Showing posts with label राजकारण. Show all posts
Showing posts with label राजकारण. Show all posts

Sunday, July 2, 2017

सलाम

(मंगेश पाडगावकरांची माफी न मागता )

सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात चॅनल त्याला सलाम,
पगाराच्या भयाने
डाव्या हातात माईकचं बोंडुक घेऊन
उजव्या हाताने सलाम,
बघणाऱ्याला सलाम,
न बघणाऱ्याला सलाम,
विकत घेणाऱ्याला सलाम,
विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला लाल सलाम,
सलाम, भाई, सबको सलाम.

चादर घातलेल्या प्रत्येल थडग्याला सलाम,
डिवायडर पीराला सलाम
देवळांना फोडून बांधलेल्या मशिदींना सलाम,
मशादीतल्या मौलवींच्याच्या धाकाला सलाम,
मशिदीतून, लाउडस्पीकरवरुन
बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्याला सलाम,
परवरदिगार आणि त्याच्या मजहबचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम,
रिकाम्या गर्भाशयात जीव भरण्यासाठी
निष्पाप मोहतरमाला नासवणाऱ्या बंगालीबाबाला  सलाम
चाँदला सलाम
बकऱ्याला सलाम,
दहशतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम,
अम्मीच्या उरावर दुसरी अम्मी बसवणाऱ्या अब्बाला सलाम,
दुसऱ्या अम्मीला टरकावणाऱ्या तिसऱ्या अम्मीला सलाम,
सलाम, प्यारे भाईयों और बेहेनों,
सबको सलाम.

ज्याच्या हातात कोयता
त्याला सलाम,
ज्याच्या गळ्यात क्रूस
त्यालाही सलाम,
चर्चच्या पादऱ्यांना सलाम,
त्यांची वेसण धरणाऱ्या
व्हॅटिकनला सलाम,
ज्याच्या सेवेला नन त्याला सलाम,
तिला भोगणाऱ्या फादरला सलाम
तिचा गर्भपात करतो
त्यालाही सलाम
क्रिसमस आणि व्हॅलेन्टाइनच्या गर्दीला सलाम,
ती गर्दी झुलवणाऱ्या
जादूगारांना लाल सलाम,
भाईयों और बेहेनों सबको सलाम.

नाक्यावरच्या अनधिकृत चिकनशॉपला सलाम
शेजारच्या इल्लीगल गॅरेजला सलाम
ते चालवत वखवखलेल्या नजरेने सावज शोधणार्‍या वाहिदला सलाम
सोनं म्हणून आरडीएक्स स्मगल करणार्‍याला सलाम
ते वापरून बनवलेले बाँब ठेवणार्‍यांना सलाम
स्फोट झाल्यावर जिहादी जल्लोष करणार्‍यांना सलाम
त्यांना पकडू पाहणार्‍या पोलीसांना सलाम
त्यांचे ट्रक न तपासता जाऊ देणार्‍यांनाही सलाम
टायगर मेमनला सलाम,
त्याला श्रद्धांजली वाहणार्‍या
कुबेरांनाही सलाम,
लोकसत्तालाबी सलाम,
सकाळलाही सलाम,
काँग्रेसला बुडवणार्‍या राहुल गांधींना सलाम,
गांधींखाली चिरडलेल्या
प्रणवदांना, नरसिंह रावांना सलाम,
ज्याच्या हातात विळा हातोडा त्याला सलाम,
सैनिकांना बलात्कारी म्हणणार्‍यांना सलाम,
भारत तेरे टुकडे होंगे म्हणणार्‍यांना ,
कन्हैया कुमारला सलाम,
कविता कृष्णनला सलाम;
आनंद पटवर्धननांना सलाम,
कबीर कला मंचला सलाम,
निरपराध मुलांना बायकांना मारणार्‍या नक्षलवाद्यांना सलाम,
मौत सस्ती करणाऱ्या सर्वांना लाल सलाम,
सलाम, प्यारे दोस्तों, सबको सलाम.

फिल्म इन्स्टिट्युटला सलाम
त्यातल्या मध्यमवयीन विद्यार्थ्यांना सलाम,
काहीही त्रास नसलेल्यांना सलाम
पण सतत तुम्हाला कसलातरी त्रास आहे असं
पटवणार्‍या कॉम्रेडांना सलाम
गोळी घालणार्‍यांना सलाम
ती घालण्याच्या आदेश देणार्‍यांना सलाम
कॅपिटालिस्ट मालकांना सलाम
कम्युनिस्ट कामगार नेत्यांना सलाम
दिवाळी बोनसला सलाम
संपाला सलाम
उपासमारीला सलाम
युनियनच्या लिडरला सलाम,
संपात बरबाद झालेल्या कामगाराला सलाम
त्याच्या पिचलेल्या बायकोला सलाम
दीड खोलीत अभ्यास करणार्‍या
एकच गणवेश आठवडाभर वापरणार्‍या
त्यांच्या पोरांना सलाम
चीनला सलाम
सोवियत रशियाला सलाम
लाल झेंड्याला सलाम
सलाम, लाल सलाम
सलाम, भाईयों और बेहेनों, सबको सलाम.

