Tuesday, April 13, 2021

मालिका, शब्द, आणि आपण

एका समूहावर कुणीतरी प्रश्न विचारला होता, तो साधारणपणे असा होता की त्रागा वगैरे ठीक आहे पण या मालिकांचा मनावर आणि प्रत्यक्ष आयुष्यावर परिणाम होतो का?

तर नक्कीच होतो. या संदर्भात विचार करत असताना मला कुणीतरी शेअर केलेली प्राजक्ता कणेगावकर यांची पोस्ट आठवली. त्यात त्यांनी मारी कॉंडो म्हणून एक जगप्रसिद्ध कन्सल्टंट आहे त्यांच्या बाबतीत लिहिलेला तपशील आठवला. 

"मारी कॉंडो लोकांना घर कसं आवरावं याचं कन्सल्टेशन देते. तिचं यावर एक छान पुस्तकही आहे, ज्यात तिने एक अप्रतिम किस्सा सांगितला आहे. एका क्लायंटचं घर तिनं छान आवरुन दिलं. काही दिवस गेल्यानंतर तिला क्लायंटचा फोन आला की घरात अशांत वाटतंय. मारी जरा चक्रावली. कारण असं याआधी कधी झालं नव्हतं. ती क्लायंटच्या घरी पोचली तेव्हा तिलाही घरातून अशांत व्हाईब्ज जाणवल्या. तिने घरभर हिंडून पाहिलं. पसाऱ्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी तिने घरातली कपाटं उघडली. मग तिला कळलं की अशांततेचं मूळ कुठे आहे ते. प्रत्येक कपाटातल्या प्रत्येक वस्तूवर, स्टोरेजचे बॉक्सेस, बरण्या, कंटेनर्सवर लेबल्स लावलेली होती. स्वयपाकघरात तर प्रत्येक भांड्यावर डब्यावर लेबल चिकटवलेलं होतं."

"मारीने ती सगळी लेबल्स काढायला लावली. तिने पुढे असं लिहिलं आहे की शब्द प्रत्यक्ष उच्चारला गेला नाही तरी तो वाचला जातो. नजर त्याची दखल घेते. मेंदू त्याचं प्रोसेसिंग करतो. ही जी प्रक्रिया अव्याहत चालू असते, त्याने नाद होतो, आवाज होतो, त्याने शांतता ढवळली जाते. घरात पसारा असेल तर हे शब्द ऐकू येत नाहीत कारण बाकीच्या गोष्टींच्या नादामध्ये त्यांचे नाद लपून जातात (पण असतात). घर रिकामं झाल्याने त्यांचा नाद, आवाज अधिक सुस्पष्ट ऐकू येऊ लागला इतकंच. त्यामुळे तिने लेबल्स काढली. क्लायंटने नंतर तिचं म्हणणं मान्य केलं."

सतत शब्द आदळत असतात आपल्यावर सगळीकडून. मालिकांतून तर आपल्यावर दुहेरी अत्याचार होत असतो, दृक्श्राव्य असा. अत्यंत हीन दर्जाचे संवाद असलेल्या, ज्यांत सतत कटकट, भांडणे, कारस्थाने, कुणीतरी कुणावर तरी सतत खार खाऊन आहे, सतत अतिरेकी आणि विकृत हावभाव करणाऱ्या आणि विचित्र कपडे वापरणाऱ्या व्यक्तिरेखा ज्यांत आहेत अशा मालिकांचा भडीमार इच्छुक प्रेक्षकांवर आणि अनिच्छेने बघणाऱ्या कुटुंबियांवर सुरू असतो. अनेक जण यावर अनेक उपाय सुचवत असतात त्यातला एक की आपण दुसऱ्या खोलीत जाऊन बसावं... मारी कॉंडोने पुस्तकात सांगितलेला किस्सा आठवला तर यातली गडबड लक्षात येते. ती म्हणजे दुसऱ्या खोलीत बसलं तरी घरात तो नाद जाणवत राहतोच. याच नकारात्मक नादाचा परिणाम हा कळत नकळत बघणाऱ्या प्रेक्षकांवर होतच असतो आणि त्याचा परिणाम इतरांशी त्यांच्या असलेल्या वागण्यात झाल्याचं दिसून येतं.

एका मालिकेत मामा आणि भाचीचं प्रेम प्रकरण दाखवलं होतं. आता यात एक गोम आहे. हे देशातल्या काही भागांत सामान्य आहे. पण सगळ्याच भागात नाही. पण याच्या पासून सुरवात करत हळू हळू हे इतर नात्यांपर्यंत वाढवत नेलं जाऊ शकतं. उद्या सख्खे भाऊ बहीण प्रेमात पडताना दाखवले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

कारण जवळजवळ प्रत्येक वाहिनीवर एखादी तरी मालिका अशी आहे की जिच्यात एखादी वाईट किंवा विचित्र गोष्ट (aberration) समाजात घडत असेल तर ती तशीच म्हणजे सामान्य किंवा नॉर्मल नाही हा संदेश जाण्याऐवजी त्याचं अशा प्रकारे सामान्यीकरण (normalisation) आणि त्या गोष्टीला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जोमाने सुरू आहे.

एका मालिकेत विवाहबाह्य संबंधांचं चित्रण होतं. मालिकेबाबत जास्त चर्चा नको, पण घटस्फोट देऊन नवऱ्याला लाथ मारून बाहेर काढायच्या ऐवजी जिच्याशी लफडं असतं त्या बाईला धडा शिकवायच्या नावाखाली तिच्याबरोबर एकाच घरात राहणारी बायको आणि तिला साथ देणारी सासू दाखवून झीने नक्की काय साधलं? विवाहबाह्य संबंध असतात समाजात, पण नवरा त्याच्या लफडयाबरोबर त्याच घरात एकाच बेडरूममध्ये राहतो आणि बायकोही मुलाबरोबर आणि सासुसासऱ्यांबरोबर त्याच घरात हळदीकुंकू, त्या लफडयाची चेष्टा करत मजा मजा करत राहतात हे काहींना बघायला विनोदी वाटत असलं तरी हे एका सामाजिक विकृतीचं उदात्तीकरण नव्हे का?

