Friday, July 31, 2015

लोकसत्ताचे डोके ठिकाणावर आहे काय?

आदरणीय वंदनीय माननीय विवेकवादी अंधश्रद्धानिर्मूलनपटू राजमान्य राजश्री श्री गिरीश कुबेर साहेब,

कोपरापासून नमस्कार.

लोकसत्ता घ्यायचे बंद केल्यापासून आणि ते तुम्हाला कारणांसहित कळवल्यापासून एका वर्षाच्या आत तुम्हाला पुन्हा पत्र लिहायची वेळ येईल असे वाटले नव्हतेपण तुम्ही तुमच्या असामान्य लेखनप्रतिभेने अप्रतीम संपादकीय अग्रलेख लिहून तुमच्याशी संवाद साधायला भाग पाडलेत त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुमचा हा लेख फॉरवर्ड मधून आला तेव्हा आधी तुमच्याच वृत्तपत्रात विनोदी सदर लिहीणार्या तंबी दुराई सदृश्य कुणीतरी लिहीला आहे असा आधी समज झाला होतापण तो अखेर गैरसमज ठरला. या लेखाबद्दल तुमचा तीव्र निषेध.

फाशीबाबत, देहांत शासनाबाबत मतभेद असल्यास गैर नाही. मात्र त्याच्या नावाखाली एका देशद्रोह्याचे, दहशतवाद्याचे किती उदात्तीकरण करायचे? सारासार विचार करण्याच्या नावाखाली सामान्य जनतेचा बुद्धीभ्रम करण्याचा किती प्रयत्न करायचा? आपण लेखाच्या सुरवातीला म्हणता, याकुब मेमन माफीचा साक्षीदार ठरला, आणि अपराधी देखील. हे साफ चूक आहेतो माफीचा साक्षीदार कधीही नव्हता, आणि तो शरणही आला नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी भारतात परतण्याचा निर्णयही घेतला नाही. रॉ संस्थेच्या ज्या रामन साहेबांच्या लेखाचा आपण हवाला देता, त्याच रामन साहेबांनी एका लेखात स्पष्टपणे म्हटलं आहे की पाकिस्तानच्या आय.एस.आयया गुप्तहेर संघटनेच्या देखरेखीखाली असलेल्या मेमन कुटुंबियांनी याकूबला 'भारतात परतणे कितपत श्रेयस्करयाचा आढावा घ्यायला नेपाळमधे असलेल्या त्याच्या नातेवाईकाशी एका वकीलाशी सल्लामसलत करायला नेपाळला पाठवलं होतं. या दोघांनीही त्याला पुन्हा कराचीला परतण्याचा सल्ला दिला. तो कराचीला परस्पर पळून जाण्यासाठी विमान पकडण्याच्या तयारीत असताना नेपाळ पोलीसांनी त्याला ओळखला, आणि वेगाने त्याची रवानगी भारतात करण्यात आली. बरं आपण रामन यांचे सोडून देऊ. गेले बिचारे. त्यांची साक्ष काही काढता येत नाही आता. पण विमानतळावर त्याला पकडणार्या नेपाळी पोलीस अधिकार्याची मुलाखत आपण हे अचाट संपादकीय लिहीण्याच्या आधी बघितली का? माझ्या अंदाजाप्रमाणे नसेलच.

मग त्या कटातला पाकिस्तानचा सहभाग उघड करावा या अटीवर त्याला भारत सरकारने माफीचा साक्षीदार करण्याचा करार केला हे कुठल्या आधारावर लिहीता? मुळात भारतात होत असलेल्या घातपाती कारवायात आणि दहशतवादी घटनात पाकिस्तानचा सहभाग आहे हे तो पर्यंत अनेको वेळा सिद्ध झालेले असताना आणि अगदी १९९३ बाँबस्फोटांचा तपास करतानाही अन्य मार्गाने निदर्शनास आलेले असताना आपण पाकिस्तानचे नक्की काय वाकडे केले जे याकुबच्या खुलाशाने करु शकणार होतो? मग ज्यातून पुढे काहीही कारवाई करता येणार नाही आणि मिळाली तरी जिची विश्वासार्हता संशयास्पदच आहे अशी माहिती 'उघड' करण्यास कारणीभूत ठरणारा असा वेडगळ आणि तद्दन निरुपयोगी करार भारत सरकारने कसा काय केला असेल असे मज पामराच्या बुद्धीलाही पडणारे प्रश्न तुम्हाला पडले नसतील असे आम्ही कसे मानावे?

वादासाठी आपण गृहित धरू की सरकारने त्याच्याशी काही गुप्त करार केला होता. तुम्हाला एक बाळबोध उदाहरण देतो. माझ्या घरात एक उंदीर धुमाकूळ घालतो आहे. मी त्याला पकडायला आत बुंदीचा लाडू ठेऊन एक पिंजरा लावतो. तो त्या पिंजर्यात फसतो. आता तुम्ही मला सांगा, निव्वळ विध्वंसक अशी ओळख असलेल्या उंदराला मी मारून टाकावे की त्याला प्रेमाने मांडीवर घेऊन प्रेमाने तो लाडू खायला द्यावा आणि मग सोडून द्यावे?

पुढे तुम्ही तोडलेले तारे तुम्हाला कदाचित पुढचा मेगासेसे किंवा गेला बाजार बुकर पुरस्कारही देऊन जातील. "मेमन कुटुंबीय मूळचे गुजरातेतले आणि आद्य व्यवसाय चांदीची तस्करी". मेमन कुटुंबीयांच्या या स्मगलिंगच्या धंद्याबाबत हे वाक्य तुम्ही इतक्या सहजपणे लिहून जाता, की वाचणार्यांचा समज व्हावा की चांदीची तस्करी म्हणजे एखाद्याचे रस्त्यालगत असलेले सायकलचे पंक्चर काढायचे अनधिकृत दुकान असावे किंवा रेल्वेत सीटखाली सापडलेली दहाची नोट एखाद्या प्रवाशाने खिशात टाकावी इतकी क्षुल्लक बाब!