या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
याच देशात राहून त्याचे टुकडे करण्याच्या घोषणा देणार्‍यांना सलाम
गायीचं मांस खाणार्‍यांना सलाम
तिला रस्त्यावर कापणार्‍यांना सलाम
आमचा धर्म शांततेचा या सर्व बिलंदर घोषणांना सलाम,
हिंदूद्वेष्ट्या उकिरड्यांना सलाम,
या उकिउरडयांतून मजहबचं पीक काढणाऱ्यांना सलाम,
टोपी आणि बुरख्याला सलाम,
पंक्चरवाल्या मियाँला सलाम,
त्यांच्या शेकडो लौढ्यांना सलाम,
निवडणुकांना सलाम,
निवडणुक प्रचाराला सलाम,
निवडणुकांवर डोळा ठेऊन झालेल्या
निरनिराळ्या वांझोट्या आंदोलनांना ,
विद्यार्थी चळवळीला सलाम
नॉट इन माय नेमला सलाम
आद्य चळवळ बामण हटावला सलाम
लाल झेंडा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम,
या सर्व अत्याचार करणाऱ्यांना सलाम,
या बातम्या वाचणाऱ्या सर्व षंढांना लाल सलाम,
सलाम, भाईयों और भैनों, सबको सलाम.

वरपासून खालपर्यंत आरक्षणाचा देश म्हटले
तर डोके फोडतील ,
भत्ताखाऊ फुकट्यांचा देश म्हटले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदले जाणाऱ्या पत्रकारांचा देश म्हटले
तर मोर्चे काढतील,
दगडाला देव आणि गायीला माता म्हटलं
तर हिंदू दहशतवादी म्हणून दम देतील
मोर्चात जातो म्हटले
तर नोकरीवरून काढतील;
म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या माझ्या
शेख्युलर हिरव्या देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.
लाल सलाम
प्यारे भाईयों और बेहेनों, सबको सलाम,

अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिन माफ़ करना भाईयों,
हात तर दोनच
आणि त्यातला उजवा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त
डाव्या हाताने सलाम,
सलाम, सबको लाल सलाम
भाईयों और बेहेनों, सबको सलाम.

© मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. ८, शके १९३९

Tuesday, June 20, 2017

राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि विरोधकांची चिडचिड

सतत तुम्ही हजारो वर्षांपासून गुलाम आहात असं एखाद्या किंवा जमल्यास अनेक समाजांच्या मनावर पिढ्यानपिढ्या बिंबवणे, आणि मग तदनुषंगाने तुम्ही त्या तथाकथित गुलामीतून बाहेर आलं पाहीजे असं पटवून देत राहणे, आणि मग त्या तथाकथित गुलामीतून बाहेर येण्यासाठी सातत्याने एक काल्पनिक शत्रू उभा करुन उदा. एखाद्या समाजाला लक्ष्य करुन - आधी वैचारिक आणि मग सामरिक बंडासाठी प्रवृत्त करणे हा डाव्या/साम्यवादी/नक्षलवादी मानसिकतेच्या लोकांचा प्रयत्न असतो. मग ज्या समाजाला गुलाम म्हणायचं तो समाज किंवा व्यक्ती किती कौशल्यविकसित, उच्चशिक्षित, आणि समृद्धीच्या दिशेने अग्रेसर असलेली का असेना !

काल राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एन.डी.ए.) च्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवाराच्या नावाची घोषणा होताच ज्या प्रकारे विरोधी पक्ष, डाव्या/साम्यवादी/नक्षलवादी आणि त्यांचे समर्थक, आणि विकला गेलेला मिडिया आणि त्यांचे सोशल मिडीयावर पडीक असणारे तट्टू यांची निराशा आणि त्यापासून उत्पन्न झालेली तडफड दिसते आहे ती या भीतीपोटी की आता जगाला संघ काय चीज आहे ते समजेल. आता ही गोष्ट समजणे काही रॉकेट सायन्स नव्हे की भाजपला सर्वसहमतीसाठी एका दलित उमेदवाराची गरज होती, तसेच तो उमेदवार उच्चशिक्षित, राजकारणाचा अनुभव असलेला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संघाच्या विचारसरणीचा हवा होता.