दुसऱ्या एका वाहिनीवर उंच, गोरी आणि सुंदर मुलगी आणि बुटका आणि अत्यंत सामान्य दिसणारा, फारसा कर्तबगार नसणारा मुलगा अशी जोडी दाखवली आहे. आणखी एका मालिकेत एक लग्नाळू मुलगा घरातल्या मोलकरणीशी सूत जमवून लग्न करताना दाखवला आहे.

ज्या सुबोध मालिकेची इथे अजूनही यथेच्छ चेष्टा सुरू असते, त्यात तरी वेगळं काय दाखवलं आहे? श्रीमंत पण चाळीशी केव्हाच उलटून गेलेल्या विधुराच्या जवळजवळ गळ्यात पडून लग्न जमवणारी विशीतली तरुणी. उद्या चांगल्या घरातल्या तरुणींना आपल्या आसपास एखाद्या बऱ्यापैकी पैसेवाल्या पण वयाने पंधरा वीस वर्षे मोठ्या असलेल्या पुरुषाला पत्नीवियोग झाल्याचं समजल्यावर त्या पुरुषात त्या मुली आपला भावी नवरा पाहू लागल्या तर त्याला जबाबदार असणाऱ्या कारणांत या मालिकांचा नंबर नक्कीच वरचा असेल.

मागे एका तरुणांच्या मालिकेत मुलं आणि मुली एकाच घरात भाड्याने राहत असल्याचं दाखवलं होतं. ही मुलं प्रामाणिक, उद्यमशील वगैरे दाखवण्याच्या आडून असं मुलामुलींनी एकत्र राहणं हे सामान्य असल्याचं किंवा सामान्य असायला हवं असं सुचवण्यात मालिकेने कोणतीही कसर सोडलेली नव्हती.

तीच तीच सासू सुनेची भांडणं दाखवून कंटाळा आला म्हणून की काय एकाच कुटूंबातले बाकीचे सदस्य पण एकमेकांच्या विरोधात उठता बसता सतत कारस्थानं करत असताना दाखवले जाऊ लागले. एकमेकांचा सत्यानाश करण्याच्या जेवढ्या योजना दर क्षणाला त्यांच्याकडे बनत असतात तेवढ्या तर राजकारणातले लोक सुद्धा करत नसतील. एका मालिकेत तर आजी नातवाचा जीव घ्यायला तत्पर असल्याचं दाखवलं होतं. त्याच मालिकेत बहीण बहिणीचा जीव घ्यायचा प्रयत्न करते, भाऊ भावाचा, आणि बरंच काही.

संत तुकाराम हा चित्रपट पाहून कुणी संत होत नाही, आणि एखादा डाकूपट पाहून कुणी दरोडेखोर होत नाही हे वाक्य डायलॉग म्हणून तोंडावर मारायला ठीक आहे, पण दृश्य माध्यमांचा परिणाम जनमानसावर किती होतो याची प्रत्यक्ष उदाहरणे आजूबाजूला घडताना पाहिलेली आहेत.

धर्मेंद्रचा जुगनू चित्रपट दोन डझन वेळा पाहून त्यातल्या दरोड्याच्या दृष्याबरहुकूम तसाच दरोडा आपण घातल्याची कबूली आरोपींनी पोलिसांना दिली होती. सैराट सिनेमा प्रदर्शित झाल्यावर नुकतंच मिसरूड फुटलेल्या अनेक किशोरवयीन मुलांनी घरातून पळून गेल्याच्या बातम्यांत वाढ झालेली होती.

सिनेमाचा परिणाम जो आणि जेवढा होतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक मालिकांत होतो, आणि होतही आहे. रोज त्याच गोष्टींचा मारा सुरू असतो, आणि कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी संपूर्णपणे तो यशस्वी होत नाही. दुर्दैवाने अशा मालिकांचा प्रेक्षकवर्ग अशा पिढीतला आहे की जी स्वतः कर्तबगार आहे पण मनोरंजनासाठी म्हणून सुरवात करून त्याचं व्यसन कधी झालं हे तिला कळलेलंच नाही.

समाजात संस्कृती, प्रकृती, आणि विकृती हे एका विशिष्ट प्रमाणात असतात. प्रमाण व्यस्त झालं तरी शेवटी विकृती ही विकृतीच राहते. दुर्दैवाने मालिकांत मात्र या विकृती किंवा विचित्र गोष्टींचं सामान्यीकरण सुरू असल्याचं दिसतं. याला हळूहळू प्रतिष्ठा प्राप्त होईल. एक प्रकारचं ब्रेनवॉशिंगच आहे, आणि त्यातून आपण लवकरात लवकर बाहेर पडायलाच हवं.

न्यायदेवता आंधळी असते कारण तिला निष्पक्षपणे विचार करायचा असतो, तसंच पण जरा वेगळ्या अर्थाने घराबद्दल म्हणायचं झालं तर वास्तूही आंधळ्या व्यक्तीसारखी असते, तिला हे कळत नसतं की आवाज कोणाचे आहेत, खरे आहेत की खोटे आहेत, टिव्हीतून येत आहेत की प्रत्यक्ष माणसांच्या तोंडून. म्हणून आपण घरात निव्वळ काय बोलतो इतकंच नव्हे तर टीव्हीवर काय बघतो हे देखील तितकंच महत्वाचं ठरतं.

स्टुडिओत आठ आठ तास घोटवून घेतलेल्या गाण्याला आपण गायकांची....नव्हे स्पर्धकांची गायकी समजतो आणि अर्धवट ज्ञानाने पिवळे झालेले परीक्षक ज्या तोंड फाटेस्तोवर स्तुतीपर स्क्रिप्टेड प्रतिक्रिया देतात त्यांना खरं समजतो, आणि कोण जिंकणार हे ही आधीच ठरलेलं असलं तरी खरोखर सुंदर गाणारा स्पर्धक जिंकला/ली नाही तर वाईटही वाटून घेतो आणि त्यावर हिरीरीने चर्चाही करतो. हा ही एक प्रकारचा नकारात्मक नादच नव्हे का?! शिवाय, आपण दर्जेदार गायनाला मुकतो आहोत आणि गेली अनेक वर्ष आपली अलिखित राष्ट्रीय पॉलिसी असलेले दोन शब्द 'चलता है' छाप गायकीचा सदोष नाद आपल्या मनात साठवत जात आहोत.

