Wednesday, June 16, 2021

डावे म्हणजे कोण रे भाऊ?

अनेक जण विचारतात डावे म्हणजे कोण, ते कसे ओळखायचे? याचं पुस्तकी उत्तर देता येतं, डावे उजवे या शब्दांची उत्पत्ती सांगता येते, पण या संज्ञेचा अर्थ पटकन समजायला हवा असेल तर गोष्टीरूपाने किंवा उदाहरणाला पर्याय नाही.

नोवाक जोकोविच (Novak Djokovic) यंदाची फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा जिंकला. रविवारी झालेला सामना संपल्यावर लगेचच त्याने त्याची रॅकेट समोरच्या म्हणजे पहिल्या रांगेत बसलेल्या सामन्यादरम्यान सतत प्रोत्साहन देणाऱ्या आपल्या एका छोटूशा चाहत्याला भेट दिली. आपल्या लाडक्या खेळाडूने आपल्याला त्याची रॅकेट भेट दिली आणि ती सुद्धा कुठली, तर ज्या रॅकेटने खेळून फ्रेंच ओपन स्पर्धेचा अंतिम सामना जिंकला ती हे पाहून तो लहानगा चाहता जवळजवळ वेडा व्हायचा शिल्लक होता. या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल झाला नसता तरच नवल होतं.

Novak Djokovic at French Open

अमेरिकेत हा व्हिडीओ पसरल्यावर तिकडचे वेडसर डावे आणखी पिसाळले आणि नोवाकला सोशल मीडियावर घाल घाल शिव्या घातल्या. त्यांच्या मते नोवाकने रॅकेट भेट द्यायला शेवटच्या रांगेतील "गरीब" मुला ऐवजी पहिल्या रांगेतल्या श्रीमंत मुलाची निवड करून फार मोठा सामाजिक गुन्हा केला होता.

एका दिलदार खेळाडूने त्याच्या लहानग्या चाहत्याप्रती दाखवलेल्या निर्व्याज स्नेहातही डाव्यांना भेदभाव दिसला. आता कळलं डावे म्हणजे कोण, किंबहुना डावी मानसिकता म्हणजे काय, ते?

आता जरा त्यांची चिरफाड करूया:

(१) पहिल्या रांगेत बसणारा मुलगा हा शेवटच्या रांगेत बसलेल्या मुलापेक्षा श्रीमंत कसा? अनेक आईवडील आपल्या मुलांना असा सामना बघायला मिळावा म्हणून कष्टाचे पैसे साठवून तिकीट विकत घेतात.

(२) एखाद्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं तिकीट काढायची ऐपत असणारी किंवा ते परवडणारी व्यक्ती, ती शेवटच्या रांगेतील तिकीट काढून बसली आहे म्हणून "गरीब" कशी काय ठरते?

(३) हे म्हणजे आयफोन ११ घेणारी व्यक्ती ही गरीब आणि आयफोन १२ घेणारी व्यक्ती श्रीमंत आहे असं म्हणण्यासारखं आहे.

या डाव्यांना वेळीच ठेचलं नाही, तर जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत विष पेरणी करून ठेवतील. डाव्यांच्या रक्तातच वीष आहे आणि त्यांच्या रंध्रारंध्रातून वीष पाझरतं असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. अशा प्रकारे प्रत्येक नात्यात दमन, भेदभाव, वर्णभेद, सूक्ष्मभेद, शोषण यांचा शोध लावून विषपेरणी करून  समाजाची, कुटुंबव्यवस्थेची वीण उसवायचं काम ते करत आहेत आणि करत राहतील. नसलेला अन्याय शोधून आणि समाजात फूट पाडून त्यांना रोजी रोटी आणि फेमिनिस्ट बेटी यांची प्राप्ती होत असते.

डाव्यांपासून स्वतःला आणि आपल्या मुलांना वाचवा, शक्य तिथे आणि शक्य त्या मार्गांनी त्यांना ठेचा.

दुर्लक्ष केलं तर एके दिवशी तुमच्यावर नाकात बोटं घालून मेकुड काढताना तुम्ही एका नाकपुडीत जास्त उत्खनन करून दुसऱ्या नाकपुडीवर अन्याय केला आहे असंही सांगतील.

म्लेंच्छ-शेषो-वाम-शेषश्च सेंट-शेषस्तथैव च |
पुनः पुनः प्रवर्धन्ते तस्माच्छेषं न रक्षयेत् ||

🖋️ मंदार दिलीप जोशी
जेष्ठ शु. ६, शके १९४३


Saturday, May 22, 2021

आपण सगळे यिगल येहोशुआ

Yigal Yehoshua

हा फोटो ज्या व्यक्तीचा आहे त्या व्यक्तीचं नाव यिगल येहोशुआ होतं. 'होतं' म्हणजे तुम्हाला वाटतंय तेच, आता यिगलचा फोटो भिंतीवर आहे. इस्राइलच्या Lod शहराचा नागरिक असलेल्या या व्यक्तीला तिथे राहणाऱ्या अरब तरुणांनी दगडांनी ठेचून मारलं. यिगल येहोशुआ इस्राइलचे एक सामान्य नागरिक होते, आणि त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी, संस्थेशी, किंवा उपक्रमाशी (वाचा: कांडाशी) काडीमात्र संबंध नव्हता. वेगळ्या भाषेत सांगायचं तर यिगलला 'तटस्थ' म्हणता येईल.  यिगलचा मृत्यू अशा प्रकारे झाला नसता आणि नंतर कधीतरी नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू पावले असते तर आज त्यांचं नावही कुणाला कळलं नसतं. 

मग यिगल येहोशुआ नामक व्यक्तीच्या हत्येबाबत तुम्हाला काय आणि महत्वाचं म्हणजे का जाणून घेणं आवश्यक आहे?

