Sunday, November 5, 2017

लव्ह जिहाद: मुलींनो उघडा डोळे, बघा नीट

बघ मुली, त्याचा धर्म वेगळा, तो पण असा की ज्यात लग्न हे जन्मजन्मांतरीचं बंधन किंवा दोन जीवांचे मीलन, दोन कुटुंबांचा संबंध वगैरे मानला जात नाही. त्यांच्यासाठी लग्न म्हणजे शरीराची भूक भागवण्याचं आणि मुलं पैदा करण्याचं साधन असतं, म्हणून तर चार चार लग्न मान्य आहेत त्यांना!

आपल्या राहणीत, खाण्यापिण्यात, संस्कारात सगळ्यातच जमीनअस्मानाचा फरक आहे गं. आणि लग्न म्हणजे फक्त दोन शरीरांचं मीलन नाही ना, या लग्नात ना आपले ना त्यांचे नातेवाईक जोडले जातील. एक तर तुला मुसलमान करतील नाही तर तू मुसलमान होई पर्यंत छळ छळ छळतील. तिथून पुढे तुझा छळ थांबेलच असं नाही.

नाही हो बाबा, तुम्हाला माहित्ये का तो तसा अजिबाताच नाहीये. खूप काळजी घेणारा, प्रेमळ आहे तो. आणि त्याच्या कुटुंबात तर धार्मिक वातावरण वगैरे काहीच नाहीये. त्यांना जात धर्म यांची काहीच पडलेली नाही. खूप उच्चशिक्षित आणि पुढारलेलं कुटुंब आहे त्याचं, आणि तो तर एक यशस्वी डॉक्टर आहे. आणि बाबा, आमचं किनै एकमेकांवर खूप प्रेम आहे.

कोणत्याही हिंदू मुलीने मुसलमान मुलाशी लग्न करायची इच्छा प्रदर्शित केल्यावर तिच्यात आणि तिच्या पालकांत होणारा हा संवाद प्रातिनिधिक म्हटला पाहीजे. असाच काहीसा संवाद जमशेदपूर शहरात राहणारे आणि टाटा स्टीलचे निवृत्त कर्मचारी श्री अरुण कुमार यांच्यात झाला असला पाहीजे.

आता शक्यतेकडून सत्यतेकडे येऊया.

आदित्यपूरमधे असलेल्या मेड्रीटीना हॉस्पिटलमधे मिर्झा रफीक हक हा डॉक्टर आणि चयनिका कुमारी व्यवस्थापिका म्हणून काम करत. सहवासातून "प्रेम" निर्माण व्हायला वेळ लागला नाही. तीन वर्ष चाललेल्या या प्रेमसंबंधांची परिणीती लग्नात व्हावी असं आता चयनिकाला वाटू लागलं होतं.

पण रफीकची पहिली अट अर्थातच चयनिकाने इस्लाम कुबूल करावा, मग बाकीचं पाहू अशी होती. लग्न करायचं असेल तर धर्म कशाला बदलायला हवा असा प्रश्न पडलेली चयनिका रफीकला ती त्याच्या "प्रेमात" आकंठ बुडालेली असल्याची जितकी खात्री पटवून द्यायची, तितकं रफीक तिला ती राफीकशी एकनिष्ठ नसल्याचे आरोप करायचा.

रफीकच्या प्रेमात आंधळी झालेली चयनिका मग आपल्या एकनिष्ठ असण्याचे आणि रफीक करत असलेल्या घाणेरड्या आरोपांतून निर्दोष असण्याचे पुरावे हॉटेल जिंजरच्या एका खोलीतल्या बेडवर देऊ लागली. तब्बल तीन दिवस हा प्रकार चालू होता. मग असंच एकदा रफीकची बोटं तिच्या केसांतून फिरू लागली. के हळू हळू गळ्यावर स्थिरावली. चयनिकाला काही कळायच्या आत रफीकच्या हातांची पकड तिच्या गळ्यावर घट्ट झाली. चयनिकाचे ओठ नकळत चावले गेले, डोळे मोठे होत गेले....आणि काही क्षणांतच चयनिकाचे श्वास थांबले. सगळं शांत शांत झालं.

आता डॉक्टर रफीकच्या थंड जिहादी डोक्यात "बॉडी"ला हॉटेलच्या बाहेर कसं न्यावं याचा विचार सुरु झाला. एक सोयीस्कर उपाय सुचायला त्याला फार वेळ लागला नाही. जवळच्या बेस्तूपूर बाजारातून एक मोठी ट्रॉली बॅग विकत घेऊन त्यात चयनिकाचं अचेतन शरीर एक एक घडी करुन कोंबलं आणि रफीक तितक्याच थंडपणे हॉटेलमधून बाहेर पडला, रिक्षा मागवली आणि बॅग रिक्षात टाकून टाटानगर रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाला.

टाटानगर रेल्वे स्टेशनवर श्री अरुण कुमार यांची एकुलती एक तरूण मुलगी चयनिका कुमारी एका बेवारशी बॅगेत बेवारशी प्रेत बनून पडली होती.

#LoveJihad #लव्ह_जिहाद

बातमी:
Page 11 of ePaper
http://epaper.jagran.com/epaper/05-nov-2017-139-edition-Dhanbad-City-Page-1.html#

विशेष धन्यवाद: Kinkar Pandey

Thursday, September 21, 2017

दारात भारताच्या गर्दी अलोट आहे

आदेश हा किताबी संदेश आसमानी
दारात भारताच्या गर्दी अलोट आहे

शतके सहिष्णुता ही पोसून सोसली मी
अब्रू जमीन सारी गमवून आज आहे

एका अलिबाबाचे झाले चव्वे-चाळीस
प्रत्येक चोर पुन्हा राहतो गर्भार आहे

डाव्यांस खाज आज सुटली साम्यवादी
मोजून दाम घेतो विकत पत्रकार आहे

यात्रेस जावयाला भरतो आजही जिझिया
पाहुण्यांस आज माझ्या मी देतो भाडे आहे

आश्रयास कुणी अतिथी म्हणूनि आला
घर, भूमी, आणि कन्या मागून आज आहे

जन्मास शिवाजी ते यावे पण शेजारी
वृत्तीच आत्मघाती ठरणार आज आहे

उत्तिष्ठ आज कृष्ण म्हणतो उच्चारवाने
हाती खडग घेता तरणार पार्थ आहे

तस्मात सज्ज सारे देशरक्षणास व्हा रे
अन्यथा आज सारे होणार भस्म आहे

© मंदार दिलीप जोशी
अश्विन शु. १, शके १९३९

Tuesday, September 12, 2017

लाल सलामवाले लोकहो

(अ)प्रिय लाल सलामवाले लोकहो,

तुमचा कन्हैय्याकुमार म्हणाला की माझ्या सख्ख्या बहिणीने भगव्या रंगाचे कपडे घातले तर मी तिचे कपडे फाडेन.

आमचा कन्हैय्या मानलेल्या बहिणीची वस्त्र फेडली जात असताना तिची अब्रू झाकायला तिच्या मदतीला धावून येतो.

हाच फरक आहे तुमच्या आणि आमच्या कन्हैय्यात.

सोळा हजार बायकांवरुन सोशल मिडीयावर फालतू पोस्टी फिरवणं सोपं आहे, समाजात मानाने वावरता यावं म्हणून इतक्या स्त्रियांना नवरा म्हणून स्वत:चं नाव देणारा भगवान श्रीकृष्ण होणं अशक्य.

तेव्हा तुमच्या लाल चड्डीत रहा. राम, कृष्ण वगैरे झेपायचे नाहीत तुम्हाला.

©️ मंदार दिलीप जोशी

Wednesday, September 6, 2017

मोबाईल, बायको, पर्स, आणि आपण

मनुष्यास स्थितप्रज्ञ या पातळी पर्यंत पोहोचायचे असल्यास दोनच मार्ग उपलब्ध आहेत.

एक साड्यांच्या दुकानात सेल्समनची नोकरी करावी आणि दुसरा म्हणजे आठवड्यातून एकदा बायकोच्या किंवा आईच्या ज्या पर्समधे मोबाईल वाजतोय त्याच पर्समधून फोन वाजायचा थांबायच्या आत काढून पलिकडच्या माणसाला हेलो म्हणून दाखवण्याचा सराव करावा.

साड्यांच्या दुकानात सेल्समन होणे अवघड वाटत असल्यास दुसर्‍या पर्यायाचे अवलोकन करा.

मोबाईल फोन हा घरी असताना पर्समधे का ठेवला जातो हे मला न उमगलेलं कोडं आहे. आणि ठेवला तर ठेवला तो नवरे लोकांना का काढायला सांगतात हे दुसरं कोडं.

आधीच पर्समधे इतक्या वस्तू असतात की फोन वाजला की आकाशवाणी झाल्यासारखा अष्टदिशांनी आवाज येतोय असं वाटत राहतं. मग आपण घराच्या आकारमानानुसार स्वयंपाकघर, दिवाणखाना, बेडरूम, इतकंच काय बाथरूम सुद्धा फिरून येतो. नेमका कुठल्या पर्समधे फोन ठेवलाय हे आठवलं आणि मोबाईल शोधायला पर्स उघडली तर त्यातल्या पिना, पेन्सिली, एक बॉलपेन, एक मार्कर पेन, एक शाळेच्या काळापासून जपलेलं शाईचं पेन, लिप बाम, पेन बाम, खडू, मुलांचे क्रेयॉन, आपण मोबाईल शोधायला आत हात घालताच बोटांचा कचकावून चावा घेत मिटणार्‍या केसांच्या जादुई क्लिपा, टोकदार कानातली, गळ्यातले साधे, मोत्याचे, अमेरिकन असे वगैरे किमान चार पाच प्रकारची गळ्यातली, शँपूची पाकिटं, घरापासून किमान १० किलोमीटरवर असणार्‍या लेडीज टेलरच्या दोन अश्मयुगीन पावत्या, आधी हात आणि मग बेसावध राहिल्यास आपलंच तोंड काळं करणारी काजळाची कांडी, पॉकेट श्रीमद्भगवतगीता (बेटा, तुम्हारा इस पर्स में क्या है? जो था वो कल नहीं रहेगा, जो नहीं था वो कैसे मिलेगा, वगैरे), स्क्रू ड्रायव्हर (हो, हा पण निघाला होता एकदा. कशाला काय विचारता? नवर्‍याचे स्क्रू टाईत करायला ख्या ख्या ख्या), आणि आपण पर्समधे हात घातलाय की मुंग्यांच्या वारुळात असा प्रश्न डावा अशा वस्तू म्हणजे सुटे मोती, वावडिंग, बॉल बेअरिंग, वेलची, लवंगा इत्यादी वस्तूंचे अडथळे पार करुन मोबाईल पर्यंत पोहोचेपर्यंत तो वाजायचा बंद झालेला असतो.

ह्या, त्यात काय, कोणाचा आहे ते पाहून परत फोन करु असं आपण म्हणतो आणि कॉल हिस्टरीत जातो. नेमका तो नंबर साठवलेला नसतो. मग बायको, "काय हो, तुम्हाला इतकं नाही जमत!" असं म्हणत हातातून मोबाईल घेते आणि त्या नंबरला बिंधास्त फोन लावते. तो नेमका तिच्या बालमैत्रिणीने घेतलेला नवा नंबर असतो. "बघा, इतक्या वर्षांनी केलाय पमीने फोन, मी लावला नसता तर आणखी किती काळाने तिने केला असता कोण जाणे" असं आपल्याला पुन्हा ऐकावं लागतं.

नेमका अशा वेळी आपला फोन वाजतो आणि पलिकडे बायकोची सासू किंवा आपली सासू यांच्यापैकी एक जण असते. आपल्याला मोबाईल तिसरा हात असल्यासारखा जवळ ठेवायची सवय असल्याने उचलावाच लागतो आणि बायकोच्या बालमैत्रिणीशी (तिच्या - आपलं नशीब कुठलं इतकं चांगलं? - तिच्या) गप्पा संपेपर्यंत आपल्या फोनवर पलिकडे आपली सासू असल्यास "तुमची मुलगी कित्ती दमते हो कश्शा कश्शाला म्हणून वेळ नसतो तिला" अशी कौतुकं सांगत आणि बायकोची सासू असल्यास पटकन विषय बदलत "अगं आई आज मन्याने काय कमाल केली माहित्ये शाळेत" या ट्रॅकवर गाडी नेत काही वेळ काढावा लागतो. सुमारे असंख्य मिनीटांनी बालमैत्रिणीशी बोलून झाल्यावर बायको फोन ठेवते आणि आपली सासू असल्यास, "अहो काय हे, आधी नाही का सांगायचं आईचा फोन होता. काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल म्हणून इतका वेळ थांबली ती! आता तिची औषधांची वेळ आहे, उचलेल की नाही कोण जाणे फोन, काय बरं काम असेल?!" असं म्हणत फोन लावते आणि तिची सासू असल्यास, "दमले बाई, उद्या सकाळी लगेच करते फोन, आता झोपल्याही असतील सासूबाई" असं म्हणत सुस्करा सोडते.

स्थितप्रज्ञ होण्याकरता साड्यांच्या दुकानात सेल्समन होणे त्यापेक्षा सोपं वाटू लागतं.

-----------------------------------------------------------------
या लिखाणाचा कुठल्याही शहाण्या, अर्धवट, किंवा ठार वेड्या अशा मानसिक स्थिती असलेल्या व्यक्तींशी; जिवंत, अर्धमेल्या, किंवा मृत व्यक्तींशी; आणि त्यांच्या स्थान, भाषा, शिक्षण, आणि व्यवसाय वगैरेंशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
-----------------------------------------------------------------

© मंदार दिलीप जोशी

Monday, September 4, 2017

गावांतील देवळांचे महत्त्व

प्रत्येक गावात एक तरी प्रमुख देऊळ असावं आणि त्यातल्या देवतेचा एक तरी मोठा उत्सव असावा. आणि जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी दरवर्षी उत्सवाला हजेरी लावणारे ग्रामस्थ असावेत. नाही, हे निव्वळ स्वप्नरंजन नव्हे. ज्या गावांत असं एखादं तरी प्रमुख देऊळ असतं आणि त्याचा असा उत्सव असतो त्या गावाला शहरांकडे वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतरानंतरही तग धरुन राहणे सोपे जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे स्थानिक देवतेच्या वास्तव्यामुळे, तिच्या होणाऱ्या पूजाअर्चनेमुळे, एकत्र जमण्यामुळे लोकांची गावाशी नाळ जोडलेली राहते. म्हणूनच ग्रामीण भागात मंदिरे ही आजही लोकांना एकमेकांशी व स्थानिक संस्कृतीशी, आपल्या मातीशी (our roots) जोडून राहण्याची प्रेरणा देतात. भारतात काही ठिकाणी तर शैक्षणिक व खेळात जिंकलेली पदके व चषक मंदिरात ठेवलेले दिसून येतात. कारण उत्तुंग यश मिळवल्यावर ते ग्रामदेवतेच्या चरणी अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी जपली गेलेली आहे.

ग्रामदेवता या जन्ममृत्यू, पूर, दुष्काळ, शेतीतले अपयश, एखादी दुर्घटना इत्यादी स्थानिक समस्यांबाबत ग्रामस्थांची काळजी घेणार्‍या एका प्रकारे हिंदू देवतांच्या स्थानिक प्रतिनिधी असतात. माणसाने एक वेळ चारधाम यात्रा आयुष्यातून एकदाच करावी पण आपल्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला वर्षातून एकदा तरी जावेच. अशा प्रकारच्या स्थानिक देवता या शहरात अभावानेच आढळून येतात. म्हणूनच अर्थार्जन इत्यादी कारणांसाठी आपल्या गावातून स्थलांतरित झालेल्यांनी, शक्य झाल्यास सहकुटुंब, वर्षातून किमान एकदा तरी गावी जाऊन आपल्या ग्रामदेवेतेची पूजा करावी व उत्सवाला हजेरी लावावी. गावातली मंदिरे ही साधी असली तरी त्यांचा प्रभाव थोर असतो हे वैय्यक्तिक अनुभूतीवरुन सांगू शकतो. वर्षातून एकदा जरी गावी गेलं तरी आपल्याला तिथल्या समस्या कळू शकतात. हा उद्देशही मनात असू द्यावा व दरवर्षी आपली उपस्थिती नोंदवून यथाशक्ति यथामति आपली सेवा देवतेच्या चरणी रुजू करावी व तिथल्या परंपरा जपण्यास मदत करावी.

असं म्हणतात की राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर लवकरच श्री अजित डोबाल यांनी आपल्या जवळ जवळ ओस पडलेल्या गावी जाऊन आपल्या ग्रामदेवतेचे दर्शन व आशीर्वाद घेतले होते. आता इतका व्यग्र माणूस हे करु शकतो, तर आपण का नाही? इच्छा ठेवा, मार्ग दिसेलच.

© मंदार दिलीप जोशी

Thursday, July 6, 2017

चुळचुळ मुंगळा, एकसुरीपणा, एकाग्रता आणि मन:स्वास्थ्य

[काही दिवसांपूर्वी आनंद राजाध्यक्ष यांनी हिंदीत एक लेख टाकला होता. मोनोटोनी किंवा एकसुरीपणा याबद्दल ती पोस्ट होती. ती टाकली असती तर लगेच मराठीत पण लिही अशी मागणी झाली असती म्हणून मराठी करुन टाकतो आहे. ती पोस्ट आज आठवण्याचे कारण म्हणजे वैद्य परीक्षित शेवडे यांनी आज एका फिजेट स्पिनर नामक खेळण्यावर लिहीलेली पोस्ट. या दोन्ही लेखांतला संबंध लक्षात आला आणि डोक्यात असंख्य दिवे पेटले. दोन्ही लेखांची सांगड घालून लिहीण्याचा हा प्रयत्न आहे. या लेखाचे श्रेय संपूर्णपणे वरील दोघांना आहे. माझं श्रेय असेल तर सूर्याचा प्रकाश पृथ्वीकडे परावर्तित करणार्‍या चंद्राला जातं तेवढंच.]

Sunday, July 2, 2017

सलाम

(मंगेश पाडगावकरांची माफी न मागता )

सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात चॅनल त्याला सलाम,
पगाराच्या भयाने
डाव्या हातात माईकचं बोंडुक घेऊन
उजव्या हाताने सलाम,
बघणाऱ्याला सलाम,
न बघणाऱ्याला सलाम,
विकत घेणाऱ्याला सलाम,
विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला लाल सलाम,
सलाम, भाई, सबको सलाम.

चादर घातलेल्या प्रत्येल थडग्याला सलाम,
डिवायडर पीराला सलाम
देवळांना फोडून बांधलेल्या मशिदींना सलाम,
मशादीतल्या मौलवींच्याच्या धाकाला सलाम,
मशिदीतून, लाउडस्पीकरवरुन
बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्याला सलाम,
परवरदिगार आणि त्याच्या मजहबचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम,
रिकाम्या गर्भाशयात जीव भरण्यासाठी
निष्पाप मोहतरमाला नासवणाऱ्या बंगालीबाबाला  सलाम
चाँदला सलाम
बकऱ्याला सलाम,
दहशतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम,
अम्मीच्या उरावर दुसरी अम्मी बसवणाऱ्या अब्बाला सलाम,
दुसऱ्या अम्मीला टरकावणाऱ्या तिसऱ्या अम्मीला सलाम,
सलाम, प्यारे भाईयों और बेहेनों,
सबको सलाम.

ज्याच्या हातात कोयता
त्याला सलाम,
ज्याच्या गळ्यात क्रूस
त्यालाही सलाम,
चर्चच्या पादऱ्यांना सलाम,
त्यांची वेसण धरणाऱ्या
व्हॅटिकनला सलाम,
ज्याच्या सेवेला नन त्याला सलाम,
तिला भोगणाऱ्या फादरला सलाम
तिचा गर्भपात करतो
त्यालाही सलाम
क्रिसमस आणि व्हॅलेन्टाइनच्या गर्दीला सलाम,
ती गर्दी झुलवणाऱ्या
जादूगारांना लाल सलाम,
भाईयों और बेहेनों सबको सलाम.

