Friday, April 27, 2018

प्रथम तुज पाहता

प्रथमदर्शी प्रेम अर्थात प्रथम तुज पाहता जीव वेडावला ही गोष्ट आधुनिक काळातली खचितच नाही. सीतामाईंना बघितल्यावर साक्षात प्रभू रामचंद्रांची अवस्था ही काहीशी अशीच झाली होती. त्या वेळी गौरीपूजनाला सीतामाई उद्यानात आल्या होत्या. अशा वेळी उद्यानात फिरणार्‍या प्रभू रामचंद्र व त्यांचे धाकटे भ्राता लक्ष्मण यांना सीतामाईंच्या एका सेविकेने बघितले आणि सीतामाईंकडे येऊन हर्षभरित भावाने दोन्ही बंधूंचे वर्णन केले. आपल्या त्या सेविकेकडून त्या अयोध्येच्या राजकुमारांचे वर्णन ऐकल्यावर सीतामाई आपल्या सख्यांसह प्रभू रामचंद्रांना बघण्यास आतुर झाल्या.

कंकन किंकिनि नूपुर धुनि सुनि। कहत लखन सन रामु हृदयँ गुनि॥
मानहुँ मदन दुंदुभी दीन्ही। मनसा बिस्व बिजय कहँ कीन्ही॥1॥

सीतामाई आणि त्यांच्या सेविकांच्या वावराने त्यांच्या बांगड्या, कंबरपट्टा, आणि पैंजणांचा आवाज ऐकून प्रभू रामचंद्रांचं लक्ष तिकडे गेलं. त्या वेळी झालेल्या प्रभू रामचंद्रांच्या अवस्थेचं वर्णन गोस्वामी तुलसीदास असं करतातः

अस कहि फिरि चितए तेहि ओरा। सिय मुख ससि भए नयन चकोरा॥
भए बिलोचन चारु अचंचल। मनहुँ सकुचि निमि तजे दिगंचल॥2॥

सीतामाईंच्या मुखचंद्राकडे बघण्याकरता प्रभूंच्या नेत्रांनी चकोर आकार धारण केला आणि ते सीतेकडे स्थिर दृष्टीने पाहू लागले, जणू निमी (राजा जनकाचे पुर्वज) (ज्यांचा निवास मानवाच्या पापण्यात आहे असे मानतात) यांनी मुलगी आणि जावई यांच्यात हा प्रसंग घडत असताना आपण तिथे उपस्थित राहू नये असे वाटून संकोचाने पापण्यांचा त्याग केला आणि त्यामुळे (हलक्या झाल्याने) प्रभू रामचंद्रांच्या पापण्या न मिटता त्या स्थिर राहून ते सीतामाईंकडे एकटक पाहू शकले.

देखि सीय शोभा सुखु पावा। हृदयँ सराहत बचनु न आवा॥
जनु बिरंचि सब निज निपुनाई। बिरचि बिस्व कहँ प्रगटि देखाई॥3॥
सुंदरता कहुँ सुंदर करई। छबिगृहँ दीपसिखा जनु बरई॥
सब उपमा कबि रहे जुठारी। केहिं पटतरौं बिदेहकुमारी॥4॥
सिय शोभा हियँ बरनि प्रभु आपनि दसा बिचारि॥
बोले सुचि मन अनुज सन बचन समय अनुहारि॥230॥
तात जनकतनया यह सोई। धनुषजग्य जेहि कारन होई॥
पूजन गौरि सखीं लै आईं। करत प्रकासु फिरइ फुलवाईं॥1॥
जासु बिलोकि अलौकिक सोभा। सहज पुनीत मोर मनु छोभा॥
सो सबु कारन जान बिधाता। फरकहिं सुभद अंग सुनु भ्राता॥2॥
रघुबंसिन्ह कर सहज सुभाऊ। मनु कुपंथ पगु धरइ न काऊ॥
मोहि अतिसय प्रतीति मन केरी। जेहिं सपनेहुँ परनारि न हेरी॥3॥
जिन्ह कै लहहिं न रिपु रन पीठी। नहिं पावहिं परतिय मनु डीठी॥
मंगन लहहिं न जिन्ह कै नाहीं। ते नरबर थोरे जग माहीं॥4॥