श्री रामनाथ कोविंदजी या सगळ्या निकषात अगदी व्यवस्थित बसतात. ते दलित तर आहेतच, शिवाय ते एका गरीब शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात ते १६ वर्ष वकील होते, आय.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण आहेत, काही शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनात ते होते, आणि संयुक्त राष्ट्रसंघात भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा व संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेपुढे भाषण करण्याचाही त्यांना अनुभव आहे. संघातून आल्यामुळे त्यांना सामाजिक कार्याची आवड आणि अनुभव आहे हे वेगळं सांगायला नकोच. शिवाय सद्ध्या ते काही वर्ष बिहारचे राज्यपाल आहेत. चाराखाऊ लालूंचे चिरंजीव तेजप्रताप यादव यांनी शपथ घेताना "अपेक्षित" ऐवजी "उपेक्षित" असा उच्चार केल्यामुळे ज्यांनी सगळी शपथ परत घ्यायला लावली होती, ते हेच श्री रामनाथ कोविंद.

उपरोक्त विरोधकांना ही गोष्ट मात्र केल्या पचत नाही आहे की अशी व्यक्ती एक संघी आहे. संघी या शब्द मुद्दामून वापरला आहे कारण आजकाल  संघाच्या अंधविरोधकांचा हा आवडता शब्द आहे. आता ही गोष्ट संघाच्या समर्थकांनाच नव्हे तर विरोधकांनाही ठावूक आहे की संघात कुणी कुणाला जात विचारत नाही, आणि एकत्र संघ शाखेत जाणार्‍यांमधे जातीला काहीच महत्व दिलं जात नाही. इतकंच नव्हे तर अनेक विजातीय संघ कार्यकर्त्यांमधे आपापसात निव्वळ रोटीच नव्हे तर बेटी व्यवहार देखील आहेत.

हे माहीत असून काही अंशी अज्ञानापोटी आणि बहुतांशी हेतूपुरस्सर संघाची सातत्याने ब्राह्मणांची आणि उच्चवर्णीयांची संघटना अशी प्रतिमा तयार करण्यात आणि संघकार्याशी अपरिचित जनमानसावर बिंबवण्यात आजवर या अंधविरोधकांनी कुठलीच कसर बाकी ठेवली नव्हती. या दुष्प्रचाराला पहिला धक्का बसला कुठल्याही तथाकथित उच्च जातीशी संबंध नसलेले श्री नरेन्द्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा. पण मोदींना विरोध करायला त्यांच्याकडे अन्य मुद्दे होते. त्यांच्या दुर्दैवाने श्री रामनाथ कोविंदांच्या बाबतीत त्यांना असं काहीच करता येत नाही.

विरोधकांचं खरं दु:ख हे आहे की राष्ट्रपतीपदाचा या वेळचा उमेदवार हा दलित, उच्चशिक्षित, अनुभवी, आणि संघी असे सगळे असल्याकारणाने संघ आणि भाजपच्या चारित्रहननाकरता त्यांना जात हा मुद्दा उकरून काढता येणार नाही. मिडियाची जी तडफड सगळीकडे बघायला मिळते आहे ती या कारणाने की आता संघ आणि भाजप हे दलितविरोधी ही प्रतिमा निर्माण करताना ज्या खोट्या बुद्धीभेदी कथांचा पूर आणला जायचा तो आणण्यात ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत. आता ही गोष्ट जगासमोर वारंवार येणार की भारतवर्षाचा राष्ट्रपती हा दलित तर आहेच पण तो संघी सुद्धा आहे. अर्थात, ही गोष्ट अखिल विश्वापुढे उघड होईल की संघ जातीयवादी तर नाहीच, पण या उलट संघ प्रत्येक जातीला राजकारणात उच्च स्थान मिळवून देशसेवा करण्यासाठी समान संधी उपलब्ध करुन देतो.

मिडियामधे जी तडफड दिसते आहे त्याने प्रत्येक राष्ट्रवादी भारतीयाला गुदगुल्या नक्की होत असणार. मलाही होत आहेत यात आश्चर्य ते काय?! लोग मजा बघत आहेत, तुम्हीही बघा.

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।

समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

।। भारत माता की जय ।।

|| वंदे मातरम् ||

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. १०, शके १९३९ | योगिनी एकादशी

राष्ट्रपतीपद का चुनाव एवं विरोधियों की तिलमिलाहट

ज्ञान न पूछो वामी का, पूछ लीजिये जात।
दलित क्यों नहीं पॉलिटब्यूरो में, पूछो मार के लात !

