Wednesday, February 15, 2023

शूरा मी वंदिले

जर एखादा पोलीस अधिकारी कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि शूर असेल, आणि तो देशद्रोही आणि समाजकंटकांशी लढत आणि जिंकत असेल तर – त्याचं वैवाहिक जीवन सुखी असू शकत नाही - धक्का बसला? आणि शीर्षकाचा याच्याशी काय संबंध? थांबा थांबा, सांगतो. 

किमान हॉलिवूड आणि तिथून चोर्‍यामार्‍या करणारे बॉलिवूडचे आणि वेब सिरीजचे निर्माते हेच असत्य (नॅरेटिव्ह) प्रस्थापित करण्यात गुंतलेले आहेत. माझ्या आठवणीत नव्वदच्या दशकाच्या सुरवातीला आलेल्या Bruce Willis नायक असलेल्या 'Diehard' या चित्रपट मालिकेनेपासून याची सुरवात झाली. नंतर २००८ च्या आसपास आलेल्या  Liam Neeson च्या 'Taken' या सिनेमा सिरीजने या छद्मसिद्धांताला पुढे रेटण्याचं काम केलं. आणखीही चित्रपट मालिका असतीलच, पण मला ठळकपणे या दोन आठवतात इतकंच. अरे हो, हे लिहीता लिहीताच बाटला हाऊस एनकाउंटरवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटातही नायकाचं वैवाहिक आयुष्य फारसं बरं चाललेलं नसतं असं दाखवलं आहे. [त्यातल्या त्यात समाधानकारक बाब म्हणजे डाय हार्ड मालिकेच्या चौथ्या भागात ऑफिसर मक्लेन (ब्रूस विलीस) ची मुलगी जी आधी स्वतःची ओळख ल्युसी जेनेरो (Gennero - तिच्या आईचं म्हणजे हॉली हिचं आडनाव) अशी करुन देत असते तीच वडिलांनी व्हिलन आणि मंडळींचे बारा वाजवल्यावर आपलं नाव ल्युसी मक्लेन अशी करुन देते. पण तरी नॅरेटिव्ह तोच राहतो.]


नुकतीच अ‍ॅमेझॉन प्राईमवर आलेली वेब सिरीज 'फर्जी' याच विकृतीने ग्रासलेली दिसते. बुद्धीमत्ता आणि शौर्याच्या जोरावर अत्यंत ताकदवान असलेल्या माफियावर मात करणार्‍या पोलीसांचा एक गट अशी साधारण कथावस्तू आहे. यात नायक असलेल्या पोलीस अधिकार्‍याच्या र्‍हास होत चाललेल्या वैवाहिक आयुष्याबाबत एक संपूर्ण असंबद्ध अशी एक समांतर चालणारी गोष्ट आहे. या घटस्फोटाच्या प्रकरणाला मालिकेच्या कथेतून रजा दिली असती तरी तरी कथेवर काहीही परिणाम झाला नसता. 

हे सातत्याने का केलं जातं? कलात्मक स्वातंत्र्य अर्थात क्रिएटिव्ह लिबर्टी अंतर्गत कथेत मसाला घालणे हा एक तर्क होऊ शकतो, पण खरंच फक्त तेच कारण आहे का?

यावर चर्चा करत असताना दोन कारणे समोर आली. कुटूंबसंस्थेला विविध मार्गांनी नष्ट करायला डावे टपलेलेच आहेत. तसंच, डाव्यांनी व्यापलेल्या मनोरंजन क्षेत्रात त्यांचं लाडकं लक्ष्य अर्थात टार्गेट असलेली patriarchy अर्थात पितृसत्ताक पद्धती नेहमीच रडावर असते. समाजमाध्यमांत #SmashPatriarchy आणि थेट बोलता येत नाही म्हणून त्याला #SmashBrahminPatriarchy अशी दिलेली फोडणी आपण बघत असतो. आता #Patriarchyनष्ट करायची तर समाजातलं पौरुष नष्ट करणे भाग आहे. 