तुम्ही म्हणता की एका अशक्त व्यवस्थेने दुसर्या अशक्ताचा बळी घेतला. खालच्या दोन कोर्टात चाललेले खटले, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, मग याकुबने दाखल केलेले क्युरेटीव्ह पेटीशन, राष्ट्रपतींकडे केलेले दयेचे अर्ज, आणि डेथ वॉरंटवर स्टे आणण्याचे प्रयत्न हे सगळे सगळे आपल्या न्यायव्यवस्थेने त्याला बचावाच्या पुरेपूर संधी दिल्या याची साक्ष नव्हे कायमग तुमच्याकडे तुमच्या "वस्तुस्थिती" "निर्विवाद सत्य" या शब्दांपलिकडे जाऊन तीन न्यायालयातज्यात अर्थात सर्वोच्च न्यायालय आहेच, जे पुरावे सादर होऊन गुन्हा सिद्ध झाला त्यांच्याहून वरचढ पुरावा आहे का? नसल्यास तुम्ही व्यवस्थेला अशक्त असे संबोधून खालच्या न्यायालयांचाच नव्हे तर फाशी जायच्या दिवशीही पहाटे साडेचार वाजता याकुबचे म्हणणे ऐकून घेणार्या सर्वोच्च न्यायालयाही अवमान करत आहात याची तुम्हांस जाणीव आहे काय?

हाच अशक्त याकुब एक धंदेवाईक चार्टर्ड अकाउंटंट होता. म्हणजेच तुमच्या भाषेत सनदी लेखपाल होता. ही परीक्षा किती कठीण असते हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. सनदी लेखपाल म्हणजे अशिक्षितअडाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी नव्हे. इतका हुशार असलेल्या हा अशक्त याकुबला आपण ज्याच्या "चोरट्या" धंद्यांचे पैसे फिरवतो आहोतलेखापरिक्षण करतो आहोत तो आपला सशक्त थोरला भाऊ टायगर काय धंदे करतो आहे याची कल्पना नव्हती असे "अधिकृत वस्तुस्थिती"च्या नावाखाली तुम्ही ठोकून देताना तुम्ही किती तर्कदुष्ट विधान करत आहात याची तुम्हालाच जाणीव नसावी. त्याच्याच पुढे तुम्ही म्हणता "त्याचे (म्हणजे टायगरचे) चोरटे व्यापार कुटुंबियांस ठाऊक होते" आणि मग लगेच "परंतू त्यापुढे जाऊन तो दहशतवादी कृत्यात सहभागी आहे हे कुटुंबास ज्ञात नव्हते". हे म्हणजे ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा बोरीवली ते चर्चगेट रेल्वे प्रवास करणारा एक चाकरमानी साईड बिझनेस म्हणून प्रवासात पाकीटमारीचा धंदा करीत असे आणि ते त्याच्या कुटुंबीयांस ठावूक नसे अशी एखादी सुरस कथा कथा सांगावी अशा प्रकारे आपण सांगता. तसेच, एकीकडे याकुबला 'काही म्हणजे काही माहित नव्हतं हो' असा टाहो फोडतानाच "तो माफीचा साक्षीदार होता आणि आहे. याचा दुसरा अर्थ असा की तो निरपराध नाही." असेही म्हणून जाता. कुबेर साहेबएक पे रेहेना, एक तो काही माहित नै बोलना नैतो निरपराध बोलना. लेकीन प्लीजच कोलांट्याउड्या मत मारना.

पुढचा भाग अधिक मनोरंजक आहे. टायगरचे दहशतवादी धंदे जर त्याच्या कुटुंबियांस माहित नव्हते, तर त्याचे वडील पाकिस्तानात आय.एस.आय.च्या कचाट्यात काय फिरत फिरत चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गेले की सहज पर्यटनाला गेले असताना ते आय.एस.आय ने त्यांना कचाट्यात पकडले? म्हणे, 'बाँबस्फोट चौकशीत टायगरचा हात असल्याचे उघड झाले तेव्हा पाकिस्तानात आय.एस.आय.च्या कचाट्यात असलेल्या त्याच्या वडिलांनी कुटुबाच्या देखत त्याला चोपले'. आईआईगंहे वाचून माझे ड्वाले पाणावले हो. कुणीतरी म्हटल्याप्रमाणे भारतात शामच्या आईनंतर थेट टायगरचे बाबाच.

आपण टायगरला पकडू शकत नाही, दाऊदला लटकावू शकत नाही याचा अर्थ आपण हातात सापडलेल्या याकुबला सोडून द्यायला हवा होता? जिथे निर्विवादपणे पाकिस्तानातून आलेल्या दहशतवादी कसाबविषयी देखील अनेकांना माणूसकीचे उमाळे येतात, त्या आपल्या भारत देशात सापडलाय तर "लटकावून टाका फासावर" इतकं सोपं आहे?

