Thursday, June 23, 2016

यस्य कस्य तरोर्मूलं

काल परवा व्हॉट्सॅपवर कोथिंबीर वापरून किडनी साफ करा अशा आशयाची एक पोस्ट वाचली त्या संदर्भात:

आपल्याकडे लोक पुन्हा आयुर्वेदाकडे व आजीबाईचा बटवा या प्रकाराकडे पुन्हा वळू लागले आहेत. पण आपल्याकडे लोकांच्या उत्साहाने उसळून वर यायला काही कळीचे शब्द (की वर्ड) - उदाहरणतः आयुर्वेदिक, organic, घरगुती, देशी उपचार, वगैरे - पुरेसे ठरतात.  हे शब्द दिसले रे दिसले की अतीउत्साहात 'आला मेसेज केला फॉरवर्ड' असं केलं जातं.

कोथींबीर काय, लिंबू काय, किंवा मध काय - या सगळ्याच गोष्टी आहारात असाव्यातच आणि योग्य प्रमाणात असाव्यात. पण त्याचा उल्लेख जेव्हा औषध म्हणून केला जातो तेव्हा त्याचा धोका आपल्याला जाणवायला हवा.

आयुर्वेदात शंभरपैकी शंभर वेळा प्रत्येक व्यक्तीला तपासूनच त्या व्यक्तीला योग्य ठरेल तो उपाय सुचवला जातो. तेव्हा एखाद्या वैद्याकडून एखादा उपाय एखाद्याला सुचवला गेला असेल तर त्याला सब घोडे बारा टक्के असा न्याय लावता येत नाही. त्या उपायात उल्लेख असलेला त्रास तुम्हाला असेल तर, पुन्हा सांगतो, तुमचा वैद्य तुम्हाला स्वतः तपासून मगच उपाय सुचवेल.

समजा तुम्ही तुमच्या वैद्याला न विचारताच तो प्रयोग केलात आणि त्याचा काहीही अपाय झाला नाही तरी त्याचा अर्थ तो औषध म्हणून सर्रास वापरायचा असा त्याचा अर्थ होत नाही. याचा अर्थ एकच - तुम्हाला काहीही नुकसान झालेलं नाही.

बरं, असा संदेश पुढे ढकलायचाच असेल तर पुढील दोन गोष्टी कराच म्हणजे कराच.

(१) वैद्याकडून तो धोकादायक नाही याची खातरजमा करुन घ्या
(२) धोकादायक नसेल तर त्याचा उल्लेख औषध म्हणून न करता "माझे स्वतःवर केलेले घरगुती प्रयोग" अशा मथळ्याखाली पाठवा. आता तुम्ही म्हणाल की वैद्यांना आक्षेप नाही तर तुम्हाला काय त्रास आहे?

पण पुन्हा वरचा मुद्दा सांगतो. कुठलाही वैद्य तुम्हाला हे असे ढकलसंदेशातले उपाय, अपायकारक नसले तरी, इतरांना औषध म्हणून सांगा असं सांगणार नाही.

हे इतके पाल्हाळ लावण्याचा उद्देश असा की आजही अनेक जण असे संदेश वाचून घरगुती प्रयोग करतात आणि उपाय लागू पडला नाही की निराश होतात. क्वचित असा प्रयोग उलटला, तर तब्येतही बिघडू शकते.

आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्ट नसतात असं लोक म्हणतात, पण योग्य मार्गदर्शना अभावी अशा अघोरी प्रयोगाद्वारे काही गोष्टींचे सेवन केले गेले तरी जो इफेक्ट व्हायचा तो होतोच ना! नैसर्गिक रेचक असलेला एखादा पदार्थ घेतल्यावर डोकेदुखी उद्भवणार नाही कदाचित, पण लोटा परेड अंमळ वाढण्याचीही शक्यता आहेच की!

समारोप करता करता शाळेत संस्कृत शिकत असताना वाचलेला श्लोक आठवला, तो आठवेल तसा देतो आहे.

यस्य कस्य  तरोर्मूलं, येनकेनापि मिश्रितम् ।
यस्मै कस्मै प्रदातव्यं, यद्वा तद्वा भविष्यति ।।

अर्थातः कशाचे तरी मूळ कशात तरी मिसळून कुणालातरी दिले असता काहीतरी होते. (नाही का?)

तेव्हा, सावधान!

