Thursday, July 6, 2017

चुळचुळ मुंगळा, एकसुरीपणा, एकाग्रता आणि मन:स्वास्थ्य

[काही दिवसांपूर्वी आनंद राजाध्यक्ष यांनी हिंदीत एक लेख टाकला होता. मोनोटोनी किंवा एकसुरीपणा याबद्दल ती पोस्ट होती. ती टाकली असती तर लगेच मराठीत पण लिही अशी मागणी झाली असती म्हणून मराठी करुन टाकतो आहे. ती पोस्ट आज आठवण्याचे कारण म्हणजे वैद्य परीक्षित शेवडे यांनी आज एका फिजेट स्पिनर नामक खेळण्यावर लिहीलेली पोस्ट. या दोन्ही लेखांतला संबंध लक्षात आला आणि डोक्यात असंख्य दिवे पेटले. दोन्ही लेखांची सांगड घालून लिहीण्याचा हा प्रयत्न आहे. या लेखाचे श्रेय संपूर्णपणे वरील दोघांना आहे. माझं श्रेय असेल तर सूर्याचा प्रकाश पृथ्वीकडे परावर्तित करणार्‍या चंद्राला जातं तेवढंच.]

Sunday, July 2, 2017

सलाम

(मंगेश पाडगावकरांची माफी न मागता )

सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात चॅनल त्याला सलाम,
पगाराच्या भयाने
डाव्या हातात माईकचं बोंडुक घेऊन
उजव्या हाताने सलाम,
बघणाऱ्याला सलाम,
न बघणाऱ्याला सलाम,
विकत घेणाऱ्याला सलाम,
विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला लाल सलाम,
सलाम, भाई, सबको सलाम.

चादर घातलेल्या प्रत्येल थडग्याला सलाम,
डिवायडर पीराला सलाम
देवळांना फोडून बांधलेल्या मशिदींना सलाम,
मशादीतल्या मौलवींच्याच्या धाकाला सलाम,
मशिदीतून, लाउडस्पीकरवरुन
बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्याला सलाम,
परवरदिगार आणि त्याच्या मजहबचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम,
रिकाम्या गर्भाशयात जीव भरण्यासाठी
निष्पाप मोहतरमाला नासवणाऱ्या बंगालीबाबाला  सलाम
चाँदला सलाम
बकऱ्याला सलाम,
दहशतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम,
अम्मीच्या उरावर दुसरी अम्मी बसवणाऱ्या अब्बाला सलाम,
दुसऱ्या अम्मीला टरकावणाऱ्या तिसऱ्या अम्मीला सलाम,
सलाम, प्यारे भाईयों और बेहेनों,
सबको सलाम.

ज्याच्या हातात कोयता
त्याला सलाम,
ज्याच्या गळ्यात क्रूस
त्यालाही सलाम,
चर्चच्या पादऱ्यांना सलाम,
त्यांची वेसण धरणाऱ्या
व्हॅटिकनला सलाम,
ज्याच्या सेवेला नन त्याला सलाम,
तिला भोगणाऱ्या फादरला सलाम
तिचा गर्भपात करतो
त्यालाही सलाम
क्रिसमस आणि व्हॅलेन्टाइनच्या गर्दीला सलाम,
ती गर्दी झुलवणाऱ्या
जादूगारांना लाल सलाम,
भाईयों और बेहेनों सबको सलाम.

नाक्यावरच्या अनधिकृत चिकनशॉपला सलाम
शेजारच्या इल्लीगल गॅरेजला सलाम
ते चालवत वखवखलेल्या नजरेने सावज शोधणार्‍या वाहिदला सलाम
सोनं म्हणून आरडीएक्स स्मगल करणार्‍याला सलाम
ते वापरून बनवलेले बाँब ठेवणार्‍यांना सलाम
स्फोट झाल्यावर जिहादी जल्लोष करणार्‍यांना सलाम
त्यांना पकडू पाहणार्‍या पोलीसांना सलाम
त्यांचे ट्रक न तपासता जाऊ देणार्‍यांनाही सलाम
टायगर मेमनला सलाम,
त्याला श्रद्धांजली वाहणार्‍या
कुबेरांनाही सलाम,
लोकसत्तालाबी सलाम,
सकाळलाही सलाम,
काँग्रेसला बुडवणार्‍या राहुल गांधींना सलाम,
गांधींखाली चिरडलेल्या
प्रणवदांना, नरसिंह रावांना सलाम,
ज्याच्या हातात विळा हातोडा त्याला सलाम,
सैनिकांना बलात्कारी म्हणणार्‍यांना सलाम,
भारत तेरे टुकडे होंगे म्हणणार्‍यांना ,
कन्हैया कुमारला सलाम,
कविता कृष्णनला सलाम;
आनंद पटवर्धननांना सलाम,
कबीर कला मंचला सलाम,
निरपराध मुलांना बायकांना मारणार्‍या नक्षलवाद्यांना सलाम,
मौत सस्ती करणाऱ्या सर्वांना लाल सलाम,
सलाम, प्यारे दोस्तों, सबको सलाम.

फिल्म इन्स्टिट्युटला सलाम
त्यातल्या मध्यमवयीन विद्यार्थ्यांना सलाम,
काहीही त्रास नसलेल्यांना सलाम
पण सतत तुम्हाला कसलातरी त्रास आहे असं
पटवणार्‍या कॉम्रेडांना सलाम
गोळी घालणार्‍यांना सलाम
ती घालण्याच्या आदेश देणार्‍यांना सलाम
कॅपिटालिस्ट मालकांना सलाम
कम्युनिस्ट कामगार नेत्यांना सलाम
दिवाळी बोनसला सलाम
संपाला सलाम
उपासमारीला सलाम
युनियनच्या लिडरला सलाम,
संपात बरबाद झालेल्या कामगाराला सलाम
त्याच्या पिचलेल्या बायकोला सलाम
दीड खोलीत अभ्यास करणार्‍या
एकच गणवेश आठवडाभर वापरणार्‍या
त्यांच्या पोरांना सलाम
चीनला सलाम
सोवियत रशियाला सलाम
लाल झेंड्याला सलाम
सलाम, लाल सलाम
सलाम, भाईयों और बेहेनों, सबको सलाम.

