Showing posts with label राजकारण. Show all posts
Showing posts with label राजकारण. Show all posts

Friday, June 26, 2020

युवराजांच्या पणजोबांचे 'उद्योग' आणि चीन

आज चीनबद्दल बोलताना आपण नेहरूंना दोष देतो आणि त्यावर काँग्रेसी चवताळताना दिसतात. 

प्रख्यात लेखक भैरप्पा यांच्या आवरण कादंबरीत एक सुंदर वाक्य आहे त्या वाक्याचा उत्तरार्ध आजच्या कोंग्रेसींना बरोब्बर लागू ठरतो. भैरप्पा आवरणच्या प्रस्तावनेत् म्हणतात., "मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्यांशी नातं जोडून आपण त्यांचेच वारसदार या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारी स्विकारावी लागेल". आवरणमध्ये मांडलेला हा मुद्दा किती यथार्थ आहे हे आपल्याला रोजच्या जीवनात सतत जाणवते, विषेशत: राजकीय घडामोडींचे विश्लेषण करताना. आधी इंग्रजांनी आणि मग नेहरूप्रणित समाजवादाने प्रभावित लोकांनी आपल्या लोकांचे केलेले ब्रेनवॉशींग किती खोलवर भिनले आहे आणि आपले सध्याचे (अ)राजकारणी आणि संभावित निधर्मीवादी, मार्क्सवादी, साम्यवादी, आणि निर्भीड (!) व निष्पक्ष (!!) पत्रकार देखील हेच धोरण कसे राबवत आहेत हेच "आवरण" वाचताना आपल्याला ठायी ठायी आठवत राहतं. इथे पु. ल. देशपांडेही आठवतात. त्यांच्या म्हैस कथेत, "बसच्या धक्क्यामुळे बहुतेक मंडळी 'होय होय होय होय, नाय नाय नाय नाय', म्हणजे साधारणत: भारताच्या परराष्ट्रीय धोरणासारखं..." हे वाक्य तुम्हाला आठवत असेलच. 

या अनुषंगाने नेहरूंच्या चुकांचा पाढा आज वाचला जाणार असेल तर ते योग्यच आहे. भोगविलासी, अप्रामाणिक, व अकार्यक्षम माणूस सर्वोच्च निर्णयस्थानी असल्याचा परिणाम फक्त परराष्ट्र धोरणाचा बट्ट्याबोळ होण्यापुरता एवढाच मर्यादित नसतो. नेहरूंकडे बहुमत होते. सर्व जनतेचा विश्वास होता. देशाची उद्योग धोरणे काय असावीत हे त्यांच्या हातात होते. त्यांनी जाणीवपूर्वक बेंगरूळ समाजवादाचीकास धरली आणि भारतातल्या खाजगी उद्योगांचा गळा घोटायचा अव्यापारेषू व्यापार केला. सबकुछ सरकार का असे बिनडोक आणि घातक धोरण अवलंबले.

भारतात उद्योजकांची कमतरता कधीच नव्हती.  अगदी चाणक्याच्या काळापूर्वीपासून शून्यातून अफाट पैसे मिळवणारे उद्योजक भारताने पाहिले आहेत. जुन्यापद्धतीच्या व्यापारात, औद्योगिक क्रांती झाल्यावर नव्या उत्पादनाच्या व्यापारात भारताने अनेक कल्पक, प्रतिभावान व्यावसायिक घडवले. बिर्ला, टाटा हे पहिल्या महायुद्धाच्या काळात घडलेले उद्योजक आहेत. पण नेहरूंच्या भोंगळ धोरणाप्रमाणे उद्योजक हे रक्तपिपासू, दुष्ट, स्वार्थी लोक असे रंगवले गेले. उलट उद्योगपती मात्र कपाळावर गंध लावणारे, मारवाडी पोषाखातले, स्थूल, सेठ धरमदास वगैरे सूचक नावे असणारे व्हिलन, गोरगरीबांना लुटणारे असेच दाखवले जायचे.
 
पण हे अत्यंत घातक धोरण होते. सरकारने उद्योग चालवले खरे पण त्यामुळे ना गरीबांचे भले झाले ना सरकारला पैसे मिळाले. समस्त बाबू लोकांचे उखळ मात्र पांढरे झाले. अत्यंत भ्रष्ट, नगण्य उत्पादनक्षमता असलेले अनेक पांढरे हत्ती जन्माला घालून भारताची परिस्थिती अधिकच खालावण्याला हे समाजवादी धोरण जबाबदार आहे.  त्याकरता नेहरू हा एकमेव माणूस आणि त्याचे चमचे जबाबदार आहेत.  नेहरु कन्येने हेच धोरण आणखी चार पावले पुढे नेऊन आणखी वाटोळे केले. त्यात चीनने युनियनबाजीला प्रोत्साहन देऊन उद्योगांची जी वाट लावली ती रोखण्याचा कुठलाही प्रयत्न नेहरू संस्कृतीतल्या काँग्रेस कडून झाला नाही. 

जुन्या भारतात फोन सेवा, बँक सेवा, वीज ही काय दर्जाची होती हे एकदा आठवून पहा. आज बीएसएनएलच्या पतनावर नक्राश्रू ढाळणार्‍या लालभाईंना हे सांगा. यामुळेच आपण समस्त जगाच्या कित्येक दशके मागे फेकलो गेलो आहोत.

कितीतरी उद्योजकांना जाचक धोरणांपायी सिंगापूर, थायलंड वा अन्य देशात उद्योग न्यावे लागले. तिथे ते यशस्वीही झाले पण त्यात नुकसान झाले ते भारताचेच .

भारतात अत्यंत अतर्क्य कायदे करून उद्योगांच्या गळ्याला नख लावण्याचे प्रकार झाले आहेत. परकीय चलनावर अतिरेकी निर्बंध, कंपनीने किती फायदा करावा ह्यावर निर्बंध, परकीय गुंतवणूकीवर अत्यंत जाचक निर्बंध - ह्या सगळ्यामुळे आपले अतोनात नुकसान झालेले आहे.

नेहरुच्या समाजवादामुळे पाया भक्कम झाला असे म्हणणे म्हणजे बिन लादेनने विमानाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन बिल्डिंग उडवून नव्या इमारतींचापाया भक्कम केला म्हणण्यासारखे हास्यास्पद आहे.

होते ते उद्योग नष्ट करुन त्याजागी पांढरे हत्ती बनवून देशाच्या कमकुवत आर्थिक स्थितीला अधिकच खिळखिळी बनवण्याचे कधीही समर्थन करता येणार नाही.

ह्याकरता लोकांचा नेहरूंवर रोष असेल तर त्यात आश्चर्य वाटायला नको. त्यात काँग्रेसप्रणित राजीव गांधी फाउंडेशनने थेट चीनकडून देणग्या स्वीकारल्याचे आज उघड होत असताना कोंग्रेसच्या युवराजांना नेहरूंच्या पापांपासून लांब पळता येणारच नाही.

✒️ © मंदार दिलीप जोशी (🗒️ संपादित)
आषाढ शु. ५/६, शके १९४२

Monday, February 24, 2020

कबीर कला मंच - शहरी व सशस्त्र नक्षलवाद संबंध

~ हिंदी ~

यह पोस्ट इम्तियाज जलील के बयान पर ध्यान आकर्षित करने के लिए नहीं है। हालांकि इन लोगों से कोई पृथक अपेक्षा नहीं है, अंतिम वाक्य पर ध्यान देना आवश्यक है। किसी को भी पता न चलने दें, बस लोगों को उत्तेजित और परेशान करें।

इस पोस्टका मुख्य विषय लाल कोष्ठकमें रेखांकित किया गया है ही| जो कबीर कला मंच शहरी और सशस्त्र नस्लवाद का सक्रिय समर्थक रहा है, उसके कार्यकर्त्याओं की उपस्थिती सीएए के विरोध में हो रहे शांतीदूतों के कार्यक्रमं में होना आश्चर्यकारक है ही नहीं| यह कहना पर्याप्त है कि मंच के कार्यकर्ता एल्रगार सम्मेलन और कई अन्य ऐसी घटनाओं में सक्रिय रूप से कार्यरत होने के इंटेलिजन्स रिपोर्ट हैं। इस तरह से भारत का हर टुकडे टुकडे गँग एक दूसरे से जुड़ा हुआ है।

कबीर कला मंच के विषय में समय समय पर जानकारी देता रहूंगा, यद्यपि बहुत सारा मटेरिअल मराठी में है.

अपने आसपास ऐसे लोगों पर नजर रखें, हो सके तो फोटो भी निकालें, अपनी सुरक्षा का ध्यान रखकर| आगे जब भी महाराष्ट्र में चुनाव होंगे, तब इस बात का स्मरण रहे इतना पर्याप्त है. महाराष्ट्र में आपके परिजन रहते हैं तो उनको अवश्य ये पोस्ट दिखायें|

यदि हो सके तो अपनी वॉलपर यह पोस्ट कॉपी पेस्ट करें, फोटो के साथ|

~ मराठी ~
इम्तियाज जलीलच्या वक्तव्याकडे लक्ष वेधण्यासाठी ही पोस्ट नाही. या लोकांकडून वेगळी अपेक्षा नाहीच, तरी शेवटच्या वाक्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. कुणाला माहीती देऊ नका, फक्त आंदोलन करायचं आणि लोकांना त्रास द्यायचा.

पोस्टचा मुख्य विषय चित्रात लाल कंसात अधोरेखित केलेलाच आहे. कबीर कला मंच या शहरी व सशस्त्र नक्षलवादाला सक्रीय पाठींबा देणार्‍या तथाकथित संस्कृतिक मंचाच्या कार्यकर्त्यांनी सीएएच्या निमिताने अराजक माजवणार्‍या म्लेंच्छांच्या कार्यक्रमात लावलेली उपस्थिती आश्चर्यकारक अजिबात नाहीच. उलट हे नसते तरच आश्चर्य वाटलं असतं. एल्गार परिषदेत आणि नंतरच्या अनेक गोष्टीत या मंचाच्या कार्यकर्त्यांचा सक्रीय सहभाग असल्याचे गुप्तहेर खात्याचे अहवाल आहेत एवढं सांगितलं तरी पुरेसं असावं. भारत तेरे टुकडे होंगे गँग कशी एकत्र झालेली आहे हेच या निमित्ताने पुन्हा अधोरेखित होतं.

कबीर कला मंचाच्या बाबतीत वेळोवेळी पोस्ट करत राहीनच.

पण पुढे जेव्हा केव्हा महाराष्ट्रात निवडणुका होतील, तेव्हा हे लक्षात ठेवा म्हणजे झालं. जमलं तर अशा लोकांवर लक्ष ठेवा, फोटोही काढा, पण स्वतःची सुरक्षितता ध्यानात ठेवूनच.




इतर काही जुन्या बातम्या:










🖋️ मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु. १, शके १९४१

Saturday, February 1, 2020

कोरोनास्य कथा: रम्या:

अमेरिकन फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात एफबीआयच्याएजंटस् नी नुकतंच बॉस्टनमधल्या विद्यापीठ व एका रुग्णालयाशी संलग्न असलेल्या तीन जणांवर हेरगिरीचे आरोप ठेवले. या तिघांपैकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

हार्वर्ड विद्यापीठाच्या रसायनशास्त्र व रासायनिक जीवशास्त्र विभागाचे अध्यक्ष डॉ चार्ल्स लिबर (Dr. Charles Lieber) यांनी त्यांना चीनकडून दरमहा मिळालेल्या ५०,००० डॉलर रकमेबाबत व एरवी मिळालेल्या कोट्यवधी डॉलर्सबद्दल संरक्षण खात्याला खोटी माहिती दिल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली.

मॅसेच्युसेट्सचे अ‍ॅटर्नी जनरल अ‍ॅन्ड्र्यू लेलिंग (Andrew Lelling) यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ चार्ल्स लिबर यांना गेल्या अनेक वर्षात ही रक्कम चीनमधील संस्थांसाठी संशोधन करण्याच्या मोबदल्यात त्यांना देण्यात आली. डॉ लिबर यांना त्यांच्या हार्वर्ड विद्यापीठातील कार्यालयात अटक करुन सक्तीच्या प्रशासकीय सुट्टीवर पाठवण्यात आले. अटकेच्या काळात अर्थातच त्यांना विद्यापीठात अध्यापन आणि संशोधनात्मक कार्यात सहभागी होता येणार नाही. डॉ चार्ल्स लिबर हे चौकशीत पूर्ण सहकार्य करत असून या प्रकरणातील त्यांच्या सहभागाचे पुनरावलोकन करत आहेत असं हार्वर्ड विद्यापीठाकडून प्रसूत करण्यात आलेल्या माहितीत म्हटलं आहे.

आरोप ठेवण्यात आलेले इतर दोन जणं चीनी "विद्यार्थी" असून हे बॉस्टनमधील विद्यापीठात संशोधन सहाय्यक अर्थात रिसर्च असिस्टंट म्हणून काम करत होते.

यातली एक जण यँकिंग ये (Yanqing Ye) ही चक्क चीनच्या सैन्यात लेफ्टनंट म्हणून अजूनही कार्यरत आहे. अमेरिकन व्हिसासाठी अर्ज करताना तिने ही माहिती लपवली होती. तिने एप्रिल २०१९ साली बॉस्टन विद्यापीठ सोडले असून ती सद्ध्या चीनमधे असल्याने अर्थातच तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, आणि सगळ्या आंतरराष्ट्रीय संकेतांना खुंटीवर टांगून ठेवण्याच्या चिनी दादागिरीच्या पद्धतीमुळे तशी शक्यताही नाही. Yeकडच्या उपकरणांत रोबोटीक्स आणि संगणक वैज्ञानिक असलेल्या दोन अमेरिकन नागरिकांची माहिती सापडली.

झाओसंग झेंग (Zaosong Zheng) या दुसर्‍या 'सहाय्यकाला' तो चीनला परतण्याच्या प्रयत्नात असताना लोगन विमानतळावर एफबीआयच्या मते "संवेदनशील जैविक नमूने" (Sensitive Biological Samples) असलेल्या तब्बल २१ कुप्यांसकट अटक करण्यात आली. तो हार्वर्ड विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीवर बेथ इस्रायल मेडिकल सेंटरमध्ये संशोधक म्हणून कार्यरत होता.

एक सांगायचंच राहीलं, हे पैसे डॉ चार्ल्स लिबर यांना चीनमध्ये रासायनिक-जैविक प्रयोगशाळा उभारण्याकरता देण्यात आले होते. त्यांनी जी रासयनिक-जैविक प्रयोगशाळा उभारायला चीनला मदत केली होती, ती प्रयोगशाळा मध्य चीनमधील वुहान तंत्रज्ञान विद्यापीठात आहे.

जगभरात झपाट्याने पसरत असलेल्या आणि हजारोंच्या संख्येने लोकांना बाधित करत असलेल्या कोरोना व्हायरसचा उगम हा याच वुहान मधल्या एका प्रयोगशाळेत झाला. आत्तापर्यंत जगभरात कोरोना व्हायरसच्या तब्बल दहा हजार रुग्ण सापडल्याच्या बातम्या आहेत. चीनमधे या व्हायरसने आजारी पडलेल्या आणि दगावलेल्यांच्या बातम्या भारतात येऊन धडकू लागताच आपल्याकडे टिपिकल "मेले साप-विंचू कुत्री-मांजरी काहीही खातात आणि मग आजारी पडतात" अशा स्वरूपाच्या टिपिकल प्रतिक्रिया ऐकू येऊ लागल्या, आणि आपली जनता 'आपल्याला काय त्याचं' म्हणून आपापल्या कामाला लागली, आणि सद्ध्या बजेट-बजेट खेळायच्या मनस्थितीत आहे. तेव्हा या बातमीक्डे दुर्लक्ष झाल्यास नवल नाही.


© मंदार दिलीप जोशी
माघ शु. सप्तमी (रथसप्तमी), शके १९४१

(विस्तृत माहिती)

Sunday, December 15, 2019

मोदीजी तुम्ही पडलात?

मोदीजी तुम्ही पडलात?

बरं, चालायचंच. शरीरच पडलं ना, वय होत चाललं आहे, शरीर कधी ना कधी दगा देणारच. ते पडलं तरी चालेल मोदीजी, विचारांत घसरण होता कामा नये. होय तर.

मोदीजी, ऐका. तुम्ही पडलात तर पडलात, पण ज्यांना तुम्ही अमुक करोड देशवासीयो म्हणून संबोधता ना, त्या असंख्य लोकांच्या आशाआकांक्षांना धक्का लागता कामा नये, ज्यांच्या लेखी मोदी हे नाव म्हणजे शेवटची आशा आहे.

१९४७ मधे धार्मिक आधारावर फाळणी झाल्यावर आपले अनेक लोक तेव्हापासून काही हलगर्जी राजकारण्यांमुळे शत्रूभूमीत अत्याचार सहन करत आहेत. सत्तर वर्षांनंतर तुमच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हलकं स्मितहास्य दिसतंय. तुमच्या शरीराचा तोल गेला तर जाऊदे एक वेळ, पण या लोकांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य जाता कामा नये.