सीतामातेच्या सौंदर्याचे वर्णन मात्र प्रभू रामचंद्र उघड बोलून दाखवत नाहीत. पण ते लक्ष्मणाला म्हणतात की हे लक्ष्मणा, हीच ती जनककन्या सीता जिच्या प्राप्तीसाठी शिवधनुष्य उचलण्याची कठीण अट आहे. या सीतेला पाहून माझ्या मनात जे चालले आहे त्याचे कारण त्या विधात्यालाच ठावूक, पण हे लक्ष्मणा, माझी ऊजवी पापणी मात्र फडफड करते आहे. पण रघुवंशात जन्म घेतलेल्यांचा हा स्वभावच आहे की ते स्वप्नातही परस्त्रीवर (जी विधिवत आपली झालेली नाही ती) लालसायुक्त दृष्टी ठेवत नाहीत. इथे गंमत पहा, आपल्याला विश्वामित्र ऋषींनी इथे का आणलं आहे याची या दोघांना कल्पना आहे. प्रभू रामचंद्रांना आपल्या पराक्रमाबद्दल खात्रीही आहे की आपण शिवधनुष्याला उचलून प्रत्यंचा नक्की चढवू आणि सीतेला पत्नी म्हणून प्राप्त करु. पण त्यांना आपण थोर अशा रघुकुलातले आहोत याची जाणीव आहे आणि त्या कुलाची मर्यादाशील परंपरा राखायची आहे म्हणून आपल्या भावना ते नियंत्रणात ठेऊ इच्छितात.

चितवति चकित चहूँ दिसि सीता। कहँ गए नृप किसोर मनु चिंता॥
जहँ बिलोक मृग सावक नैनी। जनु तहँ बरिस कमल सित श्रेनी॥1॥

आता सीतामाईंना त्यांच्या सखीने प्रभूंचे वर्णन करुन दोघांच्या दिशेने आणलं खरं पण सीतेला राम दिसेना. आपल्या लहानशा मृगनयनांनी सीतामाई प्रभूंना शोधू लागल्या.

लता ओट तब सखिन्ह लखाए। स्यामल गौर किसोर सुहाए॥
देखि रूप लोचन ललचाने। हरषे जनु निज निधि पहिचाने॥2॥

त्यांची ही अवस्था न बघवल्याने शेवटी सख्यांनी त्यांचे लक्ष प्रभू व भ्राता लक्ष्मण जिथे होत तिथे वेधून घेतलेच. वेलींच्या आडून प्रभूंचा चेहरा दिसताच सीतामाईंच्या डोळ्यांत अतीव समाधान दाटलं, की जणू त्यांना त्यांचा खजिनाच मिळाला असावा.

थके नयन रघुपति छबि देखें। पलकन्हिहूँ परिहरीं निमेषें॥
अधिक सनेहँ देह भै भोरी। सरद ससिहि जनु चितव चकोरी॥3॥
लोचन मग रामहि उर आनी। दीन्हे पलक कपाट सयानी॥
जब सिय सखिन्ह प्रेमबस जानी। कहि न सकहिं कछु मन सकुचानी॥4॥

सीतामाईंचे डोळे आता प्रभू रामचंद्रांकडे एकटक पाहू लागले. ते रूप डोळ्यांच्या मार्गे हृदयात साठवून घेत तो खजिना बाहेर पडू नये म्हणून की काय सीतामाईंनी डोळे मिटून घेतले.

लताभवन तें प्रगट भे तेहि अवसर दोउ भाइ।
तकिसे जनु जुग बिमल बिधु जलद पटल बिलगाई॥232॥

(इतक्यात एकमेकांशी बोलता बोलता) दोघे बंधू वेलींच्या आडून बाहेर आले. ढगांच्या आडून बाहेर आल्यावर ज्याप्रमाणे चंद्रदर्शन होते तसेच ते दृश्य होते. प्रभू रामचंद्रांचे सौंदर्य व पराक्रमी व्यक्तिमत्व सीतामाईंना मोहित करुन गेले.

सकुचि सीयँ तब नयन उघारे। सनमुख दोउ रघुसिंघ निहारे॥
नख सिख देखि राम कै सोभा। सुमिरि पिता पनु मनु अति छोभा॥2॥

पण त्याच वेळी आपल्या पित्याने आपल्याशी लग्न करायला ठेवलेली अट आठवून सीतामाई घाबरल्या. प्रभू रामचंद्रांच्या पराक्रमावर कितीही विश्वास असला तरी मन चिंती ते वैरी न चिंती असे वाटणे साहजिकच होते.

परबस सखिन्ह लखी जब सीता। भयउ गहरु सब कहहिं सभीता॥
पुनि आउब एहि बेरिआँ काली। अस कहि मन बिहसी एक आली॥3॥

पण अशा प्रकारे बराच वेळ उद्यानात घालवल्याची जाणीव झाल्यावर सीतामाईंची अशी प्रभू रामचंद्रांच्या प्रेमात मुग्ध झालेली अवस्था पाहून सख्या घाबरून म्हणाल्या की आता फारच उशीर झाला बाई. सीतामाईंना पाहून एका सखीला मात्र चेष्टा करण्याची हुक्की आली. ती म्हणते कशी, आपण उद्या पुन्हा याच वेळी इथे येऊ.

