Saturday, July 16, 2016

पंडित नामा - ३: सौ. तेजा रूपकिशन धर

पंडित नामा - ३

सौ. तेजा रूपकिशन धर
अलीकादल, काश्मीर
हत्या: ३० जून १९९०



हर अष्टमी या सणाचा दिवस होता. काश्मीरचे रहिवासी व राज्य सरकारी सेवेत लेबर ऑफिसर असलेले श्री रूपकिशन धर व त्यांची पत्नी तेजा यांचं रात्रीचं जेवण नुकतंच आटपलं होतं. जेवण झाल्यावर फिरायला जाण्याचा श्री रूपकिशन यांचा नेहमीचा शिरस्ता. त्या प्रमाणे ते पत्नीचा निरोप घेऊन फिरायला बाहेर पडले. घरी परतण्याआधी सहज गप्पा मारायला म्हणून एका मित्राच्या घरी गेले. नवरा बाहेर गेल्यावर आपल्यालाही विरंगुळा म्हणून तेजादेवींनी त्यांच्या एका वयस्कर मैत्रिणीला घरी बोलावून घेतलं व त्यांच्याही गप्पा रंगल्या.

साधारण रात्री साडेसातच्या सुमारास दारावर थाप पडली. बाहेर काही जण "रूपकिशनजींना भेटायचं आहे" असं म्हणत होते. आता तेजादेवींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी दार न उघडताच रूपकिशनजी बाहेर गेलेत, त्यांना भेटायचं असेल तर उद्या या" असं दार वाजवणार्‍यांना ओरडून सांगितलं. बाहेर उभं असलेल्यांना धीर नसावा. त्यांनी सरळ घराचं दार तोडून आत प्रवेश केला. ते दहशतवादी होते हे स्पष्ट होतं. घरात घुसताच दार अडवून उभ्या असलेल्या तेजादेवींना ढकलून त्या दहशतवाद्यांनी घरभर रूपकिशनजींचा शोध सुरु केला. त्यांना शोधता शोधता घरात नासधूस करायला ते विसरले नाहीत. घरातला प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक वस्तूची वाट लावूनच ते थांबले. रूपकिशनजी कुठेच सापडले नाहीत याचा आता त्या नराधमांना भयानक राग आलेला होता. सगळं घर शोधून खाली येताच समोर आलेल्या तेजादेवींच्या वयोवृद्ध मैत्रिणीला रागाच्या भरात धडाधडा मुस्काडीत ठेऊन दिल्या. तेजादेवींनी त्यांना त्यांच्या वयाचा तरी मान ठेवा आणि असं करु नका असं ओरडून सांगितलं. आता ते दहशतवादी हवा तो माणूस सापडला नाही म्हणून घराच्या बाहेर पडणार तेवढ्यात एकाने वळून तेजादेवींवर बेधुंदपणे गोळ्यांचा वर्षाव केला. त्यातल्या काही गोळ्या तेजादेवींच्या पोटात गोळ्या घुसल्या आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्या. कुणाला तरी गोळ्या घालता आल्याच्या आनंदात दहशतवादी घराबाहेर पडले.

पण अजूनही दहशतवाद्यांनी रूपकिशनजींचा शोध थांबवला नव्हता. रूपकिशनजी पळून गेले असल्याचा दहशतवाद्यांना संशय आल्याने आता त्यांनी सगळ्या मोहल्ल्याला वेढा घातलेला होता. काश्मीरमधे दहशतवादाच्या सुरवातीचा तो काळ होता आणि गावात संशयास्पद हालचाली सुरू झाल्या की लोक दारं खिडक्या बंद करुन घ्यायचे. या सगळ्या प्रकाराचा अंदाज रूपकिशनजींच्या मित्राला आल्याने त्याने त्यांना त्याच्या घराबाहेर पडू दिलं नाही. जवळजवळ रात्री दहा वाजून गेल्यानंतर कंटाळलेल्या दहशतवाद्यांनी तो मोहल्ला सोडला. आता रूपकिशनजी व त्यांच्या मित्राने परिस्थितीचा अंदाज घेतला आणि दोघे रूपकिशनजींच्या घरी आले.

पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून रूपकिशजी खचले. पण आता वेळ घालवून चालणार नव्हतं. रूपकिशनजींनी धावतच जवळचं इस्पितळ गाठलं. तिथे आलेला अनुभव हा अधिकच भयानक होता. वास्तविक एरवी सगळं जग एकीकडे आणि डॉक्टर एकीकडे अशी आशादायक परिस्थिती असते. डॉक्टर हा रंग, जात, धर्म न बघता समोर आलेल्या रुग्णाला बरं करणे हे एकमेव कर्तव्य जाणून कामाला लागतो. म्हणूनच डॉक्टरांना आपण देव मानतो. पण इस्लामी दहशतवादाने ग्रासलेल्या काश्मीरमधे इस्लामी मूलतत्ववादाची लागण वैद्यकीय क्षेत्रातही शिरली होती. त्या इस्पितळातल्या डॉक्टरांनी रूपकिशनजींना रुग्णवाहिका नवी असेल तर ही पोलीस केस असल्याने आधी पोलीस स्टेशनमधे जाऊन तक्रार नोंदवून या असा माणूसकीविरहित सल्ला दिला. रूपकिशनजी आता महराजगंज पोलीस स्थानकाच्या दिशेने धावले. तिथे एफ.आय.आर. नोंदवला आणि मग एका रुग्णवाहिकेतून पत्नी तेजादेवींना इस्पितळात दाखल केलं. हे सगळ होईपावेतो एव्हाना बराच वेळ गेला होता. इतके तास प्रचंड रक्तस्त्राव झालेल्या तेजादेवी आता अगदीच गलितगात्र झाला होत्या. आधी इस्पितळ, मग पोलीस स्टेशन, मग तेजादेवींना घेऊन इस्पितळ अशी धावाधाव करुन प्रचंड दमलेल्या रूपकिशनजींनी तेजादेवींना डॉक्टरांच्या हवाली करुन परमेश्वराचा धावा करत बसले. पण अजून त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार संपले नव्हते. तेजादेवींवर लगोलग उपचार करण्याऐवजी इस्पितळातले डॉक्टर गोष्ट ऐकायला बसलेल्या लहान मुलांच्या आविर्भावात "युद्धस्य कथा रम्या:" ऐकायला मिळतील या आशेने तेजादेवींना गोळ्या कशा लागल्या वगैरे अस्थानी आणि नुर्बुद्ध प्रश्न विचारत बसले होते. आता रूपकिशनजींचा संयम संपला आणि त्यांनी डॉक्टरांना तेजादेवींवर अजून शस्त्रक्रिया का झाली नाही असं जवळजवळ ओरडतच फैलावर घेतलं. त्यावर निर्लज्जपणे डॉक्टर म्हणाले की इस्पितळात रक्ताची कमतरता आहे. एव्हाना हे सगळं मुद्दामून चालेलेलं होतं हे रूपकिशनजींना उमगलं होतं. पण त्यांनी धीर न सोडता तेजादेवींवर ताबडतोब शस्त्रक्रिया करण्यात यावी असा आग्रह धरला. आता डॉक्टरांचा नाईलाज झाल्याने त्यांनी तेजादेवींना शस्त्रक्रियागृहात (ऑपरेशन थिएटर) मधे नेलं. रूपकिशनजींच्या म्हणण्यानुसार सकाळपर्यंत तेजादेवी मृत्यूशी झुंज देत होत्या. अखेर सकाळी आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

रूपकिशनजी व तेजादेवींना एक मुलगी होती. काश्मीरमधे दहशतवादाच्या सुरवातीचा तो काळ होता. दहशतवादी कधीही हिंदूंच्या घरात घुसून घरातल्या मुलींना धरून न्यायचे, म्हणूनच धर कुटुंबियांनी त्यांच्या मुलीला जम्मूला नातेवाईकांकडे ठेवलं होतं. म्हणुन ती बिचारी वाचली. तेजादेवींच्या मृत्यूनंतर रूपकिशनजींनी त्यांचे जवळच एका ठिकाणी सैन्यातल्या अधिकार्‍यांच्या मदतीने अंत्यसंस्कार केले आणि अस्थीविसर्जन आटोपताच ताबडतोब अलीकादल मधलं आपलं चंबुगबाळं गुंडाळून जम्मूमधे आपल्या मुलीकडे आले. ही गोष्ट ऐकल्यावर त्यांच्या मुलीची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पनाही करु शकत नाही. तिला आपल्या आईचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही.