या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
याच देशात राहून त्याचे टुकडे करण्याच्या घोषणा देणार्‍यांना सलाम
गायीचं मांस खाणार्‍यांना सलाम
तिला रस्त्यावर कापणार्‍यांना सलाम
आमचा धर्म शांततेचा या सर्व बिलंदर घोषणांना सलाम,
हिंदूद्वेष्ट्या उकिरड्यांना सलाम,
या उकिउरडयांतून मजहबचं पीक काढणाऱ्यांना सलाम,
टोपी आणि बुरख्याला सलाम,
पंक्चरवाल्या मियाँला सलाम,
त्यांच्या शेकडो लौढ्यांना सलाम,
निवडणुकांना सलाम,
निवडणुक प्रचाराला सलाम,
निवडणुकांवर डोळा ठेऊन झालेल्या
निरनिराळ्या वांझोट्या आंदोलनांना ,
विद्यार्थी चळवळीला सलाम
नॉट इन माय नेमला सलाम
आद्य चळवळ बामण हटावला सलाम
लाल झेंडा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम,
या सर्व अत्याचार करणाऱ्यांना सलाम,
या बातम्या वाचणाऱ्या सर्व षंढांना लाल सलाम,
सलाम, भाईयों और भैनों, सबको सलाम.

वरपासून खालपर्यंत आरक्षणाचा देश म्हटले
तर डोके फोडतील ,
भत्ताखाऊ फुकट्यांचा देश म्हटले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदले जाणाऱ्या पत्रकारांचा देश म्हटले
तर मोर्चे काढतील,
दगडाला देव आणि गायीला माता म्हटलं
तर हिंदू दहशतवादी म्हणून दम देतील
मोर्चात जातो म्हटले
तर नोकरीवरून काढतील;
म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या माझ्या
शेख्युलर हिरव्या देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.
लाल सलाम
प्यारे भाईयों और बेहेनों, सबको सलाम,

अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिन माफ़ करना भाईयों,
हात तर दोनच
आणि त्यातला उजवा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त
डाव्या हाताने सलाम,
सलाम, सबको लाल सलाम
भाईयों और बेहेनों, सबको सलाम.

© मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. ८, शके १९३९

Tuesday, June 20, 2017

राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि विरोधकांची चिडचिड

सतत तुम्ही हजारो वर्षांपासून गुलाम आहात असं एखाद्या किंवा जमल्यास अनेक समाजांच्या मनावर पिढ्यानपिढ्या बिंबवणे, आणि मग तदनुषंगाने तुम्ही त्या तथाकथित गुलामीतून बाहेर आलं पाहीजे असं पटवून देत राहणे, आणि मग त्या तथाकथित गुलामीतून बाहेर येण्यासाठी सातत्याने एक काल्पनिक शत्रू उभा करुन उदा. एखाद्या समाजाला लक्ष्य करुन - आधी वैचारिक आणि मग सामरिक बंडासाठी प्रवृत्त करणे हा डाव्या/साम्यवादी/नक्षलवादी मानसिकतेच्या लोकांचा प्रयत्न असतो. मग ज्या समाजाला गुलाम म्हणायचं तो समाज किंवा व्यक्ती किती कौशल्यविकसित, उच्चशिक्षित, आणि समृद्धीच्या दिशेने अग्रेसर असलेली का असेना !

काल राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एन.डी.ए.) च्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवाराच्या नावाची घोषणा होताच ज्या प्रकारे विरोधी पक्ष, डाव्या/साम्यवादी/नक्षलवादी आणि त्यांचे समर्थक, आणि विकला गेलेला मिडिया आणि त्यांचे सोशल मिडीयावर पडीक असणारे तट्टू यांची निराशा आणि त्यापासून उत्पन्न झालेली तडफड दिसते आहे ती या भीतीपोटी की आता जगाला संघ काय चीज आहे ते समजेल. आता ही गोष्ट समजणे काही रॉकेट सायन्स नव्हे की भाजपला सर्वसहमतीसाठी एका दलित उमेदवाराची गरज होती, तसेच तो उमेदवार उच्चशिक्षित, राजकारणाचा अनुभव असलेला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संघाच्या विचारसरणीचा हवा होता.

श्री रामनाथ कोविंदजी या सगळ्या निकषात अगदी व्यवस्थित बसतात. ते दलित तर आहेतच, शिवाय ते एका गरीब शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात ते १६ वर्ष वकील होते, आय.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण आहेत, काही शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनात ते होते, आणि संयुक्त राष्ट्रसंघात भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा व संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेपुढे भाषण करण्याचाही त्यांना अनुभव आहे. संघातून आल्यामुळे त्यांना सामाजिक कार्याची आवड आणि अनुभव आहे हे वेगळं सांगायला नकोच. शिवाय सद्ध्या ते काही वर्ष बिहारचे राज्यपाल आहेत. चाराखाऊ लालूंचे चिरंजीव तेजप्रताप यादव यांनी शपथ घेताना "अपेक्षित" ऐवजी "उपेक्षित" असा उच्चार केल्यामुळे ज्यांनी सगळी शपथ परत घ्यायला लावली होती, ते हेच श्री रामनाथ कोविंद.

उपरोक्त विरोधकांना ही गोष्ट मात्र केल्या पचत नाही आहे की अशी व्यक्ती एक संघी आहे. संघी या शब्द मुद्दामून वापरला आहे कारण आजकाल  संघाच्या अंधविरोधकांचा हा आवडता शब्द आहे. आता ही गोष्ट संघाच्या समर्थकांनाच नव्हे तर विरोधकांनाही ठावूक आहे की संघात कुणी कुणाला जात विचारत नाही, आणि एकत्र संघ शाखेत जाणार्‍यांमधे जातीला काहीच महत्व दिलं जात नाही. इतकंच नव्हे तर अनेक विजातीय संघ कार्यकर्त्यांमधे आपापसात निव्वळ रोटीच नव्हे तर बेटी व्यवहार देखील आहेत.

हे माहीत असून काही अंशी अज्ञानापोटी आणि बहुतांशी हेतूपुरस्सर संघाची सातत्याने ब्राह्मणांची आणि उच्चवर्णीयांची संघटना अशी प्रतिमा तयार करण्यात आणि संघकार्याशी अपरिचित जनमानसावर बिंबवण्यात आजवर या अंधविरोधकांनी कुठलीच कसर बाकी ठेवली नव्हती. या दुष्प्रचाराला पहिला धक्का बसला कुठल्याही तथाकथित उच्च जातीशी संबंध नसलेले श्री नरेन्द्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा. पण मोदींना विरोध करायला त्यांच्याकडे अन्य मुद्दे होते. त्यांच्या दुर्दैवाने श्री रामनाथ कोविंदांच्या बाबतीत त्यांना असं काहीच करता येत नाही.

