Tuesday, June 20, 2017

राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि विरोधकांची चिडचिड

सतत तुम्ही हजारो वर्षांपासून गुलाम आहात असं एखाद्या किंवा जमल्यास अनेक समाजांच्या मनावर पिढ्यानपिढ्या बिंबवणे, आणि मग तदनुषंगाने तुम्ही त्या तथाकथित गुलामीतून बाहेर आलं पाहीजे असं पटवून देत राहणे, आणि मग त्या तथाकथित गुलामीतून बाहेर येण्यासाठी सातत्याने एक काल्पनिक शत्रू उभा करुन उदा. एखाद्या समाजाला लक्ष्य करुन - आधी वैचारिक आणि मग सामरिक बंडासाठी प्रवृत्त करणे हा डाव्या/साम्यवादी/नक्षलवादी मानसिकतेच्या लोकांचा प्रयत्न असतो. मग ज्या समाजाला गुलाम म्हणायचं तो समाज किंवा व्यक्ती किती कौशल्यविकसित, उच्चशिक्षित, आणि समृद्धीच्या दिशेने अग्रेसर असलेली का असेना !

काल राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एन.डी.ए.) च्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवाराच्या नावाची घोषणा होताच ज्या प्रकारे विरोधी पक्ष, डाव्या/साम्यवादी/नक्षलवादी आणि त्यांचे समर्थक, आणि विकला गेलेला मिडिया आणि त्यांचे सोशल मिडीयावर पडीक असणारे तट्टू यांची निराशा आणि त्यापासून उत्पन्न झालेली तडफड दिसते आहे ती या भीतीपोटी की आता जगाला संघ काय चीज आहे ते समजेल. आता ही गोष्ट समजणे काही रॉकेट सायन्स नव्हे की भाजपला सर्वसहमतीसाठी एका दलित उमेदवाराची गरज होती, तसेच तो उमेदवार उच्चशिक्षित, राजकारणाचा अनुभव असलेला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संघाच्या विचारसरणीचा हवा होता.

श्री रामनाथ कोविंदजी या सगळ्या निकषात अगदी व्यवस्थित बसतात. ते दलित तर आहेतच, शिवाय ते एका गरीब शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात ते १६ वर्ष वकील होते, आय.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण आहेत, काही शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनात ते होते, आणि संयुक्त राष्ट्रसंघात भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा व संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेपुढे भाषण करण्याचाही त्यांना अनुभव आहे. संघातून आल्यामुळे त्यांना सामाजिक कार्याची आवड आणि अनुभव आहे हे वेगळं सांगायला नकोच. शिवाय सद्ध्या ते काही वर्ष बिहारचे राज्यपाल आहेत. चाराखाऊ लालूंचे चिरंजीव तेजप्रताप यादव यांनी शपथ घेताना "अपेक्षित" ऐवजी "उपेक्षित" असा उच्चार केल्यामुळे ज्यांनी सगळी शपथ परत घ्यायला लावली होती, ते हेच श्री रामनाथ कोविंद.

उपरोक्त विरोधकांना ही गोष्ट मात्र केल्या पचत नाही आहे की अशी व्यक्ती एक संघी आहे. संघी या शब्द मुद्दामून वापरला आहे कारण आजकाल  संघाच्या अंधविरोधकांचा हा आवडता शब्द आहे. आता ही गोष्ट संघाच्या समर्थकांनाच नव्हे तर विरोधकांनाही ठावूक आहे की संघात कुणी कुणाला जात विचारत नाही, आणि एकत्र संघ शाखेत जाणार्‍यांमधे जातीला काहीच महत्व दिलं जात नाही. इतकंच नव्हे तर अनेक विजातीय संघ कार्यकर्त्यांमधे आपापसात निव्वळ रोटीच नव्हे तर बेटी व्यवहार देखील आहेत.

हे माहीत असून काही अंशी अज्ञानापोटी आणि बहुतांशी हेतूपुरस्सर संघाची सातत्याने ब्राह्मणांची आणि उच्चवर्णीयांची संघटना अशी प्रतिमा तयार करण्यात आणि संघकार्याशी अपरिचित जनमानसावर बिंबवण्यात आजवर या अंधविरोधकांनी कुठलीच कसर बाकी ठेवली नव्हती. या दुष्प्रचाराला पहिला धक्का बसला कुठल्याही तथाकथित उच्च जातीशी संबंध नसलेले श्री नरेन्द्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा. पण मोदींना विरोध करायला त्यांच्याकडे अन्य मुद्दे होते. त्यांच्या दुर्दैवाने श्री रामनाथ कोविंदांच्या बाबतीत त्यांना असं काहीच करता येत नाही.

विरोधकांचं खरं दु:ख हे आहे की राष्ट्रपतीपदाचा या वेळचा उमेदवार हा दलित, उच्चशिक्षित, अनुभवी, आणि संघी असे सगळे असल्याकारणाने संघ आणि भाजपच्या चारित्रहननाकरता त्यांना जात हा मुद्दा उकरून काढता येणार नाही. मिडियाची जी तडफड सगळीकडे बघायला मिळते आहे ती या कारणाने की आता संघ आणि भाजप हे दलितविरोधी ही प्रतिमा निर्माण करताना ज्या खोट्या बुद्धीभेदी कथांचा पूर आणला जायचा तो आणण्यात ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत. आता ही गोष्ट जगासमोर वारंवार येणार की भारतवर्षाचा राष्ट्रपती हा दलित तर आहेच पण तो संघी सुद्धा आहे. अर्थात, ही गोष्ट अखिल विश्वापुढे उघड होईल की संघ जातीयवादी तर नाहीच, पण या उलट संघ प्रत्येक जातीला राजकारणात उच्च स्थान मिळवून देशसेवा करण्यासाठी समान संधी उपलब्ध करुन देतो.

मिडियामधे जी तडफड दिसते आहे त्याने प्रत्येक राष्ट्रवादी भारतीयाला गुदगुल्या नक्की होत असणार. मलाही होत आहेत यात आश्चर्य ते काय?! लोग मजा बघत आहेत, तुम्हीही बघा.

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।

समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

।। भारत माता की जय ।।

|| वंदे मातरम् ||

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. १०, शके १९३९ | योगिनी एकादशी

राष्ट्रपतीपद का चुनाव एवं विरोधियों की तिलमिलाहट

ज्ञान न पूछो वामी का, पूछ लीजिये जात।
दलित क्यों नहीं पॉलिटब्यूरो में, पूछो मार के लात !

हमेशा आपको आप हजारों सालों से गुलाम (दास) हैं यह कुछ समाजोंघटकों के  मन पर पीढी दर पीढी बिंबित करते रहना, फिर उस संदर्भ में आपको इस तथाकथित दास्यत्व से बाहर आना आवश्यक है यह बार बार समझाना, एवं उस पश्चात आपको इस तथाकथित दास्यत्व से बाहर निकालने हेतू सातत्यपूर्ण ढंग से एक काल्पनिक शत्रू को आपके सामने खडा करना, उदाहरण किसी एक समाज को लक्षय करके - प्रथमत: वैचारिक और उस पश्चात सामरिक विद्रोह के लिये आपको प्रवृत्त करना यह वामपंथी/साम्यवादी/नक्षलवादी मानसिकता के लोगों का प्रयत्न रहा है. फिर जिन्हें ये गुलाम बतलाने इच्छुक हैं वो समाज अथवा व्यक्ती कितना भी कौशल्यविकसित, उच्चशिक्षाप्राप्त, एवं समृद्धी की ओर अग्रेसर क्यों न हो!

कल राष्ट्रीय लोकतंत्र मोर्चा (एन.डी.ए.) के राष्ट्रपतीपद के प्रत्याशी के नाम की घोषणा होते ही जो विरोधक, वामपंथी/साम्यवादी/नक्षलवादी एवं उनके समर्थक, तथा बिकाऊ मिडीया एवं उनके सोशल मिडीया पर पडे खच्चरों की निराशा से उत्पन्न बैचैनी और विषवमन दृग्गोचर हो रहा है वह इस बात पर है की अब सारे दुनिया को पता चल जाएगा कि संघ है क्या. यह बात कोई रोकॅट साईन्स तो नहीं थी कि भारतीय जनता पक्ष सर्वसहमती के हेतू एक दलित, उच्चशिक्षित, राजनीतीका अनुभवी, एवं संघ की विचारधारा रखने वाला कोई प्रत्याशी की खोज कर रही थी.

श्री रामनाथ कोविंदजी इन सारे निकषों में खरे उतरते हैं. वे दलित हैं, इतना ही नहीं वे गरीब किसान कुटुंब से आते हैं, दिल्ली उच्च न्यायालय एवं सर्वोच्च न्यायालय में वे १६ वर्ष वकील थे, आय.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण हैं, कुछ शैक्षणीक संस्थाओं के व्यवस्थापक भी रहें हैं, केवल इतना ही नहीं उन्हे संयुक्त राष्ट्रसंघ में भारत का प्रतिनिधित्व करने का एवं  संयुक्त राष्ट्रसंघके आमसभा को संबोधित करनेका भी अनुभव प्राप्त है. संघी है तो पृथक बताना आवश्यक नहीं कि उन्हें सामाजिक कार्य में रुचि है अपितु अनुभव भी प्राप्त है. अब कुछ वर्षों से वे बिहार के राज्यपाल हैं. हां, यह वहीं है, जिन्होनें "अपेक्षित" के स्थान पर "उपेक्षित" कहने पर तेजस्वी यादव को पूरी शपथ पुन: पढने का आदेश दिया था.

