Tuesday, April 7, 2020

कलियुगातली भरत "भेट"

सद्ध्या रामायण मालिका सुरू आहे.

महाराज दशरथांनी माता कैयेयीला दिलेल्या दोन वरांची पूर्तता करायला राम अगदी सहज वनवास मान्य करुन अयोध्येतून निघून जातो. त्याच्यासोबत पत्नी सीता आणि धाकटा भाऊ लक्ष्मणही. आजोळी गेलेल्या भरताला हे कळल्यावर तो आईची कठोर शब्दांत निर्भत्सना करतो आणि रामाला आणायला सगळ्यांसोबत वनात जातो. रामाने नकार दिल्यावर तो त्याच्या पादुका अयोध्येत सिंहासनावर ठेवतो आणि रामाच्या वतीने राज्य करतो. धर्मपालन करण्याकरता, दिलेला शब्द पाळण्याची आपल्या कुळाची परंपरा आहे तिची प्र्तिष्ठा राखायला आपल्या हक्काचं असलेलं राज्य सहज दुसर्‍याला देऊन टाकणारा राम आणि आपल्या हक्काचं नसलेलं पण आयतं मिळालेल्या राज्याचा राजा म्हणून उपभोग घ्यायचं नाकारून ते रामाला परत द्यायला निघालेला आणि रामाच्याच पादुका सिंहासनावर ठेऊन त्याच्या वतीने राज्य करणारा भरत अशी देवमाणसे होती म्हणून आपलं राष्ट्र मोठं झालं.

भरत मिलाप आज: श्रीराम और भरत का हुआ ...

असं आजच्या काळात घडू शकेल का? असं आज कोण करेल? दोन घराच्या मधलं कुंपण एक इंच इकडे की तिकडे यावरुन पिढ्यानपिढ्या कोर्ट्कज्जे करणार्‍याया लोकांच्या काळात भरतासारखी वृत्ती कुणाची असेल? असा विचार मनात आला आणि लगोलग एका मित्राने सांगितलेला किस्सा आठवला. तो सांगतो आहे अशा पद्धतीने हा किस्सा तुमच्या समोर मांडतो आहे:

"मी आमच्या गावी हल्ली सहा सात वर्षांपासून नियमित जाऊ लागलोय. माझ्या जन्माच्या फार आधीपासून, म्हणजे साधारण २०-२५ वर्ष आधीपासूनच, आजीने घरचे संबंध तोडले होते किंबहुना तिला तोडायला लावले गेले असं म्हणणं संयुक्तिक ठरेल. साधारण १९६५ च्या दरम्यान घडलेली ही गोष्ट आहे. आजीचे आणि इतर घरच्यांचे काही गंभीर स्वरूपाचे वैयक्तिक वाद झाले आजीला बाबांच्या चुलत्यांनी घराबाहेर काढलं. आजीने फक्त जुजबी कपडे आणि तेव्हा दहा वर्षाच्या माझ्या बाबांना कडेवर घेऊन घर सोडलं आणि बदलापूरात निघून आली.

वडिलांचा मामा इकडे राहत असे, त्याने एक घर पाहून दिले, आजीला नोकरी लावून दिली. मग आजीने २०-२५ वर्ष नोकरी करुन बाबांना मोठं केलं. लग्न लावून दिलं. आजोबा तिकडेच राहायचे, आणि वर्षातून एकदा दोनदा इकडे त्यांना न सांगता इकडे आजीला आणि बाबांना भेटायला याय. त्यांनी घरच्यांना विरोध केला नाही म्हणून आजीचा त्यांच्यावरचा राग कधीच गेला नाही. 

ती चुलत्यांची पिढी नंतर कालौघात संपली आणि जवळजवळ पन्नास वर्षांनि आता माझे जे चुलत चुलते आहेत, त्यांच्यापैकी दोन नंबरचे काकाआजोबा आहेत त्यांचा मुलगा सहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ मध्ये आजीला शोधत इकडे आले. मला गावी घेऊन गेले आणि सगळी कायदेशीर कारवाई करून सगळीकडे सातबाऱ्यावर, घरावर आमची आजीची, आईची, आणि माझी नावे लावून घेतली (माझे बाबा हयात नाहीत). हे माझे चुलत चुलते सांगतात, ती लोक सगळी नालायक होती आमच्या काकूशी अशी वागली. आम्ही लहान होतो तेव्हा. जे झालं ते झालं, पण आता ज्यांच्या हक्काचं जे आहे ते त्यांना मिळायला हवंच. 

