Sunday, May 22, 2016

साँप को दूध और भूत को सोना

हाल ही में एक कन्नड कहावत पढने को मिली, "बेन्नु बिडद पिशाचि होन्नु कोट्टरे निंतीते". अर्थात, आप के पिछे पडा हुआ पिशाच्च उसको सोना देने से (वो जो करने निकला है वो करने से) रुक नहीं जाएगा. यह कहावत पढते ही कुछ दिनो पहले घटी हडकंप मचा देने वाली एक घटना याद आ गयी. 

हुआ यूं की कुछ दिनों पहले मोदी भक्तों और समर्थकों में सोशल मिडीया में जबरदस्त खलबली मच गयी. यह शायद पहली बार हुआ के भक्त मोदी सरकार पे भडक गये थे.

हुआ युं के खबर आयी केन्द्र सरकार टेक्स्टाईल मंत्रालय के हॅन्डलून डिव्हिजन और खबरों के चॅनल एन.डी.टी.व्ही. के एन.डी.टी.व्ही. रीटेल इस इकाई के बीच हॅन्डलूम इस प्रकार को लोकप्रिय बनाने के लिये एक समझोता हुआ.  

ये खबर आग से भी तेज फैल गयी. केवल सामान्य राष्ट्रवादी लोग और भाजपा एवं मोदी समर्थक ही नहीं, मोदी भक्त भी भडक गए और फिर सोशल मिडिया पर विरोध का ऐसा तूफान आया जिसका स्वयं माननीय प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी को दखल देनी पडी. इन लोगों को ये बात बिलकुल हजम नहीं हुयी की जो चॅनल हमेशा न केवल भाजपा और मोदीजी ही नहीं बल्की राष्ट्र के विषय में भी गलत खबरें देता है उस के साथ सरकार के एक मंत्रालय ने किसी भी प्रकार का रिश्ता रखने की सोची भी कैसे? २६/११ के दौरान इस चॅनल ने क्या किया था, ये इतिहास है. लोगों का यह भी मानना है की ये चॅनल न केवल राष्ट्रविरोधी है अपितु इसके पत्रकारों के हाथ हमारे सैनिकों के खून से रंगे हैं. ऐसे चॅनल के साथ किसी भी प्रकार के संबंध रखने का अर्थ है अपने और राष्ट्र के आत्मसन्मान का जानबूझ के अपमान करना. 

सोशल मिडीया पे इस कदम के समर्थन में यह भी पढने को मिला की यह एक लोकतंत्र प्रक्रिया हे अनुसार हुआ और इसको हम केवल हमारे गलत मानने के बल पर हम इसका विरोध नहीं कर सकते. भई लोकतंत्र के सूत्रों का पालन क्या एन.डी.टी.व्ही ने कभी किया है? समर्थन का एक मुद्दा तो यह भी था की ऐसा करने से हम उस चॅनल को अपने नियंत्रण में कर सकते हैं. लेकिन प्रश्न ये है की साँप को दूध पिलाने से क्या फायदा? मराठी में कहते हैं की "सापाला दूध पाजलं तरी तो चावायचा राहत नाही", मतलब साँप को दूध पिलाया जाए तो वो आपको काटने से परहेज नहीं करेगा. 

समर्थक और भक्त इस कदर भडक गए की ऐसा लगने लगा की अगर ये समझोता रद्ध न किया गया तो वे मोदी सरकार को कभी माफ नहीं करेंगे. सोशल मिडीया का यह अभियान जो तभी शांत हुआ जब मोदीजी को स्वयं हस्तक्षेप करना पडा और टेक्स्टाईल मंत्रालय हे एन.डी.टी.व्ही. के साथ उस समझोते को रद्ध करके उस भूत को सोना देने से परहेज कर लिया. 

इसी लिये न तो साँप को दूध पिलाईये और ना तो भूत को सोना दिजीये. दोनों कहावतों को और किस विषय में आप इस्तमाल कर सकते है? सोचिये, किन किन सापों को आप दूध पिलाने की सोच रहे हैं और किन किन भूतों को सोना देने से आपको फायदा नजर आ रहा है?

© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ. १, शके १९३८

Monday, May 16, 2016

आखिर कब तक?

मेरी एक फेसबुक दोस्त ने बताया हुआ किस्सा. वो लडकी एक बुटीक चलाती है और उसके पास शांतीप्रिय समुदाय की दो लड़कियां सिलाई का काम सीखने आती है. नाम उसके कहने पे नहीं दे रहा हूं. आगे पढीये उसी के शब्दों में:

"मेरे यहां शांतीप्रिय समुदाय की दो लड़कियां सिलाई का काम सीखने आती है l दो चार दिन पहले में लाइब्रेरी से "कृष्ण" ये किताब पढ़ने के लिए लेकर आई थी, खाली वक़्त मिलता है तो पढ़ लेती हुं l किताब कभी टेबल पर कभी मशीन पर रखी हुई होती है | 

दो दिन से में देख रही हुं, किताब मशीन पर रखी हुई थी, तो कल तो एक लड़की ने उठाकर मुझे दे दी l पर आज दुसरी लड़की को मशीन पर काम था, आज भी किताब वही पर थी, पर उसने हाथ नहीँ लगाया l मुझसे कहा, आपकी किताब है, ले लीजिए l


मतलब क्या सीखाते क्या है इन लोगों को?

हद है यार .."

हमें क्या सिखाते है? या फिर हमें सिखाना ही नहीं पडता? मेरे खयाल से ये सब चीजें हमारे गुणसूत्रों में ही होतीं है. सहिष्णुता. कैसे? अब आप ही सोचिये, अगर हमें ऐसी कोई किताब मिल जाए तो हम क्या करेंगे? 

ज्यादा सोचने की जरूरत ही नहीं है. १९७१ के भारत पाकिस्तान युद्ध के एक घटना पर आधारित "बॉर्डर" यह सिनेमा तो देखा ही होगा आप ने. उसमें युद्ध शुरू होने पर हिंदूस्तानी सैनिक सीमा के आसपास के गावों को खाली करवाते हैं और लोगों को सुरक्षित निकलने में मदद भी करते हैं. लोंगेवाला बी.एस.एफ पोस्ट के अफसर कमाडंट भैरों सिंग इस काम मेलग जाता है. पाकिस्तानी बमबारी से आग लगे एक घर से एक आदमी को सही सलामत निकालने के बाद उस आदमी को ध्यान मे आता है की उसका कुरान शरीफ अंदर रह गया है. कमाडंट भैरों सिंग जान की परवाह न करते हुए जलते हुए घर में घुसकर कुरान भी सही सलामत निकाल लाता है और उस आदमी को सौंप देता है. वो आदमी भौंचक्का रह जाताहै की की एक हिंदू होकर उस अफसरने कुरान के लिये जान की बाजी लगा दी.  "साहबजी, आप तो हिंदू हो". उसपर भैरों सिंग कहता है, "सदियों से यही करता आ रहा है हिंदू".  

तो अब सोचने की बात है, की सदियों से हम जो करते आ रहे हैं, उसपर विचार करने का समय आ गया है या फिर और मार खाने की जरूरत है? कितने और संघ स्वयंसेवक, कितने और प्रशांत पुजारी, कितने और डॉक्टर नारंग हमसे छीनें जाएंगे? कब तक सहेंगे जब कोई सामनेवाला आपको आपकी किताब के विषय के कारण उसको हाथ भी नहीं लगाता और ऐसी धृष्टता रहता है की आपको ही वो किताब उठाने को कहे, तब क्या यह बात अकलमंदी की बनती है की आप उनसे किसी भी प्रकार का व्यवहार रखें? 


ज्यादा नहीं लिखूंगा इस पहले हिंदी ब्लाग पोस्ट में. आगे आप को सोचने पे छोड देता हूं.

© मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. १०, शके १९३८

Monday, May 9, 2016

THE REAL BAJIRAO: AN INTERACTIVE TALK (खरे बाजीरावः भाषण व प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम)

THE REAL BAJIRAO: AN INTERACTIVE TALK (खरे बाजीरावः भाषण व प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम)
Conducted By: Dr. Uday .S. Kulkarni (सादरकर्ते: डॉ. उदय एस. कुलकर्णी)

पार्श्वभूमी व वृत्तांत.

नुकताच येऊन गेलेला बाजीराव मस्तानी हा हिंदी चित्रपट ऐतिहासिक दृष्ट्या तद्दन चुकीचा व अनेक बाबतीत अपमानकारक असल्याचे अनेकांचे मत होते. सुरवातीला दिग्दर्शक पाजीराव भंसाळीने साळसूदपणे चित्रपट हा  संपूर्णपणे खरा नसल्याचा डिस्क्लेमर दिलेला असला तरीही दृकश्राव्य माध्यमांचा जनमानसावर होणारा परिणाम बघता हा चित्रपट अत्यंत जबाबदारीने काढणे आवश्यक होते, तसे ते अर्थातच झाले नाही. असे जरी असले, तरी वाईटातून चांगले म्हणतात तसे या सिनेमामुळे श्रीमंत बाजीराव पेशव्यांविषयी जनतेच्या मनात प्रचंड प्रमाणात उत्सुकता निर्माण झालेली दिसून आली हे खरेच.

काही मित्रांनी व कार्यालयीन सहकार्यांनी माझ्याकडुन श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या संदर्भातली पुस्तके व कादंबर्‍या मागितल्या. एका मराठी समजणार्या पण दाक्षिणात्य मित्राने तर "कादंबरी नको, संशोधनात्मक वगैरे पुस्तक असेल तर सांग" असं सांगून आश्चर्याचा धक्काही दिला.

डॉ उदय कुलकर्णी यांच्याशी या कारणमिमांसेबाबत थेट चर्चा झाली नसली, तरी हा कार्यक्रम होण्यामागची ही पार्श्वभूमी सहज समजण्यासारखी आहे. कार्यक्रमात त्याची थोडी झलकही पहावयास मिळाली.

हा कार्यक्रम प्रामुख्याने श्रीमंत राऊस्वामींविषयी फारशी माहिती नसलेल्या अमराठी लोकांसाठी असला तरी बाजीराव म्हणजे फक्त मस्तानीचा असा समज असलेल्या मराठीजनांनाही खुला होता, किंबहुना तो सर्वांनाच खुला होता. त्यामुळे या विषयातली बरीच माहिती असून देखील जाणकारांकडून थोडे ज्ञानकण वेचावेत या हेतूने मी ही तिथे हजेरी लावली.

कार्यक्रम रास्ते वाड्यात ठरल्याप्रमाणे काल दिनांक ८ मे रोजी संध्याकाळी ६ ते ८ या वेळात पार पडला. इतिहास संशोधक व 'सॉल्स्टिस अॅट पानिपत' या पुस्तकाचे लेखक व व्यवसायाने सर्जन असलेले डॉ. उदय कुलकर्णी यांनी श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यावर उत्तम भाषण करुन नंतर प्रेक्षकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.


डॉ. कुलकर्णी यांनी राऊस्वामींचे वडील बाळाजी विश्वनाथ यांनी छत्रपती शाहू हे मुघलांच्या कैदेतून मुक्त झाल्यापासून त्यांची इमानेइतबारे कशी सेवा केली, बाजीरावांचे सैनिकी व राज्यकारभाराविषयीचे प्रशिक्षण, त्यांच्या निजाम-उल-मुल्क, बंगश, इत्यादी विविध सरदारांशी झालेल्या विजयी लढाया, मस्तानीची प्राप्ती, सेनापती चंद्रसेन दाभाडे यांच्याशी झालेला दुर्दैवी संघर्ष, दिल्लीला धडक, व अखेर आजारपणात आलेला मृत्यू अशा श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यातील अनेक विषयांना स्पर्श केला. तसेच त्या काळात नाविक दल अधिक मजबूत करण्याकडे झालेले दुर्लक्ष व श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या डोकेदुखीचे प्रमुख कारण असलेला कर्जाचा बोजा या बाबींचेही डॉ. कुलकर्णी यांनी थोडक्यात पण सम्यक विवेचन केले.



