Friday, April 1, 2022

खर्रा इतिहास: अकबरानेच लावला होता एक एप्रिलचा शोध, कहाणी ऐकून व्हाल थक्क

 म. ज. अकबर सर तरुण असताना एकदा बागेत फिरायला गेले. फिरत असताना त्यांना एक युवती त्यांच्या दृष्टोतपत्तीस पडली. तिच्या सौंदर्याने ते मोहित झाले आणि येऊन बादशहा जिल्लेइलाही हुमायूं यांना म्हणाले की हिला उचलू का? 

बादशहा जिल्लेइलाही जहांगीर यांनी लहानग्या जलालुद्दीनला समजावले की बाळा आधी प्रेमाने मागणी घालून पाहू, नाहीच ऐकलं तर उचलायची तयारी आहेच! मग मुघल बादशहांच्या शेहजाद्यांना शोभेल असे एक शिष्टमंडळ तयार करण्यात आले आणि जडजवाहीर, पैसे वगैरे घेऊन मुलीकडे पोहोचले. मुलीला ही सोयरिक मान्य नव्हती पण तिच्या भावाने म्हटलं तू आत्ता राडे करु नको आपण आधी मिळतंय ते पदरात पाडून घेऊ बाकी मी बघतो. "हमारी एक अट हय!" भाऊ शिष्टमंडळाच्या प्रमुखाला म्हणाला. आता हा ऐन वेळी नको म्हणाला तर काय करायचं या विचाराने शिष्टमंडळातल्या जेष्ठ दाढीच्या हृदयाचा ठोका चुकला. बादशहा याचं जे काही करायचं ते करतील पण आधी आपलीच पाळी यायची. तो म्हणाला "ते प्री-वेडिंग शूट वगैरे काही होणार नाही. जे काही शूटींग करायचं ते निकाह नंतर शहजाद्याला करु दे. आधी काही जमायचं नाही." 



"अश्लील! अश्लील!!" शिष्टमंडळात गदारोळ झाला. "अरे क्या हुआ, उसमें क्या अश्लील हय? मैने बोला वो कॅमेरामन को लेकर झाड को लटकनेका प्री-वेडिंग करते हैं ना वो नहीं करनेका. थेट शादी में मिलेंगे". आता कुठे जेष्ठ दाढीचे फुदकणारे हृदय जागेवर बसले. मुलीच्या भावाने घातलेली अट अगदीच सौम्य होती. 

होता होता निकाहचा दिवस उजाडला. इकडे शहजदा जलालुद्दीनला मनातल्या मनात गुदगुला होत होत्या. अखेर पलीकडच्या दालनातून विचारणा करणारा आवाज ऐकू आला, "बेटी क्या तुम्हे शहजादा अकबर वल्द बादशहा जिल्लेइलाही हुमायूं वल्द बादशहा जिल्लेइलाही बाबर से निकाह कबूल है?" याच्या उत्तरादाखल मंजुळ आवाजात "हां, कबूल है" असा आवाज येताच अकबराला भावना आवरेनात. पण निकाह नंतर आम्ही तुम्हाला दख्खनमध्ये फिरायला पाठवू तोवर सबर करा असं बादशहा शहनशहा-ए-आलम जिल्लेइलाही हुमायूं सर म्हणाले. त्या अनुसार दख्खनमध्ये असलेल्या बंगल्यावर दोघांना पाठवण्यात आले. निकाह झाल्यावर मुलाला व नवरीला फिरायला पाठवण्याची कल्पना बादशहा हुमायूं सरांचीच. हुमायूं सरांनी आपल्या बेगमला  खिडकीतून चांद दाखवला होता तेव्हापासून हुमायूं नावाचा हनीमून असा अपभ्रंस झाला. (हे अ‍ॅडिशनल ज्ञान ठेऊन घ्या).

