग्न लावून दिलं. आजोबा तिकडेच राहायचे, आणि वर्षातून एकदा दोनदा इकडे त्यांना न सांगता इकडे आजीला आणि बाबांना भेटायला याय. त्यांनी घरच्यांना विरोध केला नाही म्हणून आजीचा त्यांच्यावरचा राग कधीच गेला नाही. 

ती चुलत्यांची पिढी नंतर कालौघात संपली आणि जवळजवळ पन्नास वर्षांनि आता माझे जे चुलत चुलते आहेत, त्यांच्यापैकी दोन नंबरचे काकाआजोबा आहेत त्यांचा मुलगा सहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ मध्ये आजीला शोधत इकडे आले. मला गावी घेऊन गेले आणि सगळी कायदेशीर कारवाई करून सगळीकडे सातबाऱ्यावर, घरावर आमची आजीची, आईची, आणि माझी नावे लावून घेतली (माझे बाबा हयात नाहीत). हे माझे चुलत चुलते सांगतात, ती लोक सगळी नालायक होती आमच्या काकूशी अशी वागली. आम्ही लहान होतो तेव्हा. जे झालं ते झालं, पण आता ज्यांच्या हक्काचं जे आहे ते त्यांना मिळायला हवंच. 

हे एवढावरच थांबलं नाही. त्यांनी मध्यंतरी जमिनीचे व्यवहार करायचे होते तेव्हा मला बोलवून  घेतले आणि माझा त्यात हिस्सा आहे म्हणून माझ्या परवानगीने सगळे सोपस्कार पार पाडले. त्या व्यवहारात जे पैसे मिळाले त्याचा हिशोब मला देऊन ते पैसे माझ्या खात्यातही भरले. त्यांंचं म्हणणं असं की आम्हाला आमचं आहे अजून काय करायचं आहे अधिक हाव ठेवून?! त्या काकाने असं करायचं कारण म्हणजे त्याची आई.. जी आमची दोन नंबरची काकूआजी.. तिने हे सगळं ठरवून मोठ्या मनाने केलं.. आता ते घर आणि तिथलं सगळं ही काकूआजी पाहते. ती एकदम देव माणूस आहे. 

गावचं घर पाहणारे आमचे चुलत काका भजनीबुवा आहेत. टिळा लावून पांढरा झब्बा लेंगा घालून फिरणारे. गुरुवारी तिथल्या दत्ताच्या देवळात, शनिवारी मारुती मंदिरात भजनाला टाळ घेऊन असतात. कधीही घरी गेलो की सकाळी वाडीतल्या बागेत धोतर नेसून परडीत फुलं काढताना, नाहीतर दुपारी वाडीत वालीच्या खोप्यात बंदूक घेऊन माकडांना हुसकवताना दिसतात. नाहीतर चुलीसाठी लाकडं आणताना दिसतात. काकू परसदारी हौदात कपडे धुताना नाहीतर भांडी घासताना दिसते. काकूआजी पडवीतल्या झोपाळ्यावर बसून सुपारी कातरताना दिसते. खळ्यात काजू नाहीतर कोकम वाळत घातलेली दिसतात. टिपिकल कोकणातल्या घरातलं दृश्य.

मग मी आता चार सहा महिन्यांनी पडीक असतो तिकडे. येताना मला घरची कोकमं, मोहरी, वाली, मिऱ्या, काजू, गरे बांधून दिले जातात. 

जाताना हलका जाणारा मी येताना आनंदाचं ओझं घेऊन घरी येतो.

आजकालच्या काळात असा विचार मनात येणं हीच मोठी गोष्ट. बरं आला जरी, तरी इतक्या वर्षांपूर्वी दुरावलेल्या नातेवाईकांना चिकाटीने शोधून काढणं ही त्याहून मोठी गोष्ट. आणि वर तरुण वारसाला सोबत घेऊन सगळीकडे कागदोपत्री नावे लावणे म्हणजे कहर आहे. धन्य ती मित्राची काकू आजी आणि धन्य ते चुलते ज्यांनी हे सगळं घडवून आणलं. 

भारतातल्या एकूण हिंदू लोकसंख्येपैकी १% लोक जरी असं वागायला लागले, तर रामराज्य नाही तरी त्याचे वारे नक्की वाहू लागतील हे नक्की.

शुभ रात्री मित्रांनो. जय श्रीराम |

© मंदार दिलीप जोशी
चैत्र चतुर्दशी, हनुमान जयंतीचा उपवास, शालीवाहन शके १९४२