विरोधकांचं खरं दु:ख हे आहे की राष्ट्रपतीपदाचा या वेळचा उमेदवार हा दलित, उच्चशिक्षित, अनुभवी, आणि संघी असे सगळे असल्याकारणाने संघ आणि भाजपच्या चारित्रहननाकरता त्यांना जात हा मुद्दा उकरून काढता येणार नाही. मिडियाची जी तडफड सगळीकडे बघायला मिळते आहे ती या कारणाने की आता संघ आणि भाजप हे दलितविरोधी ही प्रतिमा निर्माण करताना ज्या खोट्या बुद्धीभेदी कथांचा पूर आणला जायचा तो आणण्यात ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत. आता ही गोष्ट जगासमोर वारंवार येणार की भारतवर्षाचा राष्ट्रपती हा दलित तर आहेच पण तो संघी सुद्धा आहे. अर्थात, ही गोष्ट अखिल विश्वापुढे उघड होईल की संघ जातीयवादी तर नाहीच, पण या उलट संघ प्रत्येक जातीला राजकारणात उच्च स्थान मिळवून देशसेवा करण्यासाठी समान संधी उपलब्ध करुन देतो.

मिडियामधे जी तडफड दिसते आहे त्याने प्रत्येक राष्ट्रवादी भारतीयाला गुदगुल्या नक्की होत असणार. मलाही होत आहेत यात आश्चर्य ते काय?! लोग मजा बघत आहेत, तुम्हीही बघा.

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।

समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

।। भारत माता की जय ।।

|| वंदे मातरम् ||

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. १०, शके १९३९ | योगिनी एकादशी

राष्ट्रपतीपद का चुनाव एवं विरोधियों की तिलमिलाहट

ज्ञान न पूछो वामी का, पूछ लीजिये जात।
दलित क्यों नहीं पॉलिटब्यूरो में, पूछो मार के लात !

हमेशा आपको आप हजारों सालों से गुलाम (दास) हैं यह कुछ समाजोंघटकों के  मन पर पीढी दर पीढी बिंबित करते रहना, फिर उस संदर्भ में आपको इस तथाकथित दास्यत्व से बाहर आना आवश्यक है यह बार बार समझाना, एवं उस पश्चात आपको इस तथाकथित दास्यत्व से बाहर निकालने हेतू सातत्यपूर्ण ढंग से एक काल्पनिक शत्रू को आपके सामने खडा करना, उदाहरण किसी एक समाज को लक्षय करके - प्रथमत: वैचारिक और उस पश्चात सामरिक विद्रोह के लिये आपको प्रवृत्त करना यह वामपंथी/साम्यवादी/नक्षलवादी मानसिकता के लोगों का प्रयत्न रहा है. फिर जिन्हें ये गुलाम बतलाने इच्छुक हैं वो समाज अथवा व्यक्ती कितना भी कौशल्यविकसित, उच्चशिक्षाप्राप्त, एवं समृद्धी की ओर अग्रेसर क्यों न हो!

कल राष्ट्रीय लोकतंत्र मोर्चा (एन.डी.ए.) के राष्ट्रपतीपद के प्रत्याशी के नाम की घोषणा होते ही जो विरोधक, वामपंथी/साम्यवादी/नक्षलवादी एवं उनके समर्थक, तथा बिकाऊ मिडीया एवं उनके सोशल मिडीया पर पडे खच्चरों की निराशा से उत्पन्न बैचैनी और विषवमन दृग्गोचर हो रहा है वह इस बात पर है की अब सारे दुनिया को पता चल जाएगा कि संघ है क्या. यह बात कोई रोकॅट साईन्स तो नहीं थी कि भारतीय जनता पक्ष सर्वसहमती के हेतू एक दलित, उच्चशिक्षित, राजनीतीका अनुभवी, एवं संघ की विचारधारा रखने वाला कोई प्रत्याशी की खोज कर रही थी.

श्री रामनाथ कोविंदजी इन सारे निकषों में खरे उतरते हैं. वे दलित हैं, इतना ही नहीं वे गरीब किसान कुटुंब से आते हैं, दिल्ली उच्च न्यायालय एवं सर्वोच्च न्यायालय में वे १६ वर्ष वकील थे, आय.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण हैं, कुछ शैक्षणीक संस्थाओं के व्यवस्थापक भी रहें हैं, केवल इतना ही नहीं उन्हे संयुक्त राष्ट्रसंघ में भारत का प्रतिनिधित्व करने का एवं  संयुक्त राष्ट्रसंघके आमसभा को संबोधित करनेका भी अनुभव प्राप्त है. संघी है तो पृथक बताना आवश्यक नहीं कि उन्हें सामाजिक कार्य में रुचि है अपितु अनुभव भी प्राप्त है. अब कुछ वर्षों से वे बिहार के राज्यपाल हैं. हां, यह वहीं है, जिन्होनें "अपेक्षित" के स्थान पर "उपेक्षित" कहने पर तेजस्वी यादव को पूरी शपथ पुन: पढने का आदेश दिया था.

परंतु उपरोक्त विरोधकों को यह बात पच नहीं रही की ऐसा व्यक्ती एक संघी है. हेतूपूर्वक इस शब्द का प्रयोग किया है क्योंकी बिकाऊ पत्रकारों को और संघ के अंधविरोधकों को इस शब्द का उपयोग करने के अभ्यस्त हैं. ये संघ के समर्थक ही नहीं अपितु संघ विरोधकों को भी ज्ञात है कि संघ मे किसी की जाति पूछी तक नहीं जाती, एवं नहीं साथ साथ संघ शाखा में जाने वाले लोगों मे जाती कोई महत्व नहीं रखती. इतना ही नहीं अनेक विजातीय संघ कार्यकर्ताओं के आपस में केवल रोटी ही नही बेटी व्यवहार भी हैं.

आज तक संघ को सातत्य से ब्राह्मणो एवं उच्च जातीयों के संगठन  के रूप में संघकार्य से अपरिचित जनमानस के मन पर बिंबित करने में इन अंधविरोधकों नें कोई कसर नहीं छोडी थी. इसको पहली चोंट तब पहुंची जब श्री नरेन्द्र मोदी जो किसी तथाकथित उच्च जाती से संबंध नहीं रखते वे प्रधानमंत्री बने. परंतु उनका विरोध करने के हेतू विरोधकों के पास अन्य विषय थे.  श्री रामनाथ कोविंदजी के विषय में ऐसा कुछ भी नहीं है.

