Showing posts with label राजकारण. Show all posts
Showing posts with label राजकारण. Show all posts

Saturday, January 27, 2024

जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम्

मुंबईतील एक वृद्ध निवृत्त गृहस्थ. वय ७५च्या आसपास. अगदी सश्रद्ध, अतिशय साधे, सरळ आणि पापभिरू व्यक्ती. राम मंदिराचं उद्घाटन होणार ही बातमी कळल्यावर जबरदस्त आनंदी झाले होते. २२ जानेवारी कधी एकदा उजाडते याची डोळ्यांत प्राण आणून वाट बघत असत.

त्यांना साधारण गणपतीच्या थोडं आधीपासून तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्या. पण पावसाळ्यात अनेकांची पोटं बिघडतात, तसलं काही असेल म्हणून त्यावरचे उपचार घेत राहिले. त्या औषधांनी तेवढ्यापुरतं बरं वाटत असे. गणपतीत आठ दिवस कोकणात गावीही जाऊन आले. तेव्हाही त्यांना भूक जास्त लागत नव्हती. गणपती झाल्यावर परत मुंबईत आले तेव्हा एकदा छाती आणि पोटाच्या मधे बोट दाबल्यावर हाताला गोळ्यासारखं काहीतरी लागलं. तेव्हा मुलाने तपासणीसाठी ऑक्टोबर २०२३ च्या सुरवातीला मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांना दुर्दैवाने कॅन्सरचं निदान झालं. मोठ्या आतड्याचा कर्करोग, तिसरी स्टेज. 

मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयात एका कर्करोगतज्ञांकडे त्यांच्यावर उपचार सुरु होते. ज्या वेळी कर्करोगाचं निदान झालं त्याच वेळी लक्षात आलं की तो पोटात सगळीकडे पसरलेला आहे. शस्त्रक्रिया करणंही शक्य नव्हतं. या डॉक्टरांनी कुटुंबियांना सुरवातीलाच सांगितलं होतं की रोग फार पुढे गेलेला आहे, वाचण्याची किंवा फार काळ जगण्याची काहीही आशा नाही. जेमतेम महिनाभर काढतील. 

त्यांच्यावर उपचार सुरु असताना तब्येतीत सुधारणा काहीही नव्हती, पण तब्येत बिघडतही नव्हती. पण श्रद्धेत ताकद बघा, जो मनुष्य जेमतेम महिना काढेल असं डॉक्टर म्हणालेले असताना फक्त श्रद्धेच्या जोरावर त्या व्यक्तीने २२ जानेवारीचा दिवस बघितला. २२ तारखेला दिवसभर राममंदिर सोहोळा टीव्हीवर लाईव्ह बघत होते. डोळे भरून तो अप्रतीम सोहळा बघितल्यावर रात्री घरात गव्हल्याची खीर करायला सांगितली, बाकी काहीही जेवले नाहीत. फक्त देवाला नैवेद्य दाखवला त्या पानातील खिरीची वाटी होती तेव्हढी खीर फक्त खाल्ली.

दुसऱ्या दिवशी २३ तारखेला सकाळी उठल्यावर मुलाला सांगितलं की पोटात थोडं दुखतंय. म्हणून मग त्याने डॉक्टरांना कॉल करून नऊच्या सुमारास त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी काही इंजेक्शन वगैरे दिली आणि थोड्या वेळाने त्यांचं दुखणं थांबलं. त्यानंतर ते झोपले. दुपारी बाराच्या सुमारास झोपेतच त्यांनी इहलोकीचा प्रवास संपवला आणि रामरायाच्या भेटीला निघून गेले.

कोहीनूर मिलमध्ये कामाला होते, आर्थिक स्थिती पूर्वी जेमतेम होती. पण मुलं कर्तबगार निघाली. त्यांना पेन्शन वगैरे काही नव्हतं, तरी पण दोन वर्षांपूर्वी जेव्हा मंदिरासाठी निधी गोळा करणे चालू होते तेव्हा स्वतःच्या सेव्हिंगमधून दहा का पंधरा हजार रुपये दिले होते. अर्थात त्यांच्या मुलाने पण दिलेच होते. पण ह्यांनी स्वतःकडून काहीतरी द्यावं म्हणून राम मंदिरासाठी दिले. फक्त राममंदिर सोहोळा बघायचा म्हणून जवळपास डॉक्टरांनी भाकीत केलेला १ महिना अधिक वरचे अडीच महिने स्वतःच्या इच्छाशक्तीवर त्यांनी तग धरला. राम मंदीर उदघाटन होणार ह्याच बळावर ते तगून राहिले. इतकी पराकोटीची श्रद्धा बाळगणे आपल्याला जमेल तो दिवस सोन्याचा. 

इच्छाशक्तीत खूप बळ असतं. किंबहुना श्रद्धेतून इच्छाशक्ती निर्माण होत असावी. जगण्याचं प्रयोजन आपल्याला श्रद्धा देते, आणि ते प्रयोजन साध्य करायला इच्छाशक्तीची मदत होते. म्हणूनच हे डावे आणि लिबरांडू जेव्हा लोकांच्या श्रद्धेची टिंगल करतात तेव्हा फार डोक्यात जातात.

मध्यंतरी एक लेख वाचला, त्यात (पाश्चात्य) सश्रद्ध लोक नास्तिकांंपेक्षा सरासरी ४ वर्ष अधिक जगतात असा निष्कर्ष काढलेला होता. भारतीय परिप्रेक्ष्यात असा काही सर्वे झाला असल्यास माहित नाही, पण अशी उदाहरणे बघितली, की आपल्याकडे ४ पेक्षा कितीतरी अधिक वर्ष आकडा निघेल यात शंका नाही. तसंही सद्ध्या सुरु असलेले एकेक प्रकार बघितले, तर हा देश फक्त सश्रद्ध लोकांच्या परमेश्वरावरच्या श्रद्धेमुळे चालला आहे याची खात्री पटते. पण ते असो. 

जय श्रीराम.

© मंदार दिलीप जोशी
पौष कृ. २, शके १९४५ | विक्रम संवत २०८० | युगाब्ध ५१२५

टीपः एका मित्राने त्याच्या एका नातेवाईक व्यक्तीबद्दल सांगितलेली सत्यकथा. नामोल्लेख न करता सादर.

Thursday, January 25, 2024

रामाची नसलेली बहीण आणि खोडसाळ पढतमूर्ख

शीर्षटीपः हे खोटं आहे हे माहीत असूनही स्वतः वाल्मिकी रामायणातला संदर्भ तपासून + जाणकार व्यक्तीशी माझ्या आकलनाबाबत चर्चा करुन हे लिहीतो आहे. 

आज एका व्यक्तीने मला शंका विचारली की एक पोस्ट फिरते आहे. यात शांता नामक दशरथकन्या वाचकांशी संवाद साधते आहे या स्वरूपात ती फॉर्वर्डेड पोस्ट आहे. थोडक्यात पोस्टचा सारांश असा:

दशरथ राजाची एक कन्या होती शांता तिला त्यांनी अंगदेश नरेश रोमपाद राजाला दत्तक दिली. एक ब्राह्मण शेतीची समस्या घेऊन आला त्याच्याकडे राजाचं दुर्लक्ष झाल्याने तो देश सोडून  गेला म्हणून इंद्रदेवाचा कोप झाला आणि राज्यात दुष्काळ पडला. मग "ऋषी शृंग" यांनी यशस्वी उपाय सांगितला म्हणून शांताचा विवाह "ऋषी शृंग" यांच्याशी लावून दिला. 

पोस्टमधे अधुनमधून "मी मुलगी असल्याने मला दत्तक देताना दशरथाने विचारलं नाही",  "मुलगी असल्याने अंगदेशात मला राज्यकारभार करण्याचा अधिकार नव्हता" वगैरे स्त्रीमुक्तीवादी मळमळ आहेच. पण चतुराईने 'दुखावलेल्या ब्राह्मणामुळे' दुष्काळ पडल्याचं ठोकून दिलेलं आहे. म्हणजे patriarchy अर्थात पुरुषसत्ताक पद्धतीबद्दल  ओकलेली गरळ  स्त्रीमुक्तीवाद, आणि ब्राह्मणद्वेष सगळं एकदम पेरण्यात आलेलं आहे.

या पोस्टमधली शांता म्हणते की "वाल्मिकी रामायणातील बालकांड मधल्या या या नवव्या सर्गात मला शोधाल. माझा संदर्भ तिथे  नक्कीच सापडेल. एका श्रीरामभक्त राजपुत्रीचा इतका परिचय पुरे नव्हे का?"

यासाठी वाल्मिकी रामायणातल्या बालकांडातील नवव्या सर्गातल्या या श्लोकाचा संदर्भ देण्यात आलेला आहे:
"आनाय्य तु महीपाल ऋष्यशृङ्‍गं सुसत्कृतम् ।
विभाण्डकसुतं राजन् ब्राह्मणं वेदपारगम् ।
प्रयच्छ कन्यां शान्तां वै विधिना सुसमाहितः ॥" 

आता या खोडसाळ पोस्टचा समाचार घेऊया. एक तर संस्कृतचा गंध नाही, दुसरं म्हणजे श्लोकाचा संदर्भ देताना पूर्ण, म्हणजेच मागचापुढचा संदर्भ न देता, एकच श्लोक उचलून टाकणे हे नेहमीचे यशस्वी कलाकार आहेतच. या पोस्टमधे  "ऋषी शृंग" असा उल्लेख वाचल्याने हसून हसून पोट दुखलं. त्या ऋषींचे नाव "ऋष्यश्रुड्न्ग" असे आहे, शृंग नव्हे. हे ऋष्यश्रुड्न्ग मुनी हे विभाण्डक ऋषींचे सुपुत्र होत.

तर, याचा पूर्ण संदर्भ असा आहे की पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करण्यासाठी कोणते ऋषी आमंत्रित करावेत या करता महाराज दशरथ चर्चा करत असताना सुमंत्राने महाराजांना एक कथा सांगितली. त्या कथे अनुसार महर्षि कश्यपांना 'विभाण्डक' नामक एक पुत्र आहेत. विभाण्डक यांना 'ऋष्यश्रुड्न्ग' नामक एक पुत्र आहेत. या नंतर ऋष्यश्रुड्न्ग हे कसे उत्तम आहेत याचं काही वर्णन आलेलं आहे. यांना समकालीन अंगदेशाचे प्रतापी नरेश रोमपाद होते. दुर्दैवाने महाराज रोमपाद यांच्याकडून धर्माचे उल्लंघन  (धर्माचे उल्लंघन म्हणजे कदाचित चुकीची धोरणे वगैरे असेल, त्याच्या खोलात जाण्यात अर्थ नाही) झाल्याने राज्यात अवर्षणाची परिस्थिती निर्माण झाली व भीषण दुष्काळ पडला. अशा वेळी त्या काळी राजे करत तेच रोमपाद महाराजांनी केलं. राज्यातील विद्वान ब्राह्मणांना बोलावून त्यांच्या हातून घडलेल्या या पापाचे प्रायश्चित्त काय असे विचारले. 

आता नीट वाचा. राजाने असे विचारल्यावर विद्वानांनी त्याला सल्ला दिला की विभाण्डक ऋषींचे सुपुत्र जे ऋष्यश्रुड्न्ग मुनी त्यांना आपण सन्मानपूर्वक बोलवावे आणि त्यांच्याशी आपली कन्या शान्ता हिचा विवाह लावून द्यावा. 



नवव्या सर्गात यानंतर इतक्या प्रभावी आणि विद्वान मुनींना आपल्याकडे कसं बोलवायचं या बद्दल खल केलेला दिसून येतो (आणि दहाव्या सर्गात ऋष्यश्रुड्न्ग मुनींना त्यांचे पिता विभाण्डक यांच्यासज रोमपाद राजाने त्याच्या राज्यात बोलावण्यासाठी जे उपाय केले त्याबद्दल माहिती आहे. त्याच्याही खोलात जाण्यात अर्थ नाही.) 

हे सांगताना सुमंत्र महाराज दशरथांना म्हणतो की या न्यायाने ऋष्यश्रुड्न्ग हे तुमचे जावईच झाले. याचा अर्थ ऋष्यश्रुड्न्ग मुनी हे दशरथाचे जावई "आहेत" असा अर्थ नसून "तुम्ही पण राजा, रोमपाद पण राजा, म्हणून रोमपाद राजाची मुलगी की तुम्हालाही मुलीसारखी असल्याने ऋष्यश्रुड्न्ग मुनी हे तुमचे जावई असल्यासारखे आहेत" असा त्याचा अर्थ होतो. एकाच गावातले एकाच वयोगटातले लोक त्यांच्यापैकी कुणाच्याही मुलीच्या नवर्‍याला "ओ जावईबापू" असंच म्हणतात त्यातला हा प्रकार आहे. पुढे सुमंत्र हा महाराज दशरथांना ऋष्यश्रुड्न्ग मुनींना त्यांचे पिता विभाण्डक यांच्यासह रोमपाद राजाने त्याच्या राज्यात बोलावण्यासाठी जे उपाय केले त्याबद्दल माहिती देतो. 

या गोष्टीचा सारांश असा की मंत्री सुमंत्र हा राजा दशरथाला यज्ञाचे पौरोहित्य करायला सुयोग्य ऋषी कोण याबद्दल माहिती देतो आणि त्या ओघात रोमपाद राजा, त्याच्यावर आलेले संकट, त्यावर उपाय म्हणुन त्याला मुलगी शान्ता हिचा विवाह ऋष्यश्रुड्न्ग मुनींशी करण्याचा मिळालेला सल्ला, आणि त्या संकटाचे झालेले निवारण याचे वर्णन करतो. थोडक्यात, ऋष्यश्रुड्न्ग हे पौरोहित्य करायला सुयोग्य मुनी आहेत त्याची कारणे या सर्गात येतात.

तेव्हा यात कुठेही शान्ता ही दशरथाची मुलगी आहे असा उल्लेख येत नाही.  शान्ता ही अंगदेशचे महाराज रोमपाद यांचीच मुलगी आहे. 

यात एक मेख आहे. श्रावणबाळाच्या आईवडिलांचा शाप असा होता की "तू सुद्धा पुत्रवियोगाने मरशील". संस्कृतमधे "पुत्र" म्हणजे मराठीत "मुलगा" असं नाही. मुलगा किंवा मुलगी असं कुठलंही अपत्य असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे दशरथाने मुलगी दत्तक दिली असती तरी तिच्या वियोगाने तो मृत्यू पावलाच असता. बरं आधी मुलगी झाली... नंतर ती दत्तक दिली त्यानंतर शाप मिळाला म्हणून रामलक्ष्मण ऊशिरा झाले असं नाही होऊ शकत. मुलगी झाली असती, दत्तक दिल्यानंतरही जर ती मरण पावली असती तरीही तिच्या वियोगाने दशरथ राजा मेलाच असता.

दुसरं, त्या काळी ऋषीकन्यांचा विवाह राजाशी आणि राजकन्येचा विवाह ऋषींशी या गोष्टी घडत असत. यातलं काहीही लक्षात न घेता त्यामुळे त्याला स्त्रीवादाची शेपूट लावून आपल्या मनातली मळमळ रामायणाला चिकटवण्याचा हलकटपणा या पोस्टमधे केलेला आहे. 

