Friday, April 17, 2020

एकस्रोत अधर्मी एवं रामायण

रामायण के परसोंं के एपिसोड में महाराज बिभीषण वैद्यराज सुषेण से कहते हैं:
धर्म और अधर्म की व्याख्या सदैव एक नहीं रहती। वैद्य का धर्म है, सबकी पीडा हरना एवं उनके प्राणो की रक्षा करना। वैद्यक किसीं एक के लिये नहीं, अपितु सारे मानवजाती की दुखदर्द की रक्षा का उपाय करने एवं उसकी पीडा हरने के लिये है। यही चिकित्सक का सर्वोपरी धर्म है।

वैद्यराज सुषेण कहते हैं: राजनीती का सिद्धान्त कहता हैं कि आपको मेरा विश्वास नहीं करना चाहीये। मैं शत्रूपक्ष का वैद्य हूं। आप के रोगी का अहित कर सकता हूं।

इसपर प्रभू श्रीराम कहते हैं:
वैद्य का कोई शत्रू नहीं होता, कोई मित्र नहीं होता। वैद्य और रोगी के बीच तो केवल विश्वास की एक अलौकिक डोर होती है। मैं अपने अनुज लक्ष्मण को आप को सुपूर्द करता हूं। राजभक्ती का पालन करने के लिये चाहे तो इसके प्राण ले लिजीये अथवा वैद्य का धर्म पालन करने के लिये इसे जीवनदान दे दिजीये, ये मैं आप पर छोडता हूं। आप पर मुझे पूरा विश्वास है।

प्रभू श्रीराम तो अपने शत्रू के वैद्यराज के हाथ अपने अनुज के प्राण रख देते हैं। तथा रावण जैसे असुर के राजवैद्य सुषेण भी लक्ष्मण की सुश्रुषा करने के लिये तैय्यार हो जाते हैं।


हमारे वैद्यराज एवं समस्त आरोग्य सेवकों ने इसी प्रकार अपने पराये का भेद किये बिना, समस्त रोगीयों की पीडा का उपाय एवं उनके जीवित की रक्षा कर रहे हैं। यह रोग तो ऐसा है कि रोगी पर उपचार करने वाले वैद्यक समुदाय को ही यह रोग होने की पूर्ण संभावना होती है। फिर भी हमारे समस्त वैद्यराज तथा आरोग्यसेवक यह सोचे बिना सारे रोगीयों की सेवा कर रहे हैं कि इनमें से कुछ रोगीयों में ऐसे असुरी मानसिकता के लोग हैं जिनके विचार कई शतकों से मानवता का विनाश ही करते आ रहे हैं, एवं भविष्य में भी करते रहेंगे ।

परंतु इसके उपलक्ष में उनपर कुछ एकस्रोत अधर्मी (sℹ️ngle s⭕️urce threat) पत्त्थर फेंकने का, वमन तथा थूत्कृत्य करने का, विवस्त्र होकर नग्नावस्था में नृत्य करने का दुःसाहस कर रहे हैं। इन्हें न मानवता की चिंता है न महिलाओं के सन्मान की। आज न तो ऐसे धर्मपालन करने वाले प्रभू राम हैं न तो ऐसे रोगी जिनके लिये वैद्यराज तथा आरोग्यसेवक अपने प्राण दांव पर लगा दें और न तो ऐसे धर्मपालक रोगी एवं उनके परिजन हैं जो शत्रू के हाथ अपने रोगी के प्राण विश्वासपूर्वक सुपूर्द कर दें।
इस अवस्था में हमारे वैद्र्यराज तथा आरोग्यसेवकों को स्मरण रहे, कि वैद्यों पर जो रोगी की रक्षा का दायित्व है, वो केवल उस समय तक है जब तक रोगी अपने धर्म का पालन करे। रोगी यदि अपनी व्याधी के कारण उत्पन्न भ्रम के चलते कोई असभ्य कृत्य करता है तो वह रोग का ही एक भाग होता है, तस्मात इस अवस्था में भी वैद्य अपने सुश्रुषा के धर्म का पलन करने के प्रति बाध्य होते ही हैं।

परंतु यदि सामनेवाला केवल अपने धर्म का पालन नहीं करता अपितु वो एक महापापी विचार से षडयंत्र का भाग बनकर वैद्य समुदाय पर उनके दुष्कृत्यों से अत्याचार करता है, तो पुलिस, न्यायालय, एवं सरकार का यह कर्तव्य है कि वे वैद्यक समुदाय को मार्गदर्शन करें कि ऐसे अधर्मीयों से कैसे वर्तन करें तथा उन्हें ऐसे वर्तन के लिये यह अधिकार भी प्रदान करें जिससे उन्हें आगे चलकर समस्या न उत्पन्न हो।

प्रभू श्रीराम ने यह भी कहा था कि हमारी शरण में आनेवाले के प्राणरक्षण करना हमारा धर्म है। परंतु यदि कोई युद्ध की इच्छा से हमारे समक्ष उपस्थित होता है तो उससे युद्ध करना ही हमारा धर्म तथा कर्तव्य है। तो यह एकस्त्रोत अधर्मी हमारे वैद्यक समूदाय से जिस प्रकार का वर्तन कर रहे हैं, वह युद्ध ही तो है। इस कारण वैद्यक समुदाय को ऐसे मार्गदर्शन की नितांत आवश्यकता है।

प्रभू श्रीराम सबकी रक्षा करे। जय श्रीराम 🙏

© मंदार दिलीप जोशी

Tuesday, April 7, 2020

कलियुगातली भरत "भेट"

सद्ध्या रामायण मालिका सुरू आहे.

