Monday, December 27, 2021

मदर इंडिया - सिनेमा की प्रचारतंत्र?

अजूनही, अजूनही नवा सिनेमा लागला की लॉकडाऊनने कावलेले लोक कधी एकदा जाऊन थेटरात सिनेमा बघतोय असं करतात. मग दीड वर्षापूर्वीच बॉलीवूडला धडा शिकवायची शपथ घेतलेली सोयीस्कर विसरली जाते.

आज थोडं मदर इंडिया सिनेमाकडे नॅरेटिव्हच्या दृष्टीकोनातून बघूया.

Mother India Radha Meets Lala

मेहबूब प्रोडक्शन्सचं बोधचिन्ह डावीकडे बघा, अधिक काही सांगायची गरज नाही. प्रतीके वापरून लोकांच्या मनात द्वेष पेरणी कशी करावी, फॉल्टलाईन्सचा फायदा कसा घ्यावा याचं हे उत्कृष्ठ उदाहरण आहे. यासाठी एकच दृश्य उदाहरणार्थ घेऊया. या दृश्यात गावातला व्यापारी, सावकार "लाला", मदत मागायला आलेल्या गरीब "राधा"कडे वासनांध नजरेने बघतोय. राधा ओलेती, चिखलाने माखलेली दाखवली आहे, थोडक्यात कपडे पूर्ण घातलेले असले, तरी स्त्रीदेहाचा उभार व्यवस्थित दिसेल असं दाखवलं आहे. 

  • या दृश्यातला लाला हा 'लाला' आहे, शेटजी आहे तर त्याने एखाद्या ब्राह्मणासारखी शेंडी का ठेवलेली दाखवली आहे?
  • खांद्यांवर भगवी शाल कशासाठी?
  • दोघांच्या मधे बघा. फोकसमधे नसल्याने नीट दिसत नाही, पण राधाकृष्णाची तसबीर व्यवस्थित दिसते आहे. 

सिनेमाबद्दल जागृती आत्ता आत्ता निर्माण झाली आहे, पण तेव्हा भोळ्या मनांत (gullible minds) काय चित्र निर्माण झालं असेल या गोष्टी पाहून? 

"सावकारी पाश" हे ग्रामीण भागातील सत्य आहेच, पण त्याही पेक्षा शहरी भागातील कारखान्यात काम करणारे कामगारांत जबरदस्त दहशत असलेली "पठाण" नामक एक खाजगी सावकारी करणारी जमात मात्र हिंदी सिनेमावाल्यांना कधी दिसली नसावी. दिसली असणारच, मात्र या जमातीला व्यवस्थित दडवलं गेलं. आता हे पठाण कोण होते हे वेगळं सांगायला नको. त्यांना  कर्जवसूली करायला माणसं ठेवायची आणि कायदेशीरपणे वकील आणि पोलीस घेऊन गरजच पडायची नाही. कर्जाळू कामगारांच्या येण्याजाण्याचा रस्ताही त्यांना ठावूक असायचा आणि तारखेची आठवण करायला किंवा वेळेत न फेडल्यास  कर्ज घेणार्‍यांची गचांडी धरायला तो रस्त्यातच उभा असायचा (काही मराठी चित्रपटांत बघितल्याचं आठवतं, पण तिथेही तो कनवाळू दाखवायचे. आठवा: भावे साहेबांचा बालगंधर्व). 

असं असताना कम्युनिस्टांची लाल चादर पांघरलेल्या या सिनेमातल्या लांडग्यांना पठाण दिसलेच नाहीत, यात काही नवल नाही. किंबहुना, कुणाला ते दिसू नयेत, म्हणूनच लाल चादर पांघरली जायची. 

असेच जुने सिनेमे कधी बघाल, तेव्हा अशा विसंगती दिसतील त्याची नोंद ठेवा. आणि जमल्यास लिहा सुद्धा. 

© मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष कृ अष्टमी, शके १९४३



Tuesday, October 26, 2021

माझ्यापुरतं सांगायचं तर...

