Wednesday, March 2, 2016

सारे जहां से अच्छा, इशरत जहां हमारा

सारे जहां से अच्छा
इशरत जहां हमारा
हम मोहताज हैं जिसकी
मौत का हमें सहारा

भारत में हों अगर हम,
रहता है दिल रोम में।
समझो फॅसिस्ट हमें भी,
मुसोलिनी बाप हमारा।। सारे...

घोटाला जिसका गहरा,
हमसाया काँग्रेसी का।
वो मंतरी हमारा,
वो पासबाँ हमारा।। सारे...

स्विसबँक में खेलते हैं,
जिसके हज़ारों खाते।
गुलशन है जिसके दम से,
ये जे.एन.यु हमारा।। सारे....

ऐ रोम-ए-नेप-ए-फ्लोरेन्स!
वो दिन है याद तुझको।
जीती जब मैंने दिल्ली,
वो राजीव जब दिल हारा ।। सारे...

मज़हब हमें सिखाता,
मजहब तू बदल देना।
काँगी हैं हम वतन हैं,
पाकीस्ताँ हमारा।। सारे...

केसरी-ओ-मिश्रा-ओ-सिंदीया,
सब मिट गए जहाँ से।
अब तक है मोदी बाक़ी,
नाम-ओ-निशाँ तुम्हारा।। सारे...

कुछ बात है कि हस्ती,
मिटती नहीं है इसकी।
सदियों बनाया दुश्मन,
सी.बी.आय. को तुम्हारा।। सारे..

ऐ 'सोनिया' तेरा पप्पू,
होता नहीं सयाना । 
मालूम कब प्रियांका,
जीते चुनाव हमारा।। सारे...


© मंदार दिलीप जोशी
माघ कृ ८, शके १९३७

Friday, February 5, 2016

टवाळा आवडे विनोद

आज हापिसात एक सॉलिड जोक झाला. जेवणाच्या सुट्टीनंतर मी घातलेला घट्ट स्वेटर काढायचा प्रयत्न करत होतो...तेव्हा


एक भोचक कलीगः अय्या मंदार, तू नक्की काय करतो आहेस? स्वेटरमधे घुसण्याचा प्रयत्न करतो आहेस की त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न? हँ हँ हँ हँ हँ हँ

मी: तू इकडे बघू नको. असं कपडे काढताना बघू नये कुणाकडे.

बाकीचे:  हँ हँ हँ हँ हँ हँ.


--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
 पौष कृ. १२, शके १९३७
--------------------------------------------------

Tuesday, February 2, 2016

मला पडलेलं स्वप्न

मला सर्वसाधारणपणे स्वप्नं पडत नाहीत.

म्हणजे अजाबातच नाहीत. रात्री एकदा का डोळा लागला की थेट गजर वाजला की किंवा आपोआप जाग आली की डोळे उघडतात. तसं पडतं एखादं स्वप्न क्वचित पण पु.ल. म्हणतात तसं पेटंट स्वप्न म्हणजे दुसर्‍या दिवशी तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा अकाउंट्स पार्ट १ हा किंवा गणिताचा पेपर आहे आणि आपल्याला शष्प येतंय. तेव्हाही आपल्याला शाळा कॉलेज संपून अनेक वर्ष झालेली असूनही आपण अजून पेपर का देतोय हे स्वप्नातून जागं होता होता लक्षात येतं. एक वेगळ्या प्रकारचं स्वप्न म्हणजे जिन्यावरुन किंवा कुठूनतरी उतरताना पाय घसरला आणि पाय झटकतच जाग आली. हे ही फार क्वचितच.

काल पडलेल्या स्वप्नाने मात्र त्या वेळी जाम तंतरली होती. कारण एक क्षण मला वाटलं की मी झोपेतच खपलोय.

तर....स्वप्नं असं की मी मेलोय (हितशत्रूंनी त्यांना फुटलेल्या आनंदाच्या उकळ्या दाबाव्यात. मी इतक्यात जात नाही. समद्यास्नी पोचवून मंगशान खपणार हाय) आणि भूत झालोय (जेव्हा केव्हा मरेन तेव्हा हे मात्र होणारे आणि समस्त दुश्मनांच्या बोडक्यावर बसणारे. संबंधितांनी प्लीज नोंद घ्यावी. नंतर कंप्लेन चालनार नाय ;). आणि बाकीच्यांनाही येऊन भेटणार आहे. खांद्यावर किंवा मांडीवर टॅप केल्यासारखं वाटलं की समजेलच ब्वाहाहाहाहाहा).

