Monday, October 24, 2016

लिबरल

जब एक ज्ञानी हिंदू को एक लिबरल ने
मानवता का पाठ पढाया
तो हिंदू फरमाया
की मेरे लिबरल भाया
अपनी औकात न भूल

तेरे जैसे तो उस पानी के गिलास की तरह है
जो समंदर से पूछ रहा हो
"तू जानता ही क्या है मेरे बारे में?"
तो मेरे लिबरल भाया, अपनी औकात मे रह
बचकानी बाते ना कर
मैं तो हूं विशाल बोधीवृक्ष
और तू सिर्फ मोह माया.

-~-~-~-~-~-~-~-~
© मंदार दिलीप जोशी

Monday, October 17, 2016

दिसत जावं माणसानं

हल्ली मोबाईल आणि सोशल मिडियामुळे भेटीगाठी अधिकच दुर्मीळ होऊ लागल्या आहेत. किंबहुना असंही म्हणता येईल की असे इतकं भेटणं होतं की प्रत्यक्ष नाही भेटलं तरी चालेल अशीच मानसिकता तयार होऊ लागली आहे. याच विषयावर एका मित्राने आज एक सुंदर हिंदी कविता पाठवली आणि विषय जिव्हाळ्याचा असल्यानं चटकन मराठी रुपांतर/भाषांतर सुचलं. आधी मराठी आवृत्ती आणि मग त्याची मूळ हिंदी कविता असं देतो आहे. हिंदी कवी कोण ते मात्र समजू शकलं नाही. मराठीत रूपांतर करताना एक कडवं अधिकचं जोडलं आहे.

दिसत जावं माणसानं

कालगतीच्या तीव्र प्रवाही
पोहत जावं त्वेषानं
क्षणभंगुर जीवनात या पण
दिसत जावं माणसानं

आठवणींचा साठा मोठा
क्षणात विस्कटू नये कधी
मैत्र जीवांचे होऊन हृदयी
बोलत जावं माणसानं

हसर्‍या चेहर्‍यांमागे काही
दु:ख मानसी बाळगती
हात घेऊन हाती मित्राचा
बसत जावं माणसानं

प्रत्येकाचे शल्य वेगळे
आनंद निराळा असतो रे
मित्रांचंही जगणे थोडं
वाटून घ्यावं माणसानं

कोण कुठवर सोबत असतो
कोणा असते ठावूक ते
भेटण्याची कारणे नित्यनूतन
विणत जावी माणसानं

ओझरती कधी भेट घडावी
रंगवावी मैफिल कधी
कधी हाकेसरशी खिडकीत
दिसत जावं माणसानं

भेटीगाठीतून आठवणींचा
साठा ताजा ठेवावा
म्हणून म्हणतो उगाचच्या उगाच सुद्धा
दिसत जावं माणसानं

------------------------------
© मंदार दिलीप जोशी
अश्विन कृ. २, शके १९३८
------------------------------

मूळ हिंदी कविता:

मिलते जुलते रहा करो

धार वक़्त की बड़ी प्रबल है,
इसमें लय से बहा करो,
जीवन कितना क्षणभंगुर है,
मिलते जुलते रहा करो।

यादों की भरपूर पोटली,
क्षणभर में न बिखर जाए,
दोस्तों की अनकही कहानी,
तुम भी थोड़ी कहा करो।

हँसते चेहरों के पीछे भी,
दर्द भरा हो सकता है,
यही सोच मन में रखकर के,
हाथ दोस्त का गहा करो।

सबके अपने-अपने दुःख हैं,
अपनी-अपनी पीड़ा है,
यारों के संग थोड़े से दुःख,
मिलजुल कर के सहा करो।

किसका साथ कहाँ तक होगा,
कौन भला कह सकता है,
मिलने के कुछ नए बहाने,
रचते-बुनते रहा करो।

मिलने जुलने से कुछ यादें,
फिर ताज़ा हो उठती हैं,
इसीलिए यारों नाहक भी,
मिलते जुलते रहा करो।

- कवी अज्ञात

Wednesday, October 12, 2016

मी आणि माझा होऊ पाहणारा शत्रूपक्ष

आमच्या सोसायटीच्या चेअरमनबाईंनी नुकतीच एक कुत्री पाळली आहे. तिचं नाव लायका. कुत्री असल्यामुळे नाव लायकी असावं असं मी म्हणालो, म्हणजे मनातल्या मनात म्हणालो. आम्ही मनातच म्हणायचे. पण अंतराळात गेलेला पहिला प्राणी म्हणजे रशियाने पाठवलेली (आणि परत न आलेली) लायका ही कुत्री म्हणून तिचे ते नाव तसे असल्याचे समजले.