परंतु उपरोक्त विरोधकों को यह बात पच नहीं रही की ऐसा व्यक्ती एक संघी है. हेतूपूर्वक इस शब्द का प्रयोग किया है क्योंकी बिकाऊ पत्रकारों को और संघ के अंधविरोधकों को इस शब्द का उपयोग करने के अभ्यस्त हैं. ये संघ के समर्थक ही नहीं अपितु संघ विरोधकों को भी ज्ञात है कि संघ मे किसी की जाति पूछी तक नहीं जाती, एवं नहीं साथ साथ संघ शाखा में जाने वाले लोगों मे जाती कोई महत्व नहीं रखती. इतना ही नहीं अनेक विजातीय संघ कार्यकर्ताओं के आपस में केवल रोटी ही नही बेटी व्यवहार भी हैं.

आज तक संघ को सातत्य से ब्राह्मणो एवं उच्च जातीयों के संगठन  के रूप में संघकार्य से अपरिचित जनमानस के मन पर बिंबित करने में इन अंधविरोधकों नें कोई कसर नहीं छोडी थी. इसको पहली चोंट तब पहुंची जब श्री नरेन्द्र मोदी जो किसी तथाकथित उच्च जाती से संबंध नहीं रखते वे प्रधानमंत्री बने. परंतु उनका विरोध करने के हेतू विरोधकों के पास अन्य विषय थे.  श्री रामनाथ कोविंदजी के विषय में ऐसा कुछ भी नहीं है.

विरोधीयों का दु:ख यह है कि इस बार राष्ट्रपतीपद के प्रत्याशी के दलित एवं संघी होने के कारण अब संघ एवं भारतीय जनता पक्ष के चारित्र्यहनन के लिये उनको जाती का आधार कैसे मिलेगा? मिडीयाकी जो तिलमिलाहट दृग्गोचर हो रही है, वह इस हेतू है की सालों पुराने संघ एवं भाजपा के दलितविरोधी होने की कहानियों की बाढ लाने मे वे इस बार पूरी तरह से असफल रहे हैं. अब यह बात विश्व के सामने बार बार आयेगी की भारतवर्ष का राष्ट्रपती दलित है एवं संघी भी है. अर्थात, यह बात विश्व को दृग्गोचर होगी की संघ जातीवादी तो है ही नही, अपितु संघ हर जाती के लोगों को राजनीती में उच्च स्थान प्राप्त कर देशसेवा करने हेतु समान अवसर प्राप्त कराता है.

मिडिया की इस छटपटाहट से हर राष्ट्रवादी भारतीय को गुदगुदी तो अवश्य हो रही है. मुझे भी होना आश्चर्य की बात नहीं. आप भी मजे लिजीये.

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।

महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।

समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

।। भारत माता की जय ।।

|| वंदे मातरम् ||

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. १०, शके १९३९ | योगिनी एकादशी

Wednesday, June 14, 2017

बालादपि सुभाषितम् ग्राह्यं आणि हाताला लागेल ते हत्यार

विषादप्यमृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम् ।
अमित्रादपि सद्वृत्तममेध्यादपि काञ्चनम् ॥

या श्लोकातील बालादपि सुभाषितम् ग्राह्यं हा भाग महत्त्वाचा आहे. याचा ढोबळ अर्थ लहान मुलांकडूनही अनेकदा आपल्याला काहीतरी महत्त्वाचं शिकता येतं. शाळा सुरू होण्याचे हे दिवस आहेत. आजच मुलांच्या पालकसभेला जाऊन आलो आणि शाळेत बाईंनी मुलांची आगाऊच केलेली एक तक्रार ऐकून डोक्यात लख्ख प्रकाश पडला. शाळेत मुलं मारामार्‍या करतात अशी ती तक्रार होती. वर्ष सुरू होत आहे, तेव्हा तुमच्या मुलांना आत्ताच समजावून सांगा असं त्यांचं म्हणणं होतं. इतर सूचनांमधे स्टीलची पट्टी मुलांना शाळेत देऊ नका, लाकडी द्या, कारण, मारामारी करताना मुलं अक्षरशः हाताला लागेल ती वस्तू फेकून मारतात. त्यात निरुपद्रवी खोडरबरापासून टोकदार पेन्सिली, तीर्थरूपांची हळूच ढापलेली पेनं, पट्टी, प्लॅस्टीक आणि स्टीलचे जेवणाचे डब्बे या सगळ्या वस्तू आल्या. आता आजकालची मुलं अधिक आक्रमक किंवा हिंसक होत आहेत हा मुद्दा जरा बाजूला ठेवूया. पण आपणही कधीतरी त्यांच्या वयाचे होतोच. समोरच्या मुलाने आपल्याला मारल्यावर हाताला लागेल ती वस्तू फेकून मारण्याची लहान मुलांकडे किंवा लहानपणी असलेली कल्पकता मोठेपणी कुठे जाते? मोठं झाल्यावर आपला मेंदू इतका गोठल्यासारखा का होतो? मी हे काय बोलतो आहे कळत नाही आहे ना? सांगतो.

केरळ आणि बंगालमधे हिंदूंची काय स्थिती आहे तुम्हाला वेगळं सांगायला नको, ते सगळं बातम्या आणि सोशल मिडीयामार्फत जगजाहीर झालेलं आहे. उत्तर प्रदेश, बिहार, आणि अगदी महाराष्ट्रात सुद्धा जिथे जिथे शांतीदूतांचा प्रादुर्भाव आहे तिथे तिथे हिंदूविरोधी हिंसा होतेच. या सगळ्या बातम्यांत एका गोष्टीकडे आपलं लक्ष जायला हवं. "घरात घुसून घरातल्यांच्या समोर अमक्याला मारलं किंवा तमक्याचा खून केला". मग प्रश्न असा आहे की त्यावेळी घरातले काय करत होते? याचं उत्तर अशा बातम्यांत "घरातल्यानी हल्लेखोरांकडे खूप गयावया केली", "जो मारला जात होता त्याच्या जीवासाठी हल्लेखोरांकडे भीक मागितली", "रडारड केली" या घरातल्यांच्या तत्कालीन प्रतिक्रिया अत्यंत पराभूत मानसिकतेच्या निदर्शक आहेत.

अरे! याला काही अर्थ? मान्य आहे, घरात परवान्याशिवाय हत्यारं ठेवायला परवानगी नाही. मात्र घरात स्वयंपाकघराची उपकरणं ठेवायला अजून तरी बंदी आलेली नाही. गरम पातेलं उचलायला चिमटा वापरत असालच. मारा फेकून. काही घरांत हातानी कुटलं जात असल्यास मिनी खलबत्ताही असेल. अगदी बाकी काही नाही तरी भाजी कापायची सुरी तरी असेलच. मांसाहारी असाल तर मासे किंवा मटण कापायची सुरी असेल तर आणखी उत्तम. उचला आणि जोरदार प्रतिहल्ला करा. आपल्याकडे एक म्हण आहे, "भित्यापाठी ब्रह्मराक्षस". घरातल्या कर्त्या पुरुषावर हल्ला झाल्यावर तुम्ही रडारड केलीत, हल्लेखोरांकडे त्याच्या प्राणांची भीक मागितलीत तरी तुम्ही काही सत्यवानाची सावित्री नव्हे आणि हल्लेखोर हे यमराज त्याहून नव्हेत. त्यामुळे या रडण्याभेकण्याचा काहीही परिणाम होणार नाही. झालाच, तर हल्लेखोर स्वतःच्या कृत्यावर खूष होण्याचीच शक्यता जास्त. कारण घरातला कर्ता पुरुष मारला जात असताना / गेल्यावर घरात जो हलकल्लोळ माजतो, त्याचा उपयोग इतरांवर दहशत बसवण्यासाठी त्यांना होत असतो. त्यामुळे त्यांना ब्रह्मराक्षस होण्याची संधी न देता हाताला लागेल ती वस्तू हत्यार समजून त्यांच्यावर फेकून मारा, किंवा ती वस्तू घेऊन त्यांच्यावर धावून जा.

लक्षात घ्या. पुन्हा म्हण सांगतो. भित्यापाठी ब्रह्मराक्षस. तुम्ही घाबरता म्हणून समोरचा तुम्हाला घाबरवतो, मारतो, हल्ला करतो.

दोन घटना सांगतो. पहिली बातमी नुकतीच वर्तमानपत्रात वाचलेली आहे, तर दुसरी पुर्वी सत्यघटनांवर आधारित दूरदर्शनवर सकस कार्यक्रम दाखवायचे त्या काळात अशाच एका कार्यक्रमात पाहिलेली गोष्ट आहे. हल्ली फक्त सांगितिक जल्लोष, तर्कहीन फालतू मालिका, आणि विमानापेक्षा जास्त लोक पॅनलवर बसवतात अशी चर्चावजा भांडणं यातून असल्या मनोरंजनाच्या चिखलातून असल्या बातम्या तुमच्या नजरेला पडल्याच तर त्या व्यक्तीचे कौतुक करण्याबरोबरच त्या व्यक्तीची कृती ही आपल्या स्मृतीपटलावर कोरून ठेवा.

