Saturday, September 7, 2013

काही मनातले


मी नुकतंच एका नास्तिक इसमास फेसबुकवर मित्रसूचीतून काढून टाकलं. नाही. मी त्याला तो नास्तिक आहे म्हणून काढलं नाही. प्रत्यक्ष आयुष्यात माझा मित्र तो कधीच नव्हता. पण त्याचं थोबाड रोज बघणं हा माझा नाइलाज आहे. तर कारण असं घडलं की गोकुळाष्टमीच्या काही दिवस आधी रस्त्यावरची पोस्टर बघून त्याच्या मुलाने म्हणे त्याला विचारलं राधा कृष्णाची कोण? तर त्याला म्हणे अवघडल्यासारखं झालं आणि म्हणे राधा कृष्णाची जवळची मैत्रिण. तो म्हणतो awkward mythology. त्यानंतर त्याच्या आणि त्याच्याचसारखी सडलेली विचारसरणी असलेल्या त्याच्या फेसबुकी मित्रांच्या घाणेरड्या पोस्टी वाचल्या. मी त्याला आणि त्या पोस्टवर आलेल्या काही खोडसाळ पोस्टींना प्रतिउत्तर दिल्यावर त्याला मी भगवी चड्डी घातली असल्याचा साक्षातकार झाला आणि त्याने आणखी काही तारे तोडले. त्याचं पर्यावसान मी त्याला माझ्या मित्रसूचीतून काढून टाकण्यात झालं.

माझं इतकंच म्हणणं आहे, की तुम्ही नास्तिक आहात, देव मानित नाही....त्या मताचा, त्या भावनेचा मी आदर करतो. मी तुम्हाला देव माना म्हणून समजवायला कधीच जाणार नाही, तसेच तुमच्या मताचा कधीही जाहीर कुचेष्टा किंवा अनादर करणार नाही. परंतु या नाण्याला अर्थातच दुसरी बाजू आहे अशी की तुम्ही माझा धर्म, देव, उत्सव, संस्कृती व तिचे अनेक पदर, त्या संदर्भातल्या असंख्य गोष्टी याबद्दलच्या माझ्या भावनांचाही आदर राखलाच पाहिजे. चिकित्सा म्हणून चर्चा करणे ठीक, पण वरील गोष्टींबद्दलची कुचेष्टा, अनादर, आणि त्या गोष्टींविषयीच्या कुचाळक्या मला चालणार नाहीत. तसे तुम्ही करणार असाल, तर फेसबुकावरुन तुम्ही स्वतःच मला तुमच्या मित्रसूचीतून काढून टाका. फेसबुकावरच नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यातूनही माझे मित्र राहू नका. न काढल्यास मला अशी फालतूगिरी केलेली दिसल्यास मीच काढून टाकेन. फेसबुकावरुन आणि प्रत्यक्ष आयुष्यातही. गणपतीबाप्पा तुम्हाला इतरांपेक्षा जास्तच सदबुद्धी देवो ही त्याच्या चरणी प्रार्थना. लवकर बरे व्हा. गेट वेल सून.

धन्यवाद.

- मंदार

ता.क. आणि हो, मी उद्या आणि परवा तुमच्यासारख्यांच्या नाकावर टिच्चून नारळही फोडणार आहे, बरं का!!

1 comment:

  1. मुळात ज्यांना धर्म म्हणजे काय आणि स्वधर्म कोणता याची निवड करता येत नाही त्यांचे विचार असे भलत्याच मार्गाने जातात. त्यांच्याशी प्रतिवाद करून आपली शांतता घालवण्यापेक्षा योग्य विचार व्यक्त करायचे नि बाजूला व्हायचे. कधी ना कधी ते त्यांना प्रत्ययाला येतातच.

    ReplyDelete