Showing posts with label साम्यवाद. Show all posts
Showing posts with label साम्यवाद. Show all posts

Saturday, October 24, 2020

साम्यवाद आणि भंपकपणा: निरुपम सेनच्या कर्माची फळे

सैनबारी हे नाव ऐकलंय? सैनबारी हे कम्युनिस्टांनी केलेल्या एका घृणास्पद हत्याकांडाबाबत कुप्रसिद्ध आहे.

१७ मार्च १९७० रोजी झालेल्या या हत्याकांडात प्रणब आणि मलय या दोन भावांची कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी ― हो, कम्युनिस्टांचे असतात ते कायम कार्यकर्तेच, मग किती का मुडदे पाडेनात; आणि संघाचे सेवाभावी स्वयंसेवक असले तरी ते असतात कायमच गुंड ― तर, या दोन भावांचा CPI (M) च्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून खून केला. त्यानंतर घरातल्या भातात प्रणब आणि मलय यांचे रक्त मिसळले आणि अशा प्र्कारे रक्ताने माखलेला भात त्या दशतवाद्यांनी त्यांच्या आईच्या मुखात कोंबला. याच घटने दरम्यान त्यांनी रेखा रानी सेन या महिलेचे पती श्री नब कुमार सेन यांचे डोळे धारदार शस्त्रांनी खाचेतून बाहेर काढले. याच हल्ल्यात या मुलांच्या शिकवणी घ्यायला आलेल्या जितेन्द्रनाथ राय या शिक्षकाचीही त्याच धारदार शस्त्रांनी हत्या केली. कम्युमिस्ट दहशतवाद्यांनी श्री नब कुमार सेन यांचीही वर्षभराने हत्या केली.

आपल्या दोन तरुण मुलांची डोळ्यांदेखत झालेली हत्या आणि तद्नंतर भोगावा लागलेला हा प्रसंग यांचा त्या माऊलींवर काय मानसिक आघात झाला असेल याची आपल्याला कल्पनाही येऊ शकणार नाही.

या भावांच्या हत्येच्या पवित्र लाल कार्याचे नेतृत्व करत होते CPI (M) चे 'कार्य'कर्ते निरुपम सेन.

असा हा निरुपम सेन तीन वेळा आमदार म्हणून पश्चिम बंगालच्या विधानसभेवर निवडून गेला आणि त्याने चक्क दोन वेळा वाणिज्य व उद्योग मंत्रीपदही भूषवले.

पण निरुपम सेन या दहशतवाद्याला त्याच्या कर्माची फळे ही अखेर भोगावी लागलीच. कायदेशीर नव्हे पण कम्युनिस्ट न मानत असलेल्या परमेश्वराचा त्यांच्यावर २०१३ साली आघात झाला. मेंदूत झालेल्या रक्तस्त्रावामुळे त्यांना आंशिक स्वरुपात त्यांचे अर्धांग लुळे पडले. दोन-तीन वर्षांनी त्याच्या परिस्थितीत आणखी बिघाड होऊन त्याला हर्निया झाला. आधीच पक्षाघातामुळे (paralysis) शारीरिकदृष्ट्या संपूर्णपणे परावलंबी आयुष्य जगत असलेल्या निरुपम सेन याची अवस्था आणखी बिकट झाली.

Nirupam Sen in his youth, and now in September 2018

या फोटोत निरुपम सेन यांचा तेव्हाचा अंगात रग असलेला आणि सप्टेंबर २०१८ मधला रोगग्रस्त अवतार तुम्हाला दिसेल. अशा रुग्णांची अगदी रोजची नित्यकर्मे करतानाही प्रचंड फरफट होते आणि असे जगणे जे इतके वेदनादायी असते की त्यापेक्षा मरण बरे अशी इच्छा जवळजवळ रोज होते पण मरण येत नाही. 

सप्टेंबर २०१८ साली सैनबारी हत्याकांडाबद्दल पहिल्यांदा वाचलं तेव्हाच त्या हल्लेखोरांचा म्होरक्या निरुपम सेनला असेच आणि याच स्थितीत दीर्घायुष्य मिळावे अशी परमेश्वराकडे प्रार्थना केली होती, पण पाच वर्ष मरणयातना भोगल्यावर मृत्यूला त्यांची दया आली असावी, कारण त्यानंतर तीनच महिन्यांनी या यातनांतून त्याची कायमची सुटका झाली. कोलकाता इथल्या सॉल्ट लेक मधल्या एका "खाजगी" रुग्णालयात "कम्युनिस्ट पार्टी" ऑफ इंडिया मार्कसिस्ट म्हणजे CPI (M) चे दहशतवादी/कार्यकर्ता२०१८ निरुपम सेन २४ डिसेंबर २०१८ रोजी मेला. 