हे एवढावरच थांबलं नाही. त्यांनी मध्यंतरी जमिनीचे व्यवहार करायचे होते तेव्हा मला बोलवून  घेतले आणि माझा त्यात हिस्सा आहे म्हणून माझ्या परवानगीने सगळे सोपस्कार पार पाडले. त्या व्यवहारात जे पैसे मिळाले त्याचा हिशोब मला देऊन ते पैसे माझ्या खात्यातही भरले. त्यांंचं म्हणणं असं की आम्हाला आमचं आहे अजून काय करायचं आहे अधिक हाव ठेवून?! त्या काकाने असं करायचं कारण म्हणजे त्याची आई.. जी आमची दोन नंबरची काकूआजी.. तिने हे सगळं ठरवून मोठ्या मनाने केलं.. आता ते घर आणि तिथलं सगळं ही काकूआजी पाहते. ती एकदम देव माणूस आहे. 

गावचं घर पाहणारे आमचे चुलत काका भजनीबुवा आहेत. टिळा लावून पांढरा झब्बा लेंगा घालून फिरणारे. गुरुवारी तिथल्या दत्ताच्या देवळात, शनिवारी मारुती मंदिरात भजनाला टाळ घेऊन असतात. कधीही घरी गेलो की सकाळी वाडीतल्या बागेत धोतर नेसून परडीत फुलं काढताना, नाहीतर दुपारी वाडीत वालीच्या खोप्यात बंदूक घेऊन माकडांना हुसकवताना दिसतात. नाहीतर चुलीसाठी लाकडं आणताना दिसतात. काकू परसदारी हौदात कपडे धुताना नाहीतर भांडी घासताना दिसते. काकूआजी पडवीतल्या झोपाळ्यावर बसून सुपारी कातरताना दिसते. खळ्यात काजू नाहीतर कोकम वाळत घातलेली दिसतात. टिपिकल कोकणातल्या घरातलं दृश्य.

मग मी आता चार सहा महिन्यांनी पडीक असतो तिकडे. येताना मला घरची कोकमं, मोहरी, वाली, मिऱ्या, काजू, गरे बांधून दिले जातात. 

जाताना हलका जाणारा मी येताना आनंदाचं ओझं घेऊन घरी येतो.

आजकालच्या काळात असा विचार मनात येणं हीच मोठी गोष्ट. बरं आला जरी, तरी इतक्या वर्षांपूर्वी दुरावलेल्या नातेवाईकांना चिकाटीने शोधून काढणं ही त्याहून मोठी गोष्ट. आणि वर तरुण वारसाला सोबत घेऊन सगळीकडे कागदोपत्री नावे लावणे म्हणजे कहर आहे. धन्य ती मित्राची काकू आजी आणि धन्य ते चुलते ज्यांनी हे सगळं घडवून आणलं. 

भारतातल्या एकूण हिंदू लोकसंख्येपैकी १% लोक जरी असं वागायला लागले, तर रामराज्य नाही तरी त्याचे वारे नक्की वाहू लागतील हे नक्की.

शुभ रात्री मित्रांनो. जय श्रीराम |

© मंदार दिलीप जोशी
चैत्र चतुर्दशी, हनुमान जयंतीचा उपवास, शालीवाहन शके १९४२

Tuesday, February 25, 2020

त्यांना घरं का मिळत नाहीत - उपकथानक

काही दिवसांपूर्वी मित्र ब्रिजेश मानव राणा यांना आलेल्या एका भूत बंगल्याबद्दलचा अनुभव मांडला होता. सुरवात करण्यापूर्वी सांगतो की मागील लेख वाचून मला अनेकांनी फोन, व्हॉट्सएप, व फेसबुकवर आपापले अनुभव सांगितले. ते पाहून मनातली उरलीसुरली शंकाही संपली.

तुम्हाला आठवत असेल तर मागील लेखात ब्रिजेशही म्हणाले होते की त्या घरातल्या मुलांशी मैत्री झाल्यावरही त्यांच्या मित्रमंडळींपैकी कुणीच तिथे पाणी सुद्धा पीत नसे, पण ते मात्र तिथे पाणी पीत व त्याचे त्यांना परिणामही भोगायला लागले. त्या लेखाचा विषय वेगळा असल्याने त्यांनी तो पुन्हा केव्हातरी त्याबद्दल सांगू असं सांगितलं होतं, तो ही अनुभव आज तुमच्यापुढे मांडत आहे.

