Sunday, March 20, 2022

काश्मीर फाईल्स ― एक अचर्चित मुद्दा














काश्मीर फाईल्स में सबसे महत्वपूर्ण संवाद क्या है? थोडा स्पेसिफिक पूछता हूं, काश्मीर फाईल्स में प्रोफेसर राधिका मेनन के हिस्से का सबसे महत्वपूर्ण संवाद क्या है?

यदि आप कहेंगे की "सरकार उनकी है पर सिस्टम तो हमारा है!" यह डायलॉग सबसे महत्वपूर्ण है तो आप सत्य से पृथक बात नहीं कर रहे. किंतु मुझे कुछ दूसरी बात इंगित करनी है.

चलीये आप उत्तर दें इससे पहले मैं कुछ कहता हूं. 

हम पाठशाला में हो, महाविद्यालय में हो अथवा किसीं बिझनेस स्कूल में हो, शिक्षकों का स्थान हमारे मातापिता के समकक्ष होता है. हम उन्हे सदैव सर, मॅडम, टीचर, प्रोफेसर कहके पुकारते हैं. 

JNU या कहीं भी, गांव से युवक आते हैं जिन्होने अपने आसपास कभी लडकियो से खुलकर बात नहीं की, कभी मिश्र ग्रूप में सोशलाईझ नहीं किया, उसे एक ४० के आसपास की 'ओल्ड वाईन' कॅटेगरी में आनेवाली, खुले बालवाली, husky आवाजवाली महिला, जो एक कॉलेज में प्रोफेसर है जब उसका स्टुडेंट उसे "प्रोफेसर" कहके संबोधित करता है, तो वो एक विशिष्ट seducing आवाज में कहती है कि, 

"Please, call me Radhika".

अब बताईए, काश्मीर फाईल्स में प्रोफेसर राधिका मेनन के हिस्से का सबसे महत्वपूर्ण संवाद क्या है? जी, "Please, call me Radhika".

लिबरंडू तथा बडी बिंदी गँग का युवकों को अपने चंगुल में फ़ंसाये रखने का एक प्रयोगसिद्ध आयडिया. नजदिकी बढाने का पैतरा.

© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन पौर्णिमा, होळी

Tuesday, March 15, 2022

हम देखेंगे

अनिवार्य है की हम भी देखेंगे

जो ईश्वर वचन देता है
जो वेद पुराणो का रचयिता है

जब अत्याचारों के मेघ
रूई की भांति उड़ जाएँगे
हम भक्तो के पाँव-तले
जब धरती धड़-धड़ धड़केगी
तथा आतंकीयों के शीर्षपर
जब बिजली कड़-कड़ कड़केगी

जब पापीयों के ताबे से
सब मंदिर छुडवाये जाएँगे
सब पवित्रता के शिष्यगण
सिंहासन पे बिठाए जाएँगे 

सब 'ताज' खोले जाएँगे
सब मदमत्त गिराए जाएँगे
बस नाम रहेगा रामलल्ला का
उपस्थित है जो अयोध्या में
जो न्यायी भी है द्रष्टा भी

उठ्ठेगा तत्वमसि का उद्घोष
जो मैं भी हूँ और तुम भी हो
और राज़ करेंगे सनातनी
जो मैं भी हूँ और तुम भी हो

© मंदार दिलीप जोशी
माघ द्वादशी, शके १९४३



Wednesday, February 23, 2022

वाचनप्रेमी तालिबान - लोकशाहीचा मार्ग पुस्तकातून: एक छापण्याआधीच मागे घेतलेला एक लघु अग्रलेख किंवा संपादकांचे मनोगत

तालिबान म्हणजे विद्यार्थी असे आम्ही म्हणालो होतो तेव्हा अमानुष बहुमताने निवडून आलेल्या सद्ध्याच्या राज्यकर्त्यांच्या समस्त पाठीराख्यांनी आमच्यावर जहरी टीका केली होती. पाठीराखे हा शब्द आम्ही विचारपूर्वक वापरला त्यास कारण की भक्त शब्द वापरला तर भलतीच नामुष्की ओढवण्याची भीती. मागे घेतला तरी ते आपल्याला विसरू देत नाहीत. अग्रलेख विसरू देत नाहीत तर एखादा शब्द विसरू देण्याची शक्यता अंमळ धूसरच.