हमेशा आपको आप हजारों सालों से गुलाम (दास) हैं यह कुछ समाजोंघटकों के  मन पर पीढी दर पीढी बिंबित करते रहना, फिर उस संदर्भ में आपको इस तथाकथित दास्यत्व से बाहर आना आवश्यक है यह बार बार समझाना, एवं उस पश्चात आपको इस तथाकथित दास्यत्व से बाहर निकालने हेतू सातत्यपूर्ण ढंग से एक काल्पनिक शत्रू को आपके सामने खडा करना, उदाहरण किसी एक समाज को लक्षय करके - प्रथमत: वैचारिक और उस पश्चात सामरिक विद्रोह के लिये आपको प्रवृत्त करना यह वामपंथी/साम्यवादी/नक्षलवादी मानसिकता के लोगों का प्रयत्न रहा है. फिर जिन्हें ये गुलाम बतलाने इच्छुक हैं वो समाज अथवा व्यक्ती कितना भी कौशल्यविकसित, उच्चशिक्षाप्राप्त, एवं समृद्धी की ओर अग्रेसर क्यों न हो!

कल राष्ट्रीय लोकतंत्र मोर्चा (एन.डी.ए.) के राष्ट्रपतीपद के प्रत्याशी के नाम की घोषणा होते ही जो विरोधक, वामपंथी/साम्यवादी/नक्षलवादी एवं उनके समर्थक, तथा बिकाऊ मिडीया एवं उनके सोशल मिडीया पर पडे खच्चरों की निराशा से उत्पन्न बैचैनी और विषवमन दृग्गोचर हो रहा है वह इस बात पर है की अब सारे दुनिया को पता चल जाएगा कि संघ है क्या. यह बात कोई रोकॅट साईन्स तो नहीं थी कि भारतीय जनता पक्ष सर्वसहमती के हेतू एक दलित, उच्चशिक्षित, राजनीतीका अनुभवी, एवं संघ की विचारधारा रखने वाला कोई प्रत्याशी की खोज कर रही थी.

श्री रामनाथ कोविंदजी इन सारे निकषों में खरे उतरते हैं. वे दलित हैं, इतना ही नहीं वे गरीब किसान कुटुंब से आते हैं, दिल्ली उच्च न्यायालय एवं सर्वोच्च न्यायालय में वे १६ वर्ष वकील थे, आय.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण हैं, कुछ शैक्षणीक संस्थाओं के व्यवस्थापक भी रहें हैं, केवल इतना ही नहीं उन्हे संयुक्त राष्ट्रसंघ में भारत का प्रतिनिधित्व करने का एवं  संयुक्त राष्ट्रसंघके आमसभा को संबोधित करनेका भी अनुभव प्राप्त है. संघी है तो पृथक बताना आवश्यक नहीं कि उन्हें सामाजिक कार्य में रुचि है अपितु अनुभव भी प्राप्त है. अब कुछ वर्षों से वे बिहार के राज्यपाल हैं. हां, यह वहीं है, जिन्होनें "अपेक्षित" के स्थान पर "उपेक्षित" कहने पर तेजस्वी यादव को पूरी शपथ पुन: पढने का आदेश दिया था.

परंतु उपरोक्त विरोधकों को यह बात पच नहीं रही की ऐसा व्यक्ती एक संघी है. हेतूपूर्वक इस शब्द का प्रयोग किया है क्योंकी बिकाऊ पत्रकारों को और संघ के अंधविरोधकों को इस शब्द का उपयोग करने के अभ्यस्त हैं. ये संघ के समर्थक ही नहीं अपितु संघ विरोधकों को भी ज्ञात है कि संघ मे किसी की जाति पूछी तक नहीं जाती, एवं नहीं साथ साथ संघ शाखा में जाने वाले लोगों मे जाती कोई महत्व नहीं रखती. इतना ही नहीं अनेक विजातीय संघ कार्यकर्ताओं के आपस में केवल रोटी ही नही बेटी व्यवहार भी हैं.

आज तक संघ को सातत्य से ब्राह्मणो एवं उच्च जातीयों के संगठन  के रूप में संघकार्य से अपरिचित जनमानस के मन पर बिंबित करने में इन अंधविरोधकों नें कोई कसर नहीं छोडी थी. इसको पहली चोंट तब पहुंची जब श्री नरेन्द्र मोदी जो किसी तथाकथित उच्च जाती से संबंध नहीं रखते वे प्रधानमंत्री बने. परंतु उनका विरोध करने के हेतू विरोधकों के पास अन्य विषय थे.  श्री रामनाथ कोविंदजी के विषय में ऐसा कुछ भी नहीं है.

विरोधीयों का दु:ख यह है कि इस बार राष्ट्रपतीपद के प्रत्याशी के दलित एवं संघी होने के कारण अब संघ एवं भारतीय जनता पक्ष के चारित्र्यहनन के लिये उनको जाती का आधार कैसे मिलेगा? मिडीयाकी जो तिलमिलाहट दृग्गोचर हो रही है, वह इस हेतू है की सालों पुराने संघ एवं भाजपा के दलितविरोधी होने की कहानियों की बाढ लाने मे वे इस बार पूरी तरह से असफल रहे हैं. अब यह बात विश्व के सामने बार बार आयेगी की भारतवर्ष का राष्ट्रपती दलित है एवं संघी भी है. अर्थात, यह बात विश्व को दृग्गोचर होगी की संघ जातीवादी तो है ही नही, अपितु संघ हर जाती के लोगों को राजनीती में उच्च स्थान प्राप्त कर देशसेवा करने हेतु समान अवसर प्राप्त कराता है.