महाराज दशरथांनी माता कैयेयीला दिलेल्या दोन वरांची पूर्तता करायला राम अगदी सहज वनवास मान्य करुन अयोध्येतून निघून जातो. त्याच्यासोबत पत्नी सीता आणि धाकटा भाऊ लक्ष्मणही. आजोळी गेलेल्या भरताला हे कळल्यावर तो आईची कठोर शब्दांत निर्भत्सना करतो आणि रामाला आणायला सगळ्यांसोबत वनात जातो. रामाने नकार दिल्यावर तो त्याच्या पादुका अयोध्येत सिंहासनावर ठेवतो आणि रामाच्या वतीने राज्य करतो. धर्मपालन करण्याकरता, दिलेला शब्द पाळण्याची आपल्या कुळाची परंपरा आहे तिची प्र्तिष्ठा राखायला आपल्या हक्काचं असलेलं राज्य सहज दुसर्‍याला देऊन टाकणारा राम आणि आपल्या हक्काचं नसलेलं पण आयतं मिळालेल्या राज्याचा राजा म्हणून उपभोग घ्यायचं नाकारून ते रामाला परत द्यायला निघालेला आणि रामाच्याच पादुका सिंहासनावर ठेऊन त्याच्या वतीने राज्य करणारा भरत अशी देवमाणसे होती म्हणून आपलं राष्ट्र मोठं झालं.

भरत मिलाप आज: श्रीराम और भरत का हुआ ...

असं आजच्या काळात घडू शकेल का? असं आज कोण करेल? दोन घराच्या मधलं कुंपण एक इंच इकडे की तिकडे यावरुन पिढ्यानपिढ्या कोर्ट्कज्जे करणार्‍याया लोकांच्या काळात भरतासारखी वृत्ती कुणाची असेल? असा विचार मनात आला आणि लगोलग एका मित्राने सांगितलेला किस्सा आठवला. तो सांगतो आहे अशा पद्धतीने हा किस्सा तुमच्या समोर मांडतो आहे:

"मी आमच्या गावी हल्ली सहा सात वर्षांपासून नियमित जाऊ लागलोय. माझ्या जन्माच्या फार आधीपासून, म्हणजे साधारण २०-२५ वर्ष आधीपासूनच, आजीने घरचे संबंध तोडले होते किंबहुना तिला तोडायला लावले गेले असं म्हणणं संयुक्तिक ठरेल. साधारण १९६५ च्या दरम्यान घडलेली ही गोष्ट आहे. आजीचे आणि इतर घरच्यांचे काही गंभीर स्वरूपाचे वैयक्तिक वाद झाले आजीला बाबांच्या चुलत्यांनी घराबाहेर काढलं. आजीने फक्त जुजबी कपडे आणि तेव्हा दहा वर्षाच्या माझ्या बाबांना कडेवर घेऊन घर सोडलं आणि बदलापूरात निघून आली.

वडिलांचा मामा इकडे राहत असे, त्याने एक घर पाहून दिले, आजीला नोकरी लावून दिली. मग आजीने २०-२५ वर्ष नोकरी करुन बाबांना मोठं केलं. लग्न लावून दिलं. आजोबा तिकडेच राहायचे, आणि वर्षातून एकदा दोनदा इकडे त्यांना न सांगता इकडे आजीला आणि बाबांना भेटायला याय. त्यांनी घरच्यांना विरोध केला नाही म्हणून आजीचा त्यांच्यावरचा राग कधीच गेला नाही. 

ती चुलत्यांची पिढी नंतर कालौघात संपली आणि जवळजवळ पन्नास वर्षांनि आता माझे जे चुलत चुलते आहेत, त्यांच्यापैकी दोन नंबरचे काकाआजोबा आहेत त्यांचा मुलगा सहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ मध्ये आजीला शोधत इकडे आले. मला गावी घेऊन गेले आणि सगळी कायदेशीर कारवाई करून सगळीकडे सातबाऱ्यावर, घरावर आमची आजीची, आईची, आणि माझी नावे लावून घेतली (माझे बाबा हयात नाहीत). हे माझे चुलत चुलते सांगतात, ती लोक सगळी नालायक होती आमच्या काकूशी अशी वागली. आम्ही लहान होतो तेव्हा. जे झालं ते झालं, पण आता ज्यांच्या हक्काचं जे आहे ते त्यांना मिळायला हवंच. 

हे एवढावरच थांबलं नाही. त्यांनी मध्यंतरी जमिनीचे व्यवहार करायचे होते तेव्हा मला बोलवून  घेतले आणि माझा त्यात हिस्सा आहे म्हणून माझ्या परवानगीने सगळे सोपस्कार पार पाडले. त्या व्यवहारात जे पैसे मिळाले त्याचा हिशोब मला देऊन ते पैसे माझ्या खात्यातही भरले. त्यांंचं म्हणणं असं की आम्हाला आमचं आहे अजून काय करायचं आहे अधिक हाव ठेवून?! त्या काकाने असं करायचं कारण म्हणजे त्याची आई.. जी आमची दोन नंबरची काकूआजी.. तिने हे सगळं ठरवून मोठ्या मनाने केलं.. आता ते घर आणि तिथलं सगळं ही काकूआजी पाहते. ती एकदम देव माणूस आहे. 