अशा खोट्या किंवा अर्धखोट्या कथा आधीही होत्या, आता त्यात वाढ होणार हे नक्की. कारण हिंदूंच्या मनात आपल्याच श्रद्धास्थानांबद्दल न्यूनगंड निर्माण व्हावा याचसाठी द्वेष्ट्यांचा अट्टहास सुरू असतो. यात व्हॉट्सॅप विद्यापीठातून ढकललेले संदेश अर्थात 'फॉरवर्ड मेसेज' हे मोठं हत्यार आहे. अशा पोस्ट आल्या की कुठल्यातरी स्त्रीबद्दल पुळका पोस्ट आहे म्हणून भावुक मन असलेले बदामोत्सुक स्त्रीपुरुष त्यावर "छान माहिती" वगैरे कमेंट्स ठोकून देतात. तस्मात् एखादा श्लोक संदर्भ म्हणून टाकलेला आहे म्हणजे ते खरंच असणार असं न समजता त्याच्या आधी आणि नंतर काय उल्लेख आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे गॅस सिम केला ही एक घटना किंवा कृत्य म्हणजे स्वयंपाक केला असे नसते त्याच प्रमाणे एकच श्लोक म्हणजे संपूर्ण सत्य नसते. त्यामुळे असे व्हॉट्सॅप विद्यापीठातले 'फॉरवर्ड मेसेज' पुढे ढकलण्याआधी कुठलाही ग्रंथ समूळ वाचणे आवश्यक ठरते. नाहीतर दासबोधाच्या दहाव्या समासात समर्थांनी केलेले पुढील वर्णन आपल्याला तंतोतंत लागू होईल.

दासबोध | समास दहावा: पढतमुर्ख लक्षण
समूळ ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।
गुण सांगतां अवगुण- । पाहे तो येक पढतमूर्ख ॥ ८॥

जय श्रीराम.

© मंदार दिलीप जोशी
पौष पौर्णिमा, शके १९४५ | विक्रम संवत २०८० | युगाब्ध ५१२५

Saturday, December 30, 2023

राम मंदिर आणि डाव्यांचा थयथयाट

अनेक राजकारण्यांना चर्चेत राहण्यासाठी काही ना काही सनसनाटी, विचित्र वक्तव्य करावीच लागतात. त्याचप्रमाणे ते तोंडावाटे जी नकारात्मकता पसरवतात ती आत्यंतिक निष्ठेने घणाघात, टोला, चिमटा, इत्यादी लेबले बातम्या म्हणून पसरवण्याचं काम पत्रकार करत असतात. अशा राजकारण्यांना आपल्या तोंडावाटे काय बाहेर पडतं आहे याचा फारसा विचार करण्याची आवश्यकता नसते (आणि अनेकदा फारसा विचार करण्याची त्यांची तितकी कुवतही नसते) कारण ती वक्तव्ये मुळातच लोकांना वैताग आणायला आणि उचकवायला केली गेलेली असतात.

कलाकारांचं मात्र तसं नसतं; यात नटनट्या, दिग्दर्शक, लेखक, आणि कवी आणि सगळेच सादरकर्ते अर्थात 'परफॉर्मर' आले. त्यांना काहीही मांडायला सर्जनशीलता वापरावी लागते. त्यातच विशिष्ट राजकीय अजेंडा आणि आणि कला या गोष्टी एकत्र आल्या की एक आकर्षक आणि प्रभावी, पण तितकंच फसवं आणि घातक मिश्रण तयार होतं. ज्याप्रमाणे आयुर्वेदात दूध उत्तम, फळे उत्तम पण मिल्क शेकचे दूरगामी घातक परिणाम होतात त्याचप्रमाणे कलाकारांची सर्जनशीलता आणि धर्मद्वेषी राजकीय अजेंडा यांचं मिश्रण झाल्याने होतात.

एक कविता गेले अनेक दिवस समाजमाध्यमांवर फिरते आहे. विशेष म्हणजे ही कविता फिरवणाऱ्यांमध्ये काही हिंदुत्ववादी रामभक्त ही सामील आहेत. यात त्यांचा दोष नाही; डाव्यांना एका गोष्टीचं श्रेय दिलंच पाहिजे की त्यांनी अनेक हुशार कलावंत आपल्याकडे ओढून घेतलेले आहेत किंवा ते असेट्स व्यवस्थित पोसले आहेत. कविता वापरून दिशाभूल करणे यात डाव्यांचा हातखंडा आहे.

तर, या तथाकथित कवितेतली नकारात्मकता इतक्या खुबीने झाकली आहे की अनेकांना प्रथमदर्शनी "बरोबरच बोललाय की तो!" किंवा "त्यात काय वाईट आहे?" असं नक्कीच वाटू शकतं. आधी ही कविता दिसली तेव्हा की फारसं लक्ष दिलं नव्हतं, मात्र मला दोन जणांनी, म्हणजे दोन हिंदुत्ववादी मित्रपरिवारातल्या दोन जणांनी ही कविता आवडली म्हणून पाठवली तेव्हा माझे कान टवकारले गेले. कविता त्या व्हिडिओत ऐकता येईल किंवा गुगलून मिळवता येईल. आधी ऐकली नसेल तर ती आधी पूर्ण ऐका, आणि बघा सुद्धा.

पण कविता ऐकण्याच्या आधी संजय राऊत आणि अमोल कोल्हे यांची वक्तव्य वाचा आणि कविता आणि त्यांच्यातील साम्य पहा.

"...तर तो राम तुम्हाला पावणार नाही."
― संजय राऊत

"राम मंदिराचं उद्घाटन जितक्या थाटामाटात कराल तितकीच मोठी जबाबदारी रामराज्य आणण्याची देखील आहे..."
― अमोल कोल्हे


या दोघांची वक्तव्ये ही आपण नेहमीच पाल झटकल्याच्या घृणेने झटकून टाकत असतो, पण त्यांच्या बोलण्यातला जो आशय आहे तोच कवितेच्या वेष्टनात गुंडाळला की भल्याभल्यांना योग्य वाटू शकतं. तेच या कलाकाराने साध्य केलं आहे.

अर्थात, या व्यक्तीला कलावंत म्हणावं का हा वेगळाच विषय, पण साहेबांनी ऐतिहासिक विषयांवर पुस्तकं पण लिहिली आहेत हे एके ठिकाणी वाचून पोटात गोळा आला. असो, तर या कवितेच्या यशात, म्हणजे व्हायरल होण्यात, कवितेचं चित्रीकरण ज्या प्रकारे केलं गेलं आहे आणि जे नेपथ्य वापरलं गेलं आहे त्याचा मोठा सहभाग आहे. काळा पडदा, एक खुर्ची, उगाचच आपण प्रगल्भ आणि वैचारिक काहीतरी बोलतोय असं भासवण्यासाठी वाढलेली दाढी घेऊन आणि हातातला पांढरा रुमाल मध्येच समेवर येऊन उद्वेगाने फडकवणारा त्या खुर्चीभोवती वावरणारा पांढऱ्या कपड्यातला एक इसम ― असं नेपथ्य हे खरं तर हाऊ टिपिकल ऑफ लेफ्टिस्ट्स, अर्थात डाव्यांचं व्यवच्छेदक लक्षण म्हणायला हवं. पण ते अजूनही हिंदुत्ववाद्यांच्या लक्षात येत नाही यात डाव्यांची हुशारी म्हणावी की आपला भोळसटपणा (naivety) याचा निर्णय मला करता येत नाही.

आता जरा इतर मुद्द्यांकडे वळूया. राम मंदिर खुलं होण्याच्या काहीच आठवडे आधी ही कविता यावी या 'टायमिंग'मध्ये काहीही आश्चर्य नाही, कारण या विषयावरून चित्त विचलित झालेले आणि पिसाळलेले अनेक राक्षस आपण बघत आहोत आणि मंदिर झाल्यावरही बघणार आहोत.

कवितेच्या सुरवातीलाच हा इसम वाल्मिकी ऋषींचा पट्टशिष्य असल्यागत आपण त्रेता युगातून आलेली व्यक्तिरेखा असल्यासारखं, "हाथ काट के रख दूंगा, ये नाम समझ आ जाये तो" अशी गर्जना करतो. कापाकापी हे सुद्धा डाव्यांचं महत्वाचं लक्षण आहेच, पण इथे जास्त लक्ष देण्यासारखं आहे ते म्हणजे कवितेतून केलं गेलेलं इमोशनल ब्लॅकमेलिंग आणि जनमानस हतोत्साहित करण्याचा प्रयास. राम मंदिर खुलं होण्याची घटिका तोंडावर आलेली असताना हा कवितेच्या सुरवातीपासूनच हा रामभक्तांना अटी घालत सुटलाय की अमुक केलंत तरच तुम्हाला राम समजेल आणि तमुक केलंत तरच रामाचं नाव घेता येईल. तोंडी लावायला ढमूक त्रास आणि दुःख सहन केलंच पाहिजे तरच...अशी भावनिक धमकी आहेच. आत्ता या क्षणी, आणि तसं बघायला गेलं तर कधीही, तुम्ही राम नाही आहात किंवा होऊ शकणार नाही हे सांगायची गरजच काय? हे एक प्रकारे असं सांगणं आहे की तुम्ही राम होऊ शकत नाही आणि चालले राम मंदिर उभारायला.

राम नावाचं परफेक्शन कुणी कधीच साध्य करू शकलेलं नाही आणि शकणारही नाही. त्या अवस्थेकडे निरंतर होणारा प्रवास म्हणजे रामभक्ती, राम उपासना. मग ते करायला अटी आणि शर्ती लागू करणारे हे महाशय कोण?

दुसरं म्हणजे "इस जबरदस्ती के जय श्रीराम में सब कुछ है बस राम नहीं" असं म्हणताना तो हजारो कारसेवकांचा धडधडीत अपमान करतोय. मान्य, जबरदस्तीने जय श्रीराम म्हणायला लावलं की राम भेटणार नाही. पण संपूर्ण कवितेत स्वतःच विधाने करायची आणि स्वतःच ती खोडायची ही नाटकं आहेत. वर या काल्पनिक कृत्याचा दोष सगळ्यांना द्यायचा हा शुद्ध विकृतपणा आहे. शिवाय, स्वेच्छेने जय श्रीराम म्हणणाऱ्या सामान्य बंगालीजनांवर तिथल्या पोलिसांनी अमानुषपणे अत्याचार केले तेव्हा हीच काव्यप्रतिभा कुठे पेंड खायला गेली होती, किंवा तथाकथित प्रेम म्हणून लग्न केल्यावर बायकोला धर्म बदलण्यासाठी, हिंदू धर्म त्यागण्यासाठी जबरदस्ती केली जाते, प्रसंगी जीवही घेतला जातो तेव्हा त्याची निर्भत्सना करणारी कविता का 'होत' नाही असा जाब कविवर्यांना विचारायला हवा.

सुमारे पाचशे वर्षांनंतर अगणित जनांच्या हौतात्म्यानंतर आणि सातत्याने कायदेशीर पाठपुराव्यानंतर राम मंदिर होणार आणि तिथेच होणार आणि तारीखही ठरली हे जेव्हापासून नक्की झालं, तेव्हापासून हिंदुद्वेष्ट्यांच्या कळपांतले राक्षस भयंकर पिसाळले आहेत. मग काहींना राम सगळ्यांचा आहे असा साक्षात्कार झालेला आहे, तर काहींना आमचा राम वेगळा आहे असा वेडाचा झटका येतोय. हॉस्पिटल आणि शाळा बांधा अशी किरकिर आताशा ऐकू येत नाही पण आहे. २०१४ मध्ये डाव्यांचं लाडकं सरकार जाऊन नवीन आणि नावडता पक्ष पूर्ण बहुमताने आल्यापासून सुरू झालेला त्रास हा २०१९ नंतर आणखी वाढला आहे. अजून बरंच काम बाकी असलं तरी ठिकठिकाणी म्हणजे शिक्षणसंस्था, बँका इत्यादी ठिकाणांहून डाव्यांची पिल्ले जाऊन राष्ट्रीय  विचारांच्या व्यक्तींची नेमणूक व्हायला सुरुवात झालेली आहे. शिवाय, सरकारचे निर्णय घोषित होण्याआधीच समजून ते बदलण्यापर्यंत किंवा रद्द होण्यापर्यंत असलेला डाव्यांचा दबदबा आज तितकासा उरलेला नाही. आता पंतप्रधान त्यांच्या मनातली बात कुणाच्याही आधी स्वतःच येऊन जनतेला सांगतात. दौऱ्यावर जाताना फुकटचे पुख्खे झोडणारे दारुबाज पत्रकारांचा तांडा न नेता सरकारी खात्याचे संबंधित निवडक लोकच सोबत असतात. 'काश्मीर फाईल्स' चित्रपटात जो "सरकार उनकी है पर सिस्टम तो हमारा है" यातलं सरकार बदलून झालं, आता सिस्टमला बदलण्याचं काम हळूहळू सुरू आहे. राम मंदिराच्या उद्घाटनापाठोपाठ २०२४च्या निवडणुकाही तोंडावर आहेत. विरोधी पक्षांना अजूनही आपली एक घट्ट मूठ म्हणावी तशी वळता आलेली दिसत नाही, त्यांना पंतप्रधानपदासाठी एक चेहराही देता आलेला नाही. अशा निर्नायकी विरोधकांसमोर आव्हान गोळीबंद आहे, तेव्हा निकाल काय लागणार ते उघड आहेच!

जर आपल्याला अपेक्षित असाच २०२४चा निकाल आला तर सिस्टीम बदलण्यासाठी १५ वर्ष खूप होतात. अधिकाऱ्यांची जवळजवळ संपूर्ण नवी फळी भरती होऊन वरिष्ठ पदांवर पोहोचते. म्हणजे सिस्टीम अधिक वेगाने बदलली जाऊ शकते आणि ही भीती विरोधकांना नक्की आहे!

डावे असुर पिसाटण्याचं हे देखील महत्वाचं कारण आहे.

सातत्याने मुळातच शांतताप्रिय आणि सहिष्णू असलेल्या हिंदू समाजाला वर्षानुवर्षे तुम्ही शांतता पाळा, तुम्ही सहिष्णू व्हा असे डोस पाजले गेलेत त्याला आता हिंदू समाज कंटाळला आहे. आता दुय्यम नागरिक म्हणून न जगता आमचा देश म्हणून ताठ मानेने हिंदूंनी जगायला सुरवात केली आहे, हा डाव्यांच्या पार्श्वभागात घुसलेला मोठा काटा आहे. त्यांना आजही हिंदू समाजमन समजू शकलेलं नाही. मग राम मंदिरासमोर बाईट घेताना भावुक होणारे पत्रकार आणि विविध उपक्रम करणाऱ्या व्यक्ती, आणि कोट्यवधी भारतीय घरांतून ओसंडून वाहणारा उत्साह हे सगळं पाहून डाव्यांना असे काव्यमय वेडाचे झटके येणं साहजिकच आहे.

एकदा जमीन हिसकावून घेतल्यावर ती हिंदू परत घेतात आणि ती देखील हिंसा आणि अहिंसा अशा दोन्ही मार्गांनी, हा मानसिक धक्का आपल्या शत्रूंसाठी फार मोठा आहे. कारण 'झांकी' नंतर 'बाकी' गोष्टींकडे वळलेलं हिंदूंचं लक्ष हे डाव्यांना आणि एकंदर हिंदूंच्या शत्रूंना अत्यंत अस्वस्थ करणार हे उघडच आहे.

जाता जाता कवी महाशयांना माझं चार ओळीत उत्तर असं आहे की:
रामभक्त कैसे बनना है ये उनसे हम क्यूं सीखें
दुर्गा को जिन्होने वेश्या और रावण को महात्मा बताया है
तुम जैसों को अब हम रखते है जूते की नोंक पर
सैकडों वर्षों का वसूलना अब पुराना बकाया है

जय श्रीराम 🙏🏻

🖊️ मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष कृ ३ संकष्ट चतुर्थी, शके १९४५
विक्रम संवत २०८०

Sunday, December 18, 2022

प्रारब्ध

एक व्हिडिओ बघितला ज्यात एक ताई राजकीय बंदचा भाग म्हणून दुकान बंद करायला आलेल्या काही तरुणांना समजावत आहेत. त्याच ताईंच्या फेसबुक पोस्टवर जी मंडळी गरळ ओकत असतात, त्यांच्या पोस्टवर आलेल्या घाणेरड्या भाषेतल्या टिप्पण्या वाचून लहानपणी आजोबा सांगायचे ती गोष्ट आठवली.