नाक्यावरच्या अनधिकृत चिकनशॉपला सलाम
शेजारच्या इल्लीगल गॅरेजला सलाम
ते चालवत वखवखलेल्या नजरेने सावज शोधणार्‍या वाहिदला सलाम
सोनं म्हणून आरडीएक्स स्मगल करणार्‍याला सलाम
ते वापरून बनवलेले बाँब ठेवणार्‍यांना सलाम
स्फोट झाल्यावर जिहादी जल्लोष करणार्‍यांना सलाम
त्यांना पकडू पाहणार्‍या पोलीसांना सलाम
त्यांचे ट्रक न तपासता जाऊ देणार्‍यांनाही सलाम
टायगर मेमनला सलाम,
त्याला श्रद्धांजली वाहणार्‍या
कुबेरांनाही सलाम,
लोकसत्तालाबी सलाम,
सकाळलाही सलाम,
काँग्रेसला बुडवणार्‍या राहुल गांधींना सलाम,
गांधींखाली चिरडलेल्या
प्रणवदांना, नरसिंह रावांना सलाम,
ज्याच्या हातात विळा हातोडा त्याला सलाम,
सैनिकांना बलात्कारी म्हणणार्‍यांना सलाम,
भारत तेरे टुकडे होंगे म्हणणार्‍यांना ,
कन्हैया कुमारला सलाम,
कविता कृष्णनला सलाम;
आनंद पटवर्धननांना सलाम,
कबीर कला मंचला सलाम,
निरपराध मुलांना बायकांना मारणार्‍या नक्षलवाद्यांना सलाम,
मौत सस्ती करणाऱ्या सर्वांना लाल सलाम,
सलाम, प्यारे दोस्तों, सबको सलाम.

फिल्म इन्स्टिट्युटला सलाम
त्यातल्या मध्यमवयीन विद्यार्थ्यांना सलाम,
काहीही त्रास नसलेल्यांना सलाम
पण सतत तुम्हाला कसलातरी त्रास आहे असं
पटवणार्‍या कॉम्रेडांना सलाम
गोळी घालणार्‍यांना सलाम
ती घालण्याच्या आदेश देणार्‍यांना सलाम
कॅपिटालिस्ट मालकांना सलाम
कम्युनिस्ट कामगार नेत्यांना सलाम
दिवाळी बोनसला सलाम
संपाला सलाम
उपासमारीला सलाम
युनियनच्या लिडरला सलाम,
संपात बरबाद झालेल्या कामगाराला सलाम
त्याच्या पिचलेल्या बायकोला सलाम
दीड खोलीत अभ्यास करणार्‍या
एकच गणवेश आठवडाभर वापरणार्‍या
त्यांच्या पोरांना सलाम
चीनला सलाम
सोवियत रशियाला सलाम
लाल झेंड्याला सलाम
सलाम, लाल सलाम
सलाम, भाईयों और बेहेनों, सबको सलाम.

या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
याच देशात राहून त्याचे टुकडे करण्याच्या घोषणा देणार्‍यांना सलाम
गायीचं मांस खाणार्‍यांना सलाम
तिला रस्त्यावर कापणार्‍यांना सलाम
आमचा धर्म शांततेचा या सर्व बिलंदर घोषणांना सलाम,
हिंदूद्वेष्ट्या उकिरड्यांना सलाम,
या उकिउरडयांतून मजहबचं पीक काढणाऱ्यांना सलाम,
टोपी आणि बुरख्याला सलाम,
पंक्चरवाल्या मियाँला सलाम,
त्यांच्या शेकडो लौढ्यांना सलाम,
निवडणुकांना सलाम,
निवडणुक प्रचाराला सलाम,
निवडणुकांवर डोळा ठेऊन झालेल्या
निरनिराळ्या वांझोट्या आंदोलनांना ,
विद्यार्थी चळवळीला सलाम
नॉट इन माय नेमला सलाम
आद्य चळवळ बामण हटावला सलाम
लाल झेंडा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम,
या सर्व अत्याचार करणाऱ्यांना सलाम,
या बातम्या वाचणाऱ्या सर्व षंढांना लाल सलाम,
सलाम, भाईयों और भैनों, सबको सलाम.

वरपासून खालपर्यंत आरक्षणाचा देश म्हटले
तर डोके फोडतील ,
भत्ताखाऊ फुकट्यांचा देश म्हटले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदले जाणाऱ्या पत्रकारांचा देश म्हटले
तर मोर्चे काढतील,
दगडाला देव आणि गायीला माता म्हटलं
तर हिंदू दहशतवादी म्हणून दम देतील
मोर्चात जातो म्हटले
तर नोकरीवरून काढतील;
म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या माझ्या
शेख्युलर हिरव्या देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.
लाल सलाम
प्यारे भाईयों और बेहेनों, सबको सलाम,

अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिन माफ़ करना भाईयों,
हात तर दोनच
आणि त्यातला उजवा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त
डाव्या हाताने सलाम,
सलाम, सबको लाल सलाम
भाईयों और बेहेनों, सबको सलाम.

© मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. ८, शके १९३९

Tuesday, June 20, 2017

राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि विरोधकांची चिडचिड

सतत तुम्ही हजारो वर्षांपासून गुलाम आहात असं एखाद्या किंवा जमल्यास अनेक समाजांच्या मनावर पिढ्यानपिढ्या बिंबवणे, आणि मग तदनुषंगाने तुम्ही त्या तथाकथित गुलामीतून बाहेर आलं पाहीजे असं पटवून देत राहणे, आणि मग त्या तथाकथित गुलामीतून बाहेर येण्यासाठी सातत्याने एक काल्पनिक शत्रू उभा करुन उदा. एखाद्या समाजाला लक्ष्य करुन - आधी वैचारिक आणि मग सामरिक बंडासाठी प्रवृत्त करणे हा डाव्या/साम्यवादी/नक्षलवादी मानसिकतेच्या लोकांचा प्रयत्न असतो. मग ज्या समाजाला गुलाम म्हणायचं तो समाज किंवा व्यक्ती किती कौशल्यविकसित, उच्चशिक्षित, आणि समृद्धीच्या दिशेने अग्रेसर असलेली का असेना !

काल राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एन.डी.ए.) च्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवाराच्या नावाची घोषणा होताच ज्या प्रकारे विरोधी पक्ष, डाव्या/साम्यवादी/नक्षलवादी आणि त्यांचे समर्थक, आणि विकला गेलेला मिडिया आणि त्यांचे सोशल मिडीयावर पडीक असणारे तट्टू यांची निराशा आणि त्यापासून उत्पन्न झालेली तडफड दिसते आहे ती या भीतीपोटी की आता जगाला संघ काय चीज आहे ते समजेल. आता ही गोष्ट समजणे काही रॉकेट सायन्स नव्हे की भाजपला सर्वसहमतीसाठी एका दलित उमेदवाराची गरज होती, तसेच तो उमेदवार उच्चशिक्षित, राजकारणाचा अनुभव असलेला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संघाच्या विचारसरणीचा हवा होता.

श्री रामनाथ कोविंदजी या सगळ्या निकषात अगदी व्यवस्थित बसतात. ते दलित तर आहेतच, शिवाय ते एका गरीब शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात ते १६ वर्ष वकील होते, आय.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण आहेत, काही शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनात ते होते, आणि संयुक्त राष्ट्रसंघात भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा व संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेपुढे भाषण करण्याचाही त्यांना अनुभव आहे. संघातून आल्यामुळे त्यांना सामाजिक कार्याची आवड आणि अनुभव आहे हे वेगळं सांगायला नकोच. शिवाय सद्ध्या ते काही वर्ष बिहारचे राज्यपाल आहेत. चाराखाऊ लालूंचे चिरंजीव तेजप्रताप यादव यांनी शपथ घेताना "अपेक्षित" ऐवजी "उपेक्षित" असा उच्चार केल्यामुळे ज्यांनी सगळी शपथ परत घ्यायला लावली होती, ते हेच श्री रामनाथ कोविंद.

उपरोक्त विरोधकांना ही गोष्ट मात्र केल्या पचत नाही आहे की अशी व्यक्ती एक संघी आहे. संघी या शब्द मुद्दामून वापरला आहे कारण आजकाल  संघाच्या अंधविरोधकांचा हा आवडता शब्द आहे. आता ही गोष्ट संघाच्या समर्थकांनाच नव्हे तर विरोधकांनाही ठावूक आहे की संघात कुणी कुणाला जात विचारत नाही, आणि एकत्र संघ शाखेत जाणार्‍यांमधे जातीला काहीच महत्व दिलं जात नाही. इतकंच नव्हे तर अनेक विजातीय संघ कार्यकर्त्यांमधे आपापसात निव्वळ रोटीच नव्हे तर बेटी व्यवहार देखील आहेत.

हे माहीत असून काही अंशी अज्ञानापोटी आणि बहुतांशी हेतूपुरस्सर संघाची सातत्याने ब्राह्मणांची आणि उच्चवर्णीयांची संघटना अशी प्रतिमा तयार करण्यात आणि संघकार्याशी अपरिचित जनमानसावर बिंबवण्यात आजवर या अंधविरोधकांनी कुठलीच कसर बाकी ठेवली नव्हती. या दुष्प्रचाराला पहिला धक्का बसला कुठल्याही तथाकथित उच्च जातीशी संबंध नसलेले श्री नरेन्द्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा. पण मोदींना विरोध करायला त्यांच्याकडे अन्य मुद्दे होते. त्यांच्या दुर्दैवाने श्री रामनाथ कोविंदांच्या बाबतीत त्यांना असं काहीच करता येत नाही.

विरोधकांचं खरं दु:ख हे आहे की राष्ट्रपतीपदाचा या वेळचा उमेदवार हा दलित, उच्चशिक्षित, अनुभवी, आणि संघी असे सगळे असल्याकारणाने संघ आणि भाजपच्या चारित्रहननाकरता त्यांना जात हा मुद्दा उकरून काढता येणार नाही. मिडियाची जी तडफड सगळीकडे बघायला मिळते आहे ती या कारणाने की आता संघ आणि भाजप हे दलितविरोधी ही प्रतिमा निर्माण करताना ज्या खोट्या बुद्धीभेदी कथांचा पूर आणला जायचा तो आणण्यात ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत. आता ही गोष्ट जगासमोर वारंवार येणार की भारतवर्षाचा राष्ट्रपती हा दलित तर आहेच पण तो संघी सुद्धा आहे. अर्थात, ही गोष्ट अखिल विश्वापुढे उघड होईल की संघ जातीयवादी तर नाहीच, पण या उलट संघ प्रत्येक जातीला राजकारणात उच्च स्थान मिळवून देशसेवा करण्यासाठी समान संधी उपलब्ध करुन देतो.

मिडियामधे जी तडफड दिसते आहे त्याने प्रत्येक राष्ट्रवादी भारतीयाला गुदगुल्या नक्की होत असणार. मलाही होत आहेत यात आश्चर्य ते काय?! लोग मजा बघत आहेत, तुम्हीही बघा.

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।

समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

।। भारत माता की जय ।।

|| वंदे मातरम् ||

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. १०, शके १९३९ | योगिनी एकादशी

राष्ट्रपतीपद का चुनाव एवं विरोधियों की तिलमिलाहट

ज्ञान न पूछो वामी का, पूछ लीजिये जात।
दलित क्यों नहीं पॉलिटब्यूरो में, पूछो मार के लात !

हमेशा आपको आप हजारों सालों से गुलाम (दास) हैं यह कुछ समाजोंघटकों के  मन पर पीढी दर पीढी बिंबित करते रहना, फिर उस संदर्भ में आपको इस तथाकथित दास्यत्व से बाहर आना आवश्यक है यह बार बार समझाना, एवं उस पश्चात आपको इस तथाकथित दास्यत्व से बाहर निकालने हेतू सातत्यपूर्ण ढंग से एक काल्पनिक शत्रू को आपके सामने खडा करना, उदाहरण किसी एक समाज को लक्षय करके - प्रथमत: वैचारिक और उस पश्चात सामरिक विद्रोह के लिये आपको प्रवृत्त करना यह वामपंथी/साम्यवादी/नक्षलवादी मानसिकता के लोगों का प्रयत्न रहा है. फिर जिन्हें ये गुलाम बतलाने इच्छुक हैं वो समाज अथवा व्यक्ती कितना भी कौशल्यविकसित, उच्चशिक्षाप्राप्त, एवं समृद्धी की ओर अग्रेसर क्यों न हो!

कल राष्ट्रीय लोकतंत्र मोर्चा (एन.डी.ए.) के राष्ट्रपतीपद के प्रत्याशी के नाम की घोषणा होते ही जो विरोधक, वामपंथी/साम्यवादी/नक्षलवादी एवं उनके समर्थक, तथा बिकाऊ मिडीया एवं उनके सोशल मिडीया पर पडे खच्चरों की निराशा से उत्पन्न बैचैनी और विषवमन दृग्गोचर हो रहा है वह इस बात पर है की अब सारे दुनिया को पता चल जाएगा कि संघ है क्या. यह बात कोई रोकॅट साईन्स तो नहीं थी कि भारतीय जनता पक्ष सर्वसहमती के हेतू एक दलित, उच्चशिक्षित, राजनीतीका अनुभवी, एवं संघ की विचारधारा रखने वाला कोई प्रत्याशी की खोज कर रही थी.

श्री रामनाथ कोविंदजी इन सारे निकषों में खरे उतरते हैं. वे दलित हैं, इतना ही नहीं वे गरीब किसान कुटुंब से आते हैं, दिल्ली उच्च न्यायालय एवं सर्वोच्च न्यायालय में वे १६ वर्ष वकील थे, आय.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण हैं, कुछ शैक्षणीक संस्थाओं के व्यवस्थापक भी रहें हैं, केवल इतना ही नहीं उन्हे संयुक्त राष्ट्रसंघ में भारत का प्रतिनिधित्व करने का एवं  संयुक्त राष्ट्रसंघके आमसभा को संबोधित करनेका भी अनुभव प्राप्त है. संघी है तो पृथक बताना आवश्यक नहीं कि उन्हें सामाजिक कार्य में रुचि है अपितु अनुभव भी प्राप्त है. अब कुछ वर्षों से वे बिहार के राज्यपाल हैं. हां, यह वहीं है, जिन्होनें "अपेक्षित" के स्थान पर "उपेक्षित" कहने पर तेजस्वी यादव को पूरी शपथ पुन: पढने का आदेश दिया था.

परंतु उपरोक्त विरोधकों को यह बात पच नहीं रही की ऐसा व्यक्ती एक संघी है. हेतूपूर्वक इस शब्द का प्रयोग किया है क्योंकी बिकाऊ पत्रकारों को और संघ के अंधविरोधकों को इस शब्द का उपयोग करने के अभ्यस्त हैं. ये संघ के समर्थक ही नहीं अपितु संघ विरोधकों को भी ज्ञात है कि संघ मे किसी की जाति पूछी तक नहीं जाती, एवं नहीं साथ साथ संघ शाखा में जाने वाले लोगों मे जाती कोई महत्व नहीं रखती. इतना ही नहीं अनेक विजातीय संघ कार्यकर्ताओं के आपस में केवल रोटी ही नही बेटी व्यवहार भी हैं.

आज तक संघ को सातत्य से ब्राह्मणो एवं उच्च जातीयों के संगठन  के रूप में संघकार्य से अपरिचित जनमानस के मन पर बिंबित करने में इन अंधविरोधकों नें कोई कसर नहीं छोडी थी. इसको पहली चोंट तब पहुंची जब श्री नरेन्द्र मोदी जो किसी तथाकथित उच्च जाती से संबंध नहीं रखते वे प्रधानमंत्री बने. परंतु उनका विरोध करने के हेतू विरोधकों के पास अन्य विषय थे.  श्री रामनाथ कोविंदजी के विषय में ऐसा कुछ भी नहीं है.

विरोधीयों का दु:ख यह है कि इस बार राष्ट्रपतीपद के प्रत्याशी के दलित एवं संघी होने के कारण अब संघ एवं भारतीय जनता पक्ष के चारित्र्यहनन के लिये उनको जाती का आधार कैसे मिलेगा? मिडीयाकी जो तिलमिलाहट दृग्गोचर हो रही है, वह इस हेतू है की सालों पुराने संघ एवं भाजपा के दलितविरोधी होने की कहानियों की बाढ लाने मे वे इस बार पूरी तरह से असफल रहे हैं. अब यह बात विश्व के सामने बार बार आयेगी की भारतवर्ष का राष्ट्रपती दलित है एवं संघी भी है. अर्थात, यह बात विश्व को दृग्गोचर होगी की संघ जातीवादी तो है ही नही, अपितु संघ हर जाती के लोगों को राजनीती में उच्च स्थान प्राप्त कर देशसेवा करने हेतु समान अवसर प्राप्त कराता है.

मिडिया की इस छटपटाहट से हर राष्ट्रवादी भारतीय को गुदगुदी तो अवश्य हो रही है. मुझे भी होना आश्चर्य की बात नहीं. आप भी मजे लिजीये.

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।

महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।

समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

।। भारत माता की जय ।।

|| वंदे मातरम् ||

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. १०, शके १९३९ | योगिनी एकादशी

Wednesday, June 14, 2017

बालादपि सुभाषितम् ग्राह्यं आणि हाताला लागेल ते हत्यार

विषादप्यमृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम् ।
अमित्रादपि सद्वृत्तममेध्यादपि काञ्चनम् ॥

या श्लोकातील बालादपि सुभाषितम् ग्राह्यं हा भाग महत्त्वाचा आहे. याचा ढोबळ अर्थ लहान मुलांकडूनही अनेकदा आपल्याला काहीतरी महत्त्वाचं शिकता येतं. शाळा सुरू होण्याचे हे दिवस आहेत. आजच मुलांच्या पालकसभेला जाऊन आलो आणि शाळेत बाईंनी मुलांची आगाऊच केलेली एक तक्रार ऐकून डोक्यात लख्ख प्रकाश पडला. शाळेत मुलं मारामार्‍या करतात अशी ती तक्रार होती. वर्ष सुरू होत आहे, तेव्हा तुमच्या मुलांना आत्ताच समजावून सांगा असं त्यांचं म्हणणं होतं. इतर सूचनांमधे स्टीलची पट्टी मुलांना शाळेत देऊ नका, लाकडी द्या, कारण, मारामारी करताना मुलं अक्षरशः हाताला लागेल ती वस्तू फेकून मारतात. त्यात निरुपद्रवी खोडरबरापासून टोकदार पेन्सिली, तीर्थरूपांची हळूच ढापलेली पेनं, पट्टी, प्लॅस्टीक आणि स्टीलचे जेवणाचे डब्बे या सगळ्या वस्तू आल्या. आता आजकालची मुलं अधिक आक्रमक किंवा हिंसक होत आहेत हा मुद्दा जरा बाजूला ठेवूया. पण आपणही कधीतरी त्यांच्या वयाचे होतोच. समोरच्या मुलाने आपल्याला मारल्यावर हाताला लागेल ती वस्तू फेकून मारण्याची लहान मुलांकडे किंवा लहानपणी असलेली कल्पकता मोठेपणी कुठे जाते? मोठं झाल्यावर आपला मेंदू इतका गोठल्यासारखा का होतो? मी हे काय बोलतो आहे कळत नाही आहे ना? सांगतो.