तर, स्वप्नात मी मेलोय हे असं समजलं की मी आपल्याच घरात वावरतो आहे आणि कुणाला मी तिथे आहे हे समजत नाही आहे. घरात त्या वेळी दोन व्यक्ती आहेत. एक माझी आई आणि आणखी एक माझ्याच वयाचा माणूस जे सोफ्यावर बसून एकमेकांशी बोलत आहेत. यातही गंमत अशी की स्वप्नात ते घर माझं असलं तरी मला अजिबात परिचित नाही, सद्ध्याचं किंवा आधी राहिलो त्यांपैकी कुठलंच घर ते नाही. स्वप्नातली माझी आई ही माझी आई नाहीच, दुसरीच कुणीतरी आहे पण त्या स्वप्नात मी तिला आई म्हणतो आहे. त्या माणसालाही मी ओळखत नाही. संपूर्ण स्वप्नात या दोघांचेही चेहरे मला नीट दिसलेले नाहीत.

तो दुसरा माणूस आहे त्याच्या मांडीवर लक्ष वेधून घ्यायला हाताने टक् टक् केलं तर सिनेमात दाखवतात तसा माझा हात अख्खाच्या अख्खा आरपार गेला. पण ती आई होती तिच्या मांडीवर टॅप केल्यावर मात्र तसं झालं नाही. तिने चक्क माझ्याकडे बघितलं पण नक्की कसं बघितलं ते आठवत नाही. इतकं झाल्यावर स्वप्नातच विचार केला की अनायसे भूत झालोच आहोत तर घर पाहून घ्यावं. इथेच राहू आवडल्यास!

पण फिरायला सुरवात केल्यावर अचानक घाबरून जाग आली. कुशीत पोराला घेऊन झोपलो होतो.  क्षणभर जाम तंतरली. मला वाटलं मी खरंच भूत आहे आणि पृथ्वीतलावरच्या हयात कुटुंबियांविषयीची आसक्ती न संपल्याने चिरंजीवांना कुशीत घेऊन झोपलो आहे.

मग जिवंत असल्याची खूण म्हणून मोबाईल ऑन केला आणि व्हॉट्सअ‍ॅप चालू केलं तेव्हा मी जिवंत असल्याची खूप पटली. ;)

आता मी स्वप्नांना फारसं महत्व देत नाही. ते काही भूत-भविष्य वगैरे सांगतात यावरही फारसा विश्वास नाही. मात्र या स्वप्नाचा अर्थ काय हा प्रश्न फार डोकं खातो आहे सकाळपासून. बायको म्हणाली स्वप्नात मरण दिसणं याचा अर्थ तुम्ही दीर्घायू होणार. तरी यावर जाणकारांनी काही प्रकाश पाडल्यास उपकृत होईन.

--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
पौष कृ. १०, शके १९३७
--------------------------------------------------

Thursday, January 28, 2016

महाबोअर 'नटसम्राट'

मी: "मला 'नटसम्राट' आवडला नाही"

एक दर्दी: "तुम्हाला तो कळला नसेल"

कळला नसेल?

एक सर्कीट, शिवराळ, आणि दारूडा नाटकवाला थेरडा निवृत्त झाल्यावर आपली सगळी प्रॉपर्टी मुलांत वाटून टाकतो आणि मग स्वतःच्याच कर्माने लागोपाठ दोघांनीही घराबाहेर पडायला भाग पाडल्याने रस्त्यावर येतो, मधेच त्याची बायको खपते, आणि मग शेवटी तो मरतो. वगैरे वगैरे.

या स्टोरीत न कळण्यासारखं काय आहे? सांगा ना, या स्टोरीत.....न कळण्यासारखं.......काय आहे?

साध्वी प्राची किंवा आदित्यनाथ का कोण यांनी एखादे वादग्रस्त वक्तव्य केल्यावर बरखा दत्त जसा थयथयाट सुरू करते आणि अर्णब गोस्वामी कानठळ्या बसवणार्‍या आवाजात त्याचं ते जगप्रसिद्ध "नेशन वॉन्ट्स टू नो" नामक तांडव सुरु करतो तशीच चिडचिड मला "नटसम्राट हा चित्रपट माझ्या मते टुकार सिनेमा आहे" हे सडेतोड आणि निर्भीड वक्तव्य केल्यानंतर अनेकांकडून अनुभवायला मिळाली.