गेमिंग अर्थात कॉम्पुटर/मोबाईल गेम्समध्ये जी मानसशास्त्रीय क्लृप्ती वापरली जाते तीच थोड्याफार फरकाने मालिकांत वापरली जाते. गेमिंगमध्ये कितीही अवघड गेम असला तरी खेळणाऱ्या व्यक्तीला अधूनमधून लहानसहान विजयांचं गाजर दाखवून सतत गेम खेळायला भाग पाडलं जातं, तसंच मालिकांच्या जवळजवळ प्रत्येक भागाच्या शेवटी उद्या म्हणजे पुढच्या भागात काय होणार आहे याचं औत्सुक्य चाळवून त्यावर विचार करण्यास आणि पुन्हा पुढे बघण्यास प्रवृत्त केलं जातं. 

मालिकांच्या बाबतीत एका मानसशास्त्रज्ञाचं विधान आठवलं, ते हे की मालिका या चित्रपटापेक्षा जास्त धोकादायक असतात कारण त्याने मनाला क्लोजर मिळत नाही. सिनेमात कथेचं वर्तुळ पूर्ण झाल्याने प्रेक्षकांना क्लोजर मिळतं, ते असंख्य भाग असलेल्या मालिकांतून मिळणं अशक्य असतं. क्लोजर न मिळाल्याने मानसशास्त्रीय विसंगती निर्माण होते आणि त्यातूनच सतत तोच नकारात्मक नाद मनात घेऊन आपण दिवसाचा शेवट करत असतो. काम कितीही असो किंवा नसो आजकाल जाणवणाऱ्या प्रचंड स्ट्रेस किंवा मानसिक थकव्याचं हे देखील एक मोठं कारण आहे असं वाटतं.

यातून बाहेर कसं पडायचं हा मात्र अवघड प्रश्न आणि खोल विषय आहे. मालिका नव्हत्या तेव्हा लोक जे करत होते ती परिस्थिती आणि सामाजिक वातावरण आज उरलेलं नाही आणि आज ही अवस्था आहे की मुलांच्या जडणघडणीकडे लक्ष देण्यापेक्षा, त्यांच्याशी संवाद वाढवण्यापेक्षा इतरांची आई काय करते आणि आपल्या फिटनेसची काळजी करण्यापेक्षा मालिकेतल्या वजनदार मुलीचं लग्न का ठरत नाही याची काळजी लोक जास्त करत असतात. 

कणेगावकर त्यांच्या लेखात पुढे एक उदाहरण देताना म्हणतात की "सप्तशतीमध्ये शु़ंभ दैत्याच्या मृत्युसमयाचं वर्णन करताना एक खूप सुंदर वाक्य वापरलं आहे. दिग्जनित शब्द शांतावला असं. इथे शब्द कोलाहल या अर्थी वापरला आहे. Sound is indestructible असं असलं तरी शब्द शांतवण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचा मार्ग शोधणं म्हणूनच फार गरजेचं झालं आहे."

तर असा मार्ग शोधण्यासाठी गुढीपाडवा हा त्याची सुरवात करण्याचा दिवस ठरो अशा तुम्हाला या सणाच्या निमीत्ताने खूप शुभेच्छा.

🖋️ मंदार दिलीप जोशी
चैत्र शुक्ल प्रतिपदा, शके १९४३ अर्थात गुढीपाडवा

Sunday, March 28, 2021

इतिहासाचा मृत्यू

"For historians ought to be precise, truthful, and quite unprejudiced, and neither interest nor fear, hatred nor affection, should cause them to swerve from the path of truth, whose mother is history, the rival of time, the depository of great actions, the witness of what is past, the example and instruction of the present, the monitor of the future."

- Author Unknown

विशिष्ट अभिनिवेश व काही घटकांबद्दल द्वेष मनी धरून समाजात वावरणारे लोक यांचाच आवाज आज मोठा आहे आणि त्यांना राजकीय पाठिंबाही आहे. अशा लोकांची इच्छा सत्य जाणून घेणे नाही तर निव्वळ हुल्लडबाजी आणि गुंडगिरी करणे इतकीच असते आणि त्यांच्यासमोर डोकं आपटत बसण्यापेक्षा लिहिणं बंद करणं हा निर्णय आज अनेक चांगल्या इतिहास संशोधक व लेखकांनी घेतलेला आहे. आज खलनायकांना सद्गुणांचा पुतळा तर नायकांचं चारित्र्य संशयास्पद ठरवण्याची कारस्थानं व्यापक पातळीवर सुरू असताना सत्याचे आवाज एकामागोमाग एक असे बंद होणं या गोष्टीची किंमत केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला चुकवावी लागणार आहे.

तैलबुद्धी समोर बैलबुद्धी बलवान असण्याचाच हा समय आहे, दुर्दैवाने.

خردمندى را که در زمرة اوباش سخن ببندد شگفت مدار که آواز بربط با غلبهُ دهل بر نیاید و بوی عبیر از گند سیر فرو ماند 

खुर्दमंदी रा ‌के दर ज़मुरत ए औबाश सुखन बबंदद शिगुफ्त मदार के आवाज़ ए बर‌बत बा घलबीए दुहुल बर नियायद व बु ए अबीर अज़ गंद ए सैर फरु मांद

Don't be surprised by a wise man who is silenced by the vulgar, for the sound of a lute cannot compete with the boom of a drum, and the scent of ambergris is overwhelmed by the stench of garlic.

एखाद्या शहाण्या माणसाला मुर्ख आणि असभ्य माणसांनी गप्प बसवले तर त्याचे आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण ढोलाच्या कर्कश्य आवाजापुढे सतारीचे स्वर्गीय स्वर ऐकू येत नाहीत आणि कस्तुरी सारखा उच्च सुगंध देखील लसणाच्या घाणेरड्या आणि उग्र दर्पा पुढे मार खातो !

