Tuesday, May 23, 2017

थोडंसं तुमच्या मुलीबद्दल

थोडंसं तुमच्या मुलीबद्दल

जरा तुमच्या मुलींविषयी बोलायचं आहे. हो, तुमच्याच मुलीबद्दल. थोडा वेळ आहे का?

चित्रपट निर्माते अतुल तापकिर यांनी पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी वाचल्यापासून एक विचार मनात घोळत होता. म्हणजेच कलम ४९८(अ)चा गैरवापर झाल्यास सगळ्या कुटुंबावर अटकेची वेळ येते, त्यात आई, वडील, असेल तर भाऊ आणि बहीणही. गैरवापर झाला आहे हे सिद्ध करेपर्यंत सासरच्यांचं आयुष्य उध्वस्त झालेलं असतं. कुठलाही कायदा जेव्हा केला जातो तेव्हा त्याचे समाजावर दूरगामी परिणाम होत असतात. म्हणूनच अशा कुठल्याही कायद्याबद्दल समाजाने त्या कायद्याचे होणारे परिणाम समजून घेणे आवश्यक आहे. त्या कायद्याचा प्रभाव, होणारे फायदे व नुकसान लक्षात घेऊन त्या संदर्भात व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. मग या कायद्याला आपलं समर्थन असो की विरोध, त्याची प्रत्येक बाजू आणि होणारे परिणाम या विषयी समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जागृती होणं आवश्यक आहे. एखाद्या कायद्यामुळे सत्कृतदर्शनी फायदा होतो आहे असं वाटलं किंवा सोय दिसत असली तरीही त्यावर समाधान न मानता खोलात जाऊन  कायद्याची चिकित्सा केली पाहिजे. आपल्या दुर्दैवाने सरकारने कायदा केला की हिंदू समाज तो मम म्हणून पटकन स्वीकारतो, त्याची फारशी चिकित्सा करत नाही. इतर धर्मीय मात्र जरा जरी प्रतिकूल वाटलं तरी त्याला कडाडून विरोध करुन सरकारला बेत रद्ध करायला भाग पाडतात आणि जरी कायदा स्वीकारला तरी त्यावर विचारमंथन करुन त्याच्या संभाव्य दुरुपयोगापासून स्वतःला संरक्षित (इन्सुलेट) कसं करायचं या कामाला लागतात. हिंदू नेते तर सोडाच पण सर्वसाधारण समाजही कुठल्याही कायद्याचा सर्व बाजूंनी विचार करत नाही.

हिंदू मुलींना माहेरच्या संपत्तीत वाटा देणारा जो कायदा आहे (त्यात झालेल्या सुधारणांसकट) की ज्यामुळे होणार्‍या फायद्याकडे बघताना दुर्दैवाने आपण त्याच्या एका पैलूकडे बघायला विसरलो. या कायद्याचा दुरुपयोग म्लेंछांकडून लव्ह जिहाद करता केला जातो आहे या संदर्भात काही घटना समोर येत आहेत. दुर्दैवाने अशा तर्‍हेने काही गंडवली गेलेली हिंदू कुटुंब आहेत पण अशी प्रकरणे सहन करण्याकडे प्रामुख्याने त्यांचा भर दिसतो. एक तर मुलगी मुसलमानाने पळवली म्हणून नाचक्की झालेलीच असते, त्यात मुलीने जावयाच्या सांगण्यावरुन संपत्ती धुवून नेली हे कुठल्या तोंडाने समाजाला सांगणार? मग शांतपणे नुकसान सहन करण्यापलिकडे त्यांच्याकडे काही पर्याय उरत नाही.

आता हे कसं केलं जातं त्याकडे पाहूया. आपण आपल्या मुलीचं वय १८ झाल्याशिवाय तिचं लग्न करु शकत नाही. इस्लाममधे मुलीच्या लग्नाचं एक असं वय निश्चित नाही. मुस्लिम मुलगी "वयात आली की" तिला लग्नासाठी योग्य समजलं जातं, त्यासाठी तिने वयाची १८ वर्ष पूर्ण केलेली असणं आवश्यक नाही, आणि कुठल्याही भारतीय कायद्यानुसार हा गुन्हा ठरू शकत नाही. थोडक्यात मुस्लिम मुलगी "वयात आली" की तिचं लग्न लाऊन देता येतं म्हणजे निकाह करुन देता येतो आणि तिचा नवरा तिच्याशी शारिरिक संबंधही ठेऊ शकतो, दोन्ही गोष्टींसाठी तिचं "वय" आड येत नाही.

दिनांक ३ अप्रिल २०१४ मधे लागू झालेल्या Criminal Law (Amendment) Act, 2013 नुसारपरस्परसंमतीने ठेवता येणार्‍या शरीरसंबंधांचं वय कमीतकमी १८ आहे. म्हणजेच मुलींचं वय १८ वर्षाच्या आत असेल आणि परस्परसंमतीने जरी शरीरसंबंध ठेवला गेलातरीही तो बलात्कार ठरतो आणि पुरुषाला शिक्षा होते, तशी अर्थातच कायद्यात तरतूद आहे.

इस्लाममधे मुलगी वयात आली की लग्न करता येतं हे आपण वर बघितलं. हे लग्नाचं वय साधारणपणे १५-१६असं असतं. १६ पेक्षा कमी असेल तर धर्मगुरूंच्या परवानगीने निकाह करता येतो. थोडक्यात, निकाह करता वयाची अट नाही. पण एक प्रमुख अट आहे ती म्हणजे निकाह करणारा पुरुष व स्त्री हे दोघेही मुसलमान हवेत. म्हणजेच, परधर्मीयांना स्वतःच्या धर्मात राहून मुसलमान व्यक्तीशी निकाह करता येत नाही, त्यासाठी इस्लाम स्वीकारावा लागतो. धर्मांतर करावं लागतं.

पुढे वाचण्याआधी वरचे तीन परिच्छेद पुन्हा वाचा.

वाचलेत?

