Tuesday, October 23, 2018

माननीय सर्वोच्च न्यायालय आणि मुख्य न्यायाधीश श्री गोगोई यांस दिवाळीनिमित्त अनावृत्त पत्र

माननीय सर्वोच्च न्यायालय आणि मुख्य न्यायाधीश श्री गोगोई व जमात-ए-पुरोगामी यांस

सप्रेम नमस्कार पी.आय.एल. विशेष

हे दुसरे पत्र लिहीण्यास कारण की दिवाळी जवळ आली आहे व आपण मोठ्या उदार अंतःकरणाने हिंदूंना रात्री ८ ते १० फटाके वाजवायला परवानगी दिली आहे. अर्थात काही 'बॅड हिंदू' ही वेळ पाळणार नाहीतच, पण इतर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे आपले दुर्लक्ष झाले असावे असे वाटले म्हणून हा पत्रप्रपंच.

(१) आकाशकंदील लावू की नको?
(१) (अ) लावायला परवानगी असेल तर आत साधा बल्ब लावू की एलईडीचा?
(१) (ब) बल्ब किती पावरचा लावू?
(१) (क) आकाशकंदील किती उंचीवर लावू?
(१) (ड) आकाशकंदील संध्याकाळी किती ते किती लावावा?
(१) (ई) आकाशकंदीलाचा रंग भगवा असेल तर चालेल की हिरवा हवा? त्यासंदर्भातही नि:संदिग्ध निर्देश द्यावेत.

(२) सज्जात म्हणजे बाल्कनीत दिव्यांच्या माळा लावायच्या की नाही?
(२) (अ) लावायला आपली हरकत नसेल तर प्रत्येक माळेत किती दिवे असावेत?
(२) (ब) त्यांची लुकलुक करण्याची वारंवारता अर्थात फ्रिक्वेन्सी किती प्रतिमायक्रोसेकंदांची असावी?
(२) (क) प्रत्येक दिव्यात लुकलुक करणारे किती रंग असावेत? त्यात भगवा असावा की नसावा?
(२) (ड) माळेची लांबी किती सेंटीमीटर किंवा मीटर असावी?
(२) (ई) माळ चायनीज चालेल का मेड इन इंडियाच हवी? मेड इन अमेठीच हवी असे काही आहे का? स्पष्ट निर्देशांच्या प्रतीक्षेत.

(३) सज्जात व दाराबाहेर पणत्या लावायच्या की नाही?
(३) (अ) पणत्या लावण्यास आपण परवानगी दिली तर नेमक्या किती पणत्या लावाव्यात (म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगने अँटार्क्टिका पाघळणार नाही)? या संदर्भात आपण काही नि:संदिग्ध निर्देश दिलेत तर बरे होईल.
(३) (ब) पणत्यांमध्ये कुठले तेल वापरू म्हणजे साधे की तिळाचे की आणखी कुठले?
(३) (क) प्रत्येक दिव्यात प्रतिदिन किती मिलीलिटर तेल वापरायचे?

(४) दिवाळीच्या फराळात किती तेल वापरायचे?
(४) (अ) दिवाळीच्या फराळात चकल्या व कडबोळी यांचा व्यास किती असावा ?
(४) (ब) दिवाळीचा फराळ करताना चिवडा आणि फरसाण किती ग्रॅम करावे? ते किती तिखट असावेत?
(४) (क) लाडूचा व्यास किती असावा?
(४) (ड) लाडू व करंजी किती गॉड असावेत, अर्थात त्यांच्यात साखरेचे प्रमाण किती असावे?
(४) (ई) दिवाळीच्या फराळाचा कॅलोरीफिक वाल्यू किती असावा?

(५) देशात महिषासुरासारखे नरकासुराचे फ्यान तयार झाले आहेत का? तसे असल्यास  नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून आंघोळ केली तर नरकासुर समर्थकांच्या भावना दुखावतील का? या संदर्भात दिल्ली व जे.एन.यु परिसर, आणि फर्ग्युसन महाविद्यालय, व उर्वरित भारत यांच्या साठी आपण वेगवेगळे निर्देश देणार का?

(६) आंघोळीकरता आम्ही जे उटणे वापरतो ते किती मिलीग्रॅम वापरावे?
(६) (अ) उटण्यात कोणते घटक असावेत?
(६) (ब) उटण्यात कोणत्या वनस्पती घातल्या म्हणजे निसर्गाची हानी होणार नाही?

(७) आंघोळ करताना तेल वापरावे का?
(७) (अ) तेल कुठले वापरावे?
(७) (ब) तेल लावल्यावर लगेच आंघोळ करुन वाया घालवावे की व्यवस्थित जिरेपर्यंत तसेच बसून रहावे असे आपले मत आहे काय?
(७) (क) अंदाजे किती मिलिग्रॅम तेल प्रतिमाणशी दर आंघोळीला वापरावयास आपली परवानगी आहे?
(७) (ड) आपल्या निर्देशांपेक्षा अधिक तेल वापरल्यास दंड किती होऊ शकेल?

(८) पाडव्याला पत्नीने पतीला आणि भाऊबीजेला बहिणीने भावाला ओवाळायची पद्धत आहे. या पुरुषप्रधान परंपरांमध्ये यंदा आपण बदल करणार आहात का? (मग भेट किंवा बहीणबीज बहिणीने भावाला द्यावी लागेल - नै म्हटलं आपल्या निदर्शनास आणावे. उगाच बायकांना खर्च नको, कसें?)

(९) पाडव्याला.........असो....जाऊ दे.....इश्श.

(१०) रांगोळी दाराबाहेर काढली चालेल की घरातच काढू?
(१०) (अ) रांगोळीचे सर्वोच्च न्यायालय संमत डिझाइन्स कुठले?
(१०) (ब) रांगोळीत कुठल्या व्यक्तिमत्वांचे प्रतिनिधित्व असावे अथवा असू नये?
(१०) (क) रांगोळीत वापरावयाचे रंग कोणते?
(१०) (ड) रांगोळीचा आकार काय असावा?

(११) अभ्यंगस्नान करताना जरा जोशातच अंघोळ केली जात असल्याने भरपूर पाणी वापरले जाते. तरी प्रतिमाणशी किती लिटर पाणी वापरावे त्याचे नि:संदिग्ध निर्देश आम्हाला दिवाळीच्या आत कळावेत अशी नम्र विनंती.

(१२) हिंदूंना देवदर्शनाला देवळात जायची परवानगी आहे का? की जवळच्या पोलीस स्टेशनात किंवा सत्र न्यायालयात जाऊन हजेरी लावून यायचे? या संदर्भात सुद्धा स्पष्ट नियम सांगावेत.