Reader Taliban

तर विषय असा की हातात बंदुका आहेत आणि त्यात हजार लानते पाठविण्यालायक गोळ्याही आहेत, आणि ज्या प्रमाणे नागपूरवरून आदेश येताच शाखांत अंमलबजावणी होते त्याच प्रमाणे वरिष्ठांचे आदेश येताच धार्मिक शिस्तीची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज असलेले हे शस्त्रसज्ज योद्धे कार्यतत्परही आहेत. मात्र, असे असतानाही आपल्या ज्ञानप्राप्तीच्या लालसेचे दमन न करता मिळालेल्या अल्प फावल्या वेळात, म्हणजे शिस्तीची अंमलबजावणी करताना डोकी उडविण्यापासून फुरसत मिळताच, वाचनालयात जाऊन स्वतःचे डोके मात्र पुस्तकात खुपसण्याची संधी सोडत नाहीत. काही खवचट लोक म्हणतीलही की हे फक्त चित्रे बघत आहेत, पण शेवटी भाषा ही चित्रांमधूनच निर्माण होते ना? आपल्या संस्कृतीत मनुष्य नेहमी विद्यार्थी असतो आणि त्याने सतत वाचन, मनन ठरत रहाणे आवश्यक आहे त्याचेच हे दुसरे रूप नव्हे काय? प्रस्तुत छायाचित्रात मागे फिरत असलेला इसम हा अशाच प्रकारे मनन करत असल्याचे आपल्याला दिसते. आपल्याला काय वाचायचे आहे हे सुद्धा विचारपूर्वकच ठरवले पाहिजे ही प्रगल्भ जाणीव त्याचे ठायी आहे हे तो आपल्या या कृतीतूनच दाखवून देत आहे. मग आपण ते आणि आपण असा भेदभाव का करावा?

पण अशा प्रकारे भेदभाव करावा असे प्रोत्साहनच सद्ध्याच्या प्रस्थापित राजवटीकडून मिळालेले दिसते. त्यातूनच मग कुणी काय पेहराव करावा इथपासून कुणी काय बोलावे हे काही मूठभर लोक ठरवू पाहतात. पण मूठभर लोकच शांततेने क्रांतीही घडवू शकतात हीच आशा आपल्याला या छायाचित्रातून दिसते. उद्या, परवा, तेरवा, पुढच्या वर्षी किंवा काही दशकांत या दोन वाचनप्रेमी जिज्ञासू युवकांसारखीच सवय आणखी काही युवकांना लागेल व संपूर्ण तालिबानी राजवट ही याच ज्ञानलालसेने रासवट शिस्तीतून बाहेर येऊन लोकशाहीवादी विचार आपल्या मनात रुजवेल अशी आम्हांस खात्री वाटते.

पुढे आपल्याकडचे मूठभर लोक सत्तेत टिकल्यास सद्ध्याच्या आपल्या प्रस्थापित राजवटीला तालिबानकडूनच अशा अभ्यासू, ज्ञानाधिष्ठित लोकशाहीची शिकवण घेण्याची वेळ आली तर मात्र त्यांच्या पाठीराख्यांच्या समाजमाध्यमांवरच्या कोलांट्याउड्या व डिलीट झालेली विचारमौत्तिके बघण्यास मात्र आपल्यासारख्या लोकशाहीप्रेमी व कन्हैया, मेवानी, व राऊत यांच्या भारतात पुरोगामी लोकांस मौज वाटणार हे निश्चित.

- पिरिष गुबेर
संपादक, ओकसत्ता

© मंदार दिलीप जोशी
माघ कृ. ४, शके १९४३







Monday, February 14, 2022

आधुनिक पंचतंत्रः चार मित्रांची गोष्ट - एक बोध कथा

लहानपणी पंचतंत्र की इसापनीतीत एक गोष्ट वाचली होती. त्या कथेची आजच्या काळासाठी सुसंगत आवृत्ती अशी:

चार पंडित मित्र गुरुंच्या आश्रमातून विद्या संपादन करुन आपल्या घरी परतत असतात. चौदा वर्ष अनेक गूढ विद्या आत्मसात केल्यानं प्रत्येकाला आपल्या ज्ञानाचा अभिमान असतो.

वाटेत एक जंगल लागतं, या जंगलाच्या पलिकडेच त्यांचं गाव असतं.