त्यांना का मारलं म्हणजे त्यांना असं मारण्याबद्दल अरब लोकांचं काय मत आहे हे विचारलं गेलं तेव्हा एका अरब तरुणाने सांगितलं की हसौना (Hassouna) नामक एका अरब युवकाला गोळी घातली गेली त्याचा बदला म्हणून यिगलची अशी हत्या झाली. आम्ही जशास तसे 'न्यायाने' असाच सूड उगवत राहू!

ही त्या बातमीची लिंक https://tinyurl.com/dudyyps8. असंही 'Yigal Yehoshua' हे शब्द टाकून तुम्ही शोध घेतल्यास अनेक संकेतस्थळांवर ही बातमी आणि हा फोटो तुम्हाला सापडतील.

आता आपण पाहूया की या सध्या भासणाऱ्या घटनेचे विश्लेषण आवश्यक का आहे. कारण खरं तर फार सोपं आहे, पण हल्ली सोप्या गोष्टीच उलगडून सांगाव्या लागतात, आणि कठीण विषयांबद्दल लोकांचं मत आधिच बनलेलं असत! तर, या सध्या भासणाऱ्या घटनेचे विश्लेषण अत्यावश्यक आहे कारण यिगल येहोशुआ जसे सामान्य व्यक्ती होते तितक्याच सामान्य असलेल्या तुमच्या आमच्यासारख्यांशी याचा थेट संबंध आहे. इथे हे सांगताना यिगलला एक उदाहरण म्हणून वापरावं लागतंय हे त्यांचं दुर्दैव आहे. 

आधी हे लक्षात घ्या की यिगल जिथे मारले गेले ती जागा आणि तो भाग त्यांच्या नेहमीच्या वावरातला होता. ते आपल्या घरी किंवा ऑफिसला जे काही असेल तिथे जात होते, सांगण्याचा उद्देश हा की ये त्यांच्या नेहमीच्या रस्त्याने जात होते. त्याच मार्गावर त्यांना ठार केलं गेलं. याने काय होतं की सगळ्या 'टार्गेट ऑडियन्स' ला हा संदेश जातो की 'तुम्ही' 'आमच्यापासून' सुरक्षित नाही; आमची तुम्हाला मारून टाकण्याची इच्छा झाली तर जिथे सापडाल तिथे ठार करु. म्हणून तुम्ही आम्हाला सदैव घाबरून, आमच्या पासून सदैव दबून राहण्यातच शहाणपणा आहे.

आता स्मरणशक्तीला जरासा ताण देऊन पहा, हे जे 'जिथे सापडाल तिथे ठार करु' कुठेतरी वाचल्याचं किंवा ऐकल्याचं वाटतंय का? तसं वाटत असेल तर तुमचं बरोबरच आहे, तेच आणि तसंच आहे ते. त्या शिकवणीचा सार्वकालिक संदेश, अशा हत्या करणारे आपल्या कृतीतून व्यवस्थित समजवतात की बघा, तुम्ही आम्हाला जिथे सापडाल तिथे खलास करू. म्हणून आम्हाला घाबरून, दबून रहा. या शिकवणीला कुणाच्यातरी आत्मचरित्रात जेव्हा दैवी उपदेश म्हणून खपवलं जातं तेव्हा वेळीच त्याचा नायनाट न केल्यास त्याचे परिणाम भयंकर महागात पडतात. 

आपल्याकडे एक श्लोक आहे:
अग्नि: शेषं ऋण: शेषं शत्रु: शेषं तथैव च ।
ते पुन: पुन: प्रवर्धेत तस्मात् शेषं न कारयेत् ।।

इथे जिझिया कसा घ्यावा याचा उल्लेख आहे अशा 9:29 क्रमांकाच्या दुसऱ्या एका तथाकथित दैवी उपदेशाला समजून घेणं आवश्यक आहे. यात स्पष्टपणे म्हटलं आहे की ज्याला शत्रू मानलं आहे त्याच्या स्वाभिमानाचा चेंदामेंदा करावा; त्याच्याकडून फक्त एखादा कर वसूल करणे नव्हे तर शत्रूला कायम अपमानित आणि कमकुवत मानसिक स्थितीत ठेवायचं आहे की तुम्हाला हवं तसं त्याला लुटू शकाल, जेव्हा हवा तेव्हा आणि हवा तसा त्याचा अपमान करू शकाल पण त्याच वेळी शत्रूला त्या विरोधात न्याय मागण्याचा हक्कच असू नये. त्याची एकदम हिटलर किंवा स्टालिनच्या गोष्टीतील कोंबडी करून टाका.

हा तथाकथित दैवी उपदेश वाचल्यावर हिंदी सिनेमातल्या एका टिपिकल कथावस्तूची आठवण येते ज्यात बलात्कार होण्यापासून हिरो त्याच्या बहिणीला वाचवतो आणि त्या हाणामारीत बलात्कार करणारा मारला जातो म्हणून त्याचा भाऊ हिरोच्या संपूर्ण  खानदानाला मारून टाकतो. का, तर त्याच्या भावाला हीरोने मारलं म्हणून. म्हणजे त्याचा भाऊ हीरोच्या बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न करत होता हा अपराध, पाप आहे वगैरे गोष्टींना त्याच्या लेखी शून्य महत्व असतं ― पण आपला भाऊ हीरोने मारला याचा सूड म्हणून त्याच्या पूर्ण खानदानाला ठार करणे हा त्याला न्याय वाटतो. त्याची हीच मानसिकता आहे आणि ही मानसिकता येते तथाकथित दैवी उपदेश क्रमांक 9:29 मधूनच येते. 'उमर का सुलहनामा' म्हणून ओळखला जाणारा एक शांतीकरार (खिक्) याच मानसिकतेचं एक्सटेन्शन आहे ― इब्न कसीर ची तफ़सीर बघितली तर हे पटकन लक्षात येतं. कुणीही शोधून वाचू शकतं, फुकट आहे!