मी झब्बा आणि धोतर नेसलं की कपाळावर गंध लावतोच, पण धोतराऐवजी पायजमा आला तरी मी कपाळावर गंध लावतो. फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट घातली तरी माझ्या कपाळावर गंध असतंच. टीशर्ट-जीन्स घातली तरी कपाळावर गंध लावतोच आणि जीन्सची जागा बरमुडाने घेतली तरी कपाळावर गंध लावतोच. मला ते आवडतं आणि कूल सुद्धा वाटतं, आरशात पाहून एक प्रकारचा आत्मविश्वासही वाटतो. 

पाश्चात्य कपड्यांवर अर्थात वेस्टर्न आउटफिट्सवर कपाळावर गंध लावलेलं शोभून दिसत नाही ही कूल वगैरे दिसण्याच्या प्रेशरमध्ये स्वतःच्या मनाची मी समजूत घालून घेत नाही आणि मन मोडून तडजोड करत नाही.

मुळातच कूल म्हणजे काय हे जाहीरात कंपन्यांना आणि जाहीरातीतल्या मॉडेल्सना मी ठरवू देत नाही कारण एकदा ठरवू दिलं की मी कायम त्याला बळी पडत राहणार आणि एक एक करत आपली धार्मिक चिन्हे 'टाकत' जाणार. पण मी तसं करणार नाही.

हे मी माझ्यापुरतं तरी ठरवलं आहे. 

© मंदार दिलीप जोशी
अश्विन कॄ ६, शके १९४३

Wednesday, October 13, 2021

माझिया रक्‍तात थोडा ईश्वराचा अंश आहे

सृष्टीचा कुणीतरी एक निर्माता असला पाहीजे हा तर्क अनेकांना भावतो. याच्या समर्थनार्थ मुलांचा तोंडावळा आईबाबांसारखा कसा, किंवा राईहूनही  लहान असलेली एखादी बी पेरली तर त्याचा विशाल वटवृक्ष कसा होतो असे तर्क दिले जातात.  सर्वसाधारणपणे सरासरी आणि त्याहून कमी बुद्धीमत्ता असलेल्या लोकांना ते तत्काळ पटतातही कारण त्यांच्या मते कुणीतरी एक सर्वशक्तिमान जगड्व्याळ  विचारसरणी असलेला असेल तरच हे सगळं (सृष्टीची रचना) शक्य आहे. याचं एक कारण हे आहे की सर्वसामान्यपणे मनुष्याला अनेक प्रश्नांची उतरे हवी असतात पण त्याची उत्तरे शोधण्याचे कष्ट तो घेऊ इच्छित नाही. बहुतेक वेळा माणूस न्यूनगंडापायी हा विचार करतो की त्याची स्वतःची असा शोध घेण्याची किंवा विचार करण्याची क्षमता नाही.  अर्थात, काही प्रश्नांची उत्तरे शोधायला आयुष्यही कमी पडतं म्हणा अनेकदा. पण तो भाग वेगळा.

सर्व प्राणीमात्रांना जीव प्रिय असतोच, पण माणसाला त्याच्याही पुढे जाऊन मृत्यूपश्चात आपलं काय होईल हे जाणून घेण्याची ओढ नेहमीच अस्वस्थ करते आणि त्याला असहाय्य वाटू लागतं. याच असहाय्यतेची परिणिती उत्तराची आवश्यकता निर्माण होण्यात होते. 

जिथे मागणी आहे ती प्रत्येक जागा एक प्रकारे बाजारच असते आणि जिथे बाजार आहे तिथे व्यापारीही आलेच. मात्र, बाजारात उतरणारी प्रत्येक व्यक्ती प्रामाणिकच असेल असं नाही. जिथे हे प्रश्न आहेत तिथे तर उत्तरांचा व्यापार करणारेही असतातच आणि अनेकदा ते विधीनिषेधशून्य,  अर्थात ज्याला इंग्रजीत unscrupulous charlatan म्हणतात तसे असतात. असे लोक लोकांच्या असहाय्य मानसिक स्थितीचा फायदा घेऊन वाट्टेल त्या थापा उत्तर म्हणून फेकतात आणि स्वतःचा फायदा करुन घेतात. आध्यात्मिक क्षेत्रात असे अनेक गुरू आणि कॉर्पोरेट क्षेत्रात मार्केटिंग गुरू म्हणून असे लोक प्रसिद्धी पावतात. कधी कधी मात्र दोघांत फरक उरत नाही. कसा ते पुढे पाहूच.