आपल्या या अचाट आणि अतर्क्य संपादकीयात आपण याकुबच्या धर्माचा उल्लेख करुन तुम्ही योग्य तो खोडसाळपणा केलेला आहेचभारतात आतापर्यंत फाशी दिलेल्या कैद्यांपैकी किती जण मुसलमान होते ते तपासून बघणार का जरा? त्यातच संजय दत्तचाही उल्लेख करुन तुम्ही तुमचा अजेंडा स्पष्ट केलेला आहे आणि त्या तूलनेत याकुबचा गुन्हा चक्क किरकोळ ठरवून काय सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे समजण्याइतके आता तुमचे वाचक दुधखुळे राहिलेले नाहीत. संजय दत्तला सवलती मिळतात, ते कायद्याने. दाऊद टायगरला परत आणण्यात आपण अयशस्वी ठरलो आहोत ते आपले सरकार अंतर्गत आंतरराष्ट्रीय कायदे पाळत असल्यानेच. आणि आता याकुब फासावर गेलाय तो ही सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावरच. तेव्हा 'उचलला याकुब, लटकवला फासावर' हे वाक्य 'उचलली जीभ लावली टाळ्याला' शैलीत आपण बरळू नये, हेच उत्तम.

आणखी एक. बॉम्बस्फोटात मेलेल्या २५७ निरपराध नागरिक आणि शेकडो जखमींची चौकशी करा जरा. आमचा उन्माद जाऊद्या हो, किमान चाळीसहून अधिक शस्त्रक्रिया झालेल्या आणि अजूनही काचा अंगात असलेल्याआणि ते कमी म्हणून की काय उजवा हातही निकामी झालेल्या माणसाबद्दल किंवा वयाच्या तेराव्या वर्षी आईचा तुकडे तुकडे झालेला मृतदेह बघायला ज्याला लागला त्या व्यक्ती विषयी जरा उमाळा येऊ द्या.

गिरीश कुबेर साहेब, मी मूळचा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी. इयत्ता दुसरीत मराठी वाचायला शिकलो तेव्हापासून लोकसत्ता वाचतो आहेमला मराठी वाचनाची गोडी निर्माण होण्यामागे लोकसत्ताचे नियमित वाचन हे आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. सातेक वर्षांपूर्वी पुण्यात स्थलांतरित झालो तेव्हा सुरवातीला पेपरच घेत नव्हतो. मुलं शाळेत जाऊ लागली म्हणून त्यांना चांगलं मराठी वाचायला मिळेल या आशेने पावरफुल आणि पवारफुल सकाळ घेता लोकसत्ता घेणे पसंत केले कारण लोकसत्तावरचे प्रेम आणि श्रद्धा.....हो श्रद्धाती एक मोठी अंधश्रद्धा होती हे आपण मागेच सिद्ध केले होतेत, आणि आज हे संपादकीय लिहून तेव्हाचा लोकसत्ता घेणे बंद करण्याचा माझा निर्णय किती योग्य होता हे तुम्ही मला दाखवूनच दिलेत.
माधव गडकरी लोकसत्ताच्या संपादकपदावर होते तो पर्यंत लोकसत्ता हे एक वाचनीय वर्तमानपत्र होता. नंतर त्याला उतरती कळा लागली. अरुण टीकेकर, कुमार केतकर यांनी यथास्थित गरळ ओकून झाल्यावर आता तुम्ही लोकसत्ताला ढगात पाठवण्याच्या कामी कुठलीही कसर सोडलेली दिसत नाही. लोकसत्ताचे हल्लीचे लिखाण प्रचंड एकांगी होत चालले आहे. कुणीही काहीही बोलले, किंवा एखादा विषय मांडला, किंवा काही घटना घडली की लगेच त्यावर इयत्ता तिसरी च्या उत्साहात बातमी छापलीच पाहीजे असा पायंडा अलिकडे लोकसत्तात पडला होतात्या बालीश गरळोओकीत नंतर मोदी सरकार आल्याने नवा जोम आला. एखाद्या घटनेशी, गोष्टीशी, किंवा केलेल्या विधानाशी संबंधित असलेल्या आणि असू शकणार्या असंख्य गोष्टींचा एकत्रितपणे विचार आणि अभ्यास करुन अन्वयार्थ काढायचा मगच अग्रलेख लिहायचा असतो किंवा बातमी द्यायची असते हे लोकसत्ताच्या गावीही उरलेले नाही. तोच वारसा आपण समर्थपणे पुढे चालवत आहात हे पाहून संतोष जाहला. कुठलेही वर्तमानपत्र किंवा अंक हा एकांगी असेल आणि त्याचा गाभा हा द्वेषमूलक असेल तर तो फार काळ दर्जा आणि लोकप्रियता आणि पर्यायाने खपही टिकवून ठेवू शकत नाही.

तेव्हा संपादक गिरीश कुबेरमहाशय, पेपर चालवताय तर बातम्या देण्याचे काम करा. देशाच्या न्यायव्यवस्थेचा आणि न्यायालयांचा आदर करायला शिका. उगाच समाजाला मार्ग दाखवण्याच्या नावाखाली  शाब्दिक कोलांट्याउड्या मारण्याच्या आगाऊपणा करत जाऊ नका. वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजप्रबोधन करायला तुम्ही "लोकमान्य" नाही आणि तुमच्या या संपादकीयावरुन पुन्हा सिध्द झालेले आहे की तुमची नियतही साफ नाही. तेव्हा लवकर सुधारा. नाहीतर मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधे रस्त्यावरच्या मवाल्यागत वागून थोतरीत खाणारा राजदीप आणि अनेकांनी तोंडात शेण घातलं तरी रोज  चुकता बरळणारा निखिल वागळे यांच्या रांगेत लो तुम्हाला कधी नेऊन बसवतील तुम्हालाच पत्ता लागावयाचा 
नाही.  