गूढ़ गिरा सुनि सिय सकुचानी। भयउ बिलंबु मातु भय मानी॥
धरि बड़ि धीर रामु उर आने। फिरी अपनपउ पितुबस जाने॥4॥

आणि प्रभू रामचंद्रांना बघण्यात आपण खूपच वेळ घालवला हे लक्षात आल्याने आता आई काय म्हणेल या भीतीने सीतामाईंचा जीव कासावीस झाला आणि त्या प्रभू रामचंद्रांची छबी आपल्या हृदयात साठवून आपल्या राजवाड्यात परतल्या.

म्हटलं होतं ना, 
प्रथमदर्शी प्रेम अर्थात प्रथम तुज पाहता जीव वेडावला ही गोष्ट आधुनिक काळातली खचितच नाही. आणि त्याचं इतकं सुंदर वर्णन तुलसीदासच करू जाणोत.

बोला, जय श्री राम !

- मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. नवमी, शके १९३९


Saturday, April 21, 2018

कठुआच्या निमित्ताने मतदानावर बहिष्कार घातक

सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी काही केलं नाही तर आम्ही मतदान करणार नाही - अशा अर्थाची पोस्ट ज्याने पहिल्यांदा लिहीली तो इसम चपलेने बडवून काढण्याच्या लायकीचा आहे.

ही पोस्ट ज्या भोळसटपणे** काही महिलावर्गाने पोस्ट केली त्यांना माझा कोपरापासून नमस्कार.

NOTA चा प्रचार कमी पडतो आहे असं वाटलं म्हणून आता कठूआ आणि उन्नाओ प्रकरणाचा फायदा घेऊन टाळूवरचं लोणी खाणारेच हा धंदा करत आहेत.

मतदान न केल्याने काय होणार आहे ते आपण आता पाहू.

आपण लोकशाहीत राहत असल्याने तुम्ही मतदान केलं नाहीत तरी निवडणुका व्हायच्या थांबणार नाहीत.

मतदान करणार नाही असं "माझी झांशी मी देणार नाही" या आवेशात ज्या म्हणत आहेत त्यातल्या बहुतेकांनी मोदी सरकारला मत दिलेलं आहे. मी हे ठामपणे म्हणू शकतो की हे सरकार त्याच्या सर्व गुणदोषांसकट काँग्रेस व त्याच्या भेळपुरी सरकारांच्या हजारो पटींनी चांगले आहे. असं असताना मतदान न केल्याने फक्त मोदी सरकारची अर्थात भाजपची मते कमी होतील आणि पुन्हा इटालियन मम्मी प्रणित काँग्रेस पुरस्कृत सरकार सत्तेवर येईल. मग कर्नल पुरोहित वगैरेंवर जे झालं ते सामान्य नागरिकांवर सुरु होईल. हिंदूंचं जगणं सद्ध्या मुश्कील असेल तर तेव्हा ते अशक्य होऊन बसेल. विचार करा, मतदान करु नका असं आवाहन करणार्‍या लोकांना कुणाच्याही अब्रूची पडलेली नाही. त्यांना फक्त या घटनांचा फायदा घेऊन मोदी सरकार खाली खेचायचे आहे आणि परत जनतेला आणि हिंदूंना छळायला सत्तेत यायचे आहे. आणि ते सत्तेत आल्यावर नक्की असं म्हणणार आहेत की "तुम्ही तर मतदान केलंच नाहीत, आम्ही कशाला तुमचे प्रश्न सोडवू".

खात असलेल्या अन्नाला चव नाही म्हणून ते टाकून तुम्ही शेण खाणार का? तसं असेल तर खरंच मतदान करु नका.

पण भावनेच्या भरात एका देशविघातक लांडग्याने केलेले घातक आव्हान भोळसटपणाने** आपल्या टाईमलाईनवर शेअर करु नका. हलकट लोकांनी टाकलेल्या वैचारिक शेणाचे पो आपल्या भिंतींवर थापू नका - दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ. परमेश्वराने डोक्यावर जो अवयव बसवला आहे त्याचा उपयोग करा आणि काहीही पोस्ट करण्याआधी सांगोपांग विचार करा.

माझं म्हणाल तर मी २०१९ मधे कमळावरच बटन दाबणार आहे. फिर एक बार, मोदी सरकार.