म्हणजे आजारी असल्यावर साम्यवादी राज्यात असलेल्या खाजगी रुग्णालयात त्याने उपचार करुन घेतले. यात काही नवीन नाही, भंपकपणा ही  कम्युनिस्टांची उज्ज्वल परंपराच आहे. ताजे उदाहरण म्हणजे केरळचे साम्यवादी मुख्यमंत्री पिनारयी विजयन हे उपचारांसाठी भांडवलशाही असलेल्या अमेरिकेत जात असतातच. 

कर्मायत्तं फलं पुंसां बुद्धिः कर्मानुसारिणी |
तथापि सुधिया भाव्यं सुविचार्यैव कुर्वता ||

अर्थात: माणसाची बुद्धी [प्रारब्ध] कर्माला अनुसरून चालते. [तसंच वागण्याची आपल्याला इच्छा होते.]; आपण पूर्वी जे केलेल असतं, त्याप्रमाणेच फळे भोगावी लागतात [असं असलं तरीही] माणसानी कुठलही काम करताना नीट विचार करूनच काय ते करावं. [प्रारब्धाप्रमाणे घडेल असं म्हणून निर्बुद्धपणे वागू नये.]

टीप: सेन कुटुंबीय काँग्रेस समर्थक होते, आणि त्याचीच शिक्षा कम्युनिस्ट 'कार्यकर्त्यांनी' त्यांना दिली. हा इतिहास जे एन यु मध्ये जाऊन कम्युनिस्टांचीच पिलावळ असलेल्या 'भारत तेरे तुकडे होंगे' गँगचे समर्थन करणाऱ्या आणि अटकेत असलेल्या/उजळ माथ्याने फिरणार्‍या शहरी नक्षलवाद्यांची पाठराखण करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना माहित नसेलच असं नाही, पण निदान आपला नेता कसा आपल्याच जीवावर उठलेल्या लोकांचं समर्थन करतो आहे हे काँग्रेस कार्यकर्त्यांनी लक्षात घेऊन राष्ट्रवादी शक्तींना बळ द्यावे.

©️ मंदार दिलीप जोशी 
निज अश्विन शु ७, शके १९४२


Tuesday, October 20, 2020

साम्यवाद आणि भंपकपणा: खुनशी ज्योती बसू

भारताचे एक प्रसिद्ध जलतरणपटू होते मिहीर सेन. त्यांचा एक कपड्यांचा कारखाना होता. साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट मुख्यमंत्री ज्योति बसू यांनी त्यांचा प्रचार करण्याचा आग्रह केला. मिहीर सेन यांनी आपण भांडवलशाहीचे समर्थक असल्याचं सांगत त्यांना नकार दिला. ज्योती बसू नाराज झाले.

या नंतर मिहीर सेन यांच्या कारखान्यात कामगारांच्या कटकटी सुरू झाल्या. बघता बघता ते दिवाळखोरीत निघाले. याची परिणिती म्हणून त्यांना स्मृतिभ्रंश झाला आणि ११ जून १९९७ वयाच्या ६६व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. याचा जबर धक्का बसलेल्या त्यांच्या पत्नी पाच वर्षांनी मरण पावल्या.

त्यांच्या मुलीने काही सांगितलेल्या या आठवणी सोबत जोडलेल्या फोटोत.

🖌️ मंदार दिलीप जोशी

Monday, October 19, 2020

साम्यवाद अर्थात भंपकपणा: स्वातंत्र्य आणि आझादी यातला फरक - स्पार्टाकस

आज स्पार्टाकस या सिनेमाबद्दल बोलूया. स्पार्टाकस ही एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहे. रोमन साम्राज्यात गुलाम असलेल्या स्पार्टाकसने इतर गुलामांना उचकावून सोबतीला घेऊन बंड केलं आणि अनेक विजयही मिळवले. वेगळं राज्य स्थापन केल्यावर ते टिकवायला जी दृष्टी लागते ती नसल्याने म्हणा किंवा इतर काही कारणांनी म्हणा, पण तो सरते शेवटी रोमन साम्राज्याकडून पराभूत झाला आणि त्याला क्रॉसवर लटकवलं गेलं.