केरळ आणि बंगालमधे हिंदूंची काय स्थिती आहे तुम्हाला वेगळं सांगायला नको, ते सगळं बातम्या आणि सोशल मिडीयामार्फत जगजाहीर झालेलं आहे. उत्तर प्रदेश, बिहार, आणि अगदी महाराष्ट्रात सुद्धा जिथे जिथे शांतीदूतांचा प्रादुर्भाव आहे तिथे तिथे हिंदूविरोधी हिंसा होतेच. या सगळ्या बातम्यांत एका गोष्टीकडे आपलं लक्ष जायला हवं. "घरात घुसून घरातल्यांच्या समोर अमक्याला मारलं किंवा तमक्याचा खून केला". मग प्रश्न असा आहे की त्यावेळी घरातले काय करत होते? याचं उत्तर अशा बातम्यांत "घरातल्यानी हल्लेखोरांकडे खूप गयावया केली", "जो मारला जात होता त्याच्या जीवासाठी हल्लेखोरांकडे भीक मागितली", "रडारड केली" या घरातल्यांच्या तत्कालीन प्रतिक्रिया अत्यंत पराभूत मानसिकतेच्या निदर्शक आहेत.

अरे! याला काही अर्थ? मान्य आहे, घरात परवान्याशिवाय हत्यारं ठेवायला परवानगी नाही. मात्र घरात स्वयंपाकघराची उपकरणं ठेवायला अजून तरी बंदी आलेली नाही. गरम पातेलं उचलायला चिमटा वापरत असालच. मारा फेकून. काही घरांत हातानी कुटलं जात असल्यास मिनी खलबत्ताही असेल. अगदी बाकी काही नाही तरी भाजी कापायची सुरी तरी असेलच. मांसाहारी असाल तर मासे किंवा मटण कापायची सुरी असेल तर आणखी उत्तम. उचला आणि जोरदार प्रतिहल्ला करा. आपल्याकडे एक म्हण आहे, "भित्यापाठी ब्रह्मराक्षस". घरातल्या कर्त्या पुरुषावर हल्ला झाल्यावर तुम्ही रडारड केलीत, हल्लेखोरांकडे त्याच्या प्राणांची भीक मागितलीत तरी तुम्ही काही सत्यवानाची सावित्री नव्हे आणि हल्लेखोर हे यमराज त्याहून नव्हेत. त्यामुळे या रडण्याभेकण्याचा काहीही परिणाम होणार नाही. झालाच, तर हल्लेखोर स्वतःच्या कृत्यावर खूष होण्याचीच शक्यता जास्त. कारण घरातला कर्ता पुरुष मारला जात असताना / गेल्यावर घरात जो हलकल्लोळ माजतो, त्याचा उपयोग इतरांवर दहशत बसवण्यासाठी त्यांना होत असतो. त्यामुळे त्यांना ब्रह्मराक्षस होण्याची संधी न देता हाताला लागेल ती वस्तू हत्यार समजून त्यांच्यावर फेकून मारा, किंवा ती वस्तू घेऊन त्यांच्यावर धावून जा.

लक्षात घ्या. पुन्हा म्हण सांगतो. भित्यापाठी ब्रह्मराक्षस. तुम्ही घाबरता म्हणून समोरचा तुम्हाला घाबरवतो, मारतो, हल्ला करतो.

दोन घटना सांगतो. पहिली बातमी नुकतीच वर्तमानपत्रात वाचलेली आहे, तर दुसरी पुर्वी सत्यघटनांवर आधारित दूरदर्शनवर सकस कार्यक्रम दाखवायचे त्या काळात अशाच एका कार्यक्रमात पाहिलेली गोष्ट आहे. हल्ली फक्त सांगितिक जल्लोष, तर्कहीन फालतू मालिका, आणि विमानापेक्षा जास्त लोक पॅनलवर बसवतात अशी चर्चावजा भांडणं यातून असल्या मनोरंजनाच्या चिखलातून असल्या बातम्या तुमच्या नजरेला पडल्याच तर त्या व्यक्तीचे कौतुक करण्याबरोबरच त्या व्यक्तीची कृती ही आपल्या स्मृतीपटलावर कोरून ठेवा.

एक. न घाबरणारी पन्नाशी ओलांडलेली एखादी महिला मोटारसायकलवरुन आलेल्या दोन चोरांना चोपून काढते आणि चोरी न करताच पळून जायला भाग पाडते.
दोन. स्वयंपाकघरापर्यंत घुसलेला चोर पाहून एखादी प्रसंगावधानी गृहिणी गॅसवर ठेवलल्या पातेल्यातलं उकळतं पाणी त्याच्या चेहर्‍यावर फेकून तो कळवळत असताना यशस्वीरित्या बाहेर पळ काढून गर्दी जमवते.

घरात घुसून जेव्हा हत्या होते तेव्हा प्रतिहल्ला होणार नाही या हिशेबानेच हल्ला झालेला असतो. मग तुम्हाला जो धक्का बसतो, तोच धक्का त्यांना द्यायला काय हरकत आहे? म्लेंछ क्रूर असतात, पण तितकेच भित्रेही असतात. त्यांच्यावर प्रतिहल्ला झाला, मग तो कशाने होतो याला महत्त्व नाही, आणि त्वेषाने प्रतिहल्ला झाला तर त्यांना स्वतःचं रक्त सुद्धा बघायला आवडत नाही. त्यात नको तिथे तुमचा वार बसला तर भळाभळा रक्तस्त्राव होऊन जागच्या जागी हल्लेखोर कोसळू शकतो. तुम्ही जितकी गयावया कराल, तितका त्यांना आनंद होतो. आणि मरायचंच असेल तर जीव वाचवता वाचवता मरा ना, कुत्र्याच्या मौतीने का मरता? स्वसंरक्षणार्थ प्रतिहल्ला केला आणि त्यात हल्लेखोर मेला तर प्रतिहल्ला करणार्‍याला म्हणजेच आपल्याला कायद्याचं सुद्धा संरक्षण आहे. तेव्हा तुमच्या प्रतिहल्ल्यात त्यांच्यापैकी एखादा मेला आणि त्याचा मृतदेह तुमच्या घरात सापडला तर तो तुमच्यावर त्याने तुमच्यावर प्रथम हल्ला केल्याचा एक महत्त्वाचा पुरावा होतो.

सुरवातीला लहान मुलांचं उदाहरण दिलं होतं. आता आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकलेल्या एका मोठ्या माणसांच्या गोष्टीकडे वळूया. अकबर बादशहाविषयी काहीही मत असलं तरी मठ्ठ अकबर आणि त्याला शहाणपणा शिकवणारा बिरबलाच्या गोष्टी फारच आवडत्या. तर अशाच एका गोष्टीत एकदा अकबर बादशहाच्या दरबारात 'सगळ्यात चांगले हत्यार कोणते?' याविषयी चर्चा चालू होती. अकबराचे सरदार निरनिराळे पर्याय उत्तम हत्यार म्हणून सांगत होते. कुणी म्हणे "तलवारीसारखं उत्तम हत्यार नाही." तर कुणी म्हणे की "दांडपटाही जोडीला हवाच". आणखी एक जण म्हणाला, "धनुष्य बाण उत्तम, सुरक्षित अंतरावरुन शत्रूवर हल्ला करता येतो". एकाने तर बंदुका आणि तोफांची नाव घेतलं. कुणी काही तर कुणी काही. या सगळ्या जोरदार चाललेल्या चर्चेत बिरबल मात्र गप्प होता. ते पाहून बादशहाने त्याला मुद्दाम विचारलं, "क्यों पंडित बिरबल, तुम क्या कहते हो?" बिरबलाने शांतपणे उत्तर दिलं, "जी हुजूर, खाविंदांच्या मान्यवर सरदारांनी सांगितलेली ही सगळी हत्यारं खासच आहेत, पण माझ्या मते जो ऐन वख्त पर हाथ लगे वो हथियार ही खास होता है". अकबराला हे उत्तर जरा जास्तच अनपेक्षित होतं, "नहीं बिरबल, ये बात हमें ठीक नहीं लगी. आखिर कोई एक हथियार तो सबसे खास होगा ही!"

"आप कहते हैं तो होगा जहांपनाह, लेकिन मेरी तो यही राय रहेगी". बादशहाला आणि त्याच्या इतर दरबार्‍यांना हे उत्तर जरा अगोचरपणाचं वाटलं, पण बिरबल नेहमीच अशी वेगळी उत्तरं देतो म्हणून सगळ्यांनी ते हसून सोडून दिलं.

या नंतर काही दिवसांनी अशाच एके दिवशी बिरबल त्याच्या नेहमीच्या रस्त्याने देवदर्शनाला चालला होता. देवळात जाताना त्याला एके ठिकाणी एका चिंचोळ्या गल्लीतून जावे लागत असे. आज तो ती गल्ली अर्धी ओलांडल्यावर बघतो तर काय, समोरून एक महाकाय पिसाळलेला हत्ती जो समोर येईल त्याला पायाखाली तुडवत, सोंडेनं फेकून देत धावत येत होता. आता मात्र बिरबल घाबरला. तो देवदर्शनाला निघाल्याने त्याच्याकडे काहीच हत्यार नव्हतं, ना तलवार, ना भाला, ना धनुष्यबाण. प्रत्येक क्षणी हत्ती आणि त्याच्यातलं अंतर कमी होत चाललेलं होतं. त्याने इकडेतिकडे पाहिलं....आणि त्याला जवळच एक रस्त्यावरचे उकिरडे हुंगणारं कुत्रं दिसलं. बिरबलाने निमिषभर विचार करुन त्या कुत्र्याचं तंगडं धरून ते हवेत गरागरा फिरवलं आणि हत्ती पुरेसा जवळ येताच त्याच्या दिशेने फेकून मारलं ते नेमकं त्याच्या गंडस्थळावर आदळलं! बरं आदळलं ते आदळलं वरतून ते तिथून घसरून पडू नये म्हणून आपल्या पंजे रोवून तिथे चिकटण्याचा प्रयत्न करु लागलं.

नको तिथे काहीतरी आदळल्याने आणि वर त्याच्या बोचकारण्याने हत्ती बावचळला आणि ताबडतोब पीछे मुड करुन विरूद्ध दिशेला पळत सुटला. अशा रीतीने बिरबलाने सुटकेचा निश्वास टाकला. दिल्लीतल्या भर रस्त्यात ही घटना घडल्याने बादशहाच्या कानापर्यंत जायला फार वेळ लागला नाही. तेव्हा त्याला मनोमन कबूल करावंच लागलं, "ऐन वख्त पर हाथ लगे वो हथियार ही खास होता है".

ही गोष्ट फक्त अकबराची फजितीची मजा घ्यायला आणि बिरबलाच्या बुद्धीमतेचं आणि प्रसंगावधानाचं कौतुक करायला नव्हे, तर त्यातून बोध घेण्याकरता आहे. आपल्या घरच्यांवर हल्ला झाला, तर दिसेल त्या वस्तूने प्रतिहल्ला करा. भाजी कापायची सुरीने सपासप मारत सुटा; मिसळणाच्या डब्यातलं तिखट डोळ्यात जाईल असं फेका, नाही तर आख्खा स्टीलचा डबाच फेकून मारा; पोळ्या करायचं लाटणं डोक्यात घाला; कचर्‍याची बादली फेकून मारा - पण स्वस्थ बसू नका. काही घरात किरकोळ दुरुस्तीची काही सामुग्री असते. त्यात स्क्रूड्रायव्हर, हातोडा, आणि खिळे ही सगळ्यात उपयुक्त सामुग्री आहे. आता नवीन तंत्रज्ञानामुळे भिंतीत खिळे ठोकायला हातोडा लागत नाही. त्यासाठी बंदुकीतून गोळी मारल्यासारखे खिळे भिंतीत मारता येतात अशी यंत्रे निघालेली आहेत. मी तुम्हाला पर्याय सांगतो आहे, शेवटी काय, उपलब्ध असेल आणि हाताला लागेल ते हत्यार. एकदा तुम्ही भ्यायचं सोडलंत तर ब्रह्मराक्षसाला पळवून लावणं हे फार कठीण नाही.

जाता जाता, जमलं तर सेल्युलर (Cellular) हा इंग्रजी सिनेमा बघा. आपल्यावर किंवा कुटुंबियांवर हल्ला करणार्‍या माणसाला रोखायला त्याला कुठलंतरी हत्यार घेऊन अनेकदा भोसकायला लागतं असं नाही. सिनेमातल्या नायिकेच्या घरावर काही बदमाश हल्ला करुन सगळ्यांना ओलीस ठेवतात. कथेच्या खोलात जाण्यात अर्थ नाही, पण आपल्यावर हल्ला करणार्‍या एका बदमाशाला जीवशास्त्राची शिक्षिका असलेली नायिका दंडातल्या एका धमनीच्या जागी काचेच्या तुकड्याने वार करुन कशी ठार करते, ते बघण्यासारखं आहे. हा संपुर्ण सिनेमा थरारक आहेच, पण प्रस्तुत लेखाच्या अनुषंगाने हा प्रसंग साडेत्रेपन्नाव्या (53:30) मिनीटापासून पहा.



तेव्हा, आत्मानं सततं रक्षेत - आपले सातत्याने रक्षण करा!

© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ कृ. ४, शके १९३९ 

Thursday, June 8, 2017

वामपंथी भारत विखंडन ४: चोराच्या उलट्या बोंबा आणि अर्थारोपण

समजा तुम्हाला कुणी अतिरेकी कुत्रा म्हणालं तर? तुम्हाला राग येईल ना? जो म्हणेल त्याला तुम्ही मारायला धावाल ना? कदाचित नाही. तुम्ही त्याचा प्रतिवाद कराल. काय म्हणता....तुम्ही नक्की मारायला धावून जाल??

आता पुढचा परिच्छेद वाचा. जे.एन.यु.च्या एका डाव्या विचारवंताची ही वाक्य आहेत.

"सांप्रतकाळी या देशात जी सगळ्यात मोठी फुटीरतावादी शक्ती आहे ती म्हणजे ब्राह्मणवादी हिंदू राष्ट्रवाद होय.
हा राष्ट्रवाद कुठल्याही लोकप्रिय चेहर्याच्या रूपात प्रकट होऊ शकतो.
हे एक असं सत्य आहे की ज्याला स्वीकारणे ही या देशाच्या मुक्ती आणि स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले पहिले जोमदार पाऊल असेल.
या सत्याचा स्वीकार करायला खऱ्या देशभक्तीची, सामाजिक प्रतिबद्धतेची, आणि साहसाची आवश्यकता आहे."

साम्यवादी आणि डाव्यांना अशा प्रकारचा युक्तीवाद करण्याचं रीतसर प्रशिक्षण दिलेलं असतं आणि ते या परिच्छेदातून स्पष्टच दिसतं आहे. यात त्याने त्याच्या मते गंभीर आणि खरीच अस्तित्वात आहे असं भासवून एक समस्या मांडली आहे, तिला जबाबदार कोण याचंही उत्तर हाच इसम देतो आहे, आणि त्यासाठी काय केलं पाहीजे हेही हाच सांगतो आहे. म्हणजे प्रश्न त्याचा, आणि उत्तरही त्याचंच. अशा प्रकारे त्याने अत्यंत हुशारीने व सुसूत्र पद्धतीने शब्दांची मांडणी करुन त्याला होऊ शकणारा विरोध गुंडाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला या परिच्छेदात राष्ट्रवादाला बदनाम करायचं आहे, म्हणून तो म्हणतोय की राष्ट्रवाद चुकीचा आहे. मग तो म्हणतो आहे राष्ट्रवाद कुठल्या रूपात दिसेल ते पहा. मग त्यावर तो उपाय सांगतो आहे,

"या सत्याचा स्वीकार करायला खर्‍या देशभक्तीची, सामाजिक प्रतिबद्धतेची, आणि साहसाची आवश्यकता आहे."

अरे वा रे वा. म्हणजे राष्ट्रवाद आणि देशभक्ती या वेगवेगळ्या संज्ञा आहेत? राष्ट्रवाद म्हणजे देशभक्ती नव्हे? आणि राष्ट्रवादाचा अर्थ हिंदू राष्ट्रवाद असाच होतो? बघा, म्हणजे याने जाता जाता राष्ट्रवादालाच कशी नावं ठेवली ती!

एखाद्या शब्दामागची भावना बदनाम कशी करावी याचा वरील परिच्छेद हा उत्तम वस्तुपाठ आहे. राष्ट्राच्या रक्षणासाठी, भल्यासाठी जगणाऱ्या आणि झटणाऱ्या प्रत्येकाला एका झटक्यात बदनाम करायचं असेल, हतोत्साहित करायचं असेल तर राष्ट्रवाद या शब्दालाच बदनाम करावं - या साम्यवाद्यांनी भारतात राबवलेल्या कल्पनेने आज मूर्त स्वरूप धारण केलं आहे. आपल्याला आठवत असेल तर काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांना भेटायला गेलेल्या काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर या घटिंगणाची मुलाखत घेऊ पाहणार्‍या रिपब्लिक वाहिनीच्या वार्ताहरालाच अय्यर साहेबांनी "मी देशद्रोही वाहिनीशी बोलत नाही" असं सुनावलं. या चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे शक्ती कपूरने इतरांना चारित्र्याचे धडे देण्यागत प्रकार होता. राहुल गांधींच्या प्रत्येक भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख हटकून 'धोकादायक विचारसरणी' म्हणून होणं, आणि देशाच्या भल्याचं चिंतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काँग्रेस आणि साम्यवाद्यांकडून "संघी" अशी संभावना होणं, या दोन्ही गोष्टींमागची कारणं सारखीच आहेत. एकदा का राष्ट्रवाद या संज्ञेला अस्पृश्यतेचं लेबल लावलं की त्याने प्रेरित असलेली प्रत्येक गोष्ट, व्यक्ती, संस्था, आणि कार्य हे आपोआप वाईट आहे हे सिद्ध करता येतं. हे उमगलेल्या डाव्यांनी मग देशभक्ती या शब्दाला राष्ट्रवादापासून वेगळं करुन या शाब्दिक युद्धासाठी दोन पार्ट्या तयार केल्या. ज्याला देशाबद्दल खरोखर काही पडलेली आहे, जो सदोदित देशाच्या भल्याचाच विचार करतो त्याला जहाल किंवा अतिरेकी राष्ट्रवादी म्हणून विरोधी पार्टीत उभं केलं जाऊ लागलं, आणि काँग्रेस आणि साम्यवादी घटिंगणांनी आपलंही देशावर प्रेम आहे हे सिद्ध करायला "देशभक्त" हे लेबल आपल्याला स्वतःच चिकटवून घेतलं (त्यांच्या दोन पंतप्रधानांनी स्वतःलाच भारतरत्न दिलं तसंच). यात सातशे शहाईंशीं आकडा धारक शांतीप्रिय लोक या लाटेवर स्वार झाले नसते तरच नवल होतं.

हे पुरेसं नव्हतं. कारण लोक तेच तेच ऐकून एक ना एक दिवस कंटाळतात. मग प्रखर राष्ट्रवादाला तो Jingoism किंवा Fascism यांचंच दुसरं रूप असल्याचं असत्य रेटलं जाऊ लागलं. Fascism या शब्दाचा अर्थ शब्दकोशात "A political theory advocating an authoritarian hierarchical government (as opposed to democracy or liberalism)" असा आहे. आर्यावर्तात हजारो वर्ष राजेशाहीच होती व अनेक ठिकाणी अत्यंत कल्याणकारी राजे राज्य करत असंत. आपल्याला लोकशाहीशी परिचय नव्हताच असे नव्हे, कारण चाणक्याच्या काळात मर्यादित लोकशाही असलेली जनपदं असल्याचे उल्लेख आहेत. पण प्रामुख्याने राजेशाही हीच आपल्याकडे राज्यपद्धती राहिलेली आहे, आणि राजेशाही Fascism च्या व्याख्येच्या (authoritarian hierarchical government) जराशी जवळ जाणारी आहे. आपली उज्ज्वल संस्कृती व बहुसंख्य दैदिप्यमान परंपरा निर्माण होण्याचा काळ हाच आहे. मग आपल्या संस्कृती व परंपरांचा आदर करणाऱ्या केवळ संघासारख्या संघटनेचाच नव्हे तर, संघाशी अजिबात संबंध नसलेल्या पण प्रखर राष्ट्रवादी असलेल्या व्यक्ती व संस्थांची Fascist असं लेबल लाऊन बदनामी करणं आणि मग हळू हळू जो राष्ट्रवादी तो फॅसिस्ट असं समीकरण रूढ करण्याचा प्रयत्न करणं हे साम्यवादी आणि शांतीप्रिय समुदायाच्या आधुनिक कार्यपद्धतीचा भाग होता आणि आहे.