परवा काही कामानिमित्त त्यांच्या घरी गेलो असता "ती काही करत नाही, आपण स्वस्थ उभं रहायचं" हे पुल्देश्पांडे नावाच्या द्रष्ट्या माणसाने लिहीलेलं वाक्य पुन्हा ऐकायला आलं. बरमुडा घालून गेल्याने दोन्ही पायांना गधडीने तेल आणि उटणं रगड रगड रगडल्यागत चाट चाट चाटलं आणि हा मनुष्यप्राणी उपद्रवी नसल्याची खात्री पटल्यावर पाडवा साजरा झाल्याचा आनंद झाल्यासारखी आत निघून गेली.

आत गेल्यावर काम करत बसलो होतो तेवढ्यात बाईसाहेब (म्हणजे लायका, चेअरमनबाई नव्हे) आतून परत बाहेर आल्या. लायकाला मी खूपच आवडलो होतो की काय कळेना कारण तिने माझ्याकडे मोर्चा वळवला. ते बघताच तिचा पट्टा धरून बाईसाहेब (म्हणजे चेअरमनबाई, लायका नव्हे) त्यांच्या ऑफिसातला एक तरुण डायनिंग टेबलवर बसला होता त्याच्याकडे बोट दाखवून "लायका, यु आर डुइंग अ व्हेरी बॅड बॅड काम बरं का" या चालीवर त्या म्हणाल्या, "अं हं, असं नाही करायचं, तिकडे जा तो बघ दादा आलाय!"

लायकाच्या दादाकडे माझी पाठ असल्याने त्याचा खर्रकन् उतरलेला चेहरा मला दिसू शकला नाही पण जाहीरातीत दाखवतात तसं इज्जत का फालुद्याची काच खळ्ळकन फुटल्याचा आवाज ऐकल्याचा भास मात्र नक्की झाला.

© मंदार दिलीप जोशी
कार्तिक शु. १, शके १९३८

Monday, October 10, 2016

दसरा सण मोठा, नसे विचारवांत्यांस* तोटा

चला, दसरा आला आणि सालाबादप्रमाणे आपट्याची पानं तोडू नका वगैरे नेहमीच्या बुद्धीभेद करणार्‍या पोस्टी नेटवर दिसू लागल्या.

तर्क आणि विज्ञानाला फाटा देऊन भावनिक बाबींवर भर दिला की असा काहीतरी विचित्र प्रकार निर्माण होतो. या सणाला अशा पोष्टी टाकायला "पहा पहा निसर्ग ओरबाडला जातोय" असं म्हणून भावनिक आवाहना बरोबरच मिथ्याविज्ञान अर्थात स्युडोसायन्सचा आधार घेतला जातो. इंग्रजीत एक म्हण आहे, "If you want to kill a dog, call it mad". तद्वत, हिंदू धर्मातील प्रथा एक एक करुन बंद पाडायच्या असतील तर "अमुक गोष्ट कुप्रथा आहे" हे आधी ठरवायचे आणि मग पद्धतशीरपणे हल्ला करायचा ही पद्धत आता नवीन नाही.

तारतम्य ठेऊन छाटणी केल्याने कोणत्याही झाडाची हानी होत नाही. आणि आपट्याच्या झाडाचं तर नाहीच नाही, कारण ते झाड खूप मोठं असतं. काही दिवसांनी पानं परत येतात. किंबहुना, हे सगळ्याच झाडांच्या बाबतीतलं शास्त्रीय सत्य आहे. आपट्याला आता कोवळी नुकतीच फुटलेली पालवी नाही. आता पाने जून झाली. अर्धामुर्धा पाला कापला तर झाडे अधिकच आटोपशीर वाढतील. पानांच्या कचर्‍याचाच प्रश्न असेल तर आपट्याची पाने हे उत्तम खत आहे. दुसर्‍या दिवशी टाकून देण्याऐवजी आपल्या कुंडीत पाने रिचवा.