ठीक. आता पुढे वाचा. याचाच अर्थ असा, की एखाद्या १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या पण "वयात आलेल्या" हिंदू मुलीने प्रेमाच्या भरात इस्लाम कबूल केला आणि नंतर तिने लग्न केलं तर त्यानंत‌रच्या शरीरसंबंधांना कायद्याने बलात्कार मानलं जात नाही. कारण अर्थातच ती मुलगी मुसलमान असल्याने आणि ती वयात आलेली असल्याने तिने केलेल्या निकाहाला आणि तिच्या शोहरला तिच्याशी केलेल्या शरीरसंबंधांना कायद्याने संरक्षण दिलं गेलेलं आहे. थोडक्यात, अशा तर्‍हेने एखाद्या हिंदू मुलीने धर्मांतर केलं आणि ती मुसलमान झाली तर कायदा काहीही करु शकत नाही.

तर, मुद्दा कायद्याच्या दूरगामी सामाजिक परिणांमांचा आहे. आता असे किस्से कानावर येऊ लागले आहेत की या दोन कायद्यांचा हिंदूंची संपत्ती ढापण्यासाठी अत्यंत सुनियोजित वापर म्लेंछांकडून केला जातो आहे. श्रीमंत किंवा सधन घरातली मुलगी शोधायची, मग ती धोक्याच्या चौदा ते सोळा या वयोगटातली असेल तर उत्तम. तिला प्रेमात पाडल्यावर इस्लाम कबूल करुन घ्यायला फार मतपरिवर्तन करावं लागत नाही, कारण एकदा प्रेमात आंधळं झालं की या बाबतीत स्वतःचं मत फारसं उरतच नाही. वयात आल्यावर तुम्ही कधीतरी पहिल्यांदा प्रेमात पडला असालच, त्यावेळी त्याला/तिला आवडतं म्हणून आपण आपल्या मनाविरुद्ध काय काय केलं ते आठवून पहा आणि त्यावेळी तुमचं वय काय होतं ते ही.  मुद्दा असा, की अशा तर्‍हेने अक्कल गहाण टाकून प्रेमात आंधळं होऊन प्रियकराशी लग्न करायला मुलगी पुरेशी आतुर झाली (डेस्परेट हा शब्द वापरणार होतो पण....असो) की मग तिला इस्लाम स्वीकारायला लावणं हे फारसं कठीण काम उरत नाही. कारण त्या वेळी ती मुलगी इतकी निकाहोत्सुक झालेली असते की तू इस्लाम स्वीकारला नाहीस तर तुझ्या नवर्‍याला जेल होईल मग तुमचं लग्न कसं होणार अशी भीती घातली जाते. एकदा ती मुलगी मुसलमान झाली की मग दोघांचा निकाह लाऊन द्यायला काहीच कायदेशीर अडचण येत नाही. मुलीकडच्यांनी कितीही हापटलं तरी कायदेशीररित्या ते काहीही करु शकत नाहीत, कारणबलात्काराची केस टाकायला आणि त्यासाठी १८ वर्ष ही वयोमर्यादाअसायला मुलगी आता हिंदूच उरलेली नसते. खरा धोका हा इस्लाम स्वीकारण्याच्या आधीच असतो, कारण नंतर वेळ उलटून गेलेली असते. एकदा का तिचा निकाह झाला की पुढच्या आयुष्याचा निकाल लागतो, कसा ते पुढे पाहू.

हिंदू मुलीचा माहेरच्या संपत्तीत अस‌लेला हक्क ती मुसलमान झाल्यावर नष्ट होतो अशी कुठेही तरतूद नाही. त्यामुळे निकाह झाल्यावर नव्याची नवलाई असताना मुलीला तिच्या माहेरच्या संपत्तीत हक्क मागायला लावण्याचे आणि भरपूर संपत्ती उकळली जाण्याचे किस्से घडलेले आहेत. त्यातला एक किस्सा सांगतो. यात मुलगी सज्ञान असणे या व्यतिरिक्त काही वेगळं नाही. किस्सा १००% खरा आहे. फक्त नाव आणि शहर सांगायची परवानगी नाही.

एक सधन घर. मोठी मुलगी, तिला एक धाकटा भाऊ. घरातलं वातावरण सर्वधर्मभावाने व्यापलेलं, अगदी इश्वर अल्ला सगळे समान वगैरे. वडील उद्योजक आणि आई शहरातल्या नामांकित महाविद्यालयात प्राचार्या. मुलगा आणि मुलगी दोघंही लाडके. कशाची कमतरता नाही. झालं असं की केबलवाल्या भाईजानने मुलीशी विशेष मैत्री वाढवली. एक दिवस काही कामाने बाहेर पडलेली मुलगी घरी परतलीच नाही. कुठूनतरी फोन केला की मी सुखरूप आहे, निकाह केला आहे, माझी काळजी करु नये.

अगदी सर्वधर्मसमभाववाले असले म्हणून काय झालं, शेवटी आईबापाचं काळीज. शोध शोध शोधलं पण मुलगी सापडली नाही. सज्ञान असल्याने ते फारसं काही करु शकलेही नसते. नाचक्की टाळण्यासाठी चौकशी आवरती घेतली गेली. ते कुटुंब लोकांच्यात फार मिसळणारं नसल्याने प्रकरणाचा फार बोभाटाही झाला नाही. बहुतेक हिंदू घरांमधे केलं जातं तेच यांनीही केलं, गप्प बसले.