दुसर्‍या भागात आपण पाहिलं होतं, की हिटलर शिस्तीचा भोक्ता असल्याने बाकी कुणीही शिस्तप्रिय असलं की त्याला नाव ठेवायला हिटलर म्हटलं जातं कारण त्या व्यक्तीला बदनाम करायला हिटलर हे संबोधन बरं पडतं. तीच क्लुप्ती सुक्याबरोबर ओलं जाळायला निघालेले, 'लिबरल' नामक कातडं पांघरलेले डावे / साम्यवादी वापरत असतात. वरची Fascismची व्याख्या वाचली तर त्यात राष्ट्रवाद अनुस्युत असतो. म्हणूनच तुम्ही राष्ट्रवादी असलात तर त्याच बरोबर तुम्ही फॅसिस्टही होता. हे म्हणजे आपल्या अपराधाबद्दल एखादा आपल्याला लाथ घालायला निघाला तर आपला अपमान लपवायला लाथ मारणाऱ्यालाच गाढव म्हणण्या सारखं आहे, कारण शेवटी लाथ मारण्याबद्दल गाढव हा प्राणी प्रसिद्ध आहे.

राष्ट्रवादाला नाकारायला भारतीय संविधानाचा हल्ली वापर केला जाऊ लागलेला आहे. सुरवातीला दिलेल्या वामी परिच्छेदातली क्लुप्ती इथेही आपल्याला दिसते. यात विरोधी मताची मुस्कटदाबी करायला वपरलं जाणारं एक वाक्य म्हणजे "आम्ही संविधान मानतो". या विधानात "तुम्ही संविधान मानत नाही" हे गृहित धरलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संविधानात राष्ट्रवाद हा शब्द नाही, त्याच्या संदर्भातले लेखन नाही, म्हणून राष्ट्रवाद हा देशविरोधीच आहे असा भंपक सिद्धांत मांडायचा. संविधानात बदल करण्याबद्दल कुणी भाष्य केलं की संविधानाला तुम्ही हात लावायचा नाही, संविधानाबद्दल तुम्ही काही बोलायचं नाही अशी दमदाटी सुरू होते. मग आत्तापर्यंत संविधानात झालेल्या शंभराहून अधिक (ताजा गुगल शोध) सुधारणांचं काय करायचं? ते रद्ध करायचे का? या बद्दल मात्र हाताची घडी तोंडावर बोट. गंमत म्हणजे, संविधानात घुसवलेला "सेक्युलर" हा शब्द सुद्धा एका सुधारणेद्वाराच घातलेला आहे. संविधानात बदल करायचे नसतील, म्हणजेच पर्यायाने आत्तापर्यंत केलेले बदलही रद्द करायचे असतील, तर "सेक्युलर" हा शब्दही हद्दपार करावा लागेल, हे या स्वयंघोषित संविधानरक्षकांना मान्य आहे का? असा प्रश्न विचारल्यास अर्थातच "आम्ही म्हणतो तेच संविधान, तुम्हां फॅसिस्टांना काय कळतंय त्यातलं / तुम्ही फासिस्ट आहात, तुम्हाला बोलायचा हक्क नाही" या प्रकारची विधानं येऊ लागतात. "तुम्ही फासिस्ट" हे ही ठरवणारे हेच. एका विशिष्ट पुस्तकातल्या मजकूरावर टीका झाल्यावर किंवा त्यात सुधारणा करण्याची गरज व्यक्त झाल्यावर ज्याप्रमाणे दमदाटी आणि हिंसा होते, तशीच दमदाटी संविधानाच्या नावावरही होईल अशी कल्पनाही खुद्द संविधानाच्या निर्मात्यांनीही केली नसेल.

दुसरी क्लुप्ती म्हणजे अस्तित्वात नसलेला शब्द निर्माण करायचा आणि समाजात विष पेरायला अशा शब्दांना सोडून द्यायचं. असा शब्द म्हणजे वरील वामी परिच्छेदातला Jingoism हा शब्द. हा शब्द पहिल्यांदा जॉर्ज होलिओक या ब्रिटीश इसमाने अठराशे अठ्याहात्तर साली निर्माण केला आणि वापरला. Jingoism या शब्दाचे शब्दकोषात "An appeal intended to arouse patriotic emotions" आणि "Fanatical patriotism" असे दोन अर्थ दिलेले आहेत. तर विकीपिडीया याच संज्ञेचं "Jingoism refers to nationalism in the form of aggressive foreign policy." असं वर्णन करतो. अतिरेकी राष्ट्रवाद नावाचा काही प्रकार अस्तित्वात असलाच तर तो Jingoism या संज्ञेच्या अधिक जवळ जातो. आपल्या राष्ट्राच्या रक्षणाबद्दल तीव्र भावना असणे व आक्रमक परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून त्या भावनेला जोपासणे हे नक्की कुठल्या दृष्टीकोनातून नकारात्मक आहे? पण राष्ट्रवादाला बदनाम करायचं असेल तर असे शब्द हे बनवत राहणं आणि ते वापरात आणत राहणं हे साम्यवाद्यांचं वैशिष्ठ्यच आहे. कालांतराने हे दोन शब्द इतके आलटून पालटून वापरले जाऊ लागले की त्यांचा अर्थ एकच असल्याचा समज व्हावा.

मी तुम्हाला पहिल्याच वाक्यात "तुम्हाला कुणी अतिरेकी कुत्रा म्हणालं तर" अशा अर्थाचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर आता पुढे देतो आहे. अठराशे सत्त्याहात्तर ते अठराशे अठ्याहात्तर या दरम्यान लढल्या गेलेल्या रशिया व तुर्किस्तान यांच्यातील युद्ध हे त्याची पार्श्वभूमी आहे. या युद्धाच्या तपशीलात जायचीगरज नाही. हे युद्ध सुरू असताना ब्रिटनभर असणार्‍या पब आणि संगीतसभांत एक गाणं म्हटलं जात असे. गायक जी. एच. मॅक्डरमॉट यांनी गायलेलं आणि जी. डब्ल्यू. हंट यांनी लिहीलेलं हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की अठराशे अठ्याहात्तर साली चक्क प्रिन्स ऑफ वेल्सने श्री मॅक्डरमॉट यांना स्वत:साठी खास खाजगी कार्यक्रम आयोजित करुन हे गाणं गायला लावलं. हे गाणं फारच जोशपूर्ण "बाय जीझस" या प्रार्थनावजा शपथेच्या जागी "बाय जिंगो" (by Jingo) हे शब्द वापरण्यात आले होते. एखाद्या ठिकाणी "बाय जीझस" म्हणायचं (swearing मधे जीझसला आणायचं) नसेल  तर "बाय जिंगो" हे त्याकाळी सर्रास वापरले जाणारे उद्गारवाचकशब्द होते. ते गाणं असं:

We don't want to fight but by Jingo if we do
We've got the ships, we've got the men, we've got the money too
We've fought the Bear before, and while we're Britons true
The Russians shall not have Constantinople.

याच शब्दांचा वापर करुन ब्रिटीश नागरिक जॉर्ज होलिओक यांनी Jingoism हा शब्द निर्माण करुन तो डेली न्युज या वृत्तपत्राला पाठवलेल्या पत्रात प्रथम वापरला. कालांतराने हा शब्द सामान्य वापरात घुसला...म्हणजे प्रखर राष्ट्रवादाला विरोध करण्याकरता जगभरातील घरभेद्यांच्या हातात हे कोलित मिळालं. १९१६ साली ऑस्कर सीझर नामक अमेरिकन व्यंग्यचित्रकार यांनी कढलेल्या The American War-Dog या व्यंग्यचित्रात चितारलेल्या कुत्र्याचे नाव जिंगो असे होते. आता जगातल्या १०० सर्वाधिक लोकप्रिय श्वाननामात जिंगो या नावाचा समावेश होतो.

आता मला सांगा, समजा तुम्हाला कुणी Jingoist म्हणालं तर?

------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी
जेष्ठ शु. १४, वटपौर्णिमा, शके १९३९
------------------------------------------

वामपंथी भारत विखंडन ३

Tuesday, May 23, 2017

थोडंसं तुमच्या मुलीबद्दल

थोडंसं तुमच्या मुलीबद्दल

जरा तुमच्या मुलींविषयी बोलायचं आहे. हो, तुमच्याच मुलीबद्दल. थोडा वेळ आहे का?

चित्रपट निर्माते अतुल तापकिर यांनी पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी वाचल्यापासून एक विचार मनात घोळत होता. म्हणजेच कलम ४९८(अ)चा गैरवापर झाल्यास सगळ्या कुटुंबावर अटकेची वेळ येते, त्यात आई, वडील, असेल तर भाऊ आणि बहीणही. गैरवापर झाला आहे हे सिद्ध करेपर्यंत सासरच्यांचं आयुष्य उध्वस्त झालेलं असतं. कुठलाही कायदा जेव्हा केला जातो तेव्हा त्याचे समाजावर दूरगामी परिणाम होत असतात. म्हणूनच अशा कुठल्याही कायद्याबद्दल समाजाने त्या कायद्याचे होणारे परिणाम समजून घेणे आवश्यक आहे. त्या कायद्याचा प्रभाव, होणारे फायदे व नुकसान लक्षात घेऊन त्या संदर्भात व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. मग या कायद्याला आपलं समर्थन असो की विरोध, त्याची प्रत्येक बाजू आणि होणारे परिणाम या विषयी समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जागृती होणं आवश्यक आहे. एखाद्या कायद्यामुळे सत्कृतदर्शनी फायदा होतो आहे असं वाटलं किंवा सोय दिसत असली तरीही त्यावर समाधान न मानता खोलात जाऊन  कायद्याची चिकित्सा केली पाहिजे. आपल्या दुर्दैवाने सरकारने कायदा केला की हिंदू समाज तो मम म्हणून पटकन स्वीकारतो, त्याची फारशी चिकित्सा करत नाही. इतर धर्मीय मात्र जरा जरी प्रतिकूल वाटलं तरी त्याला कडाडून विरोध करुन सरकारला बेत रद्ध करायला भाग पाडतात आणि जरी कायदा स्वीकारला तरी त्यावर विचारमंथन करुन त्याच्या संभाव्य दुरुपयोगापासून स्वतःला संरक्षित (इन्सुलेट) कसं करायचं या कामाला लागतात. हिंदू नेते तर सोडाच पण सर्वसाधारण समाजही कुठल्याही कायद्याचा सर्व बाजूंनी विचार करत नाही.

हिंदू मुलींना माहेरच्या संपत्तीत वाटा देणारा जो कायदा आहे (त्यात झालेल्या सुधारणांसकट) की ज्यामुळे होणार्‍या फायद्याकडे बघताना दुर्दैवाने आपण त्याच्या एका पैलूकडे बघायला विसरलो. या कायद्याचा दुरुपयोग म्लेंछांकडून लव्ह जिहाद करता केला जातो आहे या संदर्भात काही घटना समोर येत आहेत. दुर्दैवाने अशा तर्‍हेने काही गंडवली गेलेली हिंदू कुटुंब आहेत पण अशी प्रकरणे सहन करण्याकडे प्रामुख्याने त्यांचा भर दिसतो. एक तर मुलगी मुसलमानाने पळवली म्हणून नाचक्की झालेलीच असते, त्यात मुलीने जावयाच्या सांगण्यावरुन संपत्ती धुवून नेली हे कुठल्या तोंडाने समाजाला सांगणार? मग शांतपणे नुकसान सहन करण्यापलिकडे त्यांच्याकडे काही पर्याय उरत नाही.

आता हे कसं केलं जातं त्याकडे पाहूया. आपण आपल्या मुलीचं वय १८ झाल्याशिवाय तिचं लग्न करु शकत नाही. इस्लाममधे मुलीच्या लग्नाचं एक असं वय निश्चित नाही. मुस्लिम मुलगी "वयात आली की" तिला लग्नासाठी योग्य समजलं जातं, त्यासाठी तिने वयाची १८ वर्ष पूर्ण केलेली असणं आवश्यक नाही, आणि कुठल्याही भारतीय कायद्यानुसार हा गुन्हा ठरू शकत नाही. थोडक्यात मुस्लिम मुलगी "वयात आली" की तिचं लग्न लाऊन देता येतं म्हणजे निकाह करुन देता येतो आणि तिचा नवरा तिच्याशी शारिरिक संबंधही ठेऊ शकतो, दोन्ही गोष्टींसाठी तिचं "वय" आड येत नाही.

दिनांक ३ अप्रिल २०१४ मधे लागू झालेल्या Criminal Law (Amendment) Act, 2013 नुसारपरस्परसंमतीने ठेवता येणार्‍या शरीरसंबंधांचं वय कमीतकमी १८ आहे. म्हणजेच मुलींचं वय १८ वर्षाच्या आत असेल आणि परस्परसंमतीने जरी शरीरसंबंध ठेवला गेलातरीही तो बलात्कार ठरतो आणि पुरुषाला शिक्षा होते, तशी अर्थातच कायद्यात तरतूद आहे.

इस्लाममधे मुलगी वयात आली की लग्न करता येतं हे आपण वर बघितलं. हे लग्नाचं वय साधारणपणे १५-१६असं असतं. १६ पेक्षा कमी असेल तर धर्मगुरूंच्या परवानगीने निकाह करता येतो. थोडक्यात, निकाह करता वयाची अट नाही. पण एक प्रमुख अट आहे ती म्हणजे निकाह करणारा पुरुष व स्त्री हे दोघेही मुसलमान हवेत. म्हणजेच, परधर्मीयांना स्वतःच्या धर्मात राहून मुसलमान व्यक्तीशी निकाह करता येत नाही, त्यासाठी इस्लाम स्वीकारावा लागतो. धर्मांतर करावं लागतं.

पुढे वाचण्याआधी वरचे तीन परिच्छेद पुन्हा वाचा.

वाचलेत?

ठीक. आता पुढे वाचा. याचाच अर्थ असा, की एखाद्या १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या पण "वयात आलेल्या" हिंदू मुलीने प्रेमाच्या भरात इस्लाम कबूल केला आणि नंतर तिने लग्न केलं तर त्यानंत‌रच्या शरीरसंबंधांना कायद्याने बलात्कार मानलं जात नाही. कारण अर्थातच ती मुलगी मुसलमान असल्याने आणि ती वयात आलेली असल्याने तिने केलेल्या निकाहाला आणि तिच्या शोहरला तिच्याशी केलेल्या शरीरसंबंधांना कायद्याने संरक्षण दिलं गेलेलं आहे. थोडक्यात, अशा तर्‍हेने एखाद्या हिंदू मुलीने धर्मांतर केलं आणि ती मुसलमान झाली तर कायदा काहीही करु शकत नाही.

तर, मुद्दा कायद्याच्या दूरगामी सामाजिक परिणांमांचा आहे. आता असे किस्से कानावर येऊ लागले आहेत की या दोन कायद्यांचा हिंदूंची संपत्ती ढापण्यासाठी अत्यंत सुनियोजित वापर म्लेंछांकडून केला जातो आहे. श्रीमंत किंवा सधन घरातली मुलगी शोधायची, मग ती धोक्याच्या चौदा ते सोळा या वयोगटातली असेल तर उत्तम. तिला प्रेमात पाडल्यावर इस्लाम कबूल करुन घ्यायला फार मतपरिवर्तन करावं लागत नाही, कारण एकदा प्रेमात आंधळं झालं की या बाबतीत स्वतःचं मत फारसं उरतच नाही. वयात आल्यावर तुम्ही कधीतरी पहिल्यांदा प्रेमात पडला असालच, त्यावेळी त्याला/तिला आवडतं म्हणून आपण आपल्या मनाविरुद्ध काय काय केलं ते आठवून पहा आणि त्यावेळी तुमचं वय काय होतं ते ही.  मुद्दा असा, की अशा तर्‍हेने अक्कल गहाण टाकून प्रेमात आंधळं होऊन प्रियकराशी लग्न करायला मुलगी पुरेशी आतुर झाली (डेस्परेट हा शब्द वापरणार होतो पण....असो) की मग तिला इस्लाम स्वीकारायला लावणं हे फारसं कठीण काम उरत नाही. कारण त्या वेळी ती मुलगी इतकी निकाहोत्सुक झालेली असते की तू इस्लाम स्वीकारला नाहीस तर तुझ्या नवर्‍याला जेल होईल मग तुमचं लग्न कसं होणार अशी भीती घातली जाते. एकदा ती मुलगी मुसलमान झाली की मग दोघांचा निकाह लाऊन द्यायला काहीच कायदेशीर अडचण येत नाही. मुलीकडच्यांनी कितीही हापटलं तरी कायदेशीररित्या ते काहीही करु शकत नाहीत, कारणबलात्काराची केस टाकायला आणि त्यासाठी १८ वर्ष ही वयोमर्यादाअसायला मुलगी आता हिंदूच उरलेली नसते. खरा धोका हा इस्लाम स्वीकारण्याच्या आधीच असतो, कारण नंतर वेळ उलटून गेलेली असते. एकदा का तिचा निकाह झाला की पुढच्या आयुष्याचा निकाल लागतो, कसा ते पुढे पाहू.

हिंदू मुलीचा माहेरच्या संपत्तीत अस‌लेला हक्क ती मुसलमान झाल्यावर नष्ट होतो अशी कुठेही तरतूद नाही. त्यामुळे निकाह झाल्यावर नव्याची नवलाई असताना मुलीला तिच्या माहेरच्या संपत्तीत हक्क मागायला लावण्याचे आणि भरपूर संपत्ती उकळली जाण्याचे किस्से घडलेले आहेत. त्यातला एक किस्सा सांगतो. यात मुलगी सज्ञान असणे या व्यतिरिक्त काही वेगळं नाही. किस्सा १००% खरा आहे. फक्त नाव आणि शहर सांगायची परवानगी नाही.

एक सधन घर. मोठी मुलगी, तिला एक धाकटा भाऊ. घरातलं वातावरण सर्वधर्मभावाने व्यापलेलं, अगदी इश्वर अल्ला सगळे समान वगैरे. वडील उद्योजक आणि आई शहरातल्या नामांकित महाविद्यालयात प्राचार्या. मुलगा आणि मुलगी दोघंही लाडके. कशाची कमतरता नाही. झालं असं की केबलवाल्या भाईजानने मुलीशी विशेष मैत्री वाढवली. एक दिवस काही कामाने बाहेर पडलेली मुलगी घरी परतलीच नाही. कुठूनतरी फोन केला की मी सुखरूप आहे, निकाह केला आहे, माझी काळजी करु नये.

अगदी सर्वधर्मसमभाववाले असले म्हणून काय झालं, शेवटी आईबापाचं काळीज. शोध शोध शोधलं पण मुलगी सापडली नाही. सज्ञान असल्याने ते फारसं काही करु शकलेही नसते. नाचक्की टाळण्यासाठी चौकशी आवरती घेतली गेली. ते कुटुंब लोकांच्यात फार मिसळणारं नसल्याने प्रकरणाचा फार बोभाटाही झाला नाही. बहुतेक हिंदू घरांमधे केलं जातं तेच यांनीही केलं, गप्प बसले.

