Monday, November 19, 2018

स्टॅलिनच्या कोंबडीची गोष्ट | स्टॅलिन की मुर्गी की कहानी

तुम्हाला स्टॅलिनच्या कोंबडीची गोष्ट ठाऊक आहे का?

स्टॅलिनच्या बाबतीत पसरलेल्या खर्‍या खोट्या गोष्टींपैकी ही एक. या गोष्टीला सत्यकथा माना किंवा दंतकथा, त्यातून घ्यायचा धडा, अर्थात शाळेच्या पुस्तकात असतं ते Moral of the Story बदलत नाही.

एखादा मुद्दा पटवून देण्याचे अनेक मार्ग असतात. म्हणजे 'अमुक करा, त्याची ही कारणं आहेत, त्याने असं असं होईल' ही शिकवण्याची सामान्य पद्धत. दुसरी एक पद्धत आपलं म्हणणं गोष्ट सांगण्याच्या माध्यमातून मांडणं. एक दिवस कॉम्रेड स्टॅलिनने आपल्या पक्षाच्या लोकांना एक मोठा मुद्दा एका अतिशय विलक्षण पद्धतीने समजावून दिला. त्याने चक्क एक जिवंत कोंबडी मागवली आणि एक एक करुन तिची पिसं उपटायला सुरवात केली. कोंबडीला भयंकर वेदना होत होत्या पण कोंबडीची सगळी पिसं जाऊन ती 'नग्न' होईपर्यंत स्टॅलिनने तिला सोडलं नाही.

"आता तुम्ही बघा गंमत" असं म्हणून स्टॅलिनने त्या कोंबडीसमोर काही ब्रेडचे तुकडे टाकले. आता मात्र तीच घाबरलेली कोंबडी, बिचकत स्टॅलिनच्याच पायांना जाऊन बिलगली. मग स्टॅलिनने तिच्यासमोर धान्याचे काही दाणे टाकले. आता स्टॅलिन उठला आणि एका खोलीतून दुसर्‍या खोलीत असं फिरू लागला. त्याचबरोबर ती कोंबडीही तो जिथे जाईल तिथे त्याच्या मागे मागे स्टॅलिनला जवळजवळ बिलगून जाऊ लागली. याच माणसाने काहीवेळापूर्वीच तिची पिसं एक एक करुन उपटून तिला मरणप्राय यातना दिल्या होत्या हे विसरून.

विजयी मुद्रेने स्टॅलिनने उपस्थितांकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाला,

"पाहिलंत तुम्ही? लोकांवर राज्य करायचं तर असं. त्यांची रसद आपल्या नियंत्रणात ठेवा, मग त्यांना तुम्ही कितीही यातना दिल्यात आणि अत्याचार केलेत तरी ते सगळं विसरून तुमच्याच मागे मागे फिरत राहतील, कुठेही जाणार नाहीत, आणि तुम्हाला त्यांच्यापासून काहीही धोका नाही.

----------------

(१) गांधीवधानंतर ज्यांचं सगळ्यात जास्त नुकसान झालं, घरदार उध्वस्त होऊन लुटली गेली, जीव गेले, तेच पुढे अनेक वर्ष काँग्रेसचे सगळ्यात निष्ठावंत मतदार राहिले, त्यांच्यापैकी अनेक अजूनही आहेत. इंदिरा गांधींचं नाव आमच्याच घरात "बाई मोठी हिंमतीची" म्हणून आदराने घेतलं जाई, त्याची आठवण झाली.
(२) इंदिरा गांधींची हत्या झाल्यावर जे झाड पडलं, त्यामुळे जमीन हादरली, किंबहुना हादरवली गेली. लोकांनी पंजाबात काँग्रेसला निवडून दिलं आहे आणि हादरवणारे आज पंजाबात सत्तेत आहेत.

----------------

तेव्हा स्टॅलिनची कोंबडी कशी दिसत असेल ते आंतरजालावर शोधू नका, आरशासमोर उभे राहिलात तरी पुरेसे आहे.

 © मंदार दिलीप जोशी

मूळ हिंदी लेख:

स्टेलिन की मुर्गी की कहानी पता है ?

चलिये इसे किंवदंती कहिए, हालांकि नेट पर मिल जाएगी ।

स्टेलिन ने एक दिन अपने पार्टी के लोगों को एक बड़ा मुद्दा बिलकुल एक अवस्मरणीय तरीकेसे सिखा दिया । उसने एक ज़िंदा मुर्गी मंगवाईऔर एक एक कर के ज़ोर से उसके सारे पर उखाड़ डाले। अब तो मुर्गी बिलकुल बिना परों की नग्न सी थी। उसे बहुत पीड़ा  हो रही थी मगर स्टेलिन ने उसे छोड़ा नहीं।

अब देखिये आप लोग" स्टेलिन ने कहा और उसने  कुछ ब्रेड के टुकड़े उस मुर्गी के सामने डाले । अब वही मुर्गी डरी सहमी सी, उसी के पाँवों से लिपट गयी। फिर उसने कुछ अनाज के दाने फेंके तो मुर्गी ने वे भी उठा लिए और फिर रूम में स्टेलिन जहां जाये, मुर्गी उसके पीछे पीछे बिलकुल चिपककर चल रही थी जब कि कुछ ही समय पहले उसने उसके सभी पर बहुत दर्दनाक तरीके से नोच लिए थे ।

स्टेलिन से सब उपस्थितों पर एक विजयी दृष्टि डाली ।

देखा आप ने ? लोगों पर ऐसे हुकूमत की जाती है । बस उनका खाना कंट्रोल कर लो, फिर जो चाहे उन्हें यातना  दो, वे फिर भी आप के आगे पीछे ही घूमते रहेंगे, कहीं नहीं जाएँगे और न ही आप को कुछ करेंगे ।

------------------------------------------------------------

गांधी वध के बाद जिनका सब से अधिक नुकसान हुआ, घर जलाए लूटे  गए और हत्याएँ हुई, वे ही काँग्रेस के सब से दीर्घकालीन निष्ठावान वोटर रहे ।

इन्दिरा के समय बड़ा पेड़ गिरने से धरती काफी हिली, हिलाई गयी । हिलानेवाले ठाठ से हैं और पंजाब ने काँग्रेस सरकार को चुना है ।

स्टेलिन की मुर्गी कैसी दिखती होगी ? आईने में दिखेगी ?

