Saturday, July 4, 2020

चीन नावाचा गोंधळ

चीनबद्दल सरकारी व वैयक्तिक पातळीवर वेगवेगळी आक्रमक पावले उचलली जात आहेत ही चांगली गोष्ट एकीकडे घडत असताना आणि चीन संदर्भात स्वाभाविक विरोध निर्माण झालेला असतानाही दुसरीकडे असंही दिसतं की एक देश म्हणून आपली चीनबद्दलची समज अजूनही पुरेशी विकसित झालेली नाही.

हत्तीला चाचपणाऱ्या चार आंधळ्यांसारखे प्रत्येकाचे चीनबद्दल आपापले समज आहेत. काही लोक चीनला पाकिस्तान सारखं समजत आहेत. काही लोक चीनला कट्टर साम्यवादी देश मानतात तर काही साम्यवादाच्या आडून भांडवलशाहीचं समर्थन करणारा देश समजतात. काहींच्या मते चीनने आपल्या प्राचीन संस्कृतीशी अजून नाळ तोडलेली नाही तर काही म्हणतात चीन साम्राज्यवादी आहे. 

काही ठिकाणी तर चीनच्या अर्थव्यवस्थेबद्दल स्तुतीपर कवने देखील वाचली. काय तर म्हणे चीनची अर्थव्यवस्था  ही ब्रिटन किंवा अमेरिकेप्रमाणे 'गुंतवणुकीच्या साधनांनी इतर देशांच्या संसाधनांचे शोषण करत' किंवा 'दहशतवादाला पक्स्ट' आणि 'डॉलर हेजीमनी' इत्यादींच्या वापराने विकसित झालेली नाही (अहाहा, किती पवित्र देश आहे नै?!). हे असले कुतर्क वापरून अजून लिबरल मीडियाने हिंदी चीनी भाई भाईचा गजर अजून कसा सुरू केला नाही याचंच आश्चर्य वाटतंय. (मला हा तर्क वाचून हसायला आलं. आफ्रिकन देशांना ते गुंतवणुकीतून दादागिरी कशी सहन करत आहेत हे जाऊन विचारा आणि आपल्याच पूर्वोत्तर राज्यांतल्या अतिरेकी संघटनांकडे पैसे कुठून येतात ते तपासा.)

आज भारतात चीनबद्दल चाललेली चर्चा आणि विचारविमर्श पाहिला तर त्याची दिशा उमगत नाही. आपली रणनीती काय असायला हवी हे आपल्याला अजून समजत नाही आहे. या नव्या शत्रूशी वागायचं कसं हे आपल्याला अजूनही पूर्णपणे कळलेलं नाही. पाकिस्तानला इतकी वर्षे निरनिराळ्या मार्गांनी झेलल्याने त्याच्याबद्दल काही निश्चित धारणा आहेत आणि त्या योग्यही आहेत. पण आपला आक्रोश फक्त चीनी उत्पादनांचा बहिष्कार इतकाच मर्यादित आहे. ही एक उत्तम सुरवात असली तरी हा एक फारच किचकट आणि भ्रामक विषय आहे. चीनची उत्पादने बाजारातून पूर्णपणे गायब होईपर्यंत बराच काळ जाणार आहे.

पाकिस्तानची कुठली नस दाबल्याने काय होतं हे आपल्याला कळतं पण चीनच्या बाबतीत पाच मुद्दे कुणाला मांडायला सांगितलं तर ते कुणालाही जमणार नाही. आपलं धोरण म्हणजे 'मोदी आणि सरकार काय ते पाहून घेतील' हे आहे. 

आज परदेशी भाषा शिकणे म्हणजे जर्मन, स्पॅनिश, जपानी इत्यादी पुरतं मर्यादीत आहे पण यात चीनी भाषा कुठेच दिसत नाही. आपल्या शत्रूला समजून घेण्यात त्याची भाषा न येणं हा एक मुख्य अडथळा आहे. हां भारतीय विदेश सेवेतील आपले काही अधिकारी चीनी भाषा शिकून कर्तृत्वही गाजवून आलेले आहेत पण बाकी सगळा उजेडच म्हणावा लागेल. भाषेची अडचण आणखी एका बाबतीत जाणवते ती म्हणजे आपल्या वृत्तसंस्था आणि पत्रकार जिथे जायला परवानगी आहे तिथे जाऊनही व्यवस्थित वृत्तांकन करू शकत नाहीत. चीनमधल्या ज्या बातम्या आपल्याकडे दिल्या जातात त्या सुद्धा चीनी मीडियाने पाठवलेल्या महितीवरच आधारित असतात. आता चीनी मीडिया कुणाच्या ताब्यात आहे हे वेगळं सांगायला नको.