भारतातल्या न्यायालयांसमोर साडेतीन कोटी खटले प्रलंबित असल्याचे मध्यंतरी वाचले. काय लोक असतात? आपल्याकडे न्यायाधीशांची संख्या लक्षात घेऊन कुणी खटले दाखल करतच नाही. लोकांना फार हौस कोर्टाची पायरी चढण्याची. आजोबांच्या वेळेपासून सुरू झालेले दिवाणी दावे नातू मरायला टेकला तरी निकाली लागत नाहीत हे माहित असताना न्यायव्यवस्थेवरचा ताण लक्षात न घेता वकील आणि न्यायप्रक्रियेवर खर्च करण्याची लोकांची हौस जिरत नाही हे खरंच. ती आपण जिरवाल ही खात्री आहे. पण अशा कोट्यावधी दिवाणी आणि फौजदारी खटल्यांसारख्या अनावश्यक आणि सटरफटर खटल्यांकडे लक्ष न देता आपण नालायक आणि रिकामटेकड्या हिंदूंचे सण व प्रथा यांच्याकडे लक्ष देत आहात (आणि अधून मधून प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपलीच चव्हाट्यावर मांडत आहात) हे नि:संशय प्रशंसनीय आहे. वर्षानुवर्ष चालणार्या व न्यायाधिशांच्या डोक्याची मंडई करणार्या या यडचाप खटल्यांपेक्षा पटकन निर्णय देऊन आटपता (आणि रिकामटेकड्या हिंदूंना आपटता) येतील अशा गणेशोत्सव कसे साजरे करावेत, जलीकट्टू, होळीचे पाणी, दहीहंडीची उंची, विविध जत्रांच्या वेळी दिले जाणारे कोंबड्यांचे बळी, तसेच आता दिवाळीचे फटाके याकडे आपण दिलेले लक्ष हे खरेच कौतुकास्पद आहे.

या संदर्भात मला व माझ्या काही समविचारी मित्रांना वरील प्रश्न पडले आहेत त्या संदर्भात आपण स्पष्ट निर्देश द्यावेत जेणेकरून आम्हाला घरी दिवाळी नियमानुसार व सर्वोच्च न्यायालयसंमत अशा पद्धतीने साजरी करता यईल अशी आपल्याला या ठिकानी नम्र व साष्टांग नमस्कार घालून विनंती.

आपला (परत) नम्र,
© मंदार दिलीप जोशी
अश्विन शु. ४, शके १९४०, कोजागरी

Wednesday, July 11, 2018

केरळ: करक्किडकम अर्थात रामायण मासम् आरंभ


येत्या मंगळवारी म्हणजेच सतरा जुलै पासून केरळ राज्यात करक्किडकम अर्थात यंदाचा रामायण मासम् सुरु होत आहे. हा मास सोळा ऑगस्ट पर्यंत चालेल.

सूर्याचा मिथुन राशीतून करक्किडक राशीत प्रवेश होताना हा महिना सुरु होतो. या महिन्यात केरळमधील लोक काही व्रतांचे पालन करुन प्रभू श्रीरामांच्या दैदिप्यमान आणि पराक्रमी आयुष्यावर आधारित 'अध्यात्म रामायण किलिप्पपटू' या ग्रंथाचे पठण व श्रवण करतात.

पण हे अध्यात्म रामायण किलिप्पपटू आहे तरी काय? किलिप्पपटू याचा शब्दशः अर्थ होतो पोपटाने सांगितलेले. तथापि त्याचा भावार्थ वेगळा आहे. ते सांगण्याआधी त्याच्या किलिप्पपटूच्या थोर निर्मात्याबद्दल बोलावे लागेल.  सुमारे ४५० वर्षांपूर्वी केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात जन्मलेल्या थुन्जथू रामानुजन एझुथचन यांनी सोळाव्या शतकात या अध्यात्म रामायणाची रचना केली आणि तेव्हापासूनच रामायण पठणाची प्रथा केरळमध्ये सुरु झाली. याच रामायणाचं वैशिष्ट्य असं की मल्याळी भाषेचे जनक म्हटल्या जाणार्‍या थुन्जथू रामानुजन एझुथचन यांनी  संस्कृत आणि मल्याळम् भाषेचं एक प्रकारचं व्याकरणप्रचूर क्लिष्ट मिश्रण असलेल्या मणिप्रवळम् पद्ध्तीची  भाषा टाळून, सामान्यांतल्या सामान्य माणसाला समजेल अशा अत्यंत सरळ, साध्या, आणि ओघवत्या मल्याळी भाषेत अध्यात्म रामायणाची रचना केली. अध्यात्म रामायणातून थुन्जथू रामानुजन यांनी मल्याळी भाषेला एक नेमकेपणा आणि प्रवाहीपणा बहाल केला जो आजही दैनंदिन वापरातील मल्याळीमधे वापरात आहे. थुन्जथू रामानुजन यांच्या कार्याची तूलना करायची झाली तर आपल्याकडे ज्ञानेश्वर माऊलींनी श्रीमद्भगवद्गीतेचे प्राकृतात रूपांतर करुन ज्ञानेश्वरी रचली त्याच्याशी करता येईल.

 आपल्याकडे जवळजवळ सगळे सण आणि प्रथा या चारही ऋतूंशी निगडित आहेत. करक्किडकम महिन्यातली अतिप्रचंड पर्जन्यवृष्टी आजार, गृहौपयोगी वस्तुंचे दुर्भिक्ष्य, अपघात अशा अनेक अरिष्टांना आमंत्रण देते. या महिन्यात केरळात शेतीवर आणि शेतीशी निगडीत उत्पादनांवरही विपरीत परिणाम होतो. म्हणूनच केरळमध्ये करक्किडकम महिन्याला परंपरागत मल्याळी भाषेत "पंज मासम्" अर्थात तीव्र दुर्भिक्ष्याचा महिना म्हणतात. कदाचित याच कारणामुळे लग्न व मुंज इत्यादी मंगलकार्ये आणि नव्या उपक्रमांची सुरवात या महिन्यात केली जात नाही.

अशा या अवघड कालखंडातून तरुन जाण्यासाठी या रामायणाचे पठण व श्रवण करणे ही व्यक्ती व समाजाकरता लाभदायक असल्याची इथल्या लोकांची श्रद्धा आहे. या मासात ओढवणार्‍या संकटांवर मात करण्यासाठी आणि अडचणीच्या निवारणार्थ करक्किडकम महिन्यातले सगळे म्हणजेच ३१ दिवस घराघरात आणि देवळांमध्ये संपूर्ण श्रद्धेने आणि नियमितपणे अध्यात्म रामायण किलिप्पपटूचे पठण करण्याची पद्धत आहे. समई (नीलविलक्कू)  समोर बसून त्या प्रकाशात लयबद्ध स्वरात रामायण पठण करावे आणि करक्किडकम मासाच्या शेवटाच्या दिवशी ते संपवावे(च) असा संकेत आहे. या मासात लोक कोट्टायम आणि थ्रिसूर येथे असलेल्या राम, लक्ष्मण, भरत, आणि शत्रुघ्न यांच्या मंदिरांनाही भेट देतात. याला नलम्बलम दर्शनम् असं म्हटलं जातं.