एक. न घाबरणारी पन्नाशी ओलांडलेली एखादी महिला मोटारसायकलवरुन आलेल्या दोन चोरांना चोपून काढते आणि चोरी न करताच पळून जायला भाग पाडते.
दोन. स्वयंपाकघरापर्यंत घुसलेला चोर पाहून एखादी प्रसंगावधानी गृहिणी गॅसवर ठेवलल्या पातेल्यातलं उकळतं पाणी त्याच्या चेहर्‍यावर फेकून तो कळवळत असताना यशस्वीरित्या बाहेर पळ काढून गर्दी जमवते.

घरात घुसून जेव्हा हत्या होते तेव्हा प्रतिहल्ला होणार नाही या हिशेबानेच हल्ला झालेला असतो. मग तुम्हाला जो धक्का बसतो, तोच धक्का त्यांना द्यायला काय हरकत आहे? म्लेंछ क्रूर असतात, पण तितकेच भित्रेही असतात. त्यांच्यावर प्रतिहल्ला झाला, मग तो कशाने होतो याला महत्त्व नाही, आणि त्वेषाने प्रतिहल्ला झाला तर त्यांना स्वतःचं रक्त सुद्धा बघायला आवडत नाही. त्यात नको तिथे तुमचा वार बसला तर भळाभळा रक्तस्त्राव होऊन जागच्या जागी हल्लेखोर कोसळू शकतो. तुम्ही जितकी गयावया कराल, तितका त्यांना आनंद होतो. आणि मरायचंच असेल तर जीव वाचवता वाचवता मरा ना, कुत्र्याच्या मौतीने का मरता? स्वसंरक्षणार्थ प्रतिहल्ला केला आणि त्यात हल्लेखोर मेला तर प्रतिहल्ला करणार्‍याला म्हणजेच आपल्याला कायद्याचं सुद्धा संरक्षण आहे. तेव्हा तुमच्या प्रतिहल्ल्यात त्यांच्यापैकी एखादा मेला आणि त्याचा मृतदेह तुमच्या घरात सापडला तर तो तुमच्यावर त्याने तुमच्यावर प्रथम हल्ला केल्याचा एक महत्त्वाचा पुरावा होतो.

सुरवातीला लहान मुलांचं उदाहरण दिलं होतं. आता आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकलेल्या एका मोठ्या माणसांच्या गोष्टीकडे वळूया. अकबर बादशहाविषयी काहीही मत असलं तरी मठ्ठ अकबर आणि त्याला शहाणपणा शिकवणारा बिरबलाच्या गोष्टी फारच आवडत्या. तर अशाच एका गोष्टीत एकदा अकबर बादशहाच्या दरबारात 'सगळ्यात चांगले हत्यार कोणते?' याविषयी चर्चा चालू होती. अकबराचे सरदार निरनिराळे पर्याय उत्तम हत्यार म्हणून सांगत होते. कुणी म्हणे "तलवारीसारखं उत्तम हत्यार नाही." तर कुणी म्हणे की "दांडपटाही जोडीला हवाच". आणखी एक जण म्हणाला, "धनुष्य बाण उत्तम, सुरक्षित अंतरावरुन शत्रूवर हल्ला करता येतो". एकाने तर बंदुका आणि तोफांची नाव घेतलं. कुणी काही तर कुणी काही. या सगळ्या जोरदार चाललेल्या चर्चेत बिरबल मात्र गप्प होता. ते पाहून बादशहाने त्याला मुद्दाम विचारलं, "क्यों पंडित बिरबल, तुम क्या कहते हो?" बिरबलाने शांतपणे उत्तर दिलं, "जी हुजूर, खाविंदांच्या मान्यवर सरदारांनी सांगितलेली ही सगळी हत्यारं खासच आहेत, पण माझ्या मते जो ऐन वख्त पर हाथ लगे वो हथियार ही खास होता है". अकबराला हे उत्तर जरा जास्तच अनपेक्षित होतं, "नहीं बिरबल, ये बात हमें ठीक नहीं लगी. आखिर कोई एक हथियार तो सबसे खास होगा ही!"

"आप कहते हैं तो होगा जहांपनाह, लेकिन मेरी तो यही राय रहेगी". बादशहाला आणि त्याच्या इतर दरबार्‍यांना हे उत्तर जरा अगोचरपणाचं वाटलं, पण बिरबल नेहमीच अशी वेगळी उत्तरं देतो म्हणून सगळ्यांनी ते हसून सोडून दिलं.

या नंतर काही दिवसांनी अशाच एके दिवशी बिरबल त्याच्या नेहमीच्या रस्त्याने देवदर्शनाला चालला होता. देवळात जाताना त्याला एके ठिकाणी एका चिंचोळ्या गल्लीतून जावे लागत असे. आज तो ती गल्ली अर्धी ओलांडल्यावर बघतो तर काय, समोरून एक महाकाय पिसाळलेला हत्ती जो समोर येईल त्याला पायाखाली तुडवत, सोंडेनं फेकून देत धावत येत होता. आता मात्र बिरबल घाबरला. तो देवदर्शनाला निघाल्याने त्याच्याकडे काहीच हत्यार नव्हतं, ना तलवार, ना भाला, ना धनुष्यबाण. प्रत्येक क्षणी हत्ती आणि त्याच्यातलं अंतर कमी होत चाललेलं होतं. त्याने इकडेतिकडे पाहिलं....आणि त्याला जवळच एक रस्त्यावरचे उकिरडे हुंगणारं कुत्रं दिसलं. बिरबलाने निमिषभर विचार करुन त्या कुत्र्याचं तंगडं धरून ते हवेत गरागरा फिरवलं आणि हत्ती पुरेसा जवळ येताच त्याच्या दिशेने फेकून मारलं ते नेमकं त्याच्या गंडस्थळावर आदळलं! बरं आदळलं ते आदळलं वरतून ते तिथून घसरून पडू नये म्हणून आपल्या पंजे रोवून तिथे चिकटण्याचा प्रयत्न करु लागलं.

नको तिथे काहीतरी आदळल्याने आणि वर त्याच्या बोचकारण्याने हत्ती बावचळला आणि ताबडतोब पीछे मुड करुन विरूद्ध दिशेला पळत सुटला. अशा रीतीने बिरबलाने सुटकेचा निश्वास टाकला. दिल्लीतल्या भर रस्त्यात ही घटना घडल्याने बादशहाच्या कानापर्यंत जायला फार वेळ लागला नाही. तेव्हा त्याला मनोमन कबूल करावंच लागलं, "ऐन वख्त पर हाथ लगे वो हथियार ही खास होता है".

ही गोष्ट फक्त अकबराची फजितीची मजा घ्यायला आणि बिरबलाच्या बुद्धीमतेचं आणि प्रसंगावधानाचं कौतुक करायला नव्हे, तर त्यातून बोध घेण्याकरता आहे. आपल्या घरच्यांवर हल्ला झाला, तर दिसेल त्या वस्तूने प्रतिहल्ला करा. भाजी कापायची सुरीने सपासप मारत सुटा; मिसळणाच्या डब्यातलं तिखट डोळ्यात जाईल असं फेका, नाही तर आख्खा स्टीलचा डबाच फेकून मारा; पोळ्या करायचं लाटणं डोक्यात घाला; कचर्‍याची बादली फेकून मारा - पण स्वस्थ बसू नका. काही घरात किरकोळ दुरुस्तीची काही सामुग्री असते. त्यात स्क्रूड्रायव्हर, हातोडा, आणि खिळे ही सगळ्यात उपयुक्त सामुग्री आहे. आता नवीन तंत्रज्ञानामुळे भिंतीत खिळे ठोकायला हातोडा लागत नाही. त्यासाठी बंदुकीतून गोळी मारल्यासारखे खिळे भिंतीत मारता येतात अशी यंत्रे निघालेली आहेत. मी तुम्हाला पर्याय सांगतो आहे, शेवटी काय, उपलब्ध असेल आणि हाताला लागेल ते हत्यार. एकदा तुम्ही भ्यायचं सोडलंत तर ब्रह्मराक्षसाला पळवून लावणं हे फार कठीण नाही.

जाता जाता, जमलं तर सेल्युलर (Cellular) हा इंग्रजी सिनेमा बघा. आपल्यावर किंवा कुटुंबियांवर हल्ला करणार्‍या माणसाला रोखायला त्याला कुठलंतरी हत्यार घेऊन अनेकदा भोसकायला लागतं असं नाही. सिनेमातल्या नायिकेच्या घरावर काही बदमाश हल्ला करुन सगळ्यांना ओलीस ठेवतात. कथेच्या खोलात जाण्यात अर्थ नाही, पण आपल्यावर हल्ला करणार्‍या एका बदमाशाला जीवशास्त्राची शिक्षिका असलेली नायिका दंडातल्या एका धमनीच्या जागी काचेच्या तुकड्याने वार करुन कशी ठार करते, ते बघण्यासारखं आहे. हा संपुर्ण सिनेमा थरारक आहेच, पण प्रस्तुत लेखाच्या अनुषंगाने हा प्रसंग साडेत्रेपन्नाव्या (53:30) मिनीटापासून पहा.