Spartacus

त्याकाळी गुलाम विकले जायचे आणि त्यांना पैसे देऊन स्वतंत्र सुद्धा केलं जाऊ शकायचं. शेवटच्या दृश्यात स्पार्टाकसच्या पत्नीला असंच स्वतंत्र केलं गेलं आहे आणि ती त्यांच्या बाळाला घेऊन क्रॉसवर लटकावलेल्या स्पार्टाकसचा निरोप घ्यायला आली आहे. मृत्यूच्या जवळ जात असलेल्या स्पार्टाकसला ती त्यांचं बाळ दाखवत म्हणते की बघ स्पार्टाकस, हा तुझा मुलगा आहे, आणि तो स्वतंत्र आहे. हे दृश्य इतक्या प्रभावीपणे चित्रित करण्यात आलं आहे की ती हे बोलत असताना त्या बाळाच्या चेहऱ्यावर सुद्धा वेगळेच आनंदी भाव दिसल्याचा भास झाला, जणू त्याला कळत होतं काय चाललंय ते.

स्वतंत्र असणं म्हणजे काय, ते या दोन मिनिटांच्या दृश्यात समजतं. पूर्ण सिनेमा बघितला होता, त्यामुळे हे दृश्य जास्तच परिणाम करून गेलं. पहिल्यांदा बघितल्यावर जो आणि जसा परिणाम माझ्यावर तेव्हां झाला होता तसाच आजही होतो.

स्पार्टाकस सिनेमा याच नावाच्या कादंबरीवर बेतला होता. सिनेमाची पटकथा आणि कादंबरी या दोन्हीचे लेखक होते हॉवर्ड फास्ट. अत्यंत यशस्वी लेखक असलेल्या हॉवर्ड यांना साहित्य आणि सिनेमा क्षेत्रात खूप मागणी होती, आणि या मागणीची किंमत ते पुरेपूर वसूल करत असत. आपल्या आयुष्यात त्यांनी खूप वैभव कमावलं आणि ऐशआरामात जगले. आता कष्ट केले की त्याचे पैसे मिळायलाच हवेत, पण मग हे मुद्दाम सांगायचं प्रयोजन काय? तर, हॉवर्ड फास्ट साहेब घनघोर साम्यवादी अर्थात कम्युनिस्ट होते. पण नंतर स्टालिनची कृष्णकृत्ये पाहून त्यांचा भ्रमनिरास झाला.

आपल्या The Naked God: The Writer and the Communist Party आत्मचरित्रात त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं ― There was the evil in what we dreamed of as Communists: we took the noblest dreams and hopes of mankind as our credo; the evil we did was to accept the degradation of our own souls—and because we surrendered in ourselves, in our own party existence, all the best and most precious gains and liberties of mankind—because we did this, we betrayed mankind, and the Communist party became a thing of destruction.

स्पार्टाकस सिनेमा तिकीटबारीवर अत्यंत यशस्वी ठरला, आणि त्याला चार ऑस्कर पुरस्कारही मिळाले. आलम दुनियेतल्या कम्युनिस्टांनी स्पार्टाकसला आपला हिरो, आपला आयकॉन बनवला नसता तरच नवल होतं. आजही स्पार्टाकस वामपंथी लोकांसाठी आयकॉन आहे. डाव्यांनी या कादंबरीचा अनेक भाषांत अनुवाद देखील करवला. भारतात 'अमृतराय' यांनी त्याचा 'आदिविद्रोही' नावाने हिंदीत अनुवाद केला आणि तो डाव्यांच्या 'हंस प्रकाशनाने प्रकाशित केला. नेटवर शोधल्यास पीडीएफ चकटफू उपलब्ध आहे, त्यात हॉवर्ड फास्ट साहेबांचे रसभरीत गुणवर्णन केलेलं आहे. त्यात त्यांच्या कलाकृतींचा उल्लेखही आहे, पण उल्लेख गायब आहे तो त्यांच्या ऐशआरामी आयुष्याचा. इतकंच काय, त्यांच्या - द नेकेड गॉड या आत्मचरित्राचाही उल्लेख केलेला नाही. आश्चर्य वाटलं? नाही, कदाचित उल्लेख केला असता तरच आश्चर्य वाटलं असतं. संपूर्ण सत्य सांगतील तर ते कम्युनिस्ट कसले?

या सगळ्याचं सार इतकंच की वामपंथ आणि प्रत्येक वामपंथी हा गुलामीचा कडवा विरोधक असतो, पण हे त्यांचे निव्वळ दाखवायचे दात असतात. नाहीतर त्यांनी 'प्रत्येक मनुष्य हा त्या दयाळू शांतीदेवाचा गुलाम आहे' हे सांगणाऱ्यांना पाठिंबा दिला नसता. जी विचारधारा स्वतःला त्यांच्या शांतीदेवाची आणि त्या शांतीदेवाचा प्रेषित मानणाऱ्या व्यक्तीची गुलाम मानते, आणि स्वतःसकट पूर्ण जगावर ती गुलामी लादण्याचा प्रयत्न करत असते, त्याच विचारधारेची पाठराखण हे गुलामीचे स्वघोषित विरोधक डावे कसे काय करू शकतात?!