पुन्हा एकदा, या संपादकीयाबद्दल लोकसत्ता  तुमचा तीव्र निषेध.
आपला नम्र

मंदार दिलीप जोशी
जालनिशी | फेसबुक

ता.. मी लोकसत्ता का बंद केला ते सांगणारे जुने विपत्र इथे वाचावयास मिळेल.
http://mandarvichar.blogspot.in/2014/09/blog-post.html




61 comments:

  1. Replies
    1. खूप धन्यवाद शर्मिला.

      Delete
    2. आपला लेख खुप ऊशीरा वाचला पण नसता वाचला तर बरे झाले असते असेच वाटतय. आफण अत्यंत खालच्या पातळीवर एका विद्वानाचा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तो जमला नाहीच. आपण लोकसत्ता वाचायचा बंद केलात हे खरच बरे केलेत आमच्लाया वर फार मोठे ऊपकार केलेत.....पण बघा कसय सोडुन परत एक अग्रलेख वाचलातच आणि पुन्हा गरळ ओकलात.....अहो वाचुच नका.......मोदी, हिंदुतव याचा आयुष्यभर " जप" करा.....मोदी आणि कंपनी न देशाची आर्थीक घडीची कशी वाट लावलेली आहे वाचत असालच.....पण मानणार.......अंधळे भक्तच......

      Delete
    3. लेख नसता वाचला तर बरे झाले असते म्हणताय मग इतकी मोठी टिप्पणी टाईप करायचे कष्ट कशाला घेतलेत हाहाहा

      Delete
  2. Replies
    1. अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद

      Delete
  3. Replies
    1. अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद

      Delete
  4. लेख आवडला आपले अभिनंदन!

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

      Delete
  5. Gayatri TondapurkarAugust 1, 2015 at 1:20 AM

    Kya baat hai ! Sansanit chaprak yala mhantat. Nirbhid likhana baddal abhinandan.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद गायत्री

      Delete
  6. << रॉ संस्थेच्या ज्या रामन साहेबांच्या लेखाचा आपण हवाला देता>>

    ज्या मिडिया संस्थे कडे हा लेख आहे त्यांच्या म्हणण्या नुसार रामन यांनी हा लेख मारण्याच्या आगोदर लिहिला होता पण त्यावेळी आम्ही तो प्रसिद्ध केला नाही. त्या लेखाबाबत हि साशंकता आहे

    ReplyDelete
  7. Namaskar Mandar,
    lekha atishay dhardar ahe. Manapasun aavdla.
    Jya karnasathi ha lekh lihila ahe, tyacha parinam mhanun ma. Kuber sahebanche doke thikanawar yawe hich sadichha.

    Vaibhav Aradhye

    ReplyDelete
    Replies
    1. वा ! मंदारजी सणसणीत चपराक

      Delete
    2. सुंदर लेख आहे महाराष्ट्र टाईम्सच्या कालच्या अंकात फक्त मेमनचीच बातमी होती त्याचा ही निषेध. .....

      Delete
  8. अविनाश अनगरेAugust 1, 2015 at 7:47 AM

    कुबेराने स्वत:च्या अकलेचा
    खजिना अग्रलेखाद्वारे उघडा पाडल्यानंतर, आणि
    तो अगदीच रिता आहे हे दाखवल्यानंतर खरे तर त्यावर काही भाष्य करणे म्हणजे गाढवापुढे वाचली गिता !
    परंतु 'अकलेचा अभाव' याव्यतिरिक्त ईतरही शक्यता आहेत, उदा.
    1)संपादकासह वर्तमानपत्र अतिरेक्यांकडे गहाण पडले असणे,
    २) संपादक अतिरेकी कारवायांमध्ये सामिल असणे,
    ३) संपादकाने पाकिस्तानमधुन वकिली शिक्षण घेउन मेमन कुटुंबाचे वकिलपत्र घेतले असणे,
    ४)वर्तमानपत्राचा खप स्वकर्तुत्वाने रसातळाला नेल्यानंतर आता बरेच महिने पगार थकल्यामुळे, वर्तमानपत्राचा खप वाढविणे आवश्यक बनल्यामुळे आणि ते करण्यासाठी बुद्धीची वानवा असल्यामुळे , हा असा विवस्त्र होउन लक्ष वेधण्याचा मार्ग अवलंबिणे
    ५) दुसऱ्या एखाद्या वर्तमानपत्रसमुहाने भरपुर पैसे देउन कुबेराला हे वर्तमानपत्र बंद पाडण्याच्या कामगिरीवर पाठवले असणे
    ६)संपादकाने असे गृहित धरणे कि मराठी वाचकांना स्वत:ची अक्कलच नाही

    ई., ई.

    ReplyDelete
  9. मंदारसाहेब मस्तच.
    लोकसत्ता वाल्यांना आपली जागा दाखवुन दीली.
    पन कुत्र्याचे शेपुट सरळ होईल आसे वाटत नाही.

    ReplyDelete
  10. Uttam mudde aani yogy bhashet lihilela lekh ptla aani aavdla ..

    ReplyDelete
  11. एकदम बरोबर. याकूब हा कसा निर्दोष आहे, हे दाखवून देण्याची अहमअहमीका वर्तमानपत्रे व इलेक्ट्रॉनिक मिडीया, राजकिय नेते, तथाकथित समाजसुधारक व इतर मंडळींनी चालविली होती. आपल्या परखड, मुद्देसूद विवेचनाने त्यांचे ढोंग उघडे पाडलेत याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. तत्सम मंडळींना याच्याशी काही देणे घेणे असणार नाहीच पण मतमतांतराच्या धडाक्यात बावरलेल्या सर्वसामान्यांना वस्तुस्थिती कळेल व हेच महत्वाचे आहे.

    ReplyDelete
  12. lokasatta va dahashatvadyancha pulka aslelyaanaa khankhanit chapraak aahe ha lekh...

    ReplyDelete
  13. Ha lekh tya kuber paryant pohchava ani tyache yakub chya fashi mule panavlele dole ughadavet hich sadicha.