© मंदार दिलीप जोशी

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10155670347982326&id=652482325

**बावळटपणा म्हणणार होतो, पण जाऊदे म्हटलं आणि भोळसटपणे हा शब्द वापरला.

कठुआ, सिरीया, आणि आपण

कठुआ येथे झालेल्या तथाकथित बलात्कार आणि खून प्रकरणानंतर तसेच अमेरिका, फ्रान्स, आणि ब्रिटन यांनी सिरीयावर पुन्हा सुरु केलेल्या बॉम्बवषावाच्या निमिताने माध्यमांनी आणि इतर घटकांनी जी राळ उधळली आहे त्यातून तरुन जायचं असेल तर काही तथ्यांचा आणि तर्कांचा खोलवर जाऊन विचार करणे भाग आहे.

मनुष्याला मन आहे आणि मन म्हटलं की भावना आल्याच. वरवर उदात्त हेतू असल्याचं दाखवत मनुष्यस्वभावातील कमकुवत बाजूंचा व्यवस्थित अभ्यास करुन त्यांचा उपयोग छुपे घाणेरडे हेतू साध्य करायला वापर केला जातो, जात आहे याची नोंद आपण घेणं आवश्यक आहे. लहान मुलांना होणारे त्रास हा विषय निघाला की साहजिकच आपण भावुक होतो. त्यातही मातृसुलभ भावनेमुळे सगळ्याच स्त्रीया लहान मुलांच्या बाबतीत खूप हळव्या असतात, मग अशा घटना घडल्यावर या हळव्या बाजूचा गैरफायदा घ्यायला काही भामटे सरसावले नाहीत तरच नवल आहे.  ही गोष्ट अधिक स्पष्ट करायला एक उदाहरण पाहूया. समजा तुम्हाला बातमी सांगितली गेली की 'सिरीयात एक ३० वर्षीय तरुण बॉम्बवर्षावात मेला" तर त्यावर तुमची प्रतिक्रिया ही फार फार तर "अरेरे वाईट झालं" या उद्गारांपलिकडे नसेल. पण वयाच्या याच आकड्यातून शून्य काढून तुम्हाला सांगितलं की 'सिरीयात बॉम्बवर्षावात ३ वर्षांचा मुलगा दगावला' तर त्यावर त्वेषाने व्यक्त होणं आणि ज्यानी कुणी हे घडवून आणलं त्याचा निषेध करणं हे तुम्हाला तुमचं नैतिक कर्तव्य वाटेल.

आपल्याला जेव्हा हे सांगितलं जातं की एका ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला, तेव्हा आपल्या मेंदूतला मातृपितृसुलभ सहानुभूतीचा कोपरा जागृत होतो, पण त्यानंतर जो भावनांचा महापूर येतो त्याच्यात मात्र दुष्प्रचार करणार्‍यांनी पेरलेल्या खोट्या बातम्यांखेरीज काहीही नसतं. कठुआत घडलेल्या घटनेनंतर आपल्या मनाच्या याच कमकुवत बाजूचा फायदा घेत सहानुभूती आणि रोषाचा ओघ हा आपल्याच धर्माची आणि संस्कृतीची बदनामी करण्याकडे वळवायचा. आणि दुसरीकडे मेलेल्या लहान मुलांचे खरेखोटे फोटो पसरवून युरोपात बहुसंस्कृतिवादाचा प्रसार करायचा आणि सिरीयातील असाद सरकारला अस्थिर करायची मोहीम चालवायची.

लहान मुलांबद्दल आपल्याला असलेल्या नैसर्गिक सहानुभूतीचा फायदा घेऊन त्याचा उपयोग भलत्याच गोष्टीसाठी करुन घेणे ही नवीन गोष्ट राहिलेली नाही. जरा मागे गेलं तर युगोस्लाव्हिया आणि सर्बियाचे नेते स्लोबोदान मिलोसोविच यांना असाद यांच्या प्रमाणेच बदनाम करुन अमेरिका आणि नेटोच्या हवाईदलांनी कोसोवो आणि सर्बियावर इतका बॉम्बवर्षाव केला की मिलोसोविच यांच्यावर जितकी मुलंमाणसं मारण्याचा आरोप होता त्याच्या कित्येक पटींनी माणसं या बॉम्बवर्षावात मारण्यात आली. वर दिलेल्या उदाहरणाचा प्रयोग अमेरिकेत करुन बघितला तरी परिणाम तोच होईल. अमेरिकेत कुणालाही विचारा की सिरीयात अमेरिकेने हस्तक्षेप करावा का? तर उत्तर नाही असंच येईल. पण हा प्रश्न विचारताना "असाद सरकारमुळे आज २० मुलं मेली" हे शेपूट जोडून दिलंत, की तीच व्यक्ती फेफरे आल्यागत उच्चरवाने मुलांचा खुनी असादला खाली खेचायचा सल्ला देईल. मग त्याचे परिणाम अधिक मुलांच्या मृत्यूमध्ये होणार असल्याचं त्याच्या गावीही नसेल.