संगीत मानापमान नाटकातलं "शूरा मी वंदिले" या पदाकडे आपण येऊया. प्राचीन काळापासून स्त्री ही शूर पुरुषाकडे आकर्षित होते हा आपला पारंपारिक दृष्टीकोन (traditional view)आहे. काळानुसार समाजात अनेक बदल होत गेले असले तरी मूळ गाभा तोच राहिला आहे. आजही गणवेषातल्या अधिकारी व्यक्तीची पत्नी म्हणवून घेण्यात अनेकींना अभिमान वाटतो. माझ्या अनुभवांतही आपला नवरा पोलीसांत, सैन्यात, नौदलात किंवा तत्सम क्षेत्रात आहे हे सांगताना स्त्रियांच्या चेहर्‍यावर एक निराळीच चमक दिसते. 

चित्रपटांत आणि वेब सिरीजमधे अशा प्रकारची कथानके घालण्याचं हेच कारण दिसतं की प्रामाणिक, शूर, आणि यशस्वी पुरुष अधिकार्‍यांचं एक तर करियर उत्तम असू शकतं किंवा वैवाहिक आयुष्य तरी. पूर्वी चित्रपटांत प्रामाणिक पोलीस अधिकार्‍यांच्या कुटुंबावर होणारे अत्याचार आणि त्यांच्या हत्या दाखवल्या जायच्या. आता त्यांचा चांगला संसारच होऊ नये म्हणून हे कर्तृत्ववान शूर पुरुषांच्या अयशस्वी संसाराचा नॅरेटिव्ह रुजवण्याचे प्रयत्न होत आहेत. यात मेख अशी आहे की डाय हार्ड, टेकन, बाटला हाऊस इत्यादी सिनेमांत नायिकेला नवर्‍याच्या कर्तृत्वावर विश्वास आहे, प्रेमही आहे,  पण तरी तिला त्याबरोबर करावी लागणारी तडजोड आणि त्याग मात्र मान्य नाही. थोडक्यात ज्याप्रमाणे शिवाजी महाराज जन्माला यावेत पण शेजारी अशी समाजाची मानसिकता आहे तसंच "शूरा मी वंदिले" हा पारंपारिक दृष्टीकोन बदलून "शूरा मी लांबूनच वंदिले" असा दृष्टीकोन रुजवण्याचे जोरदार प्रयत्न गेल्या तीसहून अधिक वर्षांपासून चित्रपट आणि मालिकांमार्फत सुरु आहेत. 

वाचकांनी सहमत व्हावंच असं अजिबात नाही, पण यावर विचार करावा अशी मात्र नक्कीच अपेक्षा आहे. 

मूळ हिंदी: © श्री जनार्दन पेंढारकर
मराठी भावानुवाद, संपादन, आणि वाढीव लेखनः © श्री मंदार दिलीप जोशी

Monday, January 16, 2023

खर्रा इतिहासः मुघल - अरबस्थ बामण

 मुघल हे खरे तर अरबस्थ बामण. भारतीय बामण मुंज झाल्यावर डोक्यावर शेंडी ठेवायचे. आबा भटाचे पणजोबा अण्णा भट यांनी शहेनशहा बाबराला आयडिया सांगितली की इकडच्या बामणांपेक्षा तुम्ही वरचढ दिसणे अपेक्षित आहे तेव्हा तुम्ही डोक्यावर शेंडी न ठेवता हनुवटीवर ठेवा आणि मिशी कापून टाका. तेव्हापासून मुघल बिनमिशीचे दाढी ठेऊ लागले. 


अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान २७८६, ओळ ६
 #तुझ्यायची_अकबरी  #आबा_भट_भारीच_खट

🖋️ मंदार दिलीप जोशी

Saturday, January 7, 2023

धन्यवाद मिस्टर बुधकर

'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील सुधीर जोशी यांची विश्वास सरपोतदार ही भूमिका लांबी कमी असूनही त्यांच्या दमदार अभिनयाने गाजली, इतकी की आज बाकी कलाकारांच्या बरोबरीने त्या भूमिकेची आठवण काढली जाते. हल्लीच्या ट्रेंड अनुसार या भूमिकेचे stills वापरून केलेल्या Meme सुद्धा भरपूर आहेत.