चालता चालता अचानक एकाला हाडांचा ढीग दिसतो. पहिला म्हणतो, माझ्याकडे असणाऱ्या सिध्दीनं मी ही हाडं जुळवून सापळा तयार करु शकतो, जेणेकरुन हा कोणता प्राणी आहे ते कळेल तरी.

तो मंत्र म्हणतो आणि आश्चर्य! समोर एका प्राण्याचा सापळा तयार होतो.

दुसरा म्हणतो, हे तर काहीच नाही, मी या प्राण्याला मांस आणि त्वचा देऊ शकतो. त्यानं मंत्र म्हणताच समोर साक्षात सिंह तयार होतो.

आता तिसरा म्हणतो, माझ्याकडे तुमच्यापेक्षा महान सिध्दी आहे मी त्याला जिवंत करु शकतो!

हे ऐकताच चौथा मित्र, जो सारासार विचार करत असे व वेळोवेळी योग्य सल्ले देत असे, तो हादरतो आणि त्याला तसे न करण्याबद्दल विनंती करू लागतो. उरलेले तिघे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे घोर पुरस्कर्ते असतात. ते तिसऱ्याने आपल्या प्रगाढ ज्ञानाचा व विद्येचा उपयोग करून सिंहात प्राण फुंकून त्याला जिवंत करावेच या मताचे असतात. चौथा फारच आग्रह करू लागतो तेंव्हा ते त्याला 'टोकाचा विचार करणारा', 'आततायी', 'कट्टर', 'तुझ्या मनात द्वेष आहे,' 'तालीपंडित' अशी दूषणे देतात. शेवटी तो चौथा मित्र म्हणतो, "तुम्हाला सिंहाला जिवंत करायचे तर करा, पण त्या आधी मला थोडा अवधी द्या, मी त्या समोरच्या उंच झाडावर चढून बसतो. मग याला मंत्र म्हणू दे.

पण तिघे ऐकत नाहीत. असं कसं, तुला आवरायला झालेलं आहे. इतका कट्टरपणा चांगला नाही. आम्ही सिंहाला जिवंत करताना त्याने हिंसक होऊ नये अशीही प्रार्थना करणार आहोत. त्यामुळे त्यात सहिष्णुता स्थापन होऊन तो इतर सिंहांनाही सहिष्णू बनवेल. चौथा मित्र म्हणाला, अरे असं काही नसतं, सिंह हा सिंह असतो. त्याची नैसर्गिक वृत्ती तो का सोडेल? मी काही तुम्हाला सिंहाचे तुकडे तुकडे करा असे सांगत नाही, त्याला दगड तलवारी घेऊन हाणा असे सांगत नाही, फक्त त्याला जिवंत करु नका. तरीही त्या तिघांनी त्याचं ऐकलं नाही. त्यांनी त्या चौथ्या मित्राला झाडाला बांधलं आणि म्हणाले, "बघ आमचं पांडित्य, बघ आमची विद्या, बघ आमची सहिष्णूता!"

तिसऱ्या मित्राने मंत्र म्हटला आणि सिंह जिवंत झाला. बराच काळ भुकेलेला असल्याने त्याने पटकन आधी सैरावैरा पळणाऱ्या त्या तिघा मित्रांना पकडून खाल्ले आणि मग शेवटी चौथ्या मित्रालाही गट्टम केलं.

तात्पर्य:
(१) कितीही जीव तुटत असला तरी नको तिथे शहाणपण दाखवू नका आणि मूलभूत समजूतीतच गडबड असेल, थोडक्यात बसिकमधे राडा असेल, तिथे वाद घालू नका.
(२) संधी मिळाली की पळ काढा आणि संकटापासून स्वतःला सुरक्षित ठेवा.

टीप: यात एक पाचवे पात्र पण आहे, जे तिघांतल्या कुणाचाही सारासार विचार जागृत होऊ लागल्यास मैत्री तोडण्याची धमकी देतं. आजच्या भाषेत अनफ्रेंड करेन असं सांगतं. पण त्याबद्दल पुन्हा केव्हातरी. तोवर हा व्हिडिओ बघा. मोठमोठ्या लेखांतून जमणार नाही ते जेमतेम एका मिनिटात समजावलं आहे. 