गावचं घर पाहणारे आमचे चुलत काका भजनीबुवा आहेत. टिळा लावून पांढरा झब्बा लेंगा घालून फिरणारे. गुरुवारी तिथल्या दत्ताच्या देवळात, शनिवारी मारुती मंदिरात भजनाला टाळ घेऊन असतात. कधीही घरी गेलो की सकाळी वाडीतल्या बागेत धोतर नेसून परडीत फुलं काढताना, नाहीतर दुपारी वाडीत वालीच्या खोप्यात बंदूक घेऊन माकडांना हुसकवताना दिसतात. नाहीतर चुलीसाठी लाकडं आणताना दिसतात. काकू परसदारी हौदात कपडे धुताना नाहीतर भांडी घासताना दिसते. काकूआजी पडवीतल्या झोपाळ्यावर बसून सुपारी कातरताना दिसते. खळ्यात काजू नाहीतर कोकम वाळत घातलेली दिसतात. टिपिकल कोकणातल्या घरातलं दृश्य.

मग मी आता चार सहा महिन्यांनी पडीक असतो तिकडे. येताना मला घरची कोकमं, मोहरी, वाली, मिऱ्या, काजू, गरे बांधून दिले जातात. 

जाताना हलका जाणारा मी येताना आनंदाचं ओझं घेऊन घरी येतो.

आजकालच्या काळात असा विचार मनात येणं हीच मोठी गोष्ट. बरं आला जरी, तरी इतक्या वर्षांपूर्वी दुरावलेल्या नातेवाईकांना चिकाटीने शोधून काढणं ही त्याहून मोठी गोष्ट. आणि वर तरुण वारसाला सोबत घेऊन सगळीकडे कागदोपत्री नावे लावणे म्हणजे कहर आहे. धन्य ती मित्राची काकू आजी आणि धन्य ते चुलते ज्यांनी हे सगळं घडवून आणलं. 

भारतातल्या एकूण हिंदू लोकसंख्येपैकी १% लोक जरी असं वागायला लागले, तर रामराज्य नाही तरी त्याचे वारे नक्की वाहू लागतील हे नक्की.

शुभ रात्री मित्रांनो. जय श्रीराम |

© मंदार दिलीप जोशी
चैत्र चतुर्दशी, हनुमान जयंतीचा उपवास, शालीवाहन शके १९४२

Tuesday, February 25, 2020

त्यांना घरं का मिळत नाहीत - उपकथानक

काही दिवसांपूर्वी मित्र ब्रिजेश मानव राणा यांना आलेल्या एका भूत बंगल्याबद्दलचा अनुभव मांडला होता. सुरवात करण्यापूर्वी सांगतो की मागील लेख वाचून मला अनेकांनी फोन, व्हॉट्सएप, व फेसबुकवर आपापले अनुभव सांगितले. ते पाहून मनातली उरलीसुरली शंकाही संपली.

तुम्हाला आठवत असेल तर मागील लेखात ब्रिजेशही म्हणाले होते की त्या घरातल्या मुलांशी मैत्री झाल्यावरही त्यांच्या मित्रमंडळींपैकी कुणीच तिथे पाणी सुद्धा पीत नसे, पण ते मात्र तिथे पाणी पीत व त्याचे त्यांना परिणामही भोगायला लागले. त्या लेखाचा विषय वेगळा असल्याने त्यांनी तो पुन्हा केव्हातरी त्याबद्दल सांगू असं सांगितलं होतं, तो ही अनुभव आज तुमच्यापुढे मांडत आहे.

माझ्या शेजार्‍याच्या बंगल्यातून 'भूत' गेलं होतं आणि त्य घरातल्यांना येणारे भलतेसलते अनुभव येणं सुद्धा थांबलं होतं. पण फक्त मी त्यांच्या घरचं पाणी पीत असे म्हणून...

रात्री मी गाढ झोपेत असताना मधेच आपण एखाद्या काळोख्या खोल विहीरीत पडत आहोत असा मला भास होत असे. माझा मेंदू मला सांगायचा की अरे तू घरी बिछान्यावर झोपलेला आहेस, पण पडत असताना खाली गार गार वारा लागतो आहे असं स्पष्टपणे जाणवत असे. कितीही प्रयत्न केले तरी उठता येत नसे. असा काही वेळ गेल्यावर कधीतरी वाटत असे की आता तळ आलाय आणि आपण जोरदार आपटणार, तेवढ्यात खडबडून जाग यायची आणि उठल्यावर सर्वांगाला दरदरून घाम फुटलेला असायचा. हे पहाटे साधारण १ ते २ च्या मधे होत असे. हे प्रकार दर दोन ते चार महिन्यांनी व्हायचे पण हळूहळू असे अनुभव आलेल्या दोन रात्रींमधला काळ कमी होऊ लागला.

आता हा प्रकार दर ४-५ दिवसांनी होऊ लागला. आईने कुठलाही उपचार करायचं शिल्लक ठेवलं नव्हतं. भारताच्या उत्तर भागातला एकही वैद्य तिने शिल्ल्क ठेवला नसेल. भयंकर कडू औषधे आणि काढे घेऊन झाले, पण काहीही परिणाम झाला नाही. या प्रकारांना घाबरून मी रात्री झोपायलाच घाबरत असे. डोळे लाल दिसायचे पण शरीराला थकवा जाणवत नसे.

त्या वर्षी मी झज्जर पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला आणि तिथल्या हॉस्टेलवर राहू लागलो. पण तिथेही तोच प्रकार. सलग पाच-सहा दिवस झोपेची बोंब. रात्र रात्र मी बाहेर भटकत असे, पण जागेपणी काहीच त्रास झाला नाही.

झज्जरहून घरी येण्याचे दोन मार्ग होते, एक म्हणजे झज्जर ते सोनीपत थेट बसने आणि दुसरा म्हणजे झज्जर ते बहादुरगड, बहादुरगड ते नरेला, आणि नरेला ते सोनीपत ट्रेनने. दुसरा मार्ग लांबचा असला तरी मधे आराम करायला वेळ मिळायचा म्हणून मी याच मार्गाने यायचो.