त्यांची दुसरी एक भूमिका आहे पण ती तितकीशी गाजली नाही. कदाचित गंभीर आणि कटू सत्य मांडणारी होती म्हणून असं असू शकेल. ती भूमिका म्हणजे 'तू तिथे मी' या चित्रपटातली मिस्टर बुधकर ही अशीच लहान पण महत्वपूर्ण भूमिका. नुकतेच निवृत्त झालेले, एकुलता एक मुलगा कॅनडात अत्यंत सुस्थितीत, घरात म्हातारी आई त्यामुळे तिकडे जाऊ शकत नाहीत, इथे रिकामा वेळ खायला उठतो म्हणून ऑफिसच्या वेळात घरून निघतात, बसने ऑफिसला जातात आणि गेट बाहेर सिक्युरिटीवाल्याशी गप्पा मारतात.

प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, त्यामुळे जनरलायझेशन करणे योग्य नाही. तरीही एक उदाहरण देतो. इथे म्हणजे फेसबुकवरच एका निवृत्त गृहस्थांची ओळख झाली. म्हणजे ही माहिती वैयक्तिक संपर्क झाल्यावरच कळली की ते निवृत्त आहेत. त्यांच्या हिंदुत्ववादी धोरणात्मक (strategic) आणि साम्यवादी, डावे यांच्याबद्दलच्या लिखाणाने प्रभावित होऊन त्यांना रिक्वेस्ट पाठवली होती. ते हिंदीत लिहितात. सगळीच मते पटतात असं नाही पण त्यांना गुरू केलेलं आहे. त्यांच्यापासून सगळ्यांनीच शिकण्यासारखं आहे. अक्षरशः २४ तास ते या विषयांत डोकं चालवत असतात. असो, त्यांची स्तुती खूप झाली.

प्रत्येकाने काही राजकीय लिखाण करून ज्ञानकण वाटावेत अशी अपेक्षा नाही, पण आज हिंदू समाजापुढे ज्या लग्नसंस्था, शिक्षण, धर्मशिक्षण, धर्माचरण, आपल्या गावाकडची माहिती, उत्सव, प्रथा, परंपरा इत्यादी अनेक समस्या आणि विषय आहेत. त्यावर उपाय म्हणून अनेक कार्ये हातात घेणे आवश्यक आहे आणि त्यातले महत्वाचे कार्य म्हणजे प्रबोधन आणि मार्गदर्शन.

काही गोष्टी फक्त हुशारी आणि तरुण रक्ताने जमत नसतात तर त्याला अनुभवातून आलेल्या विचारांची जोड लागतेच. त्यामुळे निवृत्त आयुष्य जगणाऱ्यांनी तरुण पिढीला नावे ठेवण्यात आणि मालिका बघून डोक्यात कचरा भरून घेण्यात अर्थ नाही, आणि व्हाट्सपवर निरर्थक फॉरवर्ड टाकून वेळ घालवण्यातही. यात पूर्णवेळ घर सांभाळणाऱ्या व्यक्तीही आल्याच. त्यामुळे उपरोल्लेखित म्हणजे या आधीच्या परिच्छेदातील विषयांवर चिंतन, मनन, आणि जमल्यास प्रबोधन आणि मार्गदर्शन अवश्य करावे.

टीप:
(१) हे कुणा एकाला/एकीला उद्देशून हे नाही. त्यामुळे स्वतःवर ओढवून घेऊ नका. घेतलंत तरी माय फादर्स व्हॉट गोज?
(२) फेसबुकवर एका पोस्टवर एक भंकस टीपी जोकवजा कमेंट केली आणि त्यावरून 'तू तिथे मी' सिनेमा त्यातले मिस्टर बुधकर आठवले. ओशोवाले संभोगातून समधीकडे म्हणतात तसं भंकसकडून चिंतनाकडे असं झालं.
(२) (अ) म्हातारपणी 'डेक्कन क्वीन' बघायची असेल तर तिला कसं धावायचं याचं मार्गदर्शन करण्याचीही धमक ठेवा.
(३) मी फक्त एक समाजोपयोगी उपाय सांगितला. बाकी ज्याला जे करायचं त्याने ते करावं.