एक काळ असा होता की अनेकांनी नैराश्यापोटी काश्मीर आपल्या हातून गेलाय असा समज करून घेतला होता आणि तसं झालंही असतं. कारण तिथे न गवताचं पातं उगवत नाही म्हणून अक्साई चीनवर पाणी सोडायला हरकत नाही असे तारे संसदेत निर्लज्जपणे तोडल्याचे देशाने ऐकले आहेत. त्याच संसदेत तुम्ही ३७० ची तोडमोड करून देशाला विश्वास दिलात की आता खरोखरच देशाची एकही इंच भूमी शत्रूच्या ताब्यात जाणार नाही. मोदीजी, तुम्ही घसरून पडलात तर पडलात, तुमच्यावरचा भारताचा हा विश्वास डगमगता कामा नये.

मोदीजी, तुम्ही जेव्हा इंग्लंड, अमेरिका, इस्रायल, वगैरे देशांत फिरता ना, आणि जेव्हा तिथे लोक "मोदी, मोदी" म्हणून ओरडतात ना, तेव्हा आम्हाला "भारत, भारत" ऐकू येतं. आमच्यासारख्या कोट्यवधी लोकांना पूर्ण जगभर हाच "भारत, भारत" चा गजर ऐकायचा आहे. मोदीजी, तुम्ही पडलात तर पडलात, या गजराचा आवाज कमी होता कामा नये.

सभांच्या शेवटी तुम्ही लोकांना 'वंदे मातरम' आणि 'भारत माता की जय' म्हणायला लावता ना, शप्पथ सांगतो मनाला इतकं समाधान वाटतं की चला कुणीतरी आपल्या बापजाद्यांचा जयजयकार न करता देशाचा जयजयकार करतो आहे. कारण अमक्या तमक्याचा जय म्हटल्यावर काही लोकांच्या पूर्वजांचा जयजयकार डोळ्यांसमोर येतो,  पण भारत माता की जय म्हटल्यावर देशातल्या दरिद्रातल्या दरिद्री माणसापर्यंत सगळ्यांच्या पितरांचा जयजयकार होतो. हा जयजयकार थांबता कामा नये. मोदीजी, तुम्ही पडलात आणि क्षणभर थांबलात तरी चालेल, पण भारत मातेच्या सन्मानार्थ हात उंचावून जयजयकार करण्याची ही परंपरा थांबता कामा नये.
   
राजकारण, वैयक्तिक स्वार्थ, आणि पुचाट धोरणं यांच्यामुळे तुकड्या तुकड्यांत विखुरलेल्या हिंदूंना महत्प्रयासाने तुमच्या नावामुळे एकत्र येत आहेत मोदीजी.   तेव्हा तुम्ही पडलात तर पडलात, हिंदूंना जोडण्याच्या या प्रयत्नांत खंड पडता कामा नये.

काही लोकांना तुम्ही पडलेलं पाहून मजा येते आहे. भूतपूर्व राष्ट्रपती कैलासवासी श्री शंकर दयाळ शर्मा एकदा राजघाटावर एका कार्यक्रमाला गेले असताना चालता चालता पडले. मला स्पष्ट आठवतं आहे, टाइम्स ऑफ इंडियाने ते वृत्त छापताना कसे पडले याचे तीन टप्प्यातले तीन फोटो छापले होते. राष्ट्रपतींबद्दलचं हे वृत्त आणि तेही या पद्धतीने छापू नये याच तारतम्य इंग्रजांचे पिल्लू असलेल्या या वृत्तपत्राला नव्हते.

त्यावर एका वाचकाने टाईम्सला दिलेलं उत्तर सुद्धा, आमच्या तीर्थरूपांनी मोठ्याने वाचून दाखवल्याने, ठळकपणे लक्षात आहे. त्या वाचकाचे शब्द होते - It is not the President, but the Times of India which has fallen.

ही तीच लोकं आहेत ज्यांना तुमचं न थांबता धावणं आवडत नाही. पण आम्ही सांगतो मोदीजी, जोपर्यंत दुसरा मोदी निर्माण करायची धमक आमच्यात येत नाही तोवर तुम्ही धावत रहा, तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही.

मत दिलंय ना, मग तुम्हाला इतक्या सहजासहजी सोडणार नाही आम्ही. प्रत्येक मत वसूल करू.

पण एक सांगू का, काँग्रेसला शंभरदा हरवता येऊ शकतं पण वयाला, काळाला नाही ना हरवता येत. म्हणून जरा स्वतःची काळजी घेत चला.

अच्छा आजपुरतं पुरे.

©️ मंदार दिलीप जोशी, पुणे, महाराष्ट्र
©️ Sarvesh Kumar Tiwari, गोपालगंज, बिहार


आय बेग टू

खरं म्हणजे ज्यांना समजूनच घ्यायचं नाही, त्यांना काहीही आणि कितीही सांगितलं तरी उपयोग नाही. पण लाखातला एक जरी समजला, तरी पुरे म्हणून हे.

हे कव्हरिंग लेटर वाचा, विमा कंपनीच्या प्रतिनिधीने वीर सावरकरांना लिहिलेलं आहे. पॉलिसी पाठवत आहे, सोबतचा फॉर्म भरून पाठवा अशा आशयाचं हे पत्र. यातले "I beg to enclose" आणि "obliged" हे शब्द पहा. हे beg to याचा अर्थ भीक मागतो असा होत नसून, 'आपणांस विनंती करतो' या अर्थाचा इंग्रजीतून पत्र लिहिताना वापरायचा एक सामान्य शिष्टाचार आहे.

स्वातंत्रवीर सावरकर यांनी इंग्रज सरकारला लिहिलेल्या पत्रात माफीची भीक मागितल्याचा समज हा त्या काळात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेच्या अज्ञानामुळे, किंवा ज्ञान मिळवायची इच्छाच नसल्यामुळे करून दिला जातो.

संस्कृत येत नाही म्हणून एखाद्या पुस्तकाचा दु:स्वास करायचा आणि इंग्रजी पत्रलेखनाची शैली झेपत नाही म्हणून सावरकरांवर जळायचं आणि त्यांची बदनामी करू पहायची यात फार अंतर नाही. पण पिवळी पुस्तके वाचायची सवय असल्याने बुद्धीची झेप तेवढीच असणार.  किंबहुना, बुद्धीची झेप तेवढीच असल्याने फक्त पिवळी पुस्तकेच झेपत असणार.

आणि १९४८ पर्यंत सोशल मीडिया नव्हतं म्हणून चाळे खपून जायचे, आता लोक सोडणार नाहीत. तेव्हा पप्पूशेट, तुम्ही आपले थायलंडला जा सुट्टीवर आणि मस्त अंगप्रत्यंगास मसाज करून घ्या, कारण ताण आला की असं काहीतरी बरळत सुटता. हा मानसिक मसाज तुम्हाला झेपणार नाही.

#वीर_सावरकर

टीप: राऊत, ही माझी पोस्ट माझ्या नावासकट एकही शब्द न बदलता किंवा गाळता सामनात छापून दाखवा तर तुम्हाला मानलं.

©️ मंदार दिलीप जोशी

Thursday, May 23, 2019

पुन्हा एक वार, आलं मोदी सरकार !

मी काही काळापूर्वी एक पोस्ट टाकली होती त्यात म्हटलं होतं की माझं प्राधान्य हिंदुत्व व हिंदुत्वाधारित विकास आहे. पुढे म्हटलं होतं त्याचा भावार्थ असा होता की जरी असं असलं तरी पूर्ण विचारांती मी याच मतावर पोहोचून ठाम आहे की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली हिंदुत्व व विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने निर्णयप्रक्रिया व वेग इत्यादी परिप्येक्ष्यांतून पूर्ण बहुमताने निवडून आलेले भाजप सरकार हाच २०१९ला योग्य आणि एकमेव पर्याय आहे.

या पाच वर्षात मला काय मिळालं, हा विचार माझ्या मनाला कधीच शिवला नाही. माझे जवळचे आणि कुटुंबियांना चांगलंच माहीत आहे की एखाद्या गोष्टीची सत्यता आणि देशासाठी असलेलं महत्त्व पटलं की खिशाला खार लाऊन आणि आपला वेळ खर्च करुनही मी अनेक गोष्टी करतो. त्यामुळे मोदींनी माझ्या खिशात किती पैसे टाकले हा विचार मी करत नाही, करणार नाही.

तरीही एक सांगू इच्छितो. प्रधानमंत्री आवास योजना, आयुषमान योजना यातून सहाय्यता मिळालेले माझ्या जवळच्या मित्रपरिवारात, सहकर्मचार्‍यांत, आणि वैय्यत्तिक ओळखीत आहेत. एक लक्षात घ्या, हा फक्त पैसा नाही. पैसा काय सगळ्यांनाच हवा असतो, मलाही तुम्हालाही. पण जेव्हा आत्यंतिक गरज असताना मदत मिळते तेव्हा त्याची किंमत ही आभाळाहून जास्त असते. एक रुपया मदत पाठवली तर त्यातले जेमतेम पंधरा पैसे लाभार्थींपर्यंत पोहोचतात हे दिवस आपण बघितलेले असताना आता तो आख्खा रुपया थेट लाभार्थींच्या खात्यात, मग ते शहरी असोत किंवा शेतकरी, पोहोचणारे दिवस आपण बघत आहोत याचं श्रेय निर्विवादपणे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनाच जातं.

या परिप्येक्षातून आयकर रिटर्न्स भरणार्‍यांच्या संख्येत या पाच वर्षात भरीव वाढ झालेली आहे या गोष्टीकडे बघणे गरजेचे आहे. सामान्यतः मेहनतीने पैसा कमावणार्‍या जनतेला कर द्यायला हरकत नसते, पण त्या पैशाचं पुढे काय होतं किंवा कररूपी पैसा योग्य ठिकाणी खर्च होतो की नाही याची चिंता त्याला अधिक असते. हां, सरकारचा दट्ट्या असतोच, पण जबरदस्तीपेक्षा सरकारप्रती असलेला विश्वास हा अधिक प्रभावी ठरतो. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी हा विश्वास देशाच्या जनतेत रुजवल्यामुळे लोकांची कर भरण्याकडे कल वाढत चालला होता, आणि त्याचीच परिणिती रिटर्न्स वाढण्यात झाली.

हिंदुत्वाचं म्हणाल तर मुळात तुमच्यातच एकी नसेल तर मोदी काय "गुंडाळून ठेवतो मी संविधान, लगेच हिंदूराष्ट्र घोषित करतो, आणि धरुन हाणतो म्लेंछांना आणि यवनांना" असं म्हणावं अशी अपेक्षा आहे का? त्यांच्यावर किती आणि कसा दबाव आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? एखादी योजनेसाठी चार कागद लागत असतील तर म्लेंच्छ आठ घेऊन पोहोचतो, प्रत्यक्ष सरकारी कार्यालयात जाऊन योजनेची सगळी माहिती घेतल्यावर. आणि हिंदू घरी बसून मला काहीच कसं माहीत नाही, मोदींनी पोहोचवली का नाही माहिती अशी किरकिर करतो. भांडण झालं की पाच मिनिटात शंभर लोक गोळा करण्याची क्षमता तुमच्यात आहे का? नसेल तर आधी निर्माण करा आणि मग मोदी अमुक का करत नाहीत आणि तमुक का करत नाहीत याच्या चर्चा करा.

दुसरी गोष्ट, आजवर ज्याला इंग्रजीत म्हणतात तसं "Wearing your Dharma on your sleeve" असं  कुणी केल्याचं स्मरतं का? निवडणुका असो किंवा नसो, सातत्याने भगवी वस्त्रे आणि स्थानिक वेषभूषा करुन देवदर्शनाला जाणारा पंतप्रधान कुणी बघितला होता का? हिरव्यांची जाळीदार टोपी घालायला नकार देणारे मोदीजी आवर्जून कुठलीही निवडणूक नसताना स्वतः गंगा आरती साठी जाताच, पण सोबतच्या परदेशी पाहुण्यांनाही घेऊन जातात. उघडपणे हिंदू संस्कृती व धर्माबद्दल आदर व्यक्त करतात. हिंदू संस्कृतीचा अविभाज्य अंग असलेला योग आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिवस म्हणून साजरा केला जाण्याचं श्रेय कुणाला याचा विचार हिंदूंनी अवश्य करावा. निवडणुका आल्यावर राजकारणाचा भाग म्हणून आपले ख्रिस्ती आणि पारशी मूळ लपवून आपण जानवेधारी हिंदू असल्याचं सांगत देवळादेवळातून हिंडणार्‍या आणि नंतर ते सोंग साफ विसरणाऱ्या राहुल गांधीच्याच इटालियन मोतोश्रींनी हिंदूंच्या मुळावर येणार्‍या आणि हिंदूंच्या सत्यानाशाचे थेट कारण ठरणारा कायदा करण्याचं ठरवलं होतं, हे हिंदूंनी विसरू नये. हा विषय मोठा आहे, विस्तृतपणे पुन्हा केव्हातरी बोलू .

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरुन गळे काढणार्‍या लोकांनी पंतप्रधान मोदींच्या बायकोची आणि आईची काहीही तक्रार नसताना आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्या दोघीही राजकारणात नसताना अकारण प्रत्येक वादात त्या दोघींना ओढलं तेव्हा मोदींनी एक चकार शब्द काढला नाही. पण माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या भ्रष्टाचाराचा विषय काढल्यावर राहुल गांधी यांना ते आपले पिताजी असल्याची आठवण झाली आणि त्यांनी पुन्हा मोदींच्या कुटुंबियांबद्दल उद्गार काढले. बारा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि पाच वर्ष देशाचे पंतप्रधान असताना इतर कुणाच्या घरच्यांनी महाल बांधले असते. पण नरेन्द्र दामोदरदास मोदी हा इसम खरंच वेडा म्हटला पाहीजे, कारण या सतरा वर्षात त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या पदाचा एक रुपयाही अनुचित फायदा झालेला नाही. या उलट उत्पनाचं काही साधन नसताना राहुलच्या इटालियन मम्मीची संपत्ती इंग्लंडच्या राणीशी स्पर्धा करतानाही दिसली. या पार्श्वभूमीवर स्वतःच्या बचतीतली मोठी रक्कम जो माणूस सरळ दान करुन टाकतो, अशा माणसाला वेडा नाही तर काय म्हणावं? आधी केले, मग सांगितले ही म्हण या बाबतीत स्वतः जगत आहेत हे सगळा देश उघड्या डोळ्यांनी बघत होताच.

संरक्षणाच्या बाबतीतही मोदींनी देशाला नाराज केलं नाही. आधी पाकिस्तानात शरीफ महाशयांची अचानक भेट घेऊन टीकेचे धनी झालेले मोदी हे टीकाकारांना कळलेच नाहीत असे म्हणावे लागेल. नंतर पाकिस्तानची कशी ठासली हे सगळ्यांना ठाऊकच आहे. राफेल खरेदीत विरोधकांनी अनेक अडथळे आणूनही मोदी डगमगले नाहीत. आता मात्र ते लवकर पार पडावं ही इच्छा.

या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राष्ट्रवाद हा होता. हा एक शब्द नव्हे, राष्ट्रवादात राष्ट्र सर्वप्रथम, विकास, प्रगती, संरक्षण या सगळ्या गोष्टी येतात. ज्या राष्ट्रवादाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, त्या वृत्तीच्या थोबाडीत मारणारा हा निकाल आहे. क्रिकेटचा सामना असूनही तो सोडून अनेक लोकं लोकसभा टीव्ही लोक बघत बसायचे हा आणखी एक मोठा बदल आपण बघितला.

मी काही राजकीय विश्लेषक नाही, तुमच्यासारखाच सामान्य माणूस आहे. त्यामुळे या लेखनात अनेक तृटी असू शकतात, त्याबद्दल आधीच क्षमस्व. आणखी बरंच आहे बोलण्यासारखं, लिहीताही येईल, पण सद्ध्या जरा भावुक झालोय. २०१४ पेक्षा आताच्या निवडणुकीत मोदी सरकार यावं याबद्दल भावना तीव्र होत्या, त्या अपेक्षा पूर्ण झाल्याने डोळ्यांत आनंदाश्रू आहेत. आतापर्यंत बरंच लिहिलं, बरंच वाचलं, बर्‍याच चर्चा केल्या. यापुढेही हे होईलच, पण तूर्तास सद्ध्या आपला निरोप घेतो. आता वाट पाहूया "मैं नरेन्द्र दामोदरदास मोदी, इश्वर को साक्षी रखके शपथ लेता हूं कि...." हे शब्द कानावर पडण्याची.

समारोप करतो या प्रार्थनेने:

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते॥

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता, इमे सादरं त्वां नमामो वयम्।
त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्, शुभामाशिषं देहि तत्पूर्तये॥

अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिम्, सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्।
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम्, स्वयं स्वीकृतं नः सुगंकारयेत्॥

समुत्कर्ष निःश्रेयसस्यैकमुग्रम्, परं साधनं नाम वीरव्रतम्।
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा, हृदन्तः प्रजागर्तु तीव्राऽनिशम्॥

विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्, विधायास्य धर्मस्य संरक्षणम्।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्, समर्था भवत्वाशिषा ते भृशम्॥

भारत माता की जय ! जय श्रीराम !

© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ. पंचमी शके १९४१

Monday, February 11, 2019

का रे भुललासी वरलिया रंगा: अमोल पालेकर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं प्रवचन

कालच प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व निर्माते-दिग्दर्शक अमोल पालेकरांनी चित्रकार कै. प्रभाकर बर्वे यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात भलतीच टेप वाजवल्याने आयोजकांनी त्यांना विषयाला धरून बोलायचा आग्रह केला यावरून देशात गदारोळ उडाला (देशात म्हणजे ज्यांना याची काही पडली आहे अशा विश्वात, बाकी आमच्या कामवालीला अमोल पालेकर कोण हे ही माहीत नाही. तर ते असो). अमोल पालेकरांच्या कृत्याचं मुद्देसूद खंडन ते सात्विक संतापातून प्रच्छन्न शिवीगाळ अशा सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया त्यावर उमटल्या.
खूप पूर्वीपासून रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या चेहऱ्यांबद्दल आपल्याकडे प्रचंड गैरसमज दिसून येतात.



यातला प्रमुख गैरसमज असा की विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्तरातल्या, जातीधर्माच्या, आणि बुद्धीच्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या व्यक्तींना आपण सर्वज्ञ समजण्याची चूक करत आलो आहोत. त्यातही तथाकथित कलात्मक चित्रपटांबाबत ते सत्य दाखवतात हा आणि त्यात 'अभिनय' करणारे लोक म्हणजे बुद्धिजीवी आहेत हा सगळ्यात मोठा गैरसमज. गरीब आणि मध्यमवर्गांचं प्रतिबिंब दिसेल असे सिनेमे असतील तर मग काही विचारायलाच नको, लोकांनी डोक्यावर घेतले होते असे सिनेमे. उगाच नाही विक्रमी 'शोले' समोर 'गोलमाल'ने टिच्चून धंदा केला.

याबाबत नसीम निकोलस तलेब या मूळच्या लेबनीज अमेरिकन असलेल्या लेखक, विद्वान, सांख्यिकी तज्ञ, अर्थतज्ज्ञ, शेअर बाजार व्यापारी, वगैरे बरंच काही असणाऱ्या या विचारवंताचे विचार वाचण्यासारखे आहेत. नट नट्यांच्या विषयीचे त्यांचे विचार हे प्रामुख्याने हॉलीवूड अर्थात अमेरिकन चित्रपट उद्योगाशी संबंधित असले तरी कलाकारांची मानसिकता आणि समज ही नेहमीच स्थलातीत असल्याने भारतवर्षातील कुठल्याही चित्रपट उद्योगाला लागू होतात.

तलेब म्हणतात की "चित्रपटसृष्टीत काय घडतं याचा आणि आपण सर्वसामान्य लोक यांचा काहीही संबंध नसतो. तलेब  आपल्याला दोन प्रश्न विचारतात: एक तुमच्या मित्रपरिवारात किती अभिनेते आहेत? किती अभिनेते तुमच्या मित्रांचे मित्र आहेत? यात अस्तित्व आणि प्रचलन (presence and prevalence) यात गल्लत करू नये. काही अपवाद वगळता नटनट्या सामान्य लोकांत मिसळत नाहीत."

"रोमन साम्राज्यात तर नटांना लग्न करायलाही बंदी होती, इतकंच नव्हे तर त्यांना सर्वसामान्य जनतेशी मिसळायलाही बंदी असे. तुम्हाला एखादा स्त्रीरोगतज्ञ आणि इंजिनियर, गवंडी आणि वाहनचालक एकमेकांत मिसळताना दिसतील, पण अभिनेते हे त्यांच्याच जगात मशगुल दिसतात. किती क्षेत्र अशी आहेत जिथे लोकांना त्यांच्या दिसण्यावर आणि आपण जे नाही त्याचा अभिनय करण्यावर काम दिलं जातं? किती क्षेत्रात शरीराचा 'वापर' हा वर चढण्याकरता केला जातो?"

"इतर क्षेत्रातले लोक, उदाहरणार्थ स्त्रीरोगतज्ञ किंवा रेल्वे अभियंते, आपल्याला नैतिकतेची प्रवचनं देताना दिसत नाहीत. खरं तर बाह्य दिसणे यावरच ज्यांचं सगळं जग अवलंबून आहे अशा या प्रत्यक्ष वर्तन आणि वैयक्तिक मते यांच्यात प्रचंड तफावत असलेल्या या लोकांना आपल्याला नैतिकतेचे धडे देण्याचा काहीही अधिकार नाही."
मात्र नटनट्या हीच गोष्ट प्रत्येक सार्वजनिक मंचावर वारंवार करताना दिसतात आणि भोळसट (की बावळट?) लोक त्याला तितक्याच सातत्याने भुलताना दिसतात. याचं कारण म्हणजे नटनट्यांना आपला मंदपणा बाहेर दिसू नये याचं प्रशिक्षण दिलेलं असतं, त्यामुळे ते काहीही बडबडले तरी एखादा अत्यंत बुद्धिमान आणि विचारी माणूस आपल्याशी संवाद साधतो आहे असा भास निर्माण करण्यात ते यशस्वी ठरतात.

हा कार्यकारणभाव लक्षात घेतला की पैसे टाकून बनवलेला सिनेमा आणि विचारवंतांचा अभिनय करायला वर्षानुवर्ष पोसलेल्या नटनट्यांची अशी हंगामी वक्तव्य यात फारसा फरक उरत नाही हे आपल्याला समजतं.

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे यातल्या बहुतेकांचा स्वभाव मुळातच विकृत आणि द्वेषाने भरलेला असतो आणि त्याला अनेक वर्ष पद्धतशीर खतपाणी मिळालेलं असतं.

म्हणूनच मग जाड काळ्या फ्रेमचा चष्मा लावलेला, पांढऱ्या केसांचा/ची, भलंमोठं कुंकू लावलेली, दाढीवाला, अशी कोणतीही आजी किंवा माजी नटमोगरी किंवा टोणगा हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, असहिष्णुता, वगैरे पढवलेली 'पेड' वाक्य बोलताना दिसले की एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. कारण 'बनवलेला' सिनेमा कुणी बघायलाच गेलं नाही तर तो आपटतो, आणि यांच्या वक्तव्याला भाव दिला नाही की ते हवेत विरून जातं.

आपण फार मनावर न घेता एवढंच लक्षात घ्यायचं ―
तो धंदा असतो आणि हा सुद्धा, फक्त चेहऱ्याला रंग फासून ज्या बाजारात बसायचं त्याचं ठिकाण प्रत्येक पटकथेच्या मागणीनुसार वेगळं असतं इतकंच.



©️ मंदार दिलीप जोशी
माघ शु. पंचमी शके १९४०

तळटीप: अपवादांनी वरील विवेचन स्वतःवर ओढवून घेऊ नये.

Tuesday, November 20, 2018

जपानला वाचवणारी तलवार अर्थात माओवादाचा जपानमधे अंत

१९४५ मध्ये दुसरं विश्वयुद्ध संपलं तेव्हा जपानची परिस्थिती अतिशय वाईट होती.

हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर टाकलेल्या अणूबाँबनी जणू जपानचं कंबरडं मोडलं होतं. अशा परिस्थितीत जपानमध्ये "एंजिरो असनुमा" (Inejiro Asanuma) नामक नेत्याचा उदय झाला. दुसर्‍या विश्वयुद्धाच्या वेळी इनेजीरो असानुमा जपानच्या संसदेचे सदस्य होता आणि त्याने राष्ट्राध्यक्ष तोजो  यांना पाठिंबा दिला होता. मात्र १९४२ नंतर असानुमा साम्यवादाच्या प्रभावाखाली येऊ लागला, आणि जपानच्या राजकीय विश्वातून बाजूला झाला. विश्वयुद्धात जपानने चीनवर आक्रमण केल्यावर त्याने जपानच्या या कृतीचा तीव्र विरोध केला. दुसरं विश्वयुद्ध संपता संपता इनेजीरो असानुमा पूर्णपणे साम्यवादी चीनच्या प्रभावाखाली आला होता आणि युद्धसमाप्ती नंतर वरचेवर चीनचे दौरे करत असे. त्याने जपानमधे सोशलिस्ट पार्टी नामक साम्यवादी पक्ष काढला. जपानच्या प्रत्येक विद्यमान धोरणांचा विरोध आणि साम्यवादाचा स्वीकार करण्याचा पुरस्कार हा पक्ष करत असे. चीनच्या असंख्य वार्‍या करता करता असानुमाचे कॉम्रेड चेअरमन माओ त्से तुंग याच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण नसते झाले तरच नवल होतं.

इनेजीरो असानुमा जपानमध्ये माओवादाच्या प्रसारासाठी झटून कामाला लागला. १९५९मध्ये कॉम्रेड चेअरमन माओला भेटून परत आल्यावर टोकियो विमानतळावर तो उतरला तेव्हा त्याच्या अंगात माओ सूट (Mao suit) म्हणून ओळखला जाणारा गणवेश होता. जपानने या गणवेशाचा स्वीकार करावा, अर्थात माओवादी साम्यवाद स्वीकारावा, अशी इच्छा तो बाळगून होता. पूर्णपणे माओरंगी रंगलेला इनेजीरो असानुमा कष्टकरी वर्गाचा पत्कर घेतल्याचं भासवत जपानमधील प्रत्येक क्षेत्रातील औद्योगिक प्रगतीचा विरोध करत असे. जपान आणि अमेरिकेत झालेल्या "Treaty of Mutual Cooperation and Security between Japan and the U.S." या कराराचा त्याने कडाडून विरोध केला होता. अमेरिका हा देश जपान आणि चीनचा शत्रू आहे असा प्रचार तो करत असे. इतकंच नव्हे, तर जपानच्या ताब्यात असलेल्या सेनकाकू बेटांच्या (Senkaku Islands) बाबतीत चीनशी असलेल्या वादात तो उघडपणे चीनची बाजू घेत ही बेटं जपानने चीनला देऊन टाकायला हवीत अशी भूमिका घेत असे आणि त्याची सोशलिस्ट पार्टी सत्तेत आली तर त्याचं सरकार तसं करेलही असंही तो म्हणत असे.

एकोणीसशे साठच्या दशकापर्यंत एव्हाना जपानमध्ये इनेजीरो असानुमा हा एक डोकेदुखी बनला होता. दुर्दैवाने बर्‍याच मोठ्या संख्येने लोक त्याच्याकडे आकृष्ट होऊ लागले होते. १९६० मधे जपानच्या हिबिया पार्क (Hibiya Park) येथे माओवादाचे समर्थन आणि जपानच्या व्यापारवादी/भांडवलशाही धोरणांच्या विरोधात झालेल्या एका सभेत भाषण केल्यानंतर एका वादविवादात इनेजीरो असानुमा सहभागी झाला. त्या वेळी असानुमाच्या विरोधात आणि समर्थनात तुंबळ घोषणाबाजी आणि आरडाओरडा याने सभागृह दणाणून गेले होते.

इनेजीरो असानुमा बोलत असताना अचानक सतरा वर्षांचा मुलगा वायुवेगाने व्यासपीठाकडे झेपावला, आणि कुणाला काही कळायच्या आत आपली सामुराई तलवार पार मुठीपर्यंत इनेजीरो असानुमाच्या पोटात खुपसली. तो दुसरा वार करणार इतक्यात सोशलिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि तिथे उपस्थित सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्या मुलाला धरलं आणि पोलीसांच्या स्वाधीन केलं. मात्र घटनेच्या एकाच तासाच्या आत असानुमा मृत्यू पावला होता. त्या शूर मुलाचं नाव होतं ओटोया यामागुची (Otoya Yamaguchi).


घटनेनंतर तीनच आठवड्यांत ओटोयाने पोलीस स्टेशनमध्येच चादरीचा वापर करुन फास लावून जीव दिला. मरण्यापूर्वी त्याने दात घासण्याच्या पेस्टमधे थोडं पाणी मिसळून कोठडीच्या भिंतीवर एका देशद्रोह्याला शिक्षा केल्याचा आनंद व्यक्त करत आपला अखेरचा संदेश लिहिला:

"Seven lives for my Country,  Long live His Imperial Majesty, the Emperor Hirohito"  

सामुराई तलवारीने इनेजीरो असानुमा या कम्युनिस्ट नेत्याचा वध करणार्‍या ओटोयाच्या अखेरच्या संदेशात Seven lives for my Country हे शब्द समाविष्ट असणं औचित्यपूर्णच म्हणावं लागेल, कारण हे शब्द चौदाव्या शतकातील सामुराई योद्धा कुसुनोकी मासाशिगे (Kusunoki Masashige) याचे अखेरचे शब्द होत.

ओटाया यामागुची ने असानुमाला संपवताना जी सामुराई तलवार वापरली तिला जपानमधे "The sword that saved Japan" अर्थात "जपानला वाचवणारी तलवार" म्हणून ओळखली जाते. ओटाया यामागुचीने या माओवादी नेत्याला खलास करुन जपानला माओवादाच्या चिखलात रुतण्यापासून वाचवल्याने या तलवारीला हे नाव पडणं संयुक्तिकच म्हणायला हवं.

माओवादी इनेजीरो असानुमाच्या अंताबरोबरच त्याचा सोशलिस्ट पार्टी हा पक्ष जपानमधून अस्तंगत झाला. त्याचे परिणाम एका प्रगत औद्योगिक देशाच्या स्वरूपात आपल्या समोर आहे.



ओटोया यामागुची
ओटोया यामागुचीने पहिला वार केल्यानंतर दुसरा वार करण्याआधी त्याला आसानुमाच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षारक्षकांनी धरला, त्यावेळचा हा फोटो. हा फोटो घेणार्‍या यासुशी नागाओ (Yasushi Nagao) या छायाचित्रकाराला १९६१चा पुलिट्झर पुरस्कार मिळाला होता.

इनेजीरो असानुमाला ठार करुन माओवादाचे संकट फोफावण्याआधीच मुळापासून उपटून जपानला नासवण्यापासून वाचवणार्‍या ओटाया यामागुचीच्या स्मृतीला वंदन करुन हा लेख संपवतो.

...आणि हो, शहरी असो वा ग्रामीण, भारतातला माओवाद लवकरात लवकर संपो अशीही प्रार्थना.




संदर्भः
Rare Historical Photos - https://bit.ly/2A8WNq9
Ranjay Tripathi - https://bit.ly/2DyJO4k

© मंदार दिलीप जोशी

Monday, November 19, 2018

स्टॅलिनच्या कोंबडीची गोष्ट | स्टॅलिन की मुर्गी की कहानी

तुम्हाला स्टॅलिनच्या कोंबडीची गोष्ट ठाऊक आहे का?

स्टॅलिनच्या बाबतीत पसरलेल्या खर्‍या खोट्या गोष्टींपैकी ही एक. या गोष्टीला सत्यकथा माना किंवा दंतकथा, त्यातून घ्यायचा धडा, अर्थात शाळेच्या पुस्तकात असतं ते Moral of the Story बदलत नाही.

एखादा मुद्दा पटवून देण्याचे अनेक मार्ग असतात. म्हणजे 'अमुक करा, त्याची ही कारणं आहेत, त्याने असं असं होईल' ही शिकवण्याची सामान्य पद्धत. दुसरी एक पद्धत आपलं म्हणणं गोष्ट सांगण्याच्या माध्यमातून मांडणं. एक दिवस कॉम्रेड स्टॅलिनने आपल्या पक्षाच्या लोकांना एक मोठा मुद्दा एका अतिशय विलक्षण पद्धतीने समजावून दिला. त्याने चक्क एक जिवंत कोंबडी मागवली आणि एक एक करुन तिची पिसं उपटायला सुरवात केली. कोंबडीला भयंकर वेदना होत होत्या पण कोंबडीची सगळी पिसं जाऊन ती 'नग्न' होईपर्यंत स्टॅलिनने तिला सोडलं नाही.

"आता तुम्ही बघा गंमत" असं म्हणून स्टॅलिनने त्या कोंबडीसमोर काही ब्रेडचे तुकडे टाकले. आता मात्र तीच घाबरलेली कोंबडी, बिचकत स्टॅलिनच्याच पायांना जाऊन बिलगली. मग स्टॅलिनने तिच्यासमोर धान्याचे काही दाणे टाकले. आता स्टॅलिन उठला आणि एका खोलीतून दुसर्‍या खोलीत असं फिरू लागला. त्याचबरोबर ती कोंबडीही तो जिथे जाईल तिथे त्याच्या मागे मागे स्टॅलिनला जवळजवळ बिलगून जाऊ लागली. याच माणसाने काहीवेळापूर्वीच तिची पिसं एक एक करुन उपटून तिला मरणप्राय यातना दिल्या होत्या हे विसरून.

विजयी मुद्रेने स्टॅलिनने उपस्थितांकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाला,

"पाहिलंत तुम्ही? लोकांवर राज्य करायचं तर असं. त्यांची रसद आपल्या नियंत्रणात ठेवा, मग त्यांना तुम्ही कितीही यातना दिल्यात आणि अत्याचार केलेत तरी ते सगळं विसरून तुमच्याच मागे मागे फिरत राहतील, कुठेही जाणार नाहीत, आणि तुम्हाला त्यांच्यापासून काहीही धोका नाही.

