Saturday, May 9, 2020

आदिवासी विनिताने कोयत्याने नक्षलवादी एरिया कमांडर बसंत गोप याला कापून केलं ठार

आपल्याकडे एक म्हण आहे, भित्यापाठी ब्रह्मराक्षस. अर्थात मनातली भीतीच आपल्याला संकटांना तोंड देण्यापासून परावृत्त करते. ही भीती निघाली की समोर असलेला शत्रू कुणीही असो, कितीही ताकदवान असो, त्याच्याकडे कुठलीही हत्यारे असोत त्याचा पराभव ठरलेला असतो. ही गोष्ट आहे झारखंडच्या गुमलामधल्या एका आदिवासी खेड्यातल्या विनिता उरांव हिची. मुलाखत देताना अतिशय साधी आणि शांत वाटणारी विनिता प्रत्यक्षात वाघीण आहे. कसं ते आपण पाहू.

रणरागिणी विनिता उरांव
पण पूर्ण गोष्ट सांगण्याआधी नक्षलवाद्यांची विनिताच्या परिवाराशी नेमकं काय शत्रुत्व होतं हे जाणून घ्यायला आपल्याला थोडं मागे जावं लागेल. काही वर्षांपूर्वी विनिताचे वडिल शनिचरवा उरांव हे जलसंधार, जलयुक्त शिवार वगैरे कामं करायचे. त्याच काळात नक्षलवाद्यांनी एकदा त्यांच्याकडे पन्नास हजाराची खंडणी मागितली. शनिचरवा यांनि खंडणी देण्यास नकार दिल्याने नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या केली. या घटनेनंतर नक्षलवाद्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी उर्वरित परिवाराने रांची गाठली आणि तिथे मोलमजूरी करुन आपला उदर्निर्वाह करु लागले. लॉकडाऊनमुळे सगळा परिवार पुन्हा आपल्या गावी परतला. आणि मंगळवारी.....

आता वळूया मुख्य बातमीकडे. गुमला जिल्ह्यापासून दहा किलोमीटरवर वृंदा नायक टोली गाव आहे. या गावात वृंदा आपला नवरा भीमराव, दोन मुलं, भाऊ पियुष आणि आईसह राहते. मंगळवारी रात्री जेवण झाल्यावर सगळे झोपी गेले. अचानक गोळीबाराच्या आवाजाने सगळ्यांना जाग आली. पाच ते सहा नक्षलवाद्यांनी विनिताच्या घराला वेढा घातला. हे पीएलएफआय  या नक्षलवादी संघटनेचे अतिरेकी असल्याचं लवकरच सगळ्यांच्या लक्षात आलं. ते विनिताचा नवरा भीमराव याला हाका मारुन बाहेर यायला सांगत होते. विनिताच्या कुटुंबाला आणि गावातल्या इतरांना दहशत बसावी म्हणुन हवेत गोळीबार सुरुच होता. असा काही वेळ गेला. कुणीच दरवाजा उघडत नाही म्हटल्यावर नक्षलवाद्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करायचा प्रयत्न केला. एवढ्यात त्यांच्यापैकी कुणालाही काहीही कळण्याच्या आत विनिताने कोयता घेऊन त्यातल्या एकावर जोरदार हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने तो नक्षलवादी खाली पडला. तो खाली पडल्यावर विनिताने त्याच्यावर त्वेषाने आणखी अनेक वार केले. आता त्याचे साथीदार बावचळले. अशा प्रकारच्या हल्ल्याची अपेक्षाच त्यांनी केली नव्हती. त्यांनी कसंतरी गंभीर जखमी झालेल्या आपल्या म्होरक्याला उचललं आणि तिथून पळून गेले. 

नक्षलवादी पळून गेल्यावर विनिताने गुमलाचे पोलीस निरिक्षक असलेल्या श्री जनार्दन यांना फोन करुन सगळा वृत्तांत कथन केला. सद्ध्या पोलीसांनी गावातच मुक्काम ठोकला आहे. बुधवारी पोलीसांना छापा टाकताना बसंत गोपचा मुडदा जंगलात बेवारस अवस्थेत पडलेला सापडला. जखमी बसंत गोपचा मृत्यू झाल्यावर त्याचं शरीर पळून जाणार्‍या नक्षलवाद्यांनी तिथेच फेकून दिलं होतं. 