    ReplyDelete
  14. छान लेख

    ReplyDelete
  15. गिरीश कुबेरांचे लोकसत्ता व्यतिरिक्त फारसे लेख मी वाचले नव्हते. परंतू त्यांनी लिहिलेले "टाटायन" काही दिवसांपूर्वीच वाचले त्यामुळे त्यांच्याबद्दल मनात एक आदर निर्माण झाला पण दि.30जुलै 2015 च्या अग्रलेखाने निराशा केली.

    ReplyDelete
  16. लोकसत्ताचे संपादक झाल्यापासून श्री श्री श्री गिरीश कुबेर यांना बहुतेक आपण सर्व ज्ञान संपत्तीचे कुबेर झाल्यासारखे वाटत आहे. जणू संपादक म्हणजे प्रत्येक विषयाचा ज्ञानाचा महासागरच आहे. पण हे डबके किती उथळ आहे हे हळूहळू दृष्टीस येत आहेच. कुठल्याही लेखकावर आडून आडून टीका करणे, लोकभावनेचा आदर न करणे आणि आत्ता तर सर्वोच्च न्यायालयाचा अपमान. घडा भरत आल्याची ही निशाणी आहे. खरं तर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा मी वाचक आहे. पण आता त्यावर शंका येऊ लागली आहे. असो. घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर आपले मत नोंदवण्यापेक्षा त्यांनी आपल्या लोकसत्ता मधल्या प्रिंटींग मिस्टेक जरी सुधारल्या तर भरपूर होईल.

    ReplyDelete
  17. Amhala Sh. Girish Kuber yanchya murkhapanachi kiw yete.

    ReplyDelete
  18. I guess, the same article here: http://www.dailyo.in/politics/yakub-memon-terrorism-1993-mumbai-blasts-police-force-gurdaspur-attack-isis-communalism/story/1/5383.html

    ReplyDelete
  19. उत्तम लेख. सणसणीत चपराक. अगदी सगळ्यांच्या मनातलंच.

    ReplyDelete
  20. अतिशय सुंदर आणि तडफदार लेख... माझ्या आणि इतर अनेकांच्या मनातले विचार तुम्ही अगदी प्रभावी भाषेत मांडल्याबद्दल तुमचे शतशः अभिनंदन आणि आभार..
    मी "कुमार केतकर"यांना अनेक चर्चासत्रांमध्ये ऐकले आहे. नकारार्थी विचाराचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच कुमार केतकर होत.. त्यांना "भाजप-द्वेष्टे", "मोदी-द्वेष्टे", किवा "कॉंग्रेस-मित्र" यापैकी कोणतेही विशेषण देता येणार नाही. परंतु जर का हे असच चालू राहिलं तर त्यांना "भारत-द्वेष्टे" हे विशेषण अगदी शोभून दिसेल ..

    धन्यवाद .. जय हिंद ..

    ReplyDelete
  21. खुप झणझणीत अंजन घालणारा लेख आहे.

    ReplyDelete
  22. डॉ दहीवदकरAugust 1, 2015 at 3:37 PM

    गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या " हा तेल नावाचा इतिहास आहे " पासून त्यांची टाटायन पर्यत पुस्तकें वाचली आहेत. पण हे सगळे प्रकार पाहून मला वाटते की त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. त्यांनी त्यांच्या पेपर मधे आलेल्या वाचकांच्या प्रतिक्रया वाचल्या तर बरे होईल. हा अग्रलेख आला त्या सुमारास एका वाचकाने लोकसत्ता ला पत्र लिहिले आहे. त्यात हे स्पष्ट झाले आहे की बाबरी मशीदीची घटना घडण्या आधीच आर डी एक्स कोकणात पोहचली होती. ह्या वरून तरी डोक्यात प्रकाश पडायला हवा की हे सर्व फार मोठ्या प्रमाणात पुर्व नियोजित पाकिस्तान च्या सह्हयाने हत्या करण्याचे षडयंत्र होते. कोणाच्या नावाने आपण गळा काढतो आहोत. जरा भान ठेवा. पण त्या काळात इंग्रजी आणि टीव्ही मेडीयाने तेच केले. रात्रभरचा कोर्टा समोरचा थरार पट छान होता. त्या बिचार्‍या गुरदासपुर ला अतिरेकी हल्ल्यात बळी पडलेल्या पोलीस एस पी बद्दल काहीच नाही. अतिरेक्यांपेक्षा जास्त धोका ह्या मेडीयाचा आहे. हेच फुट पाडत आहेत. खेदाने हे मान्य करावे लागते की त्यांना कुणीही आवरू शकत नाही. त्यामुळे " ठेवीले तैसेची रहावे चीत्ती असू द्यावे समाधान".

    ReplyDelete
  23. मंदार मस्त लिहिलेय. कुबेरांची पुस्तके खुपच छान आहेत पण तो अग्रलेख एकदम भिककार आहे. अश्या लेखाची अपेक्षा नवती कधी.

    ReplyDelete
  24. Kuber should be charged for treason and

    ReplyDelete
  25. Kudos to you Mr. Mandar for a fantastic post. Special mention for your Assal Marathi.

    ReplyDelete
  26. चार्वाकAugust 2, 2015 at 8:22 AM

    नथुराम गोडसे च्या उदात्तीकरण बद्दल काय म्हणता?

    ReplyDelete
  27. (१) लेखाचा हा विषय नाही.
    (२) शिवाय बॅाम्बस्फोटांत २५७ लोक ठार व असंख्य जखमी आणि एक खून यात फरक करायची समज आपणांस प्राप्त झाली की आपण बोलू.

    ReplyDelete
  28. नमस्कार मंदार साहेब,

    मी जेव्हा लोकसत्तेतला अग्रलेख वाचला त्याचवेळी मनात पाल चूक-चुकली.