काही महिन्यांनी मुलगी आपला शोहर आणि इतर सासरच्यांबरोबर दारात हजर झाली. वाढलेलं पोट तिच्या शोहरचा पराक्रम दाखवत होतंच. हा धक्का पचवण्याची ताकद गोळा करण्याचा विचार करत असतानाच मुलीच्या सासरच्यांनी बाँब टाकला, च‌क्क मागणी केली की मुलीचा तुमच्या संपत्तीत हक्क आहे तो तिला मिळावा. मुलीच्या सासरच्यांनी सोबत एक वकील साहेबपण याच कामासाठी आणलेले होते. वडील जरा सावरले आणि त्यांना दुसर्‍या दिवशी या असं सांगितलं. मुलीला म्हणाले बरेच दिवसांनी आली आहेस तर आजची रात्र रहा घरी. सासरच्यांनी आक्षेप घेतला पण हा मुद्दा फार ताणला नाही. ताणल्यावर शोहरने तलाक, तलाक, तलाक म्हटलं असतं तर संपत्तीतला वाटा कसा मागता आला असता? ते निघून गेल्यावर मुलीच्या वडीलांनी त्यांच्या ओळखीतल्या काही लोकांशी संपर्क साधला, रातोरात चक्र फिरवली - तपशीलात जायची गरज नाही पण एवढं सांगणं पुरेसं आहे की मुलीच्या सासरच्यांना वाटलं गोल्डफिश गळाला लागलाय पण तो शार्क निघाला. कालांतराने मुलीचं "पुनर्वसन" झालं. तिचं भलं झालं म्हणून पुढचे तपशील विचारायची गरज वाटली नाही.

व्यवस्थित श्रीमंत घर पाहून मुलीला पटवणं, मग पळवणं, आणि मग तिला दिवस गेल्यावर गर्भपाताची शक्यताही उलटून गेल्यावर तिच्या संपत्तीत हक्क मागणं आणि तो मागत असताना सोबत वकीलालाही घेऊन जाणं हे सगळं संपूर्णपणे सुनियोजित कार्यपद्धतीचा भाग निश्चितपणे वाटावा अशा पद्धतीचा एक ट्रेन्डच सद्ध्या कानावर येणार्‍या गोष्टींमधून दिसू लागला आहे.

या किश्शात योग्य लोकांची ओळख आणि त्यांचा प्रभाव या गोष्टींचा फायदा झाला. पण सगळ्यांना असा फायदा होतो असं नाही. बहुतेक लोक लुटले जातात.

याला आणखी एक पैलू आहे. आपल्याकडे अगदी लहानपणापासून मुलांच्या नावावर पैसे ठेवले जातात, दागिने केले जातात. बँकेत खातंही काढून दिलं जातं. त्यातून एटिएम वगैरे सारख्या माध्यमातून पैसे काढणं फारसं कठीण नाहीच. मुलगी सज्ञान असेल तर तर काय विचारायलाच नको. कुठेही गेलं तरी त्या पैशावर तिचाच कायदेशीर हक्क असतो. तेव्हा जरी संपत्तीत वाटा मागितला नाही, तरी तिचा असणारा पैसा आणि तिने पळून जाताना घेतलेले दागिने ही तिच्या शोहरचीच संपत्ती होते.

इस्लाम स्वीकार करुन निकाह केलेल्या हिंदू मुलीचा जरी तिच्या माहेरच्या संपत्तीवर हक्क अबाधित असला तरी मुसलमान स्त्रीला निकाह केल्यावर मात्र नवर्‍याच्या संपत्तीवर काहीही हक्क नसतो. तिच्या संप‌त्तीव‌र‌ही शोह‌र‌चाच ह‌क्क अस‌तो. ती संपूर्णपणे कफल्लक असते. इस्लाममधे महिलांना निकाह करताना शोहरकडून जी मेहेरची रक्कम मान्य केली जाते त्या व्यतिरिक्त एकाही नव्या पैशावर तिचा अधिकार नसतो. मेहेरच्या रकमेला मात्र तिचा शोहर हात लाऊ शकत नाही. पण मुळात वर म्हटल्यप्रमाणे प्रेमात आंधळं आणि निकाहातूर झालेल्या मुलीकडून मेहेरच्या तुटपुंज्या रकमेबद्दल सहमती मिळवणं हे फारच सोपं काम असतं.

आणि हो, आपण अजून तुमच्याच मुलींबद्दल बोलतो आहोत. तेव्हा न कंटाळता वाचताय असं गृहित धरतो.

मग शोहरने तलाक दिल्यावर, मग तो हल्ली बहुचर्चित असलेला आणि एकदम दिलेला तीन तलाक असो की मग काही विशिष्ठ दिवसांच्या अंतराने दिलेला तलाक असो, एकदा का तलाक मिळाला की तुमची मुलगी रस्त्यावर आलीच समजा. हो, आणखी एक गोष्ट. एकदा स्वेच्छेने इस्लाममधे प्रवेश केला, की तो सोडण्याची शिक्षा ही मौत आहे. त्या भीतीने तलाकशुदा मुलगी परत आपल्या आईवडिलांकडे जात नाही, आणि ती भीती नसली तरी बहुतेक वेळी आईवडिलही तिला मुसलमान नवर्‍यापासून झालेल्या पोराबाळांसकट स्वीकारत नाहीत (ही गोष्ट चांगली की वाईट यावर चर्चा नको, असंहोतं हे खरं आहे). त्यामुळे काहीही आधार नसलेल्या परिस्थितीत, विपन्नावस्थेत ती मुलगी पुढचं आयुष्य कंठायला मजबूर होते.

काही गोष्टी या कालसापेक्ष किंवा स्थानसापेक्ष नसतात. त्या सार्वकालिक आणि जागतिक सत्य असतात. दारिद्र्य आणित्याचा गुन्हेगारीशी असणारा संबंध ही अशीच बाब आहे. आता श्रीमंत आणि सुशिक्षितही गुन्हे करतातच, पण गुन्हे घडण्याची शक्यता ही गरिबीशी जास्त संबंधित आहे. तुम्ही बघितलं असेल तर श्रीमंत देश आणि लोक हे गुन्हेगार आणि गुन्हेगारीचे नियंत्रण करतात आणि प्रत्यक्ष गुन्हे करणारे (आणिपकडले जाणारे) बहुतेक वेळा दारिद्र्यामुळे गुन्हेगारीकडे वळलेले असतात. अगदी काश्मीरातले हुरियत कॉन्फरन्स वगैरे फुटीरतावादी लोक बघितले तर ते वातानुकूलीत घरात बसून आदेश देतात, आणि दगडफेक करायला शाळकरी गरीब मुलं आणि सामान्य नागरिक हेच पुढे असतात. आपल्या कुबेरांचा सनदी लेखपाल याकूब मेमन हा उच्चशिक्षित इसम सुद्धा दहशतवादी हल्ल्यांचं नियोजन करणारा होता, प्रत्यक्ष बाँब ठेवणारी मुलं ब‌हुतांशी ग‌रीब घ‌रात‌ली.

तेव्हा तुमच्या मुलीला संपत्ती आणि संततीसाठी व्यवस्थित उसा सारखं चिपाड होईपर्यंत पिळून घेतल्यावर तलाक मिळाला की तिच्याकडे उरलेल्या शून्य संपत्तीचं पर्यवसान तिच्या मुलांचं गुन्हेगारीकडे वळण्यापर्यंत होऊ शकतं. किंवा वाईटात वाईट, तुमच्या काळ‌जाचा तुक‌डा अस‌लेली ती आत्म‌ह‌त्या क‌र‌ते.

बारा तेरा वर्षांपासून आजकाल मुलांना राजकीय मते मांडता येऊ लागली आहेत आणि कुठला पक्ष कसा हे समजू लागलेलं आहे, तरीही राजकीय मताचे पर्यवसान मतदानात होण्यासाठी वयोमर्यादा १८ आहे. नशीबाने हा कायदा सर्वधर्मीयांना लागू आहे. मग तोच तर्क आणि तसाच कायदा धर्मांतरासाठी का नको? हिंदू हिताचा पत्कर घेणार्‍या संघटना आणिप्रामुख्याने राजकीय पक्षांना हिंदूंनी हा प्रश्न विचारायला हवा. या प्रकरणी किमान जनजागृती करण्यासाठी ते काय करत आहेत असा जाब हिंदूंनी विचारला पाहीजे. तलाक संपला तरी पुढचे परिणाम चुकत नाहीत, म्हणून अशा पक्षांनी तीन तलाक बंद करा म्हणून उड्या मारण्यापेक्षा समान नागरी कायदा आणण्यासाठी हिंदू जनतेनेच दबाव आणला पाहीजे. सबका साथ हवा असेल आणि सबका विकास करावयाचा असेल तर कायदाही समान हवा. खेळपट्टी ही दोन्ही संघांना तीच मिळायला हवी, इंग्रजीत म्हणतात तसं लेव्हल प्लेयिंग फिल्ड. हा झाला राजकीय जाणीवांचा भाग.

मुख्य आणि मूळ मुद्दा असा की मुलांशी सतत संवाद ठेवा. त्यांना या धोक्याची जाणीव करुन द्या. अथर्वशीर्ष शिकवलंत तर सोबत पवित्र वाळवंटी पुस्तकाचंही ज्ञान द्या. रामाने परत आणायला सीतेशी त्याचं लग्न झालं होतं, तुमच्या लाडाकोडात वाढलेल्या जानकीला लग्नाआधीच समाजातल्या मारीचांची वेळीच ओळख करुन द्या. नाहीतर तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती उरलं धुपाटणं याहून वाईट परिस्थिती ओढवेल आणि तुमच्या मुलीची पालीच्या तुटलेल्या शेपटीसारखी अवस्था होऊन असहाय्यपणे वळवळण्यापलिकडे त्या दरिद्री कन्येकडे काहीही पर्याय उरणार नाही.

आणि हो, आपण तुमच्या मुलीबद्दलच बोलत आहोत. लक्षात आहे ना?

© मंदार दिलीप जोशी
मूळ संकल्पना: श्री आनंद राजाध्यक्ष

टीपः लेखात मांडलेल्या मुद्द्यावरच बोलावे. विषयांतरवाल्या टिप्पण्यांना बंदी आहे. उडवल्या जातील.

वैशाख‌ कृ. १२, श‌के १९३९

Thursday, May 4, 2017

वामपंथी भारत विखंडन ३ - महागलेली देशभक्ती आणि चवताळलेला चीन

या मालिकेखाली हा लेख असला, तरी या भागाला जगत् विखंडन असेही म्हणता येईल.

 चवताळलेल्या चीन बद्दल आधी बोलूया. गेल्या दिवाळीच्या आधीची गोष्ट आहे. चीनने हाफीज सईदला अतिरेकी घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मार्गात अडथळा निर्माण केला आणि कधी नव्हे तो अवघा भारत देश पेटून उठला. अंहं, म्हणजे चीनी वकिलातीवर मोर्चे, घोषणा वगैरे नाही. तर अत्यंत विधायक पद्धतीने जनताजनार्दनाने निषेध व्यक्त केला. तो म्हणजे चीनी वस्तूंवर बहिष्कार. बहिष्काराचे हे अस्त्र आधी स्नॅपडील वगैरेच्या माध्यमातून तावूनसुलाखून बाहेर पडलं होतं, आता त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर करावी अशी मोहीम सोशल मिडियातून सुरू झाली. चीनी मालाने बाजारपेठेत इतक्या खोलवर मुसंडी मारलेली आहे की संपूर्ण बहिष्कार ही अत्यंत अवघड होती. म्हणून मग दिवाळीच्या खरेदीतून तरी चीनी वस्तूंना लोकांनी हद्दपार करावे असे ट्रेन्ड सोशल मिडीयावर सुरु झाले आणि त्याचा परिणामही दिसू लागला.

दिवाळीत वापरले जाणारे कंदील, पणत्या, सजावटीचे सामान इत्यादी वस्तू चीनी नाहीत हे पाहून खरेदी केल्या जाऊ लागल्या. या वस्तू एक तर गेल्या वर्षीच्याच वापरायला लोक प्राधान्य देऊ लागले, किंवा रस्त्यावर विकायला बसलेल्या विक्रेत्यांकडून स्थानिक आणि ग्रामीण पातळीवर तयार झालेल्या वस्तू लोक विकत घेऊ लागले. सामान्य जनतेच्या मनातून आलेल्या या बहिष्काराची कल्पना इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल अशी कुणालाच अपेक्षा नव्हती, मात्र तो झाला हे खरे. इतका, की चीनला याची दखल घेत या बहिष्काराचा परिणाम भारतातल्या चीनच्या गुंतवणुकीवर होईल अशी चिंतावजा धमकी द्यावी लागली. मात्र या धमकीला न भीक घालता भारतीय सामान्य जनतेने हा बहिष्कार गेल्या दिवाळीपुरता का होईना यशस्वी करुन दाखवला. आम्ही काय खरेदी करावे, यावर कुणाचे नियंत्रण असूच शकत नाही, त्यामुळे चरफडत बसण्यापलिकडे चीनकडे दुसरा काहीच पर्याय उरला नाही.

चीन का चवताळला ते आपण बघितलं. आता देशभक्ती कशी महागते ते पाहूया. वर म्हटल्याप्रमाणे चीनी मालाने भारतीय बाजारपेठेत आपण कल्पनाही करु शकणार नाही अशा रीतीने खोलवर प्रवेश केला आहे. आपल्याला अर्थात ही गोष्ट माहित आहे की चीनचा हा प्रभाव त्याच्या वस्तूंच्या किंमतीवर प्रामुख्याने अवलंबून आहे. कुठलीही वस्तू किंवा सेवा यांची किंमतीमधला एक प्रमुख घटक म्हणजे त्यात गुंतलेल्या कर्मचार्‍यांचा पगार किंवा मेहनताना. कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या प्रमाणात अनेक वस्तू किंवा सेवांची किंमत कमी-जास्त  होते.

इथे दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे एखादी वस्तू स्थानिक पातळीवर बनवणे महाग पडू लागले की ती बाहेर स्वस्तात बनवून घ्यावी असा विचार बळावतो. दुसरं म्हणजे आपल्यापेक्षा स्वस्तात बाहेर वस्तू बनवून मिळते हे कळलं की स्थानिक पातळीवर वस्तू बनवणे महाग आहे हे जाणवायला लागते. लक्षात घ्या एक म्हणजे "महाग पडू लागणे" आणि दुसरं म्हणजे "स्वस्त पर्याय" मिळणे.

जगात क्रमांक एकवर असणारी देशाची लोकसंख्या आणि एकाच विचारसरणीच्या पक्षाचा एकछत्री आणि मुख्य म्हणजे निरंकुश अंमल, आणि म्हणूनच प्रत्येक विरोध निर्दयपणे चिरडून काढता येण्याची क्षमता चीनकडे खचितच होती आणि आहे. वर उल्लेख केलेल्या दोन्ही गोष्टी चीनने केल्या. म्हणजे चीनने स्वस्त पर्याय उपलब्ध करुन दिलेच (मग दर्जा गेला तेल लावत, ते इकडच्या समजे पर्यंत चीन खूप खोलवर घुसला होता) पण म्हणजेच एखाद्या देशात वस्तू बनवणं महाग होईल अशी परिस्थिती निर्माण करणे हे अत्यंत कुशलतेने केलं.  इतर देशात वस्तू बनवणं महाग कसं करायचं? तर त्या देशातल्या कामगारांना आणि त्यातही प्रामुख्याने कामगार नेत्यांना हाताशी धरून विळा-हातोडावाल्या झेंड्याखाली संघटित होऊन "शोषक" मालकांच्या विरोधात लढायला फूस द्यायची. यात कामगारांनीही

लाल चीन आणि आणि त्याच्या आधी म्हणजे रशियाच्या विघटनापूर्वी अखंड सोवियत रशिया असताना क्रेमलिनचे मिंधे असलेल्या कामगार नेत्यांनी कधी न्याय्य मागण्या करुन तेवढंच पदरात पाडून घेण्यात समाधान मानलं नाही. मागण्या या कायम अवाजवी, अवास्तव, आणि मालकाला न परवडणार्‍या अशा ठेवत गेले आणि मागण्या कधीही संपू दिल्या नाहीत. मग त्या मान्य झाल्या नाहीत की संप केले गेले. हळू हळू एक तर कामगारांवर अती खर्च होत असल्यामुळे आणि अशा संपांमुळे कंपन्या चालू ठेवणं आणि त्यांत वस्तू बनवणं आणि विकणं हे उद्योजकांसाठी आणि विकत घेणं हे ग्राहकांसाठी "महाग पडू लागलं". परिणामस्वरूप त्या वस्तूंचे ग्राहक स्वस्त पर्याय शोधू लागणं साहजिकच म्हणायला हवं.

हेच धोरण चित्रपटांत राबवले गेले. पूर्वीचे सिनेमे आठवा - त्यांत मिलमालक आणि उद्योजक रक्तपिपासू, दुष्ट, संकुचित मनोवृत्तीचे आणि आप्पलपोटे दाखवले जायचे आणि आणि नायक असायचे गरीब पण मनाने उदार. मग ते कारखान्यात संप का घडवून आणेनात, आणि कामगारांना खायचे वांदे का होईनात, व्हिलन मात्र मालक! (त्यात हमखास नायकाचे प्रेम मिलमालकाच्या मुलीबरोबर किंवा बहिणीबरोबर जमायचे आणि त्याला विरोध करणारे मिलमालक अर्थातच व्हिलन. असो. हे विषयांतर झाले. हा विषय पुढच्या भागात नक्की). अगदी कोपर्‍यावरच्या किराणा किंवा कुठल्याही दुकानाचा मालक किंवा व्यापारी सुद्धा मारवाडी पोषाखातला अत्यंत स्थूल वा बेढब दिसणारा, काहीतरी सेठ वगैरे नाव असलेला, मुलींवर वाईट नजर असलेला (त्यात नायिका किंवा नायकाची बहीण हमखास), आणि लोकांना लुटायला तत्पर असा पूर्वीच्या सिनेमातून दाखवला जायचा.

मग दिवाळीच्या कंदिल आणि पणत्यांपासून वीजेवर चालणार्‍या उपकरणांपर्यंत आणि मुलांच्या खेळण्यांपासून ते रोजच्या वापरातल्या झाडू आणि सुपलीपर्यंत सगळ्या वस्तू या "बाहेरून" विकत घेणे हेच आर्थिक गणितात बसत असेल तर मुळातच गरीब असलेल्या या देशात चीनी वस्तूंनी हातपाय पसरणे यात काहीही आश्चर्य नाही. मग कोण खिशाला चाट लावून देशातच कारखाना काढून कामगार संघटनांच्या कटकटी सहन करत बसेल? दिवाळीत एका दुकानात एका चीनी खेळण्याची किंमत आणि त्यातल्या त्यात स्वस्त भारतीय खेळण्याची किंमत विचारली, तर दोन्हीत किमान दोनशे रुपयांचा फरक होता.

आहे की नाही देशभक्ती महाग?

© मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. ९, शके १९३९

Tuesday, May 2, 2017

बाहुबली द कन्क्लुजन - एकदा तरी नक्की पहावी अशी भव्यकलाकृती

मी दक्षिणेतले डब केलेले चित्रपट फारसे बघायला जात नाही. फारसे कशाला, बघतच नाही. चित्रपटगृहातच नव्हे तर घरी सुद्धा नाही. रोजा हा शेवटचा डब केलेला सिनेमा चित्रपटगॄहात जाऊन बघितलेला आठवतो. याला मुरड घालून बघितलेले दोन चित्रपट म्हणजे अर्थातच बाहुबली द बिगिनिंग आणि गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला बाहुबली द कन्क्लुजन.