लहान मुलांबद्दल आपल्याला असलेल्या सहानुभूतीची कारणं जैविक तर आहेतच पण इतिहासाला योग्य परिप्येक्षातून बघायला आपण अजूनही न शिकणं हे कारणही तितकंच महत्त्वाचे आहे. माध्यमं आणि इतर घटकांनी चालवलेल्या मोहिमांत लहान मुलांच्या डोक्यावर निरपराध असल्याचा शिका उमटतो आणि तशी ती खरोखरच निरपराध असतातही, पण हे जग इतकं साधं सोपं नाही. लहान मूल हे आकाशातून पडलेलं रत्न नसतं, तर ते फक्त भूतकाळ आणि भविष्यकाळ यातील एक दुवा म्हणून काम करत असतं. ते कितीही निरपराध असलं तरी ते स्वतःला भूतकाळातून आलेल्या नाचणार्‍या भुतांपासून आणि क्रूर भविष्यकाळापासून वाचवू शकत नाही. आयुष्य जगताना, जगण्यासाठी त्याच्या पूर्वजांनी ज्या पर्यायांची निवड केली त्यांची, किंमत त्याला चुकवावीच लागते भले ते पर्याय निवडण्यात त्याचा काहीही हात नसला तरीही. उदाहरणतः आपल्या पूर्वजांनी ज्या पर्यायांची निवड केली त्याचे परिणाम आपण भोगतोच आहोत; यात सद्गुण विकृतीने पछाडलेल्या हिंदू राजांचा आणि देश चालवायला काँग्रेसला उत्तम पर्याय समजणार्‍या आपल्या वाडवडिलांचाही समावेश करावा लागेल. माझ्या मुलांनाही मी निवडलेल्या पर्यायांच्या परिणामांना सामोरे जावे लागेल, त्यात त्यांचा काहीही निर्णयाधिकार नसला तरी. इतिहास हा एक कालखंड नसून सतत घडणार्‍या घटनांची एक साखळी आहे, त्यामुळे कुठल्याही घटनेला भावनावेगात वेगळं कढून पुढचे, मागचे, आणि आजूबाजूचे संदर्भ वगळून तपासल्याने त्यातले प्रयोगसिद्ध वास्तविकता बदलत नाही.

याचा विचार केला तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला "पुढे काय?" याचा विचार न करता येणे किंवा पुढे काही घडले असल्यास त्याची नोंद न घेता येणे हा आहे. सिरीयाचे अध्यक्ष असलेले असाद हे लहान मुलांचे खूनी आहेत म्हणून यांना पदच्युत करा असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण "असाद यांना पदच्युत करणे" या नंतरच्या परिणामांचा विचार करणे सोडून दिलेले असते. सद्दाम हुसेन यांना फाशी दिल्या क्षणी इराकचा विचार करणं आपण थांबवतो.

आणि आपण असिफाच्या तथाकथित बलात्कार्‍यांना/खुन्यांना फाशी द्या असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण ही घटना देशविघातक घटक सद्ध्या सत्तारूढ असलेलं सरकार खाली खेचायला किंवा त्या सरकारचं निव्वळ अस्तित्व हे हिंदूंच्या रानटी मनोवृत्तीचे प्रतीक असल्याचा तद्दन खोटा प्रचार करायला कसं वापरुन घेत आहेत याचा विचार करणं बंद केलेलं असतं.

काय आहे, भोळसट असायला हरकत नाही. पण देव, देश, आणि धर्म यांच्याबद्दल दुष्प्रचार करणारे आपल्याला वापरुन घेतील इतकं बावळट असणं कितपत योग्य हे ज्याचे त्याने ठरवावे.

© मंदार दिलीप जोशी व Satish Verma

त्याच्या आत्याबाईची शेजारीण

हे असलं शीर्षक? काय आहे अर्थ याचा? आणि कोण तो? कोण त्याची आत्याबाई? आणि कोण त्या आत्याबाईची शेजारीण? अहो ती शेजारीण म्हणजे आपण सगळे....हो तुम्ही आम्ही सगळे.

सांगतो. यातला तो म्हणजे लेओनिड निकोलाएव नावाचा रशियन. आता त्याच्या आत्याबाईबद्दल आणि तिच्या शेजारणीबद्दल जाणून घेण्याआधी आपण सरगेई किरोव्ह (Sergei Kirov) याच्याबद्दल जाणून घेऊया. आता हा कोण आला मधेच? सांगतो.