विरोधीयों का दु:ख यह है कि इस बार राष्ट्रपतीपद के प्रत्याशी के दलित एवं संघी होने के कारण अब संघ एवं भारतीय जनता पक्ष के चारित्र्यहनन के लिये उनको जाती का आधार कैसे मिलेगा? मिडीयाकी जो तिलमिलाहट दृग्गोचर हो रही है, वह इस हेतू है की सालों पुराने संघ एवं भाजपा के दलितविरोधी होने की कहानियों की बाढ लाने मे वे इस बार पूरी तरह से असफल रहे हैं. अब यह बात विश्व के सामने बार बार आयेगी की भारतवर्ष का राष्ट्रपती दलित है एवं संघी भी है. अर्थात, यह बात विश्व को दृग्गोचर होगी की संघ जातीवादी तो है ही नही, अपितु संघ हर जाती के लोगों को राजनीती में उच्च स्थान प्राप्त कर देशसेवा करने हेतु समान अवसर प्राप्त कराता है.

मिडिया की इस छटपटाहट से हर राष्ट्रवादी भारतीय को गुदगुदी तो अवश्य हो रही है. मुझे भी होना आश्चर्य की बात नहीं. आप भी मजे लिजीये.

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।

महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।

समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

।। भारत माता की जय ।।

|| वंदे मातरम् ||

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. १०, शके १९३९ | योगिनी एकादशी

Wednesday, June 14, 2017

बालादपि सुभाषितम् ग्राह्यं आणि हाताला लागेल ते हत्यार

विषादप्यमृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम् ।
अमित्रादपि सद्वृत्तममेध्यादपि काञ्चनम् ॥

या श्लोकातील बालादपि सुभाषितम् ग्राह्यं हा भाग महत्त्वाचा आहे. याचा ढोबळ अर्थ लहान मुलांकडूनही अनेकदा आपल्याला काहीतरी महत्त्वाचं शिकता येतं. शाळा सुरू होण्याचे हे दिवस आहेत. आजच मुलांच्या पालकसभेला जाऊन आलो आणि शाळेत बाईंनी मुलांची आगाऊच केलेली एक तक्रार ऐकून डोक्यात लख्ख प्रकाश पडला. शाळेत मुलं मारामार्‍या करतात अशी ती तक्रार होती. वर्ष सुरू होत आहे, तेव्हा तुमच्या मुलांना आत्ताच समजावून सांगा असं त्यांचं म्हणणं होतं. इतर सूचनांमधे स्टीलची पट्टी मुलांना शाळेत देऊ नका, लाकडी द्या, कारण, मारामारी करताना मुलं अक्षरशः हाताला लागेल ती वस्तू फेकून मारतात. त्यात निरुपद्रवी खोडरबरापासून टोकदार पेन्सिली, तीर्थरूपांची हळूच ढापलेली पेनं, पट्टी, प्लॅस्टीक आणि स्टीलचे जेवणाचे डब्बे या सगळ्या वस्तू आल्या. आता आजकालची मुलं अधिक आक्रमक किंवा हिंसक होत आहेत हा मुद्दा जरा बाजूला ठेवूया. पण आपणही कधीतरी त्यांच्या वयाचे होतोच. समोरच्या मुलाने आपल्याला मारल्यावर हाताला लागेल ती वस्तू फेकून मारण्याची लहान मुलांकडे किंवा लहानपणी असलेली कल्पकता मोठेपणी कुठे जाते? मोठं झाल्यावर आपला मेंदू इतका गोठल्यासारखा का होतो? मी हे काय बोलतो आहे कळत नाही आहे ना? सांगतो.

केरळ आणि बंगालमधे हिंदूंची काय स्थिती आहे तुम्हाला वेगळं सांगायला नको, ते सगळं बातम्या आणि सोशल मिडीयामार्फत जगजाहीर झालेलं आहे. उत्तर प्रदेश, बिहार, आणि अगदी महाराष्ट्रात सुद्धा जिथे जिथे शांतीदूतांचा प्रादुर्भाव आहे तिथे तिथे हिंदूविरोधी हिंसा होतेच. या सगळ्या बातम्यांत एका गोष्टीकडे आपलं लक्ष जायला हवं. "घरात घुसून घरातल्यांच्या समोर अमक्याला मारलं किंवा तमक्याचा खून केला". मग प्रश्न असा आहे की त्यावेळी घरातले काय करत होते? याचं उत्तर अशा बातम्यांत "घरातल्यानी हल्लेखोरांकडे खूप गयावया केली", "जो मारला जात होता त्याच्या जीवासाठी हल्लेखोरांकडे भीक मागितली", "रडारड केली" या घरातल्यांच्या तत्कालीन प्रतिक्रिया अत्यंत पराभूत मानसिकतेच्या निदर्शक आहेत.

अरे! याला काही अर्थ? मान्य आहे, घरात परवान्याशिवाय हत्यारं ठेवायला परवानगी नाही. मात्र घरात स्वयंपाकघराची उपकरणं ठेवायला अजून तरी बंदी आलेली नाही. गरम पातेलं उचलायला चिमटा वापरत असालच. मारा फेकून. काही घरांत हातानी कुटलं जात असल्यास मिनी खलबत्ताही असेल. अगदी बाकी काही नाही तरी भाजी कापायची सुरी तरी असेलच. मांसाहारी असाल तर मासे किंवा मटण कापायची सुरी असेल तर आणखी उत्तम. उचला आणि जोरदार प्रतिहल्ला करा. आपल्याकडे एक म्हण आहे, "भित्यापाठी ब्रह्मराक्षस". घरातल्या कर्त्या पुरुषावर हल्ला झाल्यावर तुम्ही रडारड केलीत, हल्लेखोरांकडे त्याच्या प्राणांची भीक मागितलीत तरी तुम्ही काही सत्यवानाची सावित्री नव्हे आणि हल्लेखोर हे यमराज त्याहून नव्हेत. त्यामुळे या रडण्याभेकण्याचा काहीही परिणाम होणार नाही. झालाच, तर हल्लेखोर स्वतःच्या कृत्यावर खूष होण्याचीच शक्यता जास्त. कारण घरातला कर्ता पुरुष मारला जात असताना / गेल्यावर घरात जो हलकल्लोळ माजतो, त्याचा उपयोग इतरांवर दहशत बसवण्यासाठी त्यांना होत असतो. त्यामुळे त्यांना ब्रह्मराक्षस होण्याची संधी न देता हाताला लागेल ती वस्तू हत्यार समजून त्यांच्यावर फेकून मारा, किंवा ती वस्तू घेऊन त्यांच्यावर धावून जा.