© आनंद राजाध्यक्ष

Saturday, October 27, 2018

युपीएच्या गंमतीजमती भाग ३: भगवा दहशतवाद या लेबलाचा जन्म आणि त्याचे जन्मदाते

२९ ऑक्टोबर २००५ रोजी दिल्लीमधील गोविंदपुरी येथे एका बसमध्ये, कलकाजी जवळ, आणि सरोजिनी नगर मार्केट भागात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. यात ६७ जण ठार तर २०० हून अधिक लोक जखमी झाले.

२८ डिसेंबर २००५ रोजी बंगलुरू येतील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स Indian Institute of Science (IISc) येथे दहशतवादी हल्ला झाला. इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात गणिताचे प्रोफेसर मनीषचन्द्र पुरी यांचा मृत्यू झाला तर इतर चार जण जखमी झाले.

या नंतर ७ मार्च २००६ वाराणसी येथे कँटॉनमेन्ट रेल्वे स्टेशन आणि संकटमोचन मंदिर इथे बॉम्बस्फोट झाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर १ जून २००६ रोजी हल्ला झाला. याची पूर्वसूचना अगोदरच मिळाल्याने मोठी हानी टळली आनि तीन लष्कर-ए-तय्यबाच्या अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं.

या आणि या आधी व नंतर झालेल्या सगळ्या दहशतवादी हल्ल्यांत पकडले गेलेले, ठार झालेले, आणि संशय असलेले सगळे अतिरेकी हे म्लेंच्छ निघाले. इतकंच नव्हे, तर अतिरेक्यांना सहाय्य करणारे स्थानिकही म्लेंच्छ असल्याचे सगळ्या गुप्तचर संस्थांची माहिती होती.

या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यालयात अधिकारी असलेल्या श्री आर. व्ही. एस. मणी यांना गृहमंत्रालयात तातडीने पाचारण करण्यात आलं. गृहमंत्रालयात पोहोचल्या पोहोचल्या श्री मणी यांना गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या खोलीत जायला सांगण्यात आलं, त्यावेळी खोलीत आणखी दोन व्यक्ती हजर होत्या. त्यातली एक व्यक्ती म्हणजे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि अतिरेकी संघटनांचा प्रचंड पुळका असलेले दिग्विजय सिंग.

...आणि दुसरी व्यक्ती म्हणजे महाराष्ट्रातले प्रसिद्ध पोलीस अधिकारी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे म्हणजेच एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे.

करकरेंनी मणी यांना नजिकच्या भूतकाळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची माहिती विचारली. यात त्यांनी किती लोक मेले, आता त्या प्रकरणांच्या चौकशीची काय स्थिती आहे, इत्यादी माहिती घेतली. यानंतर दिग्विजय सिंग यांनी मणी यांना आणखी काही माहिती विचारली. बोलण्याच्या ओघात इस्लामाबाद येथे काही कामानिमित्त गेलेले गृहमंत्रालयाचे काही वरिष्ठ अधिकारी काही तासांतच दिल्लीला पोहोचतील अशी माहिती श्री मणी यांनी दिली. पण त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आलं. इतकंच नव्हे तर केंद्रीय गृहसचिव केव्हा परतणार आहेत याबद्दलही उपस्थितांना फार काही फारसा रस दिसत नव्हता. श्री मणी यांच्याकडून दिग्विजय सिंग आणि हेमंत करकरे मिळेल ती माहिती मिळवत असताना गृहमंत्री शिवराज पाटील यांना त्या चर्चेत काडीचाही रस दाखवला नाही.

या प्रश्नोतरांच्या दरम्यान दोन गोष्टी श्री मणी यांच्या प्रकर्षाने लक्षात आल्या. दोन प्रश्नांच्या मध्ये दिग्विजय सिंग आणि करकरे यांच्यात आपापसात जी चर्चा झाली त्यावरुन श्री मणी यांच्या लक्षात आलं की सगळ्या अतिरेकी हल्ल्यात म्लेंच्छ जबाबदार असणं आणि त्यांना हल्ले करण्यात मदत करणारे स्थानिकही म्लेंछ असणे आणि याला गुप्तचर संस्थांनी दुजोरा देणे या वस्तुस्थितीवर ते दोघही नाखुष होते. दुसरी गोष्ट म्हणजे 'नांदेड', 'बजरंग दल', इत्यादी उल्लेख त्यांच्यातल्या संभाषणात वारंवार येत होता. आणखी एक महत्वाची गोष्ट श्री मणी यांच्या लक्षात आली ती म्हणजे दिग्विजय सिंग आणि हेमंत करकरे यांच्यात चांगलीच दोस्ती दिसत होती. जरी आयपीएस अधिकारी आणि राजकारणी लोकांनी एकमेकांशी वैय्यक्तिक संबंध वाढवू नयेत असे संकेत असले, तरी समज करकरे मध्य प्रदेशमध्ये पोलीस अधिकारी म्हणून काम करत असते तर त्यांच्यात आणि त्या राज्याचा एके काळी मुख्यमंत्री असलेल्या दिग्विजय सिंग यांच्यात चांगले संबंध असणं नवलाची गोष्ट असली नसती, पण एका राज्याचा माजी मुख्यमंत्री आणि दुसर्‍याच राज्याचा आयपीएस अधिकारी यांच्यात इतकी जवळीक ही आश्चर्याचीच गोष्ट होती. एका राज्याच्या पोलीस अधिकारी हा दुसर्‍याच राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याबरोबर इतकी घसट का ठेऊन होता हे एक रहस्यच होते. पण शेवटी हिंदीतली एक म्हण आठवते, "चोर चोर मौसेरे भाई"