या पार्श्वभूमीवर हे लक्षात घ्या की मारला गेलेला उपरोल्लेखित हसौना नामक अरब तरुण हा दंगलीत सहभागी असताना मारला गेला होता, त्याच्या घरात घुसून त्याला कुणी मारलेलं नव्हतं. हमासने सोडलेल्या क्षेपणास्त्रांचे प्रत्युत्तर इस्राइलने द्यायला सुरुवात केली म्हणून इस्राइली नागरिक असलेल्या अरबांनीच पहिल्यांदा दंगली सुरू केल्या. या दंगलींचा त्रास सामान्य इस्राइली नागरिकांनाच (वाचा: ज्यू) होत होता. म्हणजे आपल्याकडे मिनी-पाकिस्तान असतात तसे तिकडे मिनी-पॅलेस्टाइन आहेत. 

तर, अरबांनीच पहिल्यांदा दंगली सुरू केल्या, त्याचं प्रत्युत्तर इस्राइलने द्यायला सुरुवात केली, त्यात दंगलीत सामील असलेला तो अरब तरुण हसौना मारला गेला ― पण तरी तो दोषी नाही बरं का! तरी त्याच्या मृत्यूचा बदला कशाशी काही संबंध नसलेल्या एका निष्पाप इस्राइली नागरिकाला मारून घेतला जातो आणि त्या हत्येला न्याय म्हटलं जातं तेव्हा त्या विचारांच्या चारित्र्याचे विश्लेषण करून ते समजून घेणं आवश्यक ठरतं. आणि त्याला तथाकथित दैवी शिकवण म्हटलं जातं हा आणखी एक क्रूर विनोदच म्हणायला हवा.

हे सगळं जाणून घेणं आपल्याला का गरजेचं आहे? 

कारण आपण सगळेच यिगल येहोशुआ आहोत. 

अन्याय सहन करणारा, अन्याय करणाऱ्यापेक्षा मोठा गुन्हेगार असतो. 

एक प्रयोग करून पहा, यिगल येहोशुआ यांची हत्या हा अन्याय आहे असं एखाद्या मिश्र ग्रुपात बोलून पहा. याच्यावर प्रतिक्रिया नक्कीच आश्चर्यचकित करणाऱ्या नसतील हे नक्की. अपेक्षितच प्रतिक्रिया असणार आहेत. तुम्हाला इनबॉक्सात गाठून पोस्ट किंवा मेसेज डिलीट करायला सांगणारा एखादा मोदींवर हिंदूंसाठी काहीही न केल्याचा मोदींवर सतत आरोप करणारा कट्टर हिंदुत्ववादीच निघायचा!

आणखी एक, जेक गार्डनरला विसरू नका बरं!

🖋️ मंदार दिलीप जोशी
माघ शु. दशमी, शके १९४३

टाइम्स हॅव चेंज्ड अर्थात कालाय तस्मै नमः

नुकताच कोकणात गावी गेलो होतो काही कामानिमित्त. आमच्या आणि शेजारच्या घराभोवती फेरफटका मारताना एक गोष्ट एकदम अंगावर आली. त्या निमित्त त्या क्षणी हे वाटलं ते मांडतोय. ते चूक की बरोबर यापैकी काहीच नाही. फक्त ते वाटलं, ते आहे इतकंच. 

जुनी खिडकी नवी खिडकी

जुना काळ म्हणजे नेमका किती वर्षांपूर्वीचा? काळ बदलला असं कधी म्हणता येतं? Age is just a number अर्थात वय हा फक्त एक आकडा आहे या वाक्याचा नक्की अर्थ काय? 

शारिरीक वयावर आपलं नियंत्रण नाही पण मनाने आपण म्हातारे होता कामा नये असं म्हणतात पण काही गोष्टी बघितल्या की अचानक मनाने आपण एकदम वीसेक वर्ष तरी मोठे झालोय की काय असं वाटत राहतं. 

डावीकडची खिडकी जुन्या पद्धतीच्या घराची तर उजवीकडची खिडकी पडझड व्हायला आलेल्या जुन्या घराला पाडून नव्याने बांधलेल्या घराची. 

आधुनिकतेला कधीच विरोध नाही पण अशा गोष्टी बघितल्या की कुठेतरी गलबलतं हे नक्की. अशाच खिडकीत बसून आजी/पणजी आम्हा मस्तीखोर मुलांना ओरडत असे, शेजारच्या घरातील अशाच खिडकीत बसलेल्या समवयस्क सखीशी सुखदुःखाच्या, शिळोप्याच्या गप्पा मारत असे. त्यांच्या गप्पा सुरु असताना घरातली सून पलीकडच्या खिडकीतल्या आजीला आपल्या आजेसासूच्या "बघा ना, या मुंबईहून पाठवलेलं औषध वेळेवर घेतच नाहीत" अशा प्रेमळ तक्रारी सांगत असे. लपाछुपी खेळताना पटकन लपायला आमच्यापैकी एखादा या गवाक्षातून आत जायचा प्रयत्न करत असे.

असो, काय काय आठवेल सांगता येत नाही. त्या आज्या, त्या पणज्या कधीच गेल्या. त्यांच्या नातसुना आता त्यांच्या सारख्या दिसू लागल्या. हे बदल घडतानाही काही विशेष वैषम्य वाटलं नाही, जसा काळ पुढे सरकेल तसं हे होणारच असं म्हणून मनाने स्वीकारलं. मग या दोन खिडक्यांकडे पाहून एकदम भावुक व्हायला का व्हावं? 