----------------

(१) गांधीवधानंतर ज्यांचं सगळ्यात जास्त नुकसान झालं, घरदार उध्वस्त होऊन लुटली गेली, जीव गेले, तेच पुढे अनेक वर्ष काँग्रेसचे सगळ्यात निष्ठावंत मतदार राहिले, त्यांच्यापैकी अनेक अजूनही आहेत. इंदिरा गांधींचं नाव आमच्याच घरात "बाई मोठी हिंमतीची" म्हणून आदराने घेतलं जाई, त्याची आठवण झाली.
(२) इंदिरा गांधींची हत्या झाल्यावर जे झाड पडलं, त्यामुळे जमीन हादरली, किंबहुना हादरवली गेली. लोकांनी पंजाबात काँग्रेसला निवडून दिलं आहे आणि हादरवणारे आज पंजाबात सत्तेत आहेत.

----------------

तेव्हा स्टॅलिनची कोंबडी कशी दिसत असेल ते आंतरजालावर शोधू नका, आरशासमोर उभे राहिलात तरी पुरेसे आहे.

 © मंदार दिलीप जोशी

मूळ हिंदी लेख:

स्टेलिन की मुर्गी की कहानी पता है ?

चलिये इसे किंवदंती कहिए, हालांकि नेट पर मिल जाएगी ।

स्टेलिन ने एक दिन अपने पार्टी के लोगों को एक बड़ा मुद्दा बिलकुल एक अवस्मरणीय तरीकेसे सिखा दिया । उसने एक ज़िंदा मुर्गी मंगवाईऔर एक एक कर के ज़ोर से उसके सारे पर उखाड़ डाले। अब तो मुर्गी बिलकुल बिना परों की नग्न सी थी। उसे बहुत पीड़ा  हो रही थी मगर स्टेलिन ने उसे छोड़ा नहीं।

अब देखिये आप लोग" स्टेलिन ने कहा और उसने  कुछ ब्रेड के टुकड़े उस मुर्गी के सामने डाले । अब वही मुर्गी डरी सहमी सी, उसी के पाँवों से लिपट गयी। फिर उसने कुछ अनाज के दाने फेंके तो मुर्गी ने वे भी उठा लिए और फिर रूम में स्टेलिन जहां जाये, मुर्गी उसके पीछे पीछे बिलकुल चिपककर चल रही थी जब कि कुछ ही समय पहले उसने उसके सभी पर बहुत दर्दनाक तरीके से नोच लिए थे ।

स्टेलिन से सब उपस्थितों पर एक विजयी दृष्टि डाली ।

देखा आप ने ? लोगों पर ऐसे हुकूमत की जाती है । बस उनका खाना कंट्रोल कर लो, फिर जो चाहे उन्हें यातना  दो, वे फिर भी आप के आगे पीछे ही घूमते रहेंगे, कहीं नहीं जाएँगे और न ही आप को कुछ करेंगे ।

------------------------------------------------------------

गांधी वध के बाद जिनका सब से अधिक नुकसान हुआ, घर जलाए लूटे  गए और हत्याएँ हुई, वे ही काँग्रेस के सब से दीर्घकालीन निष्ठावान वोटर रहे ।

इन्दिरा के समय बड़ा पेड़ गिरने से धरती काफी हिली, हिलाई गयी । हिलानेवाले ठाठ से हैं और पंजाब ने काँग्रेस सरकार को चुना है ।

स्टेलिन की मुर्गी कैसी दिखती होगी ? आईने में दिखेगी ?

© आनंद राजाध्यक्ष

Saturday, October 27, 2018

युपीएच्या गंमतीजमती भाग ३: भगवा दहशतवाद या लेबलाचा जन्म आणि त्याचे जन्मदाते

२९ ऑक्टोबर २००५ रोजी दिल्लीमधील गोविंदपुरी येथे एका बसमध्ये, कलकाजी जवळ, आणि सरोजिनी नगर मार्केट भागात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. यात ६७ जण ठार तर २०० हून अधिक लोक जखमी झाले.

२८ डिसेंबर २००५ रोजी बंगलुरू येतील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स Indian Institute of Science (IISc) येथे दहशतवादी हल्ला झाला. इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात गणिताचे प्रोफेसर मनीषचन्द्र पुरी यांचा मृत्यू झाला तर इतर चार जण जखमी झाले.

या नंतर ७ मार्च २००६ वाराणसी येथे कँटॉनमेन्ट रेल्वे स्टेशन आणि संकटमोचन मंदिर इथे बॉम्बस्फोट झाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर १ जून २००६ रोजी हल्ला झाला. याची पूर्वसूचना अगोदरच मिळाल्याने मोठी हानी टळली आनि तीन लष्कर-ए-तय्यबाच्या अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं.

या आणि या आधी व नंतर झालेल्या सगळ्या दहशतवादी हल्ल्यांत पकडले गेलेले, ठार झालेले, आणि संशय असलेले सगळे अतिरेकी हे म्लेंच्छ निघाले. इतकंच नव्हे, तर अतिरेक्यांना सहाय्य करणारे स्थानिकही म्लेंच्छ असल्याचे सगळ्या गुप्तचर संस्थांची माहिती होती.

या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यालयात अधिकारी असलेल्या श्री आर. व्ही. एस. मणी यांना गृहमंत्रालयात तातडीने पाचारण करण्यात आलं. गृहमंत्रालयात पोहोचल्या पोहोचल्या श्री मणी यांना गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या खोलीत जायला सांगण्यात आलं, त्यावेळी खोलीत आणखी दोन व्यक्ती हजर होत्या. त्यातली एक व्यक्ती म्हणजे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि अतिरेकी संघटनांचा प्रचंड पुळका असलेले दिग्विजय सिंग.

...आणि दुसरी व्यक्ती म्हणजे महाराष्ट्रातले प्रसिद्ध पोलीस अधिकारी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे म्हणजेच एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे.

करकरेंनी मणी यांना नजिकच्या भूतकाळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची माहिती विचारली. यात त्यांनी किती लोक मेले, आता त्या प्रकरणांच्या चौकशीची काय स्थिती आहे, इत्यादी माहिती घेतली. यानंतर दिग्विजय सिंग यांनी मणी यांना आणखी काही माहिती विचारली. बोलण्याच्या ओघात इस्लामाबाद येथे काही कामानिमित्त गेलेले गृहमंत्रालयाचे काही वरिष्ठ अधिकारी काही तासांतच दिल्लीला पोहोचतील अशी माहिती श्री मणी यांनी दिली. पण त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आलं. इतकंच नव्हे तर केंद्रीय गृहसचिव केव्हा परतणार आहेत याबद्दलही उपस्थितांना फार काही फारसा रस दिसत नव्हता. श्री मणी यांच्याकडून दिग्विजय सिंग आणि हेमंत करकरे मिळेल ती माहिती मिळवत असताना गृहमंत्री शिवराज पाटील यांना त्या चर्चेत काडीचाही रस दाखवला नाही.

या प्रश्नोतरांच्या दरम्यान दोन गोष्टी श्री मणी यांच्या प्रकर्षाने लक्षात आल्या. दोन प्रश्नांच्या मध्ये दिग्विजय सिंग आणि करकरे यांच्यात आपापसात जी चर्चा झाली त्यावरुन श्री मणी यांच्या लक्षात आलं की सगळ्या अतिरेकी हल्ल्यात म्लेंच्छ जबाबदार असणं आणि त्यांना हल्ले करण्यात मदत करणारे स्थानिकही म्लेंछ असणे आणि याला गुप्तचर संस्थांनी दुजोरा देणे या वस्तुस्थितीवर ते दोघही नाखुष होते. दुसरी गोष्ट म्हणजे 'नांदेड', 'बजरंग दल', इत्यादी उल्लेख त्यांच्यातल्या संभाषणात वारंवार येत होता. आणखी एक महत्वाची गोष्ट श्री मणी यांच्या लक्षात आली ती म्हणजे दिग्विजय सिंग आणि हेमंत करकरे यांच्यात चांगलीच दोस्ती दिसत होती. जरी आयपीएस अधिकारी आणि राजकारणी लोकांनी एकमेकांशी वैय्यक्तिक संबंध वाढवू नयेत असे संकेत असले, तरी समज करकरे मध्य प्रदेशमध्ये पोलीस अधिकारी म्हणून काम करत असते तर त्यांच्यात आणि त्या राज्याचा एके काळी मुख्यमंत्री असलेल्या दिग्विजय सिंग यांच्यात चांगले संबंध असणं नवलाची गोष्ट असली नसती, पण एका राज्याचा माजी मुख्यमंत्री आणि दुसर्‍याच राज्याचा आयपीएस अधिकारी यांच्यात इतकी जवळीक ही आश्चर्याचीच गोष्ट होती. एका राज्याच्या पोलीस अधिकारी हा दुसर्‍याच राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याबरोबर इतकी घसट का ठेऊन होता हे एक रहस्यच होते. पण शेवटी हिंदीतली एक म्हण आठवते, "चोर चोर मौसेरे भाई"

उपरोल्लेखित भेट झाल्यावर लगेच काही दिवसांनी "हिंदू दहशतवाद" हे शब्द रेकॉर्डवर आले. नांदेड इथल्या समीर कुलकर्णी नामक व्यावसायिकाच्या वर्कशॉपमध्ये २० एप्रिल २००६ रोजी स्फोट झाला. हे प्रकरण सीबीआयकडे गेलं, तेव्हा वस्तुस्थिती काही वेगळीच असल्याचं तपास अधिकार्‍यांच्या लक्षात आलं. अनेदा व्यावसायिक धंदा मंदा असल्यावर स्वतःच आपल्या गाळ्यांना आग लावतात आणि विमा कंपन्यांकडे खोटा दावा करुन विम्याचे पैसे लाटण्याचा प्रयत्न करतात. मात्र या अधिकार्‍यांवर त्यांचा हा असा अहवाल बदलण्यासाठी 'वरुन' दबाव आला. या घटनेला ताबडतोब हिंदू दहशतवादाचं लेबल लाऊन कुलकर्णी आपल्या वर्कशॉपमध्ये घातपात घडवून आणण्याकरता स्फोटक पदार्थ साठवून ठेवत असल्याचा आणि अशा प्रकारे साठवणूक करत असताना त्यांचा स्फोट झाल्याचा शोध लावण्यात आला. समीर कुलकर्णी बजरंग दलाच्या नांदेडमधल्या कार्यालयात जात असल्याची कंडीही यावेळी पिकवण्यात आली. मात्र या अधिकार्‍यांनी त्यांचा अहवाल बदलण्यास साफ नकार दिला. याचा परिणाम असा झाला की सीबीआयच्या प्रमुखपदी ज्या अधिकार्‍याची बढती होणार होती ती रोखण्यात आली, आणि भलत्याच व्यक्तीला सीबीआयचे प्रमुखपद देण्यात आले. चौकशी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी अहवाल बदलण्यास नकार दिल्याने या प्रकरणावर तिथेच पडदा पडला. पण काहीही करुन भगवा दहशतवाद खरंच अस्तित्वात आहे ही कपोलकल्पित बाब जनतेच्या मनावर बिंबवण्याची सुरवात याच प्रकरणापासून झाली होती, आणि त्याची भीषण फळे अनेकांना भोगायला लागणार होती.

अवांतरः
वर दिग्विजय सिंग यांचा उल्लेख मध्य प्रदेशचे (छत्तीसगढ वेगळे राज्य होण्याआधी) माजी मुख्यमंत्री म्हणून आलाच आहे तर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दैदिप्यमान कारकिर्दीबद्दल थोडक्यात माहिती देणं आवश्यक आहे. आता छत्तीसगढचा भाग असलेल्या भागातून चाकिनी आणि डाकिनी नामक दोन नद्या वाहतात. अगस्त्य मुनींनी त्यांच्या ललितासहस्त्रनामम् या ग्रंथात या दोन नद्यांचा उल्लेख चाकिनीअंबा स्वरुपिणी आणि डाकिनेश्वरी असा केलेला आहे. स्थानिकांच्या दृष्टीने या दोन नद्यांचे पाणी पुरवठ्याइतकेच सांस्कृतिकही महत्त्व आहे.

नॅशनल मिनरल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने या राष्ट्रीयीकृत संस्थेने या भागात खाणकामाला सुरवात केली. दुर्दैवाने नियोजनाच्या अभावामुळे या खाणींतून निघणारा विषारी कचरा याच दोन नद्यांत काही वर्ष टाकण्यात आला. याचा परिणाम अर्थातच या दोन्ही नद्यांचे पाणी धोकादायकरित्या अशुद्ध होण्यात झाला. ही गोष्ट मुख्यमंत्री असलेल्या दिग्विजय सिंग यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी स्थानिकांच्या तक्रारींवर कोणतीच कार्यवाही केली नाही. थोडक्यात, त्यांनी या नद्यांच्या शुद्धतेकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. शांततामय मार्गाने आपले प्रश्न सुटत नाहीत म्हटल्यावर त्याचे पर्यावसान हिंसेत झाले आणि त्याचे परिणाम झारखंडचा तो भाग आजही भोगतो आहे.

गंमतीची गोष्ट अशी, की जिथे आंदोलनकरुन मलई खायला मिळते अशा भागात तत्परतेने धाव घेणार्‍या मेधा पाटकर, अरुंधती रॉय, प्रिया पिल्लई, आणि बेला भाटीया इत्यादी प्रभूतीमात्र या भागाकडे कधीच फिरकल्या नाहीत. मानवाधिकार आणि आदिवासींचे प्रश्न हे त्यांच्यासाठी "जिथे मिळते मलई, तिथे वाजवा सनई" असे होते आणि आहेत. दुर्दैवाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष आणि आंदोलनाची गळचेपी यामुळे हा प्रश्न आणखी चिघळला आणि या भागातल्या नक्षलवादाला खतपाणी मिळालं. अरे हो, बेला भाटियावरुन आठवलं...याच बाईचा नवरा जॉन ड्रेझची नेमणूक सोनियामातेने संपूर्णपणे घटनाबाह्य अशा नॅशनल अ‍ॅडव्हायजरी काउन्सिलवर नेमणूक केली होती.

संदर्भः
(१) विविध वर्तमानपत्रे
(२) Hindu Terror: Insider account of Ministry of Home Affairs - RVS Mani

क्रमशः

©️ मंदार दिलीप जोशी

युपीएच्या गंमतीजमती भाग १ आणि २ - नक्षलवादी आणि काँग्रेस संबंध

भाग १

पूर्वीच्या हिंदी चित्रपटांमध्ये काही दृष्ये ठरलेली असत. त्यातलं एक म्हणजे एखादा खूनी, दरोडेखोर, थोडक्यात कोणताही गुन्हेगार जखमी अवस्थेत एखाद्या सहृदय डॉक्टरच्या (उदाहरणतः ए के हंगल, अभी भट्टाचार्य, राजेन्द्रकृष्ण, गजानन जहागिरदार, वगैरे दयाळू लोक) दवाखाना किंवा रुग्णालयाच्या पायरीवर येऊन बेशुद्ध पडतो. डॉक्टर, परिचारिका, इतर सेवक कर्मचारी यांनी त्या इसमाला ओळखलेलं असतं. त्यातले काही लोक त्या डॉक्टर साहेबांना "मरुदे तेज्यायला" असं म्हणतात सुद्धा, पण डॉक्टर त्याने वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर व्यवसायात प्रवेश करताना घेतलेल्या हिप्पॉक्रॅटिकल ओथ अर्थात शपथेचं स्मरण करतो आणि "जी जान से कोशीश" करुन त्या गुन्हेगाराचे प्राण वाचवतो. मग पोलीस येतात आणि त्या गुन्हेगाराला घेऊन जातात, गुन्हेगार पळून जातो आणि मग पोलीस येतात, वगैरे वगैरे पुढे काय होतं त्याचे तपशील वेगवेगळ्या चित्रपटांच्या कथेनुसार बदलत जातात.

डॉक्टर बिनायक सेन या छत्तीसगड मधल्या डॉक्टरने मात्र हे सिनेमेही बघितले नसावेत आणि त्याला हिप्पॉक्रॅटिकल ओथ अर्थात शपथेचंही काही गांभीर्य नसावं. आपल्या निष्ठा देशविघातक शक्तींच्या पायाशी वाहिल्या आणि विकल्या की नैतिकतेच्या शपथा वगैरे सटरफटर गोष्टी वाटू लागतात यात काही नवल नव्हे. हा डॉक्टर मोकाटमतवादी अर्थात लिबटार्ड लोकांचा लाडका आहे हे माहित असेल तर बर्‍याच गोष्टी लक्षात येतात. नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना प्रथमोपचार द्यायला डॉ. बिनायक सेन थेट नकार देत असे. मात्र हाच पोलीसांच्या जवानांना अशी अमानुष वागणूक देणारा हाच डॉ. सेन नक्षली दहशतवाद्यांवर अत्यंत निष्ठेने फक्त प्रथमोपचारच करत नसे तर त्यांचं आदरातिथ्यही करायचा. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अनेक जवान डॉ सेन यांच्या या आदरातिथ्याचे अनेक किस्से सांगतात. डॉ सेन आणि त्याची पत्नी इलीना यांच्या दवाखान्याचा वापर निव्वळ नक्षली दहशतवाद्यांच्या सेवाशुश्रुषेपुरता मर्यादित नव्हता, तर तिथे चक्क नक्षली दहशतवाद्यांच्या धोरण ठरवण्यासाठी ज्या सभा (मिटिंग) देखील व्हायच्या.