सरगेई किरोव्ह (Sergei Kirov) हा रशियाचा क्रूरकर्मा हुकूमशहा स्टॅलिनचा उजवा हात समजला जायचा. १ डिसेंबर १९३४ साली लेनिनग्रॅड शहरात त्याची गोळी घालून हत्या करण्यात आली. हत्या करणारा होता लेओनिड निकोलाएव नावाचा ३० वर्षांचा रशियन तरुण. या हत्येमुळे संपूर्ण सोवियत रशियात प्रचंड खळबळ माजली. खुद्द स्टॅलिन मॉस्कॉतून रेल्वेगाडीतून लेनिनग्रॅडला रवाना झाला.

१ डिसेंबरला निकोलएवला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याला गोळी घालून मारण्यात यावं असा आदेश बजावण्यात आला. यात कारण असं बाहेर आलं की निकोलाएवच्या पत्नीशी किरोव्हने अनैतिक संबंध ठेवले होते म्हणून चिडून निकोलाएवने त्याची हत्या केली. पण सोवियत रशियात अशी कारणं किती खरी असतील याची कल्पना केलेलीच बरी.

तर निकोलाएवने ही हत्या कुणाचीही मदत न घेता एकट्यानेच केल्याचं सांगितलं. पण स्टॅलिननं या घटनेचा पुरेपूर फायदा घेतला, निकोलाएवशी संबंध असलेल्या नसलेल्या अनेकांना सरळ उचलून देहदंडाची शिक्षा सुनावण्याचा त्याने सपाटा लावला. या शिक्षेविरुद्ध कुठलंही अपील करता येत नसे. निकोलाएवशी तुमचा संबंध असणं हे एकच कारण सांगितलं की अपील तर सोडाच खटलाही धड चालवला जाण्याची शक्यता शून्य होती. उचलल्या जाणार्‍यांच्यात निकोलाएवचे नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारी-पाजारी कुणालाही सोडलं गेलं नाही. यात एलिझाबेथ लेरमोलो नामक एका महिलेला देहदंड मिळण्याचं कारण तुम्हाला सांगितलं तर तुम्ही चाट पडाल. ही महिला निकोलएवच्या आत्याची शेजारीण होती.

किरोव्हच्या हत्येचं निमित्त करुन स्टॅलोनने भीषण हत्याकांड आरंभलं. कम्युनिस्ट पार्टीचे हजारो कार्यकर्ता आणि सामान्य जनतेतले कोट्यावधी निरपराध नागरिकांची हत्या केली गेली. या प्रकाराची दहशत इतकी होती की सर्वसामान्य माणूस श्वास घेतानाही विचार करत असे.

किरोव्ह स्टॅलिनच उजवा हात समजला जात होता खरा, पण खरंच स्टॅलिनला त्याच्याबद्दल इतकी आत्मीयता होती?

नाही. त्यावेळच्या साहित्याचा कानोसा घेतला तर अनेकांचं असं म्हणणं होतं की किरोव्हची हत्या स्टॅलिननेच घडवून आणली होती. किरोव्ह स्टॅलिनचा उजवा हात समजला जात होता याचा अर्था त्याची लोकप्रियता सुद्धा रशियन जनतेत वाढत होती. स्टॅलिनला असा संशय होता की त्याने व कम्युनिस्ट पार्टीने ज्या सातत्याने विरोधकांच्याच नव्हे तर सामान्य नागरिकांच्या हत्या घडवून आणल्या होत्या त्याने रशियन जनता विटली होती आणि कदाचित स्टॅलिनला पदच्युत करुन किरोव्हला राष्ट्राध्यक्षपदी बसवेल.

कदाचित किरोव्हच्या हत्येत स्टॅलिनचा हात नसेलही, पण त्याच्या मृत्यूचा फायदा स्टॅलिनने पुरेपूर उचलला. क्रूरतेची परिसीमा गाठत सत्तेवरची आपली पकड त्याने घट्ट केली.

पण त्याने किरोव्हला खरंच न्याय मिळाला? 

--------------------------------------

असिफाला पण न्याय मिळायलाच हवा. कारण जानेवारीमध्ये झालेल्या हत्येची आत्ता अचानक वर येणं ही बाब संशयास्पद आहे. जवळजवळ तीन महीने हे षडयंत्र रचलं जात होतं का? कधी बोंब ठोकायला सुरवात करायची, कुणाकुणाला उचलायचं, कुठल्या समूदायाची बदनामी करायची, कुठल्या चॅनलनी कुठला मुद्दा उचलायचा याची पटकथा तर लिहीली जात नव्हती? असिफा बकरवाल समाजाची होती. बकरवाल समाजाने कधीही पाकिस्तानचे समर्थन केलेलं नाही आणि कधीही काश्मीरी स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍यांच्या कच्छपी हा समाज लागलेला नाही. त्यातून वानी सारख्या बलत्काराचा आरोप असलेल्या आणि जिलानी या फुटीरतावादी नेत्याशी संबंध असलेल्या पोलीस अधिकार्‍याला बाहेरून तपासासाठी बोलवून घेणं ही बाब संशय वाढवणारी आहे. आणखी एक बाब म्हणजे सीबीआय चौकशीला दिलेला नकार आणि मुख्य्मंत्री मेहबूबा मुफ्ती यांची धक्कादायक विधाने.