 निव्वळ अध्यात्मिक साधना किंवा उन्नती हे रामायण मास पाळण्याचं कारण नाही. आपल्या संस्कृतीतल्या प्रथा आणि परंपरा यांचे श्रद्धापुर्वक आणि निष्ठापूर्वक पालन व्हावे हा रामायण मासाचा प्रमुख उद्देश आहे. वाढती लोकसंख्या आणि तदनुषंगाने येणारे रोजगाराचे दुर्भिक्ष्य, आधुनिक जीवनशैलीमुळे धर्मकार्याकरता उपलब्ध असणारा वेळ हा कमी होत जाणे ही गोष्ट केरळमधेही होऊ लागली आहे. दोन पिढ्यांमधला संघर्ष हा ही याला कारणीभूत ठरतो आहे. यात भर म्हणजे केरळमधल्या साम्यवादी राजवटीमुळे हिंदूंना दहशतीखाली वावरावे लागणे. या गोष्टींचा परिणाम रामायण मासावर झाला नसता तरच नवल होतं. तथापि काही परंपरेचा यथोचित आदर करणार्‍या घरांत अजूनहीं रामायण मासांतल्या प्रथा पाळल्या जातात; यात घरातील वयोवृद्ध आजीआजोबांचा पुढाकार असतो हे सांगणे न लगे. जवळजवळ सर्व  देवळात, विशेषतः विष्णू मंदिरांत, करक्किडकम  महिन्यात रामायण पठण करण्याची पद्धत अजूनही तितक्याच निष्ठेने पाळली जाते. उत्तरेकडे ज्याप्रकारे सार्वजनिक मैदानात आणि सभागृहात रामलीला सादर केली जाते त्याच धर्तीवर काही धार्मिक/अध्यात्मिक संघटना 'रामायण पारायणम्' चे कार्यक्रम आयोजित करतात. स्थानिक प्रसारमाध्यमांतूनही अनेक वाहिन्यांवर रामायणावर उत्तम कार्यक्रम, चर्चासत्रे, पठणे इत्यादी कार्यक्रम करक्किडकम महिन्यात सादर केले जातात. आपल्याकडे कसं गणपतीत गुरुजी मिळाले नाहीत की काही घरात सीडी आणि डीव्हीडी लाऊन पूजा केली जाते तसंच हल्ली केरळातही रामायण पठणाच्या सीडी व डीव्हीडी उपलब्ध होतात.

 तथापि सीडी आणि डीव्हीडींची गरज पडू नये इतकी सोपी भाषा या अध्यात्म रामायण किलिप्पपटूची असल्याने अगदी दहा ते अकरा वर्षाचं लहान मूलही आपल्या घरातल्या मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली रामायणाचे पठण करु शकतं. या साध्या सरळ भाषेमुळेच काळाच्या ओघात इतक्या वर्षांनंतरही ही प्रथा टिकून राहिली आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनातही ज्यांना आपल्या प्रथा व परंपरांबद्दल आदर व श्रद्धा आणि रामायणाचे सार जाणून घेण्याची मनापासून इच्छा आहे ते या करता करक्किडकम मासात वेळ काढतातच. पूर्ण अध्यात्म रामायण पठणाकरता करक्किडकम मासाचे ३१ दिवस पुरेसे असतात. मन लावून संपूर्ण महिना लयीत रामायण वाचल्यास ते केवळ मन:शांती करताच नव्हे तर मन व शरीर अशा दोन्हींच्या शुद्धीसाठी खूप लाभकारक असते अशी तिथल्या लोकांची समजूत आणि अनुभव आहे.



पण रामायण पठणाचा एवढाच लाभ आहे का? करक्किडकम महिन्यात वाचायचा एक ग्रंथ एवढ्यापुरतं त्याचं महात्म्य मर्यादित आहे का? तर नाही. रामायणातून मिळणारा अध्यात्मिक आनंद ही फक्त एक बाजू आहे. रामायणाचा गाभा म्हणजे रामाचं पराक्रमी आणि अद्वितीय आयुष्य आहे. एका सद्वर्तनी मनुष्याच्या असाधारणपणाची कथा आहे. त्याच्या आई-वडील आणि गुरुजन आणि सर्व मोठ्यांबद्दलचा आदर करण्याच्या, समवयस्कांचा यथोचित मान राखण्याच्या, आणि आणि लहानांसमोर आदर्श घालून देण्याच्या गुणांची अनुकरणीय गाथा आहे. मोठ्या भावाचा  असा आदर्श समोर असताना आपलंही वर्तन आदर्शवत  कसं असावं याचा वस्तुपाठ लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न घालून देतात. सीतेच्या विशुद्ध पतीनिष्ठेची आणि सोशिकतेची कहाणी म्हणजे रामायण. आपल्या स्वामींप्रती असीम निष्ठा आणि भक्ती बाळगणार्‍या पवनपुत्र हनुमानाची गोष्ट म्हणजे रामायण. थोडक्यात, रामायणात बंधुता, राज्य व स्वामीनिष्ठा, मोठ्यांबद्दलचा आदर आणि आज्ञाधारकपणा, प्रचंड कष्ट, सहनशक्ती, आणि चिकाटीने अशक्यकोटीत असल्याचे भासणारे लक्ष्य गाठण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या सार्‍या गोष्टी रामायणाचा गाभा आहेत. मुलांना निव्वळ शिकवून हे गुण मुलांच्यात बाणवता येणार नाहीत. त्या करता रामायणापेक्षा उत्तम ग्रंथ नाही.

संदर्भ:
(१) 'Ramayana month' begins in Kerala
(२) Kerala’s Ramayana Masam Holds Its Own Despite Having Reached The ‘Next-Gen’ Phase

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. १३, शके १९४०


Saturday, July 7, 2018

छाप तिलक सब

कुछ बातें ऐसी हो जाती है, जिससे पता चलता है कि हिन्दू अपने धर्म से आसानी से च्युत नहीं होते!

आज ऑफिस जाते हुए एक बड़ी प्यारी घटना हुई। 

पहले इस की कुछ पृष्ठभूमि बता दूँ - मैंने ट्विटर और फेसबुक पर पढ़ा था कि बगैर भूले माथे पर तिलक धारण कर के ही घर से निकलें, यह अपने धर्म के चिन्ह को गर्व के साथ दिखाने वाली बात है।  कई वर्षों से मेरा यह नित्यक्रम रहा है, सो आज भी तिलक लगा कर पूजा कर मैं घर से निकला। 

रस्ते में मेरी कार ने पैट्रोल माँगा, और धमकाया कि यदि न मिला, तो लौटते समय परेशानी करवाऊँगी! मजबूरन मैं पैट्रोल पम्प की ओर मुडा। पैट्रोल डलवा कर हवा भरवाने रुका था, कि अटेंडेंट ने कौतूहलवश पूछा, "जी, क्या आप पुणे से हैं?" मैंने हामी भरी, और उसके कुतूहल का कारण पूछा। उसने मेरा तिलक देखा था, और शायद उसके पूछने कर अर्थ यह था कि और शहरों के, ख़ास कर मुंबई के लोग अपने धार्मिक चिन्हों का इतना दिखावा नहीं करते है। 

उसके बाद उस की नजर मेरी कार पर लगे हनुमान २.० वाले स्टिकर पर पड़ी, और पूछने लगा कि क्या यह कार्टून है या कोई साधारण चित्र! मैंने उसे बताया कि केरल के किसी कलाकार ने इसे बनाया था, और आंतरजाल के माध्यम से यह विश्वभर फैल गया है, और आज कोई भी इसे बाजार से खरीद सकता है। 

आंतरजाल से शायद वह उतना परिचित न हो, यह जानकर मैंने मेरे पास के स्टिकर्स से एक हनुमान २.० का अंडाकार स्टिकर निकाल कर भेंट किया। उसे पा कर उसकी बाँछे खिल उठी!