पहिल्याच रात्री घुंघट उचलल्यावर तरुण शहजादा जलालुद्दीन जोरात किंचाळला. समोर जलालुद्दीन ने उद्यानात बघितलेली मुलगी नसून भलतीच कुणीतरी आणा कयूब नावाची वेडसर, मुलगी होती. जलालुद्दीनला गुस्सा आला आणि वेडाच्या भरात "शोधा, शोधा, त्या मुलीला शोधा" असं म्हणाला. पण त्या मुलीचा परिवार तोवर सगळा पैसाअडका घेऊन भारताबाहेर कधीच पसार झाला होता! मग हुमायूं सर म्हणाले, की पदरी पडलं पाक झालं समजून हिला नांदव. आपण सुंदर मुली काय असल्या सत्तावन्न शोधू. शेवटी शहजादा अकबर शांत झाला, पण पुढे बराच काळ तो रात्रीत "शोधा, शोधा" बडबडत असे. म्हणून त्या मुलीचे नाव रंगेबिरंगी इतिहासात "शोधा अकबर" म्हणून प्रसिद्ध झाले.

ज्या दिवशी आपण उल्लू बनल्याचे अकबराच्या लक्षात आले तो दिवस एक एप्रिलचा होता. आपण एकटेच का फूल व्हावे, समस्त हिंदूस्थान आणि जगाने एक दिवस का होईना फूल व्हावे म्हणून एक एप्रिल हा दिवस फूल्स डे म्हणून साजरा करण्याचे शाही फर्मानानुसार जाहीर झाले. 

पण संघी चड्डीवाले हा इतिहास तुम्हाला सांगणार नाहीत. 

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ४२०, ओळ ५

© मंदार दिलीप जोशी


Thursday, March 31, 2022

वाहवत जाण्याआधी - १: ऑस्करचा फज्जा

तर मेहेरबान, ऑस्करचे कदरदान, आणि ईमोशनल साहिबान,

थोडक्यात पार्श्वभूमी अशी की ऑस्कर सोहळ्यात क्रिस रॉकने विल स्मिथच्या बायकोच्या केसांवरुन एक विनोद केला आणि मग विल स्मिथने स्टेजवर जाऊन क्रिसला ठोसा मारला. हे झाल्या झाल्या अखिल सेंटीमेंटल जगताला पान्हा फुटला आणि या गोष्टींवर चर्चा लगेचच सुरु झाल्या: (१) विल स्मिथभोवती बायकोच्या सन्मान रक्षणार्थ दिवे ओवाळणे [बघा शिका काहीतरी असे टोमणे बोनस म्हणून] (२) कशावरही विनोद करता काय, मग अस्संच पाहीजे बरी अद्दल घडली छाप पोस्ट आणि ट्विट (३) मिसेस स्मिथ यांना असलेला आणि केस गळण्यासाठी/कापण्यासाठी कारणीभूत ठरलेला अ‍ॅलोपेसिया एरेटा नामक रोग. 

ज्यांना स्त्री सन्मान वगैरे वगैरे वरुन फार पुळका आलेला होता त्यांच्यासाठी प्रामुख्याने ही पोस्ट आहे, आणि इतरांसाठीही. इथे मी मिस्टर व मिसेस स्मिथ यांचे खाजगी आयुष्य, त्यांचे लग्न, लफडी यात अजिबात जात नाहीये. काही संवेदनशील भावनिक मुद्दे (Emotional trigger points) असतात. त्यात 'स्त्रियांचा सन्मान' म्हटलं की खेळण्याला चावी दिल्यागत सगळ्यांचे व्हर्च्युअल अश्रू वाहायला लागतात तसे ते इथेही वाहू लागले. म्हणूनच म्हणतो, विल स्मिथने हे बायकोच्या सन्मानाच्या रक्षणासाठी उत्स्फूर्तपणे केलं आणि सगळं खरोखरच घडलं असं मनापासून वाटणाऱ्यांना साष्टांग दंडवत आहे. दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ. 