बेवारस अवस्थेत फेकून दिलेला नक्षलवादी अतिरेकी बसंत गोपचा मुडदा

दैवदुर्विलास बघा. या नक्षलवादी संघटनेचं पूर्ण नाव आहे पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया. सामान्य जनतेची मुक्ती नावात(च) असणार्‍या या संघटना मात्र प्रत्यक्षात लोकांच्या हत्या करत फिरतात. काही वर्षांपूर्वी खबरी असल्याच्या संशयावरुन हत्या करायला आलेल्या नक्षलवादी नरधमांनी तो व्यक्ती पळून गेल्यावर त्याच्या बायकोच्या हतातून त्यांच्या चार महिन्याच्या बाळाला हिसकावून घेतलं आणि लोखंडी सळीने मारहाण केली, व ध त्याचा बळी घेऊन त्याच्या आईसमोरच त्याला पुरलं होतं. तेव्हा कुणी नक्षलवादी कसे जन्माला येतात वगैरे बकवास केली तर त्यांच्या तोंडावर ही उदाहरणे फेकून मारा. सरकारने अतिशय नीच अशा या अवलादीला आणि त्यांच्या शहरी पाठीराख्यांना निर्घृणपणे ठेचलं पाहीजे. तसेच जनतेनेही विनिताप्रमाणे सावध राहून अशा नराधमांना चांगलाच धडा शिकवावा. 

सरकारने विनिताला संरक्षण द्यावं तसंच काही बक्षिस सुद्धा जाहीर करावं अशी नम्र विनंती. झारखंडमधलं सद्ध्याचं सरकार लक्षात घेता ही अपेक्षा मोठी आहे पण तरी...

© मंदार दिलीप जोशी 
वैशाख कृ २, शके १९४२

परिशिष्ट १: विनिताची मुलाखत



परिशिष्ट २: काही बातम्या


Thursday, May 7, 2020

गणिती कलोपासनेचा निर्घृण अंत (अर्थात एक न छापताच मागे घेतलेला अग्रलेख)

लहानगा रियाझ सकाळी उठला तो ठो ठो आवाजानेच. त्याचे अब्बू त्याला सांगत होते की तू झोप, बाहेर नेहमीचीच गडबड सुरु आहे. पण निरागस रियाझला त्याची बालसुलभ उत्सुकता स्वस्थ बसू देईना. कालच त्याने खिडकीतून हळूच वाकून तिकडून इकडे येणार्‍या तीन हजार सातशे शहाऐंशी आणि पलिकडे जाणार्‍या पाच हजार आठशे बहात्तर गोळ्या मोजल्या होत्या. सरळमार्गी रियाझ नाईकुला गणिताची आवड निर्माण झाली ती अशी. त्याच्या घरच्यांचं त्याला प्रोत्साहन होतंच. त्याचे अब्बू त्याच्या अम्मीला त्याच्या छोटे छोटे शेणगोळे कसे मोजायचे ते शिकवलं होतं. एकदा एका शेणगोळ्यात अम्मीची पिन अडकली असे समजून निरागस रियाझने ती काढून अम्मीला दिली आणि शेणगोळाच तो असं म्हणून खिडकीतून बाहेर फेकून दिला. पण खालून अचानक मोठ्ठा आवाज झाला आणि अचानक ठो ठो ठो असे लहान आवाज पटापट येऊ लागले. अब्बू म्हणाले ते बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज आहेत. तेव्हापासून रियाझला गोळ्या मोजण्याची आणि पर्यायाने गणिताची आवड निर्माण झाली. रियाझला चित्रकलेचीही आवड होती ति त्याने कशी जोपासली ते पुढे येईलच.