~ शेख सादी शिराझी याच्या 'गुलिस्तान' मधून

शेख शिराझी याच्या 'गुलिस्तान' मधून आणखी एक:

A great man was asked, "With all the superiority the right hand has, why do people put rings on their left hands!"
He replied, "Don't you know that the learned are always deprived ! "

एका महान माणसाला एकाने विचारले, "उजवा हात शक्तिशाली असून देखील लोक डाव्या हातात अंगठी का घालतात?"

यावर तो महान माणूस उत्तरला, "विद्वान माणसाची नेहमी उपेक्षा होते हे तूला ठाऊक नाही का?"

~ शेख सादी शिराझी याच्या 'गुलिस्तान' मधून

🖋️ मंदार दिलीप जोशी, सत्येन वेलणकर

Friday, March 26, 2021

स्टॅन स्वामी या शहरी नक्षलवाद्याला जामीन नाकारल्यावर चर्चच्या बुडाला का आग लागावी?

तीनच दिवसांपूर्वी शहरी नक्षलवादी स्टॅन स्वामीला नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (NIA) विशेष न्यायालयाने जामीन नाकारला

Ernakulam Angamaly Archdiocese

त्यावर स्टॅन स्वामीला जामीन नाकारणे हे धक्कादायक असल्याचे 'Ernakulam Angamaly Archdiocese' चे म्हणणे आहे. स्टॅन स्वामी या शहरी नक्षलवाद्याला जामीन नाकारल्यावर 'सथ्यदीपम' या 'एरनाकुलम अंगमली Archdiocese' प्रकाशित करत असलेल्या साप्ताहिकाच्या भावी संपादकीयात चर्चने गरळ ओकली असल्याचे समजते. चर्चची निष्ठा कधीच भारत व भारताच्या संविधानाप्रती नसून परदेशी कायदे आणि दस्तैवजांप्रती असते. चर्चने हीच परधर्जिणी वृत्ति दाखवून देत म्हटलं आहे की "नागरिक व नागरिकांचे हक्क हे सर्वप्रथम असून तसा उल्लेख १५ जून १२१५ रोजी प्रकाशित झालेल्या मॅग्ना कार्टा (Magna Carta of 1215) मध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे."

आता एरनाकुलम अंगमली Archdiocese उदाहरण देत असलेले Magna Carta काय आहे? ते भारतीय संविधान आहे का? तर नव्हे. राजेशाहीच्या अनिर्बंध अधिकारांच्या विरोधात काही सरदारांनी पुकारलेल्या बंडात इन्ग्लंडचा राजा जॉन याच्याकडून एका जाहीरनाम्यावर सही करवून घेण्यात आली त्या जाहीरनाम्याचं नाव Magna Carta होतं. आता इंग्लंडमध्ये आपापसात सुरु असलेल्या राजकीय/धार्मिक संघर्षाचा परिपाक म्हणून इन्ग्लंडच्या राजाने सही केलेल्या जाहीरनाम्याचा उल्लेख व उदाहरण हे भारतात एका शहरी नक्षलवाद्याला जामीन नाकारण्याच्या विरोधातला मुद्दा म्हणून चर्चने दाखवावा यातच त्यांची परधर्जिणी वृत्ती स्प्ष्ट होते. पण प्रकरण केवळ इतकंच नाही, तर Magna Carta मध्ये जी कलमं नमूद केलेली होती त्यातल्या एका कलमाकडे आपलं लक्ष गेलं पाहीजे. Magna Carta मध्ये अनेक गोष्टींच्या हमी राजाकडून घेण्यात आली त्यातली एक महत्त्वाची आणि पहिली म्हणजे "चर्चचे अधिकार अबाधित राहतील" ही होती. हे तथ्य वाचल्यावर चर्चचे दाखवायचे दात हे वरकरणी नागरिक व नागरिकांचे हक्क यांचे रक्षण हे असले तरी अंतस्थ हेतू हे चर्चच्या हितसंबंधांचे रक्षण हे आहे. आता नक्षलवाद्यांच्या बाजूने बोलल्यावर चर्चच्या हितसंबंधांचे रक्षण कसे होते यावर आंतरजालावर थोडं संशोधन केलं तरी वाचकांना हा मुद्दा स्प्ष्ट होईल. 

पुढे जाऊन चर्च म्हणतं — "भारतावर आता फॅसिस्ट विचारधारेच्या लोकांचे राज्य असून फॅसिस्ट राज्यात राष्ट्र हे सर्वप्रथम असतं आणि कायदे बनवण्याचा मूलभूत हेतू हा राष्ट्राचे सार्वभौमत्व राखणे हा असतो. अशा परिस्थितीत मतभिन्नतेचे मार्ग खंडित केले जातात."

ही वाक्ये वाचताच यातला फोलपणा आणि भंपकपणा लक्षात येतो. जणू काही राष्ट्र प्रथम हा काही गुन्हाच आहे आणि त्याच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणाची तरतूद करणं हा त्याहून मोठा गुन्हा असावा अशा थाटात हे लिहीलं गेलं असावं हे स्प्ष्ट आहे. 