छाटणी केल्यानंतर साधारण ४० ते ९० दिवसांत झाडांना नवी पालवी फुटते. अर्थात पालवी येण्याचे प्रमाण आणि वेळ झाडाच्या वयावर अवलंबून असते. नव्या पालवीला कीड लागण्याचा धोका असतो. त्यामुळे वातावरणात कीड नसलेल्या काळात पालवी येणे अधिक चांगले. त्यामुळे साधारणत: ऑक्टोबरमध्ये झाडांची छाटणी करावी. कारण पुढे येणाऱ्या थंडीत वातावरणातील किडीचे प्रमाण अत्यल्प असते.ही माहिती आपल्या पूर्वजांना देखील होती आणि म्हणूनच त्यांनी पाने वाटल्याने निसर्गाचे कोणतेच नुकसान होणार नाही उलट त्या झाडांचे संरक्षण होईल अश्या रीतीने ही परंपरा जपली असावी, परन्तु पुस्तक वाचून स्वतःला तत्वज्ञानी समजणारे आधुनिक पर्यावरण वादी आपल्या समोर वृक्षतोड होतांना बघत बसतात पण आपल्या सण उस्तव वेळी मात्र यांचे निसर्गप्रेम उफाळून येते, एरवी हजारो वृक्षतोडीची प्रकरणे घडतात पण तक्रार द्यायला हे पुढे येत नाहीत.

आता आपट्याच्या झाडाबद्दल जरा अधिक माहिती घेऊया. आपट्याला संस्कृतमधे अश्मंतक असं नाव आहे. हा झाला भाषा इतिहास. आपट्याची झाडं आशिया खंडातच आढळतात. हा झाला भूगोल. आता आपट्याच्या झाडाचा कशा कशासाठी उपयोग केला जातो ते पाहूया आणि वळूया विज्ञानाकडे.

आपटा हे औषधी वनस्पती म्हणून प्रसिद्ध आहे. आपट्याची पाने औषधी असतात. इतकंच नव्हे तर आपट्याच्या झाडाला येणार्‍या शेंगांच्या बिया,  तसेच फुले व झाडाची साल यांचा औषध म्हणून आणि विविध औषधी घटक म्हणून सर्रास वापर केला जातो. आपट्याच्या सालीपासून दोरखंड बनवतात. ज्या झाडांपासून डिंक मिळवला जातो त्यात आपट्याच्या झाडाचाही समावेश आहे. या झाडापासून टॅनीन मिळवतात. आता तुम्हाला अधिक परिचयाचा असलेला उपयोग सांगतो. आपट्याच्या पानांचा उपयोग विडी बनविण्याकरिता केला जातो. मग? बंद पाडायचे का हे सगळे उद्योग?

अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण | इष्टानां दर्शनं देही कुरु शत्रुविनाशनम् ||
अर्थ: आपट्याचा वृक्ष हा महावृक्ष असून तो महादोषांचे निवारण करतो.इष्ट(देवतेचे) दर्शन घडवितो व शत्रुंचा विनाश करतो.

वरच्या श्लोकातल्या महादोष निवारण या शब्दांचा निर्देश आपट्याचे औषधी गुण यांच्याकडे आहे.

जसं नारळाच्या झाडाचा नारळासकट एकूण एक भाग कामी येतो तसंच आपट्याच्या झाडाचे अनेक भाग मानवी उपयोगाचे आहेत. तेव्हा "नारळ काढू नका....पहा पहा निसर्ग ओरबाडला जातोय" हे जितकं अवैज्ञानिक विधान आहे, तितकंच खुळचट विधान "आपट्याच्या झाडाची पाने तोडू नका" हे आहे.

आणि अशा बकवास पोस्टी टाकणार्‍यांनी आपट्याची किंवा इतर किती झाडं लावली आणि जगवली आहेत? अशांना माझा फुकटचा सल्ला: उगा खुर्च्या उबवून लोकांनी काय करायचं त्याचे फुकटचे सल्ले देऊ नका. आधी अभ्यास करा आणि मग बोला. उगाच निसर्गप्रेमाचा आव आणून सणांवर घाव घालू नका.