© मंदार दिलीप जोशी
माघ शुक्ल त्रयोदशी, शके १९४३




खर्रा इतिहास: इष्क-ए-हिंद-ए-दिन अर्थात व्हॅलंटाइन डे

शहेनशहा जलालुद्दीन अकबर यांच्या इतक्या बायका आणि अंगवस्त्रे होती की जहांपन्हांना एक एक्सेल वर्कबुक मेनटेन करावं लागे. त्यात तीन वर्कशीट होत्या. एक वर्कशीट पट्टबेगम आणि तिचे तपशील, म्हणजे भाऊ किती, इतर सासुरवाडीकडची मंडळी किती, वगैरे वगैरे. दुसर्या वर्कशीटमधे इतर बायका आणि त्यांचे असे तपशील. तिसरी वर्कशीट अंगवस्त्रांसाठी. तेव्हा कुठे सगळ्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, नखरे वगैरे लक्षात राहत. अर्थात हे एक्सेल वर्कबुक सुद्धा बिरबलानेच त्यांना तयार करुन दिले होते. 

एकदा सहज विचार करत बसले असता जलालुद्दीन सरांच्या मनी आले की मुघल सलतनतीत एखादा तरी प्रेम दिवस असावा. पण आता इतक्या बायका आणि अंगवस्त्रे असताना बादशहा हुजूरांचा रोजच प्रेमदिवस असे. त्यांची अडचण त्यांनी (पुन्हा) बिरबलालाच सांगितली. बिरबलाने त्यांना अरबस्थानातील प्राचीन पीर संत वळवळताहेन या थोर इश्वरी पुरुषाबद्दल सांगितले. "शहेनशहा साहेब, आपण आपल्या वर्षातील प्रत्येक दिवस प्रेम दिवस म्हणून साजरा करावा, पण इंग्रजी क्यालेंडरातील चौदा फेब्रुवारी हा दिवस सरजमीन-ए-हिंदूस्थानात प्रेम दिवस म्हणून साजरा करावा. 

"पण चौदा फेब्रुवारीच का?" जहांपन्हांनी पुन्हा अजागळ शंका विचारलीच. 

"सारख्या मालिका पाहून तुम्हाला काही सुचत नाहीसे झाले आहे झालं जहांपन्हा. मालिका सुरु असतील तेव्हा तुम्ही दीवान-ए-खास सोडून दीवान-ए-आम मध्ये बसून आवामच्या तक्रारी ऐकत चला, डोक्याची मंडई कमी होईल." बिरबल वैतागून म्हणाला.

मालिकांचा उल्लेख बिरबलाने करताच "आमच्या दुखत्या नसीवर बोट ठेवायला आम्ही तुला फर्मावलेले नाही. तेव्हा आमच्या समस्येवर तोडगा सांग पटकन", असं शहेनशहा उद्गारले.

"अहो बादशहा साहेब, चौदा फेब्रुवारी हा संत वळवळताहेन याचा स्मृतिदिन. तसेच आपल्या पट्टबेगम साहिबांचा वाढदिवस कधी येतो सांगा बरं?"

मागच्या वेळी पट्टबेगम साहिबांचा वाढदिवस विसरल्याने त्यांनी आख्खी "अम्मी कुठे कडमडते" मालिका सोबत बसवून बघायला लावली होती त्याची याद येऊन बादशहा कळवळले. तेव्हापासून पट्टबेगम साहिबांचा वाढदिवस हा चौदा फेब्रुवारीला येत असल्याचे त्यांच्या मश्तिष्कच्या 'गहराईयां'त कोरले गेले होते.

बिरबलाच्या हुशारीवर बादशहा मनातल्या मनात खुष झाले आणि त्यांनी फरमान सोडून चौदा फेब्रुवारी हा इष्क-ए-हिंद-ए-दिन म्हणून घोषित केला. त्याचा पुढे अपभ्रंश शाखावाल्यांनी वळवळताहेन दिन असा केला.

हा खर्रा इतिहास हे संघी चड्डीवाले तुम्हाला कधी सांगणार नाहीत. 

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ४४४४, ओळ २३

#इष्क_ए_हिंद_ए_दिन #तुझ्यायची_अकबरी

© मंदार दिलीप जोशी







Friday, February 11, 2022

खर्रा इतिहासः अफझलखान कसा मेला?