काही महिन्यांनी मुलगी आपला शोहर आणि इतर सासरच्यांबरोबर दारात हजर झाली. वाढलेलं पोट तिच्या शोहरचा पराक्रम दाखवत होतंच. हा धक्का पचवण्याची ताकद गोळा करण्याचा विचार करत असतानाच मुलीच्या सासरच्यांनी बाँब टाकला, च‌क्क मागणी केली की मुलीचा तुमच्या संपत्तीत हक्क आहे तो तिला मिळावा. मुलीच्या सासरच्यांनी सोबत एक वकील साहेबपण याच कामासाठी आणलेले होते. वडील जरा सावरले आणि त्यांना दुसर्‍या दिवशी या असं सांगितलं. मुलीला म्हणाले बरेच दिवसांनी आली आहेस तर आजची रात्र रहा घरी. सासरच्यांनी आक्षेप घेतला पण हा मुद्दा फार ताणला नाही. ताणल्यावर शोहरने तलाक, तलाक, तलाक म्हटलं असतं तर संपत्तीतला वाटा कसा मागता आला असता? ते निघून गेल्यावर मुलीच्या वडीलांनी त्यांच्या ओळखीतल्या काही लोकांशी संपर्क साधला, रातोरात चक्र फिरवली - तपशीलात जायची गरज नाही पण एवढं सांगणं पुरेसं आहे की मुलीच्या सासरच्यांना वाटलं गोल्डफिश गळाला लागलाय पण तो शार्क निघाला. कालांतराने मुलीचं "पुनर्वसन" झालं. तिचं भलं झालं म्हणून पुढचे तपशील विचारायची गरज वाटली नाही.

व्यवस्थित श्रीमंत घर पाहून मुलीला पटवणं, मग पळवणं, आणि मग तिला दिवस गेल्यावर गर्भपाताची शक्यताही उलटून गेल्यावर तिच्या संपत्तीत हक्क मागणं आणि तो मागत असताना सोबत वकीलालाही घेऊन जाणं हे सगळं संपूर्णपणे सुनियोजित कार्यपद्धतीचा भाग निश्चितपणे वाटावा अशा पद्धतीचा एक ट्रेन्डच सद्ध्या कानावर येणार्‍या गोष्टींमधून दिसू लागला आहे.

या किश्शात योग्य लोकांची ओळख आणि त्यांचा प्रभाव या गोष्टींचा फायदा झाला. पण सगळ्यांना असा फायदा होतो असं नाही. बहुतेक लोक लुटले जातात.

याला आणखी एक पैलू आहे. आपल्याकडे अगदी लहानपणापासून मुलांच्या नावावर पैसे ठेवले जातात, दागिने केले जातात. बँकेत खातंही काढून दिलं जातं. त्यातून एटिएम वगैरे सारख्या माध्यमातून पैसे काढणं फारसं कठीण नाहीच. मुलगी सज्ञान असेल तर तर काय विचारायलाच नको. कुठेही गेलं तरी त्या पैशावर तिचाच कायदेशीर हक्क असतो. तेव्हा जरी संपत्तीत वाटा मागितला नाही, तरी तिचा असणारा पैसा आणि तिने पळून जाताना घेतलेले दागिने ही तिच्या शोहरचीच संपत्ती होते.

इस्लाम स्वीकार करुन निकाह केलेल्या हिंदू मुलीचा जरी तिच्या माहेरच्या संपत्तीवर हक्क अबाधित असला तरी मुसलमान स्त्रीला निकाह केल्यावर मात्र नवर्‍याच्या संपत्तीवर काहीही हक्क नसतो. तिच्या संप‌त्तीव‌र‌ही शोह‌र‌चाच ह‌क्क अस‌तो. ती संपूर्णपणे कफल्लक असते. इस्लाममधे महिलांना निकाह करताना शोहरकडून जी मेहेरची रक्कम मान्य केली जाते त्या व्यतिरिक्त एकाही नव्या पैशावर तिचा अधिकार नसतो. मेहेरच्या रकमेला मात्र तिचा शोहर हात लाऊ शकत नाही. पण मुळात वर म्हटल्यप्रमाणे प्रेमात आंधळं आणि निकाहातूर झालेल्या मुलीकडून मेहेरच्या तुटपुंज्या रकमेबद्दल सहमती मिळवणं हे फारच सोपं काम असतं.

आणि हो, आपण अजून तुमच्याच मुलींबद्दल बोलतो आहोत. तेव्हा न कंटाळता वाचताय असं गृहित धरतो.

मग शोहरने तलाक दिल्यावर, मग तो हल्ली बहुचर्चित असलेला आणि एकदम दिलेला तीन तलाक असो की मग काही विशिष्ठ दिवसांच्या अंतराने दिलेला तलाक असो, एकदा का तलाक मिळाला की तुमची मुलगी रस्त्यावर आलीच समजा. हो, आणखी एक गोष्ट. एकदा स्वेच्छेने इस्लाममधे प्रवेश केला, की तो सोडण्याची शिक्षा ही मौत आहे. त्या भीतीने तलाकशुदा मुलगी परत आपल्या आईवडिलांकडे जात नाही, आणि ती भीती नसली तरी बहुतेक वेळी आईवडिलही तिला मुसलमान नवर्‍यापासून झालेल्या पोराबाळांसकट स्वीकारत नाहीत (ही गोष्ट चांगली की वाईट यावर चर्चा नको, असंहोतं हे खरं आहे). त्यामुळे काहीही आधार नसलेल्या परिस्थितीत, विपन्नावस्थेत ती मुलगी पुढचं आयुष्य कंठायला मजबूर होते.

काही गोष्टी या कालसापेक्ष किंवा स्थानसापेक्ष नसतात. त्या सार्वकालिक आणि जागतिक सत्य असतात. दारिद्र्य आणित्याचा गुन्हेगारीशी असणारा संबंध ही अशीच बाब आहे. आता श्रीमंत आणि सुशिक्षितही गुन्हे करतातच, पण गुन्हे घडण्याची शक्यता ही गरिबीशी जास्त संबंधित आहे. तुम्ही बघितलं असेल तर श्रीमंत देश आणि लोक हे गुन्हेगार आणि गुन्हेगारीचे नियंत्रण करतात आणि प्रत्यक्ष गुन्हे करणारे (आणिपकडले जाणारे) बहुतेक वेळा दारिद्र्यामुळे गुन्हेगारीकडे वळलेले असतात. अगदी काश्मीरातले हुरियत कॉन्फरन्स वगैरे फुटीरतावादी लोक बघितले तर ते वातानुकूलीत घरात बसून आदेश देतात, आणि दगडफेक करायला शाळकरी गरीब मुलं आणि सामान्य नागरिक हेच पुढे असतात. आपल्या कुबेरांचा सनदी लेखपाल याकूब मेमन हा उच्चशिक्षित इसम सुद्धा दहशतवादी हल्ल्यांचं नियोजन करणारा होता, प्रत्यक्ष बाँब ठेवणारी मुलं ब‌हुतांशी ग‌रीब घ‌रात‌ली.