    लोकसत्ता अग्रलेख - "भारताविरोधात लादल्या गेलेल्या युद्धाचा सूत्रधार याकूब मेमन नाही आणि नव्हताही."
    मी - २६/११ चा हल्ला असो कि ९३ चे ब्लास्ट, दोन्ही वेळेला सूत्रधार लांबच होते. म्हणून ज्यांनी योजनेची अमलबजावणी केली त्यांना शिक्षा द्यायची नाही असा नाही.

    लोकसत्ता अग्रलेख - "याकूबची शरणागती आणि त्याचे भारतात परतणे"
    मी - याकुब भारतात स्वतःहून आला कि त्याला आणलं गेलं हे सर्वोच्च न्यालायासमोरही मांडलेलंच असेल. तरीही सर्वोच्च न्यायालायाने त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवलि.

    लोकसत्ता अग्रलेख - "याकूब या कुटुंबाचा सनदी लेखापाल. त्यासही आपला थोरला भाऊ नक्की कोणत्या उद्योगात मग्न आहे, हे माहीत नव्हते. त्याचे चोरटे व्यापार कुटुंबीयास ठाऊक होते. परंतु त्यापुढे जाऊन तो दहशतवादी कृत्यात सहभागी आहे, हे कुटुंबास ज्ञात नव्हते."
    मी - एवढं असताना सर्वोच्च न्यायालयाने त्याला फाशी दिली हे पचायला फारच अवघड आहे. तुम्ही य़कुबच वकिली पत्रक स्वीकारायला हवं होतं.

    लोकसत्ता अग्रलेख - "मुख्य आरोपीचा भाऊ आहे आणि मुख्य आरोपी हाती लागणे शक्य नसल्याने जो कोणी हाती लागला त्यास फासावर लटकावले जावे"
    भारतीय न्यायव्यवस्थेने याकुबला त्याचा निर्दोशपणा सिद्ध करायची बरयाच संध्या दिल्या, त्यामुळे त्यावेळी घडलेल्या घटनेचा रोष निवळला म्हणूनच याकुबाची बाजू human rights वाले ऐकत अहेत. ९३ मधेच मिळाला असता तर तेव्चाच त्यांनीच याकुब विरुद्ध फाशी जाहीर केली असती.

    "फाशीची शिक्षा बरोबर कि चूक" यावर दुमत असू शकता, पण याकुबला शिक्षा चूक कि बरोबर यावर लोकसत्ता दिशाभूल करत अहेत.

    ReplyDelete
  29. दीपक वर्माAugust 2, 2015 at 1:21 PM

    छान व उत्तम उत्तर दिल्याबद्द्ल अभीनन्दन. पण कृपया आपल्या न्यायव्यवस्थेला सशक्त मानण्याची चूक करु नका. 22 वर्ष निर्णय देण्यासाठी लावणारी न्यायव्यवस्था खरच फार अशक्त आणी आजारी आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. हो, 22 वर्ष निर्णय देण्यासाठी हे फार होतं.

      Delete
  30. फारच छान

    ReplyDelete
  31. अग्रलेखाच्या विरोधात न्यायालयाच्या अपमानाची याचिका दाखल करता येईल का?

    ReplyDelete
  32. मंदार, एकदम चाबुक पोस्ट.

    ReplyDelete
  33. सर्वप्रथम इथे अभिप्राय देणार्‍या सर्वांचे आभार.

    वेळे अभावी सगळ्यांना एकास एक असे उत्तर द्यायला दरवेळी जमत नाही त्यामुळे उरलेल्या व एकंदर सर्वांनाच खूप धन्यवाद.

    मी तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य पण तीव्र देशभक्ती असलेला माणूस आहे. काही वर्षांपासून लिहीत गेल्याबे व विपूल वाचन असल्याने लिखाणात सफाई आली आहे इतकंच. सातत्य असेल तर तुम्हीही असेच लिहू शकाल.

    काही जणांनी वर्तमानपत्रांवर कायदेशीर कारवाई करता येईल का असे विचारले आहे. मला वाटते करता येईल पण तसे करु नये. कारण हा विषय फार खेचणे आपल्यासारख्या देशभक्तांच्या उद्दिष्टाला हानीकारक ठरू शकतो. उलट हे झालं तेच बरं झालं कारण त्यानिमित्ताने लोकांच्या निष्ठा (वर्तमानपत्रांच्या व याकुबच्या अंत्ययात्रेला गर्दी करणार्‍यांच्याही) नक्की कुठे आहेत ते सगळ्या देशाला ढळढळीतपणे समजलं.

    दुसरी गोष्ट म्हणजे यांना धडा शिकवणे आपल्याच हातात आहे. आपण लोकसत्ता, टाईम्स ऑफ इंडिया (व टाईम्स नाऊ च्यानल), व इंडिअन एक्स्प्रेस यांच्यावर बहिष्कार टा़कून – म्हणजे ती वर्तमानपत्रे विकत न घेण्याचा निर्णय अंमलात आणून - त्यांना आर्थिक दृष्ट्या जेरीस आणू शकतो. आणि सद्ध्या आपण तेच करावे हे श्रेयस्कर आहे. बाकी गोष्टी यथावकाश करता येतीलच.

    पुन्हा एकदा सर्वांना प्रतिसादांबद्दल खूप धन्यवाद. संपर्कात् रहा व वाचत रहावे ही नम्र विनंती.

    मला फेसबुकवर अ‍ॅड करायचे असल्यास त्याची लिंक वरील लेखात आहेच. इथेही देतो आहे. पुढीलप्रमाणे: http://www.facebook.com/mandarkelshikar.

