Monday, January 27, 2020

नक्षलवाद्यांवर पलटवार - गावकऱ्यांचा नक्षलवाद्यांवरच उलट हल्ला

मलकानगिरी (ओरिसा) - नक्षलवाद्यांच्या विकास विरोधी धोरणांनी चिडून ग्रामस्थांनी थेट नक्षलवाद्यांवरच हल्ला केल्याची घटना ओरिसा राज्यातील मलकानगरी जिल्ह्यातल्या जन्तराई नामक गावात घडली आहे.

या हल्ल्यात एक नक्षलवादी ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृत नक्षलवाद्याचे शव पोलीस निरीक्षक कार्यालयात तर जखमी माओवादी दहशतवाद्यावर जिल्ह्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जन्तराई गावात सुरू होणार असलेल्या नव्या रस्तेबांधणीला नक्षल दहशतवादी विरोध करत होते व रस्ता होऊ देऊ नये याकरिता गावकऱ्यांना धमक्या देत असत. हा रस्ता झाल्यावर गावकऱ्यांना फक्त सुखकर प्रवासच नव्हे तर आपल्या शेतमालाला वाजवी बाजारभाव व सरकारी योजनांचा लाभ मिळेल.

गावकऱ्यांना शुभेच्छा.

-----------------------------



मलकानगिरी (ओड़िसा) - नक्सलियों के विकास विरोधी होने पर ग्रामीणों का गुस्सा फूटा । ग्रामीणों ने माओवादियों पर किया हमला। हमले में एक केडर नक्सली की मौत , एक बुरी तरह घायल हो गया है मृत नक्सली का शव एसपी कार्यालय में और घायल का जिला अस्पताल में इलाज जारी ।मामला ओडिसा के मलकानगिरी जिले के जन्तराई गांव का । दरअसल यहां बन रही सड़क का नक्सली विरोध कर ग्रामीणों को चेतावनी दे रहे थे कि सड़क न बनाने दें । सड़क बनने से ग्रामीणों को न केवल यातायात की सुविधा मिलती बल्कि सरकारी योजनाओं का लाभ और अपनी फसल का सही दाम मंडी तक ले जाने से मिलता ।


#StopRedTerror #Naxalism #Maoism #Terrorism

Friday, January 10, 2020

अश्रू विकणे आहे


आपण भारतीय फारच संवेदनशील असतो आणि त्यामुळे आपल्याला भावुक करून टीआरपी वाढवणं हा सर्वभाषिक वाहिन्यांच्या हातचा मळ झालेला आहे.

सिनेमा नाटकात गरजच असते, पण हे लोण आता तथाकथित रिएलिटी शो पासून मुलाखतीपर्यंत सगळीकडे पसरलेलं आहे. पहावं तिथे रडारड. अगदी मास्टरशेफ सारख्या कार्यक्रमात सुदधा माझी आई/वडील, त्यांनी खाल्लेल्या खस्ता, आमची गरिबी, लोक मला कसे टोचून बोलत होते हो असं टँण टँण टँण ब्लाह ब्लाह ढसा ढसा अश्रूपात करत सुरू असतं.

मुलाखतीतल्या लोकांचं कार्यक्षेत्र आणि त्या मागचा प्रवास आणि त्यासंबंधीचे विचार या पुरता कार्यक्रम मर्यादित असेल तर यांना बहुतेक पैसे मिळत नसावेत, म्हणून ओढूनताणून अश्रू काढायचे प्रकार चालतात. त्यात मुलाखत देणारे लोक अभिनयक्षेत्राशी संबधित असतील तर आपल्याला त्यांच्या उत्कृष्ठ अभिनयाचं दर्शनही होतं. कहर म्हणजे मुलाखतीतल्या लोकांच्या भावनांच्या विहिरीला त्यांच्या दिवंगत आईवडीलांचे फोटो दाखवून किंवा तुम्ही त्यांना काय सांगाल अशा प्रश्नांचे रहाट लावून डोळ्यांतून अश्रूंचे पाट वहायला लावणे.

गंमत म्हणजे बऱ्याच लोकांना ते खरं वाटतं. रिएलिटी शो असो किंवा मुलाखत, अशा कार्यक्रमात जवळजवळ प्रत्येक वेळी सगळं सराव करून घेतलेलं अर्थात रिहर्स केलेलं असतं हो. प्रश्न सुद्धा आधी द्यावे लागतात, हे काही मोठं गुपित नव्हे.

सामान्य जनतेतील एखादा दमलेला बाबा आपली मुलं काय करत असतील या  वेळी शाळेत असा विचार करत असतो तर ऑफिसमधून येताना ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर एखाद्या आईचा अर्धा जीव पिल्लांपर्यंत पोहोचून तिचे डोळे पाणावलेले असतात. एखादी बहीण आपल्या भावाचा इंटरव्ह्यू आज नीट होऊदे अशी परमेश्वराकडे प्रार्थना करत असते तर एखादा भाऊ बहिणीच्या लग्नासाठी जुळवाजुळव करत असतो. एखादा मित्र आपल्या जायबंदी मित्राला ऑफिसात सोडायला वाट वाकडी करून आणि खिशाला खार लावून जातो तर कुणी आणखी काही करत असतं.

थोडक्यात, आम्हाला तुमची पाककला दाखवा, अभिनय दाखवा, खेळ दाखवा - हं त्या संदर्भातला संघर्षही दाखवा म्हणजे आम्ही काही शिकू त्यातून. बाकी रडारड आणि रोजच्या आयुष्यातला संघर्ष जनतेच्या पाचवीला पुजलेली आहे. त्याबाबतीत सामान्य लोकांकडून तुम्हीच शिकाल.

So please spare us the artificial sentimental overflow. तुमची रडारड तुमच्याकडे ठेवा.

🖋️ मंदार दिलीप जोशी
पौष पौर्णिमा, शके १९४१

Thursday, January 9, 2020

छपाकच्या निमित्ताने


तुमच्यापैकी अनेक जण जिहादींशी मैत्री ठेऊन आहेत. धक्का बसला? राग आला? पुन्हा सगळे तसे नसतात अशी टेप वाजवायची इच्छा होते आहे? आधी पुढचं वाचा.

लक्ष्मी अग्रवालवर ऍसिड फेकणारा नईम खान लक्ष्मीच्या भावाचा मित्र होता, लक्ष्मी नईमच्या बहिणीची मैत्रीण होती...आणि लक्ष्मीवर ऍसिड फेकण्यात मदत करणारी नईमच्या भावाची प्रेयसी होती.

लक्ष्मी १४ वर्षांची असल्यापासून ३१ वर्षांचा नईम तिने आपल्याशी शय्यासोबत करावी म्हणून तिच्या मागे लागला होता. एक वर्ष प्रयत्न करून थकल्यावर शेवटी नईम खानने त्याच्या मजहबी मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या मदतीने लक्ष्मीवर ऍसिड हल्ला केला. नईमच्या भावाच्या प्रेयसीने लक्ष्मीला बाजारात धरून खाली पाडलं आणि सोबतच्या तीन जिहादींनी मिळून तिच्यावर ऍसिड फेकलं.

आता दुसरा परिच्छेद पुन्हा वाचा.

काही शिकलात का यातून?

🖋️ मंदार दिलीप जोशी