तेव्हा, आत्मानं सततं रक्षेत - आपले सातत्याने रक्षण करा!

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. ४, शके १९३९ 

Thursday, June 8, 2017

वामपंथी भारत विखंडन ४: चोराच्या उलट्या बोंबा आणि अर्थारोपण

समजा तुम्हाला कुणी अतिरेकी कुत्रा म्हणालं तर? तुम्हाला राग येईल ना? जो म्हणेल त्याला तुम्ही मारायला धावाल ना? कदाचित नाही. तुम्ही त्याचा प्रतिवाद कराल. काय म्हणता....तुम्ही नक्की मारायला धावून जाल??

आता पुढचा परिच्छेद वाचा. जे.एन.यु.च्या एका डाव्या विचारवंताची ही वाक्य आहेत.

"सांप्रतकाळी या देशात जी सगळ्यात मोठी फुटीरतावादी शक्ती आहे ती म्हणजे ब्राह्मणवादी हिंदू राष्ट्रवाद होय.
हा राष्ट्रवाद कुठल्याही लोकप्रिय चेहर्याच्या रूपात प्रकट होऊ शकतो.
हे एक असं सत्य आहे की ज्याला स्वीकारणे ही या देशाच्या मुक्ती आणि स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले पहिले जोमदार पाऊल असेल.
या सत्याचा स्वीकार करायला खऱ्या देशभक्तीची, सामाजिक प्रतिबद्धतेची, आणि साहसाची आवश्यकता आहे."

साम्यवादी आणि डाव्यांना अशा प्रकारचा युक्तीवाद करण्याचं रीतसर प्रशिक्षण दिलेलं असतं आणि ते या परिच्छेदातून स्पष्टच दिसतं आहे. यात त्याने त्याच्या मते गंभीर आणि खरीच अस्तित्वात आहे असं भासवून एक समस्या मांडली आहे, तिला जबाबदार कोण याचंही उत्तर हाच इसम देतो आहे, आणि त्यासाठी काय केलं पाहीजे हेही हाच सांगतो आहे. म्हणजे प्रश्न त्याचा, आणि उत्तरही त्याचंच. अशा प्रकारे त्याने अत्यंत हुशारीने व सुसूत्र पद्धतीने शब्दांची मांडणी करुन त्याला होऊ शकणारा विरोध गुंडाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला या परिच्छेदात राष्ट्रवादाला बदनाम करायचं आहे, म्हणून तो म्हणतोय की राष्ट्रवाद चुकीचा आहे. मग तो म्हणतो आहे राष्ट्रवाद कुठल्या रूपात दिसेल ते पहा. मग त्यावर तो उपाय सांगतो आहे,

"या सत्याचा स्वीकार करायला खर्‍या देशभक्तीची, सामाजिक प्रतिबद्धतेची, आणि साहसाची आवश्यकता आहे."

अरे वा रे वा. म्हणजे राष्ट्रवाद आणि देशभक्ती या वेगवेगळ्या संज्ञा आहेत? राष्ट्रवाद म्हणजे देशभक्ती नव्हे? आणि राष्ट्रवादाचा अर्थ हिंदू राष्ट्रवाद असाच होतो? बघा, म्हणजे याने जाता जाता राष्ट्रवादालाच कशी नावं ठेवली ती!

एखाद्या शब्दामागची भावना बदनाम कशी करावी याचा वरील परिच्छेद हा उत्तम वस्तुपाठ आहे. राष्ट्राच्या रक्षणासाठी, भल्यासाठी जगणाऱ्या आणि झटणाऱ्या प्रत्येकाला एका झटक्यात बदनाम करायचं असेल, हतोत्साहित करायचं असेल तर राष्ट्रवाद या शब्दालाच बदनाम करावं - या साम्यवाद्यांनी भारतात राबवलेल्या कल्पनेने आज मूर्त स्वरूप धारण केलं आहे. आपल्याला आठवत असेल तर काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांना भेटायला गेलेल्या काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर या घटिंगणाची मुलाखत घेऊ पाहणार्‍या रिपब्लिक वाहिनीच्या वार्ताहरालाच अय्यर साहेबांनी "मी देशद्रोही वाहिनीशी बोलत नाही" असं सुनावलं. या चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे शक्ती कपूरने इतरांना चारित्र्याचे धडे देण्यागत प्रकार होता. राहुल गांधींच्या प्रत्येक भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख हटकून 'धोकादायक विचारसरणी' म्हणून होणं, आणि देशाच्या भल्याचं चिंतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काँग्रेस आणि साम्यवाद्यांकडून "संघी" अशी संभावना होणं, या दोन्ही गोष्टींमागची कारणं सारखीच आहेत. एकदा का राष्ट्रवाद या संज्ञेला अस्पृश्यतेचं लेबल लावलं की त्याने प्रेरित असलेली प्रत्येक गोष्ट, व्यक्ती, संस्था, आणि कार्य हे आपोआप वाईट आहे हे सिद्ध करता येतं. हे उमगलेल्या डाव्यांनी मग देशभक्ती या शब्दाला राष्ट्रवादापासून वेगळं करुन या शाब्दिक युद्धासाठी दोन पार्ट्या तयार केल्या. ज्याला देशाबद्दल खरोखर काही पडलेली आहे, जो सदोदित देशाच्या भल्याचाच विचार करतो त्याला जहाल किंवा अतिरेकी राष्ट्रवादी म्हणून विरोधी पार्टीत उभं केलं जाऊ लागलं, आणि काँग्रेस आणि साम्यवादी घटिंगणांनी आपलंही देशावर प्रेम आहे हे सिद्ध करायला "देशभक्त" हे लेबल आपल्याला स्वतःच चिकटवून घेतलं (त्यांच्या दोन पंतप्रधानांनी स्वतःलाच भारतरत्न दिलं तसंच). यात सातशे शहाईंशीं आकडा धारक शांतीप्रिय लोक या लाटेवर स्वार झाले नसते तरच नवल होतं.

हे पुरेसं नव्हतं. कारण लोक तेच तेच ऐकून एक ना एक दिवस कंटाळतात. मग प्रखर राष्ट्रवादाला तो Jingoism किंवा Fascism यांचंच दुसरं रूप असल्याचं असत्य रेटलं जाऊ लागलं. Fascism या शब्दाचा अर्थ शब्दकोशात "A political theory advocating an authoritarian hierarchical government (as opposed to democracy or liberalism)" असा आहे. आर्यावर्तात हजारो वर्ष राजेशाहीच होती व अनेक ठिकाणी अत्यंत कल्याणकारी राजे राज्य करत असंत. आपल्याला लोकशाहीशी परिचय नव्हताच असे नव्हे, कारण चाणक्याच्या काळात मर्यादित लोकशाही असलेली जनपदं असल्याचे उल्लेख आहेत. पण प्रामुख्याने राजेशाही हीच आपल्याकडे राज्यपद्धती राहिलेली आहे, आणि राजेशाही Fascism च्या व्याख्येच्या (authoritarian hierarchical government) जराशी जवळ जाणारी आहे. आपली उज्ज्वल संस्कृती व बहुसंख्य दैदिप्यमान परंपरा निर्माण होण्याचा काळ हाच आहे. मग आपल्या संस्कृती व परंपरांचा आदर करणाऱ्या केवळ संघासारख्या संघटनेचाच नव्हे तर, संघाशी अजिबात संबंध नसलेल्या पण प्रखर राष्ट्रवादी असलेल्या व्यक्ती व संस्थांची Fascist असं लेबल लाऊन बदनामी करणं आणि मग हळू हळू जो राष्ट्रवादी तो फॅसिस्ट असं समीकरण रूढ करण्याचा प्रयत्न करणं हे साम्यवादी आणि शांतीप्रिय समुदायाच्या आधुनिक कार्यपद्धतीचा भाग होता आणि आहे.

दुसर्‍या भागात आपण पाहिलं होतं, की हिटलर शिस्तीचा भोक्ता असल्याने बाकी कुणीही शिस्तप्रिय असलं की त्याला नाव ठेवायला हिटलर म्हटलं जातं कारण त्या व्यक्तीला बदनाम करायला हिटलर हे संबोधन बरं पडतं. तीच क्लुप्ती सुक्याबरोबर ओलं जाळायला निघालेले, 'लिबरल' नामक कातडं पांघरलेले डावे / साम्यवादी वापरत असतात. वरची Fascismची व्याख्या वाचली तर त्यात राष्ट्रवाद अनुस्युत असतो. म्हणूनच तुम्ही राष्ट्रवादी असलात तर त्याच बरोबर तुम्ही फॅसिस्टही होता. हे म्हणजे आपल्या अपराधाबद्दल एखादा आपल्याला लाथ घालायला निघाला तर आपला अपमान लपवायला लाथ मारणाऱ्यालाच गाढव म्हणण्या सारखं आहे, कारण शेवटी लाथ मारण्याबद्दल गाढव हा प्राणी प्रसिद्ध आहे.