यात रामायणातील सुद्धा संदर्भ आहे. कथा मोठी आहे तेव्हा संक्षिप्त स्वरूपात सांगतो. एकदा एका गुरूने शिष्याच्याच आग्रहावरुन त्याला चौदा कोटी मुद्रा गुरुदक्षिणा म्हणून द्यायला सांगितल्या. पण त्यात एक मेख होती. गुरूने अट घातली की त्या चौदा कोटी मुद्रा एकाच माणसाकडून आणल्या पाहीजेत. पण चौदा कोटी एकदम एकाच माणसाकडून कशा आणायच्या? ते फार अवघड. मग तो अयोध्येचे महाराज रघु यांच्याकडे पोहोचला. महाराज रघु हे दानशूर व विद्येची कदर करणारे आहेत अशी त्यांची ख्याती होती. पण नेमके त्याच वेळी महाराज रघुंनी यज्ञात सर्व संपत्ती दान केली होती. त्यामुळे त्यांनी त्या शिष्याला त्याची इच्छा पुर्ण करु शकत नसल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. पण पराक्रमी असल्याने इंद्रावर स्वारी करुन तेवढ्या मुद्रा तुला देतो असे आश्वासनही दिले. यामुळे इंद्र घाबरला व त्याने अयोध्येबाहेर आपट्याच्या तसेच शमीच्या झाडांवर कुबेराला सांगून सुवर्णमुद्रांचा वर्षांव , आणि मग त्या सगळ्या मुद्रा त्या शिष्याला दिल्या. पण त्या चौदा कोटी पेक्षा खूप जास्त होत्या म्हणून गुरुंनी १४ कोटीच ठेवून घेतल्या. आता बाकीच्या मुद्रांचे काय करायचे? महाराज रघूंनी एकदा दिलेले दान परत घ्यायचे नाही म्हणुन त्या मुद्रा परत घेण्याचे नाकारले. म्हणून त्या शिष्याने त्याच दोन झाडांच्या खाली त्या मुद्रा ओतून लोकांना त्या न्या असे सांगितले. अचानक धनलाभ झाल्याने व त्या वृक्षांखाली झाल्याने लोकांनी त्या झाडांची पूजा केली व त्या मुद्रा लुटल्या. हा दिवस दसर्‍याचा होता.

शमीच्या झाडावर पांडवांनी शस्त्रे लपवली ही कथा महाभारतात आहेच.

बाकी, आपट्याचंच झाड का? शमीचं का नाही? याला उत्तर इतकंच की हीच गोष्ट "आपण तोंडातून का भोजन करतो व पार्श्वभागातून का मलविसर्जन करतो? त्या ऐवजी ढुंगणातून जेवण व तोंडातून का नाही हगता येत? हा आपल्या मुक्त इच्छेवर (फ्री विलवर) निसर्गाचा आघात नव्हे का? इथपर्यंत नेता येईल. 

परंपरा टाकून देण्याचा अट्टाहास धरण्यापेक्षा कालानुरूप योग्य बदल अवश्य करावेत. सीमोल्लंघन म्हणजे मोहिमेवर जाऊन पराक्रम गाजवून सोने लुटून आणण्याची कल्पना पर्याय म्हणून फुले देऊन कशी साधणार? त्यापेक्षा आपट्याचे झाड प्रत्येक संकुलात रुजवण्याचा निर्धार केला तर अधिक योग्य ठरेल. पावसानंतर जड झालेले ओझे माफक पद्धतीने कमी करू आणि आपट्याचीच पाने लुटून आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची जाण ठेवू.

© मंदार दिलीप जोशी
अश्विन शु. ८, शके १९३९ | दुर्गाष्टमी | खंडेनवमी

कठीण शब्दांचे अर्थः
विचारवांत्या = perverted thought diarrhea

Wednesday, October 5, 2016

महेश भट्ट का निरुपम सत्य

हाल ही में एक कन्नड कहावत पढने को मिली, "बेन्नु बिडद पिशाचि होन्नु कोट्टरे निंतीते". अर्थात, आप के पिछे पडा हुआ पिशाच्च उसको सोना देने से (वो जो करने निकला है वो करने से) रुक नहीं जाएगा. यह कहावत पढते ही कुछ दिनो पहले घटी हडकंप मचा देने वाली एक घटना याद आ गयी.