सृष्टीचा एक निर्माता असणं हे साधारण बुद्धीमत्तेच्या मानवांसाठी एक epistemological मर्यादा आहे, कारण सरासरी किंवा त्यापेक्षा कमी बुद्धीमत्तेच्या मानवांच्या विचारांची झेप त्यापलीकडे जाऊ शकत नाही. पण सर्वसाधारण समाजाच्या नैतिकतेची परिमाणे ठरवण्यासाठी हा विचार, किंवा आपण ही  म्हणूया, खूप उपयुक्त ठरते.  

पण जेव्हा एखादा दुष्ट आणि धूर्त माणूस स्वतःला त्या सर्वशक्तीमान सृष्टीनिर्मात्याचा एकमेव आणि स्वयंघोषित अधिकृत एजंट म्हणून यात शिरतो आणि त्या जोरावर त्या निर्मात्याच्या नावावार पैसे उकळायला सुरवात करतो, आपल्या अनुयायांना त्या निर्मात्याला किंवा स्वतः त्या स्वयंघोषित एजंटला न मानणार्‍या लोकांच्या स्थावर जंगम मालमत्तेची,  त्यांच्या महिलांच्या अब्रूची लूट करायची संपूर्ण मोकळीक देतो, आणि यावर कडी म्हणजे या सर्व अनैतिक कृत्यांना त्या सर्वशक्तिमान निर्मात्याचंच नाव वापरून पापमुक्ती देतो, किंबहुना अशा कृत्यांना पुण्यकर्मांचेच लेबल लावतो तेव्हा मात्र मात्र या व्यवस्थेला आणि संपूर्ण जगालाच भयानक स्वरूपाच्या विकृतीची लागण होते. 

सत्याच्या शोधात मार्गाक्रमणा करत असताना घोळ झाला तो "कसं" (how) चं रुपांतर "कोण" (who) करण्यात आलं तेव्हा.  ज्ञान जिज्ञासा how विचारत विचारत पुढे घेऊन जाते, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेलच असं नसतं. पण या प्रकारे शोध घेताना कमीतकमी याची शाश्वती असते की उत्तराच्या नावाखाली धादांत असत्य तरी आपल्या गळ्यात मारलं जाणार नाही. पण मनुष्यस्वभाव असा असतो की काहीही करुन त्याला उत्तर हवंच असतं. प्रवासाचा आनंद न घेता काही लोकांना लवकरात लवकर गंतव्यस्थानाकडे पोहोचण्याची घाई असते त्याप्रमाणेच माणूस उत्तरांचा शोध घेता घेता मिळणारे ज्ञानकण वेचण्याऐवजी तत्काळ उत्तरं हवी म्हणून घायकुतीला येतो. अनेकदा स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्याच्या प्रयत्नात अशा स्वयंघोषित दलालांच्या नादी लागून त्यांच्या खोट्या उत्तरांवरही विश्वास ठेवतो.  

या अशा खोटारड्या दलालांकडे एक क्लुप्ती अशी असते की ते तुम्हाला विचारतात की तुमच्याकडे अमुक अमुक याचं उत्तर आहे का? तुमच्याकडे ते नसतं, म्हणून तुम्ही प्रामाणिकपणे म्हणता की बाबा नाहीये आमच्याकडे उत्तर. यावर त्यांच्याकडे उत्तर असल्याचं ते ठणकावून देतात. हाच तो क्षण असतो जिथे intelligent creationism नावाचा महाघोटाळा जन्म घेतो. याचा आधार म्हणजे एक निराधार प्रश्न असतो - हे सगळं कुणी निर्माण केलं? Who created all this? खरं तर प्रश्न असा हवा, "हे सगळं कसं निर्माण झालं?" प्रश्न चुक(व)ल्याने how ऐवजी whoच्या घोटाळ्याचा खेळ इथेच सुरु होतो. 