थोडक्यात, डॉ सेनचा दवाखाना हा नक्षली दहशतवाद्यांचा एक अड्डाच होता असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

अशा या माणसाचं सरकारने काय करायला हवं होतं? पोलीस तक्रार, कोठडी, खटला, नजरकैद, तडीपारी, तुरुंगवास यांपैकी काही घडलं असावं असा तुमचा समज असेल तर तो काढून टाका.

सोनिया गांधी प्रणित काँग्रेस अर्थात युपीएच्या सरकारने डॉ. बिनायक सेन याची प्लॅनिंग कमिशन अर्थात नियोजन आयोगात सल्लागारपदी नेमणूक केली. तिथे बसून या इसमाने कसलं नियोजन केलं असेल आणि काय सल्ले दिले असतील याची कल्पनाही न केलेली बरी.

-----------------------------------------------------------------------------------------------------------

भाग २

महाराष्ट्रातला गढचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त म्हणून खूप वर्षांपूर्वी जाहीर झाला आहे. पोलीस आणि नक्षली दहशतवादी यांच्यात होणार्‍या चकमकी या इथे नेहमीच्याच. सर्वसाधारणपणे दहशतवादी आणि सशस्त्र पोलीस दलांमध्ये चकमकी झाल्या की बातमीचा मुख्य भाग हा दोन्ही बाजूंमधील मृत आणि जखमींचा आकडा हा असतो.

मात्र या चकमकींच्या वर्णनामध्ये एक विचित्र गोष्ट असायची. जरा स्मरणशक्तीला ताण देऊन बघा. त्या वेळच्या वर्तमानपत्रात येणार्‍या बातम्या आणि संसदेत विचारलेल्या प्रश्नांना संबंधितांनी दिलेली उत्तरं यात एक फारच विचित्र बाब आढळून आली होती. या चकमकीत पोलीसांच्या मृत्यूचे प्रमाण शेजारील छत्तीसगढमधील चकमकींच्या तूलनेत लक्षणीयरित्या कमी होते. आता यात अर्थातच वाईट काहीच नाही, उलट चांगलंच आहे. पण खरी गोम पुढे आहे. या चकमकीत पोलीसांची शस्त्रे नक्षलवाद्यांनी "हिसकावून घेतली आणि पळ काढला" अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. आता हातघाईच्या लढाईत काही वेळा अशा गोष्टी होणे साहजिक आहे, पण अशा हातघाईच्या चकमकी नक्षलग्रस्त भागात फार होण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. पण इथे अशा प्रकारच्या घटनांची शृंखलाच (पॅटर्न) आढळून येत होती.

हा खरंच योगायोग होता का? की छत्तीसगढ राज्यात त्या वेळी असलेल्या काँग्रेसेतर सरकारची विश्वासार्हता रसातळाला नेण्याकरता रचलेला एक डाव होता? महाराष्ट्रात आणि केंद्रात त्या वेळी काँग्रेसचं सरकार विराजमान होतं आणि छत्तीसगढमधे भाजप सरकार, हाच तो योगायोग.

याचीच आणखी एक बाजू अशी, की जेव्हा पोलीस आपली शस्त्रे गमावतात, तेव्हा पुढे काय करायचं याची नियमावली असते त्यानुसार काही औपचारिकता पाळाव्या लागतात. शस्त्रे गमावल्यावर न्यायालयीन चौकशीसारखी एक विभागीय चौकशी होते आणि या कामकाजाची व्यवस्थित नोंदणी केली जाते. या चौकशीत शस्त्र गमावणार्‍या पोलीसांवर जबाबदारी निश्चित केली जाते आणि त्या राज्याचे जे नियम असतील त्याप्रमाणे त्या दोषी पोलीसांवर कारवाई केली जाते. मग ती कारवाई शिक्षा स्वरूपातच असेल असे नाही, पण प्रत्येक गोष्टीची नोंद होते हे नक्की.

ही गोष्ट प्रचंड धक्कादायक आहे की गढचिरोली जिल्ह्यात घडणार्‍या पोलीसांची शस्त्रे नक्षलवाद्यांनी हिसकावून पळ काढण्याच्या घटनांनंतर अशा कुठल्याही दोषनिश्चिती आणि कारवाईची नोंद सापडत नाही.

(१) पोलीसांची शस्त्रे नक्षलवाद्यांनी हिसकावून घेणे आणि (२) शस्त्र गमावल्यानंतर कुठलीही चौकशी झाल्याची नोंदही नसणे — या दोन गोष्टींची सांगड घातली तर जे निष्कर्ष समोर येतात ते हादरवून टाकणारे आहेत.

महाराष्ट्रातले काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार केंद्रातील सोनिया प्रणित काँग्रेस अर्थात युपीए सरकार आपल्याच पोलीसांचा उपयोग नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवण्यासाठी तर करुन घेत नव्हते? त्या काळात गढचिरोली जिल्ह्यात नेमणूक झालेले अनेक पोलीस या गोष्टीची खात्री करु शकतील की ज्या चकमकींत पोलीसांची सरशी झाली आणि मृत किंवा अटक केलेल्या जखमी नक्षलवाद्यांकडून पोलीसांनी जी शस्त्रास्त्रे जप्त केली ती पोलीसांची शस्त्रे असल्याची स्पष्ट खुणा/चिह्ने त्यांच्यावर होत्या.

आता आणखी एक संशय येतो. की नक्षली दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांवर पोलीसांची शस्त्रे असल्याच्या खुणा सापडल्या. पण कदाचित अशीही अनधिकृत शस्त्रास्त्रे असू शकतील का जी नक्षल्यांनी सोयीस्कररित्या "हिसकावून" घेतल्यावर पुढे काही कारवाईच होऊ नये? कल्पनाही शहारा आणते.

उपरोक्त दाव्यांचे पुरावे वर्तमानपत्रातल्या आणि माध्यमांतल्या बातम्या, संसदेतली प्रश्नोत्तरे, आणि पोलीसांकडे असलेल्या नोंदी यांच्याकडे सहज पाहता येतील.

संदर्भः
(१) विविध वर्तमानपत्रे
(२) Hindu Terror: Insider account of Ministry of Home Affairs - RVS Mani

©️ मंदार दिलीप जोशी

Friday, May 11, 2018

"आजोळी आला आहेस, रिकाम्या हाताने कसं जाऊ देणार?"

"आजोळी आला आहेस, रिकाम्या हाताने कसं जाऊ देणार?"

मूळ हिंदी लेख:  © तनया प्रफुल्ल गडकरी (https://www.facebook.com/tanaya.gadkari/posts/1845350532199281)
मराठी रुपांतर: © मंदार दिलीप जोशी

हे शब्द फक्त प्रेम किंवा सामाजिक औपचारिकता नाहीत. हे समाजशास्र किंवा मानसशास्त्रात सांगितलेले सिद्धांत प्रत्यक्षात सिद्ध करायची उदाहरणे देखील नव्हेत.

हे शब्द म्हणजे धर्माचे प्राण आहेत. भारताचा आत्मा आहे.

दवबिंदूंसारखे मनाच्या प्रत्येक कोपर्‍याला हलकेच भिजवून शीतलता प्रदान करणारे हे शब्द साधारण साडेपाच वर्षांपुर्वी ऐकल्याचं आठवतं.

२०१२ सालच्या थंडीतली गोष्ट आहे. नवी दिल्ली येथे IBTL भारत संवाद च्या कार्यक्रमात आदरणीय श्रीमती निर्मला सीतारामन, डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी, श्री महेश गिरी,श्री शेषाद्रि चारी, श्रीमति मीनाक्षी लेखी यांच्या आधी एक अपरिचित गृहस्थ मंचावर आले.

श्री रामअवतार शर्मा जी।

सीतामाता, प्रभू श्रीराम, आणि लक्ष्मण यांच्या पदचिह्नांचा माग काढत अयोध्या ते रामेश्वरम् आणि तिथून जनकपुर पर्यंत चक्क सायकल दामटवत आले होते. त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितलं की त्यांच्या मार्गातील वनवासी बंधूभगिनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल असे बोलत होते जणू काही वेळापूर्वीच राम तिथून पुढे गेले असावेत.

जनकपुरात त्यांना आलेल्या एका सुंदर अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणतात:

जनकपुरच्या मंदिराच्या महंतजींना मी भेटायला गेलो, तेव्हा मी त्यांचा कुणीच लागत नसतानाही एखाद्या जवळच्या नातेवाईकाचं करावं तसं त्यांनी माझं आदरातिथ्य केलं. एक संपूर्णपणे अनोळखी व्यक्ती असूनही!

मी जेव्हा तिथून निघालो, तेव्हा त्यांनी माझ्या हातात एक पाकीट ठेवलं. मला वाटलं, मंदिरातला अंगारा असेल. आगाऊपणे उघडून बघितलं तर त्यात शंभराची नोट होती! मी आश्चर्यचकित होऊन त्यांना विचारलं की "बाबाजी मी तर एक गृहस्थ आहे, खाऊन पिऊन सुखी आहे, नीट चाललंय सगळं, मग तुमच्या सारख्या महात्म्याने मला पैसे का द्यावेत?"

बाबाजी म्हणाले, "सीतेला काय म्हणता तुम्ही?"

मी म्हणालो, "सीतामाता...सीता आई आहे आमची."

त्यावर बाबाजी एकदम मान उंचावून गर्वाने म्हणाले, "अरे सीता माझी मुलगी आहे. आजोळी आला आहेस, रिकाम्या हाताने कसं जाऊ देणार?"
_________

श्री रामअवतारजींनी जेव्हा ही घटना सांगितली, तेव्हा ऐकणार्‍यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसली. मनात दाटलेल्या भावनांनी गंगाजमुना रूप घेऊन वहायला सुरवात केली.

आम्ही कुठे बाहेर गेलो, फिरायला गेलो, तीर्थक्षेत्री गेलो, कुठेही गेलो की माझे बाबा नेहमी म्हणायचे, "लोकांकडे एवढी श्रद्धा आणि ऊर्जा येते कुठून? त्यांच्यात एवढी विजिगिषा येते कुठून? काय आहे ती शक्ती? त्या स्त्रोताचा शोध घे!"

एकदम काहीतरी मनात चमकलं. मी वळून बाबांकडे बघितलं....त्यांचेही डोळे पाणावलेले होते.

हीच शक्ती आहे जिने सनातन धर्माचं मूळ सनातन स्वरूप जपलं आहे. सकाळी कॉलनीत झाडू मारणार्‍या मावशींना माझी, "राम राम मावशी, कशा आहात?" अशी आरोळी ऐकू आली नाही की ताडकन त्यांचा ठेवणीतला टोमणा ठरलेला असतो. त्यांना आणि मला जोडणारा माझा राम आहे. प्रभू रामचंद्र आणि सीतामातेचं चित्र गल्ल्यावर लाऊन लोकांची पादत्राणं शिवणारे काका याच सनातन धर्माला बळ देत असतात. प्रभू रामचंद्र आणि सीतामातेला भेटायला आलेल्या यात्रेकरूंच्या सेवेकरता मोठ्यातले मोठे श्रीमंत, अनवाणी धाव घेतात. त्यांच्यात आणि या तीर्थाटन करणार्‍या यात्रेकरूंच्यात पैसा, जात, पद, ओळखपाळख वगैरेंचा काही संबंध नसतो. ती सगळी प्रभू रामचंद्र आणि सीतामातेची लेकरं असतात.

आदरणीय गिरधारी लाल गोयल जी जेव्हा नमोंना दमात घेतात तेव्हा म्हणतात, "चार वर्ष साहेबांचं तोंड नाही बघितलं, आता आलेत आजोळच्या दारात आजीच्या डबोल्यावर डोळा ठेवून! हुं!!" या शब्दांत मला सनातनाला एकत्र बांधणारं हेच समान सूत्र दिसतं.

याचं आणखी एक उदाहरण रामअवतारजींनी दिलं. १९४७च्या आधी जनकपुरकडून अयोध्या प्रशासनाला काही रक्कम पाठवली जायची, जी राजर्षी जनक महाराजांकडून श्रीरामांना भेटीदाखल दिलेल्या जमीनीतून आलेल्या उत्पनातून दिली जायची. शतकानुशतकं चाललेली ही परंपरा १९४७ नंतर "स्वतंत्र" भारताच्या सरकारने बंद केली. जणू दोन देशांतल्या नातेसंबंधांना तिलांजली दिली, तो मान संपुष्टात आणला.

जेव्हा कम्युनिट चीन भारताच्या पूर्वोत्तर राज्यांत आपला प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने बौद्ध प्रतीकांना अस्त्रासारखं वापरून घेत होता, आम्ही "सेक्युलर स्टेट" होण्याचं प्रदर्शन करत आमचे जोडलेले संबंध विसरत आपल्याच माणसांना गमावत होतो.

मधे कुठेतरी हरवलेलं हे सूत्र आज परत मिळाल्यासारखं वाटतंय.

संपूर्ण भारतीय उपखंडासह दक्षिण पूर्वेकडचे समुद्राने वेढलेले देश उदाहरणार्थ कंबोडिया, वियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, थाईलँड, सिंगापुर वगैरे देश यांना मोत्यांची उपमा दिली तर या मोत्यांना ओवणारा बारीकसा दोरा कुठला, याची जाण भारताच्या सद्ध्याच्या पंतप्रधानांना आहे. म्हणूनच जेव्हा ते नेपाळचे पंतप्रधान खड्ग प्रसाद शर्मा ओली यांना "मेरे भाईसाहब" म्हणतात तेव्हा ते संबंध निव्वळ योगायोगाने, भौगोलिक परिस्थितीमुळे झालेल्या नैसर्गिक शेजार्‍यांमधले उरत नाहीत तर "आजोळ" आणि "मुलीचं सासर" यातले संबंध होऊन जातात.

याच मुळे सनातन भारताचं अस्तित्व अभंग आहे. बाकी दोन देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांमधे काय खेचाखेची चालायची ती चालूदे, ती चालतच राहणार. देशादेशात माणसं रेषा आखतात, त्या खोडल्याही जाऊ शकतात.

पण श्री रामनाम नामक सेतू ज्याने ओळखला, ज्याच्या मनःचक्षुंना दिसला, तो या समान सूत्राशी जोडला गेला किंवा त्याने स्वतःला जोडून घेतलं, असं समजा.

आता फक्त अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीची वाट बघुया.

बोला सियावर रामचंद्र महाराज की जय.

श्री रामअवतार शर्माजी यांचं वक्तव्य या लिंकमधे विशेषतः ७:३० आणि ८:१५ मिनीटे यांमधे पहा:


https://www.youtube.com/watch?v=gVSP8engVjY&feature=youtu.be



मूळ हिंदी लेख:  © तनया प्रफुल्ल गडकरी (https://www.facebook.com/tanaya.gadkari/posts/1845350532199281)
मराठी रुपांतर: © मंदार दिलीप जोशी
_____________________________________________

मूळ हिंदी लेख:  © तनया प्रफुल्ल गडकरी (https://www.facebook.com/tanaya.gadkari/posts/1845350532199281)

"नाना के घर आए हो, खाली हाथ कैसे जाओगे?"

ये शब्द महज़ स्नेह या लोक व्यवहार नहीं हैं! ये समाजशास्त्र या मानसशास्त्र को साधने की कला का उदाहरण भी नहीं हैं!

ये शब्द धर्म का प्राण हैं। भारत की आत्मा हैं!

आज से साढ़े पाँच वर्ष पहले सुने थे, तब से ओस की बूंदें बनकर हृदय को सींचते आए हैं... ये शब्द!

2012 की सर्दियाँ थीं। नई दिल्ली में आयोजित IBTL भारत संवाद प्रारंभ हुआ। (आदरणीय): श्रीमति निर्मला सीतारमण, डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी, श्री महेश गिरी, श्री शेषाद्रि चारी, श्रीमति मीनाक्षी लेखी इत्यादि नामों से पहले एक अपरिचित सज्जन मंच पर आए...
रामअवतार शर्मा जी।

साइकल से सीता-राम-लक्ष्मण के पदचिह्नों का अनुसरण करते हुए अयोध्या से रामेश्वरम् और जनकपुर तक यात्रा कर आए थे।

उन्होंने गाथा बताई.. कैसे राह भर के वनवासी श्री राम के विषय में यूँ बात करते मानों कुछ समय पहले ही राम वहाँ से होकर गए हों!