असिफाला न्याय मिळायला हवा, तिच्यावर बलात्कार झालाच असेल तर बलात्कार्‍यांना शिक्षा व्हायलाच हवी. असं ऐकलं होतं की सैन्याला मोकळिक दिली गेली तेव्हा मेहबूबांनी त्याला विरोध केला होता, पण दिल्लीहून जवळजवळ रडतरडतच परत यावं लागलं होतं. And hell hath no fury greater than a woman scorned. मुलीच्या बदल्यात जहाल अतिरेक्यांना सोडणार्‍या बापाचं रक्त आहे ते, कधी ना कधी कुठे ना कुठे  आपला रंग दाखवणारच.

असिफाला न्याय मिळायला हवा. या घटनेची निःपक्षपाती चौकशी झालीच पाहीजे, आणि जे कुणी गुन्हेगार सापडतील त्यांची जात, धर्म, पद आणि समाजातील स्थान हे न बघता शिक्षा व्हायलाच हवी.

इथे एक गोष्ट आठवली ती जाता जाता सांगतो. सहसा हिंदू समाज एक धर्म म्हणून बलात्कार्‍यांचा साथ कधीच देत नाही. मुसलमानांची इतक्या वर्षांची सोबत असूनही हा दुर्गुण हिंदूंनी अजून अंगी बाणवलेला नाही. अलिगढमधे ख्वाजा चिश्तीच्या वंशजांनी घडवलेल्या मोठ्या यौन शोषण कांडात काही हिंदूनाही सामील करुन घेतलं होतं, पण जेव्हा ते पकडले गेले तेव्हा त्यांना हिंदू समाजाने साथ दिली नाही. त्यातल्या एकाने तर हा ताण सहन न होऊन आत्महत्या केली. निर्भया कांडातल्या आरोपीने देखील तुरुंगातच आत्महत्या केली होती हे तुम्हाला आठवत असेलच.  पण चिश्ती आरोपींना मुस्लीम समाजाने दूर लोटलं नाही. त्यांच्या मागे ते ठामपणे उभे राहिले. निर्भया कांडातला तथाकथित अज्ञान आरोपी मोहम्मद अफरोजच्या पाठीशी सुद्धा मुसलमान समाज उभा राहिला. एकाही मुसलमान नेत्याने त्याचा निषेध केला नाही. महालक्ष्मी येथील शक्ती मिल्स रेप प्रकरणात सापडलेल्या मुस्लीम आरोपीची आईच त्याच्या जन्माचा दाखला घेऊन कोर्टात आली होती. तो आता मोकळा झालं आहे आणि हप्ते वसुलीचा बिझनेस करतोय. त्याच्या समाजाने त्याला साथ दिल्यामुळे.

असिफाचं निमित्त करुन नाहक हिंदू समाजाला लक्ष्य केलं जातंय. आपली जम्मूतली जनता इतकी पोलीसविरोधी कशी झाली याचीही चौकशी व्हायला हवी. वानी नावाच्या त्या पोलीस अधिकार्‍याचे चरित्र जनतेसमोर यायला हवं, आणि त्याला बाहेरून या घटनेची चौकशी करायला का आणलं गेलं याचीही चौकशी केली जायला हवी.

आणि हो, असिफाला, आणि तिच्यासारख्या सर्वांनाच, न्याय मिळायलाच हवा.

आपली निकोलाएवच्या आत्याबाईची शेजारीण व्हायची नाहीतर!

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10155668427647326&id=652482325

- © मंदार दिलीप जोशी

Monday, March 5, 2018

गलती शास्त्रों में नहीं

यह चुटकुला अर्थात जोक फिर एक बार व्हॉट्सॅप पर आया:

धरम पिता - असली पिता नहीं
धरम माता - असली माता नहीं
धरम पुत्र  - असली पुत्र नहीं
धरम भाई - असली भाई नहीं
धरम बहन - असली बहन नहीं
लेकिन ऐसी जबरदस्त गलती हुई कैसे?
धरम पत्नी मतलब असली पत्नी.
पता करो शास्त्रों में कहां गलती हुई!!!