इसी बीच गाडी में रखे रामचरितमानस को देखकर उसने पूछा क्या आप रोज पढ़ते हो? मैने कहा एखाद पन्ना रोज पढ़ लेता हूं.

मेरे कार के एक पहिए के वाल्व की टोपी गिर गई थी, सो उस ने खुद से नई लगा कर दी, और जब अगली बार खरीदने जाएं तो कौन सा ब्रैंड बेहतर होगा उस के बारे में भी बताया।  हम ने फिर एक दुसरे की विदा ली, और मैं अपनी राह चलता बना।

मेरे १० वर्ष के वाहन चालन के इतिहास में किसी पैट्रोल पम्प अटेंडेंट से यह मेरी पहली इतनी लम्बी बातचीत थी।  और वह भी मुस्कुराते हुए, बंधुत्व की भावना से! सिर्फ मेरे माथे के तिलक और कार पर सजे हनुमान २.० वाले स्टिकर की वजह से!

सोचा, यहां से अवश्य उभर सकते हैं हम.

दिन के इस से बेहतर प्रारम्भ की मैं कल्पना नहीं कर सकता हूँ!

जय श्रीराम! जय हनुमान!!

मूल लेखन ©️ मंदार दिलीप जोशी
हिंदी रुपांतर: ©️ कृष्ण धारासूरकर

जेष्ठ कृ. ८, शके १९४०

Wednesday, June 20, 2018

रजियाची गोष्ट आणि धडा

...आणि पासष्ट वर्षांचा म्हातारा मेहरदीन...रात्रभर रजियाच्या अप्रतिम सौंदर्यात न्हाऊन निघत राहिला.

एखाद्या संगमरवरात कोरलेल्या शिल्पासारखं आरस्पानी सौंदर्य. श्रावणातल्या कृष्णमेघ भासावेत असा कमरेपर्यंत पसरलेला केशसंभार. कोवळं वय....जेमतेम अठरा एकोणीसची असेल रजिया. मेहरदीनची नात तिच्याहून मोठीच होती.

रजिया चार दिवसांपूर्वीपर्यंत मेहरदीनचा मेहुणा शौकतची बायको होती. सौंदर्यखणी असलेल्या रजियाचा निकाह दोन वर्षांपूर्वीच शौकतशी झाला होता. अजून मुलंही झाली नव्हती तिला.

पण हाय रे नशीब! एक दिवस रागाच्या भरात शौकतने तिला तलाक देऊन टाकला.....तीन तलाक!!

शौकत अनाथ होता. त्याचे अम्मी-अब्बा तो लहान असतानाच इहलोक सोडून गेले होते. मोठी बहीण शगुफ्ता आणि मेहुणा मेहरदीन यांनीच त्याचं पालनपोषण केलं होतं. शौकत आपल्या बहिणीकडेच रहायचा आणि मेहरदीनकडून सुतारकाम आणि इतर कारागिरी शिकायचा. उपकाराने मिंधा झालेला शौकत मेहरदीनला बापासारखाच मान द्यायचा. त्यामुळे शौकतने उचललेल्या या आततायी पाऊलामुळे मेहरदीन चांगलाच नाराज झाला होता. पण आता जे व्हायचं ते होऊन गेलं होतं. तीन तलाक दिल्यावर आता रजिया शौकतला परस्त्रीसमान होती.

हलालाचा विषय निघताच शौकत रडत रडत मेहरदीनला म्हणाला, "जीजाजी, आता तुम्हीच मला या संकटातून सोडवू शकता. भलत्याच कुणाकडे हे काम जाण्यापेक्षा तुम्हीच हलाला करा. माझा फक्त तुमच्यावर भरवसा आहे!"

खूप मिन्नतवार्‍या केल्यावर एकदाचा मेहरदीन तयार झाला.

आणि अशा प्रकारे आज कोवळी रजिया ६५ वर्षांच्या मेहरदीनबरोबर झोपली.

इकडे शौकत रात्रभर कूस बदलत जागाच होता. कशीतरी बेचैनीत रात्र काढल्यावर तांबडं फुटण्याच्या वेळीच शौकत बहिणीच्या घरी हजर झाला.

रात्री उशीरापर्यंत जागरण केल्याने मेहरदीन सकाळी उशीरा उठला. तोपर्यंत रजिया आंघोळ वगैरे उरकून तयार झाली होती. पण आता शौकतच्या नजरेला नजर भिडवण्याची तिच्यात हिंमत उरलेली नव्हती.

मेहरदीनने आरामात उठून सकाळची आह्निके उरकली आणि शौकतला सामोरा गेला. इतक्यात चहा आला. चहाचे फुरके घेत मेहरदीन म्हणाला, "हे बघा शौकत मियाँ, माझं वय झालंय म्हणून म्हणा आणि इतर काही कटकटी म्हणा, आज रात्री काही मी रजियाशी संभोग करु शकलो नाही बुवा!"

"आणि तुला तर दीनचे नियम माहित आहेच. जो पर्यंत शारिरिक संबंध येत नाहीत तो पर्यंत हलाला पूर्ण झाल्याचं मानलं जात नाही."

पडद्याआडून हा संवाद ऐकत असलेली रजिया अंतर्बाह्य हादरली... "या अल्लाह, एवढा मोठा विश्वासघात, इतका खोटारडेपणा!" पण चरफडत बसण्यावाचून तिच्याकडे आणि डोकं धरून बसलेल्या शौकतकडे काहीही पर्याय नव्हता. रजिया परस्त्री असल्यामुळे खरंखोटं करायला तिच्याशी थेट बोलताही येत नव्हतं. मान खाली घालून परतण्याखेरिज शौकतकडे काही उपाय उरला नाही.

हाच प्रकार पुढचे अनेक दिवस सुरु राहिला....तेच बहाणे...तेच खोटं बोलणं....तोच विश्वासघात.

आता रजिया पूर्णपणे अस्वच्छ, सतत पान खाउन वास मारणार्‍या घाणेरड्या तोंडाच्या लोचट मेहरदीनच्या कर्‍ह्यात होती. तिच्या कोवळं, आरस्पानी सौंदर्याला आता रोज रात्री मेहरदीनकडून चुरगळलं जाण्याचा शाप लागला होता.

साधारण तीन चार महिने झाले असतील, रजियाला दिवस गेले! आता मेहरदीन पूर्णपणे सुरक्षित होता. कारण गरोदर स्त्रीला तलाक देता येत नाही! मजहब त्याची इजाजत देत नाही!!

या घटनेला आता अनेक वर्ष झाली होती. शौकतने दोन तीन वर्ष वाट पाहून दुसरी बायको आणली....आणि इकडे खरोखर वय झाल्याने मेहरदीन अल्लाहला प्यारे झाले!

ऐन तारुण्यात बेवा (विधवा) झालेली रजिया धुणीभांडी करुन आपला उदरनिर्वाह करु लागली आणि एकटीच आपल्या पोराला मोठं करु लागली. एका शौहरने रागाच्या भरात तलाक दिलेला. दुसर्‍याने फसवून तलाक दिलाच नाही,आणि त्याच्या मृत्यूनंतर कुणीही सांभाळ करायला नकार दिलेली रजिया पोरावर काय आणि कसे संस्कार करु शकणार होती? त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. आता तिचं पोरगं गर्दुल्लं झालं आहे. नशेत पूर्ण वाया गेलं आहे.

