Sunday, December 15, 2019

मोदीजी तुम्ही पडलात?

मोदीजी तुम्ही पडलात?

बरं, चालायचंच. शरीरच पडलं ना, वय होत चाललं आहे, शरीर कधी ना कधी दगा देणारच. ते पडलं तरी चालेल मोदीजी, विचारांत घसरण होता कामा नये. होय तर.

मोदीजी, ऐका. तुम्ही पडलात तर पडलात, पण ज्यांना तुम्ही अमुक करोड देशवासीयो म्हणून संबोधता ना, त्या असंख्य लोकांच्या आशाआकांक्षांना धक्का लागता कामा नये, ज्यांच्या लेखी मोदी हे नाव म्हणजे शेवटची आशा आहे.

१९४७ मधे धार्मिक आधारावर फाळणी झाल्यावर आपले अनेक लोक तेव्हापासून काही हलगर्जी राजकारण्यांमुळे शत्रूभूमीत अत्याचार सहन करत आहेत. सत्तर वर्षांनंतर तुमच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हलकं स्मितहास्य दिसतंय. तुमच्या शरीराचा तोल गेला तर जाऊदे एक वेळ, पण या लोकांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य जाता कामा नये.

एक काळ असा होता की अनेकांनी नैराश्यापोटी काश्मीर आपल्या हातून गेलाय असा समज करून घेतला होता आणि तसं झालंही असतं. कारण तिथे न गवताचं पातं उगवत नाही म्हणून अक्साई चीनवर पाणी सोडायला हरकत नाही असे तारे संसदेत निर्लज्जपणे तोडल्याचे देशाने ऐकले आहेत. त्याच संसदेत तुम्ही ३७० ची तोडमोड करून देशाला विश्वास दिलात की आता खरोखरच देशाची एकही इंच भूमी शत्रूच्या ताब्यात जाणार नाही. मोदीजी, तुम्ही घसरून पडलात तर पडलात, तुमच्यावरचा भारताचा हा विश्वास डगमगता कामा नये.

मोदीजी, तुम्ही जेव्हा इंग्लंड, अमेरिका, इस्रायल, वगैरे देशांत फिरता ना, आणि जेव्हा तिथे लोक "मोदी, मोदी" म्हणून ओरडतात ना, तेव्हा आम्हाला "भारत, भारत" ऐकू येतं. आमच्यासारख्या कोट्यवधी लोकांना पूर्ण जगभर हाच "भारत, भारत" चा गजर ऐकायचा आहे. मोदीजी, तुम्ही पडलात तर पडलात, या गजराचा आवाज कमी होता कामा नये.

सभांच्या शेवटी तुम्ही लोकांना 'वंदे मातरम' आणि 'भारत माता की जय' म्हणायला लावता ना, शप्पथ सांगतो मनाला इतकं समाधान वाटतं की चला कुणीतरी आपल्या बापजाद्यांचा जयजयकार न करता देशाचा जयजयकार करतो आहे. कारण अमक्या तमक्याचा जय म्हटल्यावर काही लोकांच्या पूर्वजांचा जयजयकार डोळ्यांसमोर येतो,  पण भारत माता की जय म्हटल्यावर देशातल्या दरिद्रातल्या दरिद्री माणसापर्यंत सगळ्यांच्या पितरांचा जयजयकार होतो. हा जयजयकार थांबता कामा नये. मोदीजी, तुम्ही पडलात आणि क्षणभर थांबलात तरी चालेल, पण भारत मातेच्या सन्मानार्थ हात उंचावून जयजयकार करण्याची ही परंपरा थांबता कामा नये.
   
राजकारण, वैयक्तिक स्वार्थ, आणि पुचाट धोरणं यांच्यामुळे तुकड्या तुकड्यांत विखुरलेल्या हिंदूंना महत्प्रयासाने तुमच्या नावामुळे एकत्र येत आहेत मोदीजी.   तेव्हा तुम्ही पडलात तर पडलात, हिंदूंना जोडण्याच्या या प्रयत्नांत खंड पडता कामा नये.