🖋️ मंदार दिलीप जोशी
पौष कृ १, शके १९४४

Saturday, December 31, 2022

खर्रा इतिहासः ख्रिसमस ट्री - एक मुघल शोध

 आपण हिंदूस्थानात मोठमोठ्या टूर्स काढत असूनही दीवान-ए-खास मधे आपल्या कामाची पुरेशी चिन्हे (souvenir) नाही अशी जिल्लेइलाही शहेनशहा बादशहा ज.म.अकबर सरांना अलीकडे (म्हणजे हल्ली, कुणाकडे असं नव्हे. चावट कुठले) खंत लागून राहिली होती. बेगम शोधाबाईंच्या नादाने एक दोन मराठी मालिकांचे बघून त्यांना "प्रेझेंटेशन" द्यायची हुक्की आली होती पण त्यांच्या दिमाग-ए-मस्तिष्कचे जे विचार करण्याचे काम त्यांनी ज्या बिरबलाला औटसोर्स केले होते त्याने बादशहासरांना आवरलं म्हणून बरं झालं. 

पण अकबर सर सुद्धा कधीकधी विचार करत असत. जिल्लेइलाही शहेनशहा बादशहा ज.म.अकबर सर हिंदूस्थानात जिथे जिथे टूर घेऊन गेले होते तिथल्या स्थानिक झाडांची रोपे कुंडीत आणून दीवान-ए-खासमधे ठेवण्याची सूचना त्यांनी बिरबलाला केली. पण अकबर सरांना नुसतीच झाडं बघवेनात. त्यांनी बेगम शोधाबाईंना सांगून त्या झाडांवर चायनीज प्रवासी फुं-कून-पी आणि दी-वे-लाऊ यांनी बादशहा सरांना भेट दिलेले एक हजार दिवे त्या झाडांना लावून टाकले. पण ते दिवे चायनीज असल्याने त्यातले फक्त सातशेसहाईंशीच दिवे पेटले. शोधाबाईंना चिंता लागून राहिली पण बिरबलाने त्यांना "तसे बादशहा जिल्लेइलाही अकबर सरांचेही दिवे फारसे पेटत नसल्याने काही कळणार नाही" असा दिलासा दिला.

प्रचंड थंडीला कंटाळून युरोपियन प्रवासी रिका-म-टेकडोस्की एकदा डिसेंबरात दिल्लीत आला असताना त्याने दरबारात ही रोषणाई बघितली अ‍ॅंड रेस्ट इज हिस्टरी. अशा रीतीने ख्रिसमस ट्रीची परंपरा युरोपात प्रचलित झाली. 

पण हा खर्रा इतिहास युरेशियन विकेंड इतिहासकार तुम्हाला कधी सांगणार नाहीत.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
पान ६६६, ओळ ८

#अकबर_शुंभमेळा #तुझ्यायची_अकबरी

🖋️ मंदार दिलीप जोशी






Sunday, December 18, 2022

प्रारब्ध

एक व्हिडिओ बघितला ज्यात एक ताई राजकीय बंदचा भाग म्हणून दुकान बंद करायला आलेल्या काही तरुणांना समजावत आहेत. त्याच ताईंच्या फेसबुक पोस्टवर जी मंडळी गरळ ओकत असतात, त्यांच्या पोस्टवर आलेल्या घाणेरड्या भाषेतल्या टिप्पण्या वाचून लहानपणी आजोबा सांगायचे ती गोष्ट आठवली.