    ता.क. विरोधातल्या प्रतिक्रिया उडवत नाही. गैरसमज नसावा. पण बिनबुडाच्या, विरोधात काडीचेही पुरावे न देणार्‍या, तसेच लेखाच्या विषयाशी काहीही संबंध नसणार्‍या आणि वैय्यक्तिक दोषारोप करणार्‍या प्रतिक्रिया नक्की उडवतो. विरोधी प्रतिक्रियांतून मलाच शिकता येईल पण अशाप्रकारच्या प्रतिक्रियांतून काहीही शिकता येत नाही. तसेच मला त्या पातळीवर उतरायची इच्छा नसल्याने त्या उडवणे भाग पडते.

    ReplyDelete
  34. नमस्कार मी आपला ब्लॉग माझ्या फेसबुक पेजवर आलेल्या एका लिंक द्वारे वाचला, वाचायला अतिशय आवडला, ज्या खुमासदार किंवा कडक म्हणता येईल अशा शब्दांत आपण गिरीष कुबेरांच्या संपादकीयचा समाचार घेतला आहेत त्याबद्दल आपले आभार. ज्याप्रमाणे आपण तो संपादकीय वाचून रागावलात ,चिडलात साधारण तशीच प्रतिक्रीया माझी देखील झाली होती, परंतू नंतर याच विषयावर मी थोडं संशोधन केल जरा आजूबाजूचे म्हणणे अगदी तटस्थपणे ऐकलेत, काही बातम्या शोधल्या काही त्या काळच्या अर्काईव्हज मध्ये जावून तपासल्या... आणि माझ्या मनातल्या रागाची जागा विशीष्ट अशा संभ्रमाने घेतली आहे. त्याची कारणे पुढील प्रमाणे –
    - आपल्या न्याय व्यवस्थेने त्याला पुरेपुर संधी दिली. (पण जर २० वर्षे थांबलाच होतात तर २ तास घाईघाईने रात्री अपरात्री खटला चालविण्याची गरज का? अजून ४ दिवसांनी याकूब सुटून तर जाणार नव्हता ना? न्यायालयाने आणि सदर वकिलांनी जनतेसमोर काही गोष्टी उघड केल्या असत्या तर आत्ता फोफावणारे वाद कमी नक्कीच झाले असते... )
    - याकूब प्रकारात सगळ्यात महत्वाचा मुद्दा मानला जातो तो म्हणजे त्याला पकडण्यात आले की तो शरण आला ?
    -मुळात कुबेरांच्या लेखात याबद्दल काहीच नीट खुलासा करण्यात आलेला नाही... त्यानी सांगितले आहे की त्याच्या पत्नीचे असे म्हणणे होते की तो शरण आला होता. हा वाद खरतर त्याला अटक झाल्यापासून तसाच कायम आहे. असं दिसतं त्याकाळच्या सगळ्या प्रमुख वर्तमानपत्रांच्या अर्काईव्हज तश्याच सांगतात... रमन यांच्या पत्राचा शोध मला लागला नाही परंतू गिरीष कुबेर हा नावाजलेला लेखक एवढ्या मोठ्या वृत्तपत्रातून जर असे विधान करत असेल तर त्यात खरोखर काहीच तथ्य नसावे का? त्यांच्या पुस्तकांतून मला जाणवते की त्यांची अंतरराष्ट्रीय राजकारणाची समज आणि त्यांचे स्रोत आपल्यापेक्षा नक्कीच चांगले असतील. ज्या नेपाळी पोलिसाच्या साक्षी बदद्ल आपण बोललात ती पूर्णत: खरीच आहे कशावरून कारण याकूब पकडला गेला या बातमीमुळे तेव्हा खूष झालेले अनेक लोक आता त्याच्यासाठी धावून आलेले दिसतात. जेव्हा ती मुलाखत घेण्यात आली तेव्हा त्याच्यावर दबाव आणला नसेल कशावरून? चला नसेल आणला तरी हा एकमेव पुरावा पुरेसा आहे का हे सिध्द करण्यासाठी की याकूब शरण आला नव्हता? मला हे सगळ वाचून, ऐकून डॉन सिनेमाची आठवण झाली त्यात खोटा डॉन झालेल्या अमिताभ कडे कोणताही पुरावा नसतो मी पोलिसांचा माणूस आहे हे सिध्द करण्यासाठी, अर्थात ती सिनेमाची कथा होती, पण हे सत्य नसेल हे सांगण्यासाठीचे ठोस पुरावे आहेत का खरोखर? नंतर येणारा प्रश्न की कोर्टाव्यतीरीक्त कोणीही हे ठरवू शकत नाही की माफीचा साक्षीदार कोणी असावं पण आरोपीला पकडल्यानंतर त्याच पहिलं इंटरअँक्शन होत ते अधिकारी आणि पोलीस यांच्याशी त्याला लगेच न्यायालयासमोर उभे केले जात नाही. त्याची नंतर केलेली माफीचा साक्षिदार होण्याची मागणी कोर्टाने फेटाळून लावली हे सत्य आहे सदर लोकांनी ऐनवेळी प्रकरणातून अंग काढून घेतले नसेल कशावरून?
    - पुढील मुद्दा चांदीच्या तस्करीचा याकूबच्या भावाचा म्हणजेच टायगरचा बिझनेस होता ज्याद्वारे तो मालाची ने आण करीत असे असे, करीत असताना तो चांदीची तस्करी करीत होता. ही बाब त्याच्या भावाला माहीत असेल कदाचित (तुमच्या मते माहित होती) मान्य भावाला पाठीशी घालण्यासाठी त्याने हिशेबात थोडी गडबड केली (ती आणखी कीती लोकं करतात आणि कीती नाही हा स्वतंत्र मुद्दा आहे) आणि चार पैसे लुबाडले परंतू त्याच्या नकळत त्याने चांदीच्या नावाने आर डी एक्स ईंपोर्ट केले ज्याबद्दल खरोखर याकूब अनभिज्ञ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि याच अनभिज्ञतेबद्दल कुबेर सांगत असावेत.