खूप पूर्वी एका आटपाट गावात एक म्हातारा-म्हातारी आणि त्यांचा मुलगा रहायचे. बिचारे इतके गरीब होते की दिवस दिवस उपाशी राहण्याची वेळ त्यांच्यावर येत असे. एकदा काय झालं की गरिबीमुळे त्रासून त्यांनी भगवान शकरांकडून वर प्राप्त करून घेण्यासाठी तप करायचं ठरवलं आणि तिघेही ध्यान लावून बसले.

कैलासावरून त्यांचं तप बघत असलेल्या पार्वतीमातेला त्यांच्यावर दया आली आणि त्या भगवान शंकरांना म्हणाल्या, "अहो, बघा ना, हे तिघे किती घोर तप ठरत आहेत. तुम्ही यांना वर का नाही देत?"

शिवशंकर हसून म्हणाले, "प्रिये, प्रारब्ध. मी वरदान दिल्याने काहीही होणार नाही. या जन्मात जे विधीलिखित आहे ते त्यांना भोगावंच लागेल."

पण पार्वतीमाता पडल्या आई. लगेच चिडून म्हणाल्या, "ते मला काही माहीत नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना जाऊन एक एक वर देऊन या. माझ्याच्याने यांचे कष्ट बघवत नाहीत. जाताय ना?!"

अखंड सृष्टीच्या मातेचं म्हणणं ऐकून भगवान शंकर तिघांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांनी आपल्याकडे वर मागावा असं सांगितलं.

सर्वात आधी म्हातारीने वर मागितला. ती म्हणाली, "हे भोळ्या शंकरा, तुम्ही मला मी लग्न करून या घरात आले तेव्हा मी जशी होते तशी करा."

भगवान शंकरांनी "तथास्तु" म्हणताच म्हातारीचं रूपांतर एका सुंदर षोडशवर्षीय नवरीत झालं.

हे पाहून म्हातारा भडकला. रागाने लालबुंद होऊन शंकराला म्हणाला, "हे भगवान, या मूर्ख बाईला जराही अक्कल नाही. मी वर मागतो की हिला कुत्री करा."

म्हाताऱ्याचं ऐकून भगवान शंकरांनी "तथास्तु" म्हणताच त्या नवतरुणीचं रूपांतर एका कुत्रीत झालं.

मग भगवान शंकरांनी त्या मुलाला वर मागायला सांगितलं. मुलगा विचारात पडला. आपल्या आईला या अवस्थेत पाहून त्याला अपार दुःख होत होतं. त्याने पटकन हात जोडले आणि शंकरांना विनंती केली, "हे देवाधिदेव, माझ्या आईला पुन्हा पहिल्यासारखं करा."

भगवान शंकर "तथास्तु" म्हणाले आणि शांतपणे परत कैलासाकडे प्रस्थान करते झाले. परत आल्यावर भगवान शंकरांनी माता पार्वतीकडे पाहून एक मंद स्मित केलं आणि पुन्हा ध्यानात गेले.

तसं या गोष्टीकडून बरंच शिकण्यासारखं आहे पण हजारो वर्षांपासून परमेशवराच्या अवतारांपासून ते ऐतिहासिक काळातील थोर मंडळी आणि संत परंपरेतील महान लोक जे शिकवून गेलेत ते वाचून समजून वागण्याची अक्कल जर नसेल तर अशा बैलबुद्धीच्या लोकांना कितीही सांगितलं, तरी शेवटी प्रारब्धात असेल तसेच ते वागणार.

असे लोक कधीही बेकायदेशीरपणे रस्त्यावर चादरी अंथरून जागा बळकावलेल्या असतात त्यांना मुक्त करण्याचा उपक्रम राबवत नाहीत कारण अशा ठिकाणी काही सत्कार्य करण्याची हिंमत तर नसतेच, पण आदेशही नसतो. शिवाय नेहमी आपल्यापेक्षा कमी शक्ती असलेल्या घटकांवरच दमबाजी केली जाते (अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव च अजपुत्रम बलिम दद्यात् देवो दुर्बलघातकः।) आणि त्याला आधार म्हणून काल्पनिक ऐतिहासिक अन्यायाची भावनिक फोडणी त्याला दिली जाते. अशी अरेरावी केल्यावर लोक आपल्याला घाबरतात हे एकदा कळलं की ती करणारे त्या राजकीय उतरंडीत जितक्या खालच्या पायरीवर असतील तितका त्यांचा इगो जास्त फुगतो आणि सुखावतो. मुख्य म्हणजे इतर काहीही रचनात्मक न करता उपद्रवमूल्य दाखवायला दिवसाचे काही ठराविक म्हणजे पाचशे ते दोन हजार रुपये मिळाले तर कोण थोर पुरुषांची शिकवण वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करेल? त्याला कुवत लागते आणि असल्यास बुद्धी वापरावी लागते, आणि तेवढे कष्ट घेण्याची यांची तयारी नसते. त्यापेक्षा वरून पैसे आणि आदेश आला की असली कामे ठरत फिरण्यात धन्यता वाटत असेल तर नवल काय?

तस्मात, व्हीडीओतल्या त्या ताईंनी ज्या आईच्या मायेने त्या मुलांना समजावलं ते त्यांचं कृत्य अत्यंत स्तुत्यच आहे. पण... असो. आपण आशा सोडू नये, एखादा तरी या घाणीतून बाहेर पडला तरी आपलं यश समजायचं. बाकी भगवान शकरांवर सोडून देऊया.

हर हर महादेव 🙏🏻

राजकीय बंद


🖋️ मंदारपंत जोशी

Sunday, March 20, 2022

काश्मीर फाईल्स ― एक अचर्चित मुद्दा














काश्मीर फाईल्स में सबसे महत्वपूर्ण संवाद क्या है? थोडा स्पेसिफिक पूछता हूं, काश्मीर फाईल्स में प्रोफेसर राधिका मेनन के हिस्से का सबसे महत्वपूर्ण संवाद क्या है?

यदि आप कहेंगे की "सरकार उनकी है पर सिस्टम तो हमारा है!" यह डायलॉग सबसे महत्वपूर्ण है तो आप सत्य से पृथक बात नहीं कर रहे. किंतु मुझे कुछ दूसरी बात इंगित करनी है.

चलीये आप उत्तर दें इससे पहले मैं कुछ कहता हूं. 

हम पाठशाला में हो, महाविद्यालय में हो अथवा किसीं बिझनेस स्कूल में हो, शिक्षकों का स्थान हमारे मातापिता के समकक्ष होता है. हम उन्हे सदैव सर, मॅडम, टीचर, प्रोफेसर कहके पुकारते हैं. 

JNU या कहीं भी, गांव से युवक आते हैं जिन्होने अपने आसपास कभी लडकियो से खुलकर बात नहीं की, कभी मिश्र ग्रूप में सोशलाईझ नहीं किया, उसे एक ४० के आसपास की 'ओल्ड वाईन' कॅटेगरी में आनेवाली, खुले बालवाली, husky आवाजवाली महिला, जो एक कॉलेज में प्रोफेसर है जब उसका स्टुडेंट उसे "प्रोफेसर" कहके संबोधित करता है, तो वो एक विशिष्ट seducing आवाज में कहती है कि, 

"Please, call me Radhika".

अब बताईए, काश्मीर फाईल्स में प्रोफेसर राधिका मेनन के हिस्से का सबसे महत्वपूर्ण संवाद क्या है? जी, "Please, call me Radhika".

लिबरंडू तथा बडी बिंदी गँग का युवकों को अपने चंगुल में फ़ंसाये रखने का एक प्रयोगसिद्ध आयडिया. नजदिकी बढाने का पैतरा.

© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन पौर्णिमा, होळी

Wednesday, February 23, 2022

वाचनप्रेमी तालिबान - लोकशाहीचा मार्ग पुस्तकातून: एक छापण्याआधीच मागे घेतलेला एक लघु अग्रलेख किंवा संपादकांचे मनोगत

तालिबान म्हणजे विद्यार्थी असे आम्ही म्हणालो होतो तेव्हा अमानुष बहुमताने निवडून आलेल्या सद्ध्याच्या राज्यकर्त्यांच्या समस्त पाठीराख्यांनी आमच्यावर जहरी टीका केली होती. पाठीराखे हा शब्द आम्ही विचारपूर्वक वापरला त्यास कारण की भक्त शब्द वापरला तर भलतीच नामुष्की ओढवण्याची भीती. मागे घेतला तरी ते आपल्याला विसरू देत नाहीत. अग्रलेख विसरू देत नाहीत तर एखादा शब्द विसरू देण्याची शक्यता अंमळ धूसरच.

Reader Taliban

तर विषय असा की हातात बंदुका आहेत आणि त्यात हजार लानते पाठविण्यालायक गोळ्याही आहेत, आणि ज्या प्रमाणे नागपूरवरून आदेश येताच शाखांत अंमलबजावणी होते त्याच प्रमाणे वरिष्ठांचे आदेश येताच धार्मिक शिस्तीची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज असलेले हे शस्त्रसज्ज योद्धे कार्यतत्परही आहेत. मात्र, असे असतानाही आपल्या ज्ञानप्राप्तीच्या लालसेचे दमन न करता मिळालेल्या अल्प फावल्या वेळात, म्हणजे शिस्तीची अंमलबजावणी करताना डोकी उडविण्यापासून फुरसत मिळताच, वाचनालयात जाऊन स्वतःचे डोके मात्र पुस्तकात खुपसण्याची संधी सोडत नाहीत. काही खवचट लोक म्हणतीलही की हे फक्त चित्रे बघत आहेत, पण शेवटी भाषा ही चित्रांमधूनच निर्माण होते ना? आपल्या संस्कृतीत मनुष्य नेहमी विद्यार्थी असतो आणि त्याने सतत वाचन, मनन ठरत रहाणे आवश्यक आहे त्याचेच हे दुसरे रूप नव्हे काय? प्रस्तुत छायाचित्रात मागे फिरत असलेला इसम हा अशाच प्रकारे मनन करत असल्याचे आपल्याला दिसते. आपल्याला काय वाचायचे आहे हे सुद्धा विचारपूर्वकच ठरवले पाहिजे ही प्रगल्भ जाणीव त्याचे ठायी आहे हे तो आपल्या या कृतीतूनच दाखवून देत आहे. मग आपण ते आणि आपण असा भेदभाव का करावा?

पण अशा प्रकारे भेदभाव करावा असे प्रोत्साहनच सद्ध्याच्या प्रस्थापित राजवटीकडून मिळालेले दिसते. त्यातूनच मग कुणी काय पेहराव करावा इथपासून कुणी काय बोलावे हे काही मूठभर लोक ठरवू पाहतात. पण मूठभर लोकच शांततेने क्रांतीही घडवू शकतात हीच आशा आपल्याला या छायाचित्रातून दिसते. उद्या, परवा, तेरवा, पुढच्या वर्षी किंवा काही दशकांत या दोन वाचनप्रेमी जिज्ञासू युवकांसारखीच सवय आणखी काही युवकांना लागेल व संपूर्ण तालिबानी राजवट ही याच ज्ञानलालसेने रासवट शिस्तीतून बाहेर येऊन लोकशाहीवादी विचार आपल्या मनात रुजवेल अशी आम्हांस खात्री वाटते.

पुढे आपल्याकडचे मूठभर लोक सत्तेत टिकल्यास सद्ध्याच्या आपल्या प्रस्थापित राजवटीला तालिबानकडूनच अशा अभ्यासू, ज्ञानाधिष्ठित लोकशाहीची शिकवण घेण्याची वेळ आली तर मात्र त्यांच्या पाठीराख्यांच्या समाजमाध्यमांवरच्या कोलांट्याउड्या व डिलीट झालेली विचारमौत्तिके बघण्यास मात्र आपल्यासारख्या लोकशाहीप्रेमी व कन्हैया, मेवानी, व राऊत यांच्या भारतात पुरोगामी लोकांस मौज वाटणार हे निश्चित.

- पिरिष गुबेर
संपादक, ओकसत्ता

© मंदार दिलीप जोशी
माघ कृ. ४, शके १९४३







Monday, February 14, 2022

आधुनिक पंचतंत्रः चार मित्रांची गोष्ट - एक बोध कथा

लहानपणी पंचतंत्र की इसापनीतीत एक गोष्ट वाचली होती. त्या कथेची आजच्या काळासाठी सुसंगत आवृत्ती अशी:

चार पंडित मित्र गुरुंच्या आश्रमातून विद्या संपादन करुन आपल्या घरी परतत असतात. चौदा वर्ष अनेक गूढ विद्या आत्मसात केल्यानं प्रत्येकाला आपल्या ज्ञानाचा अभिमान असतो.

वाटेत एक जंगल लागतं, या जंगलाच्या पलिकडेच त्यांचं गाव असतं.

चालता चालता अचानक एकाला हाडांचा ढीग दिसतो. पहिला म्हणतो, माझ्याकडे असणाऱ्या सिध्दीनं मी ही हाडं जुळवून सापळा तयार करु शकतो, जेणेकरुन हा कोणता प्राणी आहे ते कळेल तरी.

तो मंत्र म्हणतो आणि आश्चर्य! समोर एका प्राण्याचा सापळा तयार होतो.

दुसरा म्हणतो, हे तर काहीच नाही, मी या प्राण्याला मांस आणि त्वचा देऊ शकतो. त्यानं मंत्र म्हणताच समोर साक्षात सिंह तयार होतो.

आता तिसरा म्हणतो, माझ्याकडे तुमच्यापेक्षा महान सिध्दी आहे मी त्याला जिवंत करु शकतो!

हे ऐकताच चौथा मित्र, जो सारासार विचार करत असे व वेळोवेळी योग्य सल्ले देत असे, तो हादरतो आणि त्याला तसे न करण्याबद्दल विनंती करू लागतो. उरलेले तिघे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे घोर पुरस्कर्ते असतात. ते तिसऱ्याने आपल्या प्रगाढ ज्ञानाचा व विद्येचा उपयोग करून सिंहात प्राण फुंकून त्याला जिवंत करावेच या मताचे असतात. चौथा फारच आग्रह करू लागतो तेंव्हा ते त्याला 'टोकाचा विचार करणारा', 'आततायी', 'कट्टर', 'तुझ्या मनात द्वेष आहे,' 'तालीपंडित' अशी दूषणे देतात. शेवटी तो चौथा मित्र म्हणतो, "तुम्हाला सिंहाला जिवंत करायचे तर करा, पण त्या आधी मला थोडा अवधी द्या, मी त्या समोरच्या उंच झाडावर चढून बसतो. मग याला मंत्र म्हणू दे.

पण तिघे ऐकत नाहीत. असं कसं, तुला आवरायला झालेलं आहे. इतका कट्टरपणा चांगला नाही. आम्ही सिंहाला जिवंत करताना त्याने हिंसक होऊ नये अशीही प्रार्थना करणार आहोत. त्यामुळे त्यात सहिष्णुता स्थापन होऊन तो इतर सिंहांनाही सहिष्णू बनवेल. चौथा मित्र म्हणाला, अरे असं काही नसतं, सिंह हा सिंह असतो. त्याची नैसर्गिक वृत्ती तो का सोडेल? मी काही तुम्हाला सिंहाचे तुकडे तुकडे करा असे सांगत नाही, त्याला दगड तलवारी घेऊन हाणा असे सांगत नाही, फक्त त्याला जिवंत करु नका. तरीही त्या तिघांनी त्याचं ऐकलं नाही. त्यांनी त्या चौथ्या मित्राला झाडाला बांधलं आणि म्हणाले, "बघ आमचं पांडित्य, बघ आमची विद्या, बघ आमची सहिष्णूता!"