विचार करता करता अचानक डॉ राजीव मिश्रा यांची एक पोस्ट आठवली. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की माणसं महत्वाची नाहीत, संस्कृती आणि सभ्यता (civilization) महत्वाच्या आहेत, आणि ही गोष्ट मानवी मनात पिढ्यानपिढ्या कोरलेली आहे. डाव्या फोटोतली जुन्या घराचा अविभाज्य भाग असलेली खिडकी ही याच संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते. कदाचित म्हणूनच माणसांच्या मर्त्य असण्यापेक्षा गावाकडच्या अशा घरांचं हे असं आधुनिक होणं अपरिहार्य असलं तरी कुठेतरी मनाला झटका देऊन अचानक वीसेक वर्ष पुढं ढकलतं असं वाटतं.

उजवीकडची खिडकी नव्याने बांधलेल्या घराची. या खिडकीतून आता आजी, पणजी डोकावणार नाही. फार फार तर तिचा खापरपणतू किंवा पणती मोबाईलला रेंज येते आहे की नाही बघायला येतील खिडकीत, गावाकडे कधी आलेच तर. असाही हल्ली अनेकांचा फक्त मालमत्तेवर दावा कायम ठेवण्यापुरता संबंध असतो गावाशी. त्यांच्या लेखी ते आपलं घर, आपली वाडी नसते, तर सतत सोयीनुसार आधुनिक करत राहण्यायोग्य आणि आपला क्लेम ठेवण्यायोग्य 'प्रॉपर्टी' असते. पण विषयांतर नको.

काळ पुढे सरकला, बदलला असं नेमकं कधी म्हणता येतं हे नाही ठाऊक, पण असे बदल बघितले की माझ्या तरी अंगावर येतात हे नक्की. आपण "शहरातून" "गावाकडे" येतो ते "गावात" रहायला. आपण आपल्या संस्कृतीच्या मुळांकडे आकर्षिले जात असतो. पण गावच आता शहर (खरेतर शहरी!) बनत चाललं आहे हे झेपत नाही.

गोष्टी घडल्या म्हणून काहीच बिघडत नाही, पण बघवतही नाही. गोष्टी आधीही बदलत होत्या, पण आता त्यात भावुकतेला स्थान नाही. 

खरंच आहे, टाइम्स हॅव चेंज्ड.

🖋️ मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. ९ (सीता नवमी), शके १९४३

Tuesday, April 13, 2021

मालिका, शब्द, आणि आपण

एका समूहावर कुणीतरी प्रश्न विचारला होता, तो साधारणपणे असा होता की त्रागा वगैरे ठीक आहे पण या मालिकांचा मनावर आणि प्रत्यक्ष आयुष्यावर परिणाम होतो का?

तर नक्कीच होतो. या संदर्भात विचार करत असताना मला कुणीतरी शेअर केलेली प्राजक्ता कणेगावकर यांची पोस्ट आठवली. त्यात त्यांनी मारी कॉंडो म्हणून एक जगप्रसिद्ध कन्सल्टंट आहे त्यांच्या बाबतीत लिहिलेला तपशील आठवला. 

"मारी कॉंडो लोकांना घर कसं आवरावं याचं कन्सल्टेशन देते. तिचं यावर एक छान पुस्तकही आहे, ज्यात तिने एक अप्रतिम किस्सा सांगितला आहे. एका क्लायंटचं घर तिनं छान आवरुन दिलं. काही दिवस गेल्यानंतर तिला क्लायंटचा फोन आला की घरात अशांत वाटतंय. मारी जरा चक्रावली. कारण असं याआधी कधी झालं नव्हतं. ती क्लायंटच्या घरी पोचली तेव्हा तिलाही घरातून अशांत व्हाईब्ज जाणवल्या. तिने घरभर हिंडून पाहिलं. पसाऱ्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी तिने घरातली कपाटं उघडली. मग तिला कळलं की अशांततेचं मूळ कुठे आहे ते. प्रत्येक कपाटातल्या प्रत्येक वस्तूवर, स्टोरेजचे बॉक्सेस, बरण्या, कंटेनर्सवर लेबल्स लावलेली होती. स्वयपाकघरात तर प्रत्येक भांड्यावर डब्यावर लेबल चिकटवलेलं होतं."

"मारीने ती सगळी लेबल्स काढायला लावली. तिने पुढे असं लिहिलं आहे की शब्द प्रत्यक्ष उच्चारला गेला नाही तरी तो वाचला जातो. नजर त्याची दखल घेते. मेंदू त्याचं प्रोसेसिंग करतो. ही जी प्रक्रिया अव्याहत चालू असते, त्याने नाद होतो, आवाज होतो, त्याने शांतता ढवळली जाते. घरात पसारा असेल तर हे शब्द ऐकू येत नाहीत कारण बाकीच्या गोष्टींच्या नादामध्ये त्यांचे नाद लपून जातात (पण असतात). घर रिकामं झाल्याने त्यांचा नाद, आवाज अधिक सुस्पष्ट ऐकू येऊ लागला इतकंच. त्यामुळे तिने लेबल्स काढली. क्लायंटने नंतर तिचं म्हणणं मान्य केलं."

सतत शब्द आदळत असतात आपल्यावर सगळीकडून. मालिकांतून तर आपल्यावर दुहेरी अत्याचार होत असतो, दृक्श्राव्य असा. अत्यंत हीन दर्जाचे संवाद असलेल्या, ज्यांत सतत कटकट, भांडणे, कारस्थाने, कुणीतरी कुणावर तरी सतत खार खाऊन आहे, सतत अतिरेकी आणि विकृत हावभाव करणाऱ्या आणि विचित्र कपडे वापरणाऱ्या व्यक्तिरेखा ज्यांत आहेत अशा मालिकांचा भडीमार इच्छुक प्रेक्षकांवर आणि अनिच्छेने बघणाऱ्या कुटुंबियांवर सुरू असतो. अनेक जण यावर अनेक उपाय सुचवत असतात त्यातला एक की आपण दुसऱ्या खोलीत जाऊन बसावं... मारी कॉंडोने पुस्तकात सांगितलेला किस्सा आठवला तर यातली गडबड लक्षात येते. ती म्हणजे दुसऱ्या खोलीत बसलं तरी घरात तो नाद जाणवत राहतोच. याच नकारात्मक नादाचा परिणाम हा कळत नकळत बघणाऱ्या प्रेक्षकांवर होतच असतो आणि त्याचा परिणाम इतरांशी त्यांच्या असलेल्या वागण्यात झाल्याचं दिसून येतं.