मिडिया की इस छटपटाहट से हर राष्ट्रवादी भारतीय को गुदगुदी तो अवश्य हो रही है. मुझे भी होना आश्चर्य की बात नहीं. आप भी मजे लिजीये.

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।

महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।

समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

।। भारत माता की जय ।।

|| वंदे मातरम् ||

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. १०, शके १९३९ | योगिनी एकादशी

Sunday, May 29, 2016

तुम्हाला नक्की कुठले सावरकर हवेत?

आज सावरकर जयंती निमित्त सगळीकडे अनेकांना सावरकरांची आठवण आल्याचे पाहून आनंद झाला.

सावरकरांची अनेक वैशिष्ठ्ये प्रत्येक लेखनातून दिसली. पण त्यातून सगळ्यांना फक्त राजकीय सावरकरच प्रिय आहेत असा निष्कर्ष निघाला. सावरकरांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख झालाच, मात्र तोंडी लावण्यापुरता. जेवण झाल्यावर तृप्तीची (देसाई नव्हे, पोटभरल्या नंतरची) ढेकर दिल्यावर स्तुती होते ती जेवणातल्या आमटी, भाजी, जिलबी, उसळ वगैरे पदार्थांची. लोणच्याशिवाय जेवण पूर्ण होत नसलं तरी लोणचं खूप छान होतं असं क्वचितच ऐकायला मिळतं. तद्वतच सावरकरांच्या सामाजिक कार्याचा जेमतेम उल्लेख झालेला दिसला.

राष्ट्रीय नेत्यांना आपण जातीजातीत विभागून टाकलं आहे असं म्हणतो, मात्र त्या त्या विभागणीत आणखी एक उपविभागणी झाल्याचं दिसून येतं. सावरकरांच्या बाबतीत बोलायचं तर ही विभागणी राजकीय सावरकर आणि सामाजिक सावरकर अशी झालेली आहे. मुद्दामून नव्हे, पण सोयीचं राजकारण आपणही अनेकदा खेळत असतो.

सामाजिक सावरकरांचं साहित्य वाचलं, तर कट्टर धार्मिक हिंदूंनाच काय, पण जहाल आंबेडकरवाद्यांच्या मेंदूला झिणझिण्या येतील अशी परिस्थिती आहे. पण आजची वास्तविकता काय आहे? एखाद्या राष्ट्रपुरुषाची समस्त मते आपल्याला पटलीच पाहीजेत असे नव्हे, पण निदान समजून घेण्याची इच्छा असणे आवश्यक आहे. राजकीय सावरकरांच्या आठवणींचे बोट धरून उड्या मारताना किमान सामाजिक सावरकर आपल्याला समजलेत का? हा प्रश्न स्वतःलाच विचारण्याची गरज आहे.

"संकटातून सोडवल्याबद्दल जर सत्यनारायण घालत असू तर त्याच सत्यनारायणाने आधी संकटात पाडलेच का याबद्दल त्याची जोड्याने पुजा करायला नको का?" हे वाक्य तात्यारावांचंच आहे. राजकीय सावरकरांना डोक्यावर घेऊन नाचणार्‍या आत्ताच्या किती तथाकथीत हिंदूत्ववादी लोकांना हे झेपेल बरं? आपल्यात विरोधाभास आणि अजाणतेपणाने अंगी बाणवलेला दांभिकपणा इतका आहे की आज अनेक घरांत भींतीवर किंवा शोकेसमधे असलेल्या सावरकरांच्या फोटो खालीच सत्यनारायणाची पूजा मांडलेली दिसून येते. सामाजिक सावरकरांचा पराभव झाल्याचं याहून समर्पक उदाहरण कोणतं असू शकेल?

आज आपल्याला एखाद्या काँग्रेसी मंत्र्याने सावरकरांच्या ओळी पुसून टाकल्याचा राग येतो. भर संसदेत तात्यारावांच्या नावाचाही धड उच्चारही न करु शकणार्‍या तेव्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेल्या राहुल गांंधींचा संताप येतो. पण ती त्यांची चूक नाही. त्यांना बालपणापासून अमुक लोक आपल्या सोयीचे म्हणून त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं आणि अमुक लोकांचा (उदा. सावारकर - तसंच उच्चार केला होता ना पप्पूने संसदेत?) आपल्याला राजकीय पोळी भाजायला द्वेष केलाच पाहीजे म्हणून त्यांना दूषणे द्यायची असंच शिकवलं गेलं आहे. तेव्हा त्यांच्या बरळण्याचा राग आला तरी ती आश्चर्याची गोष्ट नव्हे. आश्चर्याची गोष्ट ही की अजून आपल्यालाच सावरकर समजलेले नाहीत.