यावर कोर्टाने स्टॅन स्वामीला जामीन नाकारताना काय भाष्य केलं आहे ते बघणं महत्त्वाचं ठरतं. जामीन नाकारण्याची कारणे देताना न्यायालय म्हणतं की "वैय्य्क्तिक स्वातंत्र्य / व्यक्तिस्वातंत्र्यापेक्षा समाजाचं व्यापक हित हे महत्त्वाचं आहे (‘Community interest outweighs right of personal liberty’). थोडक्यात, व्यक्तिस्वातंत्र्य हे समाजहिताच्या आड येत असेल किंवा समाजहिताला बाधा पोहोचवत असेल तर योग्य व कायदेशीर तरतूदींनुसार व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने घालणे हे न्यायसंगत ठरते असे न्यायालयाने स्प्ष्टपणे नमूद केले आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (NIA) विशेष न्यायाधिशांनी नोंदवलेल्या मतानुसार "आरोपीवर असलेल्या आरोपांचे गांभीर्य योग्य परिप्येक्ष्यात बघितलं तर असं म्हणण्यास कारण आहे की समाजहित हे वैयक्तिक स्वातंत्र्यापेक्षा महत्त्वाचं ठरतं, आणि म्हणूनच आरोपीचं खूप वय झालेलं असणं आणि त्याचा तथाकथित आजार हे या याचिकेवरचा निर्णय त्याच्या बाजूने जाण्यास पुरेसे ठरत नाहीत. न्यायालयाने पुढे असंही म्हटलं आहे की समोर आलेल्या पुराव्यांनुसार अर्जदार आरोपीवर असलेले आरोप हे प्रथमदर्शनी सत्य असल्याचे दिसते, तसेच स्टॅन स्वामी व इतरांनी "शक्ती प्रदर्शन करुन देशात अस्थिरता पसरवण्याचा व सरकार उलथवण्याचा कट रचला". तसेचसमोर असलेल्या पुराव्यांनी हे स्प्ष्ट होत आहे की अर्जदार हा निव्वळ बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) पक्षाचा सक्रीय सदस्यच होता असे नव्हे तर त्याने पक्षाची घातक ध्येयधोरणे पुढे नेण्याचाही प्रयत्न केला, आणि ते काम म्हणजे भारतीय लोकशाही उलथून लावणे हा होय. दुर्दैवाने न्यायालयाने कॅरॅवॅन या संकेतस्थळावर न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश मात्र दिले नाहीत., पण तो वेगळा आणि आणखी मोठा विषय आहे.

थोडक्यात:
(१) जामीन नाकारण्याच्या निर्णयाला विरोध करताना विदेशी जाहीरनाम्याचे उदाहरण देणे परधर्जिणेपणा अधोरेखित करते.
(२) त्या जाहीरनाम्यात 'चर्चच्या अधिकारांचे रक्षण' हे एक महत्त्वाचे कलम असताना शहरी नक्षलवाद्याची भलामण आणि चर्चचे हितसंबंध गुंतलेले आहेत याची अप्रत्यक्ष कबूली चर्चने दिली आहे.
(३) या पार्श्वभूमीवर चर्चवर चौकशी का बसवू नये यासाठी सरकारवर राष्ट्रवादी पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच हिंदू संघटनांनी दबाव टाकायला हवा.

आता ३१ मार्च रोजी 'सथ्यदीपम' या 'एरनाकुलम अंगमली Archdiocese' यांच्या साप्ताहिकात 'फॅसिझमचे भारतीय मॉडेल' ‘The Indian Model of Fascism’ या शीर्षकाखाली प्रकाशित होणार्‍या संपूर्ण संपादकीयाची विशेष अन्वेषण करुन चर्चची चौकशी आरंभ करावी अशी इथे केंद्रीय गॄह खात्याला विनंती. 

© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु १२/१३, शके १९४२

Wednesday, March 24, 2021

शहरी नक्षलवादी व त्याच्या चेल्यास पाठोपाठ अटक


काल तेलंगणा विद्या वंथुला वेदिकाचा माजी अध्यक्ष असलेला शहरी नक्षलवादी गुर्जला रविंदर राव याला झालेली अटक व पाठोपाठ त्याने एक्स आश्रय दिलेला माओवादी पक्षाचा वाराणसी सुब्रमण्यम आणि त्याची बायको यांना आज झालेली अटक हा घटनाक्रम वाचला आणि मी १० जानेवारीला लिहिलेल्या लेखाची आठवण झाली.


त्यातला हा परिच्छेद मला फार महत्वाचा वाटतो, कारण ज्या प्रमाणे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये हे वाक्य डाव्यांनाच चांगलंच समजल्याने ते आपल्या शहरी बापांना वाचवायचे प्रयत्न करताना वय वगैरे मुद्दे काढून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात.:

"या दोघांच्या शारीरिक अवस्थेचे वर्णन गोगटे साहेब "दोन वयोवद्ध व गंभीर आजारी असलेल्या.." असे करतात. क्षणभर असे गृहित धरू की हे दोघे खरंच मरणासन्न आहेत, पण त्यामुळे बहुसंख्य शांतताप्रिय जनतेला, गंभीर आरोपांत तुरुंगात असलेल्या वरावरा राव आणि स्टॅन स्वामी या दोन शहरी नक्षलवाद्यांच्या जहरी व कावेबाज विचार व शिकवणीमुळे निर्माण झालेला, होत असलेला, व होऊ शकणारा असलेला धोका हा कुठेही कमी होत नाही. कारण स्वतः सशस्त्र होऊन मैदानात उतरत नसले तरी इतरांची माथी भडकावून हातात शस्त्र घेऊन ४ महिन्याच्या बालकापासून निरपराध वृद्धांपर्यंत, व सशस्त्र दलांपासून पोलिसांपर्यंत कुणाचाही कशाही प्रकारे मुडदा पाडण्याला मार्गदर्शन करणारी, प्रोत्साहन देणारी, व अशा घटनांचे निर्लज्ज समर्थन करणारी ही विचारसरणी आपल्या शहरातल्या घरात राहून, विद्यापीठात शिकवत असताना, पुस्तके व इतर साहित्य निर्माण करत असताना आपले विषारी व विखारी विचार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पसरवण्याची ठाम शक्यता असते."

म्हणूनच कितीही वयाची कारणे दिली, तरी या थेरड्यांना तुरुंगातच ठेवावे.

या दोन्ही अटकांबद्दल तेलंगणा पोलिसांचे अभिनंदन.