तदनंतर ठरल्याप्रमाणे प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला. प्रश्नकर्त्यांपैकी बहुतेक जण गृहपाठ करुन आल्याचे प्रश्नांवरुन समजून येत होते व हा आश्चर्याचा सुखद धक्का होता.

सगळी प्रश्नोत्तरे इथे देणे शक्य नाही, पण मी विचारलेला प्रश्न व त्याचे डॉ. कुलकर्णी यांनी दिलेले उत्तर देतो. शब्द जसेच्या तसे नाहीत पणअर्थ साधारणपणे तोच आहे.



मी: शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्याला इंग्रज हा प्रकार कायम राजकीय घडामोडींच्या एक प्रकारे पार्श्वभूमीवर असलेला दिसून येतो. शिवाजी महाराजांच्या काळात काही घटनाही माहित आहेत. इंग्रजांनी त्यांच्या कारवाया वाढवत नेऊन पुढे देशावरच राज्य केलं हे लक्षात घेता श्रीमंत बाजीरावांच्या काळात मराठा आणि इंग्रज यांच्यात काही संघर्षाचे प्रसंग आले का, व एकंदर इंग्रजांविषयी काय धोरण होते?

डॉ. कुलकर्णी: इंग्रजांपेक्षा त्या काळी पोर्तुगीज अधिक ताकदवान व प्रभावी होता व अर्थातच त्यांच्यापासून असलेला धोका जास्त होता. रयतेवर अत्याचार करणे, जबरदस्ती धर्मांतर करणे, इत्यादी कारणांमुळे मराठ्यांच्या पोर्तुगीजांशीच लढाया झाल्या. मुघल, सिद्धी वगैरे मराठ्यांच्या शत्रूंना शस्त्र पुरवणे, पोर्तुगीजांनाही गरज पडल्यास मदत करणे इत्यादी इंग्रजांचा खोडसाळपणा चालूच असला तरी संभाजी महाराजांच्या काळापासून ते बाजीरावांच्या काळात त्यांचे धाकटे  बंधू चिमाजीअप्पांच्या मोहीमापर्यंत बघितलं तर मराठ्यांचा प्रमुख संघर्ष हा पोर्तुगीजांशीच झालेला दिसून येतो. त्यामुळे श्रीमंत बाजिरावांच्या कार्यकाळात इंग्रज इतके प्रबळनसल्याने त्यांच्याशी लढण्याचा प्रसंग असा आला नाही.

कार्यक्रमाला सरदार रास्ते, बिनिवाले, पंतसचिव या सरदारांचे काही वंशज उपस्थित होते. तसेच पेशव्यांच्या वंशजांपैकी महेन्द्र पेशवा व मोहिनी करकरे ही मंडळी उपस्थित होती. आधीच भव्य असा रास्ते वाडा मी पहिल्यांदाच बघत असल्याने वाटत असलेले भारावलेपण ही मंडळी प्रत्यक्ष बघायला मिळाल्याने अधिकच वाढले. वेळे अभावी या मंडळींना भेटता आलं नाही. कार्यक्रम संपल्यावर मी चक्क लहान मुलासारखं खांब, पायर्‍या, व एक-दोन दरवाजांना हात लावून बघितला! हो, येतो, अंगावर शहारा येतो. त्या काळात पोहोचल्यासारखंही वाटतं!!

तर, खूप ज्ञानवर्धक असलेला असा हा कार्यक्रम शेवटी आभारप्रदर्शन होऊन संपला. ज्यांना श्रीमंत बाजीराव पेशव्यांविषयी जाणून घेण्यात खरंच रस आहे, त्यांना अधिक वाचन व अभ्यास करायला या कार्यक्रमाने प्रवृत्त केले असे नक्कीच म्हणता येईल.  