वर उल्लेख केल्याप्रमाणे ज्या लोकांना आपल्या अस्तित्वाच्या बाबतीत जाणून घ्यायची जी ओढ असते त्या भावनेला साद घातली जाते आणि त्यांना भीती घातली जाते की तुम्ही अमुक केलं नाहीत आणि तमुक असे वागला नाहीत तर तुमच्या मृत्यूनंतर तुमचे भयानक हाल होतील. आता काय हाल होतील त्याच्या थापा त्या स्वयंघोषित दलालाच्या मर्जीनुसार ठरतात.

सुरवातीला म्हटल्याप्रमाणे समाजाचा गाडा योग्य पद्धतीने सुरु रहावा म्हणून काही एक प्रमाणात श्रद्धेची आवश्यकता असते कारण मनुष्यप्राणी हा स्वभावतःच नैतिक वृत्तीचा नसतो. कुठल्याही श्रद्धेविना, आधिभौतिक शक्तीच्या भीती विना नैतिक आचरण असणारी व्यक्ती विरळाच असते. म्हणून श्रद्धा आवश्यक आहे आणि प्रत्येक धर्म/रिलिजन वगैरेंत मृत्यूनंतर मिळणार्‍या 'गती' विषयी भीती घातलेली आपल्याला दिसेल. याचं कारण म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला आपला एक ना एक दिवस मृत्यू होणार हे पक्कं ठाऊक असतं, म्हणूनच प्रत्यक्ष मृत्यूचं भय तितकं वाटत नसलं तरी मृत्यूनंतर आपलं काय होईल याची त्याला जास्त चिंता असते कारण त्याला किमान एवढी खात्री असते की मेल्यावर आपण अगदीच असहाय्य असणार आहोत. आणि याच भीतीला तो आपल्या वर्तमान अस्तित्वाशीच जोडतो. 

विचार करुन बघा, इनकम टॅक्समध्ये सवलत मिळेल म्हणून कुणी दान-पुण्य करत नाही. हा माणसाच्या मृत्यूपश्चात अस्तित्वासाठी काढलेला विमा असतो;[रत इंग्रजीत सांगायचं तर After Life Insurance असतो.

प्रत्येक रिलिजनची 'शिकवण'/तत्त्वप्रणाली बनल्याला आता काही हजार वर्ष उलटून गेलेली आहेत. तेव्हाचं विज्ञान आणि आज त्याच स्वरुपात नाही. भारताची परिस्थिती थोडी वेगळी आहे – आजचं विज्ञान हे तेव्हाच्या विज्ञानासारखं उरलेलं नाही – आणि खिलजी सारख्या क्रूर अडाण्यांमुळे प्राचीन काळी काही गोष्टी कशा बनल्या याचं ज्ञान त्या जळून खाक झालेल्या नालंदा विद्यापीठाबरोबरच काळाच्या उदरात अदृश्य झालं. म्हणूनच त्या गोष्टींच्या बाबत आज अनेक अविश्वसनीय गोष्टी पसर(व)ल्या गेल्या आहेत आणि त्यावरुन आज चेष्टा केली जाते. 

रिलिजन्सची चर्चा करताना एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की सगळ्याच धर्मात/रिलीजनमध्ये काही ना काही तर्काच्या आणि वैज्ञानिकतेच्या कसोटीवर अजिबात न पटणाऱ्या बाबी आढळून येतील.  म्हणूनच रिलीजनना वैज्ञानिकतेच्या कसोटीवर तपासून बघण्याऐवजी मानवतेच्या कसोटीवर तपासले पाहिजे की ते त्या त्या रिलीजनच्या अनुयायांना किती प्रमाणात विचारस्वातंत्र्य देतात, काळानुसार परिवर्तन होण्यास काही वाव आहे की नाही, आणि इतर समाजांशी कसा व्यवहार करावा याबाबत काय मार्गदर्शन केले आहे. 