तिसऱ्या मित्राने मंत्र म्हटला आणि सिंह जिवंत झाला. बराच काळ भुकेलेला असल्याने त्याने पटकन आधी सैरावैरा पळणाऱ्या त्या तिघा मित्रांना पकडून खाल्ले आणि मग शेवटी चौथ्या मित्रालाही गट्टम केलं.

तात्पर्य:
(१) कितीही जीव तुटत असला तरी नको तिथे शहाणपण दाखवू नका आणि मूलभूत समजूतीतच गडबड असेल, थोडक्यात बसिकमधे राडा असेल, तिथे वाद घालू नका.
(२) संधी मिळाली की पळ काढा आणि संकटापासून स्वतःला सुरक्षित ठेवा.

टीप: यात एक पाचवे पात्र पण आहे, जे तिघांतल्या कुणाचाही सारासार विचार जागृत होऊ लागल्यास मैत्री तोडण्याची धमकी देतं. आजच्या भाषेत अनफ्रेंड करेन असं सांगतं. पण त्याबद्दल पुन्हा केव्हातरी. तोवर हा व्हिडिओ बघा. मोठमोठ्या लेखांतून जमणार नाही ते जेमतेम एका मिनिटात समजावलं आहे. 


© मंदार दिलीप जोशी
माघ शुक्ल त्रयोदशी, शके १९४३




Tuesday, February 1, 2022

क्लिंट इस्टवूडचा 'ग्रॅन टॉरिनो': मेक अमेरिका ग्रेट अगेन समजून घेताना

आमच्या लहानपणी सोशल मीडिया नव्हता आणि माहिती मिळवण्याचे दोन-तीनच मार्गच उपलब्ध होते ते म्हणजे सरकारी दूरदर्शन व आकाशवाणी आणि शाळेतली क्रमिक पुस्तकं. या दोन्ही माध्यमांनी असा समज करून दिला होता की कम्युनिस्ट रशिया अर्थात युएसएसआर हा भारताचा खरा मित्र. लहानपणी याच भारावलेल्या मनाने मुंबईत आलेल्या रशियन फेस्टिव्हला हजेरी लावली होती, या पातळीपर्यंत देशवासीयांचे मेंदू तेव्हा बधीर केले गेले होते. तेव्हा आमच्या बालमेंदूत राजकारणात, त्यातही आंतरराष्ट्रीय राजकारणात, कुणीही मित्र नसतो, असतात ते फक्त हितसंबंध (interests) हा प्रकाश पडायचा होता. आमचं बहुतेक लहानपण आणि तारुण्यातली काही वर्ष अमेरिकन भांडवलशाहीला नावे ठेवणारे साहित्य आणि पत्रकारितेच्या मार्फत केले गेलेले लिखाण वाचण्यात गेली नसती तरच नवल होते. 

ज्याप्रमाणे श्री नरेन्द्र मोदी पंतप्रधान होण्याची शक्यता निर्माण झाल्यावर आपल्यापैकी अनेकांना राजकारणात रस निर्माण झाला, त्यावर लिहावं, बोलावं, हिरीरीने चर्चा करावी, वादविवादात सहभागी व्हावं असं वाटलं, त्याच प्रमाणे २०१७ साली डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर अनेकांना अमेरिकन राजकारणातही रस निर्माण झाला. त्याची बीजे क्लिंटन आणि ओबामा यांच्या कारकिर्दीत रोवली गेली होतीच, मात्र प्रामुख्याने भारतीय जनता अमेरिकन अध्यक्ष निवडीची पद्धत, रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स यांच्यातली साठमारी, अमेरिकन डावे आणि उजवे, अमेरिकन राष्ट्रवाद इत्यादीत रस घेऊ लागली ती ट्रम्प अध्यक्ष झाल्यावरच.  

२०१६ साली आपल्या राष्ट्राध्यक्षपदासाठी दावा करताना निवडणुक प्रचारात एक घोषवाक्य वापरलं, जे खूप लोकप्रिय झालं, ते म्हणजे Make America Great Again (अमेरिकेला पुन्हा महान बनवा). हेच घोषवाक्य पुन्हा २०२० साली झालेल्या अध्यक्षीय निवडणुकांच्या वेळीही वापरण्यात आलं. या घोषवाक्याचा डोनाल्ड ट्रम्प यांना अभिप्रेत असलेला अर्थ नेमका कोणता जे जाणून घेण्यासाठी विकीपिडिया आणि आंतरजालावर अनेक स्त्रोत उपलब्ध आहेत. या लेखातून मात्र आपण तो अर्थ एका सिनेमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पुढे लिहीण्याआधीच सांगतो, हा लेख वाचून सिनेमा बघायला गेलात तर कदाचित तुम्हाला तो रटाळ वाटण्याची शक्यता आहे, कारण अमेरिकन सिनेमा म्हटल्यावर तुम्हाला अभिप्रेत असलेला मसाला त्यात नाही. दुसरी गोष्ट अशी की हा लेख थोडासा वरातीमागून घोडं या प्रकारात मोडतो, कारण आता ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नाहीत, आणि पुन्हा निवडणुक लढवायची त्यांची इच्छा असली तरी २०२४ साली रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार कोण असेल हे आज छातीठोकपणे कुणालाच सांगता येणार नाही. 

MAGA

हा सिनेमा म्हणजे लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध अभिनेता क्लिंट ईस्टवूड याने दिग्दर्शित केलेला व त्याचीच प्रमुख भूमिका असलेला Gran Torino हा २००८ साली आलेला चित्रपट.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------

डाव्यांनी गेली सत्तर वर्ष अमेरिका पोखरण्याकडे विशेष लक्ष दिल्याने अमेरिका त्यांच्या जीवनमूल्यांना आव्हान देत असलेल्या एका सांस्कृतिक संकटाचा सामना करत आहे. अनेक वर्ष "ह्या ह्या, अमेरिकेला कसली आलीये संस्कृती" या समजाखाली असल्याने मला याबद्दल वाचन करताना अनेक गोष्टी ध्यानात आल्या. तसं बघायला गेलं तर Gran Torino हा एक अत्यंत सामान्य कथा असलेला चित्रपट आहे, पण लक्षपूर्वक बघितल्यास अमेरिकन जीवनमूल्यांवर एक उत्तम भाष्य आहे हे आपल्याला लक्षात येतं. सिनेमातले अनेक घटक अमेरिकन जीवनमूल्यांचे दर्शन घडवत असतानाच त्यांवर घोंघावणार्‍या संकटांकडेही लक्ष वेधते. हा सिनेमा २००८ साली आला तेव्हा क्लिंट इस्टवूड ७८ वर्षांचे होते. हे म्हातारबुवा आजही तितक्याच तडफेने चित्रपटक्षेत्रात सक्रीय आहेत आणि अजूनही अनेक वर्ष काम करण्याची खुमखुमी राखून आहेत. दुसरं विश्वयुद्ध आणि कोरियन युद्ध अमेरिकेच्या ज्या पिढीने अनुभवलं त्या पिढीचं क्लिंट प्रतिनिधित्व करतात. स्वतः क्लिंट हे कोरियन युद्धात लढलेले आहेत आणि रिपब्लिकन पक्षाचे समर्थक आहेत. अमेरिकेच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका ज्या पिढीचे क्लिंट हे जिवंत उदाहरण आहेत. अस्सल अमेरिकन मातीने बनलेले आहेत.

Clint Eastwood in Gran Torino

क्लिंट इस्टवूडच्या या सिनेमातले त्यानेच साकारलेले प्रमुख पात्र आहे कोरियन युद्ध लढलेला एक माजी सैनिक वॉल्ट कोवाल्स्की. वॉल्ट फोर्ड कंपनीतून निवृत्त झालेला आहे आणि एकेकाळी अमेरिकन चारचाकी उद्योगाचा पाठीचा कणा म्हणून ओळखल्या जाणार्‍या डेट्रॉइटमधे राहत असतो. आता तिथे फारसे अमेरिकन राहत नाहीत. आता तिथे व्हियतनाम युद्धात लाओसच्या कम्युनिस्ट कब्जानंतर विस्थापित झालेले आणि अमेरिकेत स्थलांतर केलेले हमोंग जमातीचे लोक राहतात. चित्रपट सुरु होतानाच आपल्याला दिसतं की वॉल्टच्या बायकोचं नुकतंच निधन झालं आहे आणि वॉल्ट त्या घरात एकटाच डेझी या आपल्या म्हातार्‍या लॅब्रेडॉर कुत्रीसोबत राहतो. वॉल्ट आणि त्याच्या मुलांचे एकमेकांशी पटत नाही आणि त्याची मुले त्याच्याशी एक अंतर राखूनच वागतात. वॉल्टची नातवंडे आजोबाकडे असलेल्या वस्तू कशा मागायच्या या चिंतेत. कडवा अमेरिकन असलेल्या वॉल्टचे सगळे शेजारी आशियायी हमाँग जमातीचे लोक आहेत. वॉल्टला ते अजिबात आवडत नाहीत आणि तसं तो अनेकदा उघडपणे बोलूनही दाखवतो; त्यांच्यापैकी त्याच्या सख्ख्या शेजारी असलेल्या हमोंग कुटुंबातील ताओ हा किशोरवयीन मुलगा त्याच्याकडे त्याच्याकडे जंपर केबल मागायला येतो तेव्हा वॉल्ट त्याची zipperhead म्हणून संभावना करतो. ताओची एक बहीण आहे (सू). कोमल हृदयाच्या लिबरंडू मंडळींनी हा सिनेमा बघूच नये कारण संपूर्ण चित्रपटभर वॉल्टच्या तोंडी अशी वांशिक शेरेबाजी आहे आणि त्याला येणारी उत्तरेही मजेशीर आहेत. आणखी एक पात्र आहे ते म्हणजे त्याच्या बायकोचे 'अंत्यसंस्कार' करणारा एक तरूण पाद्री. वॉल्टच्या बायकोची वॉल्टने चर्चमध्ये कन्फेशन बॉक्समधे एकदा तरी जावं अशी इच्छा होती असा दावा तो करतो. अर्थातच वॉल्ट त्याला हाडतुड करुन हाकलून लावतो. वॉल्टला अधुनमधून खोकला येतो आणि त्याला असलेला आजार वॉल्ट जगापासून लपवतोही. एकंदर वॉल्ट कोवाल्स्की हा जगाला कावलेला तिरसट म्हातारा म्हणून आपल्यापुढे येतो.

Walt and Tao

ताओ हा साधाभोळा, जवळपास बावळट आहे. तिथल्या हमाँग मवाल्यांपैकी काही गुंड त्याला आपल्या टोळीत सामील करुन घ्यायला नेतात आणि वॉल्टची १९७२ सालची मॉडेल असलेली फोर्ड ग्रॅन टोरिनो (Gran Torino) चोरायला सांगतात. नवखा असलेला ताओ गाडी चोरताना बावचळतो, वॉल्टला त्याच्या आवाजाने जाग येते आणि तो आपली भलीथोरली रायफल घेऊन त्याला तिथून हुसकावून लावतो. नंतर त्याच ताओला मारहाण करायला आलेल्या त्याच गुंडांपासून वॉल्ट त्याला वाचवतो आणि चक्क त्याच्या कुटुंबाचा जवळचा माणूस होतो. हळूहळू वॉल्ट थाओला आपल्या पंखांखाली घेतो. वॉल्ट त्याला टोळीत जाण्यापासून रोखतो, त्याला लहानमोठी मॅकेनिकची आणि प्लंबरची कामे करायला शिकवतो, लोकांशी कसं बोलावं वागावं याचे धडे देतो, आपला बावळटपणा दूर करुन त्याच्या आवडीच्या मुलीला डेटवर कसे न्यावे याच्या टिप्स देतो, आणि तिला फिरवता यावं यासाठी वॉल्ट एरवी कुणाला हातही लावू देत नसे अशी त्याची प्राणप्रिय Ford Gran Torino गाडी देतो.  या सगळ्या गोष्टी त्या हमाँग टोळीला आवडत नाहीत आणि चित्रपटाची पुढची कथा ही याच संघर्षाची आहे. 

Walt teaches Tao to fix his roof

गंमत म्हणजे वॉल्ट स्वतः पोलिश स्थलांतरित आहे... पण आतून पूर्णपणे अमेरिकन आहे. अर्थात अमेरिका हा जवळपास अख्खाच स्थलांतरितांचा देश आहे पण जसेजसे ते तिथल्या जीवनमूल्यांना आत्मसात करत जातात तसे तसे ते अमेरिकन होत जातात. वॉल्ट ज्या भागात राहतो तिथे सगळेच स्थलांतरित आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण चित्रपटभर वांशिक आणि इतर तिरकस  शेरेबाजी दिसते (politically incorrect innuendo). वॉल्ट पोलिश आहे, त्याचा न्हावी इटालियन आहे, आणि दोघे एकमेकांना शिव्या देण्याच्या आवेशात पोलॅक (पोलिश  लोकांसाठी वापरला जाणारा पर्यायवाची अपमानजनक शब्द) आणि 'ज्यू' म्हणतात. शेजारच्या हमाँग मुलीला म्हणजे सू ला तो म्हणतो माझ्या कुत्र्याला खाऊ नका त्यावर ती चेष्टेतच पण ताडकन उत्तरते की नाही आम्ही फक्त मांजरंच खातो. कुणीही या वांशिक शेरेबाजीचं वाईट वाटून घेत नाही आणि कुणाच्याही भावना दुखावत नाहीत. हळूहळू आपल्याला कळत जातं की स्थलांतरितांप्रती असलेला वॉल्टचा राग हा वांशिक नसून त्यांच्यात त्याला जो अमेरिकन जीवनमूल्यांचा अभाव दिसतो त्यावर आहे. तो लोकांना जशी जशी आपल्यात अमेरिकन जीवनमूल्ये आत्मसात करताना बघतो, वॉल्टच्या मनात त्यांच्याबद्दल तशी तशी स्वीकृतीची भावना वाढत जाते. समोरच्या घरातल्या एका बाईच्या हातून गाडीतून पिशव्या काढताना भाजी/फळं पडतात तेव्हा तिची चेष्टा करणार्‍या तीन मवाल्यांना पाहून 'काय ही आजची पिढी' असे निराशाजनक उद्गार काढणारा वॉल्ट तिच्या मदतीला जाणार तोच तो ताओला तिच्या मदतीला धावून जाताना पाहून चमकतो. ताओ मग तिच्या घरापर्यंत सामान पोहोचवतो आणि इकडे वॉल्ट हे बघत आपला आधीचा समज खोटा ठरल्याचे पाहून सुखावतो. वॉल्ट ताओला आपल्या हाताखाली घेऊन निरनिराळी कामे शिकवतो. त्याला आपली बाग साफ करायला लावतो, त्याच्याकडून आपले घर रंगवून घेतो, आपल्या घराचे छत त्याच्याकडून दुरुस्त करुन घेतो आणि स्वतः ताओच्या घराचं तुंबलेलं ड्रेनेज साफ करुन देतो. हळूहळू ही सगळी कामे शिकवल्यावर त्याला आपल्या एका बिल्डर मित्राकडे कामाला लावतो... बिल्डर मित्राशी बोलतानाही वॉल्ट तो आयरिश आहे यावर शेरेबाजी करायला विसरत नाही. अशा तर्‍हेने तो जवळजवळ गँगमधे सामील होण्याच्या बेतात असलेल्या एका तरुणाचा गुरू होतो, त्याला योग्य मार्गावर आणतो आणि त्याला एक कर्तव्यपरायण नागरिक म्हणून जगायला शिकवतो. अमेरिका घडवणार्‍या प्रमुख जीवनमूल्य 'आपल्या हाताने आपली कामे करावीत आणि स्वतःसाठी मेहनतीने कमवून जगावे' आहे आणि वॉल्ट त्याचे मूर्त रूप आहे.