पहिला भाग बाहुबली द बिगिनिंग काही कारणांमुळे चित्रपटगृहात बघता आला नाही, पण मुलांच्या कृपेने अगणित वेळा टीव्हीवर पारायणे झालेली आहेत. पण टीव्हीवर पाहण्यात मजा नाही हे लक्षात आलेच होते.
चित्रपट निर्मात्यांनी रामायण, महाभारत आणि इतर इतिहासातल्या अनेक घटना आणि घटनाक्रम कथानकात वापरल्या आहेत. निवर्तलेल्या राजाच्या सद्वर्तनी आणि महपराक्रमी मुलाला सत्ता न मिळता अनीती आणि कुमार्गावर चालणार्‍या त्याच्या भावाला मिळणे, त्या सन्मार्गी मुलाने सत्तात्यागच नव्हे तर राजप्रासादाचा सुद्धा त्याग केल्यावरही त्याच्या जीवावर उठलेला अन्यायी भाऊ आणि त्याचे सल्लागार मंडळ, राजघराण्यातली कटकारस्थाने, ऐन वेळी चुकीच्या व्यक्तीचा आदेश ऐकून न्याय्य पक्षावर अन्याय करावा लागणं यात झालेला कटप्पाचा भीष्माचार्य, आणि बैलांच्या शिंगांना लावलेले पेटते पलीते अशा अनेक ऐतिहासिक संदर्भ असलेल्या गोष्टी या चित्रपटात आहेत.

पहिल्या भागात जाणवलेली आणि दुसर्‍या भागात विशेषकरुन ठसठशीतपणे समोर आलेली उल्लेखनीय बाब म्हणजे चित्रपट हे संपुर्णपणे एका हिंदू साम्राज्यावर बेतलेला असून त्यात ठायी ठायी असलेल्या हिंदू देवतांच्या मूर्ती किंवा त्यांची आणि सणांची ठसठशीत प्रतीके व गाणी. या गोष्टी निश्चितपणे डोळे आणि जीवाला सुखावून जातात. याचं विशेष कारण म्हणजे आजवर हिंदीत बनलेले चित्रपट हे प्रामुख्याने धर्मांध आणि कत्तलखोर मुघल राज्यकर्त्यांची प्रतिमा व्हाईटवॉश करण्यासाठीच बनवले गेलेले होते. इतकंच नव्हे, तर नायक, नायिका आणि त्यांचं आख्खं खानदान हिंदू असले तरी चित्रपटात किमान एक कौवाली असणे किंवा प्रेमगीत असल्यास मौला, बुल्ला, खुदा किंवा तत्सम शब्दांची रेलचेल असणे, सिनेमात किमान एक सहृदय शांतीदूत वगैरे अशा गोष्टी पाहून वीट आलेला होता. त्या पार्श्वभूमीवर वर उल्लेख केल्याप्रमाणे हिंदू दैवते व प्रतीके यांची ठसठशीत उपस्थिती दाखवल्याबद्दल संबंधितांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. नाही म्हणायला पहिल्या भागात असलम खान नामक शस्त्रविक्रेत्याची एक व्यक्तिरेखा होती पण त्यातही कटप्पा त्याच्या शस्त्रांचा पाणउतारा करताना दाखवला आहे.

आणखी एक सुखावणारी गोष्ट म्हणजे माहिष्मती साम्राज्याच्या 'राष्ट्रगीता' पासून ते सैन्याला दिल्या जाणार्‍या आदेशांपर्यंत अनेक ठिकाणी संस्कृत शब्दांचा केलेला वापर होय. सातत्याने उर्दू शब्द ऐकून किटलेल्या कानांनी आणि विटलेल्या मनांनी या बदलाचं निश्चितच जोरदार स्वागत केलं यात काही आश्चर्य नाही.
किती जणांच्या लक्षात आलं माहित नाही, पण बैलांच्या शिंगांना पेटते पलीते लावण्याची ही शिवाजी महाराजांची ही एकच कल्पना दिग्दर्शक राजामौलीने वापरलेली नाही. कुंतल देशाच्या राणीचा भाऊ कुमारवर्मामधे शौर्याची भावना उत्पन्न करुन त्याला पराक्रम गाजवायला भाग पाडणारा बाहुबली आणि मदत मागायला आलेल्या बुंदेल नरेश छत्रसालाला स्वतःचं स्थान निर्माण करायला प्रोत्साहन देणारे आपले महाराज यात मला विलक्षण साम्य आढळलं.

चित्रपटातील स्त्रियांचे केलेले चित्रण ही विशेष आवडलेली बाब. सम्राज्याचा गाडा यशस्वीपणे हाकणारी शिवगामिनी तर आहेच, पण कधी संकटसमयी तलवार तर कधी प्रियकरासाठी मोकळा सोडलेला केशसंभार अशी चतुरस्र देवसेनाही आहे. देवसेना स्त्रियांशी वावगं वागणाऱ्या सेनापतीची स्वतः बोटं छाटते, त्यासाठी नवऱ्याची वाट बघत बसत नाही. पहिल्या भागातल्या हिरविणीला अवंतिकाला मात्र या भागात फारसं काम नाही.

दोषच सांगायचे तर दक्षिणेतल्या चित्रपटातील साहसदृश्यात अतिशयोक्ती या शब्दालाही लाजवेल अशी दृश्ये असतात तशी या चित्रपटातही आहेत. बैलांची काही दृश्ये ही VFXच्या दृष्टीने जरा गडबड वाटतात, पण तरीही अंगावर रोमांच यावेत अशी आहेत. बोट हवेतून जाते हे स्वप्नदृष्य (dream sequence) आहे हे नंतर जाणवतं, तिथे संपादन (एडीटींग) दोष असावा असं वाटतं. अगदी रजनीकांतला सात जन्मात जमणार नाहीत अशी अतिशयोक्तीपूर्ण साहसदृश्ये शेवटाकडे आहेत. पण याबाबत माझं जरा वेगळं मत आहे. एक तर हे कथानक काल्पनिक आहे, त्याला कुठल्याही ऐतिहासिक सत्य परिस्थितीचा काडीचाही आधार नाही. शिवाय इतक्या मोठ्या पटलावर या गोष्टी आरामात खपून जातात. आपल्याला चमत्कृतीपूर्ण हॅरी पॉटर चालतो, तर अतिशयोक्तीपूर्ण बाहुबली का चालू नये?

या चित्रपटाच्या निमित्ताने एतद्देशीय राजे व संस्कृती निर्भीडपणे दाखवणारे चित्रपट बनायला सुरवात झाली तर सोन्याहून पिवळं असं म्हणता येईल. खानावळ आणि हीन दर्जाच्या घराणेशाहीने ग्रासलेल्या हिंदीत बनतील अशी अजिबात आशा नाही. पण जे कुणी ते निर्माण करेल, ते करताना या चित्रपटातले दोष हेरून ते दूर करण्याची प्रक्रियाही सातत्याने झाली पाहीजे.

- (भयानक कम्युनल चित्रपट चाहता) © मंदार दिलीप जोशी

तळटीपः चित्रपटाशी करण जोहरचं असलेलं नातं, VFX स्टुडीओ आणि पैसे कुणाकुणाचे लागले आहेत या संबंधातले टोमणे आधीच गृहित धरुन सांगतो, की त्यांचे पैसे वापरुन हिंदू संस्कृती चित्रपटातून दिसत असेल तर मी म्हणतो वापरा बिंधास. काय?

Thursday, March 9, 2017

गुरमेहर से सुहाना तक, सैफुल्ला के वालिद से होते हुए

कुछ लोगों के मन में उठा प्रश्न सटीक है - पहले भी मुस्लिम गायक हिंदू देवदेवताओं के स्तुतीपर गीत गा चुके हैं, तो फिर सुहाना के ऐसा करने पर बवाल क्यों?

मेरा आकलन यह है कि जब जब जो जो होना है, तब तब सो सो होता है.  अर्थात एम.एस.एम यानी मुख्यधारा के प्रसारमाध्यम एवं सोशल मिडिया पे कोई भी ट्रेन्ड यूंही नहीं चलता.  इसे अलग परिपेक्ष्य में देखना पडता है.  यहां कुछ भी समय से पहले, नसीब से ज्यादा, और कारण के अभाव में नहीं होता.

कुछ दिनो पहले ही गुरमेहर कौर की ट्विट से उठा बवाल आपको ज्ञात ही होगा.  उसने ट्विट में कहा था की मेरे पिता को पाकिस्तान ने नहीं मारा, युद्ध ने मारा.  इस बात पर राष्ट्रवादी गुस्से हो कर उसपे टूट पडे और मुख्यधारा के प्रसारमाध्यम एवं सोशल मिडिया पर मंडरा रहे असुर प्रकृति को अवसर मिल गया की कैसे देश मे असहिष्णुता एवं विचारस्वातंत्र्य का दमन हो रहा है.  किंतु जब वे भी जानते थे और आप-हम भी जानते हैं कि यह केवल अपने विचारों को प्रकट करने का विषय नहीं था.  अगर आप किसी पक्ष या व्यक्ती को कोसें तो वह विचारस्वातंत्र्य के अंतर्गत आ सकता है.  लेकिन गुरमेहर के इस ट्वीट का अन्वयार्थ यह था कि आज तक भारत के जितने भी सैनिक एवं और लोग मारे गये,  उन सब की मृत्यू का भारत एक देश के रूप में उतना ही उत्तरदायी है जितना पाकिस्तान.  अतः भारत को शांती प्रक्रिया को आगे ही बढाना चाहीये.  अब यह बात कितनी बचकानी एवं झूठी है यह तो आपको बताने की आवश्यकता नहीं है.  चूंकि अब मुख्यधारा के प्रसारमाध्यमों का दबदबा उतना नहीं रहा, इस बात की जमकर और विभिन्न कोणों से आलोचना हुई.  गुरमेहर एक लडकी है और केवल २० वर्ष आयु की है यह कुतर्क भी उसे बचा न पाये.  विरोध इतका बढ गया कि गुरमेहर को उसे किसीने बलात्कार की धमकी दी है ऐसा बोलना पडा.  इससे उसके विरोध में बोलने वालों में ही फूट पड गयी, और कईं लोग केवल इस धमकी वे विषय में क्यों न हो, गुरमेहर की तरफ हो लिये.  आखिर एक लडकी की इज्जत का सवाल था न! लेकिन बाद में जब यह ज्ञात हुआ कि उसे बलात्कार की धमकी देने वाला उसी के लिबरल गिरोह वाले किसी विद्यार्थी संघटन का सदस्य था, तो यह बात जैसे उछाली गयी थी उससे दोगुने गति गायब भी हो गयी.  फिर अखिल भारतीय विद्यार्थी संघटन के सदस्योंने ही पुलिस  में केस दर्ज करवाया.

खैर, आप को जो तथ्य पहले से ज्ञात हैं उन्हें फिरसे आप के सामने रखने के कारण क्षमाप्रार्थी हूं, परंतु सुहाना का दमन उछाले जाने के कारण तक पहुंचना है तो हमें गुरमेहर के विषय को थोडा देखना होगा इस कारण यह इतिहास लेखन करना पडा.  तो सुहाना का किस्सा क्या है? सुहाना सईद ने एक कन्नडा रियलिटी शो में एक हिंदू भक्तीगीत गाया था.  मैं इस गायक से अनभिज्ञ हूं लेकिन इस विषय में अधिक जानकारी लेने हेतु उसके एक दो गाने सुने.  भाषा तो समझ नही आयी परंतु यह ज्ञात हो गया की यह एक प्रसिद्ध गायिका है और लोगों को इसके गाने पसंद आते हैं.  तो सुहाना ने एक रियलिटी शो में एक हिंदू भक्तीगीत गाया और इसके पश्चात शुरू हुआ इस्लामियों की ओर से उसपे धमकीयोंका सत्र.  उसके विरोध में वही पुराने तर्क सुनने मिले की इन लोगों को ऐसा नहीं करना चाहिये क्योंकि देखो इस्लाम कितना अच्छा एवं शांतीपूर्ण धर्म है इत्यादि.  लेकिन सबसे बडा कुतर्क यह देखा गया की अगर गुरमेहर को अपनी बात रखने का अधिकार है तो सुहाना सईद को भी उसके जो मन मे आये वह गाने का अधिकार है. 



यूं तो महंमद रफी से लेकर कईं मुसलमान गायकों ने, इतनी पुरानी बातें छोड़िए , आजकल के गायकों ने भी हिंदू भक्तीगीत गाए हैं, तब तो कोई बवाल खडा नहीं हुआ, तो अब क्यों इसका उत्तर आप को अब तक संभवतः मिल गया होगा.  गुरमेहर मामले मे ठंडे किये गये मुख्यधारा माध्यक तथा सोशल मिडिया में लिबरल भाडे के टट्टूओं को गुरमेहर के नाम पर लगे धब्बे को धोने का अवसर चाहिये था, तो फिर वह क्या करते.  सारी दलीलें तो समाप्त हो चुकी थीं.  तो अचानक उनकी नजर एवं कान पडे सुहाना के गाए हुए हिंदू भक्ती संगीत पर.  

लिबरल गिरोह का मस्तिष्क टेढा ही चलने के कारण उन्होंने गुरमेहर की विषैले फल समान बात को, जो विष अब देश के कुछ विश्वविद्यालयों के कईं युवाओं मे फैल चुका है, उसे सुहाना के हिंदू भक्तीगीत गाने के अधिकार के समान स्तर पर लाकर खडा कर दिया, की देखो देशवासियों तुम वहां भी गलत थे यहां भी गलत हो.  दोनो ही विचारस्वातंत्र्य का ही हिस्सा हैं.  तो फिर काहे को सुहाना को गरिया रहे हो? क्या अधिकार है तुम्हें? हालाकि यह बात सुहाना को धमकाने वाले इस्लामी कट्टरपंथियों को कही गयी थी, परंतु इसका लक्ष्य गुरमेहर को विरोध करने वाले ही थे.  कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना.  

देखा आपने कैसे छल तथा चतुराई से दोनो लडकियों को एवं उनके विषयों को समक़क्ष लाकर खडा कर दिया गया?

और हां, अगर आप की सहानुभूति आयसिस के आतंकी सैफुल्ला के बाप से होकर सुहाना सईद की ओर बहने पर आमादा है, तो आप को इसका स्मरण करा दूं कि उसकी गायकी पैसे के लिये एवं कोई प्रतियोगिता मे विजयी होने हेतू है, कोई भगवान के प्रति श्रद्धा नहीं उमड पडी उसकी.

कुछ समझे?

© मंदार दिलीप जोशी
माघ शु. १३, शके १९३८


Saturday, March 4, 2017

गुरमेहर, समाज, और पालनपोषण

एक पुरानी आफ्रीकी कहावत है, "It takes a village to raise a child."

गुरमेहर बहुत छोटी थी जब इसके पिता काश्मीर मे आतंकवादियों के गोली का शिकार हुए. पेट्रोल पंप एवं मिली हुई बडी धनराशि से आय की समस्या तो हल हो गयी, परंतु पेट्रोल पंप संभालने का काम एवं घर की अन्य जिम्मेदारियों ने कदाचित इसकी मां को इस पर संस्कार करने का अवकाश नहीं दिया, और यह देशविघातक शक्तियों के लिये एक आसान सा लक्ष्य बन गयी.

अगर आपके आसपास ऐसा परिवार हो, तो उनके बच्चों की मित्रता अपने बच्चों से अवश्य करवाएं; ऐसे बच्चों को अपने घर खाने पर बुलाएं; उन्हे अपने साथ मंदिर, सिनेमा, अन्य सार्वजनिक एवं पारिवारिक कार्यक्रमों मे ले जाएं; उन्हे अच्छी किताबें भेंट करें; उनके मित्रपरिवार से परिचित हों; उनकी मां से, या अगर मां नहीं है और पिता हैं तो उनसे, बच्चों के भविष्य के विषय मे चर्चा करें; इत्यादि.

सहाय्यता केवल पैसों से नहीं की जाती.

और हां यह पहले होता था हमारी संस्कृति में, कोई आफ्रीका से आयात की हुई कल्पना नहीं है. आयात केवल कहावत है: It takes a village to raise a child.




 © मंदार दिलीप जोशी

Thursday, March 2, 2017

गुढी पाडव्याबाबतीत पसरवण्यात येणारा गैरसमज

शिवाजी महाराजांच्या जयंतीला तिथीनुसार आहे म्हणून विरोध करणारी बिग्रेड तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या हिंदूंच्या गुढीपाडव्याला मात्र विरोध करायचा म्हणून धर्मवीर संभाजी महाराजंच्या बलिदानाला तिथीनुसार स्वीकारते.

ज्या म्लेंच्छ औरंग्याने संभाजी महाराजांना इस्लाम धर्म स्वीकारत नाही म्हणून हालहाल करून ठार मारले त्या विषयी गप्प बसणारी ब्रिगेड "गुढीपाडव्याच्या आदल्यादिवशी संभाजी महाराजांना मारले म्हणून ब्राह्मणांनी आनंदासाठी गुढीपाडवा हा सन सुरु केला" अशी हिंदू समाजात फूट पडण्यासाठी सातत्याने दरवर्षी अफवा पसरवते.

आदर्शहीन समाजाला संपवणे सहज शक्य असल्याने हिंदूंच्या आदर्शांबद्दल गैरसमज पसरवून विश्वास नष्ट करणे या हेतूने भारत/हिंदू विरोधी शक्तींच्या पूर्ण अंकित असलेल्या संभाजी ब्रिगेडचा हा डाव आहे. गुढी पाडवा या सणाचा छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युशी संबंध जोडणे चुकीचे आहे त्याची कारणमिमांसा व त्या संदर्भातले पुरावे आपण पुढे पाहूच. हा सण कृषी संस्कृतीशी संबंधित असून  ‘गुढी’ हा शब्द याच मातीतला आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथामध्ये व मराठी भाषेतील साहित्यामध्ये  ‘गुढी’ हा शब्द इसवी सनाच्या १३व्या, १४व्या शतकापासून वापरला गेल्याचे आढळते.

संत चोखोबांनी एके ठिकाणी म्हटलेले आहे,

टाळी वाजवावी | गुढी उभारावी |
वाट हे चालावी । पंढरीची ।।

संत चोखोबांच्या अभंगातील चरण
(श्री सकल संतगाथा, खंड १ला, श्री संतवाङ्मय प्रकाशन मंदिर, पुणे; प्रकाशक-रमेश शंकर आवटे, प्र.आ.१९२३, दु.आ.१९६७, पृ.१२९)

संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून किमान पाच वेळा गुढ्या उभारण्याचा उल्लेख केला आहे.

श्रीकृष्णाच्या जन्मानंतर गोकुळात हर्षोल्हास पसरला आणि त्या आनंदाच्या भरात लोकांनी गुढ्या उभारल्या.

गोकुळीच्या सुखा | अंतपार नाही लेखा ॥
बाळकृष्ण नंदा घरीं | आनंदल्या नरनारी ॥

गुढिया तोरणे | करिती कथा गाती गाणे ॥ २८३९.१-४ ॥

संत तुकाराम महाराजांनीच आणखी एकदा म्हटलेले आहे,

रोमांच गुढियाडोलविती अंगें | भावबळें खेळविती सोंगें रे |
तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे | या विठोबाच्या अंगसंगें रे ॥ अ.क्र.१९२.५ ॥

कृष्णाने कालियामर्दन केल्यानंतर त्याच्या मित्रांना अतिशय आनंद झाला. त्यांच्यापैकी जो चपळ होता, त्याच्या हातात गुढी देऊन त्याला कृष्णाने आनंदाची बातमी देण्यासाठी पुढे पाठविले, हे नोंदविताना तुकारामांनी म्हटले आहे,

पुढ पाठविले गोविंदें गोपाळा । देउनि चपळा हातीं गुढी |।४५५३.२।।

आनंदाची ही बातमी गोकुळात पोचल्यानंतर तेथे काय घडले, ते सांगताना तुकाराम म्हणतात,

शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥
आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली गुढी हरुषें मात ॥ ४५५५.१,२ ।।

त्यानंतर कृष्ण गोकुळात आल्यावर तेथे किती आनंदाचे वातावरण होते, ते नोंदविताना तुकाराम म्हणतात,

नेणे वर्णधमर्जी आली समोरी | अवघी च हरी आळिंगिली ॥
हरि लोकपाळ आले नगरात | सकळांसहित मायबाप ॥
पारणे तयांचे जाले एका वेळे | देखिले सावळे परब्रह्म ॥
ब्रह्मानंदें लोक सकळ नाचती | गुढिया उभविती घरोघरीं ॥
घरोघरीं सुख आनंद सोहळा | सडे रंग माळा चौकदारी ॥ ४५५६.१-५ ॥

संत तुकाराम महाराजांचा मृत्यू इसवी सन १६५० मध्ये झाला. छत्रपती संभाजीराजांचा जन्म १६५७ मध्ये झाला. याचा अर्थ संभाजी महाराजांच्या जन्माच्या सुमारे ७ वर्षाआधी वैकुंठवासी झालेल्या संत तुकारामांचे सगळे अभंग इसवी सन १६५० पूर्वीच लिहीले गेले होते. म्हणून गुढी पाडव्याचा संभाजी महाराजांच्या मृत्युशी काहीही संबंध नाही.