या सगळ्यां धर्ममतांत सनातन धर्म सगळ्यांत कल्याणकारी  (benign) आहे कारण इतर सगळ्या बाबी बाजूला ठेवल्या तर धर्माची दहा लक्षणेदेखील कुणाही मनुष्याला योग्य मार्ग अनुसरण्यास प्रवृत्त करायला पुरेशी आहेत. त्यात इश्वराची कल्पना असली तरी ती अत्यावश्यक नाही आणि धर्मात गुरु करण्याची परंपरा असली तरी कुठलाही गुरू स्वतःला इश्वराचा एकमेव एजंट म्हणवून घेत नाही. आस्तिकता आणि इश्वरावर श्रद्धा असणे श्रेयस्कर असल्या तरी 'मी नास्तिक आहे' हे एखादा मनुष्य फक्त हिंदू धर्मातच निर्भयपणे म्हणू शकतो. प्रत्येक धर्माचे दोन भाग असतात. एक कर्मकांड आणि सामाजिक भाग (इतर धर्मीयांशी कशी वर्तणूक ठेवावी याची शिकवण). आणि हाच सामाजिक भाग प्रत्येक रिलिजनला स्वतंत्र अस्तित्व बहाल करतो. दुसरा महत्त्वाचा भाग हा की कर्मकांड ही सामाजिक भाग कसा असावा यासाठी मार्गदर्शक ठरतात आणि यातही हिंदू धर्मातली मार्गदर्शक तत्त्वे त्याला श्रेष्ठ ठरवतात.

आणि सगळ्यांत घातक (malignant) रिलिजन ते आहेत जे 'खतरे में' है ची घोषणा करत सतत घाबरवत ठेवण्याची आणि ऐकलं नाही तर हिंसा करण्याची शिकवण आणि वृत्ती राखून असतात, आणि दुराचारालाही इश्वराची आज्ञा म्हणतात - बाकी सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.


© मंदार दिलीप जोशी (मराठी संस्करण)
मूळ हिंदी लेख इथे असेपर्यंत वाचता येईल.

अश्विन शु. ८, दुर्गाष्टमी

Tuesday, September 7, 2021

Nokku Kooli (टक लावून बघण्याची मजुरी)

केरळात तुम्हाला तुमच्या घरातलं सामानही युनियन मार्फतच उतरवून घ्यावं लागतं. मोडतोड व्हायच्या किंवा अव्वाच्या सव्वा मजूरी मागितली जाण्याच्या भीतीने तुम्हाला तसं करायचं नाहीये? हरकत नाही, युनियनवाले लांबूनच तुम्हाला सामान उतरवून घेताना बघत बसतील.

Nokku kooli

तुम्ही पूर्ण सामान उतरवून घेतलंत की युनियनवाले येतील आणि मजुरी मागतील. काम नाही केलं म्हणून काय झालं, तुम्हाला सामान उतरवून घेऊ दिलं ना. दुरून बघितलं, मोडतोड केली नाही...सामान असो की तुमचं डोकं, उपकारच नव्हेत का ते? त्याचीच तर मजुरी मागत आहेत ते! त्यालाच मल्याळममध्ये nokku kooli म्हणतात. बंगालमधेही हेच व्हायचं

म्हणूनच केरळात फारसे उद्योग नाहीत, म्हणूनच केरळचं GST कलेक्शन हरियाणाच्या एक तृतीयांश आहे, म्हणूनच तिकडच्या मुली आयसिसमध्ये आनंदाने सामील व्हायला जात असतात.

कम्युनिझम/समाजवाद ही राजकीय/आर्थिक विचारधारा नाही, फक्त आणि फक्त गुंडगिरी आहे, म्हणूनच जे राज्य किंवा प्रदेश यांच्या नियंत्रणात येते त्याचा संपूर्ण सत्यानाश होतो. याचं कारण कुठल्याही गुन्हेगारी समाजाचा विनाशच होतो मग ते आपल्या विचारधारेला राजकीय म्हणोत की मजहबी.