शाहरुख खान ने देवदासची भूमिका केलेल्या चित्रपटाबद्दल जुन्या देवदासमधे पारोची भूमिका केलेल्या वैजयंतीमालाचं मत विचारल्यावर तिने "Dilip Saab played the role of Devdas, Shahrukh was Shahrukh as usual" असं  मत व्यक्त केलं होतं. अर्थात ती जुन्या आणि नव्या दोन्ही चित्रपटांचीच तूलना होती. इथे जुनं नाटक आणि त्यावर आधारित सिनेमा आहेत हे लक्षात घेतलं तरी त्यामागचा अर्थ बदलत नाही. म्हणून जुनी मंडळी कदाचित त्याच सडेतोडपणे 'श्रीराम लागू प्लेड द रोल ऑफ अप्पासाहेब बेलवलकर अ‍ॅन्ड नाना पाटेकर प्लेड नाना पाटेकर अ‍ॅज युज्वल' असं म्हणाली, तर त्यांचं हे मत किमान या सिनेमापुरतं सत्यापासून फार दूर नसेल. चित्रपटात कुठेही अप्पासाहेब बेलवलकर न दिसता प्रत्येक दृश्याच्या प्रत्येक फ्रेममधे नाना पाटेकरच दिसत राहतो.

इथे मी 'नटसम्राट' हे नाटक आणि सिनेमा यांची तूलना करत नाही. ती मी कट्यारच्या वेळीही केली नव्हती आणि इथेही करणार नाही. कारण दोन्ही नाटकं न पाहिलेल्या भाग्यवान लोकांत मी मोडतो. भाग्यवान अशासाठी की कट्यार काळजात का घुसली नाही या विषयी नाटकाचे दर्दी असलेल्या लोकांकडून टीकात्मक लेख वाचलेले आहेत. नाटक पाहिल्यामुळे अपरिहार्यपणे होणारी ती तूलना इथे आपसूक टाळली गेली. त्यामुळे म्हणा किंवा तरीही म्हणा, एक स्वतंत्र सिनेमा म्हणून मला तो आवडला. नटसम्राटच्या बाबतीत मात्र तसं इथे झालेलं नाही. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. बर्‍याच वर्षांनी काहीतरी जबरदस्त गंभीर अनुभवायला मिळेल असं वाटलं होतं. या आणि इतर अनेक अपेक्षा पूर्ण तर झाल्या नाहीतच पण घोर निराशा पदरी पडली.

एक तर आईवडिलांनी म्हातारपणीचं आर्थिक नियोजन करताना मुलांना स्वतःच्या मृत्यूआधीच सगळी संपत्ती देऊन टाकणे आणि मग मुलांनी त्यांना देशोधडीला लावणे ही संकल्पना असलेले निव्वळ मराठीतलीच असंख्य नाटकं, चित्रपट, आणि मालिका किंवा त्यातली उपकथानके हे आजच्या प्रेक्षकांनी पाहीले आहेत. त्यामुळे तो विषय सादर करुन 'अरेरे गरीब बिच्चारे आई-वडील' दाखवून प्रेक्षकांकडून अश्रू वसूल करणे हे म्हणजे मराठी चित्रपटाला किमान २५ वर्ष मागे नेऊन ठेवण्यातला प्रकार आहे. आता हे मागे नेऊन ठेवणे म्हणजे काय आणि तुमच्या मते पुढे येणं म्हणजे काय ते विचारु नका. लेख लिहीताना एक छान वाक्य म्हणून लिहीलं ते. अगदी या चित्रपटात असलेल्या अनेक गोष्टींसारखंच.

संपूर्ण चित्रपटभर नाना पाटेकर एका अत्यंत विचित्र सुरात संवादफेक करतो. त्यामुळे त्याचे संवाद ऐकताना रॉबिन विल्यम्सच्या Cricket is basically baseball on valium या वक्तव्याची आठवण येते. नटसम्राट इज नाना पाटेकर ऑन ड्रग्स. तुम्हाला आठवत असेल तर राजेश खन्नाने 'अमर प्रेम' या चित्रपटात अशीच कंटाळवाणी संवादफेक केली होती. माणूस दारुडा किंवा म्हातारा दाखवायचा असेल तर अशा प्रकारे ड्रग्सच्या अंमलाखाली असल्या सारखा सूर लावायलाच हवा का?