सनदी लेखपाल असलेल्या याकुब मेमन याचा त्याने आदर्श ठेवला व मोठा झाल्यावर गावातील इतर मुलांनाही गणिताची आवड निर्माण व्हावी असा ध्यास त्याने घेतला. पण फक्त गोळ्या मोजून त्याचे समाधान होईना. प्रत्येक गोष्टीच्या सम....सॉरी.... उगमाशी जायचे बाळकडू त्याला लहानपणापासूनच मिळाले होते. म्हणूनच आपला उगम कुठून झाला असाही प्रश्न त्याला पडत असे. पण त्याला निर्माण झालेल्या या सायंटेफिक टेंपरबद्दल पुन्हा केव्हातरी. तर, त्या गोळ्या येतात कुठून आणि सोडल्या जातात कुठून याचा शोध घ्यायचे त्याने ठरवले. मुळातच काश्मीरी जनता परस्पर सहकार्यासाठी प्रसिद्ध. तेव्हा त्याच्या या शिक्षणाची जबाबदारी गावातील जेष्ठांनी घेतली व बाहेरून काही शिक्षक मागवले. त्या शिक्षकांनी रियाझला बंदूक म्हणजे काय, त्यातून गोळ्या कशा बाहेर पडतात, त्या माणसाला लागल्यावर काय होते, त्या का चालवाव्यात वगैरे आवश्यक आणि फुटकळ माहिती दिली.  काश्मीरी लोकांचे आणि या बाहेरून आलेल्या शिक्षकांची सामाजिक जाणीव आपल्याला वाखाणलीच पाहीजे. कारण बाहेरचे निष्ठूर जग पदोपदी धनाची हाव ठेऊन पैसे मागत असताना आणि समाजकार्याचीही किंमत वसूल करत असताना रियाझला निर्माण झालेल्या बालसुलभ उत्सुकता शमवायला व त्याच्या गणिती ज्ञानार्जनासाठी दिलेल्या या शिक्षणासाठी मात्र त्या अमूर्त निर्गुण निराकार इंटानॅशनल शाळेच्या शिक्षकांनी एकही पैसा घेतला नाही. उलट बाहेरून आलेल्या या शिक्षकांनी त्याच्या अब्बू आणि अम्मीला या दिव्य कार्यासाठी तुमचा रियाझ आता आमचा (विद्यार्थी) झाला असे सांगून स्वतःहून पैसे दिले. 

रियाझला चित्रकारही व्हायचं होतं हे आपल्याला विदीत आहेच. विशेषतः गुलाबाच्या पाकळ्यांचे चित्र काढून त्यात लाल रंग भरायला त्याला फार आवडत असे. पण आपली ही आवड जोपासत असताना खूप वेळ वाया जात आहे असे त्याच्या लक्षात आलं. तसेच फक्त वेडीवाकडी चित्रे काढून देशविदेशात प्रदर्शने भरवण्यातही त्याला रस नव्हता. यावर त्याच्या शिक्षकांनी त्याला एक नामी युक्ती सुचवली. निर्जीव कागदावर त्याहून निर्जीव रंग भरण्यापेक्षा त्याने त्याच्या गणिती ज्ञानाच्या ध्यासापोटी मिळवलेले गोळ्या सोडायचे ज्ञान वापरून सजीव माणसांतच लाल रंग भरावेत असे त्यांनी सुचवले. मग सुरु झाला रियाझचा गणिती कलोपासनेचा रक्तरंजित....सॉरी हं.....रंगरंजित प्रवास.

हळूहळू रियाझ मोठा होत होता. त्याला आता मिसरुड फुटलं होतं. आता रियाझचं गणित इतके पक्के होऊ लागले होते की तो दुसर्‍यांच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळ्याच काय त्याने स्वतः बंदुकीतून सोडलेल्या गोळ्या देखील त्याला मोजता येऊ लागल्या होत्या. आता त्याच्या निर्गुण निराकार इंटरनॅशनल शाळेने शिक्षक पाठवायचे कमी करुन पर्यवेक्षक अर्थात सुपरवायझर पाठवणे सुरु केले होते. त्या पर्यवेक्षकांना रियाझची गोळ्या मोजण्याची विलक्षण बुद्धीमत्ता खूप भावली, कारण त्यांनी गणिती सरावासाठी तसेच प्रत्यक्ष प्रयोगासाठी पुरवलेल्या गोळ्यांचा हिशेब त्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांना देणे सोयीचे ठरू लागले. परिणामी शिक्षण व प्रत्यक्ष प्रयोगाकरता शाळेने करावयाचा पुरवठा भरमसाठ वाढला. 