राष्ट्रवादाला नाकारायला भारतीय संविधानाचा हल्ली वापर केला जाऊ लागलेला आहे. सुरवातीला दिलेल्या वामी परिच्छेदातली क्लुप्ती इथेही आपल्याला दिसते. यात विरोधी मताची मुस्कटदाबी करायला वपरलं जाणारं एक वाक्य म्हणजे "आम्ही संविधान मानतो". या विधानात "तुम्ही संविधान मानत नाही" हे गृहित धरलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संविधानात राष्ट्रवाद हा शब्द नाही, त्याच्या संदर्भातले लेखन नाही, म्हणून राष्ट्रवाद हा देशविरोधीच आहे असा भंपक सिद्धांत मांडायचा. संविधानात बदल करण्याबद्दल कुणी भाष्य केलं की संविधानाला तुम्ही हात लावायचा नाही, संविधानाबद्दल तुम्ही काही बोलायचं नाही अशी दमदाटी सुरू होते. मग आत्तापर्यंत संविधानात झालेल्या शंभराहून अधिक (ताजा गुगल शोध) सुधारणांचं काय करायचं? ते रद्ध करायचे का? या बद्दल मात्र हाताची घडी तोंडावर बोट. गंमत म्हणजे, संविधानात घुसवलेला "सेक्युलर" हा शब्द सुद्धा एका सुधारणेद्वाराच घातलेला आहे. संविधानात बदल करायचे नसतील, म्हणजेच पर्यायाने आत्तापर्यंत केलेले बदलही रद्द करायचे असतील, तर "सेक्युलर" हा शब्दही हद्दपार करावा लागेल, हे या स्वयंघोषित संविधानरक्षकांना मान्य आहे का? असा प्रश्न विचारल्यास अर्थातच "आम्ही म्हणतो तेच संविधान, तुम्हां फॅसिस्टांना काय कळतंय त्यातलं / तुम्ही फासिस्ट आहात, तुम्हाला बोलायचा हक्क नाही" या प्रकारची विधानं येऊ लागतात. "तुम्ही फासिस्ट" हे ही ठरवणारे हेच. एका विशिष्ट पुस्तकातल्या मजकूरावर टीका झाल्यावर किंवा त्यात सुधारणा करण्याची गरज व्यक्त झाल्यावर ज्याप्रमाणे दमदाटी आणि हिंसा होते, तशीच दमदाटी संविधानाच्या नावावरही होईल अशी कल्पनाही खुद्द संविधानाच्या निर्मात्यांनीही केली नसेल.

दुसरी क्लुप्ती म्हणजे अस्तित्वात नसलेला शब्द निर्माण करायचा आणि समाजात विष पेरायला अशा शब्दांना सोडून द्यायचं. असा शब्द म्हणजे वरील वामी परिच्छेदातला Jingoism हा शब्द. हा शब्द पहिल्यांदा जॉर्ज होलिओक या ब्रिटीश इसमाने अठराशे अठ्याहात्तर साली निर्माण केला आणि वापरला. Jingoism या शब्दाचे शब्दकोषात "An appeal intended to arouse patriotic emotions" आणि "Fanatical patriotism" असे दोन अर्थ दिलेले आहेत. तर विकीपिडीया याच संज्ञेचं "Jingoism refers to nationalism in the form of aggressive foreign policy." असं वर्णन करतो. अतिरेकी राष्ट्रवाद नावाचा काही प्रकार अस्तित्वात असलाच तर तो Jingoism या संज्ञेच्या अधिक जवळ जातो. आपल्या राष्ट्राच्या रक्षणाबद्दल तीव्र भावना असणे व आक्रमक परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून त्या भावनेला जोपासणे हे नक्की कुठल्या दृष्टीकोनातून नकारात्मक आहे? पण राष्ट्रवादाला बदनाम करायचं असेल तर असे शब्द हे बनवत राहणं आणि ते वापरात आणत राहणं हे साम्यवाद्यांचं वैशिष्ठ्यच आहे. कालांतराने हे दोन शब्द इतके आलटून पालटून वापरले जाऊ लागले की त्यांचा अर्थ एकच असल्याचा समज व्हावा.

मी तुम्हाला पहिल्याच वाक्यात "तुम्हाला कुणी अतिरेकी कुत्रा म्हणालं तर" अशा अर्थाचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर आता पुढे देतो आहे. अठराशे सत्त्याहात्तर ते अठराशे अठ्याहात्तर या दरम्यान लढल्या गेलेल्या रशिया व तुर्किस्तान यांच्यातील युद्ध हे त्याची पार्श्वभूमी आहे. या युद्धाच्या तपशीलात जायचीगरज नाही. हे युद्ध सुरू असताना ब्रिटनभर असणार्‍या पब आणि संगीतसभांत एक गाणं म्हटलं जात असे. गायक जी. एच. मॅक्डरमॉट यांनी गायलेलं आणि जी. डब्ल्यू. हंट यांनी लिहीलेलं हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की अठराशे अठ्याहात्तर साली चक्क प्रिन्स ऑफ वेल्सने श्री मॅक्डरमॉट यांना स्वत:साठी खास खाजगी कार्यक्रम आयोजित करुन हे गाणं गायला लावलं. हे गाणं फारच जोशपूर्ण "बाय जीझस" या प्रार्थनावजा शपथेच्या जागी "बाय जिंगो" (by Jingo) हे शब्द वापरण्यात आले होते. एखाद्या ठिकाणी "बाय जीझस" म्हणायचं (swearing मधे जीझसला आणायचं) नसेल  तर "बाय जिंगो" हे त्याकाळी सर्रास वापरले जाणारे उद्गारवाचकशब्द होते. ते गाणं असं:

We don't want to fight but by Jingo if we do
We've got the ships, we've got the men, we've got the money too
We've fought the Bear before, and while we're Britons true
The Russians shall not have Constantinople.

याच शब्दांचा वापर करुन ब्रिटीश नागरिक जॉर्ज होलिओक यांनी Jingoism हा शब्द निर्माण करुन तो डेली न्युज या वृत्तपत्राला पाठवलेल्या पत्रात प्रथम वापरला. कालांतराने हा शब्द सामान्य वापरात घुसला...म्हणजे प्रखर राष्ट्रवादाला विरोध करण्याकरता जगभरातील घरभेद्यांच्या हातात हे कोलित मिळालं. १९१६ साली ऑस्कर सीझर नामक अमेरिकन व्यंग्यचित्रकार यांनी कढलेल्या The American War-Dog या व्यंग्यचित्रात चितारलेल्या कुत्र्याचे नाव जिंगो असे होते. आता जगातल्या १०० सर्वाधिक लोकप्रिय श्वाननामात जिंगो या नावाचा समावेश होतो.

आता मला सांगा, समजा तुम्हाला कुणी Jingoist म्हणालं तर?

------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ शु. १४, वटपौर्णिमा, शके १९३९
------------------------------------------

वामपंथी भारत विखंडन ३

Tuesday, May 23, 2017

थोडंसं तुमच्या मुलीबद्दल

थोडंसं तुमच्या मुलीबद्दल

जरा तुमच्या मुलींविषयी बोलायचं आहे. हो, तुमच्याच मुलीबद्दल. थोडा वेळ आहे का?

चित्रपट निर्माते अतुल तापकिर यांनी पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी वाचल्यापासून एक विचार मनात घोळत होता. म्हणजेच कलम ४९८(अ)चा गैरवापर झाल्यास सगळ्या कुटुंबावर अटकेची वेळ येते, त्यात आई, वडील, असेल तर भाऊ आणि बहीणही. गैरवापर झाला आहे हे सिद्ध करेपर्यंत सासरच्यांचं आयुष्य उध्वस्त झालेलं असतं. कुठलाही कायदा जेव्हा केला जातो तेव्हा त्याचे समाजावर दूरगामी परिणाम होत असतात. म्हणूनच अशा कुठल्याही कायद्याबद्दल समाजाने त्या कायद्याचे होणारे परिणाम समजून घेणे आवश्यक आहे. त्या कायद्याचा प्रभाव, होणारे फायदे व नुकसान लक्षात घेऊन त्या संदर्भात व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. मग या कायद्याला आपलं समर्थन असो की विरोध, त्याची प्रत्येक बाजू आणि होणारे परिणाम या विषयी समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जागृती होणं आवश्यक आहे. एखाद्या कायद्यामुळे सत्कृतदर्शनी फायदा होतो आहे असं वाटलं किंवा सोय दिसत असली तरीही त्यावर समाधान न मानता खोलात जाऊन  कायद्याची चिकित्सा केली पाहिजे. आपल्या दुर्दैवाने सरकारने कायदा केला की हिंदू समाज तो मम म्हणून पटकन स्वीकारतो, त्याची फारशी चिकित्सा करत नाही. इतर धर्मीय मात्र जरा जरी प्रतिकूल वाटलं तरी त्याला कडाडून विरोध करुन सरकारला बेत रद्ध करायला भाग पाडतात आणि जरी कायदा स्वीकारला तरी त्यावर विचारमंथन करुन त्याच्या संभाव्य दुरुपयोगापासून स्वतःला संरक्षित (इन्सुलेट) कसं करायचं या कामाला लागतात. हिंदू नेते तर सोडाच पण सर्वसाधारण समाजही कुठल्याही कायद्याचा सर्व बाजूंनी विचार करत नाही.