काल अचानक पन्नाशीला टेकलेली रजिया मला भेटली.  माझ्याचकडे येत होती. मी विचारलं, "कशी आहेस रजिया? बरी आहेस ना,?"

"हो पंडितजी, अल्लाहची कृपा आहे सगळी. एक काम होतं तुमच्याकडे. या २००० च्या नोटेचे सुट्टे करुन द्या ना ..."

तिच्या हातातून ती नोट घेऊन उलटसुलट करुन बघत असतानाच तिला विचारलं,  "सुट्टे कसे देऊ? म्हणजे, पाचशेच्या नोटा देऊ की शंभराच्या?"

ती म्हणाली "पंडितजी पाचशेच्या तीन द्या आणि बाकी शंभराच्या. रमजान सुरु होतोय. तीनचारशे तर मशिदीत दान द्यायचेत!"

हे ऐकून मी चक्रावलो. माझं डोकं सुन्न झालं.

ज्या मजहबने तिचं तारुण्य, तिचा संसार...तिचं सर्वस्वच तिच्याकडून हिरावून घेतलं.... अनाथ केलं, लोकाच्या घरी धुणीभांडी करुन जेमतेम पोट भरेल इतकीच कमाई होईल असं आयुष्य जगायला भाग पाडलं......

त्याच मजहब बद्दल मनात इतकी श्रद्धा ?!

इतकं सगळं होऊनही, धुणीभांडी झाडूलादी करुन करुन कमावलेल्या पैशातून चारशे रुपये मशीदीला दान?

आणि इथे कुठल्यातरी गावच्या "दानशूर" श्रेष्ठींनी तीन चार पिढ्यांच्या आधीच्या काळात वाड्यावर पूजा घातल्यावर, किंवा इकडे शहरात एखादी सत्यनारायणाची पूजा घातल्यावर, किंवा कुठल्यातरी देवळात, कधीतरी कुठल्यातरी भटजीबुवांना अकरा रुपयांची दक्षिणा दिल्यावर त्या श्रेष्ठींची नातवंडं पण कधीकाळी बापजाद्यांनी दिलेल्या त्या अकरा रुपयांवरुन आजही टोमणे मारताना दिसतात. देवळांना सरकारला किती कर द्यावा लागतो हे माहित नसलेले अर्धवटराव देवळात जमा झालेल्या नोटांच्या फोटोसकट व्हॉट्सॅपवर मेसेज ढकलताना दिसतात. उदाहरणं बरीच आहेत अशी.

नक्की कसं 'त्यांच्याशी' लढणार आहात तुम्ही?

अजून वेळ गेलेली नाही....जागे व्हा!

©️ मंदार दिलीप जोशी
जेष्ठ शु. ८, शके १९४०

https://bit.ly/2tnmEqD

मूळ हिंदी पोस्टः श्याम मणी त्रिपाठी (https://bit.ly/2lj8QKj)

और 65 साल का  बूढ़ा ...मेहरदीन ..रात भर रजिया के बेपनाह हुस्न में गोते लगाता रहा ..!
संगमरमर सा तराशा पारदर्शी जिस्म !
भादों के मेघ सी आच्छादित आगे कटि तक लहराती केशराशि .!
कमसिन उम्र ...! यही कोई अठारह उन्नीस की।।
उससे बड़ी तो मेहरदीन की पोती थी ..!!

रजिया ...चार दिन पहले तक मेहरदीन के साले शौकत की बीबी हुआ करती थी ।।

बेपनाह हुस्न की मलिका रजिया
अभी दो साल पहले ब्याह के आई थी ।।
अभी बाल बच्चे भी न हुए थे रजिया को ।।

पर इसे रजिया की किस्मत कहिये के शौकत ने गुस्से में आके तलाक दे दिया ... तीन तलाक ।।
शौकत अनाथ था ।।
मा बाप बचपन में चल बसे थे ।।
बहन शगुफ्ता और बहनोई मेहरीदीन ने ही उसे पाला था ।।
शौकत अपने बहन के घर ही रहता था ..!
और मेहरदीन से लकड़ी की कारीगरी सीखता था ।।
शौकत हमेशा ही मेहरदीन को बाप से भी बड़ा सम्मान देता था ।।
शौकत के इस कदम से मेहरदीन बहुत नाराज हुआ था ।।
पर जो होना था वो तो हो चुका था ।।
अब रजिया शौकत मियाँ के लिए पराई समान थी ।।
हलाला की बात चली तो ..शौकत ने रोते हुए मेहरदीन से कहा ...! दूल्हे भाई (जीजा ) अब आप ही मुझे इस मुसीबत से निकाल सकते हो ।।
किसी और के बजाय आप ही हलाला कर लो .!
आप पे मुझे भरोसा है ।।
मेहरदीन बड़ी मुश्किल से तैयार हुआ ।।
और इस तरह आज कमसिन रजिया  65 साल के मेहरदीन की हमबिस्तर हुई ।।

दूसरी ओर शौकत भी रात भर करवटें बदलता रहा ।। जैसे तैसे रात बीती ... और मुहं अंधेरे शौकत बहन के घर हाजिर हुआ ।।
देर रात तक जागने की वजह से मेहरदीन थोड़ी देर से सो के उठा ।।
तब तक रजिया नहा धो के तैयार हो चुकी थी ।।
पर वो अब शौकत से नजरें न मिला पा रही थी ।।
उधर मेहरदीन तसल्ली से उठा ..नित्य कर्म से फारिग हो के शौकत से मुखातिब हुआ ।।
चाय की चुस्की के बीच मेहरदीन बोला ...!
देखो शौकत मियाँ ..... कुछ उम्र का तकाजा समझिये और कुछ अन्य उलझने ...!!
आज की रात मैं रजिया से जिस्मानी ताल्लुकात न बना सका ..!
अब मियाँ तुम्हे तो दीनी मसायल का पता ही है ...
जब तक जिस्मानी ताल्लुकात न बन जाएं तब तक हलाला मुकम्मल नहीं होता ..!
मेहरदीन की बातें पर्दे के पीछे से सुन रही रजिया कांप उठी ..! या अल्लाह इतना बड़ा झूठ ..!!
उधर शौकत सर झुकाए जड़ हो चुका था ।।
और अब पराई हो चुकी रजिया से बात करने पे भी पाबन्दी हो चुकी थी ।।
इस तरह ये सिलसिला कुछ और रातों तक चलता रहा . ! वही आनाकानी ...वही झूठ ..वही फरेब ..!
अब रजिया पूरी तरह चीकट ..मलेच्छ ...बदबूदार पान के पीकों सी सड़ांध मारते मेहरदीन की गिरफ्त में थी ।।
अब वो हर रात मेहरदीन द्वारा भंभोड़ी जाने को अभिशप्त थी ।।

और इस तरह तीन चार महीने बीतते बिताते रजिया गर्भवती हो गई ।।।
अब मेहरदीन पूरी तरह सुरक्षित था ।।
क्योंकि गर्भवती रजिया को वो तलाक नही दे सकता था ..! ऐसा मजहब में पाबन्दी है ।।