आपला तार्किक,

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. ३, शके १९३८ | संकष्ट चतुर्थी

Sunday, June 19, 2016

वामपंथी भारत विखंडन १ - छडी लागे छम छम

काही दिवसांपूर्वी जे.एन.यु. मधलं फुटेज खरं असल्याची बातमी आपण वाचली असेलच. आज ट्विटरवर फिरता फिरता कन्हैया आणि त्याच्या लाल क्रांतीवाल्या कॉम्रेड लोकांचे छायाचित्र एके ठिकाणी पाहून त्यांची पुन्हा आठवण आली.

मानसशास्त्रात वेगवेगळ्या विकृतींचे वर्णन केलेले आपल्याला आढळते. पण या डाव्या विचाराच्या लालभाईंचं त्यात काहीच वर्णन दिसत नाही याचं मला नेहमी आश्चर्य वाटत असे. पण मग अधिक विचार करता असं लक्षात आलं की या क्षेत्रावर त्यांचंच वर्चस्व असण्याचा तर हा परिणाम तर नव्हे?

मला एक सांगा. आई, बाबा, आणि शाळेतले मास्तर किंवा बाई यांचा मार खात खात मोठ्या झालेल्या माझ्या आणि मागच्या इथल्या एक दोन पिढ्यांना एक प्रश्न आहे. उठता लाथ बसता बुक्की, धम्मक लाडू आणि चापट पोळी, आणि छडी लागे छम छम विद्या येई घम घम या गोष्टींची सढळ हस्ते उधळण जितकी आपल्या बाबतीत व्हायची त्या तूलनेत आपण आपल्या मुलांना नगण्य किंवा काहीच प्रसाद देत नसणार. बरोबर ना?

आधुनिक बालमानसशास्त्रानुसार चालणारे आपल्यापैकी अनेक जण मुलांना साधा धपाटाही घालत नसणार. मग आता आठवून पहा, आपण जितके आज्ञाधारक आणि सदाचरणी होतो, तितकी तुमची मुलं आहेत का? मग एक दोन पिढ्यातच मुलांचं संगोपन करण्याची पद्धत इतकी कशी बदलली? याचा विचार थोडा फ्लॅशबॅकमधे जाऊन केला तर आपल्यावरचा डाव्या विचारांचा प्रभाव पडल्याचा संशय नक्कीच निर्माण होतो.

हां, काळ बदललाय, झपाट्याने पुढे गेलाय हे खरं. अपवाद नक्की असतील, पण सर्वसाधारणपणे विचार केला तर मुलं म्हणून आपण आपल्या आई-बाबांच्या दृष्टीने हाताळायला अधिक सोपे होतो. अपवादाने नियम सिद्ध होत असला तरी अपवादाला आपण नियम म्हणू शकत नाही, बरोबर ना? डाव्या विचारांचे पाईक आणि साम्यवाद्यांची खासियत अशी असते की प्रचलित व्यवस्थेतले असेच अपवाद शोधायचे आणि तेच कसे नियम आहेत अशी हवा निर्माण करायची, जेणेकरुन लोकांना त्या संपूर्ण व्यवस्थेविषयीच घॄणा उत्पन्न व्हावी. आणि अर्थातच न्युनगंड. मग आधीच्या पिढीतल्या नारायणाला आजच्या सुनीलला आपण कसं बदडायचो ते आठवून डोळ्यांत पाणी येतं, आणि तो पुढच्या पिढीतल्या अदित्यला अंजारत गोंजारतच मोठं करायचं मनावर घेतो. आणि अशा रीतीने पुढची पिढी प्रथम क्रमांकाची सर्किट करून सोडण्याचा डाव्या विचारांचा मनसूबा तडीस जातो. हां, अपवाद हाच नियम आहे हा विचार आपल्या मनावर ठसवताना ते उपाय सुचवत जातात, मग त्याने काही 'सुधारणा' होवोत किंवा न होवोत. पण जे बदल होतील ते चांगल्यासाठीच आहेत आणि आपण कसे योग्य मार्गावर आहोत हे गाजर मात्र दर टप्प्यागणिक आपल्याला दाखवायला ते विसरत नाहीत.

हे फक्त एक उदाहरण आहे, आपल्या घरातलं. पण आज देशात जिथे जिथे फार काही बिघडल्याचं आपल्याला दिसतं तिथे तिथे तुम्हाला या साम्यवादी, डाव्या विचारांचा प्रभाव नक्कीच दिसून येईल. कारण आधुनिक मानसशास्त्र हे त्यांच्यासाठी शास्त्र कमी आणि शस्त्र अधिक आहे.