हिंदू मुलींना माहेरच्या संपत्तीत वाटा देणारा जो कायदा आहे (त्यात झालेल्या सुधारणांसकट) की ज्यामुळे होणार्‍या फायद्याकडे बघताना दुर्दैवाने आपण त्याच्या एका पैलूकडे बघायला विसरलो. या कायद्याचा दुरुपयोग म्लेंछांकडून लव्ह जिहाद करता केला जातो आहे या संदर्भात काही घटना समोर येत आहेत. दुर्दैवाने अशा तर्‍हेने काही गंडवली गेलेली हिंदू कुटुंब आहेत पण अशी प्रकरणे सहन करण्याकडे प्रामुख्याने त्यांचा भर दिसतो. एक तर मुलगी मुसलमानाने पळवली म्हणून नाचक्की झालेलीच असते, त्यात मुलीने जावयाच्या सांगण्यावरुन संपत्ती धुवून नेली हे कुठल्या तोंडाने समाजाला सांगणार? मग शांतपणे नुकसान सहन करण्यापलिकडे त्यांच्याकडे काही पर्याय उरत नाही.

आता हे कसं केलं जातं त्याकडे पाहूया. आपण आपल्या मुलीचं वय १८ झाल्याशिवाय तिचं लग्न करु शकत नाही. इस्लाममधे मुलीच्या लग्नाचं एक असं वय निश्चित नाही. मुस्लिम मुलगी "वयात आली की" तिला लग्नासाठी योग्य समजलं जातं, त्यासाठी तिने वयाची १८ वर्ष पूर्ण केलेली असणं आवश्यक नाही, आणि कुठल्याही भारतीय कायद्यानुसार हा गुन्हा ठरू शकत नाही. थोडक्यात मुस्लिम मुलगी "वयात आली" की तिचं लग्न लाऊन देता येतं म्हणजे निकाह करुन देता येतो आणि तिचा नवरा तिच्याशी शारिरिक संबंधही ठेऊ शकतो, दोन्ही गोष्टींसाठी तिचं "वय" आड येत नाही.

दिनांक ३ अप्रिल २०१४ मधे लागू झालेल्या Criminal Law (Amendment) Act, 2013 नुसारपरस्परसंमतीने ठेवता येणार्‍या शरीरसंबंधांचं वय कमीतकमी १८ आहे. म्हणजेच मुलींचं वय १८ वर्षाच्या आत असेल आणि परस्परसंमतीने जरी शरीरसंबंध ठेवला गेलातरीही तो बलात्कार ठरतो आणि पुरुषाला शिक्षा होते, तशी अर्थातच कायद्यात तरतूद आहे.

इस्लाममधे मुलगी वयात आली की लग्न करता येतं हे आपण वर बघितलं. हे लग्नाचं वय साधारणपणे १५-१६असं असतं. १६ पेक्षा कमी असेल तर धर्मगुरूंच्या परवानगीने निकाह करता येतो. थोडक्यात, निकाह करता वयाची अट नाही. पण एक प्रमुख अट आहे ती म्हणजे निकाह करणारा पुरुष व स्त्री हे दोघेही मुसलमान हवेत. म्हणजेच, परधर्मीयांना स्वतःच्या धर्मात राहून मुसलमान व्यक्तीशी निकाह करता येत नाही, त्यासाठी इस्लाम स्वीकारावा लागतो. धर्मांतर करावं लागतं.

पुढे वाचण्याआधी वरचे तीन परिच्छेद पुन्हा वाचा.

वाचलेत?

ठीक. आता पुढे वाचा. याचाच अर्थ असा, की एखाद्या १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या पण "वयात आलेल्या" हिंदू मुलीने प्रेमाच्या भरात इस्लाम कबूल केला आणि नंतर तिने लग्न केलं तर त्यानंत‌रच्या शरीरसंबंधांना कायद्याने बलात्कार मानलं जात नाही. कारण अर्थातच ती मुलगी मुसलमान असल्याने आणि ती वयात आलेली असल्याने तिने केलेल्या निकाहाला आणि तिच्या शोहरला तिच्याशी केलेल्या शरीरसंबंधांना कायद्याने संरक्षण दिलं गेलेलं आहे. थोडक्यात, अशा तर्‍हेने एखाद्या हिंदू मुलीने धर्मांतर केलं आणि ती मुसलमान झाली तर कायदा काहीही करु शकत नाही.

तर, मुद्दा कायद्याच्या दूरगामी सामाजिक परिणांमांचा आहे. आता असे किस्से कानावर येऊ लागले आहेत की या दोन कायद्यांचा हिंदूंची संपत्ती ढापण्यासाठी अत्यंत सुनियोजित वापर म्लेंछांकडून केला जातो आहे. श्रीमंत किंवा सधन घरातली मुलगी शोधायची, मग ती धोक्याच्या चौदा ते सोळा या वयोगटातली असेल तर उत्तम. तिला प्रेमात पाडल्यावर इस्लाम कबूल करुन घ्यायला फार मतपरिवर्तन करावं लागत नाही, कारण एकदा प्रेमात आंधळं झालं की या बाबतीत स्वतःचं मत फारसं उरतच नाही. वयात आल्यावर तुम्ही कधीतरी पहिल्यांदा प्रेमात पडला असालच, त्यावेळी त्याला/तिला आवडतं म्हणून आपण आपल्या मनाविरुद्ध काय काय केलं ते आठवून पहा आणि त्यावेळी तुमचं वय काय होतं ते ही.  मुद्दा असा, की अशा तर्‍हेने अक्कल गहाण टाकून प्रेमात आंधळं होऊन प्रियकराशी लग्न करायला मुलगी पुरेशी आतुर झाली (डेस्परेट हा शब्द वापरणार होतो पण....असो) की मग तिला इस्लाम स्वीकारायला लावणं हे फारसं कठीण काम उरत नाही. कारण त्या वेळी ती मुलगी इतकी निकाहोत्सुक झालेली असते की तू इस्लाम स्वीकारला नाहीस तर तुझ्या नवर्‍याला जेल होईल मग तुमचं लग्न कसं होणार अशी भीती घातली जाते. एकदा ती मुलगी मुसलमान झाली की मग दोघांचा निकाह लाऊन द्यायला काहीच कायदेशीर अडचण येत नाही. मुलीकडच्यांनी कितीही हापटलं तरी कायदेशीररित्या ते काहीही करु शकत नाहीत, कारणबलात्काराची केस टाकायला आणि त्यासाठी १८ वर्ष ही वयोमर्यादाअसायला मुलगी आता हिंदूच उरलेली नसते. खरा धोका हा इस्लाम स्वीकारण्याच्या आधीच असतो, कारण नंतर वेळ उलटून गेलेली असते. एकदा का तिचा निकाह झाला की पुढच्या आयुष्याचा निकाल लागतो, कसा ते पुढे पाहू.

हिंदू मुलीचा माहेरच्या संपत्तीत अस‌लेला हक्क ती मुसलमान झाल्यावर नष्ट होतो अशी कुठेही तरतूद नाही. त्यामुळे निकाह झाल्यावर नव्याची नवलाई असताना मुलीला तिच्या माहेरच्या संपत्तीत हक्क मागायला लावण्याचे आणि भरपूर संपत्ती उकळली जाण्याचे किस्से घडलेले आहेत. त्यातला एक किस्सा सांगतो. यात मुलगी सज्ञान असणे या व्यतिरिक्त काही वेगळं नाही. किस्सा १००% खरा आहे. फक्त नाव आणि शहर सांगायची परवानगी नाही.

एक सधन घर. मोठी मुलगी, तिला एक धाकटा भाऊ. घरातलं वातावरण सर्वधर्मभावाने व्यापलेलं, अगदी इश्वर अल्ला सगळे समान वगैरे. वडील उद्योजक आणि आई शहरातल्या नामांकित महाविद्यालयात प्राचार्या. मुलगा आणि मुलगी दोघंही लाडके. कशाची कमतरता नाही. झालं असं की केबलवाल्या भाईजानने मुलीशी विशेष मैत्री वाढवली. एक दिवस काही कामाने बाहेर पडलेली मुलगी घरी परतलीच नाही. कुठूनतरी फोन केला की मी सुखरूप आहे, निकाह केला आहे, माझी काळजी करु नये.

अगदी सर्वधर्मसमभाववाले असले म्हणून काय झालं, शेवटी आईबापाचं काळीज. शोध शोध शोधलं पण मुलगी सापडली नाही. सज्ञान असल्याने ते फारसं काही करु शकलेही नसते. नाचक्की टाळण्यासाठी चौकशी आवरती घेतली गेली. ते कुटुंब लोकांच्यात फार मिसळणारं नसल्याने प्रकरणाचा फार बोभाटाही झाला नाही. बहुतेक हिंदू घरांमधे केलं जातं तेच यांनीही केलं, गप्प बसले.