© मंदार दिलीप जोशी

Wednesday, March 17, 2021

प्रेश्यावृत्ती मिडिया एवं वामपंथी दोगलापन


 

इस विडियों में कुछ त्रासदीयां एवं विरोधाभास समाये हुये हैं. त्रासदी यह है कि दशकों के वामपंथी शासन के बाद पश्चिम बंगाल राज्य की ये अवस्था है कि आज भी यहां मनुष्यों को रिक्षा खिंचनी पडती है. वामपंथ गरीब को गरीब बनाये रखता है, जिसके कारण जो रिक्षावाला कल खुद रिक्षा खिंचता था वो आज भी यही कर रहा है. पर्यटन के लिये आकर्षण का विषय होना एक बात है, परंतु उद्योगों के नष्ट होने के कारण एवं पीढी दर पीढी पेट पालने के लिये किसीको यह करना पड रहा है तो इसका दोष साम्यवादी व्यवस्था को ही जाता है. गरीब को गरीब ही बनाये रखना – वामपंथ की यही तो खासीयत है!

विरोधाभास यह है कि सदैव पक्षी तथा प्राणीप्रेम से ग्रस्त मिडिया की निद्रा केवल हिंदू उत्सवों के समय खुलती है, जैसे संक्रांत एवं दिवाली को. वामपंथी मिडिया को पतंग के डोर के कारण पक्षीयों को एवं पटाखों के कारण अनुष्का शर्मा के कुत्ते को होने वाली तकलीफ बहुत बडी दिखती है, परंतु प्रत्यक्ष कोई मानव आज भी रिक्षा स्वयं खींचने को विवश है, इसपर मिडिया ध्यान तो देती नहीं परंतु वो इसके मजे भी लूटते हैं. आप देख सकते है, सीएनएन न्युज १८ की पल्लवी घोष किस निर्लज्जता से मानवी रिक्षा के मजे लेते हुए यह बात कर रही हैं कि किस प्रकार पश्चिम बंगाल में चुनाव के मुद्दे हैं जय श्रीराम बनाम जय सियाराम, रविंद्रनाथ ठाकुर तथा सुभाषचंद्र बोस! 

चलो कम से कम यह मनुष्य मेहनत की कमा रहा है, परंतु क्या सीएनएन न्युज १८ पल्ल्वी घोष को यह असाइनमेंट नही दे सकते थे की उस रिक्षावाले का ही साक्षात्कार लें, उसकी व्यथाओं को जाने, यात्रिओं से लदी रिक्षा खींचने चकर लोगों के आवागमन मे सहय्यता करने की उसकी विवशता को सबके सामने लायें? क्या ऐसा इंटरव्यु लेकर जनता को यह ज्ञात क्यूं नहीं कराया गया कि किस प्रकार जैसे होस्ट के मरने पर परजीवी वायरस या जंतु दुसरे होस्ट को अपन घर बना लेता है, उसी प्रकार कम्युनिस्ट पार्टी के कार्यकर्ताओं ने....क्षमाप्रार्थी हूं....कम्युनिस्ट पार्टी के गुंडोंने पार्टी का राज समाप्त होने पर तृणमूल काँग्रेस मे स्थलांतर कर दिया था, वैसे ही कम्युनिस्ट पार्टी के नीतियों ने भी तृणमूल काँग्रेस के राज में भी अपना प्रभाव कायम रखते हुये गरीब को गरीब रखने की परंपरा कायम रखी है? 

परंतु वे ऐसा तभी करेंगे, वे इस रिक्षावाले की गरीबी एवं विवशता को तभी हाईलाईट करेंगे, जब कोई निजी बस चलाने की बात करेगा की देखीये निजीकरण के कारण कैसे इस गरीब की, जिसे गाडी चलाना नहीं आता, रोटी छीनी जा रही है, उसे गरीबी में जीने पर मजबूर किया जा रहा है. यदि पश्चिम बंगाल राज्य में चुनाव के माध्यम से वास्तविक क्रांती हो जाये और भाजप सत्ता में आ जाये, तो यही मिडिया इस रिक्षावाले को लेकर स्टोरी चलायेगा कि देखो कैसे सबका विकास करने की बात करनेवाले मोदी सरकार के राज में आज भी एक रिक्षावाले को स्वयं यात्रियों को ढोना पड रहा है. दुसरे किसी चॅनल पर ऐसा नॅरेटिव्ह चलाया जाने की पूरी संभावना है कि निजीकरण के कारण कैसे गरीब रिक्षावाले को गरीब रहना पड रहा है और यही बात उठाते हुए राहुल गांधी अदानी-अंबानी को कोसेंगे. यदि बसें सरकारी हों, तो यह भी हो सकता है कि मिडीया यह बात चलाये कि देखो बसे चली तो इंडिया और भारत के बीच की खाई और गहरी हो गयी. कैसे कैसे नॅरेटिव्ह चलेंगे इसकी संभावनाएं तो असंख्य हैं. 

तो वामपंथ एवं वामपंथ से ग्रस्त मिडिया की यही विशेषता है कि जो बोलो उसे स्वयं करो नहीं,  जो ना करने के लिये बोलो उसे घोष मॅडम की तरह निर्लज्जता से करो उपर से लोगों को वही बात करने पर अपराधगंड से ग्रस्त रखो. यही वामपंथ की पहचान है. 

अन्य राज्यों में, जहां पर वामपंथी सरकारें नहीं हैं, वहां पर मानवी रिक्षाओं के स्थान पर सायकिल रिक्षायें लायीं गयीं, और आज कई स्थानों पर सायकिल रिक्षाओं के स्थान पर मोटराइज्ड रिक्षायें चलती हैं. काम करने के लिये मानवी श्रम को कम करने का यशस्वी प्रयास वामपंथ कभी नहीं करता. 'नया दौर' लाना है तो टांगे के लिये शॉर्टकट सडक बनाने पर लोगों को अपना समय एवं श्रम बरबाद करने पर मजबूर करना विवेक नहीं है, अपितु मानवी श्रम कम करने की तकनीक आती है तो हुनर सीखकर आगे बढनें में ही भलाई है. 'नया दौर' साम्यवाद से नहीं आता, वो आता है व्यापार की स्वतंत्रता से जिसे बडे प्यार से वामपंथीयों ने पूंजीवाद का लेबल लगाया है.  