Irish builder

Italian barber

दुसरीकडे त्याच्यासमोर आणखी एक अमेरिका आहे जी पुढच्या पिढीला गिळंकृत करायला उभी आहे. सामाजिक न्यायाअंतर्गत (social welfare) वेगवेगळ्या भत्त्यांवर जगणारे बेरोजगार स्थलांतरित तरुण गुन्हेगारीकडे वळलेले त्याला दिसतात. एकेकाळी आपल्या कुशीत भरभराटीला आलेला अमेरिकन कार उद्योग बघितलेले डेट्रॉईट आज अमेरिकन जीवनमूल्यांच्या र्‍हासाचा साक्षीदार असलेले एक उद्ध्वस्त शहर आहे. जगातील दुसर्‍या क्रमांकाचा ऑटॉमोबाईल उद्योग लोकांना भत्ताजीवी करुन ठेवणार्‍या सामाजिक न्याय योजना, कामगार संघटना, आणि बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेपुढे तग धरू शकला नाही, आणि त्या वॉल्टच्या डोळ्यांसमोर उध्वस्त झाला ज्याने फोर्ड मोटर कंपनीत तीस वर्ष काम केलं होतं आणि ज्या वॉल्टची सर्वात मौल्यवान प्रॉपर्टी म्हणजे १९७२ची चमकदार मॉडेल ग्रॅन टोरिनो होती. 

मी नेहमी सांगतो तसं हा चित्रपटही बघण्यात मजा आहे, इथे सगळे सांगून तुमची मजा घालवू इच्छित नाही. पण आपला मुख्य विषय सिनेमाच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांची Make America Great Again या घोषणेतून नेमकं काय अभिप्रेत होतं हा आहे, तेव्हा त्या अनुषंगाने काही गोष्टी सांगणे अत्यावश्यक आहे.

चित्रपट संपता संपता वॉल्ट त्या तरुण पाद्र्याला, फादर जॅनोविचला जाऊन भेटतो आणि मला कन्फेशन मधे जायचे आहे असे सांगतो. वारंवार मन वळवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही तुसड्यागत वागून आपल्याला हाकलणारा वॉल्ट आज  अचानक कन्फेशनमध्ये जायला कसा काय तयार झाला असे फादरला साहजिकच आश्चर्य वाटते. वॉल्ट कोरियन युद्धात लढलेला माजी सैनिक आहे आणि युद्धाच्या अनेक अत्यंत क्लेशकारक स्मृती तो बाळगून आहे. युद्धात त्याने अनेक शत्रूसैनिक इत्यादी लोकांना ठार केलेले आहे. पण वॉल्टच्या कन्फेशनमधे कोरियन युद्धाचा उल्लेखही येत नाही. वॉल्ट कोवाल्स्की ज्या तीन गोष्टींचीव कबूली देतो त्या असतात:

(१) १९६८ सालच्या एका क्रिसमस पार्टीत त्याने एका परस्त्रीचं चुंबन घेतलेलं असतं.
(२) एकदा एक बोट आणि तिची मोटर विकून आलेल्या ९०० डॉलर रकमेवर कर भरलेला नसतो; ही एक प्रकारे चोरीच झाली.
(३) आपल्या दोन्ही मुलांशी त्याचे कधीच घट्ट नाते तयार होऊ शकलेले नसते, त्यांना तो कधीच समजून घेऊ शकला नाही ही त्याची खंत असते. का कोण जाणे पण असे झालेले असते खरे. 

वॉल्ट जे कन्फेस करतो, आणि जे करत नाही, त्यातून अमेरिकन कोअर वैय्यक्तिक जीवनमूल्ये कोणती हे आपल्याला कळतं. ज्या तीन गोष्टींची त्याला खंत असते, ज्या गोष्टी 'कन्फेस' करणे त्याला आवश्यक वाटले ती त्याच्या लेखी पापं असतात. नात्यात एकनिष्ठ असणे, व्यवसायिक आणि आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता, आणि कुटुंबाची, मुलांची प्रेमळपणे काळजी घेणे ही ती जीवनमूल्ये होत. युद्धावर जाणे आणि माणसे मारणे हे दु:खद असले तरी पाप समजली जात नाहीत, वॉल्टही तसं समजत नाही.  

Walt in confession

हां, ही एक गोष्ट वेगळी की आपल्यासमोर येणारे अमेरिकेचं चित्र अगदी वेगळे आहे ज्याच्याशी या तीन मूल्यांची कुठेही सांगड घालता येत नाही. पण अमेरिकेला मोठे करण्यात, जगाचे नेतृत्व करावे इतक्या पातळीवर आणून ठेवण्यात याच मूल्यांचे कसोशीने पालन करणार्‍या पिढीचा मोठा वाटा आहे. आज समाजवादी वेलफेअर स्टेट बनलेल्या डेमोक्रॅट अमेरिकेत याच मूल्यांचे वेगाने पतन होताना उघड्या डोळ्यांनी बघण्याची आज अनेकांवर वेळ आलेली आहे. याचमुळे अफगाणिस्तान सारख्या सटरफटर देशातून मार खाऊन परतलेल्या अमेरिकेची सदसद्विवेकबुद्धी इतकी सडलेली आहे की सत्ताधार्‍यांचा कसल्याही प्रकारचं विचारमंथन करण्याकडे कल उरलेला नाही. याचमुळे आज भारतीयांना अमेरिकेच्या घेण्याजोग्या चांगल्या गोष्टी दिसत नाहीत; दिसतं काय तर दारू ढोसून नाचणारा आणि अर्धनग्न पोरींच्या मागे धावणारा अमेरिका नावाचा देश, आणि त्याचीच नक्कल करावीशी वाटते. या समाजवादी डेमोक्रॅट संकटतून अमेरिका बाहेर येईल का, ट्रम्प यांच्या स्वप्नातली अमेरिका, Make America Great Again ही घोषणा सत्यात येईल का, हे मात्र तिथल्या जनतेवरच अवलंबून आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------

श्री नरेन्द्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे या कडव्या राष्ट्रवादी मानसिकतेच्या त्रयीचा प्रभाव आंतरराष्ट्रीय राजकारणावर आणखी काही काळ राहिला असता तर कदाचित आजचे चित्र थोडे वेगळे दिसले असते. पण दुर्दैवाने २०१६ मध्ये प्रकृतीच्या कारणास्त्व शिंजो अ‍ॅबे यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली आणि २०२१ साली झालेल्या वादग्रस्त निवडणुकांत डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले. आज जागतिक राजकारणाच्या पटलावर फक्त आपल्या देशात पंतप्रधान नरेन्द्र मोदीच घट्टपणे पाय रोवून उभे आहेत. जागतिक घडामोडींचा ज्याप्रमाणे भारतावर प्रभाव पडतो, त्याचप्रमाणे भारतीय ध्येयधोरणांचाही आंतरराष्ट्रीय राजकारणात पडसाद जाणवतात. म्हणूनच राष्ट्रीय चरित्र निर्माण करायचे असेल, भारतीय जीवनमूल्ये जपायची असतील, हिंदू संस्कृतीचा र्‍हास रोखायचा असेल तर आज आपण सगळ्यांनी त्यांच्या लहानमोठ्या चुका, आपापसातले क्षुल्लक मतभेद, आणि भाषा/प्रांतवाद, यांच्या पलीकडे विचार करत श्री नरेन्द्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यकच नव्हे तर अनिवार्य आहे.

© मंदार दिलीप जोशी
माघ कृ १५, शके १९४३

Friday, January 21, 2022

संयुक्त राष्ट्रसंघात भारत पहिल्यांदाच मांडतोय हिंदू धर्माची बाजू

"इतर धर्मांबद्दल असहिष्णुता हा अब्राहमिक धर्मांचा एक सिद्धांत आहे तर हिंदू धर्म सैद्धांतिकदृष्ट्या सहिष्णू आहे."

— अस्तित्वात असलेल्या दहशतवादाकडे दुर्लक्ष करुन emerging म्हणजे येऊ घातलेल्या तथाकथित काल्पनिक हिंसेला झोडपू पाहणार्‍या काही घटकांचा डाव उघड करताना आज संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे प्रतिनिधी श्री टी एस तिरुमूर्ती यांनी या प्रयत्नांच्या चिंधड्या उडवल्या. 


हा राहुल शिवशंकर यांनी टाईम्स नाऊ वाहिनीवरील तुघलकचे संपादक श्री गुरुमूर्ती यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा जो भाग आपल्याला या व्हिडिओत दिसतो त्याचा मराठी भावानुवाद आहे. श्री गुरुमूर्ती यांची इंग्रजी बोलण्याची विशिष्ट म्हणजे दाक्षिणात्य शैली लक्षात घेता पुनरुक्ती टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे हे लक्षात घ्यावं. तसेच, आजवर पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे हिंदूंच्या बाजूने का बोलत नाहीत असा घोष करणार्‍या लोकांना कदाचित यामुळे उत्तर मिळेल की प्रत्येक बाब ही इंस्टंट पदार्थांसारखी लगेच, आपल्याला हवी तेव्हा होत नसून योग्य वेळी अत्यंत प्रभावी तरीही संवैधानिक पद्धतीने, ज्याआंतरराष्ट्रीय मंचावर मांडली जात आहे त्याचा आदर राखून कशी मांडणे आवश्यक आहे ते कळेल अशी आशा. 

राहुल शिवशंकर: भारताने संयुक्त राष्ट्रसंघात हिंदू धर्माची जी बाजू मांडली त्याचे महत्त्व किती यावर आपण आज आपल्या स्टुडियोत उपस्थित असलेले पत्रकारितेतील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व, तुघलकचे संपादक श्री गुरुमूर्ती यांच्याकडून जाणून घेणार आहोत. श्री गुरुमूर्ती, टाईम्स नाऊ आणि विशेषतः माझ्याशी संवाद साधल्याबद्दल आपले अनेक आभार.

श्री गुरुमूर्ती: आभार.

राहुल शिवशंकर: जगात प्रचलित असलेल्या काही विशिष्ट प्रकारच्या धार्मिक भेदभावांच्या प्रकारांकडे विशेष लक्ष देऊन हिंदू धर्माबद्दल पसरवला जात असलेला भयगंड (Hinduphobia) या सारख्या इतर प्रकारांकडे संयुक्त राष्ट्रसंघ जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे या गोष्टीकडे भारताने लक्ष वेधलं. ही घटना तुम्हाला किती महत्त्वपूर्ण वाटते?

श्री गुरुमूर्ती: आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी परिषदेत टी एस तिरुमूर्ती यांनी जे केलं ते खूपच थोर कार्य म्हणावे लागेल. एक म्हणजे दहशतवाद या शब्दाची व्याख्या सतत बदलून दहशतवादविरोधी लढा सौम्य करण्याचा जो प्रयत्न चालवला जात होता तोच त्यांनी उध्वस्त केलेला आहे. गेली काही वर्षे दहशतवाद या शब्दाचीच व्याख्या सौम्य करुन खर्‍या दशतवादाला एक प्रकारची क्लीनचिट देण्याचा प्रयत्न सुरु होता. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात दहशतवादविरोधी चर्चा घडत असताना अब्राहमिकेतर धर्मांच्या विरोधात असलेल्या पूर्वग्रहाला उघडे पाडले, जे याआधी कधीही, कधीही झाले नव्हते. गेल्या सत्तर वर्षात भारतीय प्रतिनिधीने भारतीय संस्कृतीची बाजू घेतल्याचं बघायला मिळालं नव्हतं. हे असं पहिल्यांदाच घडतं आहे की भारताने भारतीय संस्कृतीची बाजू मांडायला तोंड उघडलेलं आहे आणि ते ही अशा आंतरराष्ट्रीय मंचावर जिथे अशा कुठल्याही प्रकारची चर्चा ही अब्राहमिक धर्ममतांना प्रमाण मानत, तेच मानक ठेऊन होत असे अशा मंचावर. दहशतवाद या संज्ञेला सौम्य करण्याच्या प्रयत्नांच्या श्री तिरुमूर्ती यांनी कशा चिंध्या केल्या ते आपण समजून घेऊ. सद्ध्या अस्तित्वात असलेला दहशतवाद व त्या अनुषंगाने घडत असलेल्या घटनांकडे संपूर्ण दुर्लक्ष करत, राजकीय, धार्मिक, आणि इतर हितसंबंध गुंतलेल्या काही देशांनी "उदय होत असलेले धोके" (emerging threats) नामक नवीन संज्ञा जन्माला घातली. अर्थातच कुठल्याही तात्त्विक किंवा तटस्थ भूमिकेतून या देशांनी ही संज्ञा जन्माला घातलेली नव्हती. आणखी एक गोष्ट म्हणजे दहशतवाद या शब्दाची दाहकता सौम्य करण्याकरता त्यांनी दहशतवादाचे उपप्रकार पाडायला सुरवात केली: 
(१) कट्टरतावाद आणि वांशिक आधार असलेला हिंसक दहशतवाद (Radically and ethnically motivated violent extremism)
(२) अतिरेकी राष्ट्रवाद (Violent nationalism)
(३) उजवा कट्टरतावाद (Right-wing extremism)

बाँब आणि गोळ्यांद्वारे मनुष्यहत्यांसारख्या वास्तवात घडवून आणल्या जाणार्‍या घटनांपासून लक्ष दुसरीकडे वळवत लोकाशाहीचा एक अपरिहार्य भाग असलेल्या राजकीय संघर्षाच्या घटनांना दहशतवादाचा एक प्रकार असल्याचे उपरोल्लेखित देशांकडून भासवले जात होते. श्री तिरुमूर्ती यांनी हा भंपकपणा कसा हे सिद्ध करणारी काही कारणे सांगितली ती अशी: 