इस वाकये को कई साल हो गए ..!
उधर दो तीन साल इंतजार के बाद शौकत मियाँ दूसरी ले आये ... और इधर मेहरदीन अल्ला को प्यारे हो गए ..!
भरी जवानी में विधवा हुई रजिया घरों में झाड़ू पोंछा का काम करने लगी ..!
और अकेले अपने बच्चे को पालती रही ।।
बच्चा बड़ा हो के नशेड़ी बन चुका है ।।
कल अचानक रजिया मुझे मिल गई .. ।।
यही कोई पैंतालीस पचास वय की हो रही है अब।।

मेरे ही पास आ रही थी ।। मैंने देखते ही पूंछा ..!
क्या हाल है रजिया .???
जी पंडी जी सब अल्ला का शुकर है ।।
मेरी ये दो हजार की नोट खुल्ला कर दो ।।
मैं उसके हाथ से नोट ले के उलट पलट रहा था ..!
और पूंछने लगा कैसे नोट दूँ ??
पांच सौ के चार दूँ या सौ सौ के ..?
वो बोली तीन पांच सौ के दे दो ..!और बाकी सौ सौ के ।।
रमजान शुरू होने वाले हैं ..! तीन चार सौ तो मस्जिद में ही दान देना है ..!!

ये सुन के मैं जड़वत हो गया ।। सर चकरा गया ..!

जिस मजहब ने उसका सब कुछ छीन लिया ।।
यतीम बना डाला ... बमुश्किल झाड़ू पोंछा कर के गुजर बसर को मजबूर कर दिया ..!
उस मजहब के प्रति इतनी श्रद्धा ..???
झाड़ू पोंछे से कमाए पैसों से चार सौ रुपये मस्जिद को दान ..??

यहाँ हमारे यहां अगर किसी जमींदार  ने तीन पीढ़ी पहले किसी मंदिर में .... किसी पुरोहित को दस रुपए दान दिए होंगें ...तो उनके पोते पोती आज भी उस दस रुपये का ताना मारते मिल जायँगे ..!
क्या खा के इनका  मुकाबला करोगे मियाँ  .??
अब भी समय है चेत जाओ ..!!

Friday, May 25, 2018

तुम्ही केलेत ते चमत्कार. आम्ही केले ते.....

तुम्ही केलेत ते चमत्कार. आम्ही केले ते.....

येशू ख्रिस्ताने जितके तथाकथित चमत्कार केल्याचं सांगितलं जातं त्याच्या कित्येक पटींनी चमत्कार आपल्या संतांनी ढिगावारी केलेले आहेत. तरीही "आपण सारी त्याची लेकरे" या सर्वसमावेशक सामायिक भावनेव्यतिरिक्त त्यांच्यापैकी कुणी थेट परमेश्वराचे पुत्र वगैरे असल्याचा दावा केलेला नाही.

उदाहरणार्थः मृत व्यक्तीला जिवंत करणे, पाण्यावर चालणे, फक्त टोपलीभर अन्नावर अख्ख्या गावाची भूक भागवणे इत्यादी. हं, आता ख्रिस्तासारखं कुणी पाण्यातून वाईन बनवलेली नाही कारण किमान संतांच्या लेखी आपल्याकडे दारूकडे सुदैवाने तितक्याशा आदराने पाहिलं गेलेलं नाही. निसर्ग, हवामानावर वगैरे असलेल्या नियंत्रणाचेही वेगवेगळे किस्से आहेत. नवनाथांच्या विषयी बोलायचं तर पोस्टची कादंबरी होईल. नाथपंथी संतांचे चमत्कारही कमी नाहीत.

ज्ञानेश्वरांचा विषय घेतला, तर त्यांच्या नावावर भिंत चालवण्याचा....नव्हे उडवण्याचा....चमत्कार नोंदवला गेलेला आहे, पण आज आपण एका वेगळ्या चमत्काराबाबत बोलणार आहोत. सगळ्या जिवंत प्राण्यांत परमेश्वरी तत्त्व आहे असं त्यांनी जेव्हा प्रतिपादन केलं तेव्हा त्यांची चेष्टा झाली. त्यांना आव्हान देण्यात आलं की बाबा रे हे खरं असेल तर  ‘तो जो पलीकडे पखाल वाहत आहे, त्या रेड्यासही ज्ञाना म्हणतात. तर त्याच्या पाठीवर चाबकाचे फटके मारले तर तुझ्या पाठीवर वळ उठतील काय?’ ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, ‘तोही माझा आत्माच आहे. उठतील  पाठीवर वळ.’ त्या रेड्यावर आसूड मारले गेले. त्यांचे वळ खरोखरच ज्ञानदेवांच्या पाठीवर उठले.

येशू ख्रिस्ताने पण असं काही केलं असतं तर मजा होती. म्हणजे त्याला मारलेल्या फटक्यांच्या वेदना ती सुनावणार्‍या गवर्नर पिलातला होणे, डोक्यावर ठेवलेल्या काटेरी मुकुटामुळे त्याच्यावर आरोप करणार्‍या ज्यू धर्मशिक्षकाच्या डोक्यावर जखम होऊन त्यातून रक्त वाहणे, किंवा उचललेल्या क्रूसाच्या वजनाने कुणीतरी भलतंच वाकणे. असं झालं असतं तर येशू ख्रिस्ताने समजा तिथेच स्वतःला काहीही घोषित केलं असतं तरी झाडून सगळे त्याच्या पायाशी लोळण घेऊन ख्रिस्ती झाले असते.  नंतरच्या काळात ख्रिस्तपूजा केल्यामुळे ज्या अगणित ख्रिश्चन लोकांना तत्कालीन राज्यकर्त्यांच्या हस्ते भयानक पद्धतिने मरण पत्करावं लागलं ते सगळे ख्रिस्ती बनल्यावर शांततेत दीर्घायुषी होऊन जगले असते.

ज्या येशूमुळे इतके लोक मेले त्यांची जबाबदारी येशूच्या माथी येत नाही का?

जो स्वतःला वाचवू शकला नाही तो इतरांना काय वाचवणार? घंटा?

=============================
मराठी स्वैर भाषांतरः मंदार दिलीप जोशी

अधिक ज्येष्ठ शु. ११, शके १९४०

मूळ हिंदी पोस्टः Anand Rajadhyaksha
=============================

Friday, May 11, 2018

"आजोळी आला आहेस, रिकाम्या हाताने कसं जाऊ देणार?"

"आजोळी आला आहेस, रिकाम्या हाताने कसं जाऊ देणार?"

मूळ हिंदी लेख:  © तनया प्रफुल्ल गडकरी (https://www.facebook.com/tanaya.gadkari/posts/1845350532199281)
मराठी रुपांतर: © मंदार दिलीप जोशी

हे शब्द फक्त प्रेम किंवा सामाजिक औपचारिकता नाहीत. हे समाजशास्र किंवा मानसशास्त्रात सांगितलेले सिद्धांत प्रत्यक्षात सिद्ध करायची उदाहरणे देखील नव्हेत.

हे शब्द म्हणजे धर्माचे प्राण आहेत. भारताचा आत्मा आहे.

दवबिंदूंसारखे मनाच्या प्रत्येक कोपर्‍याला हलकेच भिजवून शीतलता प्रदान करणारे हे शब्द साधारण साडेपाच वर्षांपुर्वी ऐकल्याचं आठवतं.