लक्षात घ्या. पुन्हा म्हण सांगतो. भित्यापाठी ब्रह्मराक्षस. तुम्ही घाबरता म्हणून समोरचा तुम्हाला घाबरवतो, मारतो, हल्ला करतो.

दोन घटना सांगतो. पहिली बातमी नुकतीच वर्तमानपत्रात वाचलेली आहे, तर दुसरी पुर्वी सत्यघटनांवर आधारित दूरदर्शनवर सकस कार्यक्रम दाखवायचे त्या काळात अशाच एका कार्यक्रमात पाहिलेली गोष्ट आहे. हल्ली फक्त सांगितिक जल्लोष, तर्कहीन फालतू मालिका, आणि विमानापेक्षा जास्त लोक पॅनलवर बसवतात अशी चर्चावजा भांडणं यातून असल्या मनोरंजनाच्या चिखलातून असल्या बातम्या तुमच्या नजरेला पडल्याच तर त्या व्यक्तीचे कौतुक करण्याबरोबरच त्या व्यक्तीची कृती ही आपल्या स्मृतीपटलावर कोरून ठेवा.

एक. न घाबरणारी पन्नाशी ओलांडलेली एखादी महिला मोटारसायकलवरुन आलेल्या दोन चोरांना चोपून काढते आणि चोरी न करताच पळून जायला भाग पाडते.
दोन. स्वयंपाकघरापर्यंत घुसलेला चोर पाहून एखादी प्रसंगावधानी गृहिणी गॅसवर ठेवलल्या पातेल्यातलं उकळतं पाणी त्याच्या चेहर्‍यावर फेकून तो कळवळत असताना यशस्वीरित्या बाहेर पळ काढून गर्दी जमवते.

घरात घुसून जेव्हा हत्या होते तेव्हा प्रतिहल्ला होणार नाही या हिशेबानेच हल्ला झालेला असतो. मग तुम्हाला जो धक्का बसतो, तोच धक्का त्यांना द्यायला काय हरकत आहे? म्लेंछ क्रूर असतात, पण तितकेच भित्रेही असतात. त्यांच्यावर प्रतिहल्ला झाला, मग तो कशाने होतो याला महत्त्व नाही, आणि त्वेषाने प्रतिहल्ला झाला तर त्यांना स्वतःचं रक्त सुद्धा बघायला आवडत नाही. त्यात नको तिथे तुमचा वार बसला तर भळाभळा रक्तस्त्राव होऊन जागच्या जागी हल्लेखोर कोसळू शकतो. तुम्ही जितकी गयावया कराल, तितका त्यांना आनंद होतो. आणि मरायचंच असेल तर जीव वाचवता वाचवता मरा ना, कुत्र्याच्या मौतीने का मरता? स्वसंरक्षणार्थ प्रतिहल्ला केला आणि त्यात हल्लेखोर मेला तर प्रतिहल्ला करणार्‍याला म्हणजेच आपल्याला कायद्याचं सुद्धा संरक्षण आहे. तेव्हा तुमच्या प्रतिहल्ल्यात त्यांच्यापैकी एखादा मेला आणि त्याचा मृतदेह तुमच्या घरात सापडला तर तो तुमच्यावर त्याने तुमच्यावर प्रथम हल्ला केल्याचा एक महत्त्वाचा पुरावा होतो.

सुरवातीला लहान मुलांचं उदाहरण दिलं होतं. आता आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकलेल्या एका मोठ्या माणसांच्या गोष्टीकडे वळूया. अकबर बादशहाविषयी काहीही मत असलं तरी मठ्ठ अकबर आणि त्याला शहाणपणा शिकवणारा बिरबलाच्या गोष्टी फारच आवडत्या. तर अशाच एका गोष्टीत एकदा अकबर बादशहाच्या दरबारात 'सगळ्यात चांगले हत्यार कोणते?' याविषयी चर्चा चालू होती. अकबराचे सरदार निरनिराळे पर्याय उत्तम हत्यार म्हणून सांगत होते. कुणी म्हणे "तलवारीसारखं उत्तम हत्यार नाही." तर कुणी म्हणे की "दांडपटाही जोडीला हवाच". आणखी एक जण म्हणाला, "धनुष्य बाण उत्तम, सुरक्षित अंतरावरुन शत्रूवर हल्ला करता येतो". एकाने तर बंदुका आणि तोफांची नाव घेतलं. कुणी काही तर कुणी काही. या सगळ्या जोरदार चाललेल्या चर्चेत बिरबल मात्र गप्प होता. ते पाहून बादशहाने त्याला मुद्दाम विचारलं, "क्यों पंडित बिरबल, तुम क्या कहते हो?" बिरबलाने शांतपणे उत्तर दिलं, "जी हुजूर, खाविंदांच्या मान्यवर सरदारांनी सांगितलेली ही सगळी हत्यारं खासच आहेत, पण माझ्या मते जो ऐन वख्त पर हाथ लगे वो हथियार ही खास होता है". अकबराला हे उत्तर जरा जास्तच अनपेक्षित होतं, "नहीं बिरबल, ये बात हमें ठीक नहीं लगी. आखिर कोई एक हथियार तो सबसे खास होगा ही!"

"आप कहते हैं तो होगा जहांपनाह, लेकिन मेरी तो यही राय रहेगी". बादशहाला आणि त्याच्या इतर दरबार्‍यांना हे उत्तर जरा अगोचरपणाचं वाटलं, पण बिरबल नेहमीच अशी वेगळी उत्तरं देतो म्हणून सगळ्यांनी ते हसून सोडून दिलं.

या नंतर काही दिवसांनी अशाच एके दिवशी बिरबल त्याच्या नेहमीच्या रस्त्याने देवदर्शनाला चालला होता. देवळात जाताना त्याला एके ठिकाणी एका चिंचोळ्या गल्लीतून जावे लागत असे. आज तो ती गल्ली अर्धी ओलांडल्यावर बघतो तर काय, समोरून एक महाकाय पिसाळलेला हत्ती जो समोर येईल त्याला पायाखाली तुडवत, सोंडेनं फेकून देत धावत येत होता. आता मात्र बिरबल घाबरला. तो देवदर्शनाला निघाल्याने त्याच्याकडे काहीच हत्यार नव्हतं, ना तलवार, ना भाला, ना धनुष्यबाण. प्रत्येक क्षणी हत्ती आणि त्याच्यातलं अंतर कमी होत चाललेलं होतं. त्याने इकडेतिकडे पाहिलं....आणि त्याला जवळच एक रस्त्यावरचे उकिरडे हुंगणारं कुत्रं दिसलं. बिरबलाने निमिषभर विचार करुन त्या कुत्र्याचं तंगडं धरून ते हवेत गरागरा फिरवलं आणि हत्ती पुरेसा जवळ येताच त्याच्या दिशेने फेकून मारलं ते नेमकं त्याच्या गंडस्थळावर आदळलं! बरं आदळलं ते आदळलं वरतून ते तिथून घसरून पडू नये म्हणून आपल्या पंजे रोवून तिथे चिकटण्याचा प्रयत्न करु लागलं.