एका मालिकेत मामा आणि भाचीचं प्रेम प्रकरण दाखवलं होतं. आता यात एक गोम आहे. हे देशातल्या काही भागांत सामान्य आहे. पण सगळ्याच भागात नाही. पण याच्या पासून सुरवात करत हळू हळू हे इतर नात्यांपर्यंत वाढवत नेलं जाऊ शकतं. उद्या सख्खे भाऊ बहीण प्रेमात पडताना दाखवले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

कारण जवळजवळ प्रत्येक वाहिनीवर एखादी तरी मालिका अशी आहे की जिच्यात एखादी वाईट किंवा विचित्र गोष्ट (aberration) समाजात घडत असेल तर ती तशीच म्हणजे सामान्य किंवा नॉर्मल नाही हा संदेश जाण्याऐवजी त्याचं अशा प्रकारे सामान्यीकरण (normalisation) आणि त्या गोष्टीला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जोमाने सुरू आहे.

एका मालिकेत विवाहबाह्य संबंधांचं चित्रण होतं. मालिकेबाबत जास्त चर्चा नको, पण घटस्फोट देऊन नवऱ्याला लाथ मारून बाहेर काढायच्या ऐवजी जिच्याशी लफडं असतं त्या बाईला धडा शिकवायच्या नावाखाली तिच्याबरोबर एकाच घरात राहणारी बायको आणि तिला साथ देणारी सासू दाखवून झीने नक्की काय साधलं? विवाहबाह्य संबंध असतात समाजात, पण नवरा त्याच्या लफडयाबरोबर त्याच घरात एकाच बेडरूममध्ये राहतो आणि बायकोही मुलाबरोबर आणि सासुसासऱ्यांबरोबर त्याच घरात हळदीकुंकू, त्या लफडयाची चेष्टा करत मजा मजा करत राहतात हे काहींना बघायला विनोदी वाटत असलं तरी हे एका सामाजिक विकृतीचं उदात्तीकरण नव्हे का?

दुसऱ्या एका वाहिनीवर उंच, गोरी आणि सुंदर मुलगी आणि बुटका आणि अत्यंत सामान्य दिसणारा, फारसा कर्तबगार नसणारा मुलगा अशी जोडी दाखवली आहे. आणखी एका मालिकेत एक लग्नाळू मुलगा घरातल्या मोलकरणीशी सूत जमवून लग्न करताना दाखवला आहे.

ज्या सुबोध मालिकेची इथे अजूनही यथेच्छ चेष्टा सुरू असते, त्यात तरी वेगळं काय दाखवलं आहे? श्रीमंत पण चाळीशी केव्हाच उलटून गेलेल्या विधुराच्या जवळजवळ गळ्यात पडून लग्न जमवणारी विशीतली तरुणी. उद्या चांगल्या घरातल्या तरुणींना आपल्या आसपास एखाद्या बऱ्यापैकी पैसेवाल्या पण वयाने पंधरा वीस वर्षे मोठ्या असलेल्या पुरुषाला पत्नीवियोग झाल्याचं समजल्यावर त्या पुरुषात त्या मुली आपला भावी नवरा पाहू लागल्या तर त्याला जबाबदार असणाऱ्या कारणांत या मालिकांचा नंबर नक्कीच वरचा असेल.

मागे एका तरुणांच्या मालिकेत मुलं आणि मुली एकाच घरात भाड्याने राहत असल्याचं दाखवलं होतं. ही मुलं प्रामाणिक, उद्यमशील वगैरे दाखवण्याच्या आडून असं मुलामुलींनी एकत्र राहणं हे सामान्य असल्याचं किंवा सामान्य असायला हवं असं सुचवण्यात मालिकेने कोणतीही कसर सोडलेली नव्हती.

तीच तीच सासू सुनेची भांडणं दाखवून कंटाळा आला म्हणून की काय एकाच कुटूंबातले बाकीचे सदस्य पण एकमेकांच्या विरोधात उठता बसता सतत कारस्थानं करत असताना दाखवले जाऊ लागले. एकमेकांचा सत्यानाश करण्याच्या जेवढ्या योजना दर क्षणाला त्यांच्याकडे बनत असतात तेवढ्या तर राजकारणातले लोक सुद्धा करत नसतील. एका मालिकेत तर आजी नातवाचा जीव घ्यायला तत्पर असल्याचं दाखवलं होतं. त्याच मालिकेत बहीण बहिणीचा जीव घ्यायचा प्रयत्न करते, भाऊ भावाचा, आणि बरंच काही.

संत तुकाराम हा चित्रपट पाहून कुणी संत होत नाही, आणि एखादा डाकूपट पाहून कुणी दरोडेखोर होत नाही हे वाक्य डायलॉग म्हणून तोंडावर मारायला ठीक आहे, पण दृश्य माध्यमांचा परिणाम जनमानसावर किती होतो याची प्रत्यक्ष उदाहरणे आजूबाजूला घडताना पाहिलेली आहेत.

धर्मेंद्रचा जुगनू चित्रपट दोन डझन वेळा पाहून त्यातल्या दरोड्याच्या दृष्याबरहुकूम तसाच दरोडा आपण घातल्याची कबूली आरोपींनी पोलिसांना दिली होती. सैराट सिनेमा प्रदर्शित झाल्यावर नुकतंच मिसरूड फुटलेल्या अनेक किशोरवयीन मुलांनी घरातून पळून गेल्याच्या बातम्यांत वाढ झालेली होती.