तेव्हा तुमच्या मुलीला संपत्ती आणि संततीसाठी व्यवस्थित उसा सारखं चिपाड होईपर्यंत पिळून घेतल्यावर तलाक मिळाला की तिच्याकडे उरलेल्या शून्य संपत्तीचं पर्यवसान तिच्या मुलांचं गुन्हेगारीकडे वळण्यापर्यंत होऊ शकतं. किंवा वाईटात वाईट, तुमच्या काळ‌जाचा तुक‌डा अस‌लेली ती आत्म‌ह‌त्या क‌र‌ते.

बारा तेरा वर्षांपासून आजकाल मुलांना राजकीय मते मांडता येऊ लागली आहेत आणि कुठला पक्ष कसा हे समजू लागलेलं आहे, तरीही राजकीय मताचे पर्यवसान मतदानात होण्यासाठी वयोमर्यादा १८ आहे. नशीबाने हा कायदा सर्वधर्मीयांना लागू आहे. मग तोच तर्क आणि तसाच कायदा धर्मांतरासाठी का नको? हिंदू हिताचा पत्कर घेणार्‍या संघटना आणिप्रामुख्याने राजकीय पक्षांना हिंदूंनी हा प्रश्न विचारायला हवा. या प्रकरणी किमान जनजागृती करण्यासाठी ते काय करत आहेत असा जाब हिंदूंनी विचारला पाहीजे. तलाक संपला तरी पुढचे परिणाम चुकत नाहीत, म्हणून अशा पक्षांनी तीन तलाक बंद करा म्हणून उड्या मारण्यापेक्षा समान नागरी कायदा आणण्यासाठी हिंदू जनतेनेच दबाव आणला पाहीजे. सबका साथ हवा असेल आणि सबका विकास करावयाचा असेल तर कायदाही समान हवा. खेळपट्टी ही दोन्ही संघांना तीच मिळायला हवी, इंग्रजीत म्हणतात तसं लेव्हल प्लेयिंग फिल्ड. हा झाला राजकीय जाणीवांचा भाग.

मुख्य आणि मूळ मुद्दा असा की मुलांशी सतत संवाद ठेवा. त्यांना या धोक्याची जाणीव करुन द्या. अथर्वशीर्ष शिकवलंत तर सोबत पवित्र वाळवंटी पुस्तकाचंही ज्ञान द्या. रामाने परत आणायला सीतेशी त्याचं लग्न झालं होतं, तुमच्या लाडाकोडात वाढलेल्या जानकीला लग्नाआधीच समाजातल्या मारीचांची वेळीच ओळख करुन द्या. नाहीतर तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती उरलं धुपाटणं याहून वाईट परिस्थिती ओढवेल आणि तुमच्या मुलीची पालीच्या तुटलेल्या शेपटीसारखी अवस्था होऊन असहाय्यपणे वळवळण्यापलिकडे त्या दरिद्री कन्येकडे काहीही पर्याय उरणार नाही.

आणि हो, आपण तुमच्या मुलीबद्दलच बोलत आहोत. लक्षात आहे ना?

© मंदार दिलीप जोशी
मूळ संकल्पना: श्री आनंद राजाध्यक्ष

टीपः लेखात मांडलेल्या मुद्द्यावरच बोलावे. विषयांतरवाल्या टिप्पण्यांना बंदी आहे. उडवल्या जातील.

वैशाख‌ कृ. १२, श‌के १९३९

Thursday, May 4, 2017

वामपंथी भारत विखंडन ३ - महागलेली देशभक्ती आणि चवताळलेला चीन

या मालिकेखाली हा लेख असला, तरी या भागाला जगत् विखंडन असेही म्हणता येईल.

 चवताळलेल्या चीन बद्दल आधी बोलूया. गेल्या दिवाळीच्या आधीची गोष्ट आहे. चीनने हाफीज सईदला अतिरेकी घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मार्गात अडथळा निर्माण केला आणि कधी नव्हे तो अवघा भारत देश पेटून उठला. अंहं, म्हणजे चीनी वकिलातीवर मोर्चे, घोषणा वगैरे नाही. तर अत्यंत विधायक पद्धतीने जनताजनार्दनाने निषेध व्यक्त केला. तो म्हणजे चीनी वस्तूंवर बहिष्कार. बहिष्काराचे हे अस्त्र आधी स्नॅपडील वगैरेच्या माध्यमातून तावूनसुलाखून बाहेर पडलं होतं, आता त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर करावी अशी मोहीम सोशल मिडियातून सुरू झाली. चीनी मालाने बाजारपेठेत इतक्या खोलवर मुसंडी मारलेली आहे की संपूर्ण बहिष्कार ही अत्यंत अवघड होती. म्हणून मग दिवाळीच्या खरेदीतून तरी चीनी वस्तूंना लोकांनी हद्दपार करावे असे ट्रेन्ड सोशल मिडीयावर सुरु झाले आणि त्याचा परिणामही दिसू लागला.