२०१२ सालच्या थंडीतली गोष्ट आहे. नवी दिल्ली येथे IBTL भारत संवाद च्या कार्यक्रमात आदरणीय श्रीमती निर्मला सीतारामन, डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी, श्री महेश गिरी,श्री शेषाद्रि चारी, श्रीमति मीनाक्षी लेखी यांच्या आधी एक अपरिचित गृहस्थ मंचावर आले.

श्री रामअवतार शर्मा जी।

सीतामाता, प्रभू श्रीराम, आणि लक्ष्मण यांच्या पदचिह्नांचा माग काढत अयोध्या ते रामेश्वरम् आणि तिथून जनकपुर पर्यंत चक्क सायकल दामटवत आले होते. त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितलं की त्यांच्या मार्गातील वनवासी बंधूभगिनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल असे बोलत होते जणू काही वेळापूर्वीच राम तिथून पुढे गेले असावेत.

जनकपुरात त्यांना आलेल्या एका सुंदर अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणतात:

जनकपुरच्या मंदिराच्या महंतजींना मी भेटायला गेलो, तेव्हा मी त्यांचा कुणीच लागत नसतानाही एखाद्या जवळच्या नातेवाईकाचं करावं तसं त्यांनी माझं आदरातिथ्य केलं. एक संपूर्णपणे अनोळखी व्यक्ती असूनही!

मी जेव्हा तिथून निघालो, तेव्हा त्यांनी माझ्या हातात एक पाकीट ठेवलं. मला वाटलं, मंदिरातला अंगारा असेल. आगाऊपणे उघडून बघितलं तर त्यात शंभराची नोट होती! मी आश्चर्यचकित होऊन त्यांना विचारलं की "बाबाजी मी तर एक गृहस्थ आहे, खाऊन पिऊन सुखी आहे, नीट चाललंय सगळं, मग तुमच्या सारख्या महात्म्याने मला पैसे का द्यावेत?"

बाबाजी म्हणाले, "सीतेला काय म्हणता तुम्ही?"

मी म्हणालो, "सीतामाता...सीता आई आहे आमची."

त्यावर बाबाजी एकदम मान उंचावून गर्वाने म्हणाले, "अरे सीता माझी मुलगी आहे. आजोळी आला आहेस, रिकाम्या हाताने कसं जाऊ देणार?"
_________

श्री रामअवतारजींनी जेव्हा ही घटना सांगितली, तेव्हा ऐकणार्‍यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसली. मनात दाटलेल्या भावनांनी गंगाजमुना रूप घेऊन वहायला सुरवात केली.

आम्ही कुठे बाहेर गेलो, फिरायला गेलो, तीर्थक्षेत्री गेलो, कुठेही गेलो की माझे बाबा नेहमी म्हणायचे, "लोकांकडे एवढी श्रद्धा आणि ऊर्जा येते कुठून? त्यांच्यात एवढी विजिगिषा येते कुठून? काय आहे ती शक्ती? त्या स्त्रोताचा शोध घे!"

एकदम काहीतरी मनात चमकलं. मी वळून बाबांकडे बघितलं....त्यांचेही डोळे पाणावलेले होते.

हीच शक्ती आहे जिने सनातन धर्माचं मूळ सनातन स्वरूप जपलं आहे. सकाळी कॉलनीत झाडू मारणार्‍या मावशींना माझी, "राम राम मावशी, कशा आहात?" अशी आरोळी ऐकू आली नाही की ताडकन त्यांचा ठेवणीतला टोमणा ठरलेला असतो. त्यांना आणि मला जोडणारा माझा राम आहे. प्रभू रामचंद्र आणि सीतामातेचं चित्र गल्ल्यावर लाऊन लोकांची पादत्राणं शिवणारे काका याच सनातन धर्माला बळ देत असतात. प्रभू रामचंद्र आणि सीतामातेला भेटायला आलेल्या यात्रेकरूंच्या सेवेकरता मोठ्यातले मोठे श्रीमंत, अनवाणी धाव घेतात. त्यांच्यात आणि या तीर्थाटन करणार्‍या यात्रेकरूंच्यात पैसा, जात, पद, ओळखपाळख वगैरेंचा काही संबंध नसतो. ती सगळी प्रभू रामचंद्र आणि सीतामातेची लेकरं असतात.

आदरणीय गिरधारी लाल गोयल जी जेव्हा नमोंना दमात घेतात तेव्हा म्हणतात, "चार वर्ष साहेबांचं तोंड नाही बघितलं, आता आलेत आजोळच्या दारात आजीच्या डबोल्यावर डोळा ठेवून! हुं!!" या शब्दांत मला सनातनाला एकत्र बांधणारं हेच समान सूत्र दिसतं.

याचं आणखी एक उदाहरण रामअवतारजींनी दिलं. १९४७च्या आधी जनकपुरकडून अयोध्या प्रशासनाला काही रक्कम पाठवली जायची, जी राजर्षी जनक महाराजांकडून श्रीरामांना भेटीदाखल दिलेल्या जमीनीतून आलेल्या उत्पनातून दिली जायची. शतकानुशतकं चाललेली ही परंपरा १९४७ नंतर "स्वतंत्र" भारताच्या सरकारने बंद केली. जणू दोन देशांतल्या नातेसंबंधांना तिलांजली दिली, तो मान संपुष्टात आणला.

जेव्हा कम्युनिट चीन भारताच्या पूर्वोत्तर राज्यांत आपला प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने बौद्ध प्रतीकांना अस्त्रासारखं वापरून घेत होता, आम्ही "सेक्युलर स्टेट" होण्याचं प्रदर्शन करत आमचे जोडलेले संबंध विसरत आपल्याच माणसांना गमावत होतो.

मधे कुठेतरी हरवलेलं हे सूत्र आज परत मिळाल्यासारखं वाटतंय.

संपूर्ण भारतीय उपखंडासह दक्षिण पूर्वेकडचे समुद्राने वेढलेले देश उदाहरणार्थ कंबोडिया, वियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, थाईलँड, सिंगापुर वगैरे देश यांना मोत्यांची उपमा दिली तर या मोत्यांना ओवणारा बारीकसा दोरा कुठला, याची जाण भारताच्या सद्ध्याच्या पंतप्रधानांना आहे. म्हणूनच जेव्हा ते नेपाळचे पंतप्रधान खड्ग प्रसाद शर्मा ओली यांना "मेरे भाईसाहब" म्हणतात तेव्हा ते संबंध निव्वळ योगायोगाने, भौगोलिक परिस्थितीमुळे झालेल्या नैसर्गिक शेजार्‍यांमधले उरत नाहीत तर "आजोळ" आणि "मुलीचं सासर" यातले संबंध होऊन जातात.

याच मुळे सनातन भारताचं अस्तित्व अभंग आहे. बाकी दोन देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांमधे काय खेचाखेची चालायची ती चालूदे, ती चालतच राहणार. देशादेशात माणसं रेषा आखतात, त्या खोडल्याही जाऊ शकतात.

पण श्री रामनाम नामक सेतू ज्याने ओळखला, ज्याच्या मनःचक्षुंना दिसला, तो या समान सूत्राशी जोडला गेला किंवा त्याने स्वतःला जोडून घेतलं, असं समजा.