रूपकिशनजींचा अखेरपर्यंत दावा होता की ऑपरेशन थिएटरमधे तेजादेवींवर शस्त्रक्रियाच झाली नाही. उपचार करणार्‍या मुसलमान डॉक्टरांनी त्या निर्वाणीच्या क्षणीही तेजादेवींचा धर्म बघितला आणि उपचार करायला मुद्दामून उशीर केला. लहान मुलाने एखादं खेळणं मोडलं म्हणून दुकानात परत घेऊन जावं, आणि दुकानदाराने नंतर बघू कधीतरी म्हणून ते बाजूला ठेऊन द्यावं तसं डॉक्टरांनी जखमी तेजादेवींबरोबर खेळण्यागत वर्तणूक केली. काश्मीरी पंडितांच्या जीवाला त्यावेळी ही किंमत उरली होती. कारण एखाद्याला गोळी घालून ठार मारेपर्यंत तिथे क्रौर्य संपत नसे. त्याला तडफडत तडफडत सेकंदासेकंदाने मरताना पाहून केवळ दहशतवादीच नव्हे तर इतर  तथाकथित शांतताप्रिय मुसलमान कौम सुद्धा आनंद घेत असे हे आपण दुसर्‍या भागात वाचलंच असेल. तेच भोग तेजादेवींच्या वाट्याला आले. इथे धक्कादायक बाब अशी की सगळ्या जगाचा भरवसा सुटल्यावर ज्यांना देव म्हणावं असेच डॉक्टर दानवांपेक्षाही क्रूर झाले. अशा अनेक मुलींपासून त्यांच्या आया, वडिल, भाऊ, हिरावले गेले. पहिल्या भागात मी म्हटलं होतं, जे गोळ्या झेलून लगेच मेले ते सुटले याचं हेच कारण आहे.

वर्षानुवर्ष ज्यांची सोबत केली त्या मुसलमान शेजार्‍यांवर संकटकाळी भरवसा ठेवता येत नाही, कार्यालयातल्या मुसलमान सहकार्‍यांवर भरवसा ठेवता येत नाही, इतकंच नव्हे तर मुसलमान डॉक्टरांवरही भरवसा ठेवता येत नाही अशा परिस्थितीत काश्मीरी पंडितांचे काय हाल झाले असतील याची कल्पनाही करवत नाही. आपल्या वागण्याने काश्मीरातच नव्हे तर देशभरात यांना कुणी पटकन आपली जागा विकायला आणि भाड्याने द्यायला तयार होत नाही अशी परिस्थिती त्यांनीच निर्माण करुन ठेवली आहे, आणि मग हेच आमच्याशी भेदभाव केला जातो अशी चोराची उलटी बोंब ठोकतात. कोण देईल यांना जागा? कोण ओढवून घेईल नसती कटकट? अहो यांच्या शेजारी इथे जीवाची शाश्वती देता येत नाही तर बाकीचा धोका कोण पत्करणार? अशा गोष्टींतून काय धडा घ्यायचा ते मी सांगणार नाही. ते तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे.

१९४७ साली मुसलमानांना वेगळा देश हवा म्हणून जा बाबा आम्हाला त्रास देऊ नका तुम्ही सुखात वेगळे रहा म्हणून पाकिस्तान तोडून दिला. आता त्यांना काश्मीर तोडून हवा आहे. तो त्यांना दिला तर इतर अनेक बाबींबरोबरच असंही होईल की पाकिस्तानची सीमा हिमाचल प्रदेश या राज्याला येऊन भीडेल. म्हणजेच शत्रू अधिक जवळ येईल. आधीच अस्तनीतले साप तयारच आहेत बाह्या सरसावून. शांतताप्रेमी भारतीयांचा संयम फार थोडा उरला आहे. राज्यकर्ते व भारताचे शत्रू या दोघांनीही त्या संयमाची अधिक परीक्षा बघू नये हे उत्तम.

अशा अनेक हृदय पिळवटून टाकणार्‍या गोष्टी आहेत. अशांपैकीच या मालिकेतली चौथी, लवकरच.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

आषाढ शु. १२, शके १९३८
१६ जुलै इसवी सन २०१६
--------------------------------------------------------

No comments:

Post a Comment