अहो, उगाच का कन्हैय्या आणि अनिर्बन जन्माला येतात?

ही पोस्ट एखाद्या कवटी सरकलेल्या कॉन्स्पिरसी थिअरीवाल्याची वाटली, तर बुवा सरकलेत म्हणून सोडून द्या. पण सोडून देण्याआधी ही पोस्ट पुन्हा एकदा वाचून त्यावर विचार करुन पहा.

जाता जाता एक सत्यघटना सांगतो:

पात्रयोजना: अतीद्वाड कार्टं आणि त्याचे बाबा.
स्थळः अमेरिका

बाबा: कार्ट्या..........
कार्ट: डॅड, हात खाली घ्या, पोलीसांना फोन करेन.
बाबांचाच चेहरा थोबाडीत खाल्ल्यासारखा.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
पात्रयोजना: हेच दोघे
स्थळः भारत

बाबा: <फट्यॅक्> 
कार्ट पोलीसांना फोन करतं. अर्ध्या तासात हवालदार घरी.
कार्टः ओ, बाबांनी मला थोबाडीत मारलं.
पोलीसः मग? तुझा बा न्हाई मारणार तुला तर काय मी मारणार? मारू?
कार्ट्याचं थोबाड पुन्हा एकदा थोबाडीत मारल्यासारखं.

~ सत्यघटना ~

अवांतरः आपला साम्यवादी सोवियत रशियाशी असलेल्या मैत्रीचा काळ आठवून बघितला, तर साधारण हे असे विचार हळू हळू आपल्या देशात झिरपायची सुरवात कधी झाली असावी याचा अंदाज येतो आणि त्याचे हे असे परिणाम कधी दिसू लागले असावेत याचाही. सोवियत नेते निकिता ख्रुश्चेव म्हणे म्हणायचे, "We cannot expect the Americans to jump from Capitalism to Communism, but we can assist their elected leaders in giving Americans small doses of socialism until they suddenly awake to find they have Communism." येतंय का थोडं थोडं लक्षात?

टीपः लेखातील सर्व नावे काल्पनिक.

---------------------------------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी - मराठी रूपांतर व संपादन
प्रेरणास्त्रोत / मूळ  हिंदी लेखन - आनंद राजाध्यक्ष

जेष्ठ शु. १४, शके १९३८, वटपौर्णिमा
---------------------------------------------------------------------------------

पुढचा भाग इथे

Sunday, May 29, 2016

तुम्हाला नक्की कुठले सावरकर हवेत?

आज सावरकर जयंती निमित्त सगळीकडे अनेकांना सावरकरांची आठवण आल्याचे पाहून आनंद झाला.

सावरकरांची अनेक वैशिष्ठ्ये प्रत्येक लेखनातून दिसली. पण त्यातून सगळ्यांना फक्त राजकीय सावरकरच प्रिय आहेत असा निष्कर्ष निघाला. सावरकरांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख झालाच, मात्र तोंडी लावण्यापुरता. जेवण झाल्यावर तृप्तीची (देसाई नव्हे, पोटभरल्या नंतरची) ढेकर दिल्यावर स्तुती होते ती जेवणातल्या आमटी, भाजी, जिलबी, उसळ वगैरे पदार्थांची. लोणच्याशिवाय जेवण पूर्ण होत नसलं तरी लोणचं खूप छान होतं असं क्वचितच ऐकायला मिळतं. तद्वतच सावरकरांच्या सामाजिक कार्याचा जेमतेम उल्लेख झालेला दिसला.

राष्ट्रीय नेत्यांना आपण जातीजातीत विभागून टाकलं आहे असं म्हणतो, मात्र त्या त्या विभागणीत आणखी एक उपविभागणी झाल्याचं दिसून येतं. सावरकरांच्या बाबतीत बोलायचं तर ही विभागणी राजकीय सावरकर आणि सामाजिक सावरकर अशी झालेली आहे. मुद्दामून नव्हे, पण सोयीचं राजकारण आपणही अनेकदा खेळत असतो.