खूप पूर्वी एका आटपाट गावात एक म्हातारा-म्हातारी आणि त्यांचा मुलगा रहायचे. बिचारे इतके गरीब होते की दिवस दिवस उपाशी राहण्याची वेळ त्यांच्यावर येत असे. एकदा काय झालं की गरिबीमुळे त्रासून त्यांनी भगवान शकरांकडून वर प्राप्त करून घेण्यासाठी तप करायचं ठरवलं आणि तिघेही ध्यान लावून बसले.

कैलासावरून त्यांचं तप बघत असलेल्या पार्वतीमातेला त्यांच्यावर दया आली आणि त्या भगवान शंकरांना म्हणाल्या, "अहो, बघा ना, हे तिघे किती घोर तप ठरत आहेत. तुम्ही यांना वर का नाही देत?"

शिवशंकर हसून म्हणाले, "प्रिये, प्रारब्ध. मी वरदान दिल्याने काहीही होणार नाही. या जन्मात जे विधीलिखित आहे ते त्यांना भोगावंच लागेल."

पण पार्वतीमाता पडल्या आई. लगेच चिडून म्हणाल्या, "ते मला काही माहीत नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना जाऊन एक एक वर देऊन या. माझ्याच्याने यांचे कष्ट बघवत नाहीत. जाताय ना?!"

अखंड सृष्टीच्या मातेचं म्हणणं ऐकून भगवान शंकर तिघांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांनी आपल्याकडे वर मागावा असं सांगितलं.

सर्वात आधी म्हातारीने वर मागितला. ती म्हणाली, "हे भोळ्या शंकरा, तुम्ही मला मी लग्न करून या घरात आले तेव्हा मी जशी होते तशी करा."

भगवान शंकरांनी "तथास्तु" म्हणताच म्हातारीचं रूपांतर एका सुंदर षोडशवर्षीय नवरीत झालं.

हे पाहून म्हातारा भडकला. रागाने लालबुंद होऊन शंकराला म्हणाला, "हे भगवान, या मूर्ख बाईला जराही अक्कल नाही. मी वर मागतो की हिला कुत्री करा."

म्हाताऱ्याचं ऐकून भगवान शंकरांनी "तथास्तु" म्हणताच त्या नवतरुणीचं रूपांतर एका कुत्रीत झालं.

मग भगवान शंकरांनी त्या मुलाला वर मागायला सांगितलं. मुलगा विचारात पडला. आपल्या आईला या अवस्थेत पाहून त्याला अपार दुःख होत होतं. त्याने पटकन हात जोडले आणि शंकरांना विनंती केली, "हे देवाधिदेव, माझ्या आईला पुन्हा पहिल्यासारखं करा."

भगवान शंकर "तथास्तु" म्हणाले आणि शांतपणे परत कैलासाकडे प्रस्थान करते झाले. परत आल्यावर भगवान शंकरांनी माता पार्वतीकडे पाहून एक मंद स्मित केलं आणि पुन्हा ध्यानात गेले.

तसं या गोष्टीकडून बरंच शिकण्यासारखं आहे पण हजारो वर्षांपासून परमेशवराच्या अवतारांपासून ते ऐतिहासिक काळातील थोर मंडळी आणि संत परंपरेतील महान लोक जे शिकवून गेलेत ते वाचून समजून वागण्याची अक्कल जर नसेल तर अशा बैलबुद्धीच्या लोकांना कितीही सांगितलं, तरी शेवटी प्रारब्धात असेल तसेच ते वागणार.