गेली अनेक वर्ष ऑस्कर सोहळा हा गोरे विरुद्ध काळे, मग ट्रम्प विरुद्ध बाकी सगळे या Wokeपणा आणि भंपकपणाने ओसंडून वाहत असल्याने तो सोहळा बघणं सोडून कित्येक वर्ष झाली. म्हणूनच ऑस्कर सोहळा कधी आहे वगैरे माझ्या गावीही नसतं तसं यंदाही नव्हतं. या वर्षी ठोसा कांड झाल्याने विलने क्रिसला मारलेल्या ठोशाचे फोटो आणि त्यावरच्या भावनिक भाष्याने ओथंबून वाहणार्‍या पोस्ट सगळीकडे दिसू लागल्याने सगळे कळलं की आज ऑस्कर सोहळा आहे म्हणजे तेव्हा, २७ मार्चला होता. मात्र सिनेक्षेत्राचा नीचपणा ठावूक असल्याने आणि अशा गोष्टींच्या बाबतीत 'लॉजिकल' विचार करायला शिकल्याने हा स्टंट आहे हे लगेच लक्षात आलं होतं पण कारण हे ऑस्करची घटती लोकप्रियता असावं असं आधी वाटलं. नंतर एकाने आणखी एक कारण सांगितलं आणि ते जास्त संयुक्तिक वाटलं. आज तर त्याचे पुरावेच मिळाले. कारण कोणतं ते सोबतच्या चित्रांतून दिसेलच, त्यामुळे वेगळं सांगायला नको.

क्रिस रॉकला ठोसा मारल्यावर कळवळायच्या ऐवजी तो अजिबात न बिचकता पुढे डायलॉगबाजी पण करतो (याला लोकांनी अभिनय म्हटलं, पण खरा ठोसा खाल्ल्यावर काय होतं ते अमिताभ बच्चनला जाऊन विचारा), त्यामुळे खरं तर सिनेमा ऐवजी याच सीनला ऑस्कर द्यायला हवा होता.

तर मेहेरबान, ऑस्करचे कदरदान, आणि ईमोशनल साहिबान पेश है अनेकांच्या फुग्याला टाचणी. यातल्या दोन लिंक म्हणजे फायझरची स्वतःची त्यांच्याच संकेतस्थळावरची प्रेस रिलीज आहे आणि दुसरी एक ट्विट आहे.

पुन्हा ठळक मुद्दे देतो:
(१) फायझर ट्रायल घेत असलेले एक औषध अ‍ॅलोपेसिया एरेटाच्या औषधोपचारांसाठी असणे

















(२) फायझर ऑस्करच्या स्पॉन्सर्स पैकी एक असणे




(३) क्रिस रॉकने विल स्मिथच्या बायकोच्या केसांवरुन एक अप्रत्यक्ष विनोद करणे

(४) मग विल स्मिथने क्रिसला ठोसा मारणे (क्रिस अजिबात न कळवळणे वगैरे पुनरुक्ती करत नाही)


(५) नेमकं विल स्मिथच्या बायकोला अ‍ॅलोपेसिया एरेटा असणे आणि त्यावर समाजमध्यमांवर भावनिक पूर येणे

© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु. चतुर्दशी, शके १९४३


ता.क. कुठल्याही रोगाचा अशा रीतीने जाहीर वापर करुन घेणार्‍या हॉलीवूड आणि फायझरसकट सर्व संबंधितांना माझा सविनय आक् थू!

Sunday, March 20, 2022

काश्मीर फाईल्स ― एक अचर्चित मुद्दा














काश्मीर फाईल्स में सबसे महत्वपूर्ण संवाद क्या है? थोडा स्पेसिफिक पूछता हूं, काश्मीर फाईल्स में प्रोफेसर राधिका मेनन के हिस्से का सबसे महत्वपूर्ण संवाद क्या है?

यदि आप कहेंगे की "सरकार उनकी है पर सिस्टम तो हमारा है!" यह डायलॉग सबसे महत्वपूर्ण है तो आप सत्य से पृथक बात नहीं कर रहे. किंतु मुझे कुछ दूसरी बात इंगित करनी है.

चलीये आप उत्तर दें इससे पहले मैं कुछ कहता हूं. 