आता संत ज्ञानेश्वर काय म्हणतात पाहू:

आइकैं संन्यासी तो चि योगी । ऐसी एकवाक्यतेची जगिं ।
गुढी उभिली अनेकीं । शास्त्रांतरी ।। ज्ञानेश्वरी ६.५२ ॥

‘स्मृतिस्थळ’ हा महानुभाव साहित्यामधील ग्रंथ सुमारे १४व्या शतकात लिहिला गेला आहे. या ग्रंथात ‘गुढी’ या शब्दाची ‘गुढ्या’ आणि ‘गुढेया’ ही रूपे पुढीलप्रमाणे आली आहेत:

१: आणि तुम्ही गुढ्यासरीसें यावे  (स्मृतिस्थळ ८३)
२: गुढेयासरिसें बैजोबा गाडेनिसिं निगाले  (स्मृतिस्थळ ८५)

 ‘शिशुपाळवध’ हा महानुभाव साहित्यातील एक महत्त्वाचा ग्रंथ होय. त्यामध्ये म्हटले आहे

घेत स्पर्शसुखाची गोडी श्रीकृष्ण आळिंगिला भुजादंडीं
तंव आत्मा उभितसे गुढी रोमांचमीसें ॥ शिशुपाळवध ६० ।।

राम आणि सीता यांचा विवाह झाल्यानंतर ते अयोध्येकडे निघाले असताना परशुराम आडवा आल्यानंतर राम आणि परशुराम यांच्यामध्ये झालेल्या संघर्षात रामाने परशुरामाचा पराभव केला. त्यानंतर दशरथांनी सर्व वर्‍हाडासह अयोध्येत प्रवेश केला. त्या वेळी अयोध्येतील प्रजेने ध्वज-पताका उभारल्याचे रामायणाने म्हटले आहे. ध्वज-पताका उभारल्या, म्हणजेच अयोध्येतील जनतेने आनंदाने गुढ्या उभारल्या, असा होतो.

उत्तर भारतात चांद्र मास पौर्णिमेला संपतात, म्हणजेच तिकडचे चांद्र मास पूर्णिमान्त असतात. दक्षिण भारतात चांद्र मास अमावस्येला संपून शुक्ल प्रतिपदेला नवीन महिना सुरू होतो. इसवी सन ७८ पासून ‘शके’ या कालगणनेचा जो प्रारंभ करण्यात आला आहे, त्या कालगणनेनुसार नव्या वर्षाची सुरवात चैत्र शुक्ल प्रतिपदेला होतो. सौर पद्धतीच्या कालगणनेनुसार वर्षाची नोंद करण्याच्या बाबतीत भारत सरकारने ‘शके’ या कालगणनेचाच स्वीकार केला आहे. या पद्धतीनुसार महाराष्ट्रात चैत्र शुक्ल प्रतिपदा हा चैत्र महिन्याचा प्रारंभ ठरतो. महाराष्ट्रातील निसर्गचक्राचा विचार करता चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ॠतूचे मानले जातात. शिशिर ॠतूमध्ये पानगळ झालेल्या वृक्षांना चैत्रामध्ये वसंत ॠतूचे आगमन झाल्यानंतर नवीन पालवी फुटू लागते. या पालवीला ग्रामीण भागात ‘चैत्र-पालवी’ असे म्हटले जाते. याचा अर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदा हा दिवस वसंत ॠतूच्या आगमनाचा द्योतक आहे. तो चैत्र पालवीच्या आगमनाचा दिवस असल्यामुळे कृषिसंस्कृतीशी निगडित आहे. चैत्र महिना हा बारा महिन्यांपैकी पहिला महिना होय. स्वाभाविकच, चैत्र शुक्ल प्रतिपदा हा वर्षाचा पहिला दिवस ठरतो. ‘प्रतिपदा’ या शब्दाचेच पाडवा असे रूपांतर झाले आहे. त्यामुळे चैत्र शुक्ल पाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस होय. म्हणून गुढी पाडवा हा सण नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती साजरा करावा व हिंदू संस्कृतीचे जतन करावे.

या दिवशी महाराष्ट्रात गुढीची पूजा केली जाते. तिच्या गळ्यात हार घातला जातो. हे पाहता या दिवशी गुढीचा अनादर केला जात नाही, तर तिच्याविषयी आत्यंतिक आदर व्यक्त केला जातो. गुढीसाठी स्त्रियांची वस्त्रे वापरणे, हा स्त्रियांचा अनादर असण्यापेक्षा मातृसत्ताक अथवा स्त्रीसत्ताक समाजपद्धतीमध्ये स्त्रियांना जे प्राधान्य दिले जात होते त्याचे द्योतक असल्याची शक्यता आहे. गुढीच्या टोकावर पालथे ठेवले जाणारे भांडे हे राणीच्या मस्तकावर ठेवल्या जाणार्‍या मुकुटाचे प्रतीक असू शकते.

गुढी पाडवा हा सण महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, आंध्र, गोवा आणि गुजरात या राज्यांतूनही कोणत्या ना कोणत्या स्वरुपात साजरा केला जातो. चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी कडू लिंबाच्या पानांचा उपयोग कोणत्या ना कोणत्या प्रकारे करण्याची पद्धत महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र, गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये आढळते. या पानांचा थोडा का होईना रस चाखण्याची वा पिण्याची प्रथा या राज्यांमध्ये आहे. या दिवशी कच्च्या कैरीचे पन्हेही बनविले जाते. याचा अर्थ कडू आणि आंबट रस अनुभवले जातात. शिवाय गोड, तिखट, खारट आणि तुरट चवीचे पदार्थ भोजनात असतातच. याचा अर्थ, या दिवशी निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व चावींचा आस्वाद घेतला जातो. मानवी जीवनातील सुख-दुःख वगैरे प्रकारच्या विविध अनुभवांना संतुलित वृत्तीने सामोरे जावे, असे वर्षाच्या पहिल्या दिवशी सुचविण्याचे कार्य विविध रसांच्या अनुभवांमुळे घडते, असे मानता येते.

वसंत ॠतुचे आगमन, कृषिजीवनाशी निकटचा संबंध, निसर्गाबरोबरचे नाते, नवीन वर्षाचा प्रारंभ इ. कारणांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेचे स्वागत करण्यासाठी आनंदोत्सव साजरा करावा, या भावनेने गुढी पाडवा साजराकरण्याची कृषी परंपरा आहे. गुढी पाडवा साजरा करणे वा न करणे, ही बाब ऐच्छिक आहे. गुढी पाडवा साजरा करू इच्छिणार्‍यांना तसे करण्याचे स्वातंत्र्य आहे. तथापि, त्या दिवसाकडे इतर दिवसांपेक्षा वेगळा असाशुभ मुहूर्त म्हणून पाहण्याची आवश्यकता नाही. ज्यांना गुढी भगव्या पताकेच्या वा अन्य एखाद्या स्वरुपात उभी करण्याची इच्छा असेल, ते तसे करू शकतात.

आता काही शिवकालीन पुरावे पाहू:

१) शिवचरित्र साहित्य खंड १ या पुस्तकात पृ ५९ ते ६५ वर लेखांक ४१ म्हणून एक जुना महजर दिला आहे. महजर म्हणजे न्यायाधिशाचे अंतिम लिखित मत! हा महजर मार्गशीर्ष शुद्ध १ विरोधीनाम संवत्सर शके १५७१ अथवा सुहूर सन खमसेन अलफ म्हणजेच दि. २४ नोव्हेंबर १६४९ रोजीचा असून सदर महजरात “गुढीयाचा पाडवा” असा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे पाडव्याला गुढ्या उभारत असत हे स्पष्ट दिसते.

२) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (जुना खंड) या पुस्तकात पृ २३४ ते २३८ वर लेखांक १७६ म्हणून एक निवाडपत्र दिले आहे. सदर गृहस्थाला निवाड्यासाठी काही पुरावे म्हणून दाखवायला सांगितले असता त्याने दिलेल्या कागदपत्रातील संबंधीत मजकूर असा- “शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमा ग्रामस्थ कसबे वाई याणी ग्रहण काळी कडत जोसी क॥ (कसबे) मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी येक व गहू व ‘गुढीयाचे पाडव्यास’ कुडव येक देऊ म्हणोन पत्र लेहूँ दिल्हे यास वर्षे तागायत १४८ होतात”. म्हणजे इ.स. १६३१-३२ मध्ये सुद्धा पाडव्याला गुढ्या उभारल्या जात असत हे येथे स्पष्ट होते.



३) श्री रामदासांची कविता खंड १ या पुस्तकात पृ ९६ वर समर्थ रामदासस्वामी श्रीराम रावणाचा वध करून पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर महाराष्ट्रातील जनतेने ‘गुढ्या उभारल्या’ असे देतात- “ध्वजा त्या गुढ्या तोरणे उभविली ।”. अर्थात राम आल्यावर गुढ्या इत्यादी विषय बाजूला ठेवला तरी समर्थांची समाधी ही संभाजीराजांच्या मृत्युपूर्वी किमान ८ वर्षे असल्याने आणि त्याही पूर्वी समर्थांनी हे काव्य रचल्याने “गुढ्या” या महाराष्ट्राला नविन नव्हत्या हे दिसते.

४) शिवकालीन पत्रसारसंग्रह या पुस्तकात पृ ४७७ वर लेखांक १६२५ म्हणून एक नारायण शेणव्याचे मुंबईच्या गव्हर्नरला लिहीलेले चैत्र शुद्ध ८ शके १५९६ म्हणजेच दि. ४ एप्रिल १६७४ रोजीचे पत्र दिले आहे. यापत्रात नारायण शेणवी “निराजी पंडित पाडव्याकरीता आपल्या घरी आला” असा उल्लेख असून ऐन राज्याभिषेकाच्या दोन महिने आधी “पाडव्याचा सण” महत्वाचा होता असे दिसते.

एकूणच काय, हे सगळे स्पष्ट असताना आम्ही अजूनही अशा समाजात तेढ निर्माण करणार्‍या अफवांवर विश्वास ठेवायचा का? किमान सुज्ञ लोकांस तरी हे सांगणे न लगे!

केवळ जिज्ञासूंकरता:

चैतन्य/ऊर्जा प्राप्त करण्यास जगातील कोणत्याही संस्कृतीमध्ये जी प्रतीके निर्माण केली जातात त्या सगळ्यांत निमुळता भाग वर आणि रुंद भाग खालच्या दिशेला असतो. मंदिराचे कळस, पिरॅमिडस्, स्तूप इ. गुढी उभारताना तांब्या उलटा ठेवण्याचे कारणही हेच आहे.

मग मंगलकलश सरळ का ठेवतात? पुन्हा तेच कारण; कलशात नारळ ठेवला जातो. त्याचा टोकेरी/ निमुळता भागच वर असतो. शिवाय त्यात पाणीही असते. उलट्या तांब्यात पाणी भरता येत नाही हे सामान्य ज्ञान आहे!

विखारी असत्याला बळी न पडता पारंपरिक गुढीपाडवा साजरा करा!!

- मंदार दिलीप जोशी

संदर्भः
१. इतिहासाच्या पाऊलखुणा फेसबुक समूह (शिवराम कार्लेकर, कौस्तुभ कस्तुरे, इत्यादी)
२. अखिल भारतीय मराठा महासंघ (श्री. राजेंद्र कोंढरे, श्री. गुलाब गायकवाड, राष्ट्रीय सरचिटणीस जिल्हाध्यक्ष, पुणे)
३) डॉ परीक्षित शेवडे

Wednesday, March 1, 2017

वीरमाता - क्या घर घर से शिवाजी निकलेगा?

वीरमाता शब्द जब हम सुनते हैं, तो यहां महाराष्ट्र में हमें पहले तो शिवाजी महाराज की मां वीरमाता जीजाबाई का स्मरण होता है. लेकिन आजकल तो हमारी आकांक्षा घर में शिवाजी पैदा करने की तो रही नहीं. हम सोचते हैं कि शिवाजी पैदा तो हो, लेकिन वो मेरे पडोसी के घर पर हो तो अच्छा. हिंदू घर में बच्चे तो आजकल सिर्फ 'हम दो हमारे दो' के नारे हिसाब से चलते हैं. कईं घरों में तो 'हम दो हमारा एक' ही दिखाई देता है. आजकल तो वामींयों ने "हम औरत हैं तो क्या बच्चे जनना जरूरी है? नहीं चाहीये बच्चा!" यह गंदी सोच फैला रख्खी है. हम सोचते हैं जितने कम बच्चे हो उतना पालनपोषण अच्छा हो सकता है. अरे, थोडा भटक गये हम.

चलिये फिर शिवाजी की बात करते हैं. मुझे इस बात का पूरा यकीन है की अगर आज कहीं शिवाजी महाराज पैदा भी हो गये, तो उनको jingoist (युद्धखोर देशभक्त), हायपर नॅशनलिस्ट, और इस सूची मे ताजा दाखिल हुये  अपशब्द कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम से निश्चित रूप से गरियाया जायेगा. तो बहनजी लेकिन शिवाजी नहीं तो ना सही, कमसे कम सिपाही तो पैदा कर ही सकती हैं ना आप?

आईये ऐसी ही एक वीरमाता की बात करते हैं जिसने एक नहीं, अपितु दो वीर सिपाहीयों को जन्म दिया. उनके पहले बेटे का नाम है......है नहीं, था...सौरभ. हाल ही में एक समारोह में उन्होने जो बातें कहीं वह तो हम सोच भी नहीं सकते.

२००३ के आसपास सेना मे दाखिल हुए सौरभ नंदकुमार फराटे १७ दिसंबर २०१६ को काश्मीर के पुलवामा जिले में आतंकवादीयों ने सेना के दल पर किये हमले में हुतात्मा हो गये. अपने परिवारसमेत दो महिनों की छुट्टी बिताकर और इस छुट्टी में अपने दोन जुडवा बेटीयों का जन्मदिन मनाकर फिर सेना में अपने नियुक्तिस्थान पर अक्तुबर में लौटे सौरभ की मृत्यू की खबर मिलते ही उसके परिवार तथा पूरे गांव मे दु:ख के घने बादल छा गये.

सकारात्मक खबरें देने वाले एक वेबसाईट भारतीयन्स डॉट कॉम का हाल ही मे एक अ‍ॅप निकला है. उसके उद्घाटन समारोह मे बात करते हुए सौरभ की मां ने कहा, कि अगर सब ऐसा सोचने लगे कि मेरा बेटा इंजिनिअर बनेगा, मेरा बेटा डॉक्टर बनेगा तो फिर अपने देश की रक्षा के लिये कौन जायेगा? अपना बेटा देश के लिये खोया है तो क्या हुआ, मेरा दूसरा बेटा भी सेना में ही जायेगा. [यह बात ध्यान देने लायक है कि उनका दूसरा बेटा भी उसी जगह नियुक्त है जिस जगह सौरभ की नियुक्ती हुई थी.] और यदि मुझे अवसर मिला, तो मेरा यह ३ वर्ष की आयु का पोता जो है, उसे मैं सेना मे दाखिल करवाउंगी.

सेना में दाखिल दो बेटों में से एक का हुतात्मा हो जाना, दूसरे बेटे का भी उसी स्थान पर नियुक्ती होना जहां उसके भाई की नियुक्ती हुई थी, और यह कहना की अवसर मिलते ही पोते को भी सेना में देश के लिये लडने के लिये भेजूंगी, यह कोई साधारण बात नहीं है. हम में से कोई इतना ऊँचा सोच भी नहीं सकता जितनी ऊँचा  सौरभ की माता की सोच है.

यह पढनेवाले लोगों में से कईं ऐसी होंगी जिनका अभी तक विवाह नहीं हुआ, या नयी नवेली दुल्हन है, या विवाह के पश्चात ज्यादा समय नहीं बीता है, या ऐसी भी होंगी जिनके बच्चे अभी तक स्कूल में पढ रहें है. और कुछ ऐसी भी होंगी जिनके परिवार और परिजनों में ऐये आयुगट की महिलाये होंगी. मै आपसे विनती करुंगा की आप इस विषय में सोचें और ऐसी महिलाओं को भी इस विषय में सोचने की विनती करें. अगर दूरस्थ गांव मे रहने वाले लोगों में पुलीस, सेना, एवं ऐसे ही सुरक्षा दलों मे दाखिल होने को लेकर ऐसी जागरूकता है, तो हम शहर वाले लोग जो अपने आप को ज्यादा परिपक्व समझेते हैं, क्यों नही सेना मे दाखिल होना एक विकल्प बना लेते हमारे बच्चों के लिये?

और हां, मुझे यह ज्ञात है कि केवल सेना में जाना ही देशभक्ति का प्रमाण नहीं है, परंतु यह एक महत्वपूर्ण संस्था है जिसमें अपना योगदान देने के लिये हर नागरिक को सोचना चाहीये.

इससे पहले कि कोई यह पूछे कि भाईसाहब आप अपने बेटे को सेना मे भेजेंगे? तो उसका उत्तर है - हां. मेरा बेटा ४ साल कि आयु से ही सेना मे जाने की इच्छा रखता है, और आज वह ६.५ साल का है और उसका निर्णय बदला नहीं है. हां मृत्यू की उसे बुनियादी जानकारी है, जितनी एक ६-७ साल के बच्चे को होती है. लेकिन फिर भी उसने सेना में जाने के अपने लक्ष्य को छोडा नहीं है. अगर उसने बडा होकर उसकी इच्छा किसी कारणवश बदल गयी, तो हम उसमें दखल अंदाजी नहीं करेंगे. परंतु अगर उसने बडा होने पर यह कहा की मुझे सेना में ही अपना करिअर बनाना है, तो न मैं तो उसे रोकूंगा न उसकी मां, अपितु हम दोनो उसे प्रोत्साहित ही करेंगे. हां अगर बेटी जाना चाहे तो भी.

तो आप सोचिये, आप कैसी माता बनना पसंद करेंगी. "बेटा, बाहर मत खेलो कहीं लग गया तो, ये लो मोबाईल और व्हिडिओ गेम खेलो" ये वाली मां, या खेलकर आये बच्चे के जख्मों पर दवा लगाते हुएं उसके जुझारू वृत्ती का गौरव करने वाली माता बनेंगी?

आरंभ मे एक प्रश्न पूछा था आप से. घर घर से शिवाजी न निकले तो न सही, परंतु सैनिक तो पैदा कर ही सकती हैं ना आप? चलिये कम से कम सोचना तो शुरु किजीये!!

© मंदार दिलीप जोशी

Tuesday, February 14, 2017

भगवान राम, इमाम-ए-हिंद, आणि बुद्धीभेद

जसा जसा राम मंदिराच्या भूमिपूजनाचा दिवस जवळ येत चालला आहे तसं तसं तथाकथित रामभक्त मुस्लिमांनी बुद्धीभेद सुरु केला आहे आणि त्यांनी रामाला इमाम-ए-हिंद म्हणायला पुन्हा सुरवात केली आहे. हिंदू म्हणून आपण नक्की कसल्या न्यूनगंडाखाली जगतो कुणास ठाऊक. कारण एखादी व्यक्ती किंवा एखाद्या समूहाला जेव्हा न्यूनगंडाने ग्रासलेलं असतं तेव्हा तो सतत इतरांच्या कौतुकासाठी आसुसलेला असतो आणि एखाद्या बाबतीत कौतुक वाटावं असा संशय जरी आला तरी तो प्रचंड हुरळून जातो.