सिनेमाचा परिणाम जो आणि जेवढा होतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक मालिकांत होतो, आणि होतही आहे. रोज त्याच गोष्टींचा मारा सुरू असतो, आणि कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी संपूर्णपणे तो यशस्वी होत नाही. दुर्दैवाने अशा मालिकांचा प्रेक्षकवर्ग अशा पिढीतला आहे की जी स्वतः कर्तबगार आहे पण मनोरंजनासाठी म्हणून सुरवात करून त्याचं व्यसन कधी झालं हे तिला कळलेलंच नाही.

समाजात संस्कृती, प्रकृती, आणि विकृती हे एका विशिष्ट प्रमाणात असतात. प्रमाण व्यस्त झालं तरी शेवटी विकृती ही विकृतीच राहते. दुर्दैवाने मालिकांत मात्र या विकृती किंवा विचित्र गोष्टींचं सामान्यीकरण सुरू असल्याचं दिसतं. याला हळूहळू प्रतिष्ठा प्राप्त होईल. एक प्रकारचं ब्रेनवॉशिंगच आहे, आणि त्यातून आपण लवकरात लवकर बाहेर पडायलाच हवं.

न्यायदेवता आंधळी असते कारण तिला निष्पक्षपणे विचार करायचा असतो, तसंच पण जरा वेगळ्या अर्थाने घराबद्दल म्हणायचं झालं तर वास्तूही आंधळ्या व्यक्तीसारखी असते, तिला हे कळत नसतं की आवाज कोणाचे आहेत, खरे आहेत की खोटे आहेत, टिव्हीतून येत आहेत की प्रत्यक्ष माणसांच्या तोंडून. म्हणून आपण घरात निव्वळ काय बोलतो इतकंच नव्हे तर टीव्हीवर काय बघतो हे देखील तितकंच महत्वाचं ठरतं.

स्टुडिओत आठ आठ तास घोटवून घेतलेल्या गाण्याला आपण गायकांची....नव्हे स्पर्धकांची गायकी समजतो आणि अर्धवट ज्ञानाने पिवळे झालेले परीक्षक ज्या तोंड फाटेस्तोवर स्तुतीपर स्क्रिप्टेड प्रतिक्रिया देतात त्यांना खरं समजतो, आणि कोण जिंकणार हे ही आधीच ठरलेलं असलं तरी खरोखर सुंदर गाणारा स्पर्धक जिंकला/ली नाही तर वाईटही वाटून घेतो आणि त्यावर हिरीरीने चर्चाही करतो. हा ही एक प्रकारचा नकारात्मक नादच नव्हे का?! शिवाय, आपण दर्जेदार गायनाला मुकतो आहोत आणि गेली अनेक वर्ष आपली अलिखित राष्ट्रीय पॉलिसी असलेले दोन शब्द 'चलता है' छाप गायकीचा सदोष नाद आपल्या मनात साठवत जात आहोत.

गेमिंग अर्थात कॉम्पुटर/मोबाईल गेम्समध्ये जी मानसशास्त्रीय क्लृप्ती वापरली जाते तीच थोड्याफार फरकाने मालिकांत वापरली जाते. गेमिंगमध्ये कितीही अवघड गेम असला तरी खेळणाऱ्या व्यक्तीला अधूनमधून लहानसहान विजयांचं गाजर दाखवून सतत गेम खेळायला भाग पाडलं जातं, तसंच मालिकांच्या जवळजवळ प्रत्येक भागाच्या शेवटी उद्या म्हणजे पुढच्या भागात काय होणार आहे याचं औत्सुक्य चाळवून त्यावर विचार करण्यास आणि पुन्हा पुढे बघण्यास प्रवृत्त केलं जातं. 

मालिकांच्या बाबतीत एका मानसशास्त्रज्ञाचं विधान आठवलं, ते हे की मालिका या चित्रपटापेक्षा जास्त धोकादायक असतात कारण त्याने मनाला क्लोजर मिळत नाही. सिनेमात कथेचं वर्तुळ पूर्ण झाल्याने प्रेक्षकांना क्लोजर मिळतं, ते असंख्य भाग असलेल्या मालिकांतून मिळणं अशक्य असतं. क्लोजर न मिळाल्याने मानसशास्त्रीय विसंगती निर्माण होते आणि त्यातूनच सतत तोच नकारात्मक नाद मनात घेऊन आपण दिवसाचा शेवट करत असतो. काम कितीही असो किंवा नसो आजकाल जाणवणाऱ्या प्रचंड स्ट्रेस किंवा मानसिक थकव्याचं हे देखील एक मोठं कारण आहे असं वाटतं.

यातून बाहेर कसं पडायचं हा मात्र अवघड प्रश्न आणि खोल विषय आहे. मालिका नव्हत्या तेव्हा लोक जे करत होते ती परिस्थिती आणि सामाजिक वातावरण आज उरलेलं नाही आणि आज ही अवस्था आहे की मुलांच्या जडणघडणीकडे लक्ष देण्यापेक्षा, त्यांच्याशी संवाद वाढवण्यापेक्षा इतरांची आई काय करते आणि आपल्या फिटनेसची काळजी करण्यापेक्षा मालिकेतल्या वजनदार मुलीचं लग्न का ठरत नाही याची काळजी लोक जास्त करत असतात. 

कणेगावकर त्यांच्या लेखात पुढे एक उदाहरण देताना म्हणतात की "सप्तशतीमध्ये शु़ंभ दैत्याच्या मृत्युसमयाचं वर्णन करताना एक खूप सुंदर वाक्य वापरलं आहे. दिग्जनित शब्द शांतावला असं. इथे शब्द कोलाहल या अर्थी वापरला आहे. Sound is indestructible असं असलं तरी शब्द शांतवण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचा मार्ग शोधणं म्हणूनच फार गरजेचं झालं आहे."