माझ्या शेजार्‍याच्या बंगल्यातून 'भूत' गेलं होतं आणि त्य घरातल्यांना येणारे भलतेसलते अनुभव येणं सुद्धा थांबलं होतं. पण फक्त मी त्यांच्या घरचं पाणी पीत असे म्हणून...

रात्री मी गाढ झोपेत असताना मधेच आपण एखाद्या काळोख्या खोल विहीरीत पडत आहोत असा मला भास होत असे. माझा मेंदू मला सांगायचा की अरे तू घरी बिछान्यावर झोपलेला आहेस, पण पडत असताना खाली गार गार वारा लागतो आहे असं स्पष्टपणे जाणवत असे. कितीही प्रयत्न केले तरी उठता येत नसे. असा काही वेळ गेल्यावर कधीतरी वाटत असे की आता तळ आलाय आणि आपण जोरदार आपटणार, तेवढ्यात खडबडून जाग यायची आणि उठल्यावर सर्वांगाला दरदरून घाम फुटलेला असायचा. हे पहाटे साधारण १ ते २ च्या मधे होत असे. हे प्रकार दर दोन ते चार महिन्यांनी व्हायचे पण हळूहळू असे अनुभव आलेल्या दोन रात्रींमधला काळ कमी होऊ लागला.

आता हा प्रकार दर ४-५ दिवसांनी होऊ लागला. आईने कुठलाही उपचार करायचं शिल्लक ठेवलं नव्हतं. भारताच्या उत्तर भागातला एकही वैद्य तिने शिल्ल्क ठेवला नसेल. भयंकर कडू औषधे आणि काढे घेऊन झाले, पण काहीही परिणाम झाला नाही. या प्रकारांना घाबरून मी रात्री झोपायलाच घाबरत असे. डोळे लाल दिसायचे पण शरीराला थकवा जाणवत नसे.

त्या वर्षी मी झज्जर पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला आणि तिथल्या हॉस्टेलवर राहू लागलो. पण तिथेही तोच प्रकार. सलग पाच-सहा दिवस झोपेची बोंब. रात्र रात्र मी बाहेर भटकत असे, पण जागेपणी काहीच त्रास झाला नाही.

झज्जरहून घरी येण्याचे दोन मार्ग होते, एक म्हणजे झज्जर ते सोनीपत थेट बसने आणि दुसरा म्हणजे झज्जर ते बहादुरगड, बहादुरगड ते नरेला, आणि नरेला ते सोनीपत ट्रेनने. दुसरा मार्ग लांबचा असला तरी मधे आराम करायला वेळ मिळायचा म्हणून मी याच मार्गाने यायचो.

एक दिवस असाच परतत असताना नरेला स्टेशनवर ट्रेन सुटायला खूप उशीर झाला. नरेला फक्त दोन प्लॅटफॉर्म असणारं एक लहानसं स्टेशन आहे. दुपारची वेळ होती, स्टेशनवर शुकशुकाट दिसला म्हणून इकडेतिकडे पाहिलं तर लांब एका झाडाखाली बरेच लोक जमलेले दिसले. मी तिथे पोहोचेपर्यंत ह्या गर्दीचा केंद्रबिंदू असलेल्या एका माणसाने आपलं चंबुगबाळं आवरायला सुरवात केली होती. फिरते वैदू असतात तसा तो इसम दिसत होता. इतके उपाय करुन झालेत तर यालाही सांगू म्हणून मी मला होत असलेला त्रास त्याला  सांगितला. आजूबाजूला पाहून तो किंचित हसला. मी तिथे पोहोचल्यापासून सुरु झालेलं आजूबाजूच्या कुत्र्यांचं भुंकणं माझ्या लक्षात नव्हतं आलं, पण त्याने ते अचूक हेरल्याचं त्याच्या नजरेत दिसलं.

"येत्या गुरूवारी माझ्याकडे ये", तो म्हणाला.

"पण तुमचा पत्ता..."

"धान्य बाजारात विचार, छोटे पंडितजी कुठे राहतात, कुणीही सांगेल." तो उत्तरला.

नरेला स्टेशन लहान असलं तरी तिथला धान्य बाजार त्या काळी आशिया खंडातला सगळ्यात मोठा धान्य बाजार होता, आताचं ठाऊक नाही, कदाचित अजूनही तो आपला रुबाब टिकवून असेल.