नको तिथे काहीतरी आदळल्याने आणि वर त्याच्या बोचकारण्याने हत्ती बावचळला आणि ताबडतोब पीछे मुड करुन विरूद्ध दिशेला पळत सुटला. अशा रीतीने बिरबलाने सुटकेचा निश्वास टाकला. दिल्लीतल्या भर रस्त्यात ही घटना घडल्याने बादशहाच्या कानापर्यंत जायला फार वेळ लागला नाही. तेव्हा त्याला मनोमन कबूल करावंच लागलं, "ऐन वख्त पर हाथ लगे वो हथियार ही खास होता है".

ही गोष्ट फक्त अकबराची फजितीची मजा घ्यायला आणि बिरबलाच्या बुद्धीमतेचं आणि प्रसंगावधानाचं कौतुक करायला नव्हे, तर त्यातून बोध घेण्याकरता आहे. आपल्या घरच्यांवर हल्ला झाला, तर दिसेल त्या वस्तूने प्रतिहल्ला करा. भाजी कापायची सुरीने सपासप मारत सुटा; मिसळणाच्या डब्यातलं तिखट डोळ्यात जाईल असं फेका, नाही तर आख्खा स्टीलचा डबाच फेकून मारा; पोळ्या करायचं लाटणं डोक्यात घाला; कचर्‍याची बादली फेकून मारा - पण स्वस्थ बसू नका. काही घरात किरकोळ दुरुस्तीची काही सामुग्री असते. त्यात स्क्रूड्रायव्हर, हातोडा, आणि खिळे ही सगळ्यात उपयुक्त सामुग्री आहे. आता नवीन तंत्रज्ञानामुळे भिंतीत खिळे ठोकायला हातोडा लागत नाही. त्यासाठी बंदुकीतून गोळी मारल्यासारखे खिळे भिंतीत मारता येतात अशी यंत्रे निघालेली आहेत. मी तुम्हाला पर्याय सांगतो आहे, शेवटी काय, उपलब्ध असेल आणि हाताला लागेल ते हत्यार. एकदा तुम्ही भ्यायचं सोडलंत तर ब्रह्मराक्षसाला पळवून लावणं हे फार कठीण नाही.

जाता जाता, जमलं तर सेल्युलर (Cellular) हा इंग्रजी सिनेमा बघा. आपल्यावर किंवा कुटुंबियांवर हल्ला करणार्‍या माणसाला रोखायला त्याला कुठलंतरी हत्यार घेऊन अनेकदा भोसकायला लागतं असं नाही. सिनेमातल्या नायिकेच्या घरावर काही बदमाश हल्ला करुन सगळ्यांना ओलीस ठेवतात. कथेच्या खोलात जाण्यात अर्थ नाही, पण आपल्यावर हल्ला करणार्‍या एका बदमाशाला जीवशास्त्राची शिक्षिका असलेली नायिका दंडातल्या एका धमनीच्या जागी काचेच्या तुकड्याने वार करुन कशी ठार करते, ते बघण्यासारखं आहे. हा संपुर्ण सिनेमा थरारक आहेच, पण प्रस्तुत लेखाच्या अनुषंगाने हा प्रसंग साडेत्रेपन्नाव्या (53:30) मिनीटापासून पहा.



तेव्हा, आत्मानं सततं रक्षेत - आपले सातत्याने रक्षण करा!

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. ४, शके १९३९ 

Thursday, June 8, 2017

वामपंथी भारत विखंडन ४: चोराच्या उलट्या बोंबा आणि अर्थारोपण

समजा तुम्हाला कुणी अतिरेकी कुत्रा म्हणालं तर? तुम्हाला राग येईल ना? जो म्हणेल त्याला तुम्ही मारायला धावाल ना? कदाचित नाही. तुम्ही त्याचा प्रतिवाद कराल. काय म्हणता....तुम्ही नक्की मारायला धावून जाल??

आता पुढचा परिच्छेद वाचा. जे.एन.यु.च्या एका डाव्या विचारवंताची ही वाक्य आहेत.

"सांप्रतकाळी या देशात जी सगळ्यात मोठी फुटीरतावादी शक्ती आहे ती म्हणजे ब्राह्मणवादी हिंदू राष्ट्रवाद होय.
हा राष्ट्रवाद कुठल्याही लोकप्रिय चेहर्याच्या रूपात प्रकट होऊ शकतो.
हे एक असं सत्य आहे की ज्याला स्वीकारणे ही या देशाच्या मुक्ती आणि स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले पहिले जोमदार पाऊल असेल.
या सत्याचा स्वीकार करायला खऱ्या देशभक्तीची, सामाजिक प्रतिबद्धतेची, आणि साहसाची आवश्यकता आहे."

साम्यवादी आणि डाव्यांना अशा प्रकारचा युक्तीवाद करण्याचं रीतसर प्रशिक्षण दिलेलं असतं आणि ते या परिच्छेदातून स्पष्टच दिसतं आहे. यात त्याने त्याच्या मते गंभीर आणि खरीच अस्तित्वात आहे असं भासवून एक समस्या मांडली आहे, तिला जबाबदार कोण याचंही उत्तर हाच इसम देतो आहे, आणि त्यासाठी काय केलं पाहीजे हेही हाच सांगतो आहे. म्हणजे प्रश्न त्याचा, आणि उत्तरही त्याचंच. अशा प्रकारे त्याने अत्यंत हुशारीने व सुसूत्र पद्धतीने शब्दांची मांडणी करुन त्याला होऊ शकणारा विरोध गुंडाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला या परिच्छेदात राष्ट्रवादाला बदनाम करायचं आहे, म्हणून तो म्हणतोय की राष्ट्रवाद चुकीचा आहे. मग तो म्हणतो आहे राष्ट्रवाद कुठल्या रूपात दिसेल ते पहा. मग त्यावर तो उपाय सांगतो आहे,

"या सत्याचा स्वीकार करायला खर्‍या देशभक्तीची, सामाजिक प्रतिबद्धतेची, आणि साहसाची आवश्यकता आहे."