सामाजिक सावरकरांचं साहित्य वाचलं, तर कट्टर धार्मिक हिंदूंनाच काय, पण जहाल आंबेडकरवाद्यांच्या मेंदूला झिणझिण्या येतील अशी परिस्थिती आहे. पण आजची वास्तविकता काय आहे? एखाद्या राष्ट्रपुरुषाची समस्त मते आपल्याला पटलीच पाहीजेत असे नव्हे, पण निदान समजून घेण्याची इच्छा असणे आवश्यक आहे. राजकीय सावरकरांच्या आठवणींचे बोट धरून उड्या मारताना किमान सामाजिक सावरकर आपल्याला समजलेत का? हा प्रश्न स्वतःलाच विचारण्याची गरज आहे.

"संकटातून सोडवल्याबद्दल जर सत्यनारायण घालत असू तर त्याच सत्यनारायणाने आधी संकटात पाडलेच का याबद्दल त्याची जोड्याने पुजा करायला नको का?" हे वाक्य तात्यारावांचंच आहे. राजकीय सावरकरांना डोक्यावर घेऊन नाचणार्‍या आत्ताच्या किती तथाकथीत हिंदूत्ववादी लोकांना हे झेपेल बरं? आपल्यात विरोधाभास आणि अजाणतेपणाने अंगी बाणवलेला दांभिकपणा इतका आहे की आज अनेक घरांत भींतीवर किंवा शोकेसमधे असलेल्या सावरकरांच्या फोटो खालीच सत्यनारायणाची पूजा मांडलेली दिसून येते. सामाजिक सावरकरांचा पराभव झाल्याचं याहून समर्पक उदाहरण कोणतं असू शकेल?

आज आपल्याला एखाद्या काँग्रेसी मंत्र्याने सावरकरांच्या ओळी पुसून टाकल्याचा राग येतो. भर संसदेत तात्यारावांच्या नावाचाही धड उच्चारही न करु शकणार्‍या तेव्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेल्या राहुल गांंधींचा संताप येतो. पण ती त्यांची चूक नाही. त्यांना बालपणापासून अमुक लोक आपल्या सोयीचे म्हणून त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं आणि अमुक लोकांचा (उदा. सावारकर - तसंच उच्चार केला होता ना पप्पूने संसदेत?) आपल्याला राजकीय पोळी भाजायला द्वेष केलाच पाहीजे म्हणून त्यांना दूषणे द्यायची असंच शिकवलं गेलं आहे. तेव्हा त्यांच्या बरळण्याचा राग आला तरी ती आश्चर्याची गोष्ट नव्हे. आश्चर्याची गोष्ट ही की अजून आपल्यालाच सावरकर समजलेले नाहीत.

शक्यता कमीच आहे, पण उद्या काँग्रेसवाल्यांनी खरंच तात्यारावांचा अभ्यास करायचं ठरवलं तर त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना नाकी नऊ येऊ नयेत ही काळजी घेणं आवश्यक आहे. नाही तर गांधींची तथाकथित तत्त्वं गुंडाळून ठेवणारे काँग्रेसजन आणि राजकीय सावरकर डोक्यावर घेऊन नाचणारे व सामाजिक सावरकरांना गुंडाळून ठेवणारे आपण यात फार फरक उरणार नाही.

आणि हो, राजकीय सावरकरांची बदलत गेलेली मते याचाही अभ्यास तरी किती जणांनी केला आहे हा देखील प्रश्नच आहे. समग्र इतिहासच नव्हे तर प्रत्येक इतिहासपुरुषाचाही अभ्यास असा वेगवेगळ्या परिप्येक्ष्यांमधून करावा लागतो. इतिहास हा २+२=४ असा कधीच नसतो. तसाच विचार करायची सवय असेल,तर किमान "त्यांना किनै आम्ही फॉलॉ करतो" असं पोकळ, दांभिक, आणि दिखाऊ विधान करुन आपल्या अकलेचं दिवाळं निघालेलं दाखवू नका. नाहीतर आपल्याला कित्ती कित्ती कळतं हे दाखवायला उठता बसता रामदास स्वामींच्या मूर्खलक्षणांचा उल्लेख करायचा आणि प्रत्यक्षात “समूळ ग्रंथ पाहिल्याविण, उगाच ठेवी जो दूषण" हे आपल्या किती अंगी बाणलेलं आहे याचं जाहीर प्रदर्शन करायचं असं चालेलेलं असतं. तेव्हा कुठल्याही राष्ट्रपुरुषाला आपल्या अज्ञानाने असं अपमानित करु नका. त्यांच्या आत्म्याला क्लेष होतील.