हम पाठशाला में हो, महाविद्यालय में हो अथवा किसीं बिझनेस स्कूल में हो, शिक्षकों का स्थान हमारे मातापिता के समकक्ष होता है. हम उन्हे सदैव सर, मॅडम, टीचर, प्रोफेसर कहके पुकारते हैं. 

JNU या कहीं भी, गांव से युवक आते हैं जिन्होने अपने आसपास कभी लडकियो से खुलकर बात नहीं की, कभी मिश्र ग्रूप में सोशलाईझ नहीं किया, उसे एक ४० के आसपास की 'ओल्ड वाईन' कॅटेगरी में आनेवाली, खुले बालवाली, husky आवाजवाली महिला, जो एक कॉलेज में प्रोफेसर है जब उसका स्टुडेंट उसे "प्रोफेसर" कहके संबोधित करता है, तो वो एक विशिष्ट seducing आवाज में कहती है कि, 

"Please, call me Radhika".

अब बताईए, काश्मीर फाईल्स में प्रोफेसर राधिका मेनन के हिस्से का सबसे महत्वपूर्ण संवाद क्या है? जी, "Please, call me Radhika".

लिबरंडू तथा बडी बिंदी गँग का युवकों को अपने चंगुल में फ़ंसाये रखने का एक प्रयोगसिद्ध आयडिया. नजदिकी बढाने का पैतरा.

© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन पौर्णिमा, होळी

Tuesday, March 15, 2022

हम देखेंगे

अनिवार्य है की हम भी देखेंगे

जो ईश्वर वचन देता है
जो वेद पुराणो का रचयिता है

जब अत्याचारों के मेघ
रूई की भांति उड़ जाएँगे
हम भक्तो के पाँव-तले
जब धरती धड़-धड़ धड़केगी
तथा आतंकीयों के शीर्षपर
जब बिजली कड़-कड़ कड़केगी

जब पापीयों के ताबे से
सब मंदिर छुडवाये जाएँगे
सब पवित्रता के शिष्यगण
सिंहासन पे बिठाए जाएँगे 

सब 'ताज' खोले जाएँगे
सब मदमत्त गिराए जाएँगे
बस नाम रहेगा रामलल्ला का
उपस्थित है जो अयोध्या में
जो न्यायी भी है द्रष्टा भी

उठ्ठेगा तत्वमसि का उद्घोष
जो मैं भी हूँ और तुम भी हो
और राज़ करेंगे सनातनी
जो मैं भी हूँ और तुम भी हो

© मंदार दिलीप जोशी
माघ द्वादशी, शके १९४३



Wednesday, February 23, 2022

वाचनप्रेमी तालिबान - लोकशाहीचा मार्ग पुस्तकातून: एक छापण्याआधीच मागे घेतलेला एक लघु अग्रलेख किंवा संपादकांचे मनोगत

तालिबान म्हणजे विद्यार्थी असे आम्ही म्हणालो होतो तेव्हा अमानुष बहुमताने निवडून आलेल्या सद्ध्याच्या राज्यकर्त्यांच्या समस्त पाठीराख्यांनी आमच्यावर जहरी टीका केली होती. पाठीराखे हा शब्द आम्ही विचारपूर्वक वापरला त्यास कारण की भक्त शब्द वापरला तर भलतीच नामुष्की ओढवण्याची भीती. मागे घेतला तरी ते आपल्याला विसरू देत नाहीत. अग्रलेख विसरू देत नाहीत तर एखादा शब्द विसरू देण्याची शक्यता अंमळ धूसरच.