अरे वा रे वा. म्हणजे राष्ट्रवाद आणि देशभक्ती या वेगवेगळ्या संज्ञा आहेत? राष्ट्रवाद म्हणजे देशभक्ती नव्हे? आणि राष्ट्रवादाचा अर्थ हिंदू राष्ट्रवाद असाच होतो? बघा, म्हणजे याने जाता जाता राष्ट्रवादालाच कशी नावं ठेवली ती!

एखाद्या शब्दामागची भावना बदनाम कशी करावी याचा वरील परिच्छेद हा उत्तम वस्तुपाठ आहे. राष्ट्राच्या रक्षणासाठी, भल्यासाठी जगणाऱ्या आणि झटणाऱ्या प्रत्येकाला एका झटक्यात बदनाम करायचं असेल, हतोत्साहित करायचं असेल तर राष्ट्रवाद या शब्दालाच बदनाम करावं - या साम्यवाद्यांनी भारतात राबवलेल्या कल्पनेने आज मूर्त स्वरूप धारण केलं आहे. आपल्याला आठवत असेल तर काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांना भेटायला गेलेल्या काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर या घटिंगणाची मुलाखत घेऊ पाहणार्‍या रिपब्लिक वाहिनीच्या वार्ताहरालाच अय्यर साहेबांनी "मी देशद्रोही वाहिनीशी बोलत नाही" असं सुनावलं. या चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे शक्ती कपूरने इतरांना चारित्र्याचे धडे देण्यागत प्रकार होता. राहुल गांधींच्या प्रत्येक भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख हटकून 'धोकादायक विचारसरणी' म्हणून होणं, आणि देशाच्या भल्याचं चिंतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काँग्रेस आणि साम्यवाद्यांकडून "संघी" अशी संभावना होणं, या दोन्ही गोष्टींमागची कारणं सारखीच आहेत. एकदा का राष्ट्रवाद या संज्ञेला अस्पृश्यतेचं लेबल लावलं की त्याने प्रेरित असलेली प्रत्येक गोष्ट, व्यक्ती, संस्था, आणि कार्य हे आपोआप वाईट आहे हे सिद्ध करता येतं. हे उमगलेल्या डाव्यांनी मग देशभक्ती या शब्दाला राष्ट्रवादापासून वेगळं करुन या शाब्दिक युद्धासाठी दोन पार्ट्या तयार केल्या. ज्याला देशाबद्दल खरोखर काही पडलेली आहे, जो सदोदित देशाच्या भल्याचाच विचार करतो त्याला जहाल किंवा अतिरेकी राष्ट्रवादी म्हणून विरोधी पार्टीत उभं केलं जाऊ लागलं, आणि काँग्रेस आणि साम्यवादी घटिंगणांनी आपलंही देशावर प्रेम आहे हे सिद्ध करायला "देशभक्त" हे लेबल आपल्याला स्वतःच चिकटवून घेतलं (त्यांच्या दोन पंतप्रधानांनी स्वतःलाच भारतरत्न दिलं तसंच). यात सातशे शहाईंशीं आकडा धारक शांतीप्रिय लोक या लाटेवर स्वार झाले नसते तरच नवल होतं.

हे पुरेसं नव्हतं. कारण लोक तेच तेच ऐकून एक ना एक दिवस कंटाळतात. मग प्रखर राष्ट्रवादाला तो Jingoism किंवा Fascism यांचंच दुसरं रूप असल्याचं असत्य रेटलं जाऊ लागलं. Fascism या शब्दाचा अर्थ शब्दकोशात "A political theory advocating an authoritarian hierarchical government (as opposed to democracy or liberalism)" असा आहे. आर्यावर्तात हजारो वर्ष राजेशाहीच होती व अनेक ठिकाणी अत्यंत कल्याणकारी राजे राज्य करत असंत. आपल्याला लोकशाहीशी परिचय नव्हताच असे नव्हे, कारण चाणक्याच्या काळात मर्यादित लोकशाही असलेली जनपदं असल्याचे उल्लेख आहेत. पण प्रामुख्याने राजेशाही हीच आपल्याकडे राज्यपद्धती राहिलेली आहे, आणि राजेशाही Fascism च्या व्याख्येच्या (authoritarian hierarchical government) जराशी जवळ जाणारी आहे. आपली उज्ज्वल संस्कृती व बहुसंख्य दैदिप्यमान परंपरा निर्माण होण्याचा काळ हाच आहे. मग आपल्या संस्कृती व परंपरांचा आदर करणाऱ्या केवळ संघासारख्या संघटनेचाच नव्हे तर, संघाशी अजिबात संबंध नसलेल्या पण प्रखर राष्ट्रवादी असलेल्या व्यक्ती व संस्थांची Fascist असं लेबल लाऊन बदनामी करणं आणि मग हळू हळू जो राष्ट्रवादी तो फॅसिस्ट असं समीकरण रूढ करण्याचा प्रयत्न करणं हे साम्यवादी आणि शांतीप्रिय समुदायाच्या आधुनिक कार्यपद्धतीचा भाग होता आणि आहे.

दुसर्‍या भागात आपण पाहिलं होतं, की हिटलर शिस्तीचा भोक्ता असल्याने बाकी कुणीही शिस्तप्रिय असलं की त्याला नाव ठेवायला हिटलर म्हटलं जातं कारण त्या व्यक्तीला बदनाम करायला हिटलर हे संबोधन बरं पडतं. तीच क्लुप्ती सुक्याबरोबर ओलं जाळायला निघालेले, 'लिबरल' नामक कातडं पांघरलेले डावे / साम्यवादी वापरत असतात. वरची Fascismची व्याख्या वाचली तर त्यात राष्ट्रवाद अनुस्युत असतो. म्हणूनच तुम्ही राष्ट्रवादी असलात तर त्याच बरोबर तुम्ही फॅसिस्टही होता. हे म्हणजे आपल्या अपराधाबद्दल एखादा आपल्याला लाथ घालायला निघाला तर आपला अपमान लपवायला लाथ मारणाऱ्यालाच गाढव म्हणण्या सारखं आहे, कारण शेवटी लाथ मारण्याबद्दल गाढव हा प्राणी प्रसिद्ध आहे.