चित्रपटाचं कथानक हे नेहमी वाहतं असायला हवं. तो फ्लो इथे कुठेही आढळत नाही. चित्रपटातलं प्रत्येक महत्वाचं दृश्य (किंवा कोणतंही दृश्य घ्या हो, शेणच खायचं असेल तर त्याला प्रेफरन्स असतो का? की बुवा गायीचं चांगलं आणि बकरीचं वाईट?) हे दिग्दर्शकाने नानाला "हां, तर बरं का नाना, आता पुढचा सीन असा असा आहे' हे सांगितल्यामुळे नानाने होज्जाओ शुरू म्हणत केल्यासारखा वाटतो. अगदी "कुणी घर देता का घर" हा संवाद असलेलं दृश्य सुद्धा अपेक्षित परिणाम साधत नाही. त्या जागी नानाने यशवंत मधला "एक मच्छर, साला एक मच्छर, आदमी को हिजडा बना देता है...." हा लांबलचक संवाद म्हटला असता तरी मला कळलं नसतं इतका मी हे दृश्य येईपर्यंत बधीर झालो होतो. त्यामुळे जिथे हा चित्रपट भिडायला हवा, तिथे तो मला जाम बोअर वाटायला लागला. चित्रपट 'नटसम्राट' हे नाव देऊन न काढता 'नानाची ठिगळं' या नावाखाली एखादी डॉक्युमेंटरी म्हणून काढला असता तरी चाललं असतं असा एक विचार चमकून गेला.

आता जरा पुन्हा कथानकाकडे वळूया. म्हणजे मी वळतो. तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही जाऊ शकता. मला चित्रपट बघताना तो पर्याय नव्हता, तुम्हाला हे वाचताना आहे. तर, जाणार्‍यांना अच्छा टाटा.

पण थांबा. चित्रपट तिकीट विकत घेऊन बघितला असेल, हा लेख फुकट आहे. तेव्हा वाचाच.

तर, नाटकात काम करणारा अत्यंत उत्तम नट, ज्याला त्याच्या अभिनयामुळे नटसम्राट ही पदवी देण्यात आलेली आहे, तो एके दिवशी 'कुठेतरी थांबायचं' म्हणून निवृत्त होतो. (पचतंय का? अभिनय म्हणजे क्रिकेट आहे का सुनिल गावसकर सारखं जमतंय तो पर्यंत रिटायर व्हायला? तो सत्तरीचा अनेक व्याधींनी ग्रस्त असलेला अँग्री यंग मॅन स्वतःचा मुलगा ओल्ड मॅन व्हायला टेकला तरी अजून चित्रपट, जाहीरात, टिव्ही कार्यक्रम एक ना दोन अनेक प्रकारात काम करतो आहे, अशा जमान्यात वावरणार्‍या प्रेक्षकांनी हा आउटडेटेड अप्पासाहेब बेलवलकर का चालवून घ्यायचा? पण ते असो.).

अशा प्रत्येक दृश्याचं पोस्ट मॉर्टम करत बसलो तर दिवस जाईल हे लिहीण्यात. ठीकाय ब्वॉ, व्हायचं असेल कुणाला रिटायर, आहे ब्वॉ तसं कथानक, आपल्याला काय.

तर, नाटकात काम करणारा एक सर्किट आणि अट्टल बेवडा थेरडा दारूच्या नशेतच मूर्खासारखं स्वतःची प्रॉपर्टी मुलगा आणि मुलीत वाटून टाकतो. मुलाला घर आणि मुलीला पैसे वगैरे.

बरं मुलाबरोबर सून आणि नात यांच्या बरोबर गपगुमान रहावं तर ते ही नाही. लहान वयाच्या मुलीला कविता शिकवता शिकवता अर्वाच्य शिव्या शिकवतो आणि तोंड वर करुन त्याचं समर्थनही करतो. कोणते आजोबा आपल्या नातवंडांना अशा घाणेरड्या शिव्या शिकवतात? अगदी गॅरेजवालेही आपल्या घरात नातवंडांशी बोलताना खूप जपून बोलत असतील. नाटकवाला ही पार्श्वभूमी दाखवली की त्याच्या नावावर काय वाट्टेल ते खपवता येतं अशी संबंधितांची समजूत आहे का?

या वरुन त्याच्यात आणि सुनेत झालेल्या वादाचं पर्यवसान त्याने घर सोडण्यात आणि मग मुलीकडे जाण्यात होतं. तिथे तो दारूच्या नशेत पार्टीत तमाशा करतो आणि जावयाच्या बॉसच्या मुलाच्या नाटकावर गरळ ओकतो. अरे शोन्या, सुखानं जगायचंय ना? पण ते नाही. आम्ही नाना पाटेकर आहोत किनै? मग थयथयाट करायलाच हवा!

समाजातला खोटेपणा सहन होत नाही, मग मुखवटे घालून घालून वावरायचं नाही म्हणत सगळे शिष्टाचार सोडून स्वतःच्याच घरच्यांशी मन मानेल तसं वागायचं स्वातंत्र्य घेणं हे कितपत बरोबर? किंबहुना या चित्रपटातल्या अप्पासाहेबाला स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरकच समजत नाही आणि मग त्याच्याबरोबर चित्रपटही वाहवत जातो.