जनकपुर के विषय में एक सुंदर घटना कही। उन्हीं के शब्दों में:
__________
"जनकपुर का जो मंदिर है.. उसके महंत जी के पास मैं गया। उन्होंने मुझे रिश्तेदार की तरह रखा। अनजान आदमी को! जब मैं चलने लगा, उन्होंने मुझे एक लिफाफा दिया। मैंने सोचा, बाबा ने भभूत दी होगी! फिर मैंने बेईमानी से खोलकर देखा तो उसमें 100 रुपए का नोट था !!!
मैंने पूछा: बाबा मैं तो गृहस्थ हूँ, मेरी दाल रोटी चल रही है.. आप महात्मा होकर मुझे पैसे क्यों देते हैं?

बाबा बोले- सीता को क्या मानते हो?

मैंने कहा- सीता हमारी माँ है।

तो वो बड़े गर्व से बोले-सीता मेरी बेटी है। और तुम नाना के घर आए हो, खाली हाथ जाओगे क्या? "
_________

मुझे याद है... यह सुनकर सबकी आँखें जगमगा उठी थीं। भावों ने अश्रुओं का रूप धर लिया था!

अक्सर बाऊ 'जन दर्शन' कराते हुए कहते थे... "लोक इतनी श्रद्धा और ऊर्जा कहाँ से पाता है? यह जीवट कहाँ से आता है? वह शक्ति क्या है? उस स्रोत को खोजो!"

लगा कि जैसे 'स्रोत' का पता मिल गया है! मैंने पलटकर बाऊ को देखा.. उनकी भी आँखें नम थीं।

यही शक्ति है जो सनातन को सनातन रखे हुए है। सुबह सकारे कॉलोनी में झाड़ू देती, कचरा उठाती काकी को यदि मेरा " राम-राम सा। कैसे हैं ?" सुनाई ना दे तो फट से ताना मिल जाता है। उन्हें और मुझे मेरा राम जोड़ता है। सीताराम का चित्र अपने गल्ले पर लगाकर जूते सिलते बाऊजी सनातन को संबल देते हैं। सीताराम के नाम पर बड़े-बड़े धनिक श्रेष्ठी , जातरुओं की सेवा को नंगे पाँव दौड़ जाते हैं। उनमें और जातरुओं में धन, जाति, पद, परिचय का संबंध नहीं है.. पर सब सीताराम के बेटे-बेटी हैं।

आदरणीय गिरधारी लाल गोयल जी जब नमो को उलाहना देते हैं : "चार साल से पापाजी का तो मुंह तक नहीं देखा ,अब जेब खर्च के लिए नानी की गुल्लक पर निगाह गढ़ा के चल दिए ननसाल? हुँह!" तब मुझे यही सम्बन्ध सूत्र नज़र आता है। :)

इसका एक और उदाहरण राम अवतार जी ने दिया था। 1947 से पहले तक जनकपुर से अयोध्या प्रशासन को कुछ राशि भेजी जाती थी जो राजा जनक द्वारा अयोध्या को उपहार में दी भूमि से मिलती थी। सहस्त्राब्दियों की इस परंपरा को 47 के बाद बंद कर दिया भारत सरकार ने। दो देशों के मध्य रिश्तेदारी का मान खत्म कर दिया!

जब कम्युनिस्ट चीन उत्तर-पूर्वी भारत में अपना प्रभाव बढ़ाने के लिए बौद्ध प्रतीकों को अस्त्र बना रहा था, हम अपने रक्त संबंध भुलाकर 'सेक्युलर स्टेट' होने का प्रदर्शन कर अपनों को खो रहे थे।

मध्यांतर में खोया वह सम्बन्ध सूत्र आज पुनः मिला है।

भारत के वर्तमान प्रधानमंत्री को संपूर्ण भारतीय उपमहाद्वीप, दक्षिण पूर्व व महासागरीय देशों जैसे कंबोडिया, वियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, थाईलैंड, सिंगापुर इत्यादि को जोड़ने वाले इस धागे का पता है।

जब वह नेपाल के प्रधानमंत्री खड्ग प्रसाद शर्मा ओली को 'मेरे भाईसाहब' कहते हैं तो सम्बंध केवल संयोग से भौगोलिक पड़ोसी होने का नहीं रह जाता, 'नाना का घर' और 'बेटी का ससुराल' वाला हो जाता है।

इसी से सनातन भारत का अस्तित्व अखंड है । बाकी विदेश मंत्रालयों के मध्य खींचातानी का क्या है,वह तो चलती रहती है। इंसानों की खींची लकीरें बनती और मिटती रहती हैं।

श्री सीताराम नाम सेतु है। जो समझ गया सो जुड़ जाएगा, जोड़ लेगा।

बस अब अयोध्या में भव्य मंदिर की प्रतीक्षा है।

जयतु श्री सीता राम।

[ * देखें श्री रामावतार शर्मा जी का वक्तव्य। विशेषतः 7मिनट 30 सेकण्ड और 8:15 का भाग। ]

- © तनया प्रफुल्ल गडकरी (https://www.facebook.com/tanaya.gadkari/posts/1845350532199281)

Wednesday, May 9, 2018

चला न कॉम्रेड

चला न कॉम्रेड
एक मुडदा पाडू,
चला न, त्याच्यावर एक गोष्ट रचू

तयार करुन ठेवू,
पोस्टर, पेज आणि भरपूर कविता
मग करु त्यांचा गोळीबार योग्य वेळी
हे वारे, आपल्याला हवे तसे वाहत असतील तेव्हा
आणि हो कॉम्रेड, थोडं तिखटमीठही टाकू त्यात
तुमच्या स्वादानुसार,
आणि नेहमीप्रमाणे फोडू खापर,
हिंदुस्तान, देवीस्थान और ब्लडी "भक्त" यांच्यावर

कॉम्रेड, लॉजिक कसलं शोधताय?
त्याच्याशी आपल्याला काय देणंघेणं?
काय म्हणालात? लोहड़ी आणि मकर संक्रांतीच्या वेळी
देवळात कसं कुणी कुणाला लपवेल?
कॉम्रेड ते सगळं ठीक आहे हो,
#कॉम्रेड, पुन्हा गिधाडासारखं व्हा बरं,
यु नो, मुडदे खातात ती !
वेमुला, जुनैद, आणि आता हा !
आणि ब्रो, मुडदा हा मुडदा असतो!
जाब वगैरे विचारत नसतो तो,
या मुडद्यामुळे आणखी मुडदे पडले तरच काय तो फायदा !

चला न कॉम्रेड
एक मुडदा पाडू,
चला न, त्याच्यावर एक गोष्ट रचू
रूपांतरः मंदार दिलीप जोशी
मूळ हिंदी कविता: गौतम

------------------
 चलो न कॉमरेड
------------------

चलो न कॉमरेड,
एक लाश गिराते हैं,
चलो न, उसपे कहानी बनाते हैं,
रच के रखते हैं,
पोस्टर, पेज और कविताएँ,
जो दागी जाएँगी ठीक समय पर,
ठीक तब, जब हमारा मौसम हो,
हाँ कॉमरेड, तुम्हारे टेस्ट के हिसाब से,
साल्ट एन पैपर भी रहेगा,
उसपे 'ऐज़ युज़ुअल' ब्लेम करेंगे,
हिंदुस्तान, देवीस्थान और ब्लडी "भक्त" को,


कॉमरेड लॉजिक क्यों ढूंढते हो,
उससे हमारा क्या लेना देना?
क्या ? लोहड़ी, मकर संक्रांति पर
मन्दिर में कोई कैसे छुपायेगा किसी को ?
कॉमरेड सब सही है,
#कॉमरेड बी लाइक अ वल्चर,
यु नो, वो लाशों को खाते हैं !
वेमुला, जुनैद, और अब ये लाश!
अरे लाश थोड़ी न हिसाब मांगती है ब्रो!
लाश तो लाश है,
इससे और लाशें गिरे तो कोई बात हो !
चलो न कॉमरेड,
एक लाश गिराते हैं,
चलो न, उसपे कहानी बनाते हैं

- गौतम

#कविता #OKDontMindHaan

Saturday, April 21, 2018

कठुआच्या निमित्ताने मतदानावर बहिष्कार घातक

सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी काही केलं नाही तर आम्ही मतदान करणार नाही - अशा अर्थाची पोस्ट ज्याने पहिल्यांदा लिहीली तो इसम चपलेने बडवून काढण्याच्या लायकीचा आहे.

ही पोस्ट ज्या भोळसटपणे** काही महिलावर्गाने पोस्ट केली त्यांना माझा कोपरापासून नमस्कार.

NOTA चा प्रचार कमी पडतो आहे असं वाटलं म्हणून आता कठूआ आणि उन्नाओ प्रकरणाचा फायदा घेऊन टाळूवरचं लोणी खाणारेच हा धंदा करत आहेत.

मतदान न केल्याने काय होणार आहे ते आपण आता पाहू.

आपण लोकशाहीत राहत असल्याने तुम्ही मतदान केलं नाहीत तरी निवडणुका व्हायच्या थांबणार नाहीत.

मतदान करणार नाही असं "माझी झांशी मी देणार नाही" या आवेशात ज्या म्हणत आहेत त्यातल्या बहुतेकांनी मोदी सरकारला मत दिलेलं आहे. मी हे ठामपणे म्हणू शकतो की हे सरकार त्याच्या सर्व गुणदोषांसकट काँग्रेस व त्याच्या भेळपुरी सरकारांच्या हजारो पटींनी चांगले आहे. असं असताना मतदान न केल्याने फक्त मोदी सरकारची अर्थात भाजपची मते कमी होतील आणि पुन्हा इटालियन मम्मी प्रणित काँग्रेस पुरस्कृत सरकार सत्तेवर येईल. मग कर्नल पुरोहित वगैरेंवर जे झालं ते सामान्य नागरिकांवर सुरु होईल. हिंदूंचं जगणं सद्ध्या मुश्कील असेल तर तेव्हा ते अशक्य होऊन बसेल. विचार करा, मतदान करु नका असं आवाहन करणार्‍या लोकांना कुणाच्याही अब्रूची पडलेली नाही. त्यांना फक्त या घटनांचा फायदा घेऊन मोदी सरकार खाली खेचायचे आहे आणि परत जनतेला आणि हिंदूंना छळायला सत्तेत यायचे आहे. आणि ते सत्तेत आल्यावर नक्की असं म्हणणार आहेत की "तुम्ही तर मतदान केलंच नाहीत, आम्ही कशाला तुमचे प्रश्न सोडवू".

खात असलेल्या अन्नाला चव नाही म्हणून ते टाकून तुम्ही शेण खाणार का? तसं असेल तर खरंच मतदान करु नका.

पण भावनेच्या भरात एका देशविघातक लांडग्याने केलेले घातक आव्हान भोळसटपणाने** आपल्या टाईमलाईनवर शेअर करु नका. हलकट लोकांनी टाकलेल्या वैचारिक शेणाचे पो आपल्या भिंतींवर थापू नका - दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ. परमेश्वराने डोक्यावर जो अवयव बसवला आहे त्याचा उपयोग करा आणि काहीही पोस्ट करण्याआधी सांगोपांग विचार करा.

माझं म्हणाल तर मी २०१९ मधे कमळावरच बटन दाबणार आहे. फिर एक बार, मोदी सरकार.

© मंदार दिलीप जोशी

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10155670347982326&id=652482325

**बावळटपणा म्हणणार होतो, पण जाऊदे म्हटलं आणि भोळसटपणे हा शब्द वापरला.

कठुआ, सिरीया, आणि आपण

कठुआ येथे झालेल्या तथाकथित बलात्कार आणि खून प्रकरणानंतर तसेच अमेरिका, फ्रान्स, आणि ब्रिटन यांनी सिरीयावर पुन्हा सुरु केलेल्या बॉम्बवषावाच्या निमिताने माध्यमांनी आणि इतर घटकांनी जी राळ उधळली आहे त्यातून तरुन जायचं असेल तर काही तथ्यांचा आणि तर्कांचा खोलवर जाऊन विचार करणे भाग आहे.

मनुष्याला मन आहे आणि मन म्हटलं की भावना आल्याच. वरवर उदात्त हेतू असल्याचं दाखवत मनुष्यस्वभावातील कमकुवत बाजूंचा व्यवस्थित अभ्यास करुन त्यांचा उपयोग छुपे घाणेरडे हेतू साध्य करायला वापर केला जातो, जात आहे याची नोंद आपण घेणं आवश्यक आहे. लहान मुलांना होणारे त्रास हा विषय निघाला की साहजिकच आपण भावुक होतो. त्यातही मातृसुलभ भावनेमुळे सगळ्याच स्त्रीया लहान मुलांच्या बाबतीत खूप हळव्या असतात, मग अशा घटना घडल्यावर या हळव्या बाजूचा गैरफायदा घ्यायला काही भामटे सरसावले नाहीत तरच नवल आहे.  ही गोष्ट अधिक स्पष्ट करायला एक उदाहरण पाहूया. समजा तुम्हाला बातमी सांगितली गेली की 'सिरीयात एक ३० वर्षीय तरुण बॉम्बवर्षावात मेला" तर त्यावर तुमची प्रतिक्रिया ही फार फार तर "अरेरे वाईट झालं" या उद्गारांपलिकडे नसेल. पण वयाच्या याच आकड्यातून शून्य काढून तुम्हाला सांगितलं की 'सिरीयात बॉम्बवर्षावात ३ वर्षांचा मुलगा दगावला' तर त्यावर त्वेषाने व्यक्त होणं आणि ज्यानी कुणी हे घडवून आणलं त्याचा निषेध करणं हे तुम्हाला तुमचं नैतिक कर्तव्य वाटेल.

आपल्याला जेव्हा हे सांगितलं जातं की एका ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला, तेव्हा आपल्या मेंदूतला मातृपितृसुलभ सहानुभूतीचा कोपरा जागृत होतो, पण त्यानंतर जो भावनांचा महापूर येतो त्याच्यात मात्र दुष्प्रचार करणार्‍यांनी पेरलेल्या खोट्या बातम्यांखेरीज काहीही नसतं. कठुआत घडलेल्या घटनेनंतर आपल्या मनाच्या याच कमकुवत बाजूचा फायदा घेत सहानुभूती आणि रोषाचा ओघ हा आपल्याच धर्माची आणि संस्कृतीची बदनामी करण्याकडे वळवायचा. आणि दुसरीकडे मेलेल्या लहान मुलांचे खरेखोटे फोटो पसरवून युरोपात बहुसंस्कृतिवादाचा प्रसार करायचा आणि सिरीयातील असाद सरकारला अस्थिर करायची मोहीम चालवायची.

लहान मुलांबद्दल आपल्याला असलेल्या नैसर्गिक सहानुभूतीचा फायदा घेऊन त्याचा उपयोग भलत्याच गोष्टीसाठी करुन घेणे ही नवीन गोष्ट राहिलेली नाही. जरा मागे गेलं तर युगोस्लाव्हिया आणि सर्बियाचे नेते स्लोबोदान मिलोसोविच यांना असाद यांच्या प्रमाणेच बदनाम करुन अमेरिका आणि नेटोच्या हवाईदलांनी कोसोवो आणि सर्बियावर इतका बॉम्बवर्षाव केला की मिलोसोविच यांच्यावर जितकी मुलंमाणसं मारण्याचा आरोप होता त्याच्या कित्येक पटींनी माणसं या बॉम्बवर्षावात मारण्यात आली. वर दिलेल्या उदाहरणाचा प्रयोग अमेरिकेत करुन बघितला तरी परिणाम तोच होईल. अमेरिकेत कुणालाही विचारा की सिरीयात अमेरिकेने हस्तक्षेप करावा का? तर उत्तर नाही असंच येईल. पण हा प्रश्न विचारताना "असाद सरकारमुळे आज २० मुलं मेली" हे शेपूट जोडून दिलंत, की तीच व्यक्ती फेफरे आल्यागत उच्चरवाने मुलांचा खुनी असादला खाली खेचायचा सल्ला देईल. मग त्याचे परिणाम अधिक मुलांच्या मृत्यूमध्ये होणार असल्याचं त्याच्या गावीही नसेल.

लहान मुलांबद्दल आपल्याला असलेल्या सहानुभूतीची कारणं जैविक तर आहेतच पण इतिहासाला योग्य परिप्येक्षातून बघायला आपण अजूनही न शिकणं हे कारणही तितकंच महत्त्वाचे आहे. माध्यमं आणि इतर घटकांनी चालवलेल्या मोहिमांत लहान मुलांच्या डोक्यावर निरपराध असल्याचा शिका उमटतो आणि तशी ती खरोखरच निरपराध असतातही, पण हे जग इतकं साधं सोपं नाही. लहान मूल हे आकाशातून पडलेलं रत्न नसतं, तर ते फक्त भूतकाळ आणि भविष्यकाळ यातील एक दुवा म्हणून काम करत असतं. ते कितीही निरपराध असलं तरी ते स्वतःला भूतकाळातून आलेल्या नाचणार्‍या भुतांपासून आणि क्रूर भविष्यकाळापासून वाचवू शकत नाही. आयुष्य जगताना, जगण्यासाठी त्याच्या पूर्वजांनी ज्या पर्यायांची निवड केली त्यांची, किंमत त्याला चुकवावीच लागते भले ते पर्याय निवडण्यात त्याचा काहीही हात नसला तरीही. उदाहरणतः आपल्या पूर्वजांनी ज्या पर्यायांची निवड केली त्याचे परिणाम आपण भोगतोच आहोत; यात सद्गुण विकृतीने पछाडलेल्या हिंदू राजांचा आणि देश चालवायला काँग्रेसला उत्तम पर्याय समजणार्‍या आपल्या वाडवडिलांचाही समावेश करावा लागेल. माझ्या मुलांनाही मी निवडलेल्या पर्यायांच्या परिणामांना सामोरे जावे लागेल, त्यात त्यांचा काहीही निर्णयाधिकार नसला तरी. इतिहास हा एक कालखंड नसून सतत घडणार्‍या घटनांची एक साखळी आहे, त्यामुळे कुठल्याही घटनेला भावनावेगात वेगळं कढून पुढचे, मागचे, आणि आजूबाजूचे संदर्भ वगळून तपासल्याने त्यातले प्रयोगसिद्ध वास्तविकता बदलत नाही.