हां तर आपला मूळ प्रश्न होता, तुम्हाला कोणते सावरकर हवेत? राजकीय की सामाजिक. आणि राजकीय हवे असतील तर्........जाऊ दे. आधी आपण पुरेसा अभ्यास करुया का?

© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ ३, शके १९३८
सावरकर जयंती

Sunday, May 22, 2016

साँप को दूध और भूत को सोना

हाल ही में एक कन्नड कहावत पढने को मिली, "बेन्नु बिडद पिशाचि होन्नु कोट्टरे निंतीते". अर्थात, आप के पिछे पडा हुआ पिशाच्च उसको सोना देने से (वो जो करने निकला है वो करने से) रुक नहीं जाएगा. यह कहावत पढते ही कुछ दिनो पहले घटी हडकंप मचा देने वाली एक घटना याद आ गयी. 

हुआ यूं की कुछ दिनों पहले मोदी भक्तों और समर्थकों में सोशल मिडीया में जबरदस्त खलबली मच गयी. यह शायद पहली बार हुआ के भक्त मोदी सरकार पे भडक गये थे.

हुआ युं के खबर आयी केन्द्र सरकार टेक्स्टाईल मंत्रालय के हॅन्डलून डिव्हिजन और खबरों के चॅनल एन.डी.टी.व्ही. के एन.डी.टी.व्ही. रीटेल इस इकाई के बीच हॅन्डलूम इस प्रकार को लोकप्रिय बनाने के लिये एक समझोता हुआ.  

ये खबर आग से भी तेज फैल गयी. केवल सामान्य राष्ट्रवादी लोग और भाजपा एवं मोदी समर्थक ही नहीं, मोदी भक्त भी भडक गए और फिर सोशल मिडिया पर विरोध का ऐसा तूफान आया जिसका स्वयं माननीय प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी को दखल देनी पडी. इन लोगों को ये बात बिलकुल हजम नहीं हुयी की जो चॅनल हमेशा न केवल भाजपा और मोदीजी ही नहीं बल्की राष्ट्र के विषय में भी गलत खबरें देता है उस के साथ सरकार के एक मंत्रालय ने किसी भी प्रकार का रिश्ता रखने की सोची भी कैसे? २६/११ के दौरान इस चॅनल ने क्या किया था, ये इतिहास है. लोगों का यह भी मानना है की ये चॅनल न केवल राष्ट्रविरोधी है अपितु इसके पत्रकारों के हाथ हमारे सैनिकों के खून से रंगे हैं. ऐसे चॅनल के साथ किसी भी प्रकार के संबंध रखने का अर्थ है अपने और राष्ट्र के आत्मसन्मान का जानबूझ के अपमान करना. 

सोशल मिडीया पे इस कदम के समर्थन में यह भी पढने को मिला की यह एक लोकतंत्र प्रक्रिया हे अनुसार हुआ और इसको हम केवल हमारे गलत मानने के बल पर हम इसका विरोध नहीं कर सकते. भई लोकतंत्र के सूत्रों का पालन क्या एन.डी.टी.व्ही ने कभी किया है? समर्थन का एक मुद्दा तो यह भी था की ऐसा करने से हम उस चॅनल को अपने नियंत्रण में कर सकते हैं. लेकिन प्रश्न ये है की साँप को दूध पिलाने से क्या फायदा? मराठी में कहते हैं की "सापाला दूध पाजलं तरी तो चावायचा राहत नाही", मतलब साँप को दूध पिलाया जाए तो वो आपको काटने से परहेज नहीं करेगा. 

समर्थक और भक्त इस कदर भडक गए की ऐसा लगने लगा की अगर ये समझोता रद्ध न किया गया तो वे मोदी सरकार को कभी माफ नहीं करेंगे. सोशल मिडीया का यह अभियान जो तभी शांत हुआ जब मोदीजी को स्वयं हस्तक्षेप करना पडा और टेक्स्टाईल मंत्रालय हे एन.डी.टी.व्ही. के साथ उस समझोते को रद्ध करके उस भूत को सोना देने से परहेज कर लिया. 

इसी लिये न तो साँप को दूध पिलाईये और ना तो भूत को सोना दिजीये. दोनों कहावतों को और किस विषय में आप इस्तमाल कर सकते है? सोचिये, किन किन सापों को आप दूध पिलाने की सोच रहे हैं और किन किन भूतों को सोना देने से आपको फायदा नजर आ रहा है?

© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ. १, शके १९३८

Monday, May 16, 2016

आखिर कब तक?

मेरी एक फेसबुक दोस्त ने बताया हुआ किस्सा. वो लडकी एक बुटीक चलाती है और उसके पास शांतीप्रिय समुदाय की दो लड़कियां सिलाई का काम सीखने आती है. नाम उसके कहने पे नहीं दे रहा हूं. आगे पढीये उसी के शब्दों में:

"मेरे यहां शांतीप्रिय समुदाय की दो लड़कियां सिलाई का काम सीखने आती है l दो चार दिन पहले में लाइब्रेरी से "कृष्ण" ये किताब पढ़ने के लिए लेकर आई थी, खाली वक़्त मिलता है तो पढ़ लेती हुं l किताब कभी टेबल पर कभी मशीन पर रखी हुई होती है | 

दो दिन से में देख रही हुं, किताब मशीन पर रखी हुई थी, तो कल तो एक लड़की ने उठाकर मुझे दे दी l पर आज दुसरी लड़की को मशीन पर काम था, आज भी किताब वही पर थी, पर उसने हाथ नहीँ लगाया l मुझसे कहा, आपकी किताब है, ले लीजिए l


मतलब क्या सीखाते क्या है इन लोगों को?

हद है यार .."

हमें क्या सिखाते है? या फिर हमें सिखाना ही नहीं पडता? मेरे खयाल से ये सब चीजें हमारे गुणसूत्रों में ही होतीं है. सहिष्णुता. कैसे? अब आप ही सोचिये, अगर हमें ऐसी कोई किताब मिल जाए तो हम क्या करेंगे? 

ज्यादा सोचने की जरूरत ही नहीं है. १९७१ के भारत पाकिस्तान युद्ध के एक घटना पर आधारित "बॉर्डर" यह सिनेमा तो देखा ही होगा आप ने. उसमें युद्ध शुरू होने पर हिंदूस्तानी सैनिक सीमा के आसपास के गावों को खाली करवाते हैं और लोगों को सुरक्षित निकलने में मदद भी करते हैं. लोंगेवाला बी.एस.एफ पोस्ट के अफसर कमाडंट भैरों सिंग इस काम मेलग जाता है. पाकिस्तानी बमबारी से आग लगे एक घर से एक आदमी को सही सलामत निकालने के बाद उस आदमी को ध्यान मे आता है की उसका कुरान शरीफ अंदर रह गया है. कमाडंट भैरों सिंग जान की परवाह न करते हुए जलते हुए घर में घुसकर कुरान भी सही सलामत निकाल लाता है और उस आदमी को सौंप देता है. वो आदमी भौंचक्का रह जाताहै की की एक हिंदू होकर उस अफसरने कुरान के लिये जान की बाजी लगा दी.  "साहबजी, आप तो हिंदू हो". उसपर भैरों सिंग कहता है, "सदियों से यही करता आ रहा है हिंदू".  

तो अब सोचने की बात है, की सदियों से हम जो करते आ रहे हैं, उसपर विचार करने का समय आ गया है या फिर और मार खाने की जरूरत है? कितने और संघ स्वयंसेवक, कितने और प्रशांत पुजारी, कितने और डॉक्टर नारंग हमसे छीनें जाएंगे? कब तक सहेंगे जब कोई सामनेवाला आपको आपकी किताब के विषय के कारण उसको हाथ भी नहीं लगाता और ऐसी धृष्टता रहता है की आपको ही वो किताब उठाने को कहे, तब क्या यह बात अकलमंदी की बनती है की आप उनसे किसी भी प्रकार का व्यवहार रखें? 


ज्यादा नहीं लिखूंगा इस पहले हिंदी ब्लाग पोस्ट में. आगे आप को सोचने पे छोड देता हूं.

© मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. १०, शके १९३८

Monday, May 9, 2016

THE REAL BAJIRAO: AN INTERACTIVE TALK (खरे बाजीरावः भाषण व प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम)

THE REAL BAJIRAO: AN INTERACTIVE TALK (खरे बाजीरावः भाषण व प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम)
Conducted By: Dr. Uday .S. Kulkarni (सादरकर्ते: डॉ. उदय एस. कुलकर्णी)

पार्श्वभूमी व वृत्तांत.