दिवाळीत वापरले जाणारे कंदील, पणत्या, सजावटीचे सामान इत्यादी वस्तू चीनी नाहीत हे पाहून खरेदी केल्या जाऊ लागल्या. या वस्तू एक तर गेल्या वर्षीच्याच वापरायला लोक प्राधान्य देऊ लागले, किंवा रस्त्यावर विकायला बसलेल्या विक्रेत्यांकडून स्थानिक आणि ग्रामीण पातळीवर तयार झालेल्या वस्तू लोक विकत घेऊ लागले. सामान्य जनतेच्या मनातून आलेल्या या बहिष्काराची कल्पना इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल अशी कुणालाच अपेक्षा नव्हती, मात्र तो झाला हे खरे. इतका, की चीनला याची दखल घेत या बहिष्काराचा परिणाम भारतातल्या चीनच्या गुंतवणुकीवर होईल अशी चिंतावजा धमकी द्यावी लागली. मात्र या धमकीला न भीक घालता भारतीय सामान्य जनतेने हा बहिष्कार गेल्या दिवाळीपुरता का होईना यशस्वी करुन दाखवला. आम्ही काय खरेदी करावे, यावर कुणाचे नियंत्रण असूच शकत नाही, त्यामुळे चरफडत बसण्यापलिकडे चीनकडे दुसरा काहीच पर्याय उरला नाही.

चीन का चवताळला ते आपण बघितलं. आता देशभक्ती कशी महागते ते पाहूया. वर म्हटल्याप्रमाणे चीनी मालाने भारतीय बाजारपेठेत आपण कल्पनाही करु शकणार नाही अशा रीतीने खोलवर प्रवेश केला आहे. आपल्याला अर्थात ही गोष्ट माहित आहे की चीनचा हा प्रभाव त्याच्या वस्तूंच्या किंमतीवर प्रामुख्याने अवलंबून आहे. कुठलीही वस्तू किंवा सेवा यांची किंमतीमधला एक प्रमुख घटक म्हणजे त्यात गुंतलेल्या कर्मचार्‍यांचा पगार किंवा मेहनताना. कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या प्रमाणात अनेक वस्तू किंवा सेवांची किंमत कमी-जास्त  होते.

इथे दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे एखादी वस्तू स्थानिक पातळीवर बनवणे महाग पडू लागले की ती बाहेर स्वस्तात बनवून घ्यावी असा विचार बळावतो. दुसरं म्हणजे आपल्यापेक्षा स्वस्तात बाहेर वस्तू बनवून मिळते हे कळलं की स्थानिक पातळीवर वस्तू बनवणे महाग आहे हे जाणवायला लागते. लक्षात घ्या एक म्हणजे "महाग पडू लागणे" आणि दुसरं म्हणजे "स्वस्त पर्याय" मिळणे.

जगात क्रमांक एकवर असणारी देशाची लोकसंख्या आणि एकाच विचारसरणीच्या पक्षाचा एकछत्री आणि मुख्य म्हणजे निरंकुश अंमल, आणि म्हणूनच प्रत्येक विरोध निर्दयपणे चिरडून काढता येण्याची क्षमता चीनकडे खचितच होती आणि आहे. वर उल्लेख केलेल्या दोन्ही गोष्टी चीनने केल्या. म्हणजे चीनने स्वस्त पर्याय उपलब्ध करुन दिलेच (मग दर्जा गेला तेल लावत, ते इकडच्या समजे पर्यंत चीन खूप खोलवर घुसला होता) पण म्हणजेच एखाद्या देशात वस्तू बनवणं महाग होईल अशी परिस्थिती निर्माण करणे हे अत्यंत कुशलतेने केलं.  इतर देशात वस्तू बनवणं महाग कसं करायचं? तर त्या देशातल्या कामगारांना आणि त्यातही प्रामुख्याने कामगार नेत्यांना हाताशी धरून विळा-हातोडावाल्या झेंड्याखाली संघटित होऊन "शोषक" मालकांच्या विरोधात लढायला फूस द्यायची. यात कामगारांनीही

लाल चीन आणि आणि त्याच्या आधी म्हणजे रशियाच्या विघटनापूर्वी अखंड सोवियत रशिया असताना क्रेमलिनचे मिंधे असलेल्या कामगार नेत्यांनी कधी न्याय्य मागण्या करुन तेवढंच पदरात पाडून घेण्यात समाधान मानलं नाही. मागण्या या कायम अवाजवी, अवास्तव, आणि मालकाला न परवडणार्‍या अशा ठेवत गेले आणि मागण्या कधीही संपू दिल्या नाहीत. मग त्या मान्य झाल्या नाहीत की संप केले गेले. हळू हळू एक तर कामगारांवर अती खर्च होत असल्यामुळे आणि अशा संपांमुळे कंपन्या चालू ठेवणं आणि त्यांत वस्तू बनवणं आणि विकणं हे उद्योजकांसाठी आणि विकत घेणं हे ग्राहकांसाठी "महाग पडू लागलं". परिणामस्वरूप त्या वस्तूंचे ग्राहक स्वस्त पर्याय शोधू लागणं साहजिकच म्हणायला हवं.

हेच धोरण चित्रपटांत राबवले गेले. पूर्वीचे सिनेमे आठवा - त्यांत मिलमालक आणि उद्योजक रक्तपिपासू, दुष्ट, संकुचित मनोवृत्तीचे आणि आप्पलपोटे दाखवले जायचे आणि आणि नायक असायचे गरीब पण मनाने उदार. मग ते कारखान्यात संप का घडवून आणेनात, आणि कामगारांना खायचे वांदे का होईनात, व्हिलन मात्र मालक! (त्यात हमखास नायकाचे प्रेम मिलमालकाच्या मुलीबरोबर किंवा बहिणीबरोबर जमायचे आणि त्याला विरोध करणारे मिलमालक अर्थातच व्हिलन. असो. हे विषयांतर झाले. हा विषय पुढच्या भागात नक्की). अगदी कोपर्‍यावरच्या किराणा किंवा कुठल्याही दुकानाचा मालक किंवा व्यापारी सुद्धा मारवाडी पोषाखातला अत्यंत स्थूल वा बेढब दिसणारा, काहीतरी सेठ वगैरे नाव असलेला, मुलींवर वाईट नजर असलेला (त्यात नायिका किंवा नायकाची बहीण हमखास), आणि लोकांना लुटायला तत्पर असा पूर्वीच्या सिनेमातून दाखवला जायचा.