आपल्या मुलाची मुंज प्रतापगडाच्या पायथ्याशी करण्याचा अफजलखानाचा मानस होता म्हणून गागाभट्ट गुरुजी यांना डेप्युटशनवर पाठवावे अशी विनंती करायला खान आला होता. दुर्दैवाने त्याला ब्रेन ट्यूमरचा हार्ट ऍटॅक आला आणि त्यात तो गेला. 

अफझल-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ४२०, ओळ २७

© मंदार दिलीप जोशी






खर्रा इतिहासः शाईस्तेखानाची बोटे का तुटली?

 शाईस्तेखानास भाषांतराचे वेड होते. उत्तमोत्तम धार्मिक ग्रंथांचे तो रेमिंगटन टाईपरायटरवर फारसीत भाषांतर करत असे. दिवस म्हणू नका रात्र म्हणू नका त्याचे टाइपिंग सुरूच असायचे. एकदा असाच लाल महालात बसून भगवद्गीतेचे भाषांतर टंकलिखित करत असताना स्वराज्यातून त्याला नजराण्यातून भेट मिळालेला गोदरेज टाईपरायटर नजरेस पडला. त्यावर अतिशय झटपट टाइपिंग होत असल्याचे लक्षात आल्याने त्याने अधिकच जोमाने टाइपिंग सुरू ठेवले, दुर्दैवाने त्याच टाईपरायटरमध्ये त्याचा हात अडकून तीन बोटे तुटली. 

औरंग्या-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान १८८४, ओळ २२

© मंदार दिलीप जोशी

Shaista Khan



खर्रा इतिहासः जगन्नाथ यात्रा आणि अकबर

एकदा दक्षिण सफरीवर असताना बादशहा अकबराच्या बग्गीचा टायर पंक्चर झाला. नेहमीचा अब्दुल पंक्चरवाला हग यात्रेला गेल्याने अंमळ अडचणच झाली. मग अकबराने भगवान जगन्नाथाचा धावा सुरू केला. अचानक देवळातून एक शेंडीधारक इसम आला व त्याने बग्गीच्या चाकाचे पंक्चर काढून दिले. तुला पैसे देतो असं अकबर म्हणाला पण तो इसम पैसे न घेता परत गेला आणि पुन्हा सापडलाच नाही. आपल्या मदतीला भगवान जगन्नाथच धावून आले असं समजून बादशहा अकबराने जगन्नाथ यात्रा सुरू केली.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ६६६, ओळ ११

© मंदार दिलीप जोशी

Akbar praying






खर्रा इतिहासः मुमताज बेगम आणि ताज महाल

मुमताज बेगम निष्णात रांगोळी काढणारी होती. ती अस्थम्याची रुग्ण सुद्धा होती. तिला शाहजहान म्हणायचा सुद्धा की प्रिये, रांगोळी नाकातोंडात गेली तर तुला अस्थम्याचा ऍटॅक येईल. पण ती सोळाव्या वेळी गरोदर असताना आपल्या पहिल्या डिलिव्हरीच्या म्हणजे मुलाच्या लग्नात स्वतः जातीने रांगोळी काढायला बसली होती. दुर्दैवाने बादशहा शाहजहान सरांची भीती खरी ठरली आणि रांगोळी तिच्या नाकातोंडात जाऊन दम्याचा विकार बळावून त्यात ती गेली. तिचे अत्यसंस्कार यमुनेच्या काठी करण्यात येऊन तिच्या अस्थी ताज महालात ठेवण्यात आल्या आहेत.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ७८६, ओळ ८७

© मंदार दिलीप जोशी


Mumtaj Begum and Taj Mahal



खर्रा इतिहासः कोजागिरी पौर्णिमा आणि अकबर

आजच्याच रात्री बादशहा हुमायूंने बाळ अकबराला सोन्याच्या चषकातून दुध पाजले होते. त्यात हुमायूं जायफळ टाकायला विसरल्याने बाळ जलालुद्दीन जागाच राहिला. म्हणून हुमायुं अकबराला म्हणाला "कोजागरती" म्हणजे "का रे (दिवट्या) जागा आहेस?" (माझा पुढचा प्लॅन बोंबलला ना. बेगम, तुम्ही झोपा). अशा रीतीने हा उत्सव सुरु झाला.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ४८८, ओळ २४