नुकताच येऊन गेलेला बाजीराव मस्तानी हा हिंदी चित्रपट ऐतिहासिक दृष्ट्या तद्दन चुकीचा व अनेक बाबतीत अपमानकारक असल्याचे अनेकांचे मत होते. सुरवातीला दिग्दर्शक पाजीराव भंसाळीने साळसूदपणे चित्रपट हा  संपूर्णपणे खरा नसल्याचा डिस्क्लेमर दिलेला असला तरीही दृकश्राव्य माध्यमांचा जनमानसावर होणारा परिणाम बघता हा चित्रपट अत्यंत जबाबदारीने काढणे आवश्यक होते, तसे ते अर्थातच झाले नाही. असे जरी असले, तरी वाईटातून चांगले म्हणतात तसे या सिनेमामुळे श्रीमंत बाजीराव पेशव्यांविषयी जनतेच्या मनात प्रचंड प्रमाणात उत्सुकता निर्माण झालेली दिसून आली हे खरेच.

काही मित्रांनी व कार्यालयीन सहकार्यांनी माझ्याकडुन श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या संदर्भातली पुस्तके व कादंबर्‍या मागितल्या. एका मराठी समजणार्या पण दाक्षिणात्य मित्राने तर "कादंबरी नको, संशोधनात्मक वगैरे पुस्तक असेल तर सांग" असं सांगून आश्चर्याचा धक्काही दिला.

डॉ उदय कुलकर्णी यांच्याशी या कारणमिमांसेबाबत थेट चर्चा झाली नसली, तरी हा कार्यक्रम होण्यामागची ही पार्श्वभूमी सहज समजण्यासारखी आहे. कार्यक्रमात त्याची थोडी झलकही पहावयास मिळाली.

हा कार्यक्रम प्रामुख्याने श्रीमंत राऊस्वामींविषयी फारशी माहिती नसलेल्या अमराठी लोकांसाठी असला तरी बाजीराव म्हणजे फक्त मस्तानीचा असा समज असलेल्या मराठीजनांनाही खुला होता, किंबहुना तो सर्वांनाच खुला होता. त्यामुळे या विषयातली बरीच माहिती असून देखील जाणकारांकडून थोडे ज्ञानकण वेचावेत या हेतूने मी ही तिथे हजेरी लावली.

कार्यक्रम रास्ते वाड्यात ठरल्याप्रमाणे काल दिनांक ८ मे रोजी संध्याकाळी ६ ते ८ या वेळात पार पडला. इतिहास संशोधक व 'सॉल्स्टिस अॅट पानिपत' या पुस्तकाचे लेखक व व्यवसायाने सर्जन असलेले डॉ. उदय कुलकर्णी यांनी श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यावर उत्तम भाषण करुन नंतर प्रेक्षकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.


डॉ. कुलकर्णी यांनी राऊस्वामींचे वडील बाळाजी विश्वनाथ यांनी छत्रपती शाहू हे मुघलांच्या कैदेतून मुक्त झाल्यापासून त्यांची इमानेइतबारे कशी सेवा केली, बाजीरावांचे सैनिकी व राज्यकारभाराविषयीचे प्रशिक्षण, त्यांच्या निजाम-उल-मुल्क, बंगश, इत्यादी विविध सरदारांशी झालेल्या विजयी लढाया, मस्तानीची प्राप्ती, सेनापती चंद्रसेन दाभाडे यांच्याशी झालेला दुर्दैवी संघर्ष, दिल्लीला धडक, व अखेर आजारपणात आलेला मृत्यू अशा श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यातील अनेक विषयांना स्पर्श केला. तसेच त्या काळात नाविक दल अधिक मजबूत करण्याकडे झालेले दुर्लक्ष व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या डोकेदुखीचे प्रमुख कारण असलेला कर्जाचा बोजा या बाबींचेही डॉ. कुलकर्णी यांनी थोडक्यात पण सम्यक विवेचन केले.



तदनंतर ठरल्याप्रमाणे प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला. प्रश्नकर्त्यांपैकी बहुतेक जण गृहपाठ करुन आल्याचे प्रश्नांवरुन समजून येत होते व हा आश्चर्याचा सुखद धक्का होता.

सगळी प्रश्नोत्तरे इथे देणे शक्य नाही, पण मी विचारलेला प्रश्न व त्याचे डॉ. कुलकर्णी यांनी दिलेले उत्तर देतो. शब्द जसेच्या तसे नाहीत पणअर्थ साधारणपणे तोच आहे.