१९४७ साली आपण 'स्वतंत्र' झालो, आपल्याला 'आझादी' नाही मिळाली ― ती मिळाली पाकिस्तानला, जिथे त्याच विचारधारेची सत्ता आहे.

आपला वारसा स्वातंत्र्याचा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतंत्रतेला देवी मानून लिहिलं ―
जयोsस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे।
स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुतां वंदे।

हिंदुत्वाची अधिष्ठात्रीच मुळात स्वतंत्रता आहे. आपण स्वतंत्र आहोत, राहू, आणि आपला देशही स्वतंत्र राहील आणि ते राखणे हेच आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे. आम्ही ईश्वराला मानतो, आपापल्या इष्टदेवतेचे आम्ही भक्त आहोत, आणि कुणाला देव मानायचा नसेल तर तसे न मानायलाही स्वातंत्र्य आहे.... पण गुलाम किंवा बंदे नाही म्हणजे नाहीच!

जाता जाता, स्पार्टाकसच्या त्या प्रसिद्ध शेवटच्या दृश्याची ही लिंक, अवश्य पाहून घ्या. ही लिंक काम करत नाहीशी झाली तर हे दृश्य युट्युबवर कुठेही या सिनेमाच्या व्हिडिओवर उपलब्ध असेलच. 

🖌️ मंदार दिलीप जोशी


Wednesday, October 14, 2020

साम्यवाद अर्थात भंपकपणा: एका मृत्यूलेखाची(!) चिरफाड

सर्वप्रथम मार्क्सवासी झालेल्या मार्क्सवादी कम्युमिस्ट पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्या दातार बाईच्या आत्म्याला (असलाच तर) कम्युनिस्टेश्वर शांती किंवा सद्गती देवो अशी प्रार्थना.

Marxist Communist Party of India leader Usha Datar

ही पोस्ट वाचण्याअगोदर (१) आणि (२) हे दोन लेख वाचा, पार्श्वभूमी समजायला सोपं जाईल; किंवा पोस्ट वाचल्यावर वाचा, तरीही चालेल. या दोन बहिणी आणि त्या दोन बहिणींच्यात साम्य दिसू शकेल. फरक इतकाच, की त्यातल्या एकीला उपरती झाली पण बाटगे जोरात बांग देतात या उक्तीनुसार आयात तत्वज्ञानाने आंधळे झालेल्या एत्तद्देशीय कम्युनिस्टांना आणि फेमिनाझी मंडळींना कधीच होणार नाही.

ही बातमी म्हणजे फक्त मृत्यूबद्दलची बातमी नाही तर मेंदूची कवाडे उघडी ठेवल्यास कम्युनिस्ट (साम्यवादी) आणि स्त्रीवादी चळवळीचा भंपकपणा आणि धोका समजून घ्यायला अत्यंत उपयुक्त अशी बातमी आहे. 

(१) कला क्षेत्रातील कम्युनिस्ट प्रभावः या बाईंच्या बहिणीचे लग्न "नाटककार" व "विचारवंत" इसमाशी झाल्यावर त्या डाव्या आणि महिला चळवळीत काम करु लागल्या.

आता "नाटककार" व "विचारवंत" हा एकच माणूस कसा असू शकतो? हा एक भयंकर मोठा विनोद आहे. कारण हे म्हणजे बद्धकोष्ठ आणि जुलाब यांच्यावर घेतली जाणारी औषधे एकदम घेतल्यासारखे आहे. तर ते असो. 

(२) या सगळ्या कम्युनिस्ट आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या सगळ्यात आधी अत्यंत सुस्थितीतील किंवा श्रीमंत पुरुषांशी स्वतःचं लग्न वगैरे उरकून मोकळ्या होतात, मुलं वगैरे होऊ देतात आणि मग इतर भोळ्याभाबड्या (की बावळट) तरुण पिढीला, प्रामुख्याने तरुणींनाच, पुरुषी वर्चस्ववाद (patriarchy) वर दुगाण्या झाडणारी प्रवचने देऊन त्यांची आयुष्य नासवायची कामे करायला सुरुवात करतात. त्याला फोडणी म्हणून #SmashBrahminicalPatriarchy असेल तर आणखी उत्तम. 