श्री तिरुमूर्ती यांच्या म्हणण्यानुसार, 
  • असे वर्गीकरण जागतिक दशतवादविरोधी परिषदेच्या स्थापनेमागील तत्त्वांच्या विरोधात जाते. बाँबस्फोट आणि बंदुकांद्वारे मनुष्यहत्यांसारख्या वास्तवात घडवून आणल्या जाणार्‍या घटनांच्या मागे असलेल्या कारणांचा शोध घेणे हे या परिषदेच्या स्थापनेमागील कारण होय. 
  • दुसरं म्हणजे असे वर्गीकरण काही प्रगत राष्ट्रांनी ९-११च्या दहशतवादी हल्ल्याच्या आधी जन्माला घातलेल्या "चांगला अतिरेकी आणि वाईट अतिरेकी" या फसव्या कल्पनेकडे नेणारे आहे. 
  • तिसरं म्हणजे हे समजून घेणं गरजेचं आहे की लोकशाहीत उजवी विचारसरणी आणि डावी विचारसरणी यांच्यापैकी काय निवडायचे ही जनतेच्या निवडणुकीतील निर्णयावर अवलंबून असते. जनता उजव्या किंवा डाव्या दोन्ही विचारसरणीमागील अतिरेकी विचारांना नाकारतही असते. तेव्हा, अशा प्रकारे वैचारिक संघर्षाला  दहशतवादावरील चर्चेत सामील करुन त्याला थेट हिंसक अतिरेकी कारवायांच्या पंगतीला बसवण्याचा अव्यापारेषू व्यापार हा निव्वळ दहशतवादाच्या मुळाच्या अर्थात त्यामागील सत्याच्या शोधाकडे जाण्यापासून लोकांना रोखणे याच उद्देशाने केलेला वाटतो. 
  • चौथा मुद्दा असा की दहशतवाद्यांचे वर्गीकरण करताना तयार केलेली छद्म-लेबले राष्ट्रीय किंवा स्थानिक पातळीवरील मुद्द्यांना लावून संघर्षाच्या स्थानिक मुद्द्यांना दहशतवादाच्या पातळीपर्यंत उंचावणे आणि मग आपोआप प्रत्यक्ष घडत असलेल्या दहशतवादाला सौम्य करणे असा दुहेरी डाव साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परराष्ट्रमंत्री श्री जयशंकर यांचे विधान उद्धृत करताना श्री तिरुमूर्ती  म्हणाले की "दहशतवाद हा दहशतवाद असतो, दहशतवादी हा दहशतवादी असतो, आणि चांगला दहशतवाद आणि वाईट दहशतवाद वगैरे असं काही नसतं." अशा प्रकारे ठामपणे घेतलेली ही भूमिका ही खोडसाळपणे व मुद्दाम दहशतवादाची सौम्य स्वरूपात खोटारडी मांडणी करण्याच्या विरोधात भारताने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
अब्राहमिकेतर धर्ममतांच्या विरुद्ध असलेल्या पूर्वग्रहदूषित मतांना श्री तिरुमूर्ती यांनी अशा प्रकारे प्रभावी पद्धतीने सुरुंग लावला. या आधी आंतरराष्ट्रीय मंचांवरुन होणार्‍या विचारमंथनात अब्राहमिक धर्ममते आणि अब्राहमिकेतर धर्म यांच्यात फरक करुन कधीही चर्चा झालेली नव्हती. [अपवाद फक्त मूलतत्वावाद अभ्यास प्रकल्प (fundamentalism project study) याचा. यात मात्र अब्राहमिक धर्ममते आणि अब्राहमिकेतर धर्म असे वर्गीकरण करुन त्यावर विवेचन केलेले दिसते.] श्री तिरुमूर्ती म्हणाले की सद्ध्या प्रचलित असलेल्या फोबियांमधे इस्लामोफोबिया, ख्रिती रिलिजन बद्दल द्वेष, व अ‍ॅन्टीसेमिटिझम अर्थात ज्युविरोधवाद हे प्रकार प्रामुख्याने आढळतात. पण या सगळ्याच्या सगळ्या वर्चा या अब्राहमिक धर्ममतांच्या बाबतीतल्या आहेत. पण अब्राहमिकेतर धर्मांबद्दल मोठ्या प्रमाणात असलेला आकस आणि द्वेष हा संयुक्त राष्ट्रसंघाने आजवर विचारातही घेतलेला नाही, त्यावर कधी चर्चाही केलेली नाही. हिंदूद्वेष, शीख समुदायाबद्दलचा द्वेष, बौद्धद्धमताबद्दल असलेला द्वेष हे देखील अस्तित्वात असताना या व अशा अब्राहमिकेतर धर्मांबद्दल असलेल्या द्वेषाकडे आजवर तुम्ही आजवर दुर्लक्ष का केलंत असा सडेतोड प्रश्न श्री तिरुमूर्ती यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला विचारला. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय पटलावर आपली बाजू लढवली जात आहे अशी भावना एक हिंदू म्हणून आमची प्रथमच झाली. कारण साधारण तीनेक शतकांपासून आजपर्यंत दहशतवाद, धर्ममते, व तत्सम विषयांवर होणार्‍या चर्चांचा सूर हा आम्ही हिंदू म्हणजे कुणीतरी मागासलेले आणि म्हणून टाकून देण्याच्या लायकीचे असाच असायचा, त्याला  भारताचे प्रतिनिधी श्री तिरुमूर्ती यांनी चांगलाच सुरुंग लावला. 

आता श्री तिरुमूर्ती यांच्या युक्तीवादातला सर्वात महत्त्वाचा भाग सांगतो. एक म्हणजे अब्राहमिक धर्ममतांमध्ये सैद्धांतिक आणि उपदेशात्मक पातळीवर असहिष्णुता आहे आणि हा मुद्दा जगभरात झालेल्या व सुरू असलेल्या विचारमंथनांत मान्य करण्यात आलेला आहे. दुसरीकडे अब्राहमिकेतर धर्मांत सैद्धांतिक आणि उपदेशात्मक पातळीवर असहिष्णुता अस्तित्वात नाही, आणि हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. व्यक्तीगत पातळीवर आपण सहिष्णू किंवा असहिष्णू असू शकतो. किंबहुना, मनुष्यमात्रांतील असहिष्णुता नियंत्रित करण्याचे काम हे (म्हणजे अब्राहमिकेतर) धर्म करतात. पण जर का धर्मच सैद्धांतिक आणि उपदेशात्मक पातळीवर असहिष्णू असतील तर ते मनुष्यांतील असहिष्णुता अनेक पटींनी वाढवण्याचे काम करतात हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. ही बाब Encyclopedia Britannica या शब्दकोषासकट जागतिक साहित्यात मान्य झालेली आहे. अगदी अयोध्या खटल्यात सर्वोच्च न्यायालायाचे न्यायाधीश श्री भरुचा आणि श्री अहमदी यांनीही हेच प्रतिपादन केले की हिंदू धर्म हा सैद्धांतिक पातळीवर सहिष्णूच आहे. हिंदू धर्मीय हे माणूस म्हणून असहिष्णू असू शकतात, पण त्यांचा धर्मसिद्धांत त्यांना सहिष्णू बनवतो व बनवत राहील. हा अब्राहमिकेतर धर्मांचा सर्वात मोठा गुण आहे जो या आधी भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय बुद्धीजीवी(!) वर्तुळात चर्चिला गेलाच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अब्राहमिकेतर धर्मांत मूलतत्ववाद नामक गोष्टच अस्तित्वात नाही (कारण या धर्मांची मूल तत्त्वेच सहिष्णू आहेत). वस्तुतः मूलतत्ववाद प्रकल्पाचा अब्राहमिक धर्ममतांबाबतचा निष्कर्ष हा लक्षात घेण्यासारखा आहे: "मूलतत्वावाद हा लिखित स्वरूपात उपदेश अस्तित्वात असलेल्या अब्राहमिक धर्मांची वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. या धर्मांत लिखित वचनांचे प्रामाण्य अध्याहृत असून, लिखित वचनांपासून ढळणे किंवा च्युत होणे हे मान्य नाही, ते सहनही केले जात नाही. तसेच, हिंदू, शीख, बौद्ध, ताओइझम (चीनी) आदि पौर्वात्य धर्म हे मूलतत्ववादाने पीडीत नाहीत." 

भारतीय बुद्धीवादी (!) वर्तुळात अशी चर्चा कधी ऐकली आहे काय? मूलतत्वावाद प्रकल्प हा एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प असून त्या अंतर्गत १९८० साली सुरू झालेला आंतरराष्ट्रीय प्रकल्प असून या अंतर्गत १९९४ सालापर्यंत ५ अहवालवाजा खंड प्रकाशित झालेले आहेत. असा हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प जर त्याच्या प्रकाशनांत म्हणत असेल की अब्राहमिकेतर धर्मांत सैद्धांतिक आणि उपदेशात्मक पातळीवर असहिष्णुता नाही आणि मूलतत्ववाद नाही तर त्याला निश्चितपणे वजन प्राप्त होते. या गोष्टी ज्या आजवर आपण जागतिक पातळीवर सत्य म्हणून स्थापित करु शकत नव्हतो, ज्यांमुळे आपल्याला चर्चेत आणि इतर बाबतीत अब्राहमिक धर्ममतांच्या बरोबरीने स्थान नव्हतं, त्याच गोष्टी श्री तिरुमूर्ती यांनी ठामपणे मांडून निश्चितपणे काही देश व घटकांच्या कारस्थानांना खोटं पाडलं. 



Transcript

Anchor:
We have a very influential voice tonight in the shape of Mr. S. Gurumurthy, the editor of Tughlaq to get a perspective on what monumental step this has actually been. Mr Gurumurthy, thank you for once again speaking with Times Now and me in particular. Thank you very much.

Mr Gurumurthy:
Thank you. Welcome please.

Anchor:
How significant is it that India has called out the United Nations for its selectivism over its emphasis on certain kinds of religious discrimination, but not others like Hinduphobia.

Mr Gurumurthy:
See the International Counterterrorism Conference, what T S Tirumurthi did is something outstanding. He made two great points. One, he demolished the effort to dilute the battle against terror by changing the narrative of what is terror. Over a period the very definition of terror was being diluted to include everything into terror so that the real terror escapes. This is point one he made. The second point was he exposed the bias against non-Abrahamic religions in the UN discourse, which has never, never happened. In 70 years, I have never seen an Indian representative attempting to defend the Indian civilization. This is the first time it has happened that India has opened its mouth to defend the Indian civilization in a world which has been running on the Abrahamic civilisational narratives and discourse. I will just take a minute to explain how he demolished the dilution of the concept of terror. They introduced the concept of “emerging threats”. Instead of dealing with the actual threats, they introduced the concept of emerging threats and began categorizing terror. Who are the people who were doing it? “Some interested Member States”, he says, “driven by political, religious, and other motivations.” It is not that they were driven by any intellectual or motivations of an unbiased nature, so they said they've been trying to label terrorism into categories. You see the categories they were making:
1. Radically and ethnically motivated violent extremism.
2. Violent nationalism
3. Right wing extremism

From the battle against terror, which means throwing bombs and killing people by AK47, the whole concept was diluted into almost what would be a political battle in a democracy. So he cited 4 reasons why this dilution is fraudulent. I mean I am using the word fraudulent, he didn't, but he meant it.

He said it goes against the accepted principle of Global Counter Terrorism Council’s very formulation. It was intended to find the actual terror of someone throwing bombs. Second, it goes back to the pre-911 label of your terror versus my terror. My terror is softer terror, your terror is a harder terror. So this is the second thing. Third thing, he said it is necessary to understand that in a democracy, right wing and left wing ideological battle is a matter of electoral choice of the people. So when people are choosing, there is nothing called right or left wing extreme thought, people will reject the extreme thought. So this whole idea of reducing spectrum of ideological battle into the idea of terror is only to dilute the actual terror.

The 4th point he made was that even such labels were given to so-called threats, which are limited to national or regional context. So they were trying to raise even the local disputes into something like global terror. He quoted the foreign minister Jaishankar’s statement to say “Terrorism is terrorism, terrorists are terrorists, and there is nothing like good terror and a bad terror.” I think this is a very, very major step. India has taken to stop the dilution of terror by intended and deliberate narratives, false narratives. Second thing is he exposed the bias against non-Abrahamic religions. Never in the international discourse the idea of Abrahamic religions and non-Abrahamic religions were ever debated or discourse, though in the intellectual discourse whether it is in the fundamentalism project study or in the intellectual discourse elsewhere, religions were categorized in the world as Abrahamic and non-Abrahamic. And I will tell you what is the impact of this. He said that while the phobia against Abrahamic religions that there is Islamophobia, there is Christian or phobia there is anti-Semitism —all these are Abrahamic religious pools are hurt. But he said there is also bias against non-Abrahamic religions. You have never discussed about it. There is anti-Hindu bias, there is anti-Sikh bias, there is anti-Buddhist bias. Why have you neglected the bias and the phobia against non-Abrahamic religions? This is the question he raised. The most important point is that we feel for the first time that we are defended. We were always, I mean Hinduism itself was taken as something which is backward and all that, it is something which has to go. This is the kind of discourse which has been going on in the world for the last three centuries.

Now I want to mention three facts, three facts Mr Rahul. One is that in Abrahamic religions there is doctrinal intolerance. This is accepted by all intellectual discourses in the world. In non-Abrahamic religions there is no doctrinal intolerance. This is important. Individuals can be tolerant or intolerant. In fact, only to moderate individual intolerance, you have religions, so that religions moderate the individual intolerance. But if the religions themselves are doctrinally intolerant, you can understand how individual intolerance will be multiplied by doctrinal intolerance of religions. It is accepted by all global literature, including the Encyclopedia Britannica and other literature that including the Supreme Court in the Ayodhya case, Justice Bharucha and Ahmedi said, “Hinduism is doctrinally tolerant.” The Hindus may be intolerant, but their doctrine will make them tolerant. That is the virtue of non-Abrahamic religions, which is never debated or discussed in the Indian intellectual scene or in the world. The second thing is there is nothing called fundamentalism in non-Abrahamic religions. In fact I would like to quote what the fundamentalism project said about Abrahamic religions. The fundamentalism project said “The idea of fundamentalism is unique to the Abrahamic religions which are text based. Textual inherency is presumed, and textual deviation is not allowed. And Fundamentalism Project goes on to say that Hinduism, Sikhism, Buddhism, Taoism and the eastern religions do not suffer from the vice of fundamentalism. Have you ever heard it in Indian discourse? This Fundamentalism Project started in 1980 and delivered 5 volumes by 1994, and this is an international research. So first there is no doctrinal intolerance in non-Abrahamic religions and there is no fundamentalism. To these two things taken together, we are not in a position to establish it in the world, we are not even treated on par with the Abrahamic religions — this Tirumurti has demolished.

© मंदार दिलीप जोशी
पौष कृ. ३, शके १९४३, संकष्ट चतुर्थी


Saturday, May 22, 2021

आपण सगळे यिगल येहोशुआ

Yigal Yehoshua

हा फोटो ज्या व्यक्तीचा आहे त्या व्यक्तीचं नाव यिगल येहोशुआ होतं. 'होतं' म्हणजे तुम्हाला वाटतंय तेच, आता यिगलचा फोटो भिंतीवर आहे. इस्राइलच्या Lod शहराचा नागरिक असलेल्या या व्यक्तीला तिथे राहणाऱ्या अरब तरुणांनी दगडांनी ठेचून मारलं. यिगल येहोशुआ इस्राइलचे एक सामान्य नागरिक होते, आणि त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी, संस्थेशी, किंवा उपक्रमाशी (वाचा: कांडाशी) काडीमात्र संबंध नव्हता. वेगळ्या भाषेत सांगायचं तर यिगलला 'तटस्थ' म्हणता येईल.  यिगलचा मृत्यू अशा प्रकारे झाला नसता आणि नंतर कधीतरी नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू पावले असते तर आज त्यांचं नावही कुणाला कळलं नसतं. 

मग यिगल येहोशुआ नामक व्यक्तीच्या हत्येबाबत तुम्हाला काय आणि महत्वाचं म्हणजे का जाणून घेणं आवश्यक आहे?

त्यांना का मारलं म्हणजे त्यांना असं मारण्याबद्दल अरब लोकांचं काय मत आहे हे विचारलं गेलं तेव्हा एका अरब तरुणाने सांगितलं की हसौना (Hassouna) नामक एका अरब युवकाला गोळी घातली गेली त्याचा बदला म्हणून यिगलची अशी हत्या झाली. आम्ही जशास तसे 'न्यायाने' असाच सूड उगवत राहू!

ही त्या बातमीची लिंक https://tinyurl.com/dudyyps8. असंही 'Yigal Yehoshua' हे शब्द टाकून तुम्ही शोध घेतल्यास अनेक संकेतस्थळांवर ही बातमी आणि हा फोटो तुम्हाला सापडतील.

आता आपण पाहूया की या सध्या भासणाऱ्या घटनेचे विश्लेषण आवश्यक का आहे. कारण खरं तर फार सोपं आहे, पण हल्ली सोप्या गोष्टीच उलगडून सांगाव्या लागतात, आणि कठीण विषयांबद्दल लोकांचं मत आधिच बनलेलं असत! तर, या सध्या भासणाऱ्या घटनेचे विश्लेषण अत्यावश्यक आहे कारण यिगल येहोशुआ जसे सामान्य व्यक्ती होते तितक्याच सामान्य असलेल्या तुमच्या आमच्यासारख्यांशी याचा थेट संबंध आहे. इथे हे सांगताना यिगलला एक उदाहरण म्हणून वापरावं लागतंय हे त्यांचं दुर्दैव आहे. 