Reader Taliban

तर विषय असा की हातात बंदुका आहेत आणि त्यात हजार लानते पाठविण्यालायक गोळ्याही आहेत, आणि ज्या प्रमाणे नागपूरवरून आदेश येताच शाखांत अंमलबजावणी होते त्याच प्रमाणे वरिष्ठांचे आदेश येताच धार्मिक शिस्तीची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज असलेले हे शस्त्रसज्ज योद्धे कार्यतत्परही आहेत. मात्र, असे असतानाही आपल्या ज्ञानप्राप्तीच्या लालसेचे दमन न करता मिळालेल्या अल्प फावल्या वेळात, म्हणजे शिस्तीची अंमलबजावणी करताना डोकी उडविण्यापासून फुरसत मिळताच, वाचनालयात जाऊन स्वतःचे डोके मात्र पुस्तकात खुपसण्याची संधी सोडत नाहीत. काही खवचट लोक म्हणतीलही की हे फक्त चित्रे बघत आहेत, पण शेवटी भाषा ही चित्रांमधूनच निर्माण होते ना? आपल्या संस्कृतीत मनुष्य नेहमी विद्यार्थी असतो आणि त्याने सतत वाचन, मनन ठरत रहाणे आवश्यक आहे त्याचेच हे दुसरे रूप नव्हे काय? प्रस्तुत छायाचित्रात मागे फिरत असलेला इसम हा अशाच प्रकारे मनन करत असल्याचे आपल्याला दिसते. आपल्याला काय वाचायचे आहे हे सुद्धा विचारपूर्वकच ठरवले पाहिजे ही प्रगल्भ जाणीव त्याचे ठायी आहे हे तो आपल्या या कृतीतूनच दाखवून देत आहे. मग आपण ते आणि आपण असा भेदभाव का करावा?

पण अशा प्रकारे भेदभाव करावा असे प्रोत्साहनच सद्ध्याच्या प्रस्थापित राजवटीकडून मिळालेले दिसते. त्यातूनच मग कुणी काय पेहराव करावा इथपासून कुणी काय बोलावे हे काही मूठभर लोक ठरवू पाहतात. पण मूठभर लोकच शांततेने क्रांतीही घडवू शकतात हीच आशा आपल्याला या छायाचित्रातून दिसते. उद्या, परवा, तेरवा, पुढच्या वर्षी किंवा काही दशकांत या दोन वाचनप्रेमी जिज्ञासू युवकांसारखीच सवय आणखी काही युवकांना लागेल व संपूर्ण तालिबानी राजवट ही याच ज्ञानलालसेने रासवट शिस्तीतून बाहेर येऊन लोकशाहीवादी विचार आपल्या मनात रुजवेल अशी आम्हांस खात्री वाटते.

पुढे आपल्याकडचे मूठभर लोक सत्तेत टिकल्यास सद्ध्याच्या आपल्या प्रस्थापित राजवटीला तालिबानकडूनच अशा अभ्यासू, ज्ञानाधिष्ठित लोकशाहीची शिकवण घेण्याची वेळ आली तर मात्र त्यांच्या पाठीराख्यांच्या समाजमाध्यमांवरच्या कोलांट्याउड्या व डिलीट झालेली विचारमौत्तिके बघण्यास मात्र आपल्यासारख्या लोकशाहीप्रेमी व कन्हैया, मेवानी, व राऊत यांच्या भारतात पुरोगामी लोकांस मौज वाटणार हे निश्चित.

- पिरिष गुबेर
संपादक, ओकसत्ता

© मंदार दिलीप जोशी
माघ कृ. ४, शके १९४३







Monday, February 14, 2022

आधुनिक पंचतंत्रः चार मित्रांची गोष्ट - एक बोध कथा

लहानपणी पंचतंत्र की इसापनीतीत एक गोष्ट वाचली होती. त्या कथेची आजच्या काळासाठी सुसंगत आवृत्ती अशी:

चार पंडित मित्र गुरुंच्या आश्रमातून विद्या संपादन करुन आपल्या घरी परतत असतात. चौदा वर्ष अनेक गूढ विद्या आत्मसात केल्यानं प्रत्येकाला आपल्या ज्ञानाचा अभिमान असतो.

वाटेत एक जंगल लागतं, या जंगलाच्या पलिकडेच त्यांचं गाव असतं.

चालता चालता अचानक एकाला हाडांचा ढीग दिसतो. पहिला म्हणतो, माझ्याकडे असणाऱ्या सिध्दीनं मी ही हाडं जुळवून सापळा तयार करु शकतो, जेणेकरुन हा कोणता प्राणी आहे ते कळेल तरी.