म्हणजे:

  • पुरुष कसे वाईट!
  • लग्न काय फक्त मुलं होण्यासाठी करायची का? 
  • मुलगा आणि मुलगी समान आहेत तर इतक्या मुली का होऊ द्यायच्या?
  • बायका म्हणजे काय मुलं होण्याचा कारखाना आहेत का?
  • मुळात लग्नच कशाला करायचं?
  • तुमचं शरीर ही तुमची मालमत्ता आहे तिचा उपभोग कसा घ्यायचा हे तुम्ही ठरवायचं (ma life ma body) - यात आयरनीच्या देवाला वाहिलेली ठिणगी म्हणजे म्हणजे पुरुषी वर्चस्ववादाला झुगारुन द्यायची भाषा करायची आणि स्वैराचाराला प्रोत्साहन देऊन स्वतःचं शरीर कुणालाही वापरू द्यायला प्रोत्साहन द्यायचं हे यांचं धोरण.

पार्श्वभूमी समजली असेल तर आता मूळ बातमीकडे वळूया. या बाईंच्या बहिणीचं लग्न "नाटककार" व "विचारवंत" इसमाशी झाल्यावर त्या डाव्या आणि महिला चळवळीत काम करु लागल्या. त्यांच्या प्रभावाने या दातार बाई सुद्धा "पुरोगामी" चळवळीत काम करु लागल्या. 

आता दैवदुर्विलास बघा. सर्वसाधारणपणे जुन्या काळी आपल्याला असं दिसतं की पहिली मुलगी झाली तर मुलगा होण्यासाठी आणखी दोन किंवा तीन 'चान्स' घेतले जायचे. त्यामुळे आपल्याकडे तीन बहिणीच असणे किंवा तीन किंवा चार बहिणींच्या पाठीवर एक भाऊ हे सर्रास होतं. जुन्या काळातली सामाजिक परिस्थिती वेगळी असल्याने मी यावर चांगलं किंवा वाईट अशी कोणतीच टिप्पणी करणार नाही. पण याला प्रतिगामी, बुरसटलेले विचार, पुरुषी वर्चस्ववादाचं प्रतीक वगैरे हिणवणार्‍या आणि मुख्य म्हणजे उठल्या बसल्या जेन्डर इक्वालिटीच्या (gender equality) गप्पा ठोकणार्‍या 'पुरोगामी' लोकांनीही त्याच वाटेवर जावं हे डाव्या/कम्युनिस्ट लोकांचे व्यवच्छेदक लक्षणच म्हणावे लागेल. कारण त्या काळात दातार बाईंनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते, म्हणजेच  त्या काही अगदीच अडाणी अशिक्षित नव्हत्या. तरीही 'स्त्री मुक्ती' चळवळीत सक्रीय असलेल्या या पुरोगामी बाईंना तीन मुली असणे म्हणजे आपण 'हसे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला' या म्हणीचे ठळक उदाहरण आहे. 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण' ही म्हण वापरणार होतो पण कम्युनिस्ट लोकांचा ब्रह्म वगैरे गोष्टींवर विश्वास नसल्याने त्यांना हे कितपत झेपेल याची शंकाच आहे.

तर, पैसेवाले नवरे गटवायचे, व्यवस्थित मुलं वगैरे होऊ द्यायची - थोडक्यात स्वतःची आयुष्य व्यवस्थित स्थिरस्थावर वगैरे करुन घ्यायची आणि मग आपल्या सडलेल्या डाव्या, कम्युनिस्ट विचारांनी समाजाला नासवायला सुरवात करायची. लोकांना दाखवायला घरकामगार संघटना, बालहक्क हक्क लढा, दारुमुक्ती आंदोलन वगैरे जोडधंदे करायचे. 

आणि एके दिवशी मरायचं आणि "वैकुंठ" नामक स्मशानभूमीत "अंत्यसंस्कार" करुन घ्यायचे. 

अनेक बाबी वैय्यक्तिक म्हणून सोडून दिल्या तरी देहदान करायला हरकत नव्हती, जुन्या काळच्या ग्रॅज्युएट व्यक्तीला मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र या बाबतीत माहिती नसेलच असे नाही. म्हणजे हे लोक मरतानाही आपला भंपकपणा दाखवायला कमी करत नाहीत. शेवटी 'वैकुंठ' नामक ठिकाणी 'अंत्यसंस्कार' करुन घेतलेच ना?!

आहे की नाही गंमत?!

असो. good communist is a dead communist हे मात्र खरं.

© मंदार दिलीप जोशी
अधिक अश्विन कृ १२, शके १९४२