मग दिवाळीच्या कंदिल आणि पणत्यांपासून वीजेवर चालणार्‍या उपकरणांपर्यंत आणि मुलांच्या खेळण्यांपासून ते रोजच्या वापरातल्या झाडू आणि सुपलीपर्यंत सगळ्या वस्तू या "बाहेरून" विकत घेणे हेच आर्थिक गणितात बसत असेल तर मुळातच गरीब असलेल्या या देशात चीनी वस्तूंनी हातपाय पसरणे यात काहीही आश्चर्य नाही. मग कोण खिशाला चाट लावून देशातच कारखाना काढून कामगार संघटनांच्या कटकटी सहन करत बसेल? दिवाळीत एका दुकानात एका चीनी खेळण्याची किंमत आणि त्यातल्या त्यात स्वस्त भारतीय खेळण्याची किंमत विचारली, तर दोन्हीत किमान दोनशे रुपयांचा फरक होता.

आहे की नाही देशभक्ती महाग?

© मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. ९, शके १९३९

Tuesday, May 2, 2017

बाहुबली द कन्क्लुजन - एकदा तरी नक्की पहावी अशी भव्यकलाकृती

मी दक्षिणेतले डब केलेले चित्रपट फारसे बघायला जात नाही. फारसे कशाला, बघतच नाही. चित्रपटगृहातच नव्हे तर घरी सुद्धा नाही. रोजा हा शेवटचा डब केलेला सिनेमा चित्रपटगॄहात जाऊन बघितलेला आठवतो. याला मुरड घालून बघितलेले दोन चित्रपट म्हणजे अर्थातच बाहुबली द बिगिनिंग आणि गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला बाहुबली द कन्क्लुजन.

पहिला भाग बाहुबली द बिगिनिंग काही कारणांमुळे चित्रपटगृहात बघता आला नाही, पण मुलांच्या कृपेने अगणित वेळा टीव्हीवर पारायणे झालेली आहेत. पण टीव्हीवर पाहण्यात मजा नाही हे लक्षात आलेच होते.
चित्रपट निर्मात्यांनी रामायण, महाभारत आणि इतर इतिहासातल्या अनेक घटना आणि घटनाक्रम कथानकात वापरल्या आहेत. निवर्तलेल्या राजाच्या सद्वर्तनी आणि महपराक्रमी मुलाला सत्ता न मिळता अनीती आणि कुमार्गावर चालणार्‍या त्याच्या भावाला मिळणे, त्या सन्मार्गी मुलाने सत्तात्यागच नव्हे तर राजप्रासादाचा सुद्धा त्याग केल्यावरही त्याच्या जीवावर उठलेला अन्यायी भाऊ आणि त्याचे सल्लागार मंडळ, राजघराण्यातली कटकारस्थाने, ऐन वेळी चुकीच्या व्यक्तीचा आदेश ऐकून न्याय्य पक्षावर अन्याय करावा लागणं यात झालेला कटप्पाचा भीष्माचार्य, आणि बैलांच्या शिंगांना लावलेले पेटते पलीते अशा अनेक ऐतिहासिक संदर्भ असलेल्या गोष्टी या चित्रपटात आहेत.

पहिल्या भागात जाणवलेली आणि दुसर्‍या भागात विशेषकरुन ठसठशीतपणे समोर आलेली उल्लेखनीय बाब म्हणजे चित्रपट हे संपुर्णपणे एका हिंदू साम्राज्यावर बेतलेला असून त्यात ठायी ठायी असलेल्या हिंदू देवतांच्या मूर्ती किंवा त्यांची आणि सणांची ठसठशीत प्रतीके व गाणी. या गोष्टी निश्चितपणे डोळे आणि जीवाला सुखावून जातात. याचं विशेष कारण म्हणजे आजवर हिंदीत बनलेले चित्रपट हे प्रामुख्याने धर्मांध आणि कत्तलखोर मुघल राज्यकर्त्यांची प्रतिमा व्हाईटवॉश करण्यासाठीच बनवले गेलेले होते. इतकंच नव्हे, तर नायक, नायिका आणि त्यांचं आख्खं खानदान हिंदू असले तरी चित्रपटात किमान एक कौवाली असणे किंवा प्रेमगीत असल्यास मौला, बुल्ला, खुदा किंवा तत्सम शब्दांची रेलचेल असणे, सिनेमात किमान एक सहृदय शांतीदूत वगैरे अशा गोष्टी पाहून वीट आलेला होता. त्या पार्श्वभूमीवर वर उल्लेख केल्याप्रमाणे हिंदू दैवते व प्रतीके यांची ठसठशीत उपस्थिती दाखवल्याबद्दल संबंधितांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. नाही म्हणायला पहिल्या भागात असलम खान नामक शस्त्रविक्रेत्याची एक व्यक्तिरेखा होती पण त्यातही कटप्पा त्याच्या शस्त्रांचा पाणउतारा करताना दाखवला आहे.

आणखी एक सुखावणारी गोष्ट म्हणजे माहिष्मती साम्राज्याच्या 'राष्ट्रगीता' पासून ते सैन्याला दिल्या जाणार्‍या आदेशांपर्यंत अनेक ठिकाणी संस्कृत शब्दांचा केलेला वापर होय. सातत्याने उर्दू शब्द ऐकून किटलेल्या कानांनी आणि विटलेल्या मनांनी या बदलाचं निश्चितच जोरदार स्वागत केलं यात काही आश्चर्य नाही.
किती जणांच्या लक्षात आलं माहित नाही, पण बैलांच्या शिंगांना पेटते पलीते लावण्याची ही शिवाजी महाराजांची ही एकच कल्पना दिग्दर्शक राजामौलीने वापरलेली नाही. कुंतल देशाच्या राणीचा भाऊ कुमारवर्मामधे शौर्याची भावना उत्पन्न करुन त्याला पराक्रम गाजवायला भाग पाडणारा बाहुबली आणि मदत मागायला आलेल्या बुंदेल नरेश छत्रसालाला स्वतःचं स्थान निर्माण करायला प्रोत्साहन देणारे आपले महाराज यात मला विलक्षण साम्य आढळलं.