एक दिवस असाच परतत असताना नरेला स्टेशनवर ट्रेन सुटायला खूप उशीर झाला. नरेला फक्त दोन प्लॅटफॉर्म असणारं एक लहानसं स्टेशन आहे. दुपारची वेळ होती, स्टेशनवर शुकशुकाट दिसला म्हणून इकडेतिकडे पाहिलं तर लांब एका झाडाखाली बरेच लोक जमलेले दिसले. मी तिथे पोहोचेपर्यंत ह्या गर्दीचा केंद्रबिंदू असलेल्या एका माणसाने आपलं चंबुगबाळं आवरायला सुरवात केली होती. फिरते वैदू असतात तसा तो इसम दिसत होता. इतके उपाय करुन झालेत तर यालाही सांगू म्हणून मी मला होत असलेला त्रास त्याला  सांगितला. आजूबाजूला पाहून तो किंचित हसला. मी तिथे पोहोचल्यापासून सुरु झालेलं आजूबाजूच्या कुत्र्यांचं भुंकणं माझ्या लक्षात नव्हतं आलं, पण त्याने ते अचूक हेरल्याचं त्याच्या नजरेत दिसलं.

"येत्या गुरूवारी माझ्याकडे ये", तो म्हणाला.

"पण तुमचा पत्ता..."

"धान्य बाजारात विचार, छोटे पंडितजी कुठे राहतात, कुणीही सांगेल." तो उत्तरला.

नरेला स्टेशन लहान असलं तरी तिथला धान्य बाजार त्या काळी आशिया खंडातला सगळ्यात मोठा धान्य बाजार होता, आताचं ठाऊक नाही, कदाचित अजूनही तो आपला रुबाब टिकवून असेल.

घरी येऊन आईला विचारलं तर ती म्हणाली ये जाऊन.

छोटे पंडितजींचं ठिकाण नरेला धान्य बाजारापासून अर्धा किलोमिटरवर होतं. तिथे पोहोचल्यावर एका घरी एका शेठजींना विचारल्यावर ते म्हणाले की पंडितजी इथेच पुढच्या खोलीत राहतात. त्यांचे आभार मानून मी त्या खोलीत शिरलो. ती खोली म्हणजेधान्याच्या एका मोठ्या कोठारासारखी होती, आणि छोटे पंडितजी एका कोपर्‍यात निरंजन लावून बसलेले होते. मी त्यांना नमस्कार केला, तसं मला त्यांनी खुणेनेच बसायला सांगितलं. दोन मिनिटांनंतर त्यांनी एका कागदाच्या चिठोर्‍यावर बोटानेच काहीतरी लिहीलं आणि मला तो चिठोरा दिला. झोपताना उशाखाली ठेव असं बजावून पुढच्या शनिवारी यायला सांगितलं आणि मला निरोप दिला.

त्यांनी सांगितल्यासारखं मी केलं, आणि पुढचा पूर्ण आठवडा शांत झोप लागली. किंबहुना इतकी शांत झोप मला कधी लागल्याचं आठवत देखील नाही. ठरल्याप्रमाणे पुढच्या शनिवारी मी परत त्याच घरी, त्याच खोलीत पोहोचलो. छोटे पंडितजी तिथेच कोपर्‍यात निरंजन लावून बसले होते. त्यांनी माझ्याकडून कागद घेऊन तो निरंजनाच्या ज्योतीवर जाळला. कागदाचा तेवढा कपटा जळायला मिनिटभर सुद्धा लागलं नसतं तिथे तो कागद जवळजवळ २० मिनिटं जळत होता. हे काहीतरी भलतंच होतं.काअ

कागद पुर्ण जळाल्यावर त्यांनी मला निरोप दिला.

घरून निघताना आईने मला त्यांना दक्षिणा म्हणून अर्पण करण्याकरता काही पैसे आणि कापड दिलं होते. ते त्यांना देऊ लागताच त्यांनी घ्यायला साफ नकार दिला आणि सांगितलं या कापडाचं तूच काहीतरी शिवून घाल.

पंडितजींचा आशीर्वाद म्हणून मी त्या कापडाचे कपडे शिवून वापरू लागलो.

त्या आठवड्यात लागलेली शांत झोप तशीच पुढेही लागली. आता मी पूर्ण 'बरा' झालो होतो.

साधारण महिन्याभरानंतर पुन्हा माझ्या गाडीला उशीर झाला, ते ही तब्बल दोन तास. म्हटलं अनायसे वेळ आहे तर छोटे पंडितजींकडे चक्कर टाकून येऊया, त्यांचा आशीर्वादही मिळेल.

त्या घरी पोहोचल्यावर पुढच्या खोलीत बघितलं तर कुणीच नव्हतं. फक्त गव्हाची पोतीच पोती होती तिथे. मी त्या शेटजींना विचारलं की छोटे पंडितजी कुठे गेले? त्यावर मला मिळालेलं उत्तर बुचकळ्यत टाकणारं होतं. शेटजी म्हणाले, "कोण छोटे पंडितजी, इथे कुणी पंडित नाही राहत."

"अहो पण जेमतेम महिन्याभरापूर्वी तुम्हालाच विचारलं होतं आणि तुम्हीच म्हणालात ते तिथे पुढच्या खोलीत राहतात", मी म्हणालो.

"अहो मी तुम्हाला आधी कधीच भेटलो नाही. त्या खोलीचं म्हणाल तर ती खोली फक्त कोठार म्हणून वापरली जाते आणि तिथे कुणी पंडितजी वगैरे राहत नाही आणि आधीही राहत नव्हतं. कदाचित तुम्ही पत्ता चुकला असाल, दुसरीकडे चौकशी करा."