उपरोल्लेखित भेट झाल्यावर लगेच काही दिवसांनी "हिंदू दहशतवाद" हे शब्द रेकॉर्डवर आले. नांदेड इथल्या समीर कुलकर्णी नामक व्यावसायिकाच्या वर्कशॉपमध्ये २० एप्रिल २००६ रोजी स्फोट झाला. हे प्रकरण सीबीआयकडे गेलं, तेव्हा वस्तुस्थिती काही वेगळीच असल्याचं तपास अधिकार्‍यांच्या लक्षात आलं. अनेदा व्यावसायिक धंदा मंदा असल्यावर स्वतःच आपल्या गाळ्यांना आग लावतात आणि विमा कंपन्यांकडे खोटा दावा करुन विम्याचे पैसे लाटण्याचा प्रयत्न करतात. मात्र या अधिकार्‍यांवर त्यांचा हा असा अहवाल बदलण्यासाठी 'वरुन' दबाव आला. या घटनेला ताबडतोब हिंदू दहशतवादाचं लेबल लाऊन कुलकर्णी आपल्या वर्कशॉपमध्ये घातपात घडवून आणण्याकरता स्फोटक पदार्थ साठवून ठेवत असल्याचा आणि अशा प्रकारे साठवणूक करत असताना त्यांचा स्फोट झाल्याचा शोध लावण्यात आला. समीर कुलकर्णी बजरंग दलाच्या नांदेडमधल्या कार्यालयात जात असल्याची कंडीही यावेळी पिकवण्यात आली. मात्र या अधिकार्‍यांनी त्यांचा अहवाल बदलण्यास साफ नकार दिला. याचा परिणाम असा झाला की सीबीआयच्या प्रमुखपदी ज्या अधिकार्‍याची बढती होणार होती ती रोखण्यात आली, आणि भलत्याच व्यक्तीला सीबीआयचे प्रमुखपद देण्यात आले. चौकशी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी अहवाल बदलण्यास नकार दिल्याने या प्रकरणावर तिथेच पडदा पडला. पण काहीही करुन भगवा दहशतवाद खरंच अस्तित्वात आहे ही कपोलकल्पित बाब जनतेच्या मनावर बिंबवण्याची सुरवात याच प्रकरणापासून झाली होती, आणि त्याची भीषण फळे अनेकांना भोगायला लागणार होती.

अवांतरः
वर दिग्विजय सिंग यांचा उल्लेख मध्य प्रदेशचे (छत्तीसगढ वेगळे राज्य होण्याआधी) माजी मुख्यमंत्री म्हणून आलाच आहे तर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दैदिप्यमान कारकिर्दीबद्दल थोडक्यात माहिती देणं आवश्यक आहे. आता छत्तीसगढचा भाग असलेल्या भागातून चाकिनी आणि डाकिनी नामक दोन नद्या वाहतात. अगस्त्य मुनींनी त्यांच्या ललितासहस्त्रनामम् या ग्रंथात या दोन नद्यांचा उल्लेख चाकिनीअंबा स्वरुपिणी आणि डाकिनेश्वरी असा केलेला आहे. स्थानिकांच्या दृष्टीने या दोन नद्यांचे पाणी पुरवठ्याइतकेच सांस्कृतिकही महत्त्व आहे.

नॅशनल मिनरल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने या राष्ट्रीयीकृत संस्थेने या भागात खाणकामाला सुरवात केली. दुर्दैवाने नियोजनाच्या अभावामुळे या खाणींतून निघणारा विषारी कचरा याच दोन नद्यांत काही वर्ष टाकण्यात आला. याचा परिणाम अर्थातच या दोन्ही नद्यांचे पाणी धोकादायकरित्या अशुद्ध होण्यात झाला. ही गोष्ट मुख्यमंत्री असलेल्या दिग्विजय सिंग यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी स्थानिकांच्या तक्रारींवर कोणतीच कार्यवाही केली नाही. थोडक्यात, त्यांनी या नद्यांच्या शुद्धतेकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. शांततामय मार्गाने आपले प्रश्न सुटत नाहीत म्हटल्यावर त्याचे पर्यावसान हिंसेत झाले आणि त्याचे परिणाम झारखंडचा तो भाग आजही भोगतो आहे.

गंमतीची गोष्ट अशी, की जिथे आंदोलनकरुन मलई खायला मिळते अशा भागात तत्परतेने धाव घेणार्‍या मेधा पाटकर, अरुंधती रॉय, प्रिया पिल्लई, आणि बेला भाटीया इत्यादी प्रभूतीमात्र या भागाकडे कधीच फिरकल्या नाहीत. मानवाधिकार आणि आदिवासींचे प्रश्न हे त्यांच्यासाठी "जिथे मिळते मलई, तिथे वाजवा सनई" असे होते आणि आहेत. दुर्दैवाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष आणि आंदोलनाची गळचेपी यामुळे हा प्रश्न आणखी चिघळला आणि या भागातल्या नक्षलवादाला खतपाणी मिळालं. अरे हो, बेला भाटियावरुन आठवलं...याच बाईचा नवरा जॉन ड्रेझची नेमणूक सोनियामातेने संपूर्णपणे घटनाबाह्य अशा नॅशनल अ‍ॅडव्हायजरी काउन्सिलवर नेमणूक केली होती.

संदर्भः
(१) विविध वर्तमानपत्रे
(२) Hindu Terror: Insider account of Ministry of Home Affairs - RVS Mani

क्रमशः

©️ मंदार दिलीप जोशी

युपीएच्या गंमतीजमती भाग १ आणि २ - नक्षलवादी आणि काँग्रेस संबंध

भाग १

पूर्वीच्या हिंदी चित्रपटांमध्ये काही दृष्ये ठरलेली असत. त्यातलं एक म्हणजे एखादा खूनी, दरोडेखोर, थोडक्यात कोणताही गुन्हेगार जखमी अवस्थेत एखाद्या सहृदय डॉक्टरच्या (उदाहरणतः ए के हंगल, अभी भट्टाचार्य, राजेन्द्रकृष्ण, गजानन जहागिरदार, वगैरे दयाळू लोक) दवाखाना किंवा रुग्णालयाच्या पायरीवर येऊन बेशुद्ध पडतो. डॉक्टर, परिचारिका, इतर सेवक कर्मचारी यांनी त्या इसमाला ओळखलेलं असतं. त्यातले काही लोक त्या डॉक्टर साहेबांना "मरुदे तेज्यायला" असं म्हणतात सुद्धा, पण डॉक्टर त्याने वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर व्यवसायात प्रवेश करताना घेतलेल्या हिप्पॉक्रॅटिकल ओथ अर्थात शपथेचं स्मरण करतो आणि "जी जान से कोशीश" करुन त्या गुन्हेगाराचे प्राण वाचवतो. मग पोलीस येतात आणि त्या गुन्हेगाराला घेऊन जातात, गुन्हेगार पळून जातो आणि मग पोलीस येतात, वगैरे वगैरे पुढे काय होतं त्याचे तपशील वेगवेगळ्या चित्रपटांच्या कथेनुसार बदलत जातात.