आधी हे लक्षात घ्या की यिगल जिथे मारले गेले ती जागा आणि तो भाग त्यांच्या नेहमीच्या वावरातला होता. ते आपल्या घरी किंवा ऑफिसला जे काही असेल तिथे जात होते, सांगण्याचा उद्देश हा की ये त्यांच्या नेहमीच्या रस्त्याने जात होते. त्याच मार्गावर त्यांना ठार केलं गेलं. याने काय होतं की सगळ्या 'टार्गेट ऑडियन्स' ला हा संदेश जातो की 'तुम्ही' 'आमच्यापासून' सुरक्षित नाही; आमची तुम्हाला मारून टाकण्याची इच्छा झाली तर जिथे सापडाल तिथे ठार करु. म्हणून तुम्ही आम्हाला सदैव घाबरून, आमच्या पासून सदैव दबून राहण्यातच शहाणपणा आहे.

आता स्मरणशक्तीला जरासा ताण देऊन पहा, हे जे 'जिथे सापडाल तिथे ठार करु' कुठेतरी वाचल्याचं किंवा ऐकल्याचं वाटतंय का? तसं वाटत असेल तर तुमचं बरोबरच आहे, तेच आणि तसंच आहे ते. त्या शिकवणीचा सार्वकालिक संदेश, अशा हत्या करणारे आपल्या कृतीतून व्यवस्थित समजवतात की बघा, तुम्ही आम्हाला जिथे सापडाल तिथे खलास करू. म्हणून आम्हाला घाबरून, दबून रहा. या शिकवणीला कुणाच्यातरी आत्मचरित्रात जेव्हा दैवी उपदेश म्हणून खपवलं जातं तेव्हा वेळीच त्याचा नायनाट न केल्यास त्याचे परिणाम भयंकर महागात पडतात. 

आपल्याकडे एक श्लोक आहे:
अग्नि: शेषं ऋण: शेषं शत्रु: शेषं तथैव च ।
ते पुन: पुन: प्रवर्धेत तस्मात् शेषं न कारयेत् ।।

इथे जिझिया कसा घ्यावा याचा उल्लेख आहे अशा 9:29 क्रमांकाच्या दुसऱ्या एका तथाकथित दैवी उपदेशाला समजून घेणं आवश्यक आहे. यात स्पष्टपणे म्हटलं आहे की ज्याला शत्रू मानलं आहे त्याच्या स्वाभिमानाचा चेंदामेंदा करावा; त्याच्याकडून फक्त एखादा कर वसूल करणे नव्हे तर शत्रूला कायम अपमानित आणि कमकुवत मानसिक स्थितीत ठेवायचं आहे की तुम्हाला हवं तसं त्याला लुटू शकाल, जेव्हा हवा तेव्हा आणि हवा तसा त्याचा अपमान करू शकाल पण त्याच वेळी शत्रूला त्या विरोधात न्याय मागण्याचा हक्कच असू नये. त्याची एकदम हिटलर किंवा स्टालिनच्या गोष्टीतील कोंबडी करून टाका.

हा तथाकथित दैवी उपदेश वाचल्यावर हिंदी सिनेमातल्या एका टिपिकल कथावस्तूची आठवण येते ज्यात बलात्कार होण्यापासून हिरो त्याच्या बहिणीला वाचवतो आणि त्या हाणामारीत बलात्कार करणारा मारला जातो म्हणून त्याचा भाऊ हिरोच्या संपूर्ण  खानदानाला मारून टाकतो. का, तर त्याच्या भावाला हीरोने मारलं म्हणून. म्हणजे त्याचा भाऊ हीरोच्या बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न करत होता हा अपराध, पाप आहे वगैरे गोष्टींना त्याच्या लेखी शून्य महत्व असतं ― पण आपला भाऊ हीरोने मारला याचा सूड म्हणून त्याच्या पूर्ण खानदानाला ठार करणे हा त्याला न्याय वाटतो. त्याची हीच मानसिकता आहे आणि ही मानसिकता येते तथाकथित दैवी उपदेश क्रमांक 9:29 मधूनच येते. 'उमर का सुलहनामा' म्हणून ओळखला जाणारा एक शांतीकरार (खिक्) याच मानसिकतेचं एक्सटेन्शन आहे ― इब्न कसीर ची तफ़सीर बघितली तर हे पटकन लक्षात येतं. कुणीही शोधून वाचू शकतं, फुकट आहे!

या पार्श्वभूमीवर हे लक्षात घ्या की मारला गेलेला उपरोल्लेखित हसौना नामक अरब तरुण हा दंगलीत सहभागी असताना मारला गेला होता, त्याच्या घरात घुसून त्याला कुणी मारलेलं नव्हतं. हमासने सोडलेल्या क्षेपणास्त्रांचे प्रत्युत्तर इस्राइलने द्यायला सुरुवात केली म्हणून इस्राइली नागरिक असलेल्या अरबांनीच पहिल्यांदा दंगली सुरू केल्या. या दंगलींचा त्रास सामान्य इस्राइली नागरिकांनाच (वाचा: ज्यू) होत होता. म्हणजे आपल्याकडे मिनी-पाकिस्तान असतात तसे तिकडे मिनी-पॅलेस्टाइन आहेत. 

तर, अरबांनीच पहिल्यांदा दंगली सुरू केल्या, त्याचं प्रत्युत्तर इस्राइलने द्यायला सुरुवात केली, त्यात दंगलीत सामील असलेला तो अरब तरुण हसौना मारला गेला ― पण तरी तो दोषी नाही बरं का! तरी त्याच्या मृत्यूचा बदला कशाशी काही संबंध नसलेल्या एका निष्पाप इस्राइली नागरिकाला मारून घेतला जातो आणि त्या हत्येला न्याय म्हटलं जातं तेव्हा त्या विचारांच्या चारित्र्याचे विश्लेषण करून ते समजून घेणं आवश्यक ठरतं. आणि त्याला तथाकथित दैवी शिकवण म्हटलं जातं हा आणखी एक क्रूर विनोदच म्हणायला हवा.

हे सगळं जाणून घेणं आपल्याला का गरजेचं आहे? 

कारण आपण सगळेच यिगल येहोशुआ आहोत. 

अन्याय सहन करणारा, अन्याय करणाऱ्यापेक्षा मोठा गुन्हेगार असतो. 

एक प्रयोग करून पहा, यिगल येहोशुआ यांची हत्या हा अन्याय आहे असं एखाद्या मिश्र ग्रुपात बोलून पहा. याच्यावर प्रतिक्रिया नक्कीच आश्चर्यचकित करणाऱ्या नसतील हे नक्की. अपेक्षितच प्रतिक्रिया असणार आहेत. तुम्हाला इनबॉक्सात गाठून पोस्ट किंवा मेसेज डिलीट करायला सांगणारा एखादा मोदींवर हिंदूंसाठी काहीही न केल्याचा मोदींवर सतत आरोप करणारा कट्टर हिंदुत्ववादीच निघायचा!

आणखी एक, जेक गार्डनरला विसरू नका बरं!

🖋️ मंदार दिलीप जोशी
माघ शु. दशमी, शके १९४३

Tuesday, February 16, 2021

प्रियांका गांधी वड्रा, दिशा रवी, आणि टूलकिट

१९९१ साली पेरारीवलन नावाचा एक तरुण फक्त १९ वर्षांचा होता. शिवरासन नामक एका मित्राने सांगितलं म्हणून त्याने एका दुकानातून सेल विकत घेऊन त्याला दिले. शिवरासन हा राजीव गांधी हत्या खटल्यातील मुख्य आरोपी होता, आणि तपासात निष्पन्न झाल्यानुसार त्याने त्या बॅटऱ्यांचा उपयोग बॉम्बमध्ये केला होता. 

पेरारीवलन गेली तीस वर्ष तुरुंगात आहे, फक्त आपल्या मित्राने मागितले म्हणून दुकानातून सेल आणून दिले या 'गुन्ह्यात'. त्या मित्राने त्या सेलचा उपयोग बॉम्ब बनवण्यात केला म्हणून. आता पेरारीवलनला त्या सेलचा उपयोग कशात होणार आहे हे खरंच माहीत नव्हतं का या मुद्द्यावर वाद होऊ शकतो, पण त्याला संशयाचा फायदा देता आला असता जो दिला गेला नाही हे ही खरंच आहे.

त्याच राजीव गांधींच्या मुलीने आज पर्यावरण कार्यकर्ती म्हणवून घेणाऱ्या दिशा रवीला अटक केली या घटनेचा निषेध केला आहे ― कारण ती 'फक्त' २१ वर्षांची आहे म्हणून. पेरारीवलनला माहीतही नव्हतं की तो दुकानात जाऊन जे सेल विकत घेतो आहे त्यांचा उपयोग बॉम्ब बनवण्यात होणार आहे ते. पण, पण, पण, दिशा रवीला हे पूर्णपणे ठाऊक होतं की ती जे #toolkit संपादित करत आहे, त्यातले दोष दूर करून पुढे पाठवत आहे, त्याचा उपयोग पुढे देशात शांतताभंग करून देश अस्थिर करायला होणार आहे. दिशा रवी आणि ग्रेटाच्या चॅटमध्ये दिशा सरळ म्हणते की त्यांच्यावर यूएपीए लागू शकतो, वकिलांशी बोलून घेते वगैरे! म्हणजे चुकीचं काम करते आहे हे तिला माहिती होतं. 

गांधी परिवाराचं हेच वैशिष्ट्य आहे. स्वतःच्या कुटुंबाबाबत काही दुर्घटना घडली तर त्यांच्याकडून वापरले जाणारे न्यायाचे मापदंड हे देशाच्या बाबतीत घडलेल्या दुःखद घटनेच्या बाबतीत त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या मापदंडांपेक्षा खूप वेगळे असतात.

आता गांधी परिवराच्या दुटप्पीपणाबाबत आणखी एक गोष्ट सांगतो. दिनांक १८ नोव्हेंबर २००८ रोजी राजीव गांधी हत्या केसमधील आणखी एक प्रमुख आरोपी नलिनीला भेटून वडिलांच्या हत्येच्या आरोपात नलिनीला वैयक्तिक पातळीवर 'माफ करत' प्रियांका गांधींनी त्या वेळी भरपूर फुटेज खाल्लं होतं. प्रियांका गांधी-वड्रांकडे फक्त शोबाजीसाठी का होईना पण नलिनीसारख्या प्रमुख आरोपीला माफ करण्यामागे काय अजेंडा होता तो त्या आणि त्यांची मम्मी जाणे, पण फक्त मित्राला बॅटऱ्या आणून दिल्या म्हणून गेली तीस वर्ष तुरुंगात खितपत पडलेला पेरारीवलन त्यांच्या खिजगणतीतही नव्हता ही बाबही गांधी कुटुंबाच्या स्वभावाच्या टूलकिटचे व्यवच्छेदक लक्षणच म्हणावे लागेल.

📖 मंदार दिलीप जोशी


Friday, September 25, 2020

तुम्हीही जेक गार्डनर

जेक Gardner ही व्यक्ती कोण होती? तुम्हाला त्याचं नाव माहीत असणं का आवश्यक आहे? 

जेक गार्डनरचा अमेरिकेतील ओमाहामध्ये एक बार होता. मे महिन्यात एकदा त्याच्या बार मध्ये ब्लॅक लाईवज मॅटर (Black Lives Matter) वाले घुसले आणि नासधूस करायला सुरुवात केली. त्याच्या वडिलांना त्यांनी मारहाण केली. 

तो मागच्या खोलीतून बाहेर आला आणि ओरडून सांगितलं की आत्ताच्या आत्ता थांबा आणि चालते व्हा. लोकांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्याने खिशातून पिस्तुल काढली आणि हवेत दोन बार उडवले. आता लोकांनी त्याला खाली पाडलं. तो ओरडू लागला की मला सोडा, मला सोडा. आता जीवावर बेतणार असं वाटल्याने त्याने त्याला खाली पाडून दाबणाऱ्या एकावर गोळी झाडली, त्यात तो माणूस मेला.

CCTV मध्ये पूर्ण घटना चलचित्रमुद्रित झाली होती. पब्लिक प्रोसिक्युटरने ते पाहून निर्णय घेतला की जेकने स्वसंरक्षणार्थ गोळी चालवली असल्याने केस होऊ शकत नाही.



BLM वाल्यांनी बोंबाबोंब केली आणि एक नवाच प्रोसिक्युटर आणला गेला. त्याने एका न्यायाधीशाकडून जेकच्या अटक वॉरंटवर सही करून घेतली.

जेकने गेल्या आठवड्यात आत्महत्या केली.


जेकने कायदेशीर कारवाईत त्याला लोकांकडून पैशाची मदत व्हावी  म्हणून GoFundMe वर खातं  उघडलं होतं, जे BLM वाल्यांनी बंद करायला लावलं. 

तुम्ही तुमचा जीव देऊन सुद्धा डाव्यांचं समाधान करू शकत नाही.

एकदा स्वतःलाच पीडित घोषित करायचं म्हणजे सहानुभूती मिळते, आणि डावे म्हणतात की जे पीडित असतात त्यांना कायदा पाळायची गरज नसते. हे तुम्ही मान्य केलेलं आहे. (उदा. गरीब बिचारा भाडेकरू, कुठे जाईल)

डावे म्हणतात तुम्हाला तुमच्या संपत्तीचं रक्षण करायचा अधिकार नाही, हे तुम्ही मान्य केलेलं आहे. (कारखाना जाळला कामगारांनी, पण शोषक आहे कारखाना मालक!).

आता डावे म्हणू लागलेले आहेत की त्यांच्यातल्या पीडितांनी तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला तुमच्या जीवाचं रक्षण करायचाही अधिकार नाही. 

आणि त्यांच्या मते पीडित कोण आहेत? ज्यांना त्यांनी पीडित असल्याचं सर्टिफिकेट वाटलं आहे ते.

दंगलखोर, अतिरेकी यांना कायदेशीर पाठबळ देण्यासाठी पैसे कुठून येणार? तर तुमच्या खिशात हात घालून तुमच्या कष्टाच्या कमाईतून दिलेल्या करांवर डल्ला मारून. पण तुम्हाला कायदेशीर मदत लागली त्यासाठी तुम्ही लोकांकडून दानमार्गाने पैसे गोळा करायचे ठरवलेत तर तुम्हाला ते ही करू दिलं जाणार नाही.

तुम्ही तुमची नैतिकता इतरांना ठरवू दिलीत, तर तर तुमची जीवनकथा एक दिवस तुमचा नरबळी घेऊनच संपेल हे नक्की. 

वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे कायदे ही व्यवस्था तुम्ही मान्य केलीत, तर 'त्यांना' हवा म्हणून तुमच्याविरुद्ध काय कायदा निर्माण होईल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. 

मागे घरकाम करणार्‍या एका बाईंचा व्हिडीओ फिरत होता, ज्यात तिला तीन पाचशेच्या नोटा म्हणजे पंधराशे हे कळत होतं, पण वर तीनशे म्हणजे एकूण अठराशे हे कळत नव्हतं म्हणे. त्या व्हिडिओत ती सरळ सरळ जास्त पैसे उकळायला बघत होती, आणखी पाचशे असं काहीतरी म्हणत. त्या बाईबद्दल अनेकांना सहानुभूतीचा पुळका आला  होता. तो व्हिडिओ खरा असेल आणि त्या बाईंची कटकट बंद व्हावी म्हणून त्या तरुणांनी तिला अठराशे पेक्षा एक रुपयाही जास्त दिला असेल, तर त्यांनी उद्या आपल्या सगळ्या संपत्तीवर पाणी सोडायला तयार रहावं.