आता मला काही कळायचं बंद झालं होतं. घरी येऊन आईला झालेला प्रकार सांगितला. आई विचारात पडली आणि मग म्हणाली, असेल कुणी पवित्र आत्मा (तिला spirit guide म्हणायचं असावं)तुझ्यासाठी खास आलेला.  मला कळेना, पूर्ण शुद्धीत असताना माझ्या डोळ्यांसमोर सगळं घडलं आणि आता जाऊन बघतो तर काहीच न घडल्यासारखं सगळं दिसत होतं.

तेच घर, तेच शेठजी, तीच ती बाहेरची खोली, पण छोटे पंडितजी गायब आणि असं कुणी अस्तित्वातच नसल्याचा त्या शेठजींचा दावा.अस

असं कसं होईल?

🖋️  मंदार दिलीप जोशी
फाल्गून शु २, शके १९४१

सहाय्य: श्री ब्रिजेश राणा व श्री आनंद राजाध्यक्ष

Monday, February 24, 2020

कबीर कला मंच - शहरी व सशस्त्र नक्षलवाद संबंध

~ हिंदी ~

यह पोस्ट इम्तियाज जलील के बयान पर ध्यान आकर्षित करने के लिए नहीं है। हालांकि इन लोगों से कोई पृथक अपेक्षा नहीं है, अंतिम वाक्य पर ध्यान देना आवश्यक है। किसी को भी पता न चलने दें, बस लोगों को उत्तेजित और परेशान करें।

इस पोस्टका मुख्य विषय लाल कोष्ठकमें रेखांकित किया गया है ही| जो कबीर कला मंच शहरी और सशस्त्र नस्लवाद का सक्रिय समर्थक रहा है, उसके कार्यकर्त्याओं की उपस्थिती सीएए के विरोध में हो रहे शांतीदूतों के कार्यक्रमं में होना आश्चर्यकारक है ही नहीं| यह कहना पर्याप्त है कि मंच के कार्यकर्ता एल्रगार सम्मेलन और कई अन्य ऐसी घटनाओं में सक्रिय रूप से कार्यरत होने के इंटेलिजन्स रिपोर्ट हैं। इस तरह से भारत का हर टुकडे टुकडे गँग एक दूसरे से जुड़ा हुआ है।

कबीर कला मंच के विषय में समय समय पर जानकारी देता रहूंगा, यद्यपि बहुत सारा मटेरिअल मराठी में है.

अपने आसपास ऐसे लोगों पर नजर रखें, हो सके तो फोटो भी निकालें, अपनी सुरक्षा का ध्यान रखकर| आगे जब भी महाराष्ट्र में चुनाव होंगे, तब इस बात का स्मरण रहे इतना पर्याप्त है. महाराष्ट्र में आपके परिजन रहते हैं तो उनको अवश्य ये पोस्ट दिखायें|

यदि हो सके तो अपनी वॉलपर यह पोस्ट कॉपी पेस्ट करें, फोटो के साथ|

~ मराठी ~
इम्तियाज जलीलच्या वक्तव्याकडे लक्ष वेधण्यासाठी ही पोस्ट नाही. या लोकांकडून वेगळी अपेक्षा नाहीच, तरी शेवटच्या वाक्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. कुणाला माहीती देऊ नका, फक्त आंदोलन करायचं आणि लोकांना त्रास द्यायचा.

पोस्टचा मुख्य विषय चित्रात लाल कंसात अधोरेखित केलेलाच आहे. कबीर कला मंच या शहरी व सशस्त्र नक्षलवादाला सक्रीय पाठींबा देणार्‍या तथाकथित संस्कृतिक मंचाच्या कार्यकर्त्यांनी सीएएच्या निमिताने अराजक माजवणार्‍या म्लेंच्छांच्या कार्यक्रमात लावलेली उपस्थिती आश्चर्यकारक अजिबात नाहीच. उलट हे नसते तरच आश्चर्य वाटलं असतं. एल्गार परिषदेत आणि नंतरच्या अनेक गोष्टीत या मंचाच्या कार्यकर्त्यांचा सक्रीय सहभाग असल्याचे गुप्तहेर खात्याचे अहवाल आहेत एवढं सांगितलं तरी पुरेसं असावं. भारत तेरे टुकडे होंगे गँग कशी एकत्र झालेली आहे हेच या निमित्ताने पुन्हा अधोरेखित होतं.

कबीर कला मंचाच्या बाबतीत वेळोवेळी पोस्ट करत राहीनच.

पण पुढे जेव्हा केव्हा महाराष्ट्रात निवडणुका होतील, तेव्हा हे लक्षात ठेवा म्हणजे झालं. जमलं तर अशा लोकांवर लक्ष ठेवा, फोटोही काढा, पण स्वतःची सुरक्षितता ध्यानात ठेवूनच.




इतर काही जुन्या बातम्या:










🖋️ मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु. १, शके १९४१

Sunday, February 16, 2020

"त्यांना" घरे का मिळत नाहीत?

शीर्षटीप: तुमचा आत्मा, नजर लागणे, मूठ मारणे, भूत बंगला वगैरे गोष्टींवर विश्वास असेल तर वाचून सावध व्हा. विश्वास ठेवावा की नाही अशा संभ्रमात असाल तर नक्कीच वाचा. विश्वास नसेल तर वाचाच वाचा, आणि किमान एकदा घरी जाऊन विचार करा.

फेसबुकवरचे मित्र ब्रिजेश मानव राणा यांनी सांगितलेली ही हकीकत आहे.