CNNNews18 Correspondent Pallavi Ghosh

© मंदार दिलीप जोशी

Monday, March 15, 2021

रनअवे ज्युरी आणि डाव्यांची चित्रपटीय लबाडी

२००३ साली आलेला हा सिनेमा अजून लक्षात आहे तो त्यात असलेल्या जीन हॅकमन आणि डस्टिन हॉफमन या दिगग्ज कलाकारांमुळे. चित्रपट साधारणपणे मसाला चित्रपट असतात तसा आहे, पण गंमत त्याच्या कथेत दडली आहे. किंवा असं म्हणणं जास्त योग्य ठरेल की त्याच्या गोष्टीने जे दडवलं आहे त्यात खरी गंमत आहे.

रनअवे ज्युरी पोस्टर

अमेरिकेत एका गोळीबारात ११ लोक मारले जातात. त्यापैकी एकाची पत्नी गोळीबार ज्या बंदुकीने केलेला असतो ती बनवणाऱ्या कंपनीवर नुकसानभरपाईसाठी खटला दाखल करते. खटला सुरू असताना दोन्ही पक्षाच्या वकिलांना एक फोन येतो की जो पक्ष त्याला, म्हणजे फोन करणाऱ्याला, १० मिलियन डॉलर देईल त्याच्या बाजूने तो ज्यूरीला निकाल द्यायला भाग पाडेल.

मग सस्पेस थ्रिलर जॉनर चित्रपटाला साजेशा काही घटना घडतात आणि शेवटी त्या बाईच्या बाजूने उभा असलेला वकील ते पैसे द्यायला नकार देतो वगैरे वगैरे. कथेच्या तपशीलात जाण्यात अर्थ नाही. हां एक गोष्ट म्हणजे ज्यूरीत एक माजी अमेरिकन मरीन असतो जो त्या बाईला नुकसानभरपाई देण्याच्या विरोधात असलेला दाखवलाय, आणि शेवटी त्या बाईच्या बाजूने निकाल लागून बंदूक बनवणाऱ्या कंपनीच्या वकिलाला ज्यूरीला लाच दिल्याच्या आरोपाखाली अटक होते इतका तपशील सद्ध्या पुरेसा आहे.

आता कथेतली गोम सांगतो. हा चित्रपट लीगल थ्रिलर म्हणजे कोर्टाच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या थरार कादंबऱ्यांचा लेखक जॉन ग्रीशॅम याच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. कादंबरीचं चित्रपटात रूपांतर करताना एक महत्वाचा बदल असा केला आहे की कादंबरीत सिगारेट कंपनी विरोधात खटला लढवणारी बाई फुफ्फुसांच्या कर्करोगाने दगावलेल्या नवऱ्याची बायको दाखवली गेली आहे, आणि चित्रपटात मात्र साफ बदलून शस्त्रास्त्र बनवणारी कंपनी आणि गोळीबारात गेलेल्या माणसाची पत्नी असा बदल केला गेला आहे.  

आता इथे जॉन ग्रीशॅमची किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांची कल्पकता तोकडी पडली होती का? तर नाही. मग कादंबरीत असलेली सिगारेट कंपनी सिनेमात आणता आणता बंदूक बनवणारी कंपनी का आणि कशी झाली?

इथे येते डाव्यांची लबाडी. पुस्तकापेक्षा सिनेमा या दृकश्राव्य माध्यमाची ताकद कुणी ओळखली असेल तर डाव्यांनीच. तुम्हाला वाटत असेल की बॉलिवूड म्लेंच्छ किंवा वामपंथी विचारप्रवाह म्हणजे नेरेटीव्ह चालवतात तर एक गोष्ट लक्षात ठेवा, बॉलिवूडच्या शंभर पटींनी हॉलिवूड हे डाव्या विचारांनी भारलेलं आहे. जे डावे मद्यपान, धूम्रपान, आणि इतर सगळ्या प्रकारच्या व्यसनांचा पुरस्कर करणारे डावे सिगारेट कंपनीच्या विरोधात सिनेमा कसा बनवतील? 

बनवतील सुद्धा, बनलेही (थँक्यू फॉर स्मोकिंग, १९९७), पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांना या कथेत बदल करताना बंदूका बनवणाऱ्या कपन्यांवर 'नेम धरला' हे आहे.

हॉलिवूडचे सिनेमे नीट बघितले तर आपल्याला एक समान धागा नेहमी दिसून येतो की एफबीआय, सीआयए, आणि सेना यांना बहुतेक वेळा भ्रष्ट आणि क्रूर दाखवलं जातं (आठवा: Jason Bourne मालिका. आठवा: रनअवे ज्युरी मधल्या जीन हॅकमनचाच एनिमी ऑफ द स्टेट हा सिनेमा ). अशा चित्रपटांतला नायक असलेला सैनिक नेहमी अन्यायग्रस्त असतो आणि आदेशांच्या विरोधात जाऊन नेहमी काहीतरी करत असतो. अनेक सिनेमात मुख्य तक्रारीचा सूर एका गोष्टीच्या विरोधात असतो ती म्हणजे म्हणजे अमेरिकन नागरिकांना त्यांच्याच घटनेने (म्हणजे संविधान बरं का) असलेला शस्त्र बाळगण्याचा अधिकार.

या पूर्ण डाव्यांच्या लॉबीला शस्त्र बाळगण्याच्या याच अधिकारावर आक्षेप आहे. वास्तविक त्यांना आशा प्रत्येक व्यवस्थेवर आक्षेप घेतात जी अमेरिकन नागरिकांना स्वतःसाठी किंवा देशासाठी लढण्यास प्रेरित आणि प्रवृत्त करते. अमेरिकेच्या घटनेच्या सेकंड अमेंडमेंटमध्ये अमेरिकन नागरिकांना शस्त्र (बंदुका) बाळगण्याचा आणि स्वसंरक्षणासाठी ती वापरण्याचा अधिकार दिलेला आहे. मान्य आहे की अधूनमधून अमेरिकेत रागाच्या भरात किंवा इतर कारणांनी केल्या गेलेल्या गोळीबाराच्या घटना घडत असतात, तरीही अमेरिकेत कुणीही शस्त्र बाळगण्याचा आपला हा अधिकार सोडण्याच्या मनःस्थितीत नाही.