काही महिन्यांनी मुलगी आपला शोहर आणि इतर सासरच्यांबरोबर दारात हजर झाली. वाढलेलं पोट तिच्या शोहरचा पराक्रम दाखवत होतंच. हा धक्का पचवण्याची ताकद गोळा करण्याचा विचार करत असतानाच मुलीच्या सासरच्यांनी बाँब टाकला, च‌क्क मागणी केली की मुलीचा तुमच्या संपत्तीत हक्क आहे तो तिला मिळावा. मुलीच्या सासरच्यांनी सोबत एक वकील साहेबपण याच कामासाठी आणलेले होते. वडील जरा सावरले आणि त्यांना दुसर्‍या दिवशी या असं सांगितलं. मुलीला म्हणाले बरेच दिवसांनी आली आहेस तर आजची रात्र रहा घरी. सासरच्यांनी आक्षेप घेतला पण हा मुद्दा फार ताणला नाही. ताणल्यावर शोहरने तलाक, तलाक, तलाक म्हटलं असतं तर संपत्तीतला वाटा कसा मागता आला असता? ते निघून गेल्यावर मुलीच्या वडीलांनी त्यांच्या ओळखीतल्या काही लोकांशी संपर्क साधला, रातोरात चक्र फिरवली - तपशीलात जायची गरज नाही पण एवढं सांगणं पुरेसं आहे की मुलीच्या सासरच्यांना वाटलं गोल्डफिश गळाला लागलाय पण तो शार्क निघाला. कालांतराने मुलीचं "पुनर्वसन" झालं. तिचं भलं झालं म्हणून पुढचे तपशील विचारायची गरज वाटली नाही.

व्यवस्थित श्रीमंत घर पाहून मुलीला पटवणं, मग पळवणं, आणि मग तिला दिवस गेल्यावर गर्भपाताची शक्यताही उलटून गेल्यावर तिच्या संपत्तीत हक्क मागणं आणि तो मागत असताना सोबत वकीलालाही घेऊन जाणं हे सगळं संपूर्णपणे सुनियोजित कार्यपद्धतीचा भाग निश्चितपणे वाटावा अशा पद्धतीचा एक ट्रेन्डच सद्ध्या कानावर येणार्‍या गोष्टींमधून दिसू लागला आहे.

या किश्शात योग्य लोकांची ओळख आणि त्यांचा प्रभाव या गोष्टींचा फायदा झाला. पण सगळ्यांना असा फायदा होतो असं नाही. बहुतेक लोक लुटले जातात.

याला आणखी एक पैलू आहे. आपल्याकडे अगदी लहानपणापासून मुलांच्या नावावर पैसे ठेवले जातात, दागिने केले जातात. बँकेत खातंही काढून दिलं जातं. त्यातून एटिएम वगैरे सारख्या माध्यमातून पैसे काढणं फारसं कठीण नाहीच. मुलगी सज्ञान असेल तर तर काय विचारायलाच नको. कुठेही गेलं तरी त्या पैशावर तिचाच कायदेशीर हक्क असतो. तेव्हा जरी संपत्तीत वाटा मागितला नाही, तरी तिचा असणारा पैसा आणि तिने पळून जाताना घेतलेले दागिने ही तिच्या शोहरचीच संपत्ती होते.

इस्लाम स्वीकार करुन निकाह केलेल्या हिंदू मुलीचा जरी तिच्या माहेरच्या संपत्तीवर हक्क अबाधित असला तरी मुसलमान स्त्रीला निकाह केल्यावर मात्र नवर्‍याच्या संपत्तीवर काहीही हक्क नसतो. तिच्या संप‌त्तीव‌र‌ही शोह‌र‌चाच ह‌क्क अस‌तो. ती संपूर्णपणे कफल्लक असते. इस्लाममधे महिलांना निकाह करताना शोहरकडून जी मेहेरची रक्कम मान्य केली जाते त्या व्यतिरिक्त एकाही नव्या पैशावर तिचा अधिकार नसतो. मेहेरच्या रकमेला मात्र तिचा शोहर हात लाऊ शकत नाही. पण मुळात वर म्हटल्यप्रमाणे प्रेमात आंधळं आणि निकाहातूर झालेल्या मुलीकडून मेहेरच्या तुटपुंज्या रकमेबद्दल सहमती मिळवणं हे फारच सोपं काम असतं.

आणि हो, आपण अजून तुमच्याच मुलींबद्दल बोलतो आहोत. तेव्हा न कंटाळता वाचताय असं गृहित धरतो.

मग शोहरने तलाक दिल्यावर, मग तो हल्ली बहुचर्चित असलेला आणि एकदम दिलेला तीन तलाक असो की मग काही विशिष्ठ दिवसांच्या अंतराने दिलेला तलाक असो, एकदा का तलाक मिळाला की तुमची मुलगी रस्त्यावर आलीच समजा. हो, आणखी एक गोष्ट. एकदा स्वेच्छेने इस्लाममधे प्रवेश केला, की तो सोडण्याची शिक्षा ही मौत आहे. त्या भीतीने तलाकशुदा मुलगी परत आपल्या आईवडिलांकडे जात नाही, आणि ती भीती नसली तरी बहुतेक वेळी आईवडिलही तिला मुसलमान नवर्‍यापासून झालेल्या पोराबाळांसकट स्वीकारत नाहीत (ही गोष्ट चांगली की वाईट यावर चर्चा नको, असंहोतं हे खरं आहे). त्यामुळे काहीही आधार नसलेल्या परिस्थितीत, विपन्नावस्थेत ती मुलगी पुढचं आयुष्य कंठायला मजबूर होते.

काही गोष्टी या कालसापेक्ष किंवा स्थानसापेक्ष नसतात. त्या सार्वकालिक आणि जागतिक सत्य असतात. दारिद्र्य आणित्याचा गुन्हेगारीशी असणारा संबंध ही अशीच बाब आहे. आता श्रीमंत आणि सुशिक्षितही गुन्हे करतातच, पण गुन्हे घडण्याची शक्यता ही गरिबीशी जास्त संबंधित आहे. तुम्ही बघितलं असेल तर श्रीमंत देश आणि लोक हे गुन्हेगार आणि गुन्हेगारीचे नियंत्रण करतात आणि प्रत्यक्ष गुन्हे करणारे (आणिपकडले जाणारे) बहुतेक वेळा दारिद्र्यामुळे गुन्हेगारीकडे वळलेले असतात. अगदी काश्मीरातले हुरियत कॉन्फरन्स वगैरे फुटीरतावादी लोक बघितले तर ते वातानुकूलीत घरात बसून आदेश देतात, आणि दगडफेक करायला शाळकरी गरीब मुलं आणि सामान्य नागरिक हेच पुढे असतात. आपल्या कुबेरांचा सनदी लेखपाल याकूब मेमन हा उच्चशिक्षित इसम सुद्धा दहशतवादी हल्ल्यांचं नियोजन करणारा होता, प्रत्यक्ष बाँब ठेवणारी मुलं ब‌हुतांशी ग‌रीब घ‌रात‌ली.

तेव्हा तुमच्या मुलीला संपत्ती आणि संततीसाठी व्यवस्थित उसा सारखं चिपाड होईपर्यंत पिळून घेतल्यावर तलाक मिळाला की तिच्याकडे उरलेल्या शून्य संपत्तीचं पर्यवसान तिच्या मुलांचं गुन्हेगारीकडे वळण्यापर्यंत होऊ शकतं. किंवा वाईटात वाईट, तुमच्या काळ‌जाचा तुक‌डा अस‌लेली ती आत्म‌ह‌त्या क‌र‌ते.

बारा तेरा वर्षांपासून आजकाल मुलांना राजकीय मते मांडता येऊ लागली आहेत आणि कुठला पक्ष कसा हे समजू लागलेलं आहे, तरीही राजकीय मताचे पर्यवसान मतदानात होण्यासाठी वयोमर्यादा १८ आहे. नशीबाने हा कायदा सर्वधर्मीयांना लागू आहे. मग तोच तर्क आणि तसाच कायदा धर्मांतरासाठी का नको? हिंदू हिताचा पत्कर घेणार्‍या संघटना आणिप्रामुख्याने राजकीय पक्षांना हिंदूंनी हा प्रश्न विचारायला हवा. या प्रकरणी किमान जनजागृती करण्यासाठी ते काय करत आहेत असा जाब हिंदूंनी विचारला पाहीजे. तलाक संपला तरी पुढचे परिणाम चुकत नाहीत, म्हणून अशा पक्षांनी तीन तलाक बंद करा म्हणून उड्या मारण्यापेक्षा समान नागरी कायदा आणण्यासाठी हिंदू जनतेनेच दबाव आणला पाहीजे. सबका साथ हवा असेल आणि सबका विकास करावयाचा असेल तर कायदाही समान हवा. खेळपट्टी ही दोन्ही संघांना तीच मिळायला हवी, इंग्रजीत म्हणतात तसं लेव्हल प्लेयिंग फिल्ड. हा झाला राजकीय जाणीवांचा भाग.

मुख्य आणि मूळ मुद्दा असा की मुलांशी सतत संवाद ठेवा. त्यांना या धोक्याची जाणीव करुन द्या. अथर्वशीर्ष शिकवलंत तर सोबत पवित्र वाळवंटी पुस्तकाचंही ज्ञान द्या. रामाने परत आणायला सीतेशी त्याचं लग्न झालं होतं, तुमच्या लाडाकोडात वाढलेल्या जानकीला लग्नाआधीच समाजातल्या मारीचांची वेळीच ओळख करुन द्या. नाहीतर तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती उरलं धुपाटणं याहून वाईट परिस्थिती ओढवेल आणि तुमच्या मुलीची पालीच्या तुटलेल्या शेपटीसारखी अवस्था होऊन असहाय्यपणे वळवळण्यापलिकडे त्या दरिद्री कन्येकडे काहीही पर्याय उरणार नाही.

आणि हो, आपण तुमच्या मुलीबद्दलच बोलत आहोत. लक्षात आहे ना?