"त्यांना" घरे का मिळत नाहीत
काही वर्षांपूर्वी प्रसिद्धीमाध्यमांतून 'त्यांना' भाड्याने घरे मिळत नाहीत अशी बोंबाबोंब झाली होती. वातावरण खराब होतंय, भेदभाव होतो आहे, वगैरे छापाची ही बोंब होती. प्रत्येक घटनेच्या वेळी हिंदूंना दोष दिला जायचा कारण अर्थातच घरं हिंदुंचीच असायची, हिंदू कशाला त्यांच्या वस्तीत जाऊन राहतील नाही का! नंतर जेव्हा या घटनांमागची कारणं पुढे यायला लागली तेव्हा मिडियातली ही बोंबाबोंब बंद झाली कारण त्यांचा डाव आता त्यांच्यावरच उलटण्याची परिस्थिती ओढवली होती.

पण उघड झालेल्या कारणांत सुद्धा घरातल्या आणि वस्तीतल्या आयाबहिणींशी अभद्र व्यवहार व इतर भौतिक कारणे होती, पण अशीही कारणे असतात की जी आपण मस्करी केली जाईल या भीतीपोटी उघड बोलायला कचरतो. पण बोलायला तर हवीच कारण कोण जाणे एखाद्या हिंदू कुटुंबाचं नुकसान व्हायला नको. अशीच एक विचित्र, गूढ पण माझ्या समोर घडलेली एक गोष्ट तुमच्यापुढे ठेवतो.

१९८८-९८ या दरम्यान आम्ही सोनीपतमध्ये रहायचो. आम्ही रोज संध्याकाळी घराच्या समोरच असलेल्या खेळाच्या मैदानावर खेळायला जायचो. तिथे जवळच एक घर होतं जी वास्तू भूत बंगला म्हणून कुप्रसिद्ध होती. त्यावेळी मी सातवीत होतो.

ही वास्तूचा साध्या घरापासून ते भूत बंगल्यापर्यंत झालेला प्रवास मी स्वतः बघितलेला असल्यामुळे जसं आठवेल तसं तुमच्यापुढे माझ्या आठवणींची शिदोरी उघडी करतो.

झालं असं की त्या घरात राजस्थानातून एक पाच वेळा प्रार्थना करणारे एक शांतीप्रिय महाशय भाड्याने राहू लागले. हल्ली भाडेकरार सर्रास केला जातो पण त्याकाळी बहुतेक व्यवहार विश्वासावर चालत असल्याने असा भाडेकरार करणं लोकांना आवश्यक वाटत नसे.

सुमारे वर्षभरानंतरची गोष्ट आहे. आम्ही नेहमीप्रमाणे संध्याकाळी मैदानात खेळत असताना घरमालक आणि हे मियां यांचं जोरदार भांडण सुरु होतं. आम्ही तिथे मजा बघत उभे होतो.

गोष्ट अशी होती की घरमालक, हे हिंदू होते, त्यांना त्या घरात रहायला यायचं होतं म्हणून ते त्या भाडेकरू मियाँजींना घर सोडायला सांगत होते आणि मियाँजी घर सोडायला तयार नव्हते.

दुसऱ्या दिवशी घरमालक पोलीस घेऊन आले आणि त्यानंतर मियाँजींनी आठवडाभरात घर सोडलं.

त्यांनी घर सोडल्यावर दोनेक दिवसांनी त्या घरमालक साहेबांनी घराची चांगलीसाफसफाई करून घेतली आणि आपल्या कुटुंबासहित तिथे राहू लागले. त्यानंतर एकाच आठवड्यात त्यांच्या नवविवाहित तरुण मुलाचा आकस्मिक मृत्यू झाला; मग त्यांची मुलगी आजारी पडली. मन विटल्याने त्यांनी ते घर सोडलं आणि दुसरीकडे गेले.

या नंतर जवळपास दोन वर्ष त्या घरात तब्बल १४ वेगवेगळे भाडेकरू राहून गेले. या सगळ्यांच्याच बाबतीत  त्या घरात काही अनाकलनीय आणि अभद्र घटना घडत गेल्या. आसपास असलेल्या इतर घरांमध्ये मात्र सगळं आलबेल होतं.

एक दिवस अचानक राजस्थानच्याच एका हिंदू इसमाने ते घर विकत घेतल्याचं कानावर आलं. शहरापासून तीन किलोमीटरवर त्यांचा कसलासा व्यवसाय होता.

ते येऊन राहू लागल्यावर त्यांनाही त्या भाडेकरूंना आले तसेच अनुभव येऊ लागले. आता त्यांनी आपल्या गावाकडून एका 'जाणकार' इसमाला बोलावून घेतलं. त्याने काही विधी केलेले आम्ही पाहिले, सहा तास लागले त्याला.

आमचं तिकडे येणं जाणं असल्याने त्या नव्या घरमालकाच्या मुलांशी मैत्रीही झाली होती. पण आमच्यापैकी मी सोडून कुणीच त्या घरचं पाणीही पीत नसे. त्याचे परिणाम मला नंतर भोगायला लागले, पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

सात आठ महिन्यांनी हिवाळा सुरू झाला. त्यांच्या कारखान्यातील अनेक गोष्टी बाहेर आवारात पडलेल्या असत, म्हणून ते रात्रीच सायकलवर टांग मारून तिकडे जाऊन झोपत.

एके दिवशी असेच कारखान्यात जाताना त्यांना कुणीतरी सायकलला मागून खेचतय असं वाटलं. पण थांबून बघितलं तर मागे कुणीच नव्हतं. असं त्या दिवशी अनेकदा झालं. एक दिवस संध्याकाळी पाऊस पडू लागला तो थेट रात्री दहा वाजता थांबला, तेव्हा ते फॅक्टरीत जायला निघाले. त्या दिवशी त्यांची सायकल अचानक जाम झाली आणि ते पडले. पुन्हा सायकलवर टांग मारून काही अंतर गेले आणि पुन्हा सायकल जाम झाली. या वेळी ते सावध होते म्हणून पडले मात्र नाहीत. असं वाटत होतं की त्यांना चालत जायला भाग पाडलं जात होतं. त्या रात्री त्यांनी कसातरी कारखाना गाठला.