काही लोकांना तुम्ही पडलेलं पाहून मजा येते आहे. भूतपूर्व राष्ट्रपती कैलासवासी श्री शंकर दयाळ शर्मा एकदा राजघाटावर एका कार्यक्रमाला गेले असताना चालता चालता पडले. मला स्पष्ट आठवतं आहे, टाइम्स ऑफ इंडियाने ते वृत्त छापताना कसे पडले याचे तीन टप्प्यातले तीन फोटो छापले होते. राष्ट्रपतींबद्दलचं हे वृत्त आणि तेही या पद्धतीने छापू नये याच तारतम्य इंग्रजांचे पिल्लू असलेल्या या वृत्तपत्राला नव्हते.

त्यावर एका वाचकाने टाईम्सला दिलेलं उत्तर सुद्धा, आमच्या तीर्थरूपांनी मोठ्याने वाचून दाखवल्याने, ठळकपणे लक्षात आहे. त्या वाचकाचे शब्द होते - It is not the President, but the Times of India which has fallen.

ही तीच लोकं आहेत ज्यांना तुमचं न थांबता धावणं आवडत नाही. पण आम्ही सांगतो मोदीजी, जोपर्यंत दुसरा मोदी निर्माण करायची धमक आमच्यात येत नाही तोवर तुम्ही धावत रहा, तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही.

मत दिलंय ना, मग तुम्हाला इतक्या सहजासहजी सोडणार नाही आम्ही. प्रत्येक मत वसूल करू.

पण एक सांगू का, काँग्रेसला शंभरदा हरवता येऊ शकतं पण वयाला, काळाला नाही ना हरवता येत. म्हणून जरा स्वतःची काळजी घेत चला.

अच्छा आजपुरतं पुरे.

©️ मंदार दिलीप जोशी, पुणे, महाराष्ट्र
©️ Sarvesh Kumar Tiwari, गोपालगंज, बिहार


आय बेग टू

खरं म्हणजे ज्यांना समजूनच घ्यायचं नाही, त्यांना काहीही आणि कितीही सांगितलं तरी उपयोग नाही. पण लाखातला एक जरी समजला, तरी पुरे म्हणून हे.

हे कव्हरिंग लेटर वाचा, विमा कंपनीच्या प्रतिनिधीने वीर सावरकरांना लिहिलेलं आहे. पॉलिसी पाठवत आहे, सोबतचा फॉर्म भरून पाठवा अशा आशयाचं हे पत्र. यातले "I beg to enclose" आणि "obliged" हे शब्द पहा. हे beg to याचा अर्थ भीक मागतो असा होत नसून, 'आपणांस विनंती करतो' या अर्थाचा इंग्रजीतून पत्र लिहिताना वापरायचा एक सामान्य शिष्टाचार आहे.

स्वातंत्रवीर सावरकर यांनी इंग्रज सरकारला लिहिलेल्या पत्रात माफीची भीक मागितल्याचा समज हा त्या काळात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेच्या अज्ञानामुळे, किंवा ज्ञान मिळवायची इच्छाच नसल्यामुळे करून दिला जातो.

संस्कृत येत नाही म्हणून एखाद्या पुस्तकाचा दु:स्वास करायचा आणि इंग्रजी पत्रलेखनाची शैली झेपत नाही म्हणून सावरकरांवर जळायचं आणि त्यांची बदनामी करू पहायची यात फार अंतर नाही. पण पिवळी पुस्तके वाचायची सवय असल्याने बुद्धीची झेप तेवढीच असणार.  किंबहुना, बुद्धीची झेप तेवढीच असल्याने फक्त पिवळी पुस्तकेच झेपत असणार.

आणि १९४८ पर्यंत सोशल मीडिया नव्हतं म्हणून चाळे खपून जायचे, आता लोक सोडणार नाहीत. तेव्हा पप्पूशेट, तुम्ही आपले थायलंडला जा सुट्टीवर आणि मस्त अंगप्रत्यंगास मसाज करून घ्या, कारण ताण आला की असं काहीतरी बरळत सुटता. हा मानसिक मसाज तुम्हाला झेपणार नाही.

#वीर_सावरकर

टीप: राऊत, ही माझी पोस्ट माझ्या नावासकट एकही शब्द न बदलता किंवा गाळता सामनात छापून दाखवा तर तुम्हाला मानलं.

©️ मंदार दिलीप जोशी