डॉक्टर बिनायक सेन या छत्तीसगड मधल्या डॉक्टरने मात्र हे सिनेमेही बघितले नसावेत आणि त्याला हिप्पॉक्रॅटिकल ओथ अर्थात शपथेचंही काही गांभीर्य नसावं. आपल्या निष्ठा देशविघातक शक्तींच्या पायाशी वाहिल्या आणि विकल्या की नैतिकतेच्या शपथा वगैरे सटरफटर गोष्टी वाटू लागतात यात काही नवल नव्हे. हा डॉक्टर मोकाटमतवादी अर्थात लिबटार्ड लोकांचा लाडका आहे हे माहित असेल तर बर्‍याच गोष्टी लक्षात येतात. नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना प्रथमोपचार द्यायला डॉ. बिनायक सेन थेट नकार देत असे. मात्र हाच पोलीसांच्या जवानांना अशी अमानुष वागणूक देणारा हाच डॉ. सेन नक्षली दहशतवाद्यांवर अत्यंत निष्ठेने फक्त प्रथमोपचारच करत नसे तर त्यांचं आदरातिथ्यही करायचा. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अनेक जवान डॉ सेन यांच्या या आदरातिथ्याचे अनेक किस्से सांगतात. डॉ सेन आणि त्याची पत्नी इलीना यांच्या दवाखान्याचा वापर निव्वळ नक्षली दहशतवाद्यांच्या सेवाशुश्रुषेपुरता मर्यादित नव्हता, तर तिथे चक्क नक्षली दहशतवाद्यांच्या धोरण ठरवण्यासाठी ज्या सभा (मिटिंग) देखील व्हायच्या.

थोडक्यात, डॉ सेनचा दवाखाना हा नक्षली दहशतवाद्यांचा एक अड्डाच होता असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

अशा या माणसाचं सरकारने काय करायला हवं होतं? पोलीस तक्रार, कोठडी, खटला, नजरकैद, तडीपारी, तुरुंगवास यांपैकी काही घडलं असावं असा तुमचा समज असेल तर तो काढून टाका.

सोनिया गांधी प्रणित काँग्रेस अर्थात युपीएच्या सरकारने डॉ. बिनायक सेन याची प्लॅनिंग कमिशन अर्थात नियोजन आयोगात सल्लागारपदी नेमणूक केली. तिथे बसून या इसमाने कसलं नियोजन केलं असेल आणि काय सल्ले दिले असतील याची कल्पनाही न केलेली बरी.

-----------------------------------------------------------------------------------------------------------

भाग २

महाराष्ट्रातला गढचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त म्हणून खूप वर्षांपूर्वी जाहीर झाला आहे. पोलीस आणि नक्षली दहशतवादी यांच्यात होणार्‍या चकमकी या इथे नेहमीच्याच. सर्वसाधारणपणे दहशतवादी आणि सशस्त्र पोलीस दलांमध्ये चकमकी झाल्या की बातमीचा मुख्य भाग हा दोन्ही बाजूंमधील मृत आणि जखमींचा आकडा हा असतो.

मात्र या चकमकींच्या वर्णनामध्ये एक विचित्र गोष्ट असायची. जरा स्मरणशक्तीला ताण देऊन बघा. त्या वेळच्या वर्तमानपत्रात येणार्‍या बातम्या आणि संसदेत विचारलेल्या प्रश्नांना संबंधितांनी दिलेली उत्तरं यात एक फारच विचित्र बाब आढळून आली होती. या चकमकीत पोलीसांच्या मृत्यूचे प्रमाण शेजारील छत्तीसगढमधील चकमकींच्या तूलनेत लक्षणीयरित्या कमी होते. आता यात अर्थातच वाईट काहीच नाही, उलट चांगलंच आहे. पण खरी गोम पुढे आहे. या चकमकीत पोलीसांची शस्त्रे नक्षलवाद्यांनी "हिसकावून घेतली आणि पळ काढला" अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. आता हातघाईच्या लढाईत काही वेळा अशा गोष्टी होणे साहजिक आहे, पण अशा हातघाईच्या चकमकी नक्षलग्रस्त भागात फार होण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. पण इथे अशा प्रकारच्या घटनांची शृंखलाच (पॅटर्न) आढळून येत होती.

हा खरंच योगायोग होता का? की छत्तीसगढ राज्यात त्या वेळी असलेल्या काँग्रेसेतर सरकारची विश्वासार्हता रसातळाला नेण्याकरता रचलेला एक डाव होता? महाराष्ट्रात आणि केंद्रात त्या वेळी काँग्रेसचं सरकार विराजमान होतं आणि छत्तीसगढमधे भाजप सरकार, हाच तो योगायोग.

याचीच आणखी एक बाजू अशी, की जेव्हा पोलीस आपली शस्त्रे गमावतात, तेव्हा पुढे काय करायचं याची नियमावली असते त्यानुसार काही औपचारिकता पाळाव्या लागतात. शस्त्रे गमावल्यावर न्यायालयीन चौकशीसारखी एक विभागीय चौकशी होते आणि या कामकाजाची व्यवस्थित नोंदणी केली जाते. या चौकशीत शस्त्र गमावणार्‍या पोलीसांवर जबाबदारी निश्चित केली जाते आणि त्या राज्याचे जे नियम असतील त्याप्रमाणे त्या दोषी पोलीसांवर कारवाई केली जाते. मग ती कारवाई शिक्षा स्वरूपातच असेल असे नाही, पण प्रत्येक गोष्टीची नोंद होते हे नक्की.

ही गोष्ट प्रचंड धक्कादायक आहे की गढचिरोली जिल्ह्यात घडणार्‍या पोलीसांची शस्त्रे नक्षलवाद्यांनी हिसकावून पळ काढण्याच्या घटनांनंतर अशा कुठल्याही दोषनिश्चिती आणि कारवाईची नोंद सापडत नाही.