याचा विचार केला तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला "पुढे काय?" याचा विचार न करता येणे किंवा पुढे काही घडले असल्यास त्याची नोंद न घेता येणे हा आहे. सिरीयाचे अध्यक्ष असलेले असाद हे लहान मुलांचे खूनी आहेत म्हणून यांना पदच्युत करा असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण "असाद यांना पदच्युत करणे" या नंतरच्या परिणामांचा विचार करणे सोडून दिलेले असते. सद्दाम हुसेन यांना फाशी दिल्या क्षणी इराकचा विचार करणं आपण थांबवतो.

आणि आपण असिफाच्या तथाकथित बलात्कार्‍यांना/खुन्यांना फाशी द्या असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण ही घटना देशविघातक घटक सद्ध्या सत्तारूढ असलेलं सरकार खाली खेचायला किंवा त्या सरकारचं निव्वळ अस्तित्व हे हिंदूंच्या रानटी मनोवृत्तीचे प्रतीक असल्याचा तद्दन खोटा प्रचार करायला कसं वापरुन घेत आहेत याचा विचार करणं बंद केलेलं असतं.

काय आहे, भोळसट असायला हरकत नाही. पण देव, देश, आणि धर्म यांच्याबद्दल दुष्प्रचार करणारे आपल्याला वापरुन घेतील इतकं बावळट असणं कितपत योग्य हे ज्याचे त्याने ठरवावे.

© मंदार दिलीप जोशी व Satish Verma

त्याच्या आत्याबाईची शेजारीण

हे असलं शीर्षक? काय आहे अर्थ याचा? आणि कोण तो? कोण त्याची आत्याबाई? आणि कोण त्या आत्याबाईची शेजारीण? अहो ती शेजारीण म्हणजे आपण सगळे....हो तुम्ही आम्ही सगळे.

सांगतो. यातला तो म्हणजे लेओनिड निकोलाएव नावाचा रशियन. आता त्याच्या आत्याबाईबद्दल आणि तिच्या शेजारणीबद्दल जाणून घेण्याआधी आपण सरगेई किरोव्ह (Sergei Kirov) याच्याबद्दल जाणून घेऊया. आता हा कोण आला मधेच? सांगतो.

सरगेई किरोव्ह (Sergei Kirov) हा रशियाचा क्रूरकर्मा हुकूमशहा स्टॅलिनचा उजवा हात समजला जायचा. १ डिसेंबर १९३४ साली लेनिनग्रॅड शहरात त्याची गोळी घालून हत्या करण्यात आली. हत्या करणारा होता लेओनिड निकोलाएव नावाचा ३० वर्षांचा रशियन तरुण. या हत्येमुळे संपूर्ण सोवियत रशियात प्रचंड खळबळ माजली. खुद्द स्टॅलिन मॉस्कॉतून रेल्वेगाडीतून लेनिनग्रॅडला रवाना झाला.

१ डिसेंबरला निकोलएवला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याला गोळी घालून मारण्यात यावं असा आदेश बजावण्यात आला. यात कारण असं बाहेर आलं की निकोलाएवच्या पत्नीशी किरोव्हने अनैतिक संबंध ठेवले होते म्हणून चिडून निकोलाएवने त्याची हत्या केली. पण सोवियत रशियात अशी कारणं किती खरी असतील याची कल्पना केलेलीच बरी.

तर निकोलाएवने ही हत्या कुणाचीही मदत न घेता एकट्यानेच केल्याचं सांगितलं. पण स्टॅलिननं या घटनेचा पुरेपूर फायदा घेतला, निकोलाएवशी संबंध असलेल्या नसलेल्या अनेकांना सरळ उचलून देहदंडाची शिक्षा सुनावण्याचा त्याने सपाटा लावला. या शिक्षेविरुद्ध कुठलंही अपील करता येत नसे. निकोलाएवशी तुमचा संबंध असणं हे एकच कारण सांगितलं की अपील तर सोडाच खटलाही धड चालवला जाण्याची शक्यता शून्य होती. उचलल्या जाणार्‍यांच्यात निकोलाएवचे नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारी-पाजारी कुणालाही सोडलं गेलं नाही. यात एलिझाबेथ लेरमोलो नामक एका महिलेला देहदंड मिळण्याचं कारण तुम्हाला सांगितलं तर तुम्ही चाट पडाल. ही महिला निकोलएवच्या आत्याची शेजारीण होती.

किरोव्हच्या हत्येचं निमित्त करुन स्टॅलोनने भीषण हत्याकांड आरंभलं. कम्युनिस्ट पार्टीचे हजारो कार्यकर्ता आणि सामान्य जनतेतले कोट्यावधी निरपराध नागरिकांची हत्या केली गेली. या प्रकाराची दहशत इतकी होती की सर्वसामान्य माणूस श्वास घेतानाही विचार करत असे.

किरोव्ह स्टॅलिनच उजवा हात समजला जात होता खरा, पण खरंच स्टॅलिनला त्याच्याबद्दल इतकी आत्मीयता होती?

नाही. त्यावेळच्या साहित्याचा कानोसा घेतला तर अनेकांचं असं म्हणणं होतं की किरोव्हची हत्या स्टॅलिननेच घडवून आणली होती. किरोव्ह स्टॅलिनचा उजवा हात समजला जात होता याचा अर्था त्याची लोकप्रियता सुद्धा रशियन जनतेत वाढत होती. स्टॅलिनला असा संशय होता की त्याने व कम्युनिस्ट पार्टीने ज्या सातत्याने विरोधकांच्याच नव्हे तर सामान्य नागरिकांच्या हत्या घडवून आणल्या होत्या त्याने रशियन जनता विटली होती आणि कदाचित स्टॅलिनला पदच्युत करुन किरोव्हला राष्ट्राध्यक्षपदी बसवेल.

कदाचित किरोव्हच्या हत्येत स्टॅलिनचा हात नसेलही, पण त्याच्या मृत्यूचा फायदा स्टॅलिनने पुरेपूर उचलला. क्रूरतेची परिसीमा गाठत सत्तेवरची आपली पकड त्याने घट्ट केली.

पण त्याने किरोव्हला खरंच न्याय मिळाला? 

--------------------------------------

असिफाला पण न्याय मिळायलाच हवा. कारण जानेवारीमध्ये झालेल्या हत्येची आत्ता अचानक वर येणं ही बाब संशयास्पद आहे. जवळजवळ तीन महीने हे षडयंत्र रचलं जात होतं का? कधी बोंब ठोकायला सुरवात करायची, कुणाकुणाला उचलायचं, कुठल्या समूदायाची बदनामी करायची, कुठल्या चॅनलनी कुठला मुद्दा उचलायचा याची पटकथा तर लिहीली जात नव्हती? असिफा बकरवाल समाजाची होती. बकरवाल समाजाने कधीही पाकिस्तानचे समर्थन केलेलं नाही आणि कधीही काश्मीरी स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍यांच्या कच्छपी हा समाज लागलेला नाही. त्यातून वानी सारख्या बलत्काराचा आरोप असलेल्या आणि जिलानी या फुटीरतावादी नेत्याशी संबंध असलेल्या पोलीस अधिकार्‍याला बाहेरून तपासासाठी बोलवून घेणं ही बाब संशय वाढवणारी आहे. आणखी एक बाब म्हणजे सीबीआय चौकशीला दिलेला नकार आणि मुख्य्मंत्री मेहबूबा मुफ्ती यांची धक्कादायक विधाने.

असिफाला न्याय मिळायला हवा, तिच्यावर बलात्कार झालाच असेल तर बलात्कार्‍यांना शिक्षा व्हायलाच हवी. असं ऐकलं होतं की सैन्याला मोकळिक दिली गेली तेव्हा मेहबूबांनी त्याला विरोध केला होता, पण दिल्लीहून जवळजवळ रडतरडतच परत यावं लागलं होतं. And hell hath no fury greater than a woman scorned. मुलीच्या बदल्यात जहाल अतिरेक्यांना सोडणार्‍या बापाचं रक्त आहे ते, कधी ना कधी कुठे ना कुठे  आपला रंग दाखवणारच.

असिफाला न्याय मिळायला हवा. या घटनेची निःपक्षपाती चौकशी झालीच पाहीजे, आणि जे कुणी गुन्हेगार सापडतील त्यांची जात, धर्म, पद आणि समाजातील स्थान हे न बघता शिक्षा व्हायलाच हवी.

इथे एक गोष्ट आठवली ती जाता जाता सांगतो. सहसा हिंदू समाज एक धर्म म्हणून बलात्कार्‍यांचा साथ कधीच देत नाही. मुसलमानांची इतक्या वर्षांची सोबत असूनही हा दुर्गुण हिंदूंनी अजून अंगी बाणवलेला नाही. अलिगढमधे ख्वाजा चिश्तीच्या वंशजांनी घडवलेल्या मोठ्या यौन शोषण कांडात काही हिंदूनाही सामील करुन घेतलं होतं, पण जेव्हा ते पकडले गेले तेव्हा त्यांना हिंदू समाजाने साथ दिली नाही. त्यातल्या एकाने तर हा ताण सहन न होऊन आत्महत्या केली. निर्भया कांडातल्या आरोपीने देखील तुरुंगातच आत्महत्या केली होती हे तुम्हाला आठवत असेलच.  पण चिश्ती आरोपींना मुस्लीम समाजाने दूर लोटलं नाही. त्यांच्या मागे ते ठामपणे उभे राहिले. निर्भया कांडातला तथाकथित अज्ञान आरोपी मोहम्मद अफरोजच्या पाठीशी सुद्धा मुसलमान समाज उभा राहिला. एकाही मुसलमान नेत्याने त्याचा निषेध केला नाही. महालक्ष्मी येथील शक्ती मिल्स रेप प्रकरणात सापडलेल्या मुस्लीम आरोपीची आईच त्याच्या जन्माचा दाखला घेऊन कोर्टात आली होती. तो आता मोकळा झालं आहे आणि हप्ते वसुलीचा बिझनेस करतोय. त्याच्या समाजाने त्याला साथ दिल्यामुळे.

असिफाचं निमित्त करुन नाहक हिंदू समाजाला लक्ष्य केलं जातंय. आपली जम्मूतली जनता इतकी पोलीसविरोधी कशी झाली याचीही चौकशी व्हायला हवी. वानी नावाच्या त्या पोलीस अधिकार्‍याचे चरित्र जनतेसमोर यायला हवं, आणि त्याला बाहेरून या घटनेची चौकशी करायला का आणलं गेलं याचीही चौकशी केली जायला हवी.

आणि हो, असिफाला, आणि तिच्यासारख्या सर्वांनाच, न्याय मिळायलाच हवा.

आपली निकोलाएवच्या आत्याबाईची शेजारीण व्हायची नाहीतर!

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10155668427647326&id=652482325

- © मंदार दिलीप जोशी

Friday, February 2, 2018

वनवासींच्या जमिनी बळकावणारे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते उर्फ 'लोका सांगे Anti-ब्रह्मज्ञान'

नक्षलवाद्यांच्या समर्थकांपैकी एका व्यक्तीच्या ग्रामीण भागातल्या कारवायांकडे आपण आज पाहूया. वनवासींचा पुळका येऊन त्यांच्या भागात कुठलाच विकास होऊ नये म्हणून जंग जंग पछाडणार्‍या तथकथित सामाजिक कार्यकर्त्यांचा भंपकपणा आपल्याला विदीत आहेच. पण ज्याप्रमाणे दलित आणि वनवासी यांचा कैवार घेणारे नक्षलवादी त्यांच्याच जीवावर उठलेले आपण पाहिले आहेत, त्याच प्रमाणे वनवासींच्या जमिनीसाठी संघर्ष करायचं नाटक करणारे  सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याच जमिनींवर डोळा ठेवतात असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण एकदा भ्रष्ट आचारविचार अंगिकारले, की पापाच्या दरीत किती खोल माणूस जातो त्याला काही धरबंध राहत नाही. अशाच एका वनवासींच्या जमिनीसाठी संघर्षरत असण्याचं सोंग वठवणार्‍या नवरा बायकोची ही गोष्ट आहे. मध्यप्रदेशातल्या निसर्गरम्य, शहराच्या गजबजाटापासून लांब असणार्‍या पंचमढी पर्वतरांगांतल्या हिरव्यागार जंगलावर साधारण नव्वदच्या दशकात एका व्यक्तीची वक्रदृष्टी पडली. या जंगलात आपला एक टुमदार बंगला असलाच पाहीजे असं तो ठरवतो, आणि सिनेमे काढून श्रीमंत झालेल्या त्याला ते फारसं कठीणही जात नाही. गंमत म्हणजे पर्यावरण रक्षण आणि वनवासींचा वनजमिनीवर असणारा हक्क या बाबत शहरी आणि विदेशी लोकांत जनजागृती करुन तो श्रीमंत झालेला आहे. काही वर्षांनंतर त्याच्याच वैचारिक जमातीमधल्या एका स्त्रीशी तो लग्न करतो. ती व्यक्ती त्याच्यासारखीच रणरागिणी 'सामाजिक कार्यकर्ती' आणि लेखिका असते. ब्राह्मणवादी मनुवादी भारत देश वनवासींच्या जमिनी घशात घालायलाच टपलेला आहे या गृहतिकाखाली ती काम करत असते. मला वाटतं आत्तापर्यंत तुम्हाला या जोडप्याचं नाव लक्षात आलं असेल. नसल्यास सांगतो, प्रदीप किशन आणि अरुंधती रॉय.

मुस्लिम दंगलपिडीतांना मदत म्हणून पैसे गोळा करुन ते स्वतःच्याच घशात घालणार्‍या तीस्ता सेटलवाड आणि तिचा नवरा जावेद आनंद यांच्या बद्दल आपण ऐकलं वाचलं असेलच. हे सगळे एकाच माणेचे मणी.

तर प्रदीप किशन आणि अरुंधती रॉय हे जोडपं आता वनवासी जनतेची गरीबी, त्यांच्याकडून हिरावून घेतल्या जाणार्‍या जमिनी, त्यांची एकंदर पिचलेली स्थिती याबद्दल त्याच वनवासींच्या जंगल जमिनीवर उभ्या असलेल्या आपल्या बंगल्यात आरामात बसून चिंतन करु लागले. असे चिंतन करायला लागणारी जागा अशाच निबीड अरण्यात मिळू शकते, नाही का? आता जुन्या ऋषीमुनींप्रमाणे यांनी काय कुट्या बांधून रहावयाचे? छे! हाऊ ओल्ड फॅशन्ड. त्यांना बंगलाच हवा.

काही काळाने त्याच भागात सरकारतर्फे पर्यटकांसाठी एक हॉटेल बांधायचा घाट घातला गेला तेव्हा मात्र प्रदीप किशन आणि अरुंधती रॉय यांना या विकासकामांमुळे तिथल्या निसर्गाचा र्‍हास होणार असल्याचा आणि मायबाप ब्रिटीश सरकारच्या काळातल्या हिल स्टेशनसदृश्य भागाचं विद्रूपीकरण होणार असल्याचा साक्षात्कार झाला. जंगलात बंगला बांधणं न परवडणार्‍या   सामान्य मध्यमवर्गीय पर्यटकांबरोबर त्याच हवेत श्वास घ्यायचा आणि ते चालतील त्याच रस्त्यांवर चालायचं म्हणजे किशन आणि रॉय यांचा वैचारिक अपमानच नाही का? अशा वेळी ते हॉटेल विरोधात बाह्या सरसावून उभे राहिले नसते तरच नवल होतं. हॉटेलबाबतचे आक्षेप नोंदवण्यासाठी नेमलेल्या समितीवर प्रदीप किशन याने स्वतःची वर्णी लावून घेतली आणि लुटारू भांडवलवाद्यांच्या विरोधात  "सामान्य जनतेची" बाजू मांडायला मदत केली. इथे सामान्य जनता वनवासी वगैरे नाही हो, असं वाटलंच कसं तुम्हाला? सामान्यजन म्हणजे नियम डावलून वनजमिनींवर बंगला बांधणारे स्वतः प्रदीप किशन आणि अरुंधती रॉय.