रियाझने आता तारुण्यात पदार्पण केलं होतं. नाकाखाली असलेल्या मिसरुडाबरोबर तो आता हनवटीवरही डौलदार दाढीसंभार बाळगू लागला होता. रियाझने आता अनेक मुलांना आपल्या पंखाखाली घेऊन त्यांच्याही अनौपचारिक शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. कधी तो एकटाच तर कधी त्या मुलांन घेऊन तो इंटरनॅशनल शाळेत शैक्षणिक सहलींन जात असे. हळुहळू रियाझने आपल्यासारखे अनेक जण गणितात तयार केले. पण आता त्या शाळेला रियाझने पुस्तकी ज्ञानातले लक्ष कमी करुन प्रत्यक्ष प्रयोगांकडे अधिक लक्ष द्यायला हवे असे वाटू लागले. रियाझही एव्हाना फक्त थिअरीला कंटाळला होताच. रियाझचे शिक्षक ज्या शाळेतून यायचे त्या शाळेची एक शाखा होती हिजबुल मुजाहिदीन अर्थात पवित्र योद्धे. या शाखेच्या प्रमुखपदी त्याची नेमणूक करण्यात आली. आता त्याने भारतीय बंदुकधारी सैन्य, इतर नागरिक, दुकानदार, अशा सजीवांसमोर आपल्या गणिती कलोपासनेचे रक्तरंजित....सॉरी हं.....रंगरंजित प्रयोग सुरु केले. 

पण २००२...सॉरी...२०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांनंतर कलेचा व गणिताचा र्‍हास सुरु झाला व सायंटेफिक टेंपर नसलेल्यांची चलती सुरु झाली. आपल्याकडे असहिष्णुता तेव्हापासूनच आणखी वाढली. याचेच पर्यावसान आधी बुरहान वाणी नामक मुख्याध्यापकपुत्राच्या प्राणोत्क्रमणात झाले. पण एवढ्यावर समाधान मानतील ते भारतीय बंदुकधारी सैन्याधिकारी कसले. रियाझ नाईकूला आपल्या कलेचे प्रात्यक्षिक आपण कसे दाखवले याचा व आपल्या गणिती ज्ञानाचा व कलोपासनेचा साप्ताहिक हवाल त्याला आपल्या निर्गुण निराकार इंटरनॅशनल शाळेच्या शिक्षकांना शुक्रवारी नजिकच्या प्रार्थनास्थळात द्यावयाचा होता. पण आधी काहीतरी भव्यदिव्य कार्य ताबडतोबीने करावयास हवे म्हणोन तो बुधवारी बाहेर पडला आणि घात झाला. तो कुठे आहे याचा सुगावा सैन्याला लागला व त्याला भारतीय बंदूकधारी सैन्याने त्याच्याच कलोपासनेचे प्रयोग त्याच्यावरच करुन त्याला या भौतिक जगातून कायमचे नाहीसे केले. 

जा रियाझ जा, या जगात, ज्या देशात तुझ्या कलेची कदर नाही अशा देशात राहून अवहेलना झेलण्यापेक्षा त्या तुझ्या निर्गुण निराकार निर्मात्याकडे जा. तिथे तुझ्या गणिती कलोपासनेचे तुला निश्चितच बक्षिस मिळेल. तुझे गणित चांगले असल्यामुळे तुला बहात्तर पर्यंत आकडे नक्की मोजता येतील असा आम्हाला विश्वास आहे. तुझा उगम कुठे झाला हे ही तुला तिथेच समजेल. 

#वक्रोक्ती #Sarcasm

 

Riyaz Naikoo Encounter: Hizbul Mujahideen Chief Riyaz Naikoo, Most ...


© पिरिष गूबेर (मंदार दिलीप जोशी)

Friday, April 17, 2020

एकस्रोत अधर्मी एवं रामायण

रामायण के परसोंं के एपिसोड में महाराज बिभीषण वैद्यराज सुषेण से कहते हैं:
धर्म और अधर्म की व्याख्या सदैव एक नहीं रहती। वैद्य का धर्म है, सबकी पीडा हरना एवं उनके प्राणो की रक्षा करना। वैद्यक किसीं एक के लिये नहीं, अपितु सारे मानवजाती की दुखदर्द की रक्षा का उपाय करने एवं उसकी पीडा हरने के लिये है। यही चिकित्सक का सर्वोपरी धर्म है।

वैद्यराज सुषेण कहते हैं: राजनीती का सिद्धान्त कहता हैं कि आपको मेरा विश्वास नहीं करना चाहीये। मैं शत्रूपक्ष का वैद्य हूं। आप के रोगी का अहित कर सकता हूं।