😜😝😂😂😷😷

गलती शास्त्रों में नहीं, इस जोक को लिखने वाले के दिमाग में हुई है. जरा तर्क लगाएंगे तो इसमें क्या गलती है ये आप को जल्द समझ आ जाएगा.

माता, पिता, पुत्र, बहन, भाई ये सब खून के रिश्ते होते है. इसी लिये आप जब किसी परिचित को इनमें से किसी रिश्ते की तरह मानने लगते हैं तो उसे धर्म का रिश्ता कहा जाता है, क्योंकी आपने उस इन्सान के साथ उस रिश्ते का धर्म की तरह निष्ठा से पालन करना एवं निभाना चाहते हैं.

धर्म की परिभाषा देते हुए भीष्म पितामह महाभारत में कहते हैं— धारणात् धर्म इत्याहुः धर्मो धारयति प्रजाः। यः स्यात् धारणसंयुक्तः स धर्म इति निश्चयः।। अर्थात्—'जो धारण करता है, एकत्र करता है, उसे ''धर्म'' कहते हैं। धर्म प्रजा को धारण करता है। जिसमें प्रजा को धारण कर एकसूत्र में बाँध देने की सामर्थ्य है, वह निश्चय ही धर्म है।'
कोई स्त्री आपकी पत्नी बनके जन्म नहीं लेती, आप इस नाते को धारण करते हैं. सामान्यतः आपकी पत्नी से आपका कोई खून का रिश्ता नहीं होता. इसी कारणवश जिस स्त्री से आपकी शादी होती है उसे धर्मपत्नी इसीलिये कहा जाता है की आप ने कोई खून का रिश्ता न होते जन्म का बंधन स्वीकार करते हुए उसका शारीरिक एवं मानसिक तौर पर निष्ठा के साथ जीवनभर साथ देने का निर्णय लिया होता है. अर्थात, आपके जिस स्त्री को पत्नी का दर्जा दिया है उसका इस प्रकार साथ देना आपका दायित्व होता है, अर्थात धर्म होता है. जैसे की आपने किसी को अपना पिता या बहन मानकर उस रिश्ते को निभाने का वचन दिया हुआ होता है.

इसी लिये कहा था, गलती शास्त्रों में नहीं, इस जोक को लिखने वाले के दिमाग में हुई है.

हर बात पर राम, सीता, शास्त्र, वेद, पुराण इनपर चुटकुले सुनाना बंद किजीये और ऐसे चुटकुले आयें तो उनको आगे ढकेलना भी.


© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन कृ. ४, शके १९३९

श्री रामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम्

प्रातःकाल में दिनदर्शिका अर्थात कैलेंडर की ओर ध्यान गया और देखा रामनवमी अर्थात भगवान श्री राम का जन्मदिन निकट आ रहा है. इस से कुछ महीनों पहले घटी एक घटना का स्मरण हुआ.

रात्रि के भोजन के कुछ समय पश्चात पलंग पर लेटे लेटे बेटा कहने लगा की पिताजी मै नहीं सोऊंगा, नींद नहीं आ रही है. वो आप कभी कभी गाना सुन रहे थे वो फिरसे लगाईये, थोडी देर सुनूंगा. बहुत अच्छा है, ऐसा गाना तो कोई गा नही सकता." छोटा है, मेरे समझ के अनुसार वह कहना चाह रहा था कि बहुत अनुठा गाना है.

वैसे वो कोई गाना नहीं था, तुलसीदासजी लिखित रामस्तुती "श्री रामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम्" थी. मै जो सुन रहा था उसे गायकों ने थोडा तेज गति से गाया था. केवल २ मिनट की होगी. मैने जैसे ही वो लगाई, समाप्त होने से पहले ही मुख पर समाधान के भाव लिये बेटेजी एकदम शांती से सो गये थे.

बहुत अचरज हुआ, इस कारण कि अगर वो सोना नहीं चाहता तो नहीं सोता, चाहे कितनी भी नींद आ रही हो.

कुछ दिनों मे बेटेजी को इसका मराठी में अर्थ बता दिया. रामस्तुती का अर्थ जानकर बेटेजी को भी बडा आनंद आया.

मेरा मानना है हम बच्चों को ऐसी हमारे भगवान, उनके अवतार, तथा ऐतिहासिक व्यक्तियों एवं संस्कृती से जुडी कहानियां, स्तोत्र, या गाने सुनाते रहना चाहीए क्योंकि इस प्रकार के ऑडियो/विज्युअल संस्कार आज के समय में बच्चों मे मन पर गहरा असर करते हैं. फिर न कोई वामी इन पर असर कर पायेगा न अधर्मी.

का कही?!

© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन कृ. ४, शके १९३९