मी: शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्याला इंग्रज हा प्रकार कायम राजकीय घडामोडींच्या एक प्रकारे पार्श्वभूमीवर असलेला दिसून येतो. शिवाजी महाराजांच्या काळात काही घटनाही माहित आहेत. इंग्रजांनी त्यांच्या कारवाया वाढवत नेऊन पुढे देशावरच राज्य केलं हे लक्षात घेता श्रीमंत बाजीरावांच्या काळात मराठा आणि इंग्रज यांच्यात काही संघर्षाचे प्रसंग आले का, व एकंदर इंग्रजांविषयी काय धोरण होते?

डॉ. कुलकर्णी: इंग्रजांपेक्षा त्या काळी पोर्तुगीज अधिक ताकदवान व प्रभावी होता व अर्थातच त्यांच्यापासून असलेला धोका जास्त होता. रयतेवर अत्याचार करणे, जबरदस्ती धर्मांतर करणे, इत्यादी कारणांमुळे मराठ्यांच्या पोर्तुगीजांशीच लढाया झाल्या. मुघल, सिद्धी वगैरे मराठ्यांच्या शत्रूंना शस्त्र पुरवणे, पोर्तुगीजांनाही गरज पडल्यास मदत करणे इत्यादी इंग्रजांचा खोडसाळपणा चालूच असला तरी संभाजी महाराजांच्या काळापासून ते बाजीरावांच्या काळात त्यांचे धाकटे  बंधू चिमाजीअप्पांच्या मोहीमापर्यंत बघितलं तर मराठ्यांचा प्रमुख संघर्ष हा पोर्तुगीजांशीच झालेला दिसून येतो. त्यामुळे श्रीमंत बाजिरावांच्या कार्यकाळात इंग्रज इतके प्रबळनसल्याने त्यांच्याशी लढण्याचा प्रसंग असा आला नाही.

कार्यक्रमाला सरदार रास्ते, बिनिवाले, पंतसचिव या सरदारांचे काही वंशज उपस्थित होते. तसेच पेशव्यांच्या वंशजांपैकी महेन्द्र पेशवा व मोहिनी करकरे ही मंडळी उपस्थित होती. आधीच भव्य असा रास्ते वाडा मी पहिल्यांदाच बघत असल्याने वाटत असलेले भारावलेपण ही मंडळी प्रत्यक्ष बघायला मिळाल्याने अधिकच वाढले. वेळे अभावी या मंडळींना भेटता आलं नाही. कार्यक्रम संपल्यावर मी चक्क लहान मुलासारखं खांब, पायर्‍या, व एक-दोन दरवाजांना हात लावून बघितला! हो, येतो, अंगावर शहारा येतो. त्या काळात पोहोचल्यासारखंही वाटतं!!

तर, खूप ज्ञानवर्धक असलेला असा हा कार्यक्रम शेवटी आभारप्रदर्शन होऊन संपला. ज्यांना श्रीमंत बाजीराव पेशव्यांविषयी जाणून घेण्यात खरंच रस आहे, त्यांना अधिक वाचन व अभ्यास करायला या कार्यक्रमाने प्रवृत्त केले असे नक्कीच म्हणता येईल.  

कार्यक्रम संपल्यावर डॉ. उदय कुलकर्णी यांच्याशी परिचय करुन घेतला व 'सॉल्स्टिस अॅट पानिपत' या पुस्तकावर त्यांची स्वाक्षरीही घेतली. अधिक औत्सुक्याची बाब म्हणजे  डॉ. उदय कुलकर्णी हे श्रीमंत बाजीराव पेशव्यांवर एक पुस्तक लिहीत आहेत. तेव्हा आता त्याची वाट बघण्याचे अवघड काम आलेच!

कार्यक्रमस्थळी वारसा या शनिवारवाड्यात असलेल्या दुकानातर्फे काही वस्तू व राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या सौजन्याने काही वस्तू स्मृतिचिन्हांच्या (मेमोराबिलिया) स्वरूपात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यातले राऊस्वामींचे चित्र असलेले मग, चुंबक, व टी-शर्ट विकत घेता आले. सोबत चित्रे जोडलेली आहेत.




 



 कार्यक्रमाची काही छायाचित्रे - सौजन्य: डॉ उदय कुलकर्णी

© मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. ३, अक्षय्य तृतिया, शके १९३८