याचमुळे आता गंमत अशी झालेली आगे की "चीनशी आपलं युद्ध होऊ शकतं" असा भारतीय जनतेचा समज करून देण्यात चीन यशस्वी ठरलं आहे. या भ्रमातून आपण लवकरात लवकर बाहेर येणं आवश्यक आहे, कारण चीनशी आपलं युद्ध कधीच सुरू झालेलं आहे. साडेतीन महिने झाले आज आपण घरात कोंडल्यासारखे आहोत, मुलांच्या शाळा बंद आहेत, लोकं ऑफिसला जाऊ शकत नाहीत; रेल्वे, बस आणि विमानसेवा बंद आहेत. अनलॉक करायचं की लॉकडाऊन हे अनेकांना झेपत नाहीये. देशाच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसलेला आहे, प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्र सरकार रोज आरोग्यविषयक बातमीपत्र प्रसारित करत आहे. चीनने बनवलेल्या एका व्हायरसमुळे इतका हाहा:कार उडालेला असताना याला युद्ध नाही म्हणायचं तर आणखी काय?

शत्रुसैन्याला प्रतिबंध म्हणून लष्करे सज्ज असतात. पण भविष्यातली युद्ध की वर उल्लेख केल्याप्रमाणेच होण्याची शक्यता  जास्त आहे. 

चीनने हा व्हायरस कसा बनवला हे आपल्याला कळो न कळो पण या जागतिक संकटाच्या वेळी एका जबाबदार देशाचं वर्तन ज्याप्रमाणे असायला हवं त्याप्रमाणे चीन नक्कीच वागत नाहीये. 

चीनशी लढायला अनेक आघाड्यांवर आपल्याला तयारी करावी लागेल. यात भूराजनीति (geopolitics), आर्थिक आघाडी, लष्करी ताकद, विज्ञान आणि प्रौद्योगिकी, ऐतिहासिक सांस्कृतिक सॉफ्ट पावर आणि इतकंच नव्हे तर लडाख, तिबेट, आणि चीनमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात असलेली विविध बौद्ध मते आपल्याला समजून घ्यावी लागतील.

म्हणूनच सुन जू चे एक प्रसिद्ध वाक्य कायम लक्षात ठेवलं पाहिजे Know Yourself, Know Your Enemy, A Hundred Battles, A Hundred Victories.

तस्मात उत्तिष्ठ!

🖋️ मंदार दिलीप जोशी व Yashark Pandey
आषाढ शु १४, शके १९४२

Monday, June 29, 2020

पेंगळ्यांची शाखा फुले (विडंबनः बगळ्यांची माळ फुले)

पेंगळ्यांची शाखा फुले (विडंबनः बगळ्यांची माळ फुले) 

पेंगळ्यांची शाखा फुले सोनियाच्या अंगणात
राडा आपुला स्मरशी काय भूतकाळात

जमती कवटीत बीन थेंब पावसाचे
झोल्या मंत्र्यास खुले रान वादळाचे
आश्वासन देत फिरतो मग कोकणात
पेंगळ्यांची शाखा फुले सोनियाच्या अंगणात

त्या गाठी, त्या गोष्टी, खंडणीच्या (प)खाली
मांडवली तव घरटी भर दिवसा झाली
पर्यवसान होईल का विकल कोथळ्यात
पेंगळ्यांची शाखा फुले सोनियाच्या अंगणात

हातांसह धनुष्याची गाठ बांधताना
घड्याळाचे दोन काटे मिळुनि फिरवताना
उसापरी मिळुनि सारे सतत पिळतात
पेंगळ्यांची शाखा फुले सोनियाच्या अंगणात

तू गेलीस तोडुनि ती माळ, सर्व धागे
मळमळणे पेंविनचे अन् गंजका, खंजीर उरे मागे
सलते ती तडफड का कधी तुझ्या पक्षात?

पेंगळ्यांची शाखा फुले सोनियाच्या अंगणात
राडा आपुला स्मरशी काय भूतकाळात

🖋️कवी: सा. रा. शांत
मंदार दिलीप जोशी  

टळटीप: ताल, लय आणि सूर हे जुळवून आणण्यासाठी पेंग्विन बाबा की जय.

भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी लाईव्ह येऊन गातो, तू मला शिकविली गीते
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
भय इथले संपत नाही

ते झरे चंद्र शरदाचे, ती धरती हिरवी माया
शेवाळ्यावर घसरलो आपण, सर्दीत नाक पुसाया
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
भय इथले संपत नाही

तो बोल मंद हळवासा, पार डोक्यावरूनि गेला 
कोरोना प्रादुर्भावातील, जणु कोमट पाणी प्याला
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
भय इथले संपत नाही

नारळात कवटी अवघी, किंचाळत दुःख कुणाचे
हे पडता पडत नाही, सरकार तिघाडीचे
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
भय इथले संपत नाही
मी लाईव्ह येऊन गातो, तू मला शिकविली गीते
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते

🖋️ कवी डिसग्रेस
मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. ९, शके १९४२

मराठी चुड़ैलों की फिल्मोंं में कमी

आप को कदाचित पता होगा कि अनुष्का शर्मा की संस्कारी चुड़ैलों की ट्रायलॉजी में तीसरी फिल्म है, बुलबुल. फिल्लौरी, परी और अब बुलबुल. एक पंजाबी, एक बांग्लादेशी और एक बंगाली चुड़ैल.

मुझे एक बात की शिकायत है अनुष्का शर्मा से. वैसे उनके पती विराट से भी है की वो मराठीयों को टीम में ज्यादा लेते नहीं हैं। यही शिकायत अनुष्का से भी है।

ब्रूस विलीस की डाय हार्ड अर्थात कडक मृत्यू फिल्मो के तीन भाग होते होते लगा था चरम पर सिरीज खतम हो गयी है। परंतु नहीं। गन्ने के भूत से भी रस निकालने की कला तो हमें अवगत है परंतु उस कला का फिल्मो में यशस्वी प्रयोग हॉलिवूड ने ही किया है। ऊन्होने ऑफिसर मक्लेन के किरदार को रबरबँड से अधिक खिंचते हुए चौथे भाग में बेटी एवं पांचवे भाग में बेटे का किरदार को लेकर दो और फिल्में बना डालीं। 

उसी प्रकार संस्कारी चुड़ैलों के सिरीज में चौथी फिल्म में चुड़ैल को मराठी दिखा सकते हैं।  वैसे मेरे मस्तिष्क में इस रोल के लिये तीन महिलाओं का नाम है परंतु वो अपने समाजसेवा एवं राजनीती के अच्छी खासी आमदनी के क्षेत्रों को छोडकर फ़िल्मों में आने के लिये तैय्यार होंगी भी या नहीं पता नहीं। खैर कुछ ना कुछ जुगाड़ हो जायेगा।

वैसे अजिंक्य रहाणे से पता चला है की विराट को मराठीयों से विराट को वैसे तो कोई समस्या नहीं हैं परंतु उनका कहना है की मराठीयों की गालियाँ उतनी पॉवरफुल नहीं लगतीं जितना पंजाबीयों की जाकर दुष्मन को चुभती हैं। मैं फेसबुक के माध्यम से उनको बताना चाहता हूं कि ऐसा कतई नहीं है। 

मुझे लगता है कि ऐसी ही कोई शिकायत अनुष्का शर्मा को होगी। उन्हें लगता होगा कितना भी मेकअप कर लो मराठी अभिनेत्रीयां उतनी डरावनी नहीं लगेंगी। तो मैं उन्हें आश्वस्त कर देना चाहता हूं कि मैने उपर जिन तीन महिलाओं की बात की है उन्हे देखकर स्वर्गीय रफी साहब के 'उन्हे देखकर रो रहे हैं सभी' गाने की याद आ जायेगी। और तो और मेकप की भी आवश्यकता नहीं पडेगी। 

परंतु उनका नाम अभी नहीं बता सकता। कमिशन का प्रश्न है। और सायनिंग अमाउंट पसंद नहीं आया तो मुझे बंगले पर ले जाकर....खैर....आप पहले अनुष्का से चौथे सिक्वेल के एमओयु अर्थात मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग पर साइन तो करवाईए।

🖋️ मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. ९, शके १९४२

बहिष्कारापेक्षा जालीम उपाय

बहिष्कारापेक्षा जालीम उपाय सांगतो. यापुढे सिनेमावर पोस्ट लिहिताना काही जेष्ठ हिंदी चित्रपट अभिनेत्यांच्या नावाआधी त्यांच्या वयाचा उल्लेख करावा.