(१) पोलीसांची शस्त्रे नक्षलवाद्यांनी हिसकावून घेणे आणि (२) शस्त्र गमावल्यानंतर कुठलीही चौकशी झाल्याची नोंदही नसणे — या दोन गोष्टींची सांगड घातली तर जे निष्कर्ष समोर येतात ते हादरवून टाकणारे आहेत.

महाराष्ट्रातले काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार केंद्रातील सोनिया प्रणित काँग्रेस अर्थात युपीए सरकार आपल्याच पोलीसांचा उपयोग नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवण्यासाठी तर करुन घेत नव्हते? त्या काळात गढचिरोली जिल्ह्यात नेमणूक झालेले अनेक पोलीस या गोष्टीची खात्री करु शकतील की ज्या चकमकींत पोलीसांची सरशी झाली आणि मृत किंवा अटक केलेल्या जखमी नक्षलवाद्यांकडून पोलीसांनी जी शस्त्रास्त्रे जप्त केली ती पोलीसांची शस्त्रे असल्याची स्पष्ट खुणा/चिह्ने त्यांच्यावर होत्या.

आता आणखी एक संशय येतो. की नक्षली दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांवर पोलीसांची शस्त्रे असल्याच्या खुणा सापडल्या. पण कदाचित अशीही अनधिकृत शस्त्रास्त्रे असू शकतील का जी नक्षल्यांनी सोयीस्कररित्या "हिसकावून" घेतल्यावर पुढे काही कारवाईच होऊ नये? कल्पनाही शहारा आणते.

उपरोक्त दाव्यांचे पुरावे वर्तमानपत्रातल्या आणि माध्यमांतल्या बातम्या, संसदेतली प्रश्नोत्तरे, आणि पोलीसांकडे असलेल्या नोंदी यांच्याकडे सहज पाहता येतील.

संदर्भः
(१) विविध वर्तमानपत्रे
(२) Hindu Terror: Insider account of Ministry of Home Affairs - RVS Mani

©️ मंदार दिलीप जोशी

Tuesday, October 23, 2018

माननीय सर्वोच्च न्यायालय आणि मुख्य न्यायाधीश श्री गोगोई यांस दिवाळीनिमित्त अनावृत्त पत्र

माननीय सर्वोच्च न्यायालय आणि मुख्य न्यायाधीश श्री गोगोई व जमात-ए-पुरोगामी यांस

सप्रेम नमस्कार पी.आय.एल. विशेष

हे दुसरे पत्र लिहीण्यास कारण की दिवाळी जवळ आली आहे व आपण मोठ्या उदार अंतःकरणाने हिंदूंना रात्री ८ ते १० फटाके वाजवायला परवानगी दिली आहे. अर्थात काही 'बॅड हिंदू' ही वेळ पाळणार नाहीतच, पण इतर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे आपले दुर्लक्ष झाले असावे असे वाटले म्हणून हा पत्रप्रपंच.

(१) आकाशकंदील लावू की नको?
(१) (अ) लावायला परवानगी असेल तर आत साधा बल्ब लावू की एलईडीचा?
(१) (ब) बल्ब किती पावरचा लावू?
(१) (क) आकाशकंदील किती उंचीवर लावू?
(१) (ड) आकाशकंदील संध्याकाळी किती ते किती लावावा?
(१) (ई) आकाशकंदीलाचा रंग भगवा असेल तर चालेल की हिरवा हवा? त्यासंदर्भातही नि:संदिग्ध निर्देश द्यावेत.

(२) सज्जात म्हणजे बाल्कनीत दिव्यांच्या माळा लावायच्या की नाही?
(२) (अ) लावायला आपली हरकत नसेल तर प्रत्येक माळेत किती दिवे असावेत?
(२) (ब) त्यांची लुकलुक करण्याची वारंवारता अर्थात फ्रिक्वेन्सी किती प्रतिमायक्रोसेकंदांची असावी?
(२) (क) प्रत्येक दिव्यात लुकलुक करणारे किती रंग असावेत? त्यात भगवा असावा की नसावा?
(२) (ड) माळेची लांबी किती सेंटीमीटर किंवा मीटर असावी?
(२) (ई) माळ चायनीज चालेल का मेड इन इंडियाच हवी? मेड इन अमेठीच हवी असे काही आहे का? स्पष्ट निर्देशांच्या प्रतीक्षेत.

(३) सज्जात व दाराबाहेर पणत्या लावायच्या की नाही?
(३) (अ) पणत्या लावण्यास आपण परवानगी दिली तर नेमक्या किती पणत्या लावाव्यात (म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगने अँटार्क्टिका पाघळणार नाही)? या संदर्भात आपण काही नि:संदिग्ध निर्देश दिलेत तर बरे होईल.
(३) (ब) पणत्यांमध्ये कुठले तेल वापरू म्हणजे साधे की तिळाचे की आणखी कुठले?
(३) (क) प्रत्येक दिव्यात प्रतिदिन किती मिलीलिटर तेल वापरायचे?

(४) दिवाळीच्या फराळात किती तेल वापरायचे?
(४) (अ) दिवाळीच्या फराळात चकल्या व कडबोळी यांचा व्यास किती असावा ?
(४) (ब) दिवाळीचा फराळ करताना चिवडा आणि फरसाण किती ग्रॅम करावे? ते किती तिखट असावेत?
(४) (क) लाडूचा व्यास किती असावा?
(४) (ड) लाडू व करंजी किती गॉड असावेत, अर्थात त्यांच्यात साखरेचे प्रमाण किती असावे?
(४) (ई) दिवाळीच्या फराळाचा कॅलोरीफिक वाल्यू किती असावा?

(५) देशात महिषासुरासारखे नरकासुराचे फ्यान तयार झाले आहेत का? तसे असल्यास  नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून आंघोळ केली तर नरकासुर समर्थकांच्या भावना दुखावतील का? या संदर्भात दिल्ली व जे.एन.यु परिसर, आणि फर्ग्युसन महाविद्यालय, व उर्वरित भारत यांच्या साठी आपण वेगवेगळे निर्देश देणार का?

(६) आंघोळीकरता आम्ही जे उटणे वापरतो ते किती मिलीग्रॅम वापरावे?
(६) (अ) उटण्यात कोणते घटक असावेत?
(६) (ब) उटण्यात कोणत्या वनस्पती घातल्या म्हणजे निसर्गाची हानी होणार नाही?