राष्ट्रवादाला नाकारायला भारतीय संविधानाचा हल्ली वापर केला जाऊ लागलेला आहे. सुरवातीला दिलेल्या वामी परिच्छेदातली क्लुप्ती इथेही आपल्याला दिसते. यात विरोधी मताची मुस्कटदाबी करायला वपरलं जाणारं एक वाक्य म्हणजे "आम्ही संविधान मानतो". या विधानात "तुम्ही संविधान मानत नाही" हे गृहित धरलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संविधानात राष्ट्रवाद हा शब्द नाही, त्याच्या संदर्भातले लेखन नाही, म्हणून राष्ट्रवाद हा देशविरोधीच आहे असा भंपक सिद्धांत मांडायचा. संविधानात बदल करण्याबद्दल कुणी भाष्य केलं की संविधानाला तुम्ही हात लावायचा नाही, संविधानाबद्दल तुम्ही काही बोलायचं नाही अशी दमदाटी सुरू होते. मग आत्तापर्यंत संविधानात झालेल्या शंभराहून अधिक (ताजा गुगल शोध) सुधारणांचं काय करायचं? ते रद्ध करायचे का? या बद्दल मात्र हाताची घडी तोंडावर बोट. गंमत म्हणजे, संविधानात घुसवलेला "सेक्युलर" हा शब्द सुद्धा एका सुधारणेद्वाराच घातलेला आहे. संविधानात बदल करायचे नसतील, म्हणजेच पर्यायाने आत्तापर्यंत केलेले बदलही रद्द करायचे असतील, तर "सेक्युलर" हा शब्दही हद्दपार करावा लागेल, हे या स्वयंघोषित संविधानरक्षकांना मान्य आहे का? असा प्रश्न विचारल्यास अर्थातच "आम्ही म्हणतो तेच संविधान, तुम्हां फॅसिस्टांना काय कळतंय त्यातलं / तुम्ही फासिस्ट आहात, तुम्हाला बोलायचा हक्क नाही" या प्रकारची विधानं येऊ लागतात. "तुम्ही फासिस्ट" हे ही ठरवणारे हेच. एका विशिष्ट पुस्तकातल्या मजकूरावर टीका झाल्यावर किंवा त्यात सुधारणा करण्याची गरज व्यक्त झाल्यावर ज्याप्रमाणे दमदाटी आणि हिंसा होते, तशीच दमदाटी संविधानाच्या नावावरही होईल अशी कल्पनाही खुद्द संविधानाच्या निर्मात्यांनीही केली नसेल.

दुसरी क्लुप्ती म्हणजे अस्तित्वात नसलेला शब्द निर्माण करायचा आणि समाजात विष पेरायला अशा शब्दांना सोडून द्यायचं. असा शब्द म्हणजे वरील वामी परिच्छेदातला Jingoism हा शब्द. हा शब्द पहिल्यांदा जॉर्ज होलिओक या ब्रिटीश इसमाने अठराशे अठ्याहात्तर साली निर्माण केला आणि वापरला. Jingoism या शब्दाचे शब्दकोषात "An appeal intended to arouse patriotic emotions" आणि "Fanatical patriotism" असे दोन अर्थ दिलेले आहेत. तर विकीपिडीया याच संज्ञेचं "Jingoism refers to nationalism in the form of aggressive foreign policy." असं वर्णन करतो. अतिरेकी राष्ट्रवाद नावाचा काही प्रकार अस्तित्वात असलाच तर तो Jingoism या संज्ञेच्या अधिक जवळ जातो. आपल्या राष्ट्राच्या रक्षणाबद्दल तीव्र भावना असणे व आक्रमक परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून त्या भावनेला जोपासणे हे नक्की कुठल्या दृष्टीकोनातून नकारात्मक आहे? पण राष्ट्रवादाला बदनाम करायचं असेल तर असे शब्द हे बनवत राहणं आणि ते वापरात आणत राहणं हे साम्यवाद्यांचं वैशिष्ठ्यच आहे. कालांतराने हे दोन शब्द इतके आलटून पालटून वापरले जाऊ लागले की त्यांचा अर्थ एकच असल्याचा समज व्हावा.

मी तुम्हाला पहिल्याच वाक्यात "तुम्हाला कुणी अतिरेकी कुत्रा म्हणालं तर" अशा अर्थाचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर आता पुढे देतो आहे. अठराशे सत्त्याहात्तर ते अठराशे अठ्याहात्तर या दरम्यान लढल्या गेलेल्या रशिया व तुर्किस्तान यांच्यातील युद्ध हे त्याची पार्श्वभूमी आहे. या युद्धाच्या तपशीलात जायचीगरज नाही. हे युद्ध सुरू असताना ब्रिटनभर असणार्‍या पब आणि संगीतसभांत एक गाणं म्हटलं जात असे. गायक जी. एच. मॅक्डरमॉट यांनी गायलेलं आणि जी. डब्ल्यू. हंट यांनी लिहीलेलं हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की अठराशे अठ्याहात्तर साली चक्क प्रिन्स ऑफ वेल्सने श्री मॅक्डरमॉट यांना स्वत:साठी खास खाजगी कार्यक्रम आयोजित करुन हे गाणं गायला लावलं. हे गाणं फारच जोशपूर्ण "बाय जीझस" या प्रार्थनावजा शपथेच्या जागी "बाय जिंगो" (by Jingo) हे शब्द वापरण्यात आले होते. एखाद्या ठिकाणी "बाय जीझस" म्हणायचं (swearing मधे जीझसला आणायचं) नसेल  तर "बाय जिंगो" हे त्याकाळी सर्रास वापरले जाणारे उद्गारवाचकशब्द होते. ते गाणं असं:

We don't want to fight but by Jingo if we do
We've got the ships, we've got the men, we've got the money too
We've fought the Bear before, and while we're Britons true
The Russians shall not have Constantinople.

याच शब्दांचा वापर करुन ब्रिटीश नागरिक जॉर्ज होलिओक यांनी Jingoism हा शब्द निर्माण करुन तो डेली न्युज या वृत्तपत्राला पाठवलेल्या पत्रात प्रथम वापरला. कालांतराने हा शब्द सामान्य वापरात घुसला...म्हणजे प्रखर राष्ट्रवादाला विरोध करण्याकरता जगभरातील घरभेद्यांच्या हातात हे कोलित मिळालं. १९१६ साली ऑस्कर सीझर नामक अमेरिकन व्यंग्यचित्रकार यांनी कढलेल्या The American War-Dog या व्यंग्यचित्रात चितारलेल्या कुत्र्याचे नाव जिंगो असे होते. आता जगातल्या १०० सर्वाधिक लोकप्रिय श्वाननामात जिंगो या नावाचा समावेश होतो.

आता मला सांगा, समजा तुम्हाला कुणी Jingoist म्हणालं तर?

------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ शु. १४, वटपौर्णिमा, शके १९३९
------------------------------------------

वामपंथी भारत विखंडन ३