    -आपला पुढील मुद्दा पाकिस्तानचा सहभाग उघड करणेबाबत- याकूब हा आय एस आय च्या देखरेखीखाली होता त्यामुळे पाकिस्तानाच्या या घटनेतल्या सहभागाबाबत त्याच्याकडे निष्चीतच जास्त माहिती होती. पाकिस्तानचा दहशतवादी कारवायांत हात आहे हे याकूबने उघड करणे हे तुमच्या आमच्यासाठी महत्वाचे नसले तरी अंतरराष्ट्रीय राजकारणात ही अत्यंत महत्वाची बाब आहे.
    - पळून जाण्याच्या मुद्यावर येवूयात- समजा क्ष या व्यक्तीने त्याच्या भावाला गैर प्रकारे मदत केली पण अचानक त्या भावाने एक दिवस आधी येवून क्ष या व्यक्तीला सांगितले की तू केलेल्या मदतीतून मी देशद्रोहाचे कृत्य करीत आहे आणि जर पकडलो गेलो तर तू सुध्दा त्यात अडकशील हे ऐकल्यावर त्या क्ष व्यक्तीने त्याच्या कुटूबातील सदस्याने तेथे रहावे की पळून जावे? तुमच्या मते कोणताही सामान्य माणूस अशा वेळी काय करेल असे तुम्हांस वाटते? यानुसार तुम्ही एका भिकाऱयाला रोज मदत करत आहात तो रोज तुमच्या पैशाने नकळत दारू पितो एक दिवस तो भिकारी मेला तर पोलिसांनी तुमच्यावर सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा का? तो योग्य असेल का?

    ReplyDelete

  35. ( कमेंटचा उर्वरीत भाग )
    - फाशीतून धर्माचे राजकारण होत असेल तर ते नक्कीच निंदनीय आहे, पण भारतीय न्यायव्यवस्थेच्या नियमांनुसार कोणत्याही निरअपराध व्यक्तीस शिक्षा होता कामा नये, तसे न्यायव्यव्सथेने चोख बजावले असेल तर ते मुद्दे समोर का आणले जात नाही आहेत? जेणेकरून लोकांच्या मनातील गैरसमज दूर तरी होतील.
    - याकूब ला सोडून द्यावे अशी मागणी कुणीही केली नव्हती आणि नाही आहे, त्याचा प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग होताच हे साऱयांना मान्यच आहे, फक्त देहदंडाची शिक्षा व्हावी याबद्दलच दुमत आहे साऱयांचे आणि कुबेरांच्या लेखातूनही हेच प्रेरीत झालेले मला वाटते.
    ता. क.- आपल्या विधानांना विरोध करणे, अगर उगीच वाद घालणे हा उद्देश यातून नक्कीच नाही, मी ही उत्तरे शोधतो आहे जर आपल्याकडे असतील तर कळवावीत.

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या प्रश्नांना थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

      याकुबचा खटला खुल्या न्यायालयात चालवला गेला होता, त्यामुळे सर्व पुरावे हे कुठल्याही प्रकारे लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे तो नेपाळी पोलीस वगैरे पुरावे योग्य वेळी सादर झालेले असणारच. आता फक्त प्रसारमाध्यमांसमोर येत आहेत इतकेच. त्यामुळे आपण संभ्रमात पडायचे कारण नाही.

      पाकिस्तानच्या सहभागाबद्दल वर लेखात मुद्दा आलेलाच आहे, तेव्हा तो पुन्हा इथे मांडत नाही.

      याकुबला आर.डि.एक्स बद्दल माहित नव्हते यावर शेंबडे पोर सुद्धा विश्वास ठेवणार नाही कारण सगळ्या व्यवहारात याकुबचा सक्रीय सहभाग होता, ते व्यवहार तोच सांभाळत होता. हे ही न्यायालयात सिद्ध झालेले आहे. पळून जाण्याच्या मुद्द्याबाबतही हेच. गुन्ह्यात सक्रिय सहभाग असणारा माणूस घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करणारच, तसा त्याने केला आणि नेपाळात पकडला गेला. याकुबला फाशीचीच शिक्षा योग्य आहे कारण एखाद् दुसरा खून नव्हे, तर २५७ जणांच्या मृत्यूला व असंख्य जण तात्पुरते किंवा कायमचे जायबंदी व्हायला कारणीभूत ठरला, ते ही पाकिस्तानच्या कारस्थानात सहभागी होऊन.

      त्यामुळे उशीरा का होईना तो लटकला हे महत्त्वाचं. बाकी सगळं गौण आहे.

      Delete
  36. आपण म्हणता ते खरे आहे. लोकसत्ता बरेचदा विरोधी विचार मांडतो. मोदी द्वेषही उघड दिसतो पण शनिवार व रविवार तसेच कथा अकलेच्या कायद्याची व मानव विजय, आकलन सारखी विचारक्षम सदरे मी तरी इतर कोणत्याही वर्तमानपत्रात वाचली नाहीत. कुबेर कधी कधी अति करतात पण रोज लिहावं लागलं की असं होतं हे मानण्यास जागा आहे. कुमार केतकर आणि वागळे यांच्याबद्दल न बोललेलंच बरं! त्यांची अवस्था रजोनिवृत्तीतले विचारवंत अशीच करायला हवी!

    ReplyDelete
  37. आहो यात काही विशेष नाही असले लोक विकतच
    मिळतात...आणि पैशाला पासरी मिळतात....म्हणूनच पत्रकारिता म्हणजे लोकमान्य टिळक हेच चिरस्मृतीत राहाते...कुबेरांची रद्दी त्याच दिवशी संध्याकाळी होते.

    ReplyDelete