घरी येऊन आईला विचारलं तर ती म्हणाली ये जाऊन.

छोटे पंडितजींचं ठिकाण नरेला धान्य बाजारापासून अर्धा किलोमिटरवर होतं. तिथे पोहोचल्यावर एका घरी एका शेठजींना विचारल्यावर ते म्हणाले की पंडितजी इथेच पुढच्या खोलीत राहतात. त्यांचे आभार मानून मी त्या खोलीत शिरलो. ती खोली म्हणजेधान्याच्या एका मोठ्या कोठारासारखी होती, आणि छोटे पंडितजी एका कोपर्‍यात निरंजन लावून बसलेले होते. मी त्यांना नमस्कार केला, तसं मला त्यांनी खुणेनेच बसायला सांगितलं. दोन मिनिटांनंतर त्यांनी एका कागदाच्या चिठोर्‍यावर बोटानेच काहीतरी लिहीलं आणि मला तो चिठोरा दिला. झोपताना उशाखाली ठेव असं बजावून पुढच्या शनिवारी यायला सांगितलं आणि मला निरोप दिला.

त्यांनी सांगितल्यासारखं मी केलं, आणि पुढचा पूर्ण आठवडा शांत झोप लागली. किंबहुना इतकी शांत झोप मला कधी लागल्याचं आठवत देखील नाही. ठरल्याप्रमाणे पुढच्या शनिवारी मी परत त्याच घरी, त्याच खोलीत पोहोचलो. छोटे पंडितजी तिथेच कोपर्‍यात निरंजन लावून बसले होते. त्यांनी माझ्याकडून कागद घेऊन तो निरंजनाच्या ज्योतीवर जाळला. कागदाचा तेवढा कपटा जळायला मिनिटभर सुद्धा लागलं नसतं तिथे तो कागद जवळजवळ २० मिनिटं जळत होता. हे काहीतरी भलतंच होतं.काअ

कागद पुर्ण जळाल्यावर त्यांनी मला निरोप दिला.

घरून निघताना आईने मला त्यांना दक्षिणा म्हणून अर्पण करण्याकरता काही पैसे आणि कापड दिलं होते. ते त्यांना देऊ लागताच त्यांनी घ्यायला साफ नकार दिला आणि सांगितलं या कापडाचं तूच काहीतरी शिवून घाल.

पंडितजींचा आशीर्वाद म्हणून मी त्या कापडाचे कपडे शिवून वापरू लागलो.

त्या आठवड्यात लागलेली शांत झोप तशीच पुढेही लागली. आता मी पूर्ण 'बरा' झालो होतो.

साधारण महिन्याभरानंतर पुन्हा माझ्या गाडीला उशीर झाला, ते ही तब्बल दोन तास. म्हटलं अनायसे वेळ आहे तर छोटे पंडितजींकडे चक्कर टाकून येऊया, त्यांचा आशीर्वादही मिळेल.

त्या घरी पोहोचल्यावर पुढच्या खोलीत बघितलं तर कुणीच नव्हतं. फक्त गव्हाची पोतीच पोती होती तिथे. मी त्या शेटजींना विचारलं की छोटे पंडितजी कुठे गेले? त्यावर मला मिळालेलं उत्तर बुचकळ्यत टाकणारं होतं. शेटजी म्हणाले, "कोण छोटे पंडितजी, इथे कुणी पंडित नाही राहत."

"अहो पण जेमतेम महिन्याभरापूर्वी तुम्हालाच विचारलं होतं आणि तुम्हीच म्हणालात ते तिथे पुढच्या खोलीत राहतात", मी म्हणालो.

"अहो मी तुम्हाला आधी कधीच भेटलो नाही. त्या खोलीचं म्हणाल तर ती खोली फक्त कोठार म्हणून वापरली जाते आणि तिथे कुणी पंडितजी वगैरे राहत नाही आणि आधीही राहत नव्हतं. कदाचित तुम्ही पत्ता चुकला असाल, दुसरीकडे चौकशी करा."

आता मला काही कळायचं बंद झालं होतं. घरी येऊन आईला झालेला प्रकार सांगितला. आई विचारात पडली आणि मग म्हणाली, असेल कुणी पवित्र आत्मा (तिला spirit guide म्हणायचं असावं)तुझ्यासाठी खास आलेला.  मला कळेना, पूर्ण शुद्धीत असताना माझ्या डोळ्यांसमोर सगळं घडलं आणि आता जाऊन बघतो तर काहीच न घडल्यासारखं सगळं दिसत होतं.