आता फक्त अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीची वाट बघुया.

बोला सियावर रामचंद्र महाराज की जय.

श्री रामअवतार शर्माजी यांचं वक्तव्य या लिंकमधे विशेषतः ७:३० आणि ८:१५ मिनीटे यांमधे पहा:


https://www.youtube.com/watch?v=gVSP8engVjY&feature=youtu.be



मूळ हिंदी लेख:  © तनया प्रफुल्ल गडकरी (https://www.facebook.com/tanaya.gadkari/posts/1845350532199281)
मराठी रुपांतर: © मंदार दिलीप जोशी
_____________________________________________

मूळ हिंदी लेख:  © तनया प्रफुल्ल गडकरी (https://www.facebook.com/tanaya.gadkari/posts/1845350532199281)

"नाना के घर आए हो, खाली हाथ कैसे जाओगे?"

ये शब्द महज़ स्नेह या लोक व्यवहार नहीं हैं! ये समाजशास्त्र या मानसशास्त्र को साधने की कला का उदाहरण भी नहीं हैं!

ये शब्द धर्म का प्राण हैं। भारत की आत्मा हैं!

आज से साढ़े पाँच वर्ष पहले सुने थे, तब से ओस की बूंदें बनकर हृदय को सींचते आए हैं... ये शब्द!

2012 की सर्दियाँ थीं। नई दिल्ली में आयोजित IBTL भारत संवाद प्रारंभ हुआ। (आदरणीय): श्रीमति निर्मला सीतारमण, डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी, श्री महेश गिरी, श्री शेषाद्रि चारी, श्रीमति मीनाक्षी लेखी इत्यादि नामों से पहले एक अपरिचित सज्जन मंच पर आए...
रामअवतार शर्मा जी।

साइकल से सीता-राम-लक्ष्मण के पदचिह्नों का अनुसरण करते हुए अयोध्या से रामेश्वरम् और जनकपुर तक यात्रा कर आए थे।

उन्होंने गाथा बताई.. कैसे राह भर के वनवासी श्री राम के विषय में यूँ बात करते मानों कुछ समय पहले ही राम वहाँ से होकर गए हों!

जनकपुर के विषय में एक सुंदर घटना कही। उन्हीं के शब्दों में:
__________
"जनकपुर का जो मंदिर है.. उसके महंत जी के पास मैं गया। उन्होंने मुझे रिश्तेदार की तरह रखा। अनजान आदमी को! जब मैं चलने लगा, उन्होंने मुझे एक लिफाफा दिया। मैंने सोचा, बाबा ने भभूत दी होगी! फिर मैंने बेईमानी से खोलकर देखा तो उसमें 100 रुपए का नोट था !!!
मैंने पूछा: बाबा मैं तो गृहस्थ हूँ, मेरी दाल रोटी चल रही है.. आप महात्मा होकर मुझे पैसे क्यों देते हैं?

बाबा बोले- सीता को क्या मानते हो?

मैंने कहा- सीता हमारी माँ है।

तो वो बड़े गर्व से बोले-सीता मेरी बेटी है। और तुम नाना के घर आए हो, खाली हाथ जाओगे क्या? "
_________

मुझे याद है... यह सुनकर सबकी आँखें जगमगा उठी थीं। भावों ने अश्रुओं का रूप धर लिया था!

अक्सर बाऊ 'जन दर्शन' कराते हुए कहते थे... "लोक इतनी श्रद्धा और ऊर्जा कहाँ से पाता है? यह जीवट कहाँ से आता है? वह शक्ति क्या है? उस स्रोत को खोजो!"

लगा कि जैसे 'स्रोत' का पता मिल गया है! मैंने पलटकर बाऊ को देखा.. उनकी भी आँखें नम थीं।

यही शक्ति है जो सनातन को सनातन रखे हुए है। सुबह सकारे कॉलोनी में झाड़ू देती, कचरा उठाती काकी को यदि मेरा " राम-राम सा। कैसे हैं ?" सुनाई ना दे तो फट से ताना मिल जाता है। उन्हें और मुझे मेरा राम जोड़ता है। सीताराम का चित्र अपने गल्ले पर लगाकर जूते सिलते बाऊजी सनातन को संबल देते हैं। सीताराम के नाम पर बड़े-बड़े धनिक श्रेष्ठी , जातरुओं की सेवा को नंगे पाँव दौड़ जाते हैं। उनमें और जातरुओं में धन, जाति, पद, परिचय का संबंध नहीं है.. पर सब सीताराम के बेटे-बेटी हैं।

आदरणीय गिरधारी लाल गोयल जी जब नमो को उलाहना देते हैं : "चार साल से पापाजी का तो मुंह तक नहीं देखा ,अब जेब खर्च के लिए नानी की गुल्लक पर निगाह गढ़ा के चल दिए ननसाल? हुँह!" तब मुझे यही सम्बन्ध सूत्र नज़र आता है। :)

इसका एक और उदाहरण राम अवतार जी ने दिया था। 1947 से पहले तक जनकपुर से अयोध्या प्रशासन को कुछ राशि भेजी जाती थी जो राजा जनक द्वारा अयोध्या को उपहार में दी भूमि से मिलती थी। सहस्त्राब्दियों की इस परंपरा को 47 के बाद बंद कर दिया भारत सरकार ने। दो देशों के मध्य रिश्तेदारी का मान खत्म कर दिया!

जब कम्युनिस्ट चीन उत्तर-पूर्वी भारत में अपना प्रभाव बढ़ाने के लिए बौद्ध प्रतीकों को अस्त्र बना रहा था, हम अपने रक्त संबंध भुलाकर 'सेक्युलर स्टेट' होने का प्रदर्शन कर अपनों को खो रहे थे।

मध्यांतर में खोया वह सम्बन्ध सूत्र आज पुनः मिला है।

भारत के वर्तमान प्रधानमंत्री को संपूर्ण भारतीय उपमहाद्वीप, दक्षिण पूर्व व महासागरीय देशों जैसे कंबोडिया, वियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, थाईलैंड, सिंगापुर इत्यादि को जोड़ने वाले इस धागे का पता है।

जब वह नेपाल के प्रधानमंत्री खड्ग प्रसाद शर्मा ओली को 'मेरे भाईसाहब' कहते हैं तो सम्बंध केवल संयोग से भौगोलिक पड़ोसी होने का नहीं रह जाता, 'नाना का घर' और 'बेटी का ससुराल' वाला हो जाता है।

इसी से सनातन भारत का अस्तित्व अखंड है । बाकी विदेश मंत्रालयों के मध्य खींचातानी का क्या है,वह तो चलती रहती है। इंसानों की खींची लकीरें बनती और मिटती रहती हैं।

श्री सीताराम नाम सेतु है। जो समझ गया सो जुड़ जाएगा, जोड़ लेगा।

बस अब अयोध्या में भव्य मंदिर की प्रतीक्षा है।

जयतु श्री सीता राम।

[ * देखें श्री रामावतार शर्मा जी का वक्तव्य। विशेषतः 7मिनट 30 सेकण्ड और 8:15 का भाग। ]

- © तनया प्रफुल्ल गडकरी (https://www.facebook.com/tanaya.gadkari/posts/1845350532199281)