शक्यता कमीच आहे, पण उद्या काँग्रेसवाल्यांनी खरंच तात्यारावांचा अभ्यास करायचं ठरवलं तर त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना नाकी नऊ येऊ नयेत ही काळजी घेणं आवश्यक आहे. नाही तर गांधींची तथाकथित तत्त्वं गुंडाळून ठेवणारे काँग्रेसजन आणि राजकीय सावरकर डोक्यावर घेऊन नाचणारे व सामाजिक सावरकरांना गुंडाळून ठेवणारे आपण यात फार फरक उरणार नाही.

आणि हो, राजकीय सावरकरांची बदलत गेलेली मते याचाही अभ्यास तरी किती जणांनी केला आहे हा देखील प्रश्नच आहे. समग्र इतिहासच नव्हे तर प्रत्येक इतिहासपुरुषाचाही अभ्यास असा वेगवेगळ्या परिप्येक्ष्यांमधून करावा लागतो. इतिहास हा २+२=४ असा कधीच नसतो. तसाच विचार करायची सवय असेल,तर किमान "त्यांना किनै आम्ही फॉलॉ करतो" असं पोकळ, दांभिक, आणि दिखाऊ विधान करुन आपल्या अकलेचं दिवाळं निघालेलं दाखवू नका. नाहीतर आपल्याला कित्ती कित्ती कळतं हे दाखवायला उठता बसता रामदास स्वामींच्या मूर्खलक्षणांचा उल्लेख करायचा आणि प्रत्यक्षात “समूळ ग्रंथ पाहिल्याविण, उगाच ठेवी जो दूषण" हे आपल्या किती अंगी बाणलेलं आहे याचं जाहीर प्रदर्शन करायचं असं चालेलेलं असतं. तेव्हा कुठल्याही राष्ट्रपुरुषाला आपल्या अज्ञानाने असं अपमानित करु नका. त्यांच्या आत्म्याला क्लेष होतील.

हां तर आपला मूळ प्रश्न होता, तुम्हाला कोणते सावरकर हवेत? राजकीय की सामाजिक. आणि राजकीय हवे असतील तर्........जाऊ दे. आधी आपण पुरेसा अभ्यास करुया का?

© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ ३, शके १९३८
सावरकर जयंती

Monday, January 18, 2016

असा मिडिया मिडीया...

होई कांड दादरीचं, मिडीयाला लागे घोर |   
जवा घडते मालदा, म्हणे भुरटा तो चोर ||

करी दादरी दादरी, त्याले शिक्षा करी कोन |  
उभा जाळला मालदा, डोळे वटारी ना कोन ||

दीदी जेहादी जेहादी, तिचं न्यारं ते तंतर | 
पाकी अतिरेकी बरे, त्याले गोळीचा मंतर ||

दीदी गुलाम गुलाम, अली गातोया गझला |
मालद्यात दंगेखोर, जाळी मजला मजला ||

आले कसाई कसाई, झाला मुर्दाड कायदा |
आमच्या दीदीले हिरव्या, मिळे मतांचा वायदा ||

मारी कोकरू कोकरू, म्हणे भावना धार्मिक |
झुंज बैलांशी करता, मिडीयाले होतो शोक ||

क्रूर मानूस मानूस, मुके बैल झुंजवले |
मुल्ला दयाळू दयाळू, त्याले खाऊन टाकले ||

देवळात नको बाई, तरी आम्ही जानारच |
ब्रह्मचार्‍याच्या कुटीत, गोंधळ होनारच ||

असा कसं हे मिडिया, त्याले डोकं गुडघ्यात | 
पैकं खाऊन इकतो,  इये देशाची इज्जत ||

--------------------------------------------------
...बहिणाबाईंची क्षमा मागून.
--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
पौष शु. ९, शके १९३७
--------------------------------------------------

Thursday, December 24, 2015

हेराल्डेश्वरी ओव्या

स्वामी करी केस
कलम ४२०
पप्पू तोंडी फेस
आणलासि

पप्पू असे पोर
अमेठीचा मोर
का म्हणता चोर
पुन्हा पुन्हा?