(७) आंघोळ करताना तेल वापरावे का?
(७) (अ) तेल कुठले वापरावे?
(७) (ब) तेल लावल्यावर लगेच आंघोळ करुन वाया घालवावे की व्यवस्थित जिरेपर्यंत तसेच बसून रहावे असे आपले मत आहे काय?
(७) (क) अंदाजे किती मिलिग्रॅम तेल प्रतिमाणशी दर आंघोळीला वापरावयास आपली परवानगी आहे?
(७) (ड) आपल्या निर्देशांपेक्षा अधिक तेल वापरल्यास दंड किती होऊ शकेल?

(८) पाडव्याला पत्नीने पतीला आणि भाऊबीजेला बहिणीने भावाला ओवाळायची पद्धत आहे. या पुरुषप्रधान परंपरांमध्ये यंदा आपण बदल करणार आहात का? (मग भेट किंवा बहीणबीज बहिणीने भावाला द्यावी लागेल - नै म्हटलं आपल्या निदर्शनास आणावे. उगाच बायकांना खर्च नको, कसें?)

(९) पाडव्याला.........असो....जाऊ दे.....इश्श.

(१०) रांगोळी दाराबाहेर काढली चालेल की घरातच काढू?
(१०) (अ) रांगोळीचे सर्वोच्च न्यायालय संमत डिझाइन्स कुठले?
(१०) (ब) रांगोळीत कुठल्या व्यक्तिमत्वांचे प्रतिनिधित्व असावे अथवा असू नये?
(१०) (क) रांगोळीत वापरावयाचे रंग कोणते?
(१०) (ड) रांगोळीचा आकार काय असावा?

(११) अभ्यंगस्नान करताना जरा जोशातच अंघोळ केली जात असल्याने भरपूर पाणी वापरले जाते. तरी प्रतिमाणशी किती लिटर पाणी वापरावे त्याचे नि:संदिग्ध निर्देश आम्हाला दिवाळीच्या आत कळावेत अशी नम्र विनंती.

(१२) हिंदूंना देवदर्शनाला देवळात जायची परवानगी आहे का? की जवळच्या पोलीस स्टेशनात किंवा सत्र न्यायालयात जाऊन हजेरी लावून यायचे? या संदर्भात सुद्धा स्पष्ट नियम सांगावेत.

भारतातल्या न्यायालयांसमोर साडेतीन कोटी खटले प्रलंबित असल्याचे मध्यंतरी वाचले. काय लोक असतात? आपल्याकडे न्यायाधीशांची संख्या लक्षात घेऊन कुणी खटले दाखल करतच नाही. लोकांना फार हौस कोर्टाची पायरी चढण्याची. आजोबांच्या वेळेपासून सुरू झालेले दिवाणी दावे नातू मरायला टेकला तरी निकाली लागत नाहीत हे माहित असताना न्यायव्यवस्थेवरचा ताण लक्षात न घेता वकील आणि न्यायप्रक्रियेवर खर्च करण्याची लोकांची हौस जिरत नाही हे खरंच. ती आपण जिरवाल ही खात्री आहे. पण अशा कोट्यावधी दिवाणी आणि फौजदारी खटल्यांसारख्या अनावश्यक आणि सटरफटर खटल्यांकडे लक्ष न देता आपण नालायक आणि रिकामटेकड्या हिंदूंचे सण व प्रथा यांच्याकडे लक्ष देत आहात (आणि अधून मधून प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपलीच चव्हाट्यावर मांडत आहात) हे नि:संशय प्रशंसनीय आहे. वर्षानुवर्ष चालणार्या व न्यायाधिशांच्या डोक्याची मंडई करणार्या या यडचाप खटल्यांपेक्षा पटकन निर्णय देऊन आटपता (आणि रिकामटेकड्या हिंदूंना आपटता) येतील अशा गणेशोत्सव कसे साजरे करावेत, जलीकट्टू, होळीचे पाणी, दहीहंडीची उंची, विविध जत्रांच्या वेळी दिले जाणारे कोंबड्यांचे बळी, तसेच आता दिवाळीचे फटाके याकडे आपण दिलेले लक्ष हे खरेच कौतुकास्पद आहे.

या संदर्भात मला व माझ्या काही समविचारी मित्रांना वरील प्रश्न पडले आहेत त्या संदर्भात आपण स्पष्ट निर्देश द्यावेत जेणेकरून आम्हाला घरी दिवाळी नियमानुसार व सर्वोच्च न्यायालयसंमत अशा पद्धतीने साजरी करता यईल अशी आपल्याला या ठिकानी नम्र व साष्टांग नमस्कार घालून विनंती.

आपला (परत) नम्र,
© मंदार दिलीप जोशी
अश्विन शु. ४, शके १९४०, कोजागरी

Wednesday, July 11, 2018

केरळ: करक्किडकम अर्थात रामायण मासम् आरंभ


येत्या मंगळवारी म्हणजेच सतरा जुलै पासून केरळ राज्यात करक्किडकम अर्थात यंदाचा रामायण मासम् सुरु होत आहे. हा मास सोळा ऑगस्ट पर्यंत चालेल.

सूर्याचा मिथुन राशीतून करक्किडक राशीत प्रवेश होताना हा महिना सुरु होतो. या महिन्यात केरळमधील लोक काही व्रतांचे पालन करुन प्रभू श्रीरामांच्या दैदिप्यमान आणि पराक्रमी आयुष्यावर आधारित 'अध्यात्म रामायण किलिप्पपटू' या ग्रंथाचे पठण व श्रवण करतात.