दुसऱ्याच दिवशी त्यांनी राजस्थानवरून त्याच 'जाणकार' इसमाला बोलावून घेतलं. या वेळी त्यांनी कसलंसं अनुष्ठान केलं आणि पूर्ण कुटुंबाला रक्षसूत्र बांधलं आणि आणखी काहीतरी दिलं.. या नंतर त्यांच्या घरात किंवा कुटुंबियांना काही त्रास झाला नाही.

आता यात काय नुकसान झालं, कुणाचं झालं...त्या वेळी मला समजत नव्हतं पण आता लक्षात येतंय.

आता विचार करा, या घटना कधी सुरू झाल्या, तर त्या पाच वेळच्या नमाजी मियाँना भाड्याच्या घरातून जायला लागलं तेव्हा. जेव्हा त्यांना लक्षात आलं की आता आपल्याला घर सोडायलाच लागेल तेव्हा त्यांनी काहीतरी केलं किंवा करवलं ज्यामुळे अनेक कुटुंबांना त्रास भोगावा लागला आणि घराची 'भूत बंगला' म्हणून बदनामी झाली ती वेगळीच. आधीच्या मालकाला घर कवडीमोल भावात विकावं लागलं. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे विकत घेणारा हिंदूच होता, शातीदूत असता तर पूर्ण कॉलनीचा सत्यानाश नक्की होता.

तर ही झाली ब्रिजेश राणा यांनी सांगितलेली सत्यघटना. तुम्हाला आठवत असेल तर बरोबर वर्षभरापूर्वी २०१९ साली पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मी एका वेगळ्या संदर्भात लिहिलं होतं - "जिहादी शत्रू सीमापार राहत नाही हो. तो तुमचा रिक्षावाला, प्लंबर, पंक्चरवाला, सिनेमाचा हीरो, फळ विक्रेता, सुफी गायक, चिकन दुकानदार, सुतार, आणि शिंपी आहे. तो साडी विकणारा, इंजिनियर, आणि डॉक्टर सुद्धा आहे. जो पर्यंत तुम्ही त्यांच्याकडून सेवा आणि वस्तू घेऊन पैसे मोजत रहाल, तोपर्यंत जिहादला पैशाचा कधीच तुटवडा जाणवणार नाही."

"तेव्हा संताप आलेल्या माझ्या प्रिय हिंदू बंधू आणि भगिनींनो, तुम्ही या समस्येचा एक भाग आहात."

पण या सगळ्या भौतिक (physical) गोष्टी झाल्या, अगदी शांतीपूर्ण समाजाच्या भाडेकरूंना घरातून हाकलूही शकू आपण. एखाद्या प्लबरचा वाईट अनुभव आला तर पुढच्या वेळी माणूस बदलू सुद्धा.

प्लंबर, सुतार, इलेक्ट्रीशियन, गवंडी वगैरे मंडळींचं घरातल्या अशा कोपऱ्यात काम असतं जिथे काही गोष्टी नादुरुस्त किंवा बिघाडग्रस्त होईपर्यंत आपलं तिथे लक्षही जात नाही. आजकालच्या कन्सिल्ड पाइपिंग आणि वायरिंगच्या काळात एखाद्याने काम करता करता पाईप, नळ, टाईल, किंवा वायरिंगच्या मागे तावीज़, गंडा किंवा अशीच एखादी लहानशी 'मंतरलेली' वस्तू ठेऊन गेला तर आपल्याला कळणारही नाही. भौतिक गोष्टींशी आपण लढू देखील, पण ज्या डोळ्यांना दिसत नाहीत आणि कुठल्याही प्रयोगशाळेत व्हायरससारख्या बनवल्याही जाऊ शकत नाहीत त्यांच्याशी आपण कसे लढणार आहोत?

गंमत म्हणजे या शांतीपूर्ण लोकांशी तुमचं काही वैयक्तिक शत्रुत्व असण्याची गरज नसते. भारतावर आक्रमण करणाऱ्या सुलतान, बादशहा, आणि वेगवेगळ्या सरदारांच्या सैन्याला इकडे कुणाशी वैयक्तिक शत्रुत्व नव्हतं. तरी त्यांनी इकडे येऊन फक्त लुटणे आणि राज्य करणे इतकंच केलं नाही तर अत्याचार, बलात्कार, खून, इत्यादी सुद्धा केलं, हा इतिहास आहे.

मुळात तुम्हाला हरप्रकारे त्रास देणं आणि त्यांचा तेजोभंग करणं हा त्यांना मिळालेला दैवी आदेश आहे. विश्वास बसत नसेल तर 9:120 असं गुगलून बघा. नेटवर सहज उपलब्ध आहे, आणि ते सुद्धा पुर्णपणे फु-क-ट.

तुम्हाला असा एखादा अनुभव आला असल्यास जरुर सांगा. या गोष्टीही लोकांना कळणे ही एक प्रकारची जनजागृतीच आहे.

तात्पर्य असं की या लोकांपासून जितकं लांब राहता येईल तितकं लांब रहा. सावधान रहा, सतर्क रहा.

🖋️  मंदार दिलीप जोशी
माघ कृ. नवमी, शके १९४१

सहाय्य: श्री ब्रिजेश राणा व श्री आनंद राजाध्यक्ष

Wednesday, February 12, 2020

बडे अच्छे लगते हैं

काही गाणी अचानक उमगतात, समजतात, आणि खरी वाटू लागतात त्यातलं हे एक.