इसपर प्रभू श्रीराम कहते हैं:
वैद्य का कोई शत्रू नहीं होता, कोई मित्र नहीं होता। वैद्य और रोगी के बीच तो केवल विश्वास की एक अलौकिक डोर होती है। मैं अपने अनुज लक्ष्मण को आप को सुपूर्द करता हूं। राजभक्ती का पालन करने के लिये चाहे तो इसके प्राण ले लिजीये अथवा वैद्य का धर्म पालन करने के लिये इसे जीवनदान दे दिजीये, ये मैं आप पर छोडता हूं। आप पर मुझे पूरा विश्वास है।

प्रभू श्रीराम तो अपने शत्रू के वैद्यराज के हाथ अपने अनुज के प्राण रख देते हैं। तथा रावण जैसे असुर के राजवैद्य सुषेण भी लक्ष्मण की सुश्रुषा करने के लिये तैय्यार हो जाते हैं।


हमारे वैद्यराज एवं समस्त आरोग्य सेवकों ने इसी प्रकार अपने पराये का भेद किये बिना, समस्त रोगीयों की पीडा का उपाय एवं उनके जीवित की रक्षा कर रहे हैं। यह रोग तो ऐसा है कि रोगी पर उपचार करने वाले वैद्यक समुदाय को ही यह रोग होने की पूर्ण संभावना होती है। फिर भी हमारे समस्त वैद्यराज तथा आरोग्यसेवक यह सोचे बिना सारे रोगीयों की सेवा कर रहे हैं कि इनमें से कुछ रोगीयों में ऐसे असुरी मानसिकता के लोग हैं जिनके विचार कई शतकों से मानवता का विनाश ही करते आ रहे हैं, एवं भविष्य में भी करते रहेंगे ।

परंतु इसके उपलक्ष में उनपर कुछ एकस्रोत अधर्मी (sℹ️ngle s⭕️urce threat) पत्त्थर फेंकने का, वमन तथा थूत्कृत्य करने का, विवस्त्र होकर नग्नावस्था में नृत्य करने का दुःसाहस कर रहे हैं। इन्हें न मानवता की चिंता है न महिलाओं के सन्मान की। आज न तो ऐसे धर्मपालन करने वाले प्रभू राम हैं न तो ऐसे रोगी जिनके लिये वैद्यराज तथा आरोग्यसेवक अपने प्राण दांव पर लगा दें और न तो ऐसे धर्मपालक रोगी एवं उनके परिजन हैं जो शत्रू के हाथ अपने रोगी के प्राण विश्वासपूर्वक सुपूर्द कर दें।
इस अवस्था में हमारे वैद्र्यराज तथा आरोग्यसेवकों को स्मरण रहे, कि वैद्यों पर जो रोगी की रक्षा का दायित्व है, वो केवल उस समय तक है जब तक रोगी अपने धर्म का पालन करे। रोगी यदि अपनी व्याधी के कारण उत्पन्न भ्रम के चलते कोई असभ्य कृत्य करता है तो वह रोग का ही एक भाग होता है, तस्मात इस अवस्था में भी वैद्य अपने सुश्रुषा के धर्म का पलन करने के प्रति बाध्य होते ही हैं।

परंतु यदि सामनेवाला केवल अपने धर्म का पालन नहीं करता अपितु वो एक महापापी विचार से षडयंत्र का भाग बनकर वैद्य समुदाय पर उनके दुष्कृत्यों से अत्याचार करता है, तो पुलिस, न्यायालय, एवं सरकार का यह कर्तव्य है कि वे वैद्यक समुदाय को मार्गदर्शन करें कि ऐसे अधर्मीयों से कैसे वर्तन करें तथा उन्हें ऐसे वर्तन के लिये यह अधिकार भी प्रदान करें जिससे उन्हें आगे चलकर समस्या न उत्पन्न हो।

प्रभू श्रीराम ने यह भी कहा था कि हमारी शरण में आनेवाले के प्राणरक्षण करना हमारा धर्म है। परंतु यदि कोई युद्ध की इच्छा से हमारे समक्ष उपस्थित होता है तो उससे युद्ध करना ही हमारा धर्म तथा कर्तव्य है। तो यह एकस्त्रोत अधर्मी हमारे वैद्यक समूदाय से जिस प्रकार का वर्तन कर रहे हैं, वह युद्ध ही तो है। इस कारण वैद्यक समुदाय को ऐसे मार्गदर्शन की नितांत आवश्यकता है।

प्रभू श्रीराम सबकी रक्षा करे। जय श्रीराम 🙏

© मंदार दिलीप जोशी