फ्लॅशबॅकः
२०१२ की आझाद मैदान की घटना याद है? यह घटना हम सब की आँखें खोलने के लिये पर्याप्त थी. लेकिन या तो हमने मन की आँखोंपर पट्टी बांध ली है या हमारी स्मरणशक्ती कमजोर है, क्योंकी आज हम महेश भट्ट और संजय निरुपम जैसों के देशविरोधी बकवास से आहत और गुस्सा हो रहें हैं.

इस घटना से पहले एस.एम.एस. और व्हॉट्सॅप के द्वारा कुछ भडकाई संदेश व्हारयल किये जा रहे थे. इस बारे में पुलिस को पथा था. घटना से एक दिन पहले पुलिस को यह सूचना मिल चुकी थी की जुम्मे के नमाज के समय लोगों को यह आवाहन किया गया था की म्याममार मे रोहिंग्या मुसलमानों पर हुए अत्याचारों के खिलाफ मोर्चें मे भारी संख्या में शामिल हो. इस मोर्चे का आयोजन करने वाले रझा अकादमीने पुलिसको यह कहकर आश्वस्त किया था की मोर्चे में सिर्फ करीब १५०० के आस पास लोग आयेंगे. लेकिन उस दुर्भाग्यपूर्ण दिन शुरवात मे १,५०० नहीं, बल्कि १५,००० लोग आये, और धीरे धीरे यह संख्या ४०,००० तक पहुंच गये. जैसी अपेक्षा थी, मोर्चा हिंसक हो गया. जैसा कोई सैन्य काम करता हो वैसेही उस मोर्चे के लोग बर्ताव कर रहे थे. मोर्चे मे से एक भागने मिडिया के ओ.बी. व्हॅन तथा लोगों पर हमला किया. दंगाईयों ने गाडीयों को आग लगाना, बसों पे हमला करना, और पुलीस पे पथराव करना आरंभ किया. तीन ओ.बी. व्हॅन और एक पुलीस की गाडी को आग लगा दी गयी. पथराव के वजह से एक बेस्ट की बस, दो कारें, और पांच दुपहिया गाडीयों का भारी नुकसान हुवा. इतना ही नहीं, पाच महिला पुलिसकर्मियों के साथ दंगाईयों ने दुष्कर्म किया और उनपर हॉकी स्टिक, लोखंड के रॉड, पत्थर, और नुकिले लकडी की काठी से हमला किया. और अमर जवान ज्योती का इन शांतीप्रिय समुदाय के लोगों के क्या किया यह तो सर्वविदीत है.

सलीम अल्लारख्खां चौकिया (अली),  वह आदमी जिसने, एक पुलिसकर्मी के हाथ से एक सेल्फ-लोडिंग रायफल छीन के उससे फायरिंग की थी उसे १६ अगस्त को गिरफ्तार किया गया. अब्दुल कादीर महम्मद युनुस अन्सारी को बिहार से २८ अगस्त को अमर जवान ज्योती को नुकसान किये जाने के जुर्म में गिरफ्तार किया गया. क्या संजय निरुपम इस बात को झुठला सकते है की यह दोनो काँग्रेस पार्टी से रिश्ता रखते थे? क्या संजय निरुपम इस बात को झुठला सकते है की गिरफ्तार किये गये ४३ लोगों मे से बहुतांश लोग काँग्रेस पार्टी के सदस्य थे?  मौलाना अख्तर (उलेमा बोर्ड के अध्यक्ष) और सईद नुरी (रझा अकादमी के सेक्रेटरी) जिन्हे गुनाह करने की साजीश, खून करना, सार्वजनिक प्रॉपर्टी को नुकसान पहुंचाना, गैरकानूनी सभा, और हिंसा करने के आरोप लगाये गये थे - क्या संजय निरुपम इस बात को झुठला सकते है की उनका इन दोनों के साथ करीबी संबंध है? क्युं संजय निरुपमने बादमें इन्ही देशद्रोही इस्लामी धर्मांधों को भरी संसद में बचाव किया था?