चित्रपटातील स्त्रियांचे केलेले चित्रण ही विशेष आवडलेली बाब. सम्राज्याचा गाडा यशस्वीपणे हाकणारी शिवगामिनी तर आहेच, पण कधी संकटसमयी तलवार तर कधी प्रियकरासाठी मोकळा सोडलेला केशसंभार अशी चतुरस्र देवसेनाही आहे. देवसेना स्त्रियांशी वावगं वागणाऱ्या सेनापतीची स्वतः बोटं छाटते, त्यासाठी नवऱ्याची वाट बघत बसत नाही. पहिल्या भागातल्या हिरविणीला अवंतिकाला मात्र या भागात फारसं काम नाही.

दोषच सांगायचे तर दक्षिणेतल्या चित्रपटातील साहसदृश्यात अतिशयोक्ती या शब्दालाही लाजवेल अशी दृश्ये असतात तशी या चित्रपटातही आहेत. बैलांची काही दृश्ये ही VFXच्या दृष्टीने जरा गडबड वाटतात, पण तरीही अंगावर रोमांच यावेत अशी आहेत. बोट हवेतून जाते हे स्वप्नदृष्य (dream sequence) आहे हे नंतर जाणवतं, तिथे संपादन (एडीटींग) दोष असावा असं वाटतं. अगदी रजनीकांतला सात जन्मात जमणार नाहीत अशी अतिशयोक्तीपूर्ण साहसदृश्ये शेवटाकडे आहेत. पण याबाबत माझं जरा वेगळं मत आहे. एक तर हे कथानक काल्पनिक आहे, त्याला कुठल्याही ऐतिहासिक सत्य परिस्थितीचा काडीचाही आधार नाही. शिवाय इतक्या मोठ्या पटलावर या गोष्टी आरामात खपून जातात. आपल्याला चमत्कृतीपूर्ण हॅरी पॉटर चालतो, तर अतिशयोक्तीपूर्ण बाहुबली का चालू नये?

या चित्रपटाच्या निमित्ताने एतद्देशीय राजे व संस्कृती निर्भीडपणे दाखवणारे चित्रपट बनायला सुरवात झाली तर सोन्याहून पिवळं असं म्हणता येईल. खानावळ आणि हीन दर्जाच्या घराणेशाहीने ग्रासलेल्या हिंदीत बनतील अशी अजिबात आशा नाही. पण जे कुणी ते निर्माण करेल, ते करताना या चित्रपटातले दोष हेरून ते दूर करण्याची प्रक्रियाही सातत्याने झाली पाहीजे.

- (भयानक कम्युनल चित्रपट चाहता) © मंदार दिलीप जोशी

तळटीपः चित्रपटाशी करण जोहरचं असलेलं नातं, VFX स्टुडीओ आणि पैसे कुणाकुणाचे लागले आहेत या संबंधातले टोमणे आधीच गृहित धरुन सांगतो, की त्यांचे पैसे वापरुन हिंदू संस्कृती चित्रपटातून दिसत असेल तर मी म्हणतो वापरा बिंधास. काय?

Thursday, March 9, 2017

गुरमेहर से सुहाना तक, सैफुल्ला के वालिद से होते हुए

कुछ लोगों के मन में उठा प्रश्न सटीक है - पहले भी मुस्लिम गायक हिंदू देवदेवताओं के स्तुतीपर गीत गा चुके हैं, तो फिर सुहाना के ऐसा करने पर बवाल क्यों?

मेरा आकलन यह है कि जब जब जो जो होना है, तब तब सो सो होता है.  अर्थात एम.एस.एम यानी मुख्यधारा के प्रसारमाध्यम एवं सोशल मिडिया पे कोई भी ट्रेन्ड यूंही नहीं चलता.  इसे अलग परिपेक्ष्य में देखना पडता है.  यहां कुछ भी समय से पहले, नसीब से ज्यादा, और कारण के अभाव में नहीं होता.

कुछ दिनो पहले ही गुरमेहर कौर की ट्विट से उठा बवाल आपको ज्ञात ही होगा.  उसने ट्विट में कहा था की मेरे पिता को पाकिस्तान ने नहीं मारा, युद्ध ने मारा.  इस बात पर राष्ट्रवादी गुस्से हो कर उसपे टूट पडे और मुख्यधारा के प्रसारमाध्यम एवं सोशल मिडिया पर मंडरा रहे असुर प्रकृति को अवसर मिल गया की कैसे देश मे असहिष्णुता एवं विचारस्वातंत्र्य का दमन हो रहा है.  किंतु जब वे भी जानते थे और आप-हम भी जानते हैं कि यह केवल अपने विचारों को प्रकट करने का विषय नहीं था.  अगर आप किसी पक्ष या व्यक्ती को कोसें तो वह विचारस्वातंत्र्य के अंतर्गत आ सकता है.  लेकिन गुरमेहर के इस ट्वीट का अन्वयार्थ यह था कि आज तक भारत के जितने भी सैनिक एवं और लोग मारे गये,  उन सब की मृत्यू का भारत एक देश के रूप में उतना ही उत्तरदायी है जितना पाकिस्तान.  अतः भारत को शांती प्रक्रिया को आगे ही बढाना चाहीये.  अब यह बात कितनी बचकानी एवं झूठी है यह तो आपको बताने की आवश्यकता नहीं है.  चूंकि अब मुख्यधारा के प्रसारमाध्यमों का दबदबा उतना नहीं रहा, इस बात की जमकर और विभिन्न कोणों से आलोचना हुई.  गुरमेहर एक लडकी है और केवल २० वर्ष आयु की है यह कुतर्क भी उसे बचा न पाये.  विरोध इतका बढ गया कि गुरमेहर को उसे किसीने बलात्कार की धमकी दी है ऐसा बोलना पडा.  इससे उसके विरोध में बोलने वालों में ही फूट पड गयी, और कईं लोग केवल इस धमकी वे विषय में क्यों न हो, गुरमेहर की तरफ हो लिये.  आखिर एक लडकी की इज्जत का सवाल था न! लेकिन बाद में जब यह ज्ञात हुआ कि उसे बलात्कार की धमकी देने वाला उसी के लिबरल गिरोह वाले किसी विद्यार्थी संघटन का सदस्य था, तो यह बात जैसे उछाली गयी थी उससे दोगुने गति गायब भी हो गयी.  फिर अखिल भारतीय विद्यार्थी संघटन के सदस्योंने ही पुलिस  में केस दर्ज करवाया.