उदाहरणत:
५४ वर्षीय शाहरुख खान व ३४ वर्षीय दीपिका पदुकोण एका नव्या सिनेमात झळकणार आहेत. यापूर्वी हे दोघे अनुक्रमे ४७ वर्ष व २७ वर्षे वयाचे असताना चेन्नई एक्स्प्रेस या सिनेमात आपल्याला दिसले होते. दीपिकाच्या धाकट्या भावाची भूमिका ४९ वर्षांचे सैफ अली खान करणार आहेत.

या सिनेमात ५४ वर्षीय सलमान खान आपल्याला तरुण कॉलेज प्राध्यापकाच्या पाहुण्या भूमिकेत दिसणार आहेत. यात ते दीपिकाच्या जराच मोठ्या असलेल्या भावाच्या भूमिकेत दिसणार असून त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत चाळीशी गाठलेल्या करीना सैफ अली खान दिसतील.

चित्रपटाची कथा गुप्त ठेवण्याचा प्रयत्न झाला असला तरी आमच्या वार्ताहराने काढलेल्या बातमीनुसार कथावस्तू एका तरुण शास्त्रज्ञाच्या संघर्षाभोवती गुंफलेली असून ती त्यातून नायक व त्याचे समवयस्क सहकारी कसे मार्ग काढतात या भोवती फिरते.

🖋️ मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. ९, शके १९४२

Friday, June 26, 2020

अँटीहीरो आणि आपण

चित्रपटांतून कुकर्म अर्थात चोरी, दरोडेखोरी, स्मगलिंग, माफिया इत्यादी कृत्ये करणार्‍यांना किंवा आपल्याला हवं ते वाट्टेल त्या मार्गाने मिळवणारा नायक म्हणून प्रस्तुत केलं जाण्याची सुरवात खरं तर खूप पूर्वी झाली. ढोबळ मानाने सांगायचे झाले तर ही सुरवात अशोक कुमार नायक असलेल्या किस्मत (१९४३) या सिनेमापासून झाली असं म्हणता येईल. मात्र त्या वेळी जेवणात मीठ असावं इतकं अशा सिनेमांचं प्रमाण होतं. या प्रकाराला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली ते मात्र अमिताभ बच्चनच्या अँग्री यंग मॅन सिनेमांनी. 

त्या काळात बॉलीवूड पुर्णपणे दाऊद आणि अंडरवर्ल्डच्या ताब्यात केलेलं नव्हतं तेव्हा किमान जे काही निर्माण व्हायचं त्याचा दर्जा उत्तम असायचा आणि म्हणूनच या प्रकाराला प्रतिष्ठा मिळण्यातून एक साध्य झालं की सामान्य जनतेच्या मनातलीही डॉन किंवा भुरट्या चोर्‍या करणार्‍याबरोबरच मोठे गुन्हे करणारा गुन्हेगार या प्रकाराबद्दल भीतीयुक्त तिरस्कार या भावनेची जागा कुतुहूलयुक्त आकर्षणाने घेतली. हे का झालं, याचा शोध घ्यायचा तर या चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते यांच्या नावांचा शोध घ्या, त्यांची पार्श्वभूमी तपासा म्हणजे तुम्हाला याचं रहस्य उलगडेल. चित्रपटसृष्टी पूर्णपणे माफियामय झाल्यावर त्याना दर्जाशी काही देणंघेणं उरलं नाही, कारण जो परिणाम पापभीरू जनतेच्या मनावर करायचा होता तो आधीच करुन झाला होता. उदाहरणादाखल शोले, डॉन, आणि परवाना या तीन सिनेमांबद्दल वाचा. 

गुन्हेगारांच्या उदात्तीकरणाबरोबरच उद्योजक हे रक्तपिपासू, दुष्ट, स्वार्थी लोक असे रंगवले गेले. जुन्या काळचे, म्हणजे अगदी कृष्णधवल काळापासूनचे सिनेमे पाहिले तरी नायक हे गरीब पण मनाने उदार. उलट मारवाडी पोषाखातले, सेठ धरमदास किंवा तत्सम सूचक नावे असलेले वगैरे नाव असणारे व्हिलन, गोरगरीबांना लुटणारे असेच दाखवले गेले. हिंदी चित्रपटांतून भारतीय/हिंदू संस्कृतीचे विकृत दर्शन आणि शांतीदूतांचे उदात्तीकरण हा संबंधित पण मोठा विषय आहे, त्या संदर्भात इथे वाचता येईल.. 