तर असा मार्ग शोधण्यासाठी गुढीपाडवा हा त्याची सुरवात करण्याचा दिवस ठरो अशा तुम्हाला या सणाच्या निमीत्ताने खूप शुभेच्छा.

🖋️ मंदार दिलीप जोशी
चैत्र शुक्ल प्रतिपदा, शके १९४३ अर्थात गुढीपाडवा

Sunday, March 28, 2021

इतिहासाचा मृत्यू

"For historians ought to be precise, truthful, and quite unprejudiced, and neither interest nor fear, hatred nor affection, should cause them to swerve from the path of truth, whose mother is history, the rival of time, the depository of great actions, the witness of what is past, the example and instruction of the present, the monitor of the future."

- Author Unknown

विशिष्ट अभिनिवेश व काही घटकांबद्दल द्वेष मनी धरून समाजात वावरणारे लोक यांचाच आवाज आज मोठा आहे आणि त्यांना राजकीय पाठिंबाही आहे. अशा लोकांची इच्छा सत्य जाणून घेणे नाही तर निव्वळ हुल्लडबाजी आणि गुंडगिरी करणे इतकीच असते आणि त्यांच्यासमोर डोकं आपटत बसण्यापेक्षा लिहिणं बंद करणं हा निर्णय आज अनेक चांगल्या इतिहास संशोधक व लेखकांनी घेतलेला आहे. आज खलनायकांना सद्गुणांचा पुतळा तर नायकांचं चारित्र्य संशयास्पद ठरवण्याची कारस्थानं व्यापक पातळीवर सुरू असताना सत्याचे आवाज एकामागोमाग एक असे बंद होणं या गोष्टीची किंमत केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला चुकवावी लागणार आहे.

तैलबुद्धी समोर बैलबुद्धी बलवान असण्याचाच हा समय आहे, दुर्दैवाने.

خردمندى را که در زمرة اوباش سخن ببندد شگفت مدار که آواز بربط با غلبهُ دهل بر نیاید و بوی عبیر از گند سیر فرو ماند 

खुर्दमंदी रा ‌के दर ज़मुरत ए औबाश सुखन बबंदद शिगुफ्त मदार के आवाज़ ए बर‌बत बा घलबीए दुहुल बर नियायद व बु ए अबीर अज़ गंद ए सैर फरु मांद

Don't be surprised by a wise man who is silenced by the vulgar, for the sound of a lute cannot compete with the boom of a drum, and the scent of ambergris is overwhelmed by the stench of garlic.

एखाद्या शहाण्या माणसाला मुर्ख आणि असभ्य माणसांनी गप्प बसवले तर त्याचे आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण ढोलाच्या कर्कश्य आवाजापुढे सतारीचे स्वर्गीय स्वर ऐकू येत नाहीत आणि कस्तुरी सारखा उच्च सुगंध देखील लसणाच्या घाणेरड्या आणि उग्र दर्पा पुढे मार खातो !

~ शेख सादी शिराझी याच्या 'गुलिस्तान' मधून

शेख शिराझी याच्या 'गुलिस्तान' मधून आणखी एक:

A great man was asked, "With all the superiority the right hand has, why do people put rings on their left hands!"
He replied, "Don't you know that the learned are always deprived ! "

एका महान माणसाला एकाने विचारले, "उजवा हात शक्तिशाली असून देखील लोक डाव्या हातात अंगठी का घालतात?"

यावर तो महान माणूस उत्तरला, "विद्वान माणसाची नेहमी उपेक्षा होते हे तूला ठाऊक नाही का?"

~ शेख सादी शिराझी याच्या 'गुलिस्तान' मधून

🖋️ मंदार दिलीप जोशी, सत्येन वेलणकर

Friday, March 26, 2021

स्टॅन स्वामी या शहरी नक्षलवाद्याला जामीन नाकारल्यावर चर्चच्या बुडाला का आग लागावी?

तीनच दिवसांपूर्वी शहरी नक्षलवादी स्टॅन स्वामीला नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (NIA) विशेष न्यायालयाने जामीन नाकारला

Ernakulam Angamaly Archdiocese

त्यावर स्टॅन स्वामीला जामीन नाकारणे हे धक्कादायक असल्याचे 'Ernakulam Angamaly Archdiocese' चे म्हणणे आहे. स्टॅन स्वामी या शहरी नक्षलवाद्याला जामीन नाकारल्यावर 'सथ्यदीपम' या 'एरनाकुलम अंगमली Archdiocese' प्रकाशित करत असलेल्या साप्ताहिकाच्या भावी संपादकीयात चर्चने गरळ ओकली असल्याचे समजते. चर्चची निष्ठा कधीच भारत व भारताच्या संविधानाप्रती नसून परदेशी कायदे आणि दस्तैवजांप्रती असते. चर्चने हीच परधर्जिणी वृत्ति दाखवून देत म्हटलं आहे की "नागरिक व नागरिकांचे हक्क हे सर्वप्रथम असून तसा उल्लेख १५ जून १२१५ रोजी प्रकाशित झालेल्या मॅग्ना कार्टा (Magna Carta of 1215) मध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे."