विकली गेलेली माध्यमे आणि विचारजंत यांच्याकडून केरळमधली ही लाल गुंडगिरी उघड होण्याची अपेक्षा नाहीच, पण अशा गोष्टींची माहिती घेऊन हे आपल्या दारापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. 

आणि हो, केरळमध्ये मल्याळममध्ये ज्याला nokku kooli म्हणतात, त्याला महाराष्ट्रात 'खंडणी' म्हणतात, बरोबर ना?

🖋️ मंदार दिलीप जोशी



Friday, July 16, 2021

असंभव को संभव करेंगे स्वामी, बिगडने नहीं दिया यह वामी!

कॉम्रेड प्रकाश रेड्डी ने कुछ समय पहले पोस्ट किया है कि कॉम्रेड बाबूराव शेलार का नाम वो जिस चाल में रहते हैं वहीं पास के किसी रास्ते को दिया गया है । उस समय उनके घर पर एक छोटा सा रिसेप्शन रहा होगा यह फोटो तब कें हैं।

 

अब सोशल डिस्टेंसिंग, कई लोगों के चेहरे पर मास्क न होना आदि छोटी-छोटी बातों को छोडिये। मजेदार बात अलग है। 

प्रतिमा और पूजा रॉय इन दो बहनों को नासा में इंटर्नशिप के लिए चुना गया था। नासा ने उनकी फोटो सांझा करने की देर थी कि लड़कियां इतनी पढ़ी-लिखी होने के बाद भी अपने माथे पर क्या टिकी लगाती हैं और देवीदेवताओ की मूर्तियाँ या चित्र क्यूं रखती हैं आदि लिखकर उन्हें भारी मात्रा में ट्रोल किया गया।


परंतु वो भगवान पर विश्वास करती हैं तो ऐसा करना स्वाभाविक है। परंतु आदीवामपंथी मार्क्सबाबा कहकर गये हैं कि Religion is the opium of the masses (रिलिजियन अफीम की गोली है), तो आपके दो कॉम्रेडों में से एक के माथे पर तिलक एवं दूसरे के घर में देवी-देवताओं के चित्र कैसे दिखाई देते है? ये तो कुछ भी नहीं! महाराष्ट्र में एक स्वामीजी थे स्वामी समर्थ; तो जिस लकडी के फलक  पर देवीदेवताओं के चित्र रखे हैं उसके बायीं ओर "असंभव को संभव करेंगे स्वामी" एवं नीचे "डरो मत, हम तुम्हारे साथ है" ये उनके भक्तीपर वचन लिखे गये हैं!! अपने मूल भूलना सहज नहीं होता।   इसे निधर्मी वामपंथ की हार एवं आस्तिकता का विजय ही मानना पडेगा। 

तो लिब्रंडूओं और वामीयों, आप उन्हें विचारधारा के प्रति निष्ठावान न होने के कारण कुछ सीख नहीं देंगे? क्या आप उन्हें कुछ नहीं कहेंगे? देखिए, नीचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी के पोस्ट की लिंक है। खुला प्रस्ताव, आप को कॉम्रेड को सुधारना ही होगा! कॉम्रेड प्रकाश रेड्डी के पोस्ट की लिंक यह रही — https://www.facebook.com/prakash.reddy/posts/10225535914535407 

जाते जाते: कल एक फोटो देखी थी जिसमें साम्यवादी व्यवसायिक क्रांतीकारक चे ग्वेरा की एक बड़ी तस्वीर कूड़ेदान में फेंकी दिखाई देती है, वैसे ही बाबूराव के परिवारने जिस प्रकार घर में पूजापाठ कर के उनकी विचारधारा का कचरा कर दिया है उसी प्रकार उनके घर का कूड़ेदान यदि दिखाई दिया तो उसमें किस किस के फोटो मिलने की संभावना है ये सोचकर और हसीं आ रही है।

© मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. ७, विवस्वत सप्तमी


अशक्य ते शक्य करतील स्वामी, बिघडू न शकला हा वामी !