सरळ साधा विचार करा, जेव्हा एखादा गुन्हेगार खुनासारखा एखादा गुन्हा करायला प्रवृत्त होतो तेव्हा तो कुठली मानवता पाळतो बरं? ज्या गुन्ह्यामुळे मृत्युदंडाची किंवा आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते, तो गुन्हा करणारा माणूस इतर कुठले कायदे पाळणार आहे.  मग शस्त्र बाळगण्याच्या अधिकाराला बेकायदेशीर ठरवण्यात आणि शांतताप्रिय सामान्य नागरिकांचा स्वसंरक्षणाचा अधिकार हिरावून घेऊन त्यांचा जीव धोक्यात घालण्यात काय हंशील?

गोळीबाराच्या घटना घडल्यावर प्रत्येक वेळी शस्त्र (बंदुका) बाळगण्याच्या विरोधात डावे अशा प्रकारचं भावनिक आवाहन करतात की जणू बंदूक स्वतःहून आली आणि गोळीबार करून गेली आहे. वर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला मृत्युदंड देण्यालाही त्यांचा विरोध असतो. म्हणजे गंमत बघा

  • जे शस्त्र बाळगून अमेरिकन नागरिक स्वसंरक्षण करू शकतील तो अधिकार काढून घेण्यासाठी लॉबीग करायचं.
  • बंदूक वापरणारा माणूस नव्हे तर बंदूक दोषी असा विचारप्रवाह चालवायचा (कुणाला रे गुरमेहर कौर आठवली? "पाकिस्तान डिड नॉट किल माय फादर, वॉर डिड" हाहा).
  • असे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींना जरब बसावी आणि गुन्हे कमी व्हावेत म्हणून असलेली मृत्युदंडाची शिक्षा द्यायलाही विरोध करायचा.

सूज्ञ वाचकांना यातली गोम किंवा पॅटर्न लक्षात आला असेलच. डाव्यांना तुम्ही ज्या ज्या प्रकारे स्वतःच संरक्षण करू शकाल असा प्रत्येक अधिकात हिरावून घ्यायचा आहे, इतकंच नव्हे तर अशी प्रत्येक संस्था नष्ट करायची आहे जी तुमच्या अधिकारांचं आणि पर्यायाने तुमचं रक्षण करू शकतील. याच बरोबर त्यांना कायदे हे गुन्हेगारांच्या बाजूने असा वाकवायचे आहेत ज्यायोगे कुठल्याही गुन्हेगाराला शिक्षा सुनावणं अत्यंत अवघड व्हावं आणि झालीच तर कमीतकमी शिक्षा व्हावी (कुणाला रे निर्भया केस आणि शिवणयंत्र आठवलं?).

यात डाव्यांचा फायदा काय? त्यांचं कुठलं उद्दिष्ट साध्य होतं? तर समाजावर संपूर्ण नियंत्रण. फक्त उत्पादनाची साधने आणि वितरण व्यवस्था यांवर ताबाच नव्हे तर हरप्रकारे संपूर्ण नियंत्रण. तुमच्या संसाधनांवर, तुमच्या विचारांवर, तुमच्या स्वातंत्र्यावर. यात नागरिकांच्या हातात जोवर बंदूक असेल, तोवर त्यांचं मनोबल पूर्णपणे तोडणं शक्य होणार नाही. हातात शस्त्र असलेला माणूस एका मर्यादेपलीकडे वाकणार नाही, संपूर्ण समर्पण करणार नाही. तुम्ही अमेरिकेत झालेल्या ब्लॅक लाईव्हज मॅटर वाल्यांनी केलेल्या दंगली आणि संबंधित घडामोडींवर लक्ष ठेवलं असेल तर त्यावेळी अशा घटना घडल्याचं तुमच्या लक्षात आलं असणार की काही ठिकाणी घरं आणि दुकानं जाळायला आणि फोडायला आलेला हिंसक जमाव हा तिथल्या नागरिकांच्या हातातल्या बंदुका नुसत्या पाहूनच पार्श्वभागाला पाय लावून पळाला होता.

ब्लॅक लाईव्हज् मॅटर अर्थात च्या दंगलखोरांपासून आपल्या मालमत्तेचं रक्षण करायला उभं असलेलं बंदुकधारी मार्क आणि पॅट्रेशिया मॅक्लॉस्की (Mark and Patricia McCloskey) हे दांपत्य

म्हणूनच अमेरिकेतील डावे अमेरिकन घटनेच्या (तेच ते, संविधान) सेकंड अमेंडमेंटच्या गेली अनेक दशके मागे लागलेले आहेत.

भारतात १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर इंग्रजांनी भारतीयांना निःशस्त्र केलं तो निर्णय मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर चाचा नेहरूंनी फिरवला नाही. त्याचा परिणाम असा आहे की जे गुन्हेगार वैयक्तिक किंवा सामूहिक प्रवृत्ती व शिकवणीने प्रेरित होऊन गुन्हे करतात ते कायदे धाब्यावर बसवून निर्भयपणे गच्चीवर दगड, घरात धारदार शस्त्रे, बंदुका वगैरे बाळगत असतात आणि योजना आखून हल्लेही करत असतात (कुणाला रे दिल्ली दंगल आठवली?) आणि सगळे कायदे पाळणाऱ्या नागरीकांना प्रतिकार करायला मात्र काहीच नसतं (याला आणखी अनेक कारणे आहेत पण निःशस्त्र करणारे कायदे हे एक मुख्य कारण नाकारता येत नाही). थोडक्यात, आपला हातात शस्त्र नसलेला जेक गार्डनर झालेला आहे. 

तेव्हा स्वसंरक्षणासाठी करायच्या तयारी बरोबरच शस्त्र बाळगण्याचे परवाने मिळणे सहज सुलभ होण्याच्या दृष्टीने संसद व न्यायालय या दोन्ही मार्गांनी लढा देणे आवश्यक आहे.

तस्मादुत्तिष्ठ!

प्रेरणा: डॉ राजीव मिश्रा

🖋️ मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु. २, शके १९४२