Friday, July 10, 2020

विकास दुबेच्या निमित्ताने

विकास दुबे अमुक पक्षाचा समर्थक आणि अमुक जातीचा आहे म्हणून त्याला मारणार नाहीत असा दावा करणारे आता त्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी ठोकल्यावर म्हणत आहेत की त्याने तोंड उघडू नये म्हणून मारलं. अशी डबल ढोलकी सगळीकडे आहेत.

मला सांगा, असं आजवर किती वेळा झालंय की कुख्यात गुंड किंवा गुन्हेगार कोर्टात उभा राहिला आणि त्याच्या साक्षीने नेते मंडळी तुरुंगात गेली आहेत? शून्य!

तेलगीला विसरलात का? नार्को टेस्टमध्ये ज्या कुणाचं नाव घेतलं होतं त्याने तो गेला का आत? अबू सालेम ने नावे तरी घेतली का? हे तर गुन्हेगारी आणि खंडणीखोरीचा दैदिप्यमान इतिहास असलेलं उत्तर प्रदेश आहे जे आता कुठे योगीजींच्या ताब्यात आलंय.

हिंदू डॉन वगैरे ठीक आहे पण यातून दोन प्रश्न उद्भवतात: (१) आजवर त्याने हिंदुत्वासाठी काय केलं?
(२) पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत होतेच कशी? असं करणाऱ्या कुणाचीही अशीच अवस्था व्हायला हवी. (गंमत अशी की हिंदू डॉन नेहमी आपल्याच लोकांचे शोषण करतो तर म्लेंच्छ डॉन आपल्या लोकांचा जास्तीत जास्त फायदा आणि काफिरांचे शोषण होईल असे बघतो. त्यामुळे हा मुद्दाही निकालात निघतो. पण तो विषय जरासा वेगळा आणि मोठा आहे, पुन्हा केव्हातरी.)

सर्वांना सारखा न्याय हवा हे मान्य. पण तो हिंदू होता म्हणून मारला, ब्राह्मण होता म्हणून मारला अशी बकवास करायची हौस असेल तर त्यांनी लवकर मानसोपचार घ्यावेत.

गुन्हेगारांच्या मागच्या खऱ्या चेहऱ्यांचा एन्काऊंटर झाला पाहिजे किंवा ते पकडले गेले पाहिजेत वगैरे बरोबर आहे पण आधी हे लक्षात घ्या की या खऱ्या चेहऱ्यांना आपणच निवडून देतो आणि योग्यतेपेक्षा कितीतरी मोठं करतो. मूल्यांपेक्षा व्यक्तीला अधिक महत्व देतो. मग यांच्या नावावर साधी एक चारचाकी गाडी नसते पण संपूर्ण राज्याला वेठीला धरण्याइतके उपद्रवमूल्य ते नक्कीच बाळगून असतात आणि खरोखर प्रामाणिक व काम करणाऱ्या माणसांना जातीवरून, शरीरयष्टीवरून, घरातल्या महिलांवरून टोमणे मारून आणि इतर सर्व मार्गांनी टोचून टोचून हैराण करतात. याला लोकच जबाबदार आहेत.

🖋️ मंदार दिलीप जोशी
📃 रोखठोक
आषाढ कृ ५, शके १९४२

No comments:

Post a Comment