© मंदार दिलीप जोशी





खर्रा इतिहासः छठ पूजेची सुरवात

 एकदा यमुनेच्या काठी सूर्याला अर्घ्य देत उभा असताना बादशहा जलालूद्दीन महंमद अकबराला "बचाओ बचाओ" अशी हाक ऐकू आली. लांब कुणीतरी नदीत बुडत असल्याचं अकबराला दिसलं. बादशहाने आजूबाजूला बघितलं आणि आपल्या अधिकाऱ्यांना विचारलं की किसीको तैरना आता हय क्या? पण तो समय त्यांचे घसे ओले करण्याचा असल्याने सगळ्यांनी आपापल्या आवडीच्या ठिकाणी पोहोचायला ओला बुक केल्यामुळे स्वतःला ओलं करून घ्यायला कुणी तयार होईना, त्यामुळे आम्हाला पोहोणे को नाही आता असं ठोकून ते मोकळे झाले. आता आलमपनाह स्वतः कसे उडी मारणार एवढ्यात त्यांना मागून कुणीतरी धक्का दिला आणि ते पाण्यात पडले, आणि पडल्यावर हातपाय मारू लागले. त्यांना काही कळण्याच्या आत ते बुडणाऱ्या माणसाजवळ पोहोचले सुद्धा होते. शेवटी त्या माणसास धरून त्यांनी किनाऱ्यावर आणले तेव्हा लक्षात आले की हा साला...अंहं...ही शिवी नव्हे बरं... हा इसम त्यांचा सालाच होता. म्हणजे धक्का देणाऱ्या बेगम शोधाबाईच होत्या!! 

बादशहांनी रागे भरू नये म्हणून बेगम साहिबांनी फुलांनी भरलेलं ताट त्यांच्यासमोर धरलं तर आलमपनाह चिडले आणि "हट" असं म्हणून ते ताट उडवलं, तेव्हा सगळी फुले यमुनेत जाऊन पडली. शोधाबाई साहिबांना हा कसलातरी संकेत वाटला आणि बादशहा सलामत "छठ" म्हणाले असं वाटून तेव्हापासून साला प्रकरण थंड झाल्यावर बादशहा अकबरांची परवानगी घेऊन सर्वप्रथम "छठ पूजेला" सुरवात केली.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ६६६, ओळ ६

© मंदार दिलीप जोशी




खर्रा इतिहासः नेहरू आणि सावरकर भेट

ग्रामोफोनवर चोरून ऐकत असताना चाल आवडल्याने भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना एकदा 'जयोस्तुते' लाईव्ह ऐकायची लहर आली. लागलीच त्यांनी मुंबईला सावरकरांना फोन लावला, तो साधारण आठवडाभराने लागला. नेहरू म्हणाले, "स्वातंत्र्यवीर, अब हमारा कोई भरवसा नहीं. आज है उद्या नहीं. जाने से पहले एक बार जयोस्तुते गाना लाईव्ह सूनना है."

[म्हातारचळ लागलेलं दिसतंय, असं म्हणून] सावरकरांनी ताबडतोब शेजारची चार कार्टी गोळा केली आणि गाणं बसवून घेतले. अखेर तो दिवस उजाडला. पंडित नेहरू लहानग्या इंदिरेसह सावरकरांच्या घरी आले. कार्ट्यांनी जबरदस्त गाणे म्हटले. दोघांना गाणं इतकं आवडलं की 'सागरा प्राण तळमळला' आणि इतर अनेक गाण्यांची फर्माईश नेहरूंनी केली आणि पोरांनी ती म्हटली. 

पंडितजी साश्रूनयनांनी सावरकरांना म्हणाले देखील, "स्वातंत्र्यवीर, हमसे बडी गलती हो गयी, हमने तुमकू बहुत त्रास दिया. अब हम तुमकू भारतरत्न देना चाहते हैं." 

यावर सावरकरांनी [काय पण रत्न आहे असे उद्गार काढून] विनम्रपणे त्यास नकार दिला. म्हणून मग नाईलाजाने नेहरूंनी ते भारतरत्न स्वतःलाच ठेऊन घेतलं. 

हा इतिहास हे चड्डीवाले संघी तुम्हाला सांगणार नाहीत.

- सिमसिम मरुदे
जमात-ए-पुरोगामी टाईम्स कडून प्रमेय चिरडकरसह