पण हे अध्यात्म रामायण किलिप्पपटू आहे तरी काय? किलिप्पपटू याचा शब्दशः अर्थ होतो पोपटाने सांगितलेले. तथापि त्याचा भावार्थ वेगळा आहे. ते सांगण्याआधी त्याच्या किलिप्पपटूच्या थोर निर्मात्याबद्दल बोलावे लागेल.  सुमारे ४५० वर्षांपूर्वी केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात जन्मलेल्या थुन्जथू रामानुजन एझुथचन यांनी सोळाव्या शतकात या अध्यात्म रामायणाची रचना केली आणि तेव्हापासूनच रामायण पठणाची प्रथा केरळमध्ये सुरु झाली. याच रामायणाचं वैशिष्ट्य असं की मल्याळी भाषेचे जनक म्हटल्या जाणार्‍या थुन्जथू रामानुजन एझुथचन यांनी  संस्कृत आणि मल्याळम् भाषेचं एक प्रकारचं व्याकरणप्रचूर क्लिष्ट मिश्रण असलेल्या मणिप्रवळम् पद्ध्तीची  भाषा टाळून, सामान्यांतल्या सामान्य माणसाला समजेल अशा अत्यंत सरळ, साध्या, आणि ओघवत्या मल्याळी भाषेत अध्यात्म रामायणाची रचना केली. अध्यात्म रामायणातून थुन्जथू रामानुजन यांनी मल्याळी भाषेला एक नेमकेपणा आणि प्रवाहीपणा बहाल केला जो आजही दैनंदिन वापरातील मल्याळीमधे वापरात आहे. थुन्जथू रामानुजन यांच्या कार्याची तूलना करायची झाली तर आपल्याकडे ज्ञानेश्वर माऊलींनी श्रीमद्भगवद्गीतेचे प्राकृतात रूपांतर करुन ज्ञानेश्वरी रचली त्याच्याशी करता येईल.

 आपल्याकडे जवळजवळ सगळे सण आणि प्रथा या चारही ऋतूंशी निगडित आहेत. करक्किडकम महिन्यातली अतिप्रचंड पर्जन्यवृष्टी आजार, गृहौपयोगी वस्तुंचे दुर्भिक्ष्य, अपघात अशा अनेक अरिष्टांना आमंत्रण देते. या महिन्यात केरळात शेतीवर आणि शेतीशी निगडीत उत्पादनांवरही विपरीत परिणाम होतो. म्हणूनच केरळमध्ये करक्किडकम महिन्याला परंपरागत मल्याळी भाषेत "पंज मासम्" अर्थात तीव्र दुर्भिक्ष्याचा महिना म्हणतात. कदाचित याच कारणामुळे लग्न व मुंज इत्यादी मंगलकार्ये आणि नव्या उपक्रमांची सुरवात या महिन्यात केली जात नाही.

अशा या अवघड कालखंडातून तरुन जाण्यासाठी या रामायणाचे पठण व श्रवण करणे ही व्यक्ती व समाजाकरता लाभदायक असल्याची इथल्या लोकांची श्रद्धा आहे. या मासात ओढवणार्‍या संकटांवर मात करण्यासाठी आणि अडचणीच्या निवारणार्थ करक्किडकम महिन्यातले सगळे म्हणजेच ३१ दिवस घराघरात आणि देवळांमध्ये संपूर्ण श्रद्धेने आणि नियमितपणे अध्यात्म रामायण किलिप्पपटूचे पठण करण्याची पद्धत आहे. समई (नीलविलक्कू)  समोर बसून त्या प्रकाशात लयबद्ध स्वरात रामायण पठण करावे आणि करक्किडकम मासाच्या शेवटाच्या दिवशी ते संपवावे(च) असा संकेत आहे. या मासात लोक कोट्टायम आणि थ्रिसूर येथे असलेल्या राम, लक्ष्मण, भरत, आणि शत्रुघ्न यांच्या मंदिरांनाही भेट देतात. याला नलम्बलम दर्शनम् असं म्हटलं जातं.



 निव्वळ अध्यात्मिक साधना किंवा उन्नती हे रामायण मास पाळण्याचं कारण नाही. आपल्या संस्कृतीतल्या प्रथा आणि परंपरा यांचे श्रद्धापुर्वक आणि निष्ठापूर्वक पालन व्हावे हा रामायण मासाचा प्रमुख उद्देश आहे. वाढती लोकसंख्या आणि तदनुषंगाने येणारे रोजगाराचे दुर्भिक्ष्य, आधुनिक जीवनशैलीमुळे धर्मकार्याकरता उपलब्ध असणारा वेळ हा कमी होत जाणे ही गोष्ट केरळमधेही होऊ लागली आहे. दोन पिढ्यांमधला संघर्ष हा ही याला कारणीभूत ठरतो आहे. यात भर म्हणजे केरळमधल्या साम्यवादी राजवटीमुळे हिंदूंना दहशतीखाली वावरावे लागणे. या गोष्टींचा परिणाम रामायण मासावर झाला नसता तरच नवल होतं. तथापि काही परंपरेचा यथोचित आदर करणार्‍या घरांत अजूनहीं रामायण मासांतल्या प्रथा पाळल्या जातात; यात घरातील वयोवृद्ध आजीआजोबांचा पुढाकार असतो हे सांगणे न लगे. जवळजवळ सर्व  देवळात, विशेषतः विष्णू मंदिरांत, करक्किडकम  महिन्यात रामायण पठण करण्याची पद्धत अजूनही तितक्याच निष्ठेने पाळली जाते. उत्तरेकडे ज्याप्रकारे सार्वजनिक मैदानात आणि सभागृहात रामलीला सादर केली जाते त्याच धर्तीवर काही धार्मिक/अध्यात्मिक संघटना 'रामायण पारायणम्' चे कार्यक्रम आयोजित करतात. स्थानिक प्रसारमाध्यमांतूनही अनेक वाहिन्यांवर रामायणावर उत्तम कार्यक्रम, चर्चासत्रे, पठणे इत्यादी कार्यक्रम करक्किडकम महिन्यात सादर केले जातात. आपल्याकडे कसं गणपतीत गुरुजी मिळाले नाहीत की काही घरात सीडी आणि डीव्हीडी लाऊन पूजा केली जाते तसंच हल्ली केरळातही रामायण पठणाच्या सीडी व डीव्हीडी उपलब्ध होतात.

 तथापि सीडी आणि डीव्हीडींची गरज पडू नये इतकी सोपी भाषा या अध्यात्म रामायण किलिप्पपटूची असल्याने अगदी दहा ते अकरा वर्षाचं लहान मूलही आपल्या घरातल्या मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली रामायणाचे पठण करु शकतं. या साध्या सरळ भाषेमुळेच काळाच्या ओघात इतक्या वर्षांनंतरही ही प्रथा टिकून राहिली आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनातही ज्यांना आपल्या प्रथा व परंपरांबद्दल आदर व श्रद्धा आणि रामायणाचे सार जाणून घेण्याची मनापासून इच्छा आहे ते या करता करक्किडकम मासात वेळ काढतातच. पूर्ण अध्यात्म रामायण पठणाकरता करक्किडकम मासाचे ३१ दिवस पुरेसे असतात. मन लावून संपूर्ण महिना लयीत रामायण वाचल्यास ते केवळ मन:शांती करताच नव्हे तर मन व शरीर अशा दोन्हींच्या शुद्धीसाठी खूप लाभकारक असते अशी तिथल्या लोकांची समजूत आणि अनुभव आहे.