खैर, आप को जो तथ्य पहले से ज्ञात हैं उन्हें फिरसे आप के सामने रखने के कारण क्षमाप्रार्थी हूं, परंतु सुहाना का दमन उछाले जाने के कारण तक पहुंचना है तो हमें गुरमेहर के विषय को थोडा देखना होगा इस कारण यह इतिहास लेखन करना पडा.  तो सुहाना का किस्सा क्या है? सुहाना सईद ने एक कन्नडा रियलिटी शो में एक हिंदू भक्तीगीत गाया था.  मैं इस गायक से अनभिज्ञ हूं लेकिन इस विषय में अधिक जानकारी लेने हेतु उसके एक दो गाने सुने.  भाषा तो समझ नही आयी परंतु यह ज्ञात हो गया की यह एक प्रसिद्ध गायिका है और लोगों को इसके गाने पसंद आते हैं.  तो सुहाना ने एक रियलिटी शो में एक हिंदू भक्तीगीत गाया और इसके पश्चात शुरू हुआ इस्लामियों की ओर से उसपे धमकीयोंका सत्र.  उसके विरोध में वही पुराने तर्क सुनने मिले की इन लोगों को ऐसा नहीं करना चाहिये क्योंकि देखो इस्लाम कितना अच्छा एवं शांतीपूर्ण धर्म है इत्यादि.  लेकिन सबसे बडा कुतर्क यह देखा गया की अगर गुरमेहर को अपनी बात रखने का अधिकार है तो सुहाना सईद को भी उसके जो मन मे आये वह गाने का अधिकार है. 



यूं तो महंमद रफी से लेकर कईं मुसलमान गायकों ने, इतनी पुरानी बातें छोड़िए , आजकल के गायकों ने भी हिंदू भक्तीगीत गाए हैं, तब तो कोई बवाल खडा नहीं हुआ, तो अब क्यों इसका उत्तर आप को अब तक संभवतः मिल गया होगा.  गुरमेहर मामले मे ठंडे किये गये मुख्यधारा माध्यक तथा सोशल मिडिया में लिबरल भाडे के टट्टूओं को गुरमेहर के नाम पर लगे धब्बे को धोने का अवसर चाहिये था, तो फिर वह क्या करते.  सारी दलीलें तो समाप्त हो चुकी थीं.  तो अचानक उनकी नजर एवं कान पडे सुहाना के गाए हुए हिंदू भक्ती संगीत पर.  

लिबरल गिरोह का मस्तिष्क टेढा ही चलने के कारण उन्होंने गुरमेहर की विषैले फल समान बात को, जो विष अब देश के कुछ विश्वविद्यालयों के कईं युवाओं मे फैल चुका है, उसे सुहाना के हिंदू भक्तीगीत गाने के अधिकार के समान स्तर पर लाकर खडा कर दिया, की देखो देशवासियों तुम वहां भी गलत थे यहां भी गलत हो.  दोनो ही विचारस्वातंत्र्य का ही हिस्सा हैं.  तो फिर काहे को सुहाना को गरिया रहे हो? क्या अधिकार है तुम्हें? हालाकि यह बात सुहाना को धमकाने वाले इस्लामी कट्टरपंथियों को कही गयी थी, परंतु इसका लक्ष्य गुरमेहर को विरोध करने वाले ही थे.  कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना.  

देखा आपने कैसे छल तथा चतुराई से दोनो लडकियों को एवं उनके विषयों को समक़क्ष लाकर खडा कर दिया गया?

और हां, अगर आप की सहानुभूति आयसिस के आतंकी सैफुल्ला के बाप से होकर सुहाना सईद की ओर बहने पर आमादा है, तो आप को इसका स्मरण करा दूं कि उसकी गायकी पैसे के लिये एवं कोई प्रतियोगिता मे विजयी होने हेतू है, कोई भगवान के प्रति श्रद्धा नहीं उमड पडी उसकी.

कुछ समझे?

© मंदार दिलीप जोशी
माघ शु. १३, शके १९३८


Saturday, March 4, 2017

गुरमेहर, समाज, और पालनपोषण

एक पुरानी आफ्रीकी कहावत है, "It takes a village to raise a child."

गुरमेहर बहुत छोटी थी जब इसके पिता काश्मीर मे आतंकवादियों के गोली का शिकार हुए. पेट्रोल पंप एवं मिली हुई बडी धनराशि से आय की समस्या तो हल हो गयी, परंतु पेट्रोल पंप संभालने का काम एवं घर की अन्य जिम्मेदारियों ने कदाचित इसकी मां को इस पर संस्कार करने का अवकाश नहीं दिया, और यह देशविघातक शक्तियों के लिये एक आसान सा लक्ष्य बन गयी.

अगर आपके आसपास ऐसा परिवार हो, तो उनके बच्चों की मित्रता अपने बच्चों से अवश्य करवाएं; ऐसे बच्चों को अपने घर खाने पर बुलाएं; उन्हे अपने साथ मंदिर, सिनेमा, अन्य सार्वजनिक एवं पारिवारिक कार्यक्रमों मे ले जाएं; उन्हे अच्छी किताबें भेंट करें; उनके मित्रपरिवार से परिचित हों; उनकी मां से, या अगर मां नहीं है और पिता हैं तो उनसे, बच्चों के भविष्य के विषय मे चर्चा करें; इत्यादि.

सहाय्यता केवल पैसों से नहीं की जाती.

और हां यह पहले होता था हमारी संस्कृति में, कोई आफ्रीका से आयात की हुई कल्पना नहीं है. आयात केवल कहावत है: It takes a village to raise a child.




 © मंदार दिलीप जोशी