कट टू १९९० दशकः 
"हाऊ क्युट ना, ही ही ही ही": कु़ख्यात डॉन अबू सालेम ह्याला अटक केल्यावर वैद्यकीय तपासणीसाठी इस्पितळात आणलं असता त्याला 'बघायला' जमलेल्या तिथल्या काही निवासी महिला डॉक्टरांचे हे उदगार आहेत. तो क्युट आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण एका अंडरवर्ल्ड डॉनला – एका गुन्हेगाराला, खून्याला बघायला एवढी गर्दी? ते ही ठीक आहे, पण चांगल्या घरातल्या (हे गृहीत धरलं आहे) उच्चशिक्षित होऊ पाहणार्‍या महिलांच्या तोंडून हे असले उदगार निघावेत हा उपरोल्लेखित उदात्तीकरणाचाच परिणाम म्हणावा लागेल.

जे निर्माते "लोकांना पाहिजे ते आम्ही देतो" असा युक्तीवाद करतात तो अंशतः बरोबरच आहे, पण 'लोकांना काय हवं' या पेक्षा 'लोकांना काय चालतं ते आम्ही देतो' हे सत्याच्या अधिक जवळ जाणारं आहे. आणि लोकांना ते चालावं याची पार्श्वभूमी ऐंशीच्या दशकातच तयार करण्यात आली हे आपण विसरता कामा नये. प्रत्येक माणसांत करड्या छटा असतात असं गोंडस पण फसवं कारण देऊन गुन्हेगारीला वलय आणि सामाजिक स्वीकारार्हता प्राप्त करुन देण्यात आली.

हरणमार्‍या सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी अटक झाली. जामीनावर सुटका झाल्यावर त्याच्या बंगल्याच्या गच्चीत त्याने त्याच्या नेहमीच्या उघड्या अवतारात अत्यंत उर्मट भाषेत आपल्या 'चाहत्यां' समोर एक निर्ल्लज्ज भाषण ठोकलं. त्याचा प्रत्येक शब्द साधारण शंभराच्या आसपास जमलेले ते चाहते उचलून धरत होते. अक्षरशः जल्लोष सुरु होता. त्याने काही वावगं केलंय हेच उपस्थितांपैकी कुणाला वाटत नव्हतं!! मग त्याचा निषेध करणं, बहिष्कार टाकणं सोडाच!!! काही काळाने त्यानं मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्याकडेला झोपलेल्या काही लोकांना चिरडलं (यातून तो निर्दोष बाहेरही पडला). नंतर सलमान अनेक चित्रपट आणि रिअ‍ॅलिटी शो यामधून झळकला आणि आजही उजळ माथ्याने वावरतो आहे.

पिसाटलेला मिडीया हा एक मोठा विषय आहे, पण सर्वसामान्य लोकांनी चवीने त्यांचे सिनेमे बघितले हे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. एकीकडे सरकार कायदा आणि सुरक्षितता राखण्यात कसं अपयशी ठरतं आहे ह्याच्या चर्चा करायच्या आणि दुसरीकडे कायदा मोडणार्‍यांना आपल्याच पैशाने अधिकाधिक लोकप्रिय आणि धनवान व्हायला मदत करायची हा सर्वस्वी आपला दोष आहे. 

कट टू २०२०:
कै. सुशांत सिंगच्या निमिताने आज करण जोहर, सलमान, शाहरुख या सगळ्यांना आपण लक्ष्य करतो आहोत, पण ही सगळी आपली आणि आपल्या आधीच्या पिढीची अपत्ये आहेत एवढं ध्यानात आलं तरी पुरे. पूर्वी सोशल मिडीया नसल्याने या गोष्टी किंवा या मागचा पॅटर्न सहज लक्षात येत नसे, पण आता हिरवे आणि लाल सगळेच तर्क आणि पुराव्यानिशी उघडे पडत असताना आपल्याकडे ते कारण नाही. आजही आपण तेच करणार असू तर आपल्यासारखे मूर्ख आपणच.

✒️ © मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. ५/६, शके १९४२