असे लोक कधीही बेकायदेशीरपणे रस्त्यावर चादरी अंथरून जागा बळकावलेल्या असतात त्यांना मुक्त करण्याचा उपक्रम राबवत नाहीत कारण अशा ठिकाणी काही सत्कार्य करण्याची हिंमत तर नसतेच, पण आदेशही नसतो. शिवाय नेहमी आपल्यापेक्षा कमी शक्ती असलेल्या घटकांवरच दमबाजी केली जाते (अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव च अजपुत्रम बलिम दद्यात् देवो दुर्बलघातकः।) आणि त्याला आधार म्हणून काल्पनिक ऐतिहासिक अन्यायाची भावनिक फोडणी त्याला दिली जाते. अशी अरेरावी केल्यावर लोक आपल्याला घाबरतात हे एकदा कळलं की ती करणारे त्या राजकीय उतरंडीत जितक्या खालच्या पायरीवर असतील तितका त्यांचा इगो जास्त फुगतो आणि सुखावतो. मुख्य म्हणजे इतर काहीही रचनात्मक न करता उपद्रवमूल्य दाखवायला दिवसाचे काही ठराविक म्हणजे पाचशे ते दोन हजार रुपये मिळाले तर कोण थोर पुरुषांची शिकवण वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करेल? त्याला कुवत लागते आणि असल्यास बुद्धी वापरावी लागते, आणि तेवढे कष्ट घेण्याची यांची तयारी नसते. त्यापेक्षा वरून पैसे आणि आदेश आला की असली कामे ठरत फिरण्यात धन्यता वाटत असेल तर नवल काय?

तस्मात, व्हीडीओतल्या त्या ताईंनी ज्या आईच्या मायेने त्या मुलांना समजावलं ते त्यांचं कृत्य अत्यंत स्तुत्यच आहे. पण... असो. आपण आशा सोडू नये, एखादा तरी या घाणीतून बाहेर पडला तरी आपलं यश समजायचं. बाकी भगवान शकरांवर सोडून देऊया.

हर हर महादेव 🙏🏻

राजकीय बंद


🖋️ मंदारपंत जोशी

Friday, December 16, 2022

खाण तशी माती: देशी ग्रेटा थनबर्ग लायसिप्रिया कंगूजम

खाण तशी माती अशी एक म्हण आहे मराठीत, त्याची आठवण झाली. 

देशी ग्रेटा थनबर्ग लायसिप्रिया कंगूजम चा डँबिसपणा पहिल्या फोटोत दिसेलच. तिचे तीर्थरूपही काही कमी नाहीत. त्यांनी तर प्रचंड मोठा घोटाळा केलेला आहे. घोटाळे म्हणायला हवं.

या इसमाने खोट्या कागदपत्रांच्या आधारे व  आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्वांबरोबर काढलेले फोटो दाखवून आपण आंतरराष्ट्रीय दर्जाची मोठी व्यक्ती असल्याचे भासवून: 

(१) International Youth Committee (IYC) च्या नावे देशी आणि विदेशी विद्यार्थ्यांकडून कोट्यावधी रुपये उकळले आहेत.

(२) हे साहेब तीस्ता सेटलवाडचे पुर्वोत्तर भारतीय घोटाळाबंधू असून दंगलग्रस्तांना मदत करण्याच्या नावाखाली बेकायदेशीर स्त्रोतांद्वारे आणि दानाद्वारे कोट्यावधी रुपये जमवले आहे.

(३) या साहेबांवर २०१६ची एक गुन्हेगारी केस प्रलंबित असून मुख्य न्याय दंडाधिकारी, इम्फाळ पूर्व यांनी त्याला फरार घोषित केलं होतं.

आणि देशी ग्रेटा थनबर्ग लायसिप्रिया म्हणते आम्ही गरीब. 

Licypriya Kangujam KKSingh


सोशल मिडियाने बातम्या समपातळीवर आणून ठेवल्या आहेत (created a level playing field). खाती ब्लॉक करणे वगैरे प्रकार असले तरी एखाद्या गोष्टीची सत्यासत्यता तपासणे अगदी सोपे झाले आहे. डाव्यांचा सोशल मिडियावर नियंत्रण आणण्याचा आग्रह असण्याचं कारण हेच आहे की "अरेच्या, तुम्हाला खरं कळतं, आणि तुम्ही ते जगाला सांगता पण?" थोडक्यात, सोशल मिडिया नसता, तर हे लोक आपल्याला वर्षानुवर्ष असंच येडे बनवत राहिले असते.


🖊 मंदार दिलीप जोशी