लवकरच प्रदीप किशन व अरुंधती रॉय यांना त्यांचा बंगला बेकायदेशीर असण्यासंबंधी पहिली नोटीस आली. त्या वेळी प्रसारमाध्यमातून त्यांच्या समर्थनार्थ लेख लिहीले गेले. त्यात दोन सूर प्रामुख्याने आळवण्यात आले होते. एक म्हणजे आमच्यापेक्षा कायदेभंग इतरांनी जास्त केला आहे आणि दुसरं म्हणजे आमचे शेजारी पहा आमच्याच वैचारिक जमातीतले आहेत म्हणून आम्ही इथेच राहणार.

नव्वदच्या दशकात सुरु झालेल्या केसमधला शेवटचा ज्ञात भाग म्हणजे २०१० साली स्थानिक न्यायालयात केस हरल्यावर होशंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडे सुद्धा किशन व रॉय आपल्या बाजूने निकाल लावण्यास असमर्थ ठरले. सद्ध्या ही केस भारतीय न्यायव्यवस्थेत कुठेतरी हरवली आहे. हिंदू सणांवर निर्णय आणि टिप्पण्या करण्यात, रिक्त जागा कशा आहेत याबद्दल रडारड करण्यात, आणि आपली भांडणे चव्हाट्यावर आणण्यात व्यग्र असलेल्या आपल्या न्यायाधिशांना फुरसत मिळाली तर कदाचित काहीतरी निकाल ऐकायला मिळेलही. आणि तो जर त्यांच्या विरोधात लागलाच, तर पुन्हा भारत कसा असहिष्णू आहे आणि इथे रहावयास कशी भीती वाटते याच्या कहाण्याही ऐकायला मिळतील.

पण तो पर्यंत प्रदीप किशन आणि अरुंधती रॉय यांच्या वनवासी जमीन बळकावून त्यावर बंगला बांधण्याच्या या अद्वितीय वनवासी दीनदुबळ्या जनतेच्या चरणी रुजू केलेल्या समाजसेवेची कहाणी आपल्या मित्र, परिचित, आणि यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका.

संदर्भः
ऑपइंडिया, टेलीग्राफ, इंडियन एक्सप्रेस, टाईम्स ऑफ इंडिया, इंडिया टुडे, डिफेन्स डॉट पीके
https://goo.gl/DXcjPS  -   https://goo.gl/iYS36Y   -   https://goo.gl/YE7zob   -   https://goo.gl/cndNJS
-  https://goo.gl/3Qoyo3 - https://goo.gl/ST4cjy

© मंदार दिलीप जोशी
माघ कृ. २, शके १९३९




Wednesday, January 31, 2018

देशाची ७३% संपत्ती १% जनतेच्या हातात - ऑक्सफॅमचा अहवाल आणि आपण

देशाची ७३% संपत्ती १% जनतेच्या हातात अशा शीर्षकाचा एक अहवाल ऑक्सफॅम (Oxfam) नामक अनेक संस्थांचे कडबोळे असलेल्या संस्थेतर्फे प्रकाशित झाल्याचे वृत्त देशातील प्रमुख वृत्तपत्रांनी तसेच बातम्यांच्या वाहिन्यांनी प्रसारित केल्याचे सगळ्यांना आठवत असेलच.

बातमीचे शीर्षक आणि अहवालाचा निष्कर्ष पाहिल्यावरच काहीतरी काळबेरं असल्याचा संशय आला होता, पण वेळ मिळताच थोडं खोलात जाऊन बघू म्हणून तेव्हा काही प्रतिक्रिया दिली नव्हती. या संबंधात थोडं वाचन केल्यावर एक मात्र नक्की समजलं की कुठल्याही आंतरराष्ट्रीय संस्थेने फार भारताचं कौतुक केल्यावर हुरळून जाऊ नये, आणि टीका केल्यावर रागही मानू नये. कारण हे अहवाल ९९% वेळा वेगवेगळ्या हितसंबंधांवर आधारित असतात आणि भारताचं किंवा भारतातल्या गरीबांचं भलं वगैरे चिंतण्याचा अजिबात हेतू नसतो.

ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर लगेचच ज्या घराण्याला भारताच्या सम्राटपद वारसाहक्काने मिळायला हवं असं वाटतं त्या घराण्याच्या अठ्ठेचाळीस वर्षांच्या युवराजांनी त्या बातमीवर झडप घालून ऑक्स्फॅमचा अहवाल डाव्होसला गेलेल्या पंतप्रधान मोदींना वाचायला सांगितला. त्यांनी अहवालातला निष्कर्ष खरा मानला असेल तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ७१ वर्षांतली मधली साधारण १५ वर्ष वगळली तर भारतावर त्यांच्याच पक्षाचं राज्य होतं हे तथ्य ते सोयिस्कररित्या विसरले व नेहमीप्रमाणे स्वतःचं हसू करुन घेतलं.


अधिक विषयांतर न करता ऑक्सफॅमकडे वळूया. जागतिक राजकारणात पडद्यामागून सूत्र हलवणारे भलतेच असतात हे आता लपून राहिलेलं नाही. पडद्यामागे असणार्‍या व्यक्तींबरोबरच अनेक स्वयंसेवी संस्थाही (NGO) जागतिक राजकारणात आपापली प्यादी हलवत असतात. अशाच संस्थांपैकी ऑक्सफॅम आहे. ऑक्सफॅमचा संस्थापक कॅनन रिचर्ड मिलफॉर्ड (Canon Richard Milford) हा एक भूतपूर्व ख्रिश्चन मिशनरी होता इतकं सांगितलं तरी संस्थेचा हेतू काय हे वेगळं सांगायला लागू नये. पण इतकी माहिती पुरेशी नसल्याने आणखी सांगणे आवश्यक आहे. या संस्थेचा जन्म दुसर्‍या महायुद्धानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या काही ख्रिस्ती धर्मप्रसारक कार्यकर्त्यांनी (Students' Christian Movement) एका संस्थेची स्थापना केली. हीच संस्था पुढे ऑक्सफॅम म्हणून प्रसिद्ध झाली.

सुरवातीच्या आक्रमक धर्मप्रसाराची जागा हळूहळू समाजसेवेच्या आणि रुग्णसेवेच्या वेष्टनात गुंडाळलेल्या धर्मपरिवर्तनाने घेतली. चर्चशी संबंधित संस्थांचे लक्ष तिसर्‍या जगातल्या भारतासारख्या भरपूर गरीबी आणि 'मागास' असलेल्या देशांकडे गेले नसते तरच नवल होते. पण या सगळ्यात मूळ हेतू हा आपण ज्यांची 'सेवा' करत आहोत अशांना स्थानिक संस्कृतीपासून वेगळं पाडणे आणि त्यांचे धर्मपरिवर्तन करुन ख्रिस्ती करणे हाच होता. मॅगडेलिन विद्यापीठात शिकत असताना ख्रिश्चन विद्यार्थी चळवळीत सक्रीय असणारा कॅनन रिचर्ड मिलफॉर्ड याने त्यानंतर काही काळ भारतात त्रावणकोर आणि आग्रा येथे मिशनरी लोकांनी चालवलेल्या महाविद्यालयांत प्राध्यापकी केली. त्या नंतर तो इंग्लंडला परतला व लिवरपूल मधल्या ख्रिश्चन विद्यार्थी चळवळीचा अर्थात Students' Christian Movementचा सचिव झाला आणि मग काही काळ ऑक्स्फर्ड विद्यापीठातल्या चर्चचा म्हणजेच सेंट मेरीज ऑक्सफर्ड या चर्चचा धर्मगुरू म्हणजे व्हिकार म्हणून काम पाहिलं. १९४२ साली याच महशयांनी Oxford Committee for Famine Relief (ऑक्स्फर्ड दुष्काळ निवारण संस्था) अर्थात ऑक्सफॅमची स्थापना केली. १९८५ साली प्रकाशित एका मार्गदर्शक पुस्तिकेत ऑक्सफॅमने संस्थेने आपल्या कार्याची व्याप्ती थेट सेवेपुरती मर्यादित न ठेवता तिसर्‍या जगातील 'राहणीमानाचा दर्जा सुधारण्याच्या' दृष्टीने वाढवण्याची गरज व्यक्त केली. या कराता ऑक्सफॅमने आपल्या 'सेवा' आणि 'विकास' कार्यांना इतर संस्थांना सोपवण्यास सुरवात केली. रोमन कॅथोलिक ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी स्वतःच्या स्वयंसेवी  संस्था काढायला सुरवात केलीच होती. Evangelical Alliance Relief Fund (TEAR) व Catholic Agency for Overseas Development (CAFOD) या सारख्या संस्थांनी ऑक्सफॅमच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या 'सेवाकार्याचा' भर दुष्काळ निवारणावरुन हलवून 'राहणीमान विकासाकडे' वळवला. आता सेवाकार्यापेक्षा समग्र मानवतेच्या कल्याणाची काळजी त्यांना सतावू लागली होती.

हे सगळं करताना ऑक्सफॅमने स्वतःचा हेतू हा धर्मनिरपेक्ष सेवाकार्य असल्याचा आव व्यवस्थित आणला होता. उपरोक्त संस्था सुद्धा सेवाकार्य करताना आपला धर्मप्रसारणाचा हेतू आणि सेवाकार्याचा लाभ ख्रिश्चनांनाच मिळत असल्याची वस्तुस्थिती अगदी खर्‍याखुर्‍या धर्मनिरपेक्ष व शुद्ध हेतू असणार्‍या देणगीदारांपासूनही लपवण्यात यशस्वी झाल्या होत्या. ऐंशीच्या दशकात मात्र आपल्या 'सेवाकार्याचे' अवलंबत्व ऑक्सफॅमने ख्रिश्चन संस्थांकडून खूपच कमी करुन सरकारी आणि 'सेक्युलर' स्वयंसेवी संस्थांकडे सोपवलं. या संस्थांमधे अगदी प्राण्यांसाठी काम करणारी पेटा असो किंवा वरवर मानवी हक्कांची बाजू घेणारी अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल संस्थासुद्धा सामील आहेत असं त्यांच्या कारभाराकडे व कारवायांकडे पाहून म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. असं केल्याने त्यांच्या ख्रिश्चन अजेंड्याकडे जनतेचं आणि देणगीदारांचं  फारसं लक्ष जाणार नाही असा त्यांचा होरा होता आणि तो खराही ठरला. असं असलं तरी आपला मूळ हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने ऑक्सफॅमने ख्रिश्चन संस्थांशी आपले संबंध घनिष्टच ठेवले होते.

अशा संस्थांचा गरीबांना मदत करता करता आणखी एक हेतू साध्य करायचा होता आणि तो म्हणजे समाजात प्रस्थापितांबद्दल आणि सरकारबद्दल असलेल्या असंतोषाला खतपाणी घालत त्याचे रूपांतर अंतर्गत कलहात करुन बंडापर्यंत गोष्टी पोहोचवणे. या कामी ख्रिश्चन एड (Christian Aid) ही संस्था पूर्वी आघाडीवर होती. वरवर सेक्युलर अशी छबी पण आतून हेतू वेगळाच हेतू अशा अनेक स्वयंसेवी संस्था आजही यात जाणता अजाणता सहभागी आहेत. भारतात अशा स्वयंसेवी संस्थांचं आदिवासी/वनवासी लोकांकडे विशेष लक्ष असतं. आदिवासी/वनवासींच्या भागात असणार्‍या खाणी आणि कारखाने व तत्सम गोष्टींत ढवळाढवळ करणे ही अशा संस्थांच्या कार्यपद्धतीचा अविभाज्य भाग आहे. भारतात अशा एन.जी.ओ. संस्थांमधे कार्यरत असणार्‍या नावांत हत्येचा आरोप असलेल्या नक्षलसमर्थक नलिनी सुंदर, बेला भाटीया अशांचा समावेश बघता या संस्थांचे कार्य काय असू शकतं या विचारानेच थरकाप होतो. नक्षलवादग्रस्त जिल्ह्यात हिंदू साधूसंतांची हत्या होते आणि मिशनर्‍यांचे कार्य मात्र निर्विघ्नपणे कसं सुरु असतं याची कारणमिमांसाही यातूनच स्पष्ट होते.

यात अंबानीने नवीन मोबाईल किंवा मोबाईलचा प्लान काढला की तो कसा कमावणार आहे आणि तुम्ही कसे गरीब अशा कंड्या पिकवण्यापासून ते नुकत्याच झालेल्या कोरेगाव-भीमा आणि वढू इथून जाणूनबुजून पसर(व)लेली दंगल समाविष्ट आहे. आर्थिक विषमतेचा बागुलबुवा दाखवून निर्माण झालेल्या असंतोषाला खतपाणी घालण्याबरोबरच जातीय भावना भडकावून बंडसदृश्य दंगल घडवून आणण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. कोपर्डी बलात्कार व हत्याकांडाच्या वेळी काय घोषणा व पोस्ट फिरत होत्या त्याची आठवण करुन देण्याची गरज नाही. त्यात पोलीस व सरकारी वकिलांनाही सोडलं गेलेलं नव्हतं. उज्ज्वल निकम यांनी विनामोबदला खटला लढवायची तयारी दाखवूनही सरकारी सोपस्कार म्हणून त्यांना दिलं गेलेलं मानधनाचं पत्र सोशल मिडीयावर फिरवून पोलीसांनी बघा किती कष्ट केले आणि हा माणूस बघा किती मलिदा खातो अशा प्रकारची पोस्ट फिरत असलेली आपल्याला आठवत असेलच. यात दुसरं तिसरं काही नसून कुठून तरी तुम्ही दबलेले/दाबलेले, पिचलेले, अत्याचारित आहात आणि तुमच्यापेक्षा श्रीमंत हे स्वत:च्या बुद्धीने व कष्टाने झालेले नसून तुमच्या जीवावर व तुम्हाला पिळूनच झालेले आहेत हेच ठसवणं आहे, आणि या कामी अशा स्वयंसेवी संस्था सक्रीय असतात. कोपर्डीच्या खटल्याला असलेली जातीय किनार अशा संस्थांना गिधाडाला मेलेला प्राणी दिसल्यावर होणार्‍या आनंदापेक्षा जास्त मोहात पाडतो. अशा संस्थांना परदेशातून आणि देशातून किती आणि कसा पैसा येतो हे एका वेगळ्या लेखाचा व संशोधनाचा विषय आहे, तेव्हा ती चर्चा इथे नको.

थोडंसं मागे जाऊन बघितलं तर मुंबईत लोकल गाड्यांवर दगड फेकण्याचं प्रमाण खूप वाढलं होतं. ही दंगलीत होणारी दगडफेक नव्हे तर रेल्वेरुळांनजिकच्या झोपडपट्टीतल्याच भरकटलेल्या तरुणांनी अधुनमधून भिरकावलेला दगड असं त्या गोष्टीचं स्वरूप होतं. रेल्वे डब्याच्या दारात उभं असणार्‍या आणि खिडकीजवळच्या जागेत म्हणजे विंडो सीटवर बसलेल्या लोकांना अर्थातच याचा सर्वाधिक त्रास झाला. प्रमाण खूप वाढलं आणि याची चर्चा टीव्ही व वर्तमानपत्रात होऊ लागली तेव्हा या जीवघेण्या प्रकाराचं चक्क समर्थन करत ही दगडफेक म्हणजे "आहे रे" आणि "नाही रे" वर्गांतल्या संघर्षाचं प्रतीक असल्याचा निर्लज्ज युक्तीवाद तेव्हा या एन.जी.ओं.नी केल्याचेही स्मरते.

तेव्हा ऑक्सफॅमच्या कार्याची मुळं किती खोलवर आणि दूरवर पसरलेली आहेत हे लक्षात घेतलं की 'देशाची ७३% संपत्ती १% जनतेच्या हातात' अशा सनसनाटी मथळ्याची बातमी ही निव्वळ देशातली आर्थिक स्थितीवर भाष्य नसून असंतोष पेरण्याच्या अत्यंत मोठ्या आणि जटील कारस्थानाचा भाग आहे हे लक्षात घ्यायला हवं.

एखादी संस्था जेव्हा भारताच्या जी.डी.पी. किंवा एकूण आर्थिक परिस्थितीबद्दल व स्थिरतेबद्दल गौरवोद्गार काढते आणि ऑक्सफॅमसारखी संस्था देशाची ७३% संपत्ती १% जनतेच्या हातात असं सांगते तेव्हा त्याने अनुक्रमे हुरळून न जाता आणि दु:खी न होता त्या मागच्या हेतूकडे बघणे हे क्रमप्राप्त ठरते.

एका लोकप्रिय जाहिरातीचं वाक्य आठवतं. दिखावे पे न जाओ, अपनी अकल लगाओ. तेव्हा 'विद्येच्या' बाबतीत 'बाळ' न राहता इथे थोडीशी अक्कल वापरली, आणि ऑक्सफॅमची कुंडलीच हातात आली की राव!

संदर्भः
OXFORD HISTORY OF THE BRITISH EMPIRE Companion Series: Britain's Experience of Empire in the Twentieth Century, Edited by Andrew Thompson व इतर.

© मंदार दिलीप जोशी
पौष कृ. ८, शके १९३९