© मंदार दिलीप जोशी
मूळ संकल्पना: श्री आनंद राजाध्यक्ष

टीपः लेखात मांडलेल्या मुद्द्यावरच बोलावे. विषयांतरवाल्या टिप्पण्यांना बंदी आहे. उडवल्या जातील.

वैशाख‌ कृ. १२, श‌के १९३९

Thursday, May 4, 2017

वामपंथी भारत विखंडन ३ - महागलेली देशभक्ती आणि चवताळलेला चीन

या मालिकेखाली हा लेख असला, तरी या भागाला जगत् विखंडन असेही म्हणता येईल.

 चवताळलेल्या चीन बद्दल आधी बोलूया. गेल्या दिवाळीच्या आधीची गोष्ट आहे. चीनने हाफीज सईदला अतिरेकी घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मार्गात अडथळा निर्माण केला आणि कधी नव्हे तो अवघा भारत देश पेटून उठला. अंहं, म्हणजे चीनी वकिलातीवर मोर्चे, घोषणा वगैरे नाही. तर अत्यंत विधायक पद्धतीने जनताजनार्दनाने निषेध व्यक्त केला. तो म्हणजे चीनी वस्तूंवर बहिष्कार. बहिष्काराचे हे अस्त्र आधी स्नॅपडील वगैरेच्या माध्यमातून तावूनसुलाखून बाहेर पडलं होतं, आता त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर करावी अशी मोहीम सोशल मिडियातून सुरू झाली. चीनी मालाने बाजारपेठेत इतक्या खोलवर मुसंडी मारलेली आहे की संपूर्ण बहिष्कार ही अत्यंत अवघड होती. म्हणून मग दिवाळीच्या खरेदीतून तरी चीनी वस्तूंना लोकांनी हद्दपार करावे असे ट्रेन्ड सोशल मिडीयावर सुरु झाले आणि त्याचा परिणामही दिसू लागला.

दिवाळीत वापरले जाणारे कंदील, पणत्या, सजावटीचे सामान इत्यादी वस्तू चीनी नाहीत हे पाहून खरेदी केल्या जाऊ लागल्या. या वस्तू एक तर गेल्या वर्षीच्याच वापरायला लोक प्राधान्य देऊ लागले, किंवा रस्त्यावर विकायला बसलेल्या विक्रेत्यांकडून स्थानिक आणि ग्रामीण पातळीवर तयार झालेल्या वस्तू लोक विकत घेऊ लागले. सामान्य जनतेच्या मनातून आलेल्या या बहिष्काराची कल्पना इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल अशी कुणालाच अपेक्षा नव्हती, मात्र तो झाला हे खरे. इतका, की चीनला याची दखल घेत या बहिष्काराचा परिणाम भारतातल्या चीनच्या गुंतवणुकीवर होईल अशी चिंतावजा धमकी द्यावी लागली. मात्र या धमकीला न भीक घालता भारतीय सामान्य जनतेने हा बहिष्कार गेल्या दिवाळीपुरता का होईना यशस्वी करुन दाखवला. आम्ही काय खरेदी करावे, यावर कुणाचे नियंत्रण असूच शकत नाही, त्यामुळे चरफडत बसण्यापलिकडे चीनकडे दुसरा काहीच पर्याय उरला नाही.

चीन का चवताळला ते आपण बघितलं. आता देशभक्ती कशी महागते ते पाहूया. वर म्हटल्याप्रमाणे चीनी मालाने भारतीय बाजारपेठेत आपण कल्पनाही करु शकणार नाही अशा रीतीने खोलवर प्रवेश केला आहे. आपल्याला अर्थात ही गोष्ट माहित आहे की चीनचा हा प्रभाव त्याच्या वस्तूंच्या किंमतीवर प्रामुख्याने अवलंबून आहे. कुठलीही वस्तू किंवा सेवा यांची किंमतीमधला एक प्रमुख घटक म्हणजे त्यात गुंतलेल्या कर्मचार्‍यांचा पगार किंवा मेहनताना. कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या प्रमाणात अनेक वस्तू किंवा सेवांची किंमत कमी-जास्त  होते.

इथे दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे एखादी वस्तू स्थानिक पातळीवर बनवणे महाग पडू लागले की ती बाहेर स्वस्तात बनवून घ्यावी असा विचार बळावतो. दुसरं म्हणजे आपल्यापेक्षा स्वस्तात बाहेर वस्तू बनवून मिळते हे कळलं की स्थानिक पातळीवर वस्तू बनवणे महाग आहे हे जाणवायला लागते. लक्षात घ्या एक म्हणजे "महाग पडू लागणे" आणि दुसरं म्हणजे "स्वस्त पर्याय" मिळणे.

जगात क्रमांक एकवर असणारी देशाची लोकसंख्या आणि एकाच विचारसरणीच्या पक्षाचा एकछत्री आणि मुख्य म्हणजे निरंकुश अंमल, आणि म्हणूनच प्रत्येक विरोध निर्दयपणे चिरडून काढता येण्याची क्षमता चीनकडे खचितच होती आणि आहे. वर उल्लेख केलेल्या दोन्ही गोष्टी चीनने केल्या. म्हणजे चीनने स्वस्त पर्याय उपलब्ध करुन दिलेच (मग दर्जा गेला तेल लावत, ते इकडच्या समजे पर्यंत चीन खूप खोलवर घुसला होता) पण म्हणजेच एखाद्या देशात वस्तू बनवणं महाग होईल अशी परिस्थिती निर्माण करणे हे अत्यंत कुशलतेने केलं.  इतर देशात वस्तू बनवणं महाग कसं करायचं? तर त्या देशातल्या कामगारांना आणि त्यातही प्रामुख्याने कामगार नेत्यांना हाताशी धरून विळा-हातोडावाल्या झेंड्याखाली संघटित होऊन "शोषक" मालकांच्या विरोधात लढायला फूस द्यायची. यात कामगारांनीही

लाल चीन आणि आणि त्याच्या आधी म्हणजे रशियाच्या विघटनापूर्वी अखंड सोवियत रशिया असताना क्रेमलिनचे मिंधे असलेल्या कामगार नेत्यांनी कधी न्याय्य मागण्या करुन तेवढंच पदरात पाडून घेण्यात समाधान मानलं नाही. मागण्या या कायम अवाजवी, अवास्तव, आणि मालकाला न परवडणार्‍या अशा ठेवत गेले आणि मागण्या कधीही संपू दिल्या नाहीत. मग त्या मान्य झाल्या नाहीत की संप केले गेले. हळू हळू एक तर कामगारांवर अती खर्च होत असल्यामुळे आणि अशा संपांमुळे कंपन्या चालू ठेवणं आणि त्यांत वस्तू बनवणं आणि विकणं हे उद्योजकांसाठी आणि विकत घेणं हे ग्राहकांसाठी "महाग पडू लागलं". परिणामस्वरूप त्या वस्तूंचे ग्राहक स्वस्त पर्याय शोधू लागणं साहजिकच म्हणायला हवं.

हेच धोरण चित्रपटांत राबवले गेले. पूर्वीचे सिनेमे आठवा - त्यांत मिलमालक आणि उद्योजक रक्तपिपासू, दुष्ट, संकुचित मनोवृत्तीचे आणि आप्पलपोटे दाखवले जायचे आणि आणि नायक असायचे गरीब पण मनाने उदार. मग ते कारखान्यात संप का घडवून आणेनात, आणि कामगारांना खायचे वांदे का होईनात, व्हिलन मात्र मालक! (त्यात हमखास नायकाचे प्रेम मिलमालकाच्या मुलीबरोबर किंवा बहिणीबरोबर जमायचे आणि त्याला विरोध करणारे मिलमालक अर्थातच व्हिलन. असो. हे विषयांतर झाले. हा विषय पुढच्या भागात नक्की). अगदी कोपर्‍यावरच्या किराणा किंवा कुठल्याही दुकानाचा मालक किंवा व्यापारी सुद्धा मारवाडी पोषाखातला अत्यंत स्थूल वा बेढब दिसणारा, काहीतरी सेठ वगैरे नाव असलेला, मुलींवर वाईट नजर असलेला (त्यात नायिका किंवा नायकाची बहीण हमखास), आणि लोकांना लुटायला तत्पर असा पूर्वीच्या सिनेमातून दाखवला जायचा.

मग दिवाळीच्या कंदिल आणि पणत्यांपासून वीजेवर चालणार्‍या उपकरणांपर्यंत आणि मुलांच्या खेळण्यांपासून ते रोजच्या वापरातल्या झाडू आणि सुपलीपर्यंत सगळ्या वस्तू या "बाहेरून" विकत घेणे हेच आर्थिक गणितात बसत असेल तर मुळातच गरीब असलेल्या या देशात चीनी वस्तूंनी हातपाय पसरणे यात काहीही आश्चर्य नाही. मग कोण खिशाला चाट लावून देशातच कारखाना काढून कामगार संघटनांच्या कटकटी सहन करत बसेल? दिवाळीत एका दुकानात एका चीनी खेळण्याची किंमत आणि त्यातल्या त्यात स्वस्त भारतीय खेळण्याची किंमत विचारली, तर दोन्हीत किमान दोनशे रुपयांचा फरक होता.

आहे की नाही देशभक्ती महाग?

© मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. ९, शके १९३९