तो मंत्र म्हणतो आणि आश्चर्य! समोर एका प्राण्याचा सापळा तयार होतो.

दुसरा म्हणतो, हे तर काहीच नाही, मी या प्राण्याला मांस आणि त्वचा देऊ शकतो. त्यानं मंत्र म्हणताच समोर साक्षात सिंह तयार होतो.

आता तिसरा म्हणतो, माझ्याकडे तुमच्यापेक्षा महान सिध्दी आहे मी त्याला जिवंत करु शकतो!

हे ऐकताच चौथा मित्र, जो सारासार विचार करत असे व वेळोवेळी योग्य सल्ले देत असे, तो हादरतो आणि त्याला तसे न करण्याबद्दल विनंती करू लागतो. उरलेले तिघे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे घोर पुरस्कर्ते असतात. ते तिसऱ्याने आपल्या प्रगाढ ज्ञानाचा व विद्येचा उपयोग करून सिंहात प्राण फुंकून त्याला जिवंत करावेच या मताचे असतात. चौथा फारच आग्रह करू लागतो तेंव्हा ते त्याला 'टोकाचा विचार करणारा', 'आततायी', 'कट्टर', 'तुझ्या मनात द्वेष आहे,' 'तालीपंडित' अशी दूषणे देतात. शेवटी तो चौथा मित्र म्हणतो, "तुम्हाला सिंहाला जिवंत करायचे तर करा, पण त्या आधी मला थोडा अवधी द्या, मी त्या समोरच्या उंच झाडावर चढून बसतो. मग याला मंत्र म्हणू दे.

पण तिघे ऐकत नाहीत. असं कसं, तुला आवरायला झालेलं आहे. इतका कट्टरपणा चांगला नाही. आम्ही सिंहाला जिवंत करताना त्याने हिंसक होऊ नये अशीही प्रार्थना करणार आहोत. त्यामुळे त्यात सहिष्णुता स्थापन होऊन तो इतर सिंहांनाही सहिष्णू बनवेल. चौथा मित्र म्हणाला, अरे असं काही नसतं, सिंह हा सिंह असतो. त्याची नैसर्गिक वृत्ती तो का सोडेल? मी काही तुम्हाला सिंहाचे तुकडे तुकडे करा असे सांगत नाही, त्याला दगड तलवारी घेऊन हाणा असे सांगत नाही, फक्त त्याला जिवंत करु नका. तरीही त्या तिघांनी त्याचं ऐकलं नाही. त्यांनी त्या चौथ्या मित्राला झाडाला बांधलं आणि म्हणाले, "बघ आमचं पांडित्य, बघ आमची विद्या, बघ आमची सहिष्णूता!"

तिसऱ्या मित्राने मंत्र म्हटला आणि सिंह जिवंत झाला. बराच काळ भुकेलेला असल्याने त्याने पटकन आधी सैरावैरा पळणाऱ्या त्या तिघा मित्रांना पकडून खाल्ले आणि मग शेवटी चौथ्या मित्रालाही गट्टम केलं.

तात्पर्य:
(१) कितीही जीव तुटत असला तरी नको तिथे शहाणपण दाखवू नका आणि मूलभूत समजूतीतच गडबड असेल, थोडक्यात बसिकमधे राडा असेल, तिथे वाद घालू नका.
(२) संधी मिळाली की पळ काढा आणि संकटापासून स्वतःला सुरक्षित ठेवा.

टीप: यात एक पाचवे पात्र पण आहे, जे तिघांतल्या कुणाचाही सारासार विचार जागृत होऊ लागल्यास मैत्री तोडण्याची धमकी देतं. आजच्या भाषेत अनफ्रेंड करेन असं सांगतं. पण त्याबद्दल पुन्हा केव्हातरी. तोवर हा व्हिडिओ बघा. मोठमोठ्या लेखांतून जमणार नाही ते जेमतेम एका मिनिटात समजावलं आहे. 


© मंदार दिलीप जोशी
माघ शुक्ल त्रयोदशी, शके १९४३