बड़े अच्छे लगते है...
क्या?
ये धरती, ये नदिया, ये रैना...
...और?
और तुम!


आपल्याला फक्त माणसांबद्दल जिव्हाळा नसतो, तर वस्तू, वास्तू, आणि जागांबद्दलही आत्मीयता असते.

तुम इन सबको छोड़के कैसे कल सुबह जाओगी
मेरे साथ इन्हें भी तो तुम याद बहुत आओगी


काही जुने इंग्रजी आणि त्यावरून ढापलेले हिंदी सिनेमे बघितले असतील, तर त्यात चारचाकी गाडीला जीव किंवा स्वतःचं मन आहे या मध्यवर्ती कल्पनेभोवती चित्रपटाची कथा फिरत असे हे नक्की आठवेल. अनेक कठीण प्रसंगांतून ती गाडी आपल्या मालकाला किंवा त्याच्या मुलाला बाहेर काढत असे. जगात सुष्ट शक्ती आहेत तशाच दुष्ट शक्ती सुद्धा म्हणून एका चित्रपटात एक दुष्ट खुनशी काळी गाडी  'मुख्य भूमिकेत' दाखवण्यात आली होती.

मगर सच्चे लगते हैं,
ये धरती, ये नदिया, ये रैना,
और?
और तुम!


आपली गाडी, शाईचे निबाचे पेन, म्युझिक सिस्टिम, अगदी वॉशिंग मशीन सारख्या घरगुती वस्तू या आपण एकहाती रहाव्या असं म्हणतो त्यामागे व्यक्तीपरत्वे वापरण्याची पद्धत बदलत असल्याने वस्तूंची झीज लवकर होऊ शकते, वस्तू लवकर बिघडू शकते हा साधा तर्कशुद्ध विचार आहे, पण त्यापलीकडे जाऊन माणसांना जशी माणसांबरोबरच निर्जीव वस्तूंबद्दलही जिव्हाळा असतो तसाच जिव्हाळा झाडं, नदी, आपल्या गावची माती अशा वस्तूंनाही माणसांबद्दल वाटू शकतो असं मला तरी वाटतं.

एखादी स्कुटर फक्त आपल्याच लाथेने सुरू होते, तर एखाद्या जुन्या टीव्हीला त्याच्याच मालकाने टपलीत मारल्यावर सुरू व्हायची खोड असते. एखाद्या सवयीच्या किंवा आवडीच्या झाडाखाली आपण बसलो तर एरवी माणसं पाहताच तिथे न फिरकणारे पक्षी आपल्या डोक्यावर घोंघावू लागतात आणि आपण त्या झाडाच्या आणि ते झाड आपल्या सानिध्यात शांतावल्यासारखं वाटतं, तर कधी नदीच्या किंवा स्वच्छ पाण्याच्या ओढ्याच्या संथ वाहणाऱ्या पाण्यात पाय सोडून बसल्यावर लहानगे मासे पायांभोवती निर्धास्त घोटाळू लागतात. कधी वाहतं पाणी पायाशी घुटमळून तळपायाला गुदगुल्या करुन पुढे गेल्याचा भास होतो. वर्षभर बंद असणारं आपलं गावाकडचं घर कुटुंबासहित कुलूप उघडून आत शिरल्यावर एकदम जिवंत होऊन उठतं तर कधी तेच घर आपण एकटे गेल्यावर 'बाकीचे कुठे आहेत, मुलं दिसत नाहीत ती..मग बरोबर मंडळी पण नाही आली ते', असं अपूर्णतेने व्याकूळ होऊन विचारतंय असा भास होतो.

ओ माझी रे, जइयो पिया के देस
ढोबळ विचार केला तर इथे पिया का देस म्हणून फक्त प्रिय व्यक्तीचा देस नव्हे तर आपलं शहरातलं किंवा गावाकडचं घर, अगदी बरीच वर्षे काम करत असलेलं ऑफिस, मित्रांबरोबर चकाट्या पिटायची जागा, देऊळ आणि त्यापुढंचं पटांगण, असं काहीही असू शकतं. जी जागा आपला भावनिक कम्फर्ट झोन असते, तोच पियाका देस.

फक्त ते आपलं असायला, वाटायला हवं. ते नातं सहजीवनाला पूरक अर्थात symbiotic असलं तरच हे शक्य होतं, परजीवी म्हणजे parasitic असलं तर नाही. आपण बहुतांशी symbiotic आहोत म्हणूनच आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलं:
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् |
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ||
 
(महोपनिषद्, अध्याय ४, श्‍लोक ७१)
अर्थात: हा आपला बंधू, तर तो आपला बंधू नव्हे तर परका आहे, असा विचार कोत्या मनाची माणसे करतात. उदार अंत:करणाच्या लोकांकरता हे संपूर्ण जगच कुटुंबासमान आहे.

एका कुटुंबातली लोकं ज्याप्रमाणे वागतात तसं symbiotic वागलं तर माणसं, वस्तू, आणि वास्तूच काय पण संपूर्ण देश तुम्हाला सामावून घ्यायला सरसावतील. Parasitic माणसं मात्र स्वतःच्याही देशात तिरस्करणीय ठरतात. सुज्ञांंस अधिक सांगणे न लगे.

खरंच आहे, काही गाणी अचानक उमगतात, समजतात, आणि नुसतीच वाटू लागत नाहीत तर त्यांचे वेगळे अर्थही लागू लागतात.

🖋️ मंदार दिलीप जोशी
माघ शु, चतुर्थी, शके १९४१