सासू माझी थोर 
लावा किती जोर
मला नाही घोर
मम्मी म्हणे

सुंभ गेला तरी
पीळ तो जाईना
लाज ती वाटेना
मायलेका

जामीन तो ठरे
मौनीबाबा भरे
पन्नास हजार
इतकाचि

मम्मी असे त्राता
भारताची माता
त्वरेने वदला
खुर्शीद तो 

घालती गोंधळ
राडा नित्य घोळ
मधमाशांचे पोळ उधळले

बाहेर ते गुंड
संसदेत झोंड
मवाली ते पुंड
माजलेत

पंचेचाळीस उरले
वेठीस धरले
काम नाही झाले
संसदेत

दिस नको आम्हा
आता सोनियाचे
देश चाले पुढे
प्रगतीत

जन ते जागवा
चोर तो दाखवा
फाडून पुरता
मुखवटा

जिरवा ही खोड
ठेचा ही घमेंड
त्यांच्या बापाची पेंड
देश नसे

-------------------------------------------------------
©  मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष शु. १४, शके १९३७, दत्त जयंती
-------------------------------------------------------

Sunday, December 20, 2015

नियतीचा सूड २: बरखाची बहार ओसरते तेव्हा

"आपल्याकडे तथ्यांबद्दलचा पुरेसा तपशील असल्याशिवाय कुठलाही सिद्धांत मांडणे ही घोडचूक असते. कारण मग आपण मूर्खासारखे तथ्य समजल्यावर सिद्धांत मांडण्याऐवजी सिद्धांत सिद्ध करायला तथ्यांची मोडतोड करु लागतो."

सर आर्थर कोनान डोयल, शेरलॉक होम्स

“It is a capital mistake to theorize before one has data. Insensibly one begins to twist facts to suit theories, instead of theories to suit facts."
Arthur Conan Doyle, Sherlock Holmes

एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पुर्वार्धात इंग्लंडात वाईट मनोवृत्तीचे पत्रकार नक्कीच असतील. मात्र आज भारतात आढळतात तसे तमासगीर पत्रकार उर्फ मिडियावाले कदाचित कुठेही नसावेत. ते काही असो, वरचं वाक्य आणि त्याचा कालनिरपेक्ष असलेला संदर्भ लक्षात घेतला, तर सर आर्थर कोनान डॉयल यांना मात्र द्रष्टाच म्हटलं पाहीजे. कारण आजकालचे बहुसंख्य पत्रकार हे अगदी हेच आणि ते ही जाणूनबुजून करण्याच्या मागे लागलेले असतात. तथ्य तपासून मग सिद्धांत माडण्याऐवजी आपलेच सिद्धांत मांडून सोयीप्रमाणे तथ्यांची मोडतोड करणे.

असे पत्रकार २००२ ची माळ जपत दिवस कंठतात, कुणाला 'मौत का सौदागर' म्हणून त्याभोवती गोष्टी विणत बसतात. मग सत्य मांडू इच्छिणार्या ब्लॉग लेखकावर खटले भरतात. आणि मग आपला देश कसा अशांत (unquiet) आहे यावर एक पुस्तक लिहीतात. आणि मग एक दिवस....लोकांनी इ-कॉमर्स साईट्सवर ते पुस्तक न वाचता पुस्तक टुक्कार असल्याचे अभिप्राय देऊन गुरूच्या विद्येचे फळ गुरुलाच चाखायला लावल्यावर वांझोटे शिव्याशाप देत बसतात.

तर मी म्हणत होतो, नियतीचे सूड घेण्याचे प्रकार किती विचित्र असतात नाही! मग अमॅझॉनवर विकायला ठेवलेल्या पुस्तकाला लोकांनी नीच दर्जाची श्रेणी प्रदान करण्याइतकी क्षुल्लक गोष्ट का असेना.

टीपः वरील लेखनाचा आणि नुकत्याच घडलेल्या बरखा दत्तने अमॅझॉनवर केलेली आगपाखड याचा काही परस्पर संबंध आढळल्यास तो योगायोग अजिबात न समजता तो मुद्दामून केलेला उल्लेख समजावा.

-----------------------------------------------------------------------------------------------------

“It is a capital mistake to theorize before one has data. Insensibly one begins to twist facts to suit theories, instead of theories to suit facts."

Arthur Conan Doyle,  Sherlock Holmes

I am sure bad journalists existed in the late 19th and early 20th century England, but none that matched the crappyness of today's media. Nonetheless, Arthur Conan Doyle can surely be called a visionary. This is exactly what most journalists of today particularly in our country do, and mostly deliberately - they twist facts to suit theories, instead of theories to suit facts.

They keep chanting 2002, and proclaim someone as 'maut ka saudagar' and then begin weaving stories around their assumption. Then they sue bloggers who write the truth. And then they write books about how unquiet their motherland is. And then they curse when people pay them back in their own coin by giving them bad ratings on eCommerce sites without reading their book.

Fate, as they say, has strange ways of taking revenge. Even if it is in a superficial way as bad book ratings.

P.S. If the above post bears any resemblance to the recent Barkha Dutt outrage on Amazon, it is definitely intentional and not coincidental.