कार्यक्रम संपल्यावर डॉ. उदय कुलकर्णी यांच्याशी परिचय करुन घेतला व 'सॉल्स्टिस अॅट पानिपत' या पुस्तकावर त्यांची स्वाक्षरीही घेतली. अधिक औत्सुक्याची बाब म्हणजे  डॉ. उदय कुलकर्णी हे श्रीमंत बाजीराव पेशव्यांवर एक पुस्तक लिहीत आहेत. तेव्हा आता त्याची वाट बघण्याचे अवघड काम आलेच!

कार्यक्रमस्थळी वारसा या शनिवारवाड्यात असलेल्या दुकानातर्फे काही वस्तू व राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या सौजन्याने काही वस्तू स्मृतिचिन्हांच्या (मेमोराबिलिया) स्वरूपात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यातले राऊस्वामींचे चित्र असलेले मग, चुंबक, व टी-शर्ट विकत घेता आले. सोबत चित्रे जोडलेली आहेत.




 



 कार्यक्रमाची काही छायाचित्रे - सौजन्य: डॉ उदय कुलकर्णी

© मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. ३, अक्षय्य तृतिया, शके १९३८

Saturday, May 7, 2016

वाचन कला

बस किंवा गाडीतून प्रवास करायचा नसून देखील ती वाहने दिसताच कुत्री भो भो भो वॅक् वॅक् वॅक् वॅक् वॅक् वॅक् वॅक् करत त्यांच्या मागे जीव खाउन धावू लागतात.
कुत्री अशी का वागतात या विषयावर संशोधन झाले आहे. वाहने विशिष्ठ वेगाने जवळून गेली असता ती भंजाळतात (disoriented होतात) आणि मग त्या भंजाळण्याच्या स्त्रोतावर हल्ला करतात.

त्याचप्रमाणे, न झेपणारा विषय असेल तर भंजाळून जाऊन, संपूर्ण विषय समजून न घेता, लेख असो किंवा टिप्पणी असो, लेखनातले एक दोन विशिष्ठ शब्द  अथवा शब्दसमूह दिसताच भो भो भो वॅक् वॅक् वॅक् वॅक् वॅक् वॅक् वॅक् करत काही लोक धावून जात असावेत असा संशय आहे.
ऑनलाईन असलं, तरी वाचन ही एक कला असून ती प्रयत्नपूर्वक जोपासावी लागते. वाचेल तो वाचेल हे जरी खरे असले तरी त्यापुढे जाऊन असे म्हणणे संयुक्तिक ठरेल की वाचून समजेल तो वाचेल..

© मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. १, शके १९३८

Friday, March 18, 2016

माफीवीर गिरीश कुबेर

वैचारिक दारिद्र्याचे मेरुमणी लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर यांचा पुन्हा एकदा निषेध. या भेकड माणसाने पुन्हा शेण खाल्लं. हिंदूंचा द्वेष आणि संबंधित सगळ्या गोष्टींची टिंगल करण्यापासून ते फाशी गेलेला अतिरेकी याकुब मेमनचे समर्थन करण्यापर्यंत मजल गेलेले गिरीश कुबेर आज आणखी घसरले. कधी नव्हे ते भंपक ख्रिस्ती संत मर्डर टेरेसांच्या संतपदाबद्दल टीकात्मक अग्रलेख लिहीला आणि म्हणे कुठल्याशा फादर की कुणाच्यातरी भावना दुखावल्या म्हणून चक्क मागे घेतला. संपादक म्हणून फक्त हिंदूंच्याच भावना दुखावता येतात, बाकीच्यांवर बोललं की मग पार्श्वभागाला पाय लाऊन अग्रलेख मागे घेतला जातो...

...आणि अग्रलेख मागे कसा घेणार हो. व्हायरल झाला तो. इथे देतोय परत.लोकसत्ताचा लेख कधी स्वतःच्या ब्लॉगवर देईन असे वाटले नव्हते, पण तुमची लायकी दाखवायला टाकतो आहे. तेल लावत गेल्या संबंधितांच्या भावना.












तर, माफीवीर लोकसत्ता संपादक गिरीश कुबेर, थू तुमच्यावर.

© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु. १०, शके १९३७