कारण वामपंथ हा एक असा साप आहे की ज्याला कितीही दूध पाजलंत तरी तो एक दिवस तुम्हाला डसणारच आहे, गिळणारच आहे. 

If you are not ready to surrender everything, do not surrender anything.

आता तुम्हाला जेक गार्डनरचं नाव ठावूक असणं का आवश्यक आहे?

कारण तुम्हीही जेक गार्डनर आहात.

🖋️ मंदार दिलीप जोशी
अश्विन शु. ९, शके १९४२


Monday, August 17, 2020

बॉलिवुडचे तरुण(!) 'तुर्क', काँग्रेस, आणि आंतरराष्ट्रीय लागेबांधे

आज आमिर खान सबंधातली एक बातमी वाचली आणि गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर मधली एक बातमी आठवली.

काँग्रेस पक्ष अर्थात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने तुर्कस्थानात इस्तंबुल इथं आपलं एक कार्यालय उघडल्याची ती बातमी होती. ही माहिती 'इंडियन ओव्हरसीज काँग्रेस' नावाच्या गटातर्फे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे तुर्कीश माध्यमांना देण्यात आली. 'इंडियन ओव्हरसीज काँग्रेस' हा भारताबाहेर राहणाऱ्या काँग्रेस समर्थकांचा एक गट आहे आणि पूर्वी स्व. राजीव गांधींचे खास असलेले आणि आताच राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू निकटवर्तीय 'हुआ तो हुआ' फेम सॅम पित्रोदा ह्या गटाचे अध्यक्ष आहेत. या कार्यालयाची धुरा मोहोम्मद युसूफ खान नामक एक इसम सांभाळेल. काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेल्या या मोहोम्मद युसूफ खान या व्यक्तीबद्दल मात्र आंतरजालावर फारशी माहिती मिळत नाही.


हे कार्यालय उघडण्यामागे काँग्रेस पक्षाचा हेतू सांगताना प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं की भारत व तुर्कस्थान यांच्यातले द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत व्हावेत या करता काँग्रेस पक्षाने हा पुढाकार घेतला आहे. यातली गोम अशी की असं करण्याचा राजमार्ग अर्थात भारतीय सरकारची अधिकृत वकीलात तिथे असताना काँग्रेस पक्षाचे आंतरराष्ट्रीय पिल्लू असलेल्या इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या या कार्यालयाचं औचित्य काय?

काही तथ्ये लक्षात घेतली तर काँग्रेस पक्षाची ही कृती किती धोकादायक आहे हे लक्षात येईल. तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांना इस्लामी जगताचा खलिफा बनण्याची सुरवातीपासूनक्सह स्वप्न पडत आली आहेत आणि त्यांनी तुर्कस्थानला मजहबी कट्टरतेच्या दिशेने नेण्यात एकही कसर बाकी ठेवलेली नाही. तुर्कस्थानचे पहिले राष्ट्राध्यक्ष केमाल पाशा अतातुर्क यांनी केलेल्या सुधारणांच्या बरोबर उलट दिशेला तुर्कस्थानला नेण्याचा त्यांनी चंगच बांधलेला आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये काश्मीरातून कलम ३७० निष्प्रभ केल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने बहुसंख्येने हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत योग्य विधाने केली. मात्र राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांच्या नेतृत्वाखालील तुर्कस्थानने मात्र भारताला या मुद्द्यावर विरोध केला.

राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांची ही पहिलीच खोडी नव्हती. या आधी २०१७ साली एप्रिल ३० ते १ मे या कालावधीत भारत दौऱ्यावर असताना काश्मीर प्रश्नावर बहुपक्षीय चर्चा व्हावी असे विधान करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. यात लक्षणीय बाब अशी की २००२ साली राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळताना मात्र त्यांनी काश्मीर प्रश्न शिमला कराराअनुसार द्विपक्षीय चर्चेनेच सोडवला जावा अशी भूमिका घेतली होती. अर्थात पाकिस्तान ज्याप्रमाणे काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पटलावर मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो त्याच प्रमाणे तुर्कस्थानच्या ग्रीसशी असलेल्या वादात ग्रीस सायप्रस बाबत तेच करत असतो ही पार्श्वभूमी त्या भूमिकेमागे होती. पण हा यु टर्न भारतासाठी आश्चर्यकारक असल्याने त्यावेळी भारताकडून या विधानाचा स्पष्ट शब्दात निषेध नोंदवण्यात आला होता व काश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय मामला असल्याचे भारताने ठामपणे पुन्हा सांगितले होते.

अवांतर: याच दौऱ्यात एर्डोगन महाशयांना जामिया मिलिया इस्लामीया विद्यापीठातर्फे मानद पदवी प्रदान करण्यात आली, आणि तेव्हा त्यांनी तुर्कीश भाषेत भाषण केले होते.

इतर इस्लामिक देश - जरा सुधारणा करतो - अनेक अरब देश राष्ट्रहिताकडे डोळा ठेऊन भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यास प्राधान्य देत असताना इस्लामी जगताचे नेतृव करण्याची स्वप्ने बघणारा तुर्कस्थान आणि पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खानने शब्द टाकला म्हणून इस्लामी जिहादी विचार पसरवणाऱ्या झाकीर नाईकला आश्रय देणारा मलेशिया हे मजहबी कट्टरतेकडे झुकलेले देश मात्र काश्मीर प्रश्नावर सातत्याने इस्लामी दहशतवादाचा कारखाना असलेल्या पाकिस्तानला पाठिंबा देताना दिसतात.  हाच झाकीर नाईक राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांची उघडपणे इस्लामची तळी उचलल्या बद्दल तोंड फाटेस्तोवर स्तुती करतो.आता तुर्कस्थान, मलेशिया आणि पाकिस्तानच्या महाआघाडीत आता ओमानही आपली सुन्नी कट्टरता पोसायला सामील झाला आहे. राजकीय पाठिंबा इथवर ही गोष्ट थांबत नाही. भारताने एर्डोगन पाठिंबा सेट असलेल्या टर्किश संघटनांकडून काश्मीर व केरळमधल्या कट्टरतावादी इस्लामी संघटनांना पुरवला जाणारा पैसा या बाबतीत अनेकदा निषेध नोंदवलेला आहे.

अवांतर: हे लिहीत असतानाच अरब देश भारताशी मित्रत्वाचे संबंध ठेवण्यास उत्सुक आहेत हे दर्शवणारी एक आश्वासक बातमी आली. बहारीनमध्ये गणपतीच्या मूर्तीची नासधूस केल्याच्या आरोपावरुन एका बुरखाधारी महिलेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. एर्डोगन मजहबी कट्टरतेची खुर्ची आपल्याकडे खेचून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न का करत आहे हे देखील अशा घटनांतून मिळणार्‍या संकेतांमधून  कळते. 

या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने तुर्कस्थानात आपलं कार्यालय उघडणं हे निव्वळ संशयास्पदच ठरत नाही तर सरळ सरळ देशविरोधी भूमिका ठरते. पण मनमोहन सिंग पंतप्रधान आणि प्रत्यक्षात घटनाबाह्य सत्ताकेंद्र सोनिया गांधी अशी व्यवस्था राबवणाऱ्या काँग्रेसने अधिकृत भारतीय वकीलात असताना त्याला वळसा घालून वेगळं कार्यालय उघडण्यात खरं तर काहीच आश्चर्य नव्हे. कायम भारताच्या हिताला बाधा पोहोचेल अशी विधाने व कृती करणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून ऑटोमन साम्राज्याच्या दिशेने जायची इच्छा बाळगणाऱ्या मजहबी कट्टर एर्डोगन यांच्या देशात वेगळे कार्यालय उघडणे हे काँग्रेसच्या बाबतीत नैसर्गिकच म्हणायला हवे.

अवांतर: २०१९ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७४व्या सर्वसाधारण सभेच्या वेळी न्यू यॉर्क पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान, मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद आणि आपले उत्सवमूर्ती एर्डोगन हे भेटले आणि या भेटीत त्यांच्यात 'इस्लामोफोबिया' शी लढायला एक टीव्ही चॅनल सुरू करण्यावर एकमत झालं.

आता आमिर खानच्या बातमीकडे वळूया.

बॉलिवूड आणि त्याला पोसणाऱ्या पाकिस्तानी अंडरवर्ल्डचे संबंध आता काही गुपित राहिलेले नाहीत. तथापि इतर कट्टर मजहबी देश आणि बॉलिवूड यांच्यातल्या संबंधांबाबत फारशी माहिती उजेडात येत नाही. गेलाबाजार पीके सिनेमात भगवान शंकरांच्या बाबतीत खोडसाळपणा करणाऱ्या, हिंदू देवळांच्या बाबतीत डोस पाजणारा, आणि एकंदर हिंदू धर्माबद्दल यथेच्छ गरळ ओकणारा आमिर खान हज यात्रेला जाऊन तिथे विविध देशातील मौलवींची गळाभेट घेताना फोटो चमकवतो त्याला प्रसिद्धी मिळते, पण ते तेवढंच. न्यू इअर पार्टी करून साजरे करण्याचे खूळ भारतात पुरेपुर असताना एकेकाळी उदारमतवादी व प्रगत होऊ बघणारा तुर्कस्थान हा बॉलिवुडमधल्या मंडळींच्या आवडत्या देशांपैकी एक देश आहे. आजही तिथे अनेक नाईटक्लब आहेत. अशाच एका नाईटक्लबात ख्रिस्ती नवीन वर्षाच्या स्वागत पार्टीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात झालेल्या गोळीबारात बॉलिवूडचे चित्रपट निर्माते अबिस रिझवी आणि त्यांची मैत्रीण खुशी शहा हे मृत्युमुखी पडल्याचे वृत्त वाचलं आणि पहिल्यांदा बॉलिवूडच्या टर्किश कनेक्शनकडे लक्ष गेलं.

तर आमिर खान सबंधातली ती बातमी कोणती? तर फॉरेस्ट गम्प या टॉम हँक्स अभिनित हॉलिवूडच्या प्रसिद्ध चित्रपटाची नक्कल असलेल्या लालसिंग चढ्ढा या आपल्या सिनेमाचे शेवटचे काही चित्रीकरण आटपण्यासाठी आमिर खान तुर्कस्थानात होता. ही संधी साधत आमिरने १५ ऑगस्ट रोजी आपली द्वितीय हिंदू पत्नी किरण राव हिच्यासह राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांची पत्नी इमिन एर्डोगन यांची हुबेर मॅन्शन या त्यांच्या अध्यक्षीय प्रासादात भेट घेतली. आपल्या पानी फाउंडेशन या आपल्या एनजीओच्या दुष्काळ निवारण व पाणी संवर्धनाच्या क्षेत्रातल्या कामाची माहिती देण्यासाठी ही भेट होती असे समजते. श्रीमती एर्डोगन यांनी आमिर खानची तो आपल्या चित्रपटांमधून 'सामाजिक प्रश्नांची' धाडसी मांडणी [courageous handling of social problems] (!) केल्याबद्दल स्तुती केली.

ही भेट इथली साधी सरळ असणार असे समजण्याचे काहीच कारण नाही. कारण आपल्या नव-ऑटोमन धोरणानुसार चालणाऱ्या तुर्कस्थानने दक्षिण आशियातल्या मुसलमानांत आपला प्रभाव वाढवायला सुरवात केली आहे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष एर्डोगन हे स्वतःला गैर-अरब इस्लामी जगताचा खलिफा किंवा सम्राट म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. याच धोरणाचा भाग म्हणून मलेशिया आणि पाकिस्तानशी संधान बांधलं असून या देशांच्या मदतीने दक्षिण आशिया व प्रामुख्याने भारतीय मुसलमानांना लक्ष्य करून तिथं आपलं कट्टर इस्लामी प्रभावक्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमिर खान व एर्डोगन पत्नीची भेट ही या परिप्रेक्ष्यात बघितली पाहिजे.

एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा अशीच परिस्थिती या खानावळीची असली तरी पाकिस्तानला गुड नेबर अर्थात चांगला शेजारी म्हणणारा शाहरुख खान आणि उघड गुंडासारखी वागणूक ठेऊन ती झाकायला बिइंग ह्युमन काढणारा हरणमाऱ्या सलमान खान यांच्यापेक्षा भारतीयांच्याच जीवावर कोट्यवधी कमावून मग २०१५ साली बायकोला भारतात असुरक्षित वाटतं असं साळसूद विधान करणारा आणि दक्षिण आशियाई देशांत इस्लामी कट्टरतेचा प्रभाव वाढवू बघणाऱ्या एर्डोगन यांच्या पत्नीची भेट घेणारा आमिर खान हा जास्त धोकादायक वाटतो.

ही सगळी माहिती आणि बातम्या अर्थातच उघड आहेत, म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये आहेत, तरी राष्ट्रीय महत्वाच्या प्रश्नांपेक्षा बॉलिवूडच्या चाळ्यांना अधिक प्राधान्य देणाऱ्या जनतेला त्याचं महत्व आणि धोक्याची जाणीव झालेली दिसत नाही. आज एका नटाच्या संशयास्पद मृत्यूने पेटून उठणाऱ्या त्याच्या चाहत्यांनी आणि तो कोण होता याची अचानक जाणीव झालेल्या इतरांनी बॉलिवूडमधली घराणेशाही, नेपोटीझम, वगैरेंत यथेच्छ डुंबून झाल्यावर त्याच्याकडे कसलेसे स्वामित्व हक्क म्हणजेच पेटंट होते आणि ते चोरले गेले वगैरे जागृती आली. हे प्रकरण आणि जे या मृत्यूस कारणीभूत ठरले आहेत किंवा यात गुंतले आहेत असे जे आरोप होत आहेत ते बघता एक-दोन संशयास्पद मृत्यू आणि बॉलिवूडच्या ताऱ्यांचा पाकिस्तानी अंडरवर्ल्डशी संबंध इतका आपल्या माहितीचा परीघ मर्यादित न ठेवता देशविरोधी शक्तींशी बॉलिवूडचे आंतरराष्ट्रीय संबंध या विरोधात व्यापक जनजागृती होण्याची आवश्यकता आहे.

या परिप्रेक्ष्यात बघितल्यास काँग्रेस पक्षाचे तुर्कस्थानात वेगळे कार्यालय उघडणे आणि तुर्कस्थानच्या मजहबी कट्टर राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीशी आमिर खानच्या अहो रुपम अहो ध्वनी थाटाच्या गप्पा या एकटीदुकटी घटना उरत नाही, तर एका मोठ्या सुनियोजित आणि दीर्घकाळ चालणाऱ्या भारत आणि हिंदूद्वेषी राजकारणाचा एक भाग असल्याचं स्पष्ट होतं.

मात्र काँग्रेसच्या वळचणीला जाणाऱ्या नवनिधर्मांध पक्षांच्या लक्षात हे दुवे आलेले तरी दिसत नाहीत किंवा लक्षात येऊनही दुर्लक्ष केलं जातं आहे. ही बाब अशा पक्षांच्या अस्तित्वासाठी ही धोक्याची घंटा आहे हे नक्की. पण तो विषय वेगळा. 

चीनी व्हायरसमुळे उद्भवलेल्या नव्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज अनेक लोक अनावश्यक गोष्टींचा त्याग करत असताना आपणही अशी यादी तयार करून अशा अनावश्यकच नव्हे तर राष्ट्रविघातक गोष्टींना अंगावर बसलेल्या माशीप्रमाणे झटकून टाकणे आणि शक्य झाल्यास ठेचणे आवश्यक आहे.

© मंदार दिलीप जोशी
श्रावण कृ १३, शके १९४२