पण रामायण पठणाचा एवढाच लाभ आहे का? करक्किडकम महिन्यात वाचायचा एक ग्रंथ एवढ्यापुरतं त्याचं महात्म्य मर्यादित आहे का? तर नाही. रामायणातून मिळणारा अध्यात्मिक आनंद ही फक्त एक बाजू आहे. रामायणाचा गाभा म्हणजे रामाचं पराक्रमी आणि अद्वितीय आयुष्य आहे. एका सद्वर्तनी मनुष्याच्या असाधारणपणाची कथा आहे. त्याच्या आई-वडील आणि गुरुजन आणि सर्व मोठ्यांबद्दलचा आदर करण्याच्या, समवयस्कांचा यथोचित मान राखण्याच्या, आणि आणि लहानांसमोर आदर्श घालून देण्याच्या गुणांची अनुकरणीय गाथा आहे. मोठ्या भावाचा  असा आदर्श समोर असताना आपलंही वर्तन आदर्शवत  कसं असावं याचा वस्तुपाठ लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न घालून देतात. सीतेच्या विशुद्ध पतीनिष्ठेची आणि सोशिकतेची कहाणी म्हणजे रामायण. आपल्या स्वामींप्रती असीम निष्ठा आणि भक्ती बाळगणार्‍या पवनपुत्र हनुमानाची गोष्ट म्हणजे रामायण. थोडक्यात, रामायणात बंधुता, राज्य व स्वामीनिष्ठा, मोठ्यांबद्दलचा आदर आणि आज्ञाधारकपणा, प्रचंड कष्ट, सहनशक्ती, आणि चिकाटीने अशक्यकोटीत असल्याचे भासणारे लक्ष्य गाठण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या सार्‍या गोष्टी रामायणाचा गाभा आहेत. मुलांना निव्वळ शिकवून हे गुण मुलांच्यात बाणवता येणार नाहीत. त्या करता रामायणापेक्षा उत्तम ग्रंथ नाही.

संदर्भ:
(१) 'Ramayana month' begins in Kerala
(२) Kerala’s Ramayana Masam Holds Its Own Despite Having Reached The ‘Next-Gen’ Phase

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. १३, शके १९४०


Saturday, July 7, 2018

छाप तिलक सब

कुछ बातें ऐसी हो जाती है, जिससे पता चलता है कि हिन्दू अपने धर्म से आसानी से च्युत नहीं होते!

आज ऑफिस जाते हुए एक बड़ी प्यारी घटना हुई। 

पहले इस की कुछ पृष्ठभूमि बता दूँ - मैंने ट्विटर और फेसबुक पर पढ़ा था कि बगैर भूले माथे पर तिलक धारण कर के ही घर से निकलें, यह अपने धर्म के चिन्ह को गर्व के साथ दिखाने वाली बात है।  कई वर्षों से मेरा यह नित्यक्रम रहा है, सो आज भी तिलक लगा कर पूजा कर मैं घर से निकला। 

रस्ते में मेरी कार ने पैट्रोल माँगा, और धमकाया कि यदि न मिला, तो लौटते समय परेशानी करवाऊँगी! मजबूरन मैं पैट्रोल पम्प की ओर मुडा। पैट्रोल डलवा कर हवा भरवाने रुका था, कि अटेंडेंट ने कौतूहलवश पूछा, "जी, क्या आप पुणे से हैं?" मैंने हामी भरी, और उसके कुतूहल का कारण पूछा। उसने मेरा तिलक देखा था, और शायद उसके पूछने कर अर्थ यह था कि और शहरों के, ख़ास कर मुंबई के लोग अपने धार्मिक चिन्हों का इतना दिखावा नहीं करते है। 

उसके बाद उस की नजर मेरी कार पर लगे हनुमान २.० वाले स्टिकर पर पड़ी, और पूछने लगा कि क्या यह कार्टून है या कोई साधारण चित्र! मैंने उसे बताया कि केरल के किसी कलाकार ने इसे बनाया था, और आंतरजाल के माध्यम से यह विश्वभर फैल गया है, और आज कोई भी इसे बाजार से खरीद सकता है। 

आंतरजाल से शायद वह उतना परिचित न हो, यह जानकर मैंने मेरे पास के स्टिकर्स से एक हनुमान २.० का अंडाकार स्टिकर निकाल कर भेंट किया। उसे पा कर उसकी बाँछे खिल उठी!

इसी बीच गाडी में रखे रामचरितमानस को देखकर उसने पूछा क्या आप रोज पढ़ते हो? मैने कहा एखाद पन्ना रोज पढ़ लेता हूं.

मेरे कार के एक पहिए के वाल्व की टोपी गिर गई थी, सो उस ने खुद से नई लगा कर दी, और जब अगली बार खरीदने जाएं तो कौन सा ब्रैंड बेहतर होगा उस के बारे में भी बताया।  हम ने फिर एक दुसरे की विदा ली, और मैं अपनी राह चलता बना।

मेरे १० वर्ष के वाहन चालन के इतिहास में किसी पैट्रोल पम्प अटेंडेंट से यह मेरी पहली इतनी लम्बी बातचीत थी।  और वह भी मुस्कुराते हुए, बंधुत्व की भावना से! सिर्फ मेरे माथे के तिलक और कार पर सजे हनुमान २.० वाले स्टिकर की वजह से!

सोचा, यहां से अवश्य उभर सकते हैं हम.

दिन के इस से बेहतर प्रारम्भ की मैं कल्पना नहीं कर सकता हूँ!

जय श्रीराम! जय हनुमान!!

मूल लेखन ©️ मंदार दिलीप जोशी
हिंदी रुपांतर: ©️ कृष्ण धारासूरकर

जेष्ठ कृ. ८, शके १९४०