-----------------------------------------------------------------------------------------------------
मार्गशीर्ष शु. ८/९, शके १९३७

© Mandar Dilip Joshi

Saturday, December 19, 2015

नियतीचा सूड १: आरोपी क्रमांक एक हाजीर हो!

भूतपूर्व काँग्रेस अध्यक्ष श्री सीताराम केसरी आज समाधानाने हसत असतील.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या लवकरच होणार्‍या निवडणूकांची वाटही न बघता आत्ताच्या नॅशनल हेराल्ड केसमधल्या आरोपी क्रमांक एक सोनिया गांधींना काँग्रेस अध्यक्ष बनवण्याची घाई झालेल्या काँग्रेसच्या चाटू कार्यकर्त्यांनी तेव्हा सीताराम केसरी यांना बाथरूममधे कोंडून त्यांच्याकडून अध्यक्षपदाचा राजीनामा लिहून घेतला होता.

आता तीच ती, फॅसिस्ट मुसोलीनी समर्थक असलेल्या बापाची मुलगी, इटालियन मम्मी आणि तिचा मतिमंद मुलगा ह्या दोघांना त्यांच्यावरचा 'आरोपी क्रमांक अमुक अमुक' असल्याचा इतिहास कधीच पुसून टाकता येणार नाही.

नियतीचे सूड उगवण्याचे प्रकार किती विचित्र असतात नाही? मग कोर्टात फ्रॉडचे आरोपी म्हणून उभं राहणं आणि जामीन मिळणे इतकी क्षुल्लक बाब का असेना.

स्वामीजी की जय हो !

-----------------------------------------------------------------------------------------------------

Fate and it's revenge 1: Accused Number One Sonia Gandhi


Former Congress President Shree Sitaram Kesari must be very happy today.

His resignation was taken by shutting him up in a toilet, without even waiting for the party elections, to make way for the current Congress President and Accused Number One Sonia Gandhi.

Now, daughter of a Fascist aficionado the Italian Mummy and her retarded son will never be able to wash off their reputation as once being Accused Number so and so.

Fate has a way of taking revenge. Even if it is as superficial as getting bail.

Swamyjee Ki Jai Ho

-----------------------------------------------------------------------------------------------------
मार्गशीर्ष शु. ८/९, शके १९३७

© Mandar Dilip Joshi

Friday, January 24, 2014

मौत का सौदागर कुणाला म्हणावे मग?


गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदींना काही वर्षांपूर्वी मौत का सौदागर म्हटल्याने सोनिया गांधींवर चौफेर टीका झाली. मग रीतसर सारवासारव करण्यात आली. नुकतेच एका काँग्रेसी मंत्र्याने पंतप्रधान नरभक्षक नको असे खळबळजनक विधान केले.

तर गुजरातच्या दंगलींच्या वेळेला नरेन्द्र मोदी मुख्यमंत्री होते म्हणून त्यांच्यावर मौत का सौदागर असल्याचा आरोप केला जातो. पण जेव्हा ३०००+ शी़खांची हत्या झाली तेव्हा सरदहु दंगलींना प्रोत्साहन दिल्याचा आरोप हरकिशनलाल भगत, ललित माकन, जगदीश टायटलर व सज्जनकुमार यांच्यावर होता. यांच्याव्यतिरिक्त धरमदास शास्त्री (काँग्रेस), अर्जुनदास (काँग्रेस) व कमलनाथ (काँग्रेस) यांच्यावरही आरोप होते. १९९९ च्या निवडणुकीत वाचाळ मनमोहन सिंगांनी, 'या दंगलीत रा.स्व.संघाचा हात होता' असा धडधडीत खोटा आरोप केला होता. दंगलींनंतर पंतप्रधान राजीव गांधींनी "एक मोठे झाड पडते तेव्हा जमीन हादरतेच" असे बेजबाबदार विधान करुन शी़खांच्या जखमेवर मीठ चोळले होते. मग त्यांना हे मौ.का.सौ. हे विशेषण लावायला काँग्रेसवाले का विसरले?

आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या दंगलींत बहुसंख्य वेळेला भाजपेतर सरकारे......आणि बहुतेक ठिकाणी काँग्रेसचीच सरकारे व मुख्यमंत्री होते हे या यादीवरुन स्पष्ट आहे. अशांना का नाही मौ.का.सौ. असे विशेषण लागले? की देशपातळीवरच्या राजकारणात नरेन्द्र मोदी आपल्याला भविष्यात भारी पडू शकतात हे आधीच ओळखल्याने काँग्रेसची तंतरली? आता या सगळ्या दंगलींच्या वेळी मुख्यमंत्री असलेल्या सगळ्यांना मौत का सौदागर म्हणायला काँग्रेस तयार आहे का?