ही पोस्ट पाहून स्वामी भक्तांची स्वामी समर्थांवरील भक्ती आणखी दृढ होईल आणि तुम्ही त्या पंथातले नसाल तर नक्की स्वामी समर्थांवर विश्वास बसेल!

कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी काही वेळापूर्वी पोस्ट टाकली आहे. कॉ. बाबुराव शेलार यांचे नाव ते राहत असलेल्या भिकुमाळी चाळीतील नजिकच्या रस्त्याला देण्यात आले. त्यावेळी त्यांच्या घरी छोटेखानी सत्कार समारंभ वगैरे झाला असावा. आता सोशल डिस्टन्सिंग, अनेकांच्या तोंडावर मास्क नसणे, वगैरे क्षुल्लक गोष्टी सोडून द्या. खरी गंमत वेगळीच आहे.

प्रतिमा आणि पूजा रॉय या नासातील इंटर्नशिपसाठी निवड झाल्यावर नासाने त्यांचे फोटो शेअर करताच आपल्याकडील हुश्शार विज्ञानवाद्यांना आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांना फार्फार वाईट वाटले. मुली एवढ्या शिकलेल्या असून कपाळावर टिकली काय लावतात आणि देवादिकांच्या मूर्ती वा तसबिरी काय ठेवतात?! वगैरे वगैरे वगैरे लिहून त्यांना बरेच ट्रोल करण्यात आलं.     

रॉय भगिनींचा उल्लेख असलेली नासाची पोस्ट

पण त्या निदान देव मानतात तरी, त्यामुळे त्यांच्याकडे तसबीरी मूर्ती असणं अगदी स्वाभाविक आहे. पण मार्क्सबाबा सांगून गेलेत ना, Religion is the opium of the masses (रिलिजियन ही अफूची गोळी आहे), मग तसं असून तुमचे दोन कॉम्रॅडांपैकी एकाच्या कपाळावर लक्षात येईल असा टिळा आणि दुसर्‍याच्या घरी देवीदेवतांच्या तसबीरी कशा?  हे तर काहीच नाही, फळीवर देव ठेवले आहेत तिथे डावीकडे नीट बघा, चक्क स्वामी समर्थांची भक्ती करताना लिहीलं बोललं जाणारं वाक्य "अशक्य ते शक्य करतील स्वामी" असं लिहीलेलं दिसेल! आता फळीच्या खाली बघा, "भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे" असं लिहीलेलं दिसेल. शेवटी आपल्या मुळांना नाकारता येत नाही हेच खरं. आयुष्यभर कम्युनिस्ट पक्षाचे काम करुनही घरात देवपूजा होते आणि स्वामींवर श्रद्धा असते याला निधर्मी साम्यवादाची शोकांतिका आणि आस्तिकतेचा विजयच म्हणावा लागेल.

तर, लिबरंडू आणि लाल माकडांनो, अशा वामपंथभ्रष्ट कॉम्रेडांना त्यांना तुम्ही विचारधारेशी एकनिष्ठ न राहिल्याबद्दल काहीच बोलणार नाही? काहीच बोलणार नाही का तुम्ही त्यांना? बघा हं, खाली पोस्टची लिंक देतोय. खुल्ला ऑफर — https://www.facebook.com/prakash.reddy/posts/10225535914535407 

ता.क. परवा तो साम्यवादी व्यवसायिक क्रांतीकारक चे ग्वेव्हेराचा मोठ्ठा फोटो कचराकुंडीत फेकलेला दिसला तसं घरी देवपूजा वगैरे करुन यांच्या विचारधारेला बाबुरावांच्या कुटुंबियांनी जसं फाट्यावर मारलं तसं त्यांच्या घरातल्या कचराकुंडीत कुणाकुणाचे फोटो सापडतील असा विचार करुन आणखी हसू आलं. 

© मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. ७, विवस्वत सप्तमी