तेच घर, तेच शेठजी, तीच ती बाहेरची खोली, पण छोटे पंडितजी गायब आणि असं कुणी अस्तित्वातच नसल्याचा त्या शेठजींचा दावा.अस

असं कसं होईल?

🖋️  मंदार दिलीप जोशी
फाल्गून शु २, शके १९४१

सहाय्य: श्री ब्रिजेश राणा व श्री आनंद राजाध्यक्ष

Monday, February 24, 2020

कबीर कला मंच - शहरी व सशस्त्र नक्षलवाद संबंध

~ हिंदी ~

यह पोस्ट इम्तियाज जलील के बयान पर ध्यान आकर्षित करने के लिए नहीं है। हालांकि इन लोगों से कोई पृथक अपेक्षा नहीं है, अंतिम वाक्य पर ध्यान देना आवश्यक है। किसी को भी पता न चलने दें, बस लोगों को उत्तेजित और परेशान करें।

इस पोस्टका मुख्य विषय लाल कोष्ठकमें रेखांकित किया गया है ही| जो कबीर कला मंच शहरी और सशस्त्र नस्लवाद का सक्रिय समर्थक रहा है, उसके कार्यकर्त्याओं की उपस्थिती सीएए के विरोध में हो रहे शांतीदूतों के कार्यक्रमं में होना आश्चर्यकारक है ही नहीं| यह कहना पर्याप्त है कि मंच के कार्यकर्ता एल्रगार सम्मेलन और कई अन्य ऐसी घटनाओं में सक्रिय रूप से कार्यरत होने के इंटेलिजन्स रिपोर्ट हैं। इस तरह से भारत का हर टुकडे टुकडे गँग एक दूसरे से जुड़ा हुआ है।

कबीर कला मंच के विषय में समय समय पर जानकारी देता रहूंगा, यद्यपि बहुत सारा मटेरिअल मराठी में है.

अपने आसपास ऐसे लोगों पर नजर रखें, हो सके तो फोटो भी निकालें, अपनी सुरक्षा का ध्यान रखकर| आगे जब भी महाराष्ट्र में चुनाव होंगे, तब इस बात का स्मरण रहे इतना पर्याप्त है. महाराष्ट्र में आपके परिजन रहते हैं तो उनको अवश्य ये पोस्ट दिखायें|

यदि हो सके तो अपनी वॉलपर यह पोस्ट कॉपी पेस्ट करें, फोटो के साथ|

~ मराठी ~
इम्तियाज जलीलच्या वक्तव्याकडे लक्ष वेधण्यासाठी ही पोस्ट नाही. या लोकांकडून वेगळी अपेक्षा नाहीच, तरी शेवटच्या वाक्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. कुणाला माहीती देऊ नका, फक्त आंदोलन करायचं आणि लोकांना त्रास द्यायचा.

पोस्टचा मुख्य विषय चित्रात लाल कंसात अधोरेखित केलेलाच आहे. कबीर कला मंच या शहरी व सशस्त्र नक्षलवादाला सक्रीय पाठींबा देणार्‍या तथाकथित संस्कृतिक मंचाच्या कार्यकर्त्यांनी सीएएच्या निमिताने अराजक माजवणार्‍या म्लेंच्छांच्या कार्यक्रमात लावलेली उपस्थिती आश्चर्यकारक अजिबात नाहीच. उलट हे नसते तरच आश्चर्य वाटलं असतं. एल्गार परिषदेत आणि नंतरच्या अनेक गोष्टीत या मंचाच्या कार्यकर्त्यांचा सक्रीय सहभाग असल्याचे गुप्तहेर खात्याचे अहवाल आहेत एवढं सांगितलं तरी पुरेसं असावं. भारत तेरे टुकडे होंगे गँग कशी एकत्र झालेली आहे हेच या निमित्ताने पुन्हा अधोरेखित होतं.

कबीर कला मंचाच्या बाबतीत वेळोवेळी पोस्ट करत राहीनच.

पण पुढे जेव्हा केव्हा महाराष्ट्रात निवडणुका होतील, तेव्हा हे लक्षात ठेवा म्हणजे झालं. जमलं तर अशा लोकांवर लक्ष ठेवा, फोटोही काढा, पण स्वतःची सुरक्षितता ध्यानात ठेवूनच.




इतर काही जुन्या बातम्या:










🖋️ मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु. १, शके १९४१