आता एरनाकुलम अंगमली Archdiocese उदाहरण देत असलेले Magna Carta काय आहे? ते भारतीय संविधान आहे का? तर नव्हे. राजेशाहीच्या अनिर्बंध अधिकारांच्या विरोधात काही सरदारांनी पुकारलेल्या बंडात इन्ग्लंडचा राजा जॉन याच्याकडून एका जाहीरनाम्यावर सही करवून घेण्यात आली त्या जाहीरनाम्याचं नाव Magna Carta होतं. आता इंग्लंडमध्ये आपापसात सुरु असलेल्या राजकीय/धार्मिक संघर्षाचा परिपाक म्हणून इन्ग्लंडच्या राजाने सही केलेल्या जाहीरनाम्याचा उल्लेख व उदाहरण हे भारतात एका शहरी नक्षलवाद्याला जामीन नाकारण्याच्या विरोधातला मुद्दा म्हणून चर्चने दाखवावा यातच त्यांची परधर्जिणी वृत्ती स्प्ष्ट होते. पण प्रकरण केवळ इतकंच नाही, तर Magna Carta मध्ये जी कलमं नमूद केलेली होती त्यातल्या एका कलमाकडे आपलं लक्ष गेलं पाहीजे. Magna Carta मध्ये अनेक गोष्टींच्या हमी राजाकडून घेण्यात आली त्यातली एक महत्त्वाची आणि पहिली म्हणजे "चर्चचे अधिकार अबाधित राहतील" ही होती. हे तथ्य वाचल्यावर चर्चचे दाखवायचे दात हे वरकरणी नागरिक व नागरिकांचे हक्क यांचे रक्षण हे असले तरी अंतस्थ हेतू हे चर्चच्या हितसंबंधांचे रक्षण हे आहे. आता नक्षलवाद्यांच्या बाजूने बोलल्यावर चर्चच्या हितसंबंधांचे रक्षण कसे होते यावर आंतरजालावर थोडं संशोधन केलं तरी वाचकांना हा मुद्दा स्प्ष्ट होईल. 

पुढे जाऊन चर्च म्हणतं — "भारतावर आता फॅसिस्ट विचारधारेच्या लोकांचे राज्य असून फॅसिस्ट राज्यात राष्ट्र हे सर्वप्रथम असतं आणि कायदे बनवण्याचा मूलभूत हेतू हा राष्ट्राचे सार्वभौमत्व राखणे हा असतो. अशा परिस्थितीत मतभिन्नतेचे मार्ग खंडित केले जातात."

ही वाक्ये वाचताच यातला फोलपणा आणि भंपकपणा लक्षात येतो. जणू काही राष्ट्र प्रथम हा काही गुन्हाच आहे आणि त्याच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणाची तरतूद करणं हा त्याहून मोठा गुन्हा असावा अशा थाटात हे लिहीलं गेलं असावं हे स्प्ष्ट आहे. 

यावर कोर्टाने स्टॅन स्वामीला जामीन नाकारताना काय भाष्य केलं आहे ते बघणं महत्त्वाचं ठरतं. जामीन नाकारण्याची कारणे देताना न्यायालय म्हणतं की "वैय्य्क्तिक स्वातंत्र्य / व्यक्तिस्वातंत्र्यापेक्षा समाजाचं व्यापक हित हे महत्त्वाचं आहे (‘Community interest outweighs right of personal liberty’). थोडक्यात, व्यक्तिस्वातंत्र्य हे समाजहिताच्या आड येत असेल किंवा समाजहिताला बाधा पोहोचवत असेल तर योग्य व कायदेशीर तरतूदींनुसार व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने घालणे हे न्यायसंगत ठरते असे न्यायालयाने स्प्ष्टपणे नमूद केले आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (NIA) विशेष न्यायाधिशांनी नोंदवलेल्या मतानुसार "आरोपीवर असलेल्या आरोपांचे गांभीर्य योग्य परिप्येक्ष्यात बघितलं तर असं म्हणण्यास कारण आहे की समाजहित हे वैयक्तिक स्वातंत्र्यापेक्षा महत्त्वाचं ठरतं, आणि म्हणूनच आरोपीचं खूप वय झालेलं असणं आणि त्याचा तथाकथित आजार हे या याचिकेवरचा निर्णय त्याच्या बाजूने जाण्यास पुरेसे ठरत नाहीत. न्यायालयाने पुढे असंही म्हटलं आहे की समोर आलेल्या पुराव्यांनुसार अर्जदार आरोपीवर असलेले आरोप हे प्रथमदर्शनी सत्य असल्याचे दिसते, तसेच स्टॅन स्वामी व इतरांनी "शक्ती प्रदर्शन करुन देशात अस्थिरता पसरवण्याचा व सरकार उलथवण्याचा कट रचला". तसेचसमोर असलेल्या पुराव्यांनी हे स्प्ष्ट होत आहे की अर्जदार हा निव्वळ बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) पक्षाचा सक्रीय सदस्यच होता असे नव्हे तर त्याने पक्षाची घातक ध्येयधोरणे पुढे नेण्याचाही प्रयत्न केला, आणि ते काम म्हणजे भारतीय लोकशाही उलथून लावणे हा होय. दुर्दैवाने न्यायालयाने कॅरॅवॅन या संकेतस्थळावर न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश मात्र दिले नाहीत., पण तो वेगळा आणि आणखी मोठा विषय आहे.

थोडक्यात:
(१) जामीन नाकारण्याच्या निर्णयाला विरोध करताना विदेशी जाहीरनाम्याचे उदाहरण देणे परधर्जिणेपणा अधोरेखित करते.
(२) त्या जाहीरनाम्यात 'चर्चच्या अधिकारांचे रक्षण' हे एक महत्त्वाचे कलम असताना शहरी नक्षलवाद्याची भलामण आणि चर्चचे हितसंबंध गुंतलेले आहेत याची अप्रत्यक्ष कबूली चर्चने दिली आहे.
(३) या पार्श्वभूमीवर चर्चवर चौकशी का बसवू नये यासाठी सरकारवर राष्ट्रवादी पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच हिंदू संघटनांनी दबाव टाकायला हवा.

आता ३१ मार्च रोजी 'सथ्यदीपम' या 'एरनाकुलम अंगमली Archdiocese' यांच्या साप्ताहिकात 'फॅसिझमचे भारतीय मॉडेल' ‘The Indian Model of Fascism’ या शीर्षकाखाली प्रकाशित होणार्‍या संपूर्ण संपादकीयाची विशेष अन्वेषण करुन चर्चची चौकशी आरंभ करावी अशी इथे केंद्रीय गॄह खात्याला विनंती. 

© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु १२/१३, शके १९४२