माटुंगा डिव्हिजन की एक महिला ट्रॅफिक हवालदार सुजाता पाटील ने एक पुलिस द्वारा प्रकाशित किये जाने वाले संवाद नाम के मॅगजीनमें आझाद मैदान इसी नाम से एक कविता लिखी छपवाई:

हम न समझे थे बात इतनी सी,
लाठी हाथ में थी
पिस्तौल कमर पे थी,
गाड़ियाँ फूंकी थी
आँखे नशीली थी,
धक्का देते उनको तो भी वो जलते थे,
हम न समझे थे बात इतनी सी,
होंसला बुलंद था,
इज्जत लुट रही थी,
गिराते एक एक को,
क्या जरुरत थी इशारो की,
हम न समझे बात इतनी सी,
हम न समझे बात इतनी सी,
हिम्मत की गद्दारों ने,
अमर ज्योति को हाथ लगाने की,
काट देते हाथ उनके तो
फ़रियाद किसी की भी ना होती,
हम न समझे बात इतनी सी
भूल गये वो रमजान
भूल गये वो इंसानियत,
घात उतार देते एक एक को,
अरे, क्या जरुरत थी किसी से डरने की,
संगीन लाठी तो आपके हाथ में थी
हम न समझे थे बात इतनी सी,
हमला तो हमपे था,
जनता देख रही थी,
खेलते गोलियों की होली तो,
जरुरत न पड़ती रावण जलाने की,
रमजान के साथ दिवाली भी होती
हम न समझे थे बात इतनी सी,
सांप को दूध पिलाकर
बात करते है हम भाईचारा की,
ख्वाब अमर जवानों के,
जनता भी डरी डरी सी,
हम न समझे बात इतनी सी
हम न समझे बात इतनी सी

इस कविता की कुछ अपेक्षित लोगों ने जमकर आलोचना की. फिल्म निर्देशक महेश भट्ट ने उलटा चोर कोतवाल को डांटे इस कहावत को सच करते हुए इस कविता को अल्पसंख्य समुदाय के प्रति पुलीस के द्वेष का प्रतीक करार दिया और पुलिस को मनोविकार तज्ञ के कुर्सी पर ही बिठा देने का अनुरोध किया. लोगों, यही लोग हैं जो टॉलरन्स की बात किया करते हैं, दंगों को टॉलरेट कर सकते हैं, अमर जवान ज्योती पर हमला टॉलरेट कर सकते हैं, स्वयं की सुरक्षा हेतू पुलिस से रक्षा की अपेक्षा करते हैं लेकिन महिला पुलिसकर्मियों की इज्जत पर दंगाईयों द्वारा हमला होना टॉलरेट कर सकते हैं, लेकिन दंगाईयों के विरोध मे लिखे गये एक कविता को टॉलरेट नहीं कर सकते.

लोगों, अब आज की तारीख में लौट आईये. यह सिर्फ आप को याद दिला ने के लिये था की संजय निरुपम और महेश भट्ट जैसे नीच लोगों से जिनकी नियत क्या है उस पर अभी प्रकाश डाला है, उनके देशविरोधी वक्तव्योंसे आहत होना व्यर्थ है. इन सापों को दूध किसने पिलाया है? आपने. इनको व्होट किसने दिये हैं? आपने. इनकी फिल्में किसने देखी हैं और उस द्वारा इनकी जेबें किसने भरी हैं? आपने.

मित्रों, अपेक्षाभंग तभी होता है जब किसीसे कोई अपेक्षा हो. शुरवात में को वाक्य लिखा था वह फिरसे दोहराता हूं. "बेन्नु बिडद पिशाचि होन्नु कोट्टरे निंतीते". अर्थात, आप के पिछे पडा हुआ पिशाच्च उसको सोना देने से (वो जो करने निकला है वो करने से) रुक नहीं जाएगा. तो इस प्रवचन का तात्पर्य यह है की बिना किसी अपवाद के इन्हे सोना देना बंद करो. इन भूतों को सोना देने से कुछ फायदा नहीं. हम इन भूतों को बहिष्कार की लात जरूर मार सकते हैं. तो आगे क्या करना है, या फिर क्या नहीं करना है, आप को पता है.

बाकी जो है, सो हैयी है.

© मंदार दिलीप जोशी