मग बहुतकरुन वेळ जात नाही म्हणून एकाकीपणाला कंटाळलेल्या स्वतःच्याच मित्राचा त्यानेच सांगितलं म्हणून झोपेच्या गोळ्या देऊन खून करतो (आपण नसता केला, मित्राने सांगितलं तरी) आणि वर त्याचंही समर्थन करतो.  मग चोरीचा आळ घेतला म्हणून मुलीच्या घरातूनही बाहेर पडतो आणि त्याची बायको रस्त्यातच कुठेतरी मरते आणि हा पुलाखाली वन-पूल-किचन ची खोली असल्यागत, हक्काची (आणि सेक्युलर) स्वयंपाकीणबाई असलेल्या जागेत राहू लागतो. आणि मग एक दोन दॄश्यांनंतर मरतो. सिनेमा खतम, पैसा (थेटरवालेको) हजम. जा घरी.

या स्टोरीत न कळण्यासारखं काय आहे? सांगा ना, या स्टोरीत.....न कळण्यासारखं.......काय आहे?

एकंदरीत चित्रपटात ठायी ठायी दिग्दर्शक आपल्याला "वि.वा.शिरवाडकरांच्या अजरामर (हॉss हॉss हॉss हॉssहॉss)*** नाटकावर आधारित आहे आणि त्यात नाना पाटेकर आहे म्हणून चालवून घ्या" असा दम भरत असल्याचा भास होत राहतो. नाना आहे म्हणून आवडून घ्यायचा असेल तर मग 'यशवंत' काय वाईट होता? अमिताभ बच्चन आहे म्हणून 'लाल बादशाह' आवडून घ्यायचा का? आँ? अरे बैल समजता का प्रेक्षकांना तुम्ही? कुणी उत्तर देता का उत्तर?

वास्तविक, आवडलेल्या सिनेमावर लिहीणे आणि न आवडलेल्यावर वेळ व शक्ती वाया न घालवणे हा माझा मी स्वतःवरच घालून घेतलेला नियम. त्याला मी का मुरड घातली? तर चित्रपट आवडला नाही कारण तो "तुम्हाला समजला नसेल" या अतार्किक आरोपामुळे.

पुन्हा सांगतो, नटसम्राट हा एक अत्यंत, प्रचंड, महाभयानक बोअर सिनेमा आहे. कुणी फुकट दाखवला तरी बघू नका. नाना पाटेकरच बघायचा असेल तर क्रांतीवीर बघा.

--------------------------------------------------
*** इथे मी पाताळविजयम या मद्राशी सिनेमातल्या राक्षसासारखा हॉss हॉss हॉss हॉssहॉss असं का हसलो ते कृपया विचारू नका. उत्तर आवडणार नाही.
--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
पौष कृ. ४, शके १९३७
--------------------------------------------------



Monday, January 18, 2016

असा मिडिया मिडीया...

होई कांड दादरीचं, मिडीयाला लागे घोर |   
जवा घडते मालदा, म्हणे भुरटा तो चोर ||

करी दादरी दादरी, त्याले शिक्षा करी कोन |  
उभा जाळला मालदा, डोळे वटारी ना कोन ||

दीदी जेहादी जेहादी, तिचं न्यारं ते तंतर | 
पाकी अतिरेकी बरे, त्याले गोळीचा मंतर ||

दीदी गुलाम गुलाम, अली गातोया गझला |
मालद्यात दंगेखोर, जाळी मजला मजला ||

आले कसाई कसाई, झाला मुर्दाड कायदा |
आमच्या दीदीले हिरव्या, मिळे मतांचा वायदा ||

मारी कोकरू कोकरू, म्हणे भावना धार्मिक |
झुंज बैलांशी करता, मिडीयाले होतो शोक ||

क्रूर मानूस मानूस, मुके बैल झुंजवले |
मुल्ला दयाळू दयाळू, त्याले खाऊन टाकले ||

देवळात नको बाई, तरी आम्ही जानारच |
ब्रह्मचार्‍याच्या कुटीत, गोंधळ होनारच ||

असा कसं हे मिडिया, त्याले डोकं गुडघ्यात | 
पैकं खाऊन इकतो,  इये देशाची इज्जत ||

--------------------------------------------------
...बहिणाबाईंची क्षमा मागून.
--------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
पौष शु. ९, शके १९३७
--------------------------------------------------

आशापुरा माईनिंग कंपनीकडून कोकणातल्या पर्यावरणाला धोका