काही मुस्लीम म्हणतात की ते सुद्धा कुराणात सांगितल्याप्रमाणे श्री राम, कृष्ण, किंवा भगवान शंकराला प्रेषित मानतात. या तिघांना उद्देशून म्लेंच्छगण 'नबी' हा शब्द वापरतात. आणि रामाला इमाम-ए-हिंद म्हणतात हे ही काही जणांकडून ऐकलेलं आहे. हे ऐकलं की आपल्यातले १०० पैकी ९९ लोक हुरळून जातात. खरं तर हे प्रचंड अपमानास्पद आहे आणि आपल्या देवांचा आणि अवतारी पुरुषांचा अपमान केला जातो आहे हे आपल्याला दुर्दैवाने कळतही नाही. या लबाडीला आपण फसण्याचं मुख्य कारण असं की बहुसंख्य हिंदूंना इस्लाम एकेश्वरवादी (खरं तर एकोपास्यवादी, पण या शब्दच्छलाबद्दल पुन्हा केव्हातरी) असून त्यांच्या देवाचं नाव अल्लाह आहे आणि मोहम्मद हा त्याचा शेवटचा प्रेषित आहे, या पलिकडे फारशी माहिती नसते. त्यामुळे ते जेव्हा या तिघांना नबी म्हणतात तेव्हा ते आपल्याकरता भूषणावह नसून अपमानास्पद आहे हे त्यांना पक्कं ठाऊक असतं.

भगवान राम आणि कृष्ण आणि भगवान शंकर हे प्रेषित म्हणण्यातली गोम लक्षात घ्या. एकदा या तिघांना अल्लाहचा प्रेषित म्हटलं की ते अल्लाहपेक्षा दुय्यम दर्जाचे ठरतात. हे मान्य आहे का तुम्हाला? राम व कृष्ण हे विष्णूचा अवतार आहेत असं आपण मानतो. भगवान शंकर हे तर प्रत्यक्ष देव. मग हे तिघे अल्लाहचे प्रेषित, त्याने पृथ्वीवर पाठवलेले, त्याच्याहून दुय्यम दर्जाचे?

आता दुसरा मुद्दा. इस्लाममध्ये अल्लाह ज्या व्यक्ती मार्फत मौखिक संदेश (व्हॉईस मेसेज) देतो त्याला नबी म्हणतात; तर अल्लाह ज्याला आपला संदेश पुस्तकरूपात किंवा लिखित स्वरूपात सुपूर्द करतो त्याला रसूल म्हणतात (Quran was "revealed" to Mohammed by Allah). दुसर्‍या शब्दात, रसूल हा नबी सुद्धा असतो, पण प्रत्येक नबी हा रसूल असू शकत नाही आणि तो रसूलपेक्षा खालच्या दर्जाचा संदेशवाहक असतो कारण रसूलकडे अल्लाहने पुस्तकरूपात दिलेला त्याचा संदेश असतो, जो नबीकडे नसतो. महंमदाच्या आधी अनेक नबी होऊन गेले, पण महंमद हा शेवटचा नबी आणि रसूल होय आणि म्हणून तो या सगळ्यांत श्रेष्ठ असल्याचं इस्लाम मानतो. अल्लाहने कुराण नामक पुस्तकरूपाने दिलेल्या संदेशाला लोकांपर्यंत पोहोचवणारा महंमद असल्याने त्याला रसूल ही पदवी प्राप्त आहे. म्हणजे भगवान राम आणि कृष्ण व भगवान शंकर हे तिघं नबी, आणि महंमद मात्र रसूल. आणि जेव्हा ते रामाला इमाम-ए-हिंद म्हणतात तेव्हा ते त्याला आणखी खाली आणत असतात, म्हणजे प्रेषिताहून खाली. थोडक्यात, या देशातल्या सगळ्या इमामांचा मुख्य इमाम. येतंय लक्षात?

थोडक्यात, भगवान राम आणि कृष्ण व भगवान शंकर या तिघांना नबी असं संबोधून फक्त अल्लाहपेक्षाच नव्हे तर महंमद हा रसूल असल्यानं त्याच्याहीपेक्षा कमी दर्जाचे असल्याचं हिंदूंना तोंडावर अपमानित केलं जातं पण आपल्याला ते समजत नाही.

असो. रसूल असो की नबी, तो अल्लाहने निवडलेला एक सामान्य मनुष्य असतो. हिंदू धर्मात 'अवतार' हा सामान्य माणूस नव्हे. अवतार याचा अर्थ देवाचा अवतार, दैवी अंश असलेला मनुष्य. या अर्थाने श्री राम व श्रीकृष्ण हे दैवी अंश असलेले महापुरुष ठरतात. आणि भगवान शंकर तर प्रत्यक्ष देवच आहेत. मग या तिघांना नबी असं संबोधून सामान्य मनुष्याच्या पातळीवर आणण्याचं प्रयोजन?

तेव्हा एखादा मुस्लिम तुम्हाला कधी असं म्हणला की श्री राम, श्रीकृष्ण आणि भगवान शंकर हे नबी आहेत, तर त्यांना अज्ञानी समजण्याची चूक करु नका. ते अज्ञानी किंवा भोळे नाहीत. ते मुद्दामून या तिघांना नबी असं संबोधून त्यांना अल्लाह आणि महंमद या दोघांच्या पायाशी आणून ठेवण्याचं कृत्य करत आहेत हे जाणून त्याचा तिथल्या तिथे जबरदस्त विरोध करा. यावर "तुमच्या देवतांचा सन्मानच करतो आहोत ना आम्ही" असं उत्तर येऊ शकतं. त्याला "गरज नाही, आमचे देव आणि त्यांचे अवतार यांचा तुम्ही सन्मान करावा इतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही" असं सांगा.

अशा प्रकारे आपल्या दैवतांना कमी लेखण्याचा कुणालाही अधिकार नाही. त्यांना ठणकावून सांगा की मग आम्ही सुद्धा तुमच्या श्रद्धेवर शंका घेऊ शकतो, आणि विश्वास ठेवा म्लेंच्छधर्मात अशी अगणित ठिकाणं आहेत जिथे आपण त्यांना खिंडीत गाठून अडचणीत आणणारे प्रश्न विचारू शकतो. तेव्हा त्यांनी असली बकवास करायला सुरवात केली तर हिंदूंकडून 'आमच्या श्रद्धेची टिंगल करायची असेल तर आम्हीही कित्येक पटीनी आणि संपूर्ण तार्किक दृष्ट्या हे तुमच्या श्रद्धांच्या बाबतीतही करु' आणि 'चुकूनही श्री राम आणि श्रीकृष्ण व भगवान शंकर यांना नबी म्हणण्याची हिंमत करु नका' हे संदेश  स्पष्टपणे त्यांना जाणं आवश्यक आहे.

लक्षात घ्या, एकदा का आपण श्री राम, श्रीकृष्ण, आणि भगवान शंकर यांना नबी किंवा इमाम-ए-हिंद म्हटल्यावर आनंदाने माना डोलवायला सुरवात केली, की मुल्लाला दिली ओसरी आणि मुल्ला हातपाय पसरी असं होतं अणि आपले अनेक देव, प्रथा, उत्सव हे 'त्यांचे' कधी होतात कळत नाही. शिवाय या तिघांना आपण अल्लाह आणि महंमदापेक्षा दुय्यम दर्जाचे मानायला परवानगी देतो ते वेगळंच. इस्लाम हा एक अविरतरित्या आक्रमक असणारा धर्म आहे तेव्हा आपले देवीदेवता, श्रद्धा, प्रथा, उत्सव यांच्या बाबतीत भाष्य करण्याचं म्लेंछांना काहीही अधिकार नाही आणि आपल्या दैवी पुरुषांचं नबीकरण आणि इमामीकरण करुन ते फक्त आणि फक्त सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करत आहेत हे त्यांच्यापर्यंत अत्यंत थेटपणे आणि त्यांच्यापेक्षा अधिक सातत्याने व तीव्रतेने पोहोचायला हवं.

 


© मंदार दिलीप जोशी
माघ कृ. ४, शके १९३८
अंगारक संकष्ट चतुर्थी

संपादितः श्रावण शु, दशमी, शके १९४२

Monday, February 13, 2017

तुम्हाला तुमच्या स्वतःच्याच घरातून कसं हाकललं जातंय हे लक्षात येतंय का?

एका गावात एक सधन कुटुंब रहात असे. शेतीवाडी, गुरंढोरं, कशा कशाची म्हणून त्यांना वानवा नव्हती. या कुटुंबात गृहस्थाश्रमी झालेले दोन मुलगे होते.

पण या दोन मुलातला एक वाईट प्रवृत्तीचा आणि अप्रामाणिक होता. या ना त्या कारणाने तो सारखं आई-वडिलांशी आणि भावाशी भांडायचा. या रोजच्या भांडणांना कंटाळून एकदा आईवडिलांनी सगळ्या संपत्तीचे दोन भाग करुन वाटण्या करुन टाकल्या. तो भांडखोर मुलगा आपल्या वाट्याला आलेली सगळी संपत्ती घेऊन दुसर्‍या गावात स्थायिक झाला.

त्या भाडखोर मुलाला दोन मुलं होती. एक मुलगा आणि एक मुलगी. वाटण्या होत असताना त्या दोघांनी आपल्या वडिलांना सरळ सांगून टाकलं की "आमचं आमच्या आजी-आजोबांवर खूप खूप प्रेम आहे आणि त्यांनाही आमचा लळा आहे. तेव्हा तुम्ही घर सोडून जायचं तर जा पण आम्ही आमच्या आजी आजोबांना सोडून कुठेही जाणार नाही. आम्ही इथेच राहणार." आणि ते दोघे त्याच घरात राहिले.

म्हातारे आजी-आजोबा त्यांच्यावर खरंच खूप माया करायचे. मुलांना आजी-आजोबांनी आता एका चांगल्या शाळेत घातलं, आणि त्यांच्यासाठी अनेक सोयीसुविधा पुरवल्या. त्यांना कुठलीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली.

सुरवातीला त्या दोघा भावंडांनी आपल्या आजी-आजोबांना निक्षून सांगितलं की त्यांना त्यांच्या आई-वडिलांना कधीच भेटायचं नाही. पण आजी आजोबांनी त्यांना समजावलं की बाबांनो, शेवटी ते तुमचे आईवडील आहेत. तुम्ही त्यांना महिन्यातून एकदा तरी भेटायला हवं. मग ती मुलं दर महिन्याला आपल्या आई-वडिलांना भेटायला जाऊ लागली आणि आजी-आजोबांच्या खर्चाने तिथे जाऊन मौजमजाही करु लागली.

असाच हळू हळू काळ पुढे सरकत होता.

मुलं मोठी झाल्यावर आजी-आजोबांनी त्यांच्याकडची संपत्ती विकून मुलाला एक व्यवसाय चालू करुन दिला आणि एक छानसं स्थळ पाहून मुलीचं लग्न करुन दिलं. मुलीच्या लग्नात चिक्कार खर्च करुन शिवाय वर बरीच मोठी रक्कमही दिली.

काही काळ लोटल्यावर त्या मुलाने आपल्या व्यवसायात आपल्याला नुकसान झाले आहे आणि एवढ्या प्रेमाने सुरू करुन दिलेला व्यवसाय बंद पडायला नको म्हणून आपल्याला मदत म्हणून आणखी काही रक्कम द्यावी अशी आजी-आजोबांकडे गळ घातली. आता त्याच्या बहिणीनेही तिच्याही नवर्‍याला एखादा व्यवसाय सुरू करायला आजी-आजोबांकडून काही रक्कम मिळावी अशी गळ घातली. अर्थातच लाडक्या नातीला आजी-आजोबा नाही म्हणू शकले नाहीत. अशा रीतीने ही दोघं भावंडं बरीच वर्ष आजी-आजोबांना गंडवत राहिली आणि आजी-आजोबा याच भ्रमात राहिले की आपली ही दोन नातवंडं आपल्यावर कित्ती कित्ती प्रेम करतात.

पण या मुलांच्या काकाला, म्हणजे या वृद्ध जोडप्याच्या दुसर्‍या मुलाला हे सगळं लक्षात येत होतं. त्याने आपल्या आई-वडिलांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळे घरात पुन्हा कलह सुरू झाला. आता दोन्ही भावंडं आजी-आजोबांवर उलटली. त्यांनी सगळ्या गावात "आजी-आजोबा आणि काका आमच्यावर खूप अत्याचार करत आहेत" असा जोरदार बोभाटा केला.

त्या दोघा भावाबहिणींनी गावातल्या तलाठ्याला पैसे चारून फितवलं आणि त्याच्या मार्फत गावात हे पसरवून दिलं की आम्हीच आमच्या आजी-आजोबांच्या संपत्तीचे खरे वाटेकरी आहोत आणि त्यांच्या संपत्तीवर आमचाच प्रथम हक्क आहे, आणि आम्हाला आमचा हिस्सा घेऊन आजी-आजोबांच्या जुलमी सावटातून मुक्त व्हायचं आहे. या कुटुंबाचे गावातले काही हितशत्रू आपल्यालही काही मिळेल या लालसेने त्या दोघा भावंडांच्या बाजूने साक्ष द्यायला तयार झाले.

अशा रीतीने त्या दोघा भावंडांनी आपल्या आजी-आजोबांची व सदवर्तनी काकाचीच अत्याचारी, खोटारडे, आणि अप्रामाणिक अशी बदनामी केली.

आणि मग ती दोन मुलं ढापलेल्या सगळ्या संपत्तीसकट आपल्या आईवडिलांना जाऊन मिळाली.

काही काळाने आजी-आजोबांना हे लक्षात आलं की हा सगळा त्यांच्या भांडखोर आणि वाईट प्रवृत्तीच्या दुसर्‍या मुलाने रचलेला पूर्व नियोजित खेळ होता. त्याने आपल्या मुलांना मुद्दामून सोबत न घेता आपल्या आई-वडिलांच्याच घरात त्यांची उरलीसुरली संपत्ती ढापण्यासाठी ठेवलं होतं.

तर लोकहो, येतंय का काही लक्षात? ही गोष्ट मी तुम्हाला का सांगितली? वाचणारे बहुसंख्य सूज्ञजन असल्याने ही रूपककथा लक्षात आली असेलच. नसेल आली तर पुढे वाचा.

आता जरा भारताच्या फाळणीपर्यंत मागे जाऊया. काही म्लेंच्छांनी धर्माच्या आधारावर भारताच्या फाळणीची मागणी केली आणि आपल्यासाठी भारताचाच भूभाग तोडून एक वेगळा देश बनवला. आपला हिस्सा घेतला. अगदी वरील गोष्टीतल्या भांडखोर भावासारखा.

त्याच वेळी त्यांनी आधीच ठरवल्याप्रमाणे आपल्या काही समधर्मीयांना भारतातच राहण्याचा फायदा पटवून दिला आणि म्हणून काही म्लेंच्छ इथेच राहिले. इथे राहिलेल्या म्लेंच्छांनी (त्या गोष्टीतली दोन्ही भावंडं) देशाला आणि विशेषतः भारतातल्या हिंदूंना (गोष्टीतले त्यांचे आजी-आजोबा) हे सांगितलं की आमचं किनै भारतावर खूप खूप प्रेम आहे आणि आम्ही मरेपर्यंत भारताच राहू.

मग सुरवातीच्या फाळणीच्या जखमांवर खपली धरू लागताच इथल्या म्लेंच्छांनी पाकिस्तानातल्या आपल्या नातेवाईकांना (गोष्टीतला भांडखोर भाऊ आणि त्याची बायको - त्या दोन मुलांचे आई-वडील) उघड उघड भेटायला सुरवात केली. पण दुर्दैवाने धर्मनिरपेक्षतेचे भरपूर डोस प्यायलेल्या इथल्या हिंदूंना असं वाटलं की इथले म्लेंच्छांचं हिंदूंवर खूप प्रेम आहे आणि म्हणून ते भारत सोडून गेले नाहीत. वत्सल्य उतू चाललेल्या काही हिंदूंनी त्यांना डोक्यावर चढवून ठेवलं आणि त्यांना काही धर्मस्थळंही बांधून दिली.

आता इथे राहिलेल्या म्लेंच्छांनी आपला खरा रंग दाखवायला सुरवात केली आणि आपली लोकसंख्या भरमसाठ वाढवून भारतातल्या अनेक भागांवर आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि कधी छुपेपणाने तर कधी उघड हिंसेला सुरवात केली. हिंदूंना हे अत्याचार बोचू लागताच म्लेंच्छांनी डावे/साम्यवादी/समाजवादी (गोष्टीतला तलाठी) यांच्या मदतीने भारतात हे ठोकून ठोकून सांगायला सुरवात केली की हिंदूंनी गरीब बिचार्‍या म्लेंच्छांवर दडपशाही आणि अत्याचार करत असून त्यांना त्यांचा न्याय्य वाटा देत नाहीत. खरं तर देशातल्या संपत्तीवर म्लेंच्छांचाच प्रथम हक्क आहे.

हा झाला देशातल्या हिंदूंना फसवण्याचा एक मार्ग. सुरवातीला जेव्हा तलवारीच्या जोरावर हिंदू पुर्णपणे बधत नाहीत हे लक्षात आलं तेव्हा हिंदूंना फसवायला "सूफी संत" नामक एक भंपक प्रकार जन्माला आला. या प्रकारात तथाकथित "सूफी संत" संगीताच्या माध्यमातून म्लेंच्छधर्म आणि अल्लाहची महत्ता सांगू लागले. सूफी संगीत नामक प्रकार प्रचंड लोकप्रिय केला गेला. इतकंच नव्हे तर इतर लोकप्रिय संगीतात सुद्धा मौला, अल्ला, खुदा, परवरदिगार, रसूल, सजदा आणि यांच्यासारखे शब्द सर्रास ऐकू येऊ लागले आणि इथल्या बावळट हिंदूंनी (पुन्हा, गोष्टीतले आजी-आजोबा) या शब्दांना जोरदार पद्धतीने उचलून धरलं. आज आपण बघतो आहोत की चित्रपट संगीतात हे शब्दच सगळं सूरविश्व व्यापून राहिलेले आहेत आणि किमान हिंदी गाण्यातून तरी इश्वर, भगवान, वगैरे शब्द हद्दपार झालेले आहेत. संगीत हे संस्कृतीचा भाग असतं. आणि म्लेंच्छांना ही गोष्ट पूर्णपणे ठावूक आहे की संस्कृतीवर कब्जा केला तर त्या मार्गे राजकारणावर कब्जा करणं खूपच सोपं आहे.

आज हे काश्मीर मागत आहेत. उद्या याच लोकसंख्येच्या जोरावर हे लोक हैद्राबाद (भागानगर) मागतील. परवा केरळ, मग पश्चिम बंगाल, आणि अशा रीतीने पूर्ण भारतावर त्यांची सत्ता निर्माण होईल.

या लोकांची चाल आजही अनेक हिंदूंच्या लक्षात आलेली नाही. म्लेंच्छ नेहमी पूर्वनियोजित पद्धतीने काम करतात. जिथे फक्त बळाचा वापर शक्य नाही तिथे ते स्वतःला दोन भाग करतात. एक भाग नेहमी कट्टर, हिंसा करणारा, दहशतवादी असतो, तर दुसरा गट तुमच्याशी फार फार प्रेमाने वागतो आणि तुम्हाला सतत याची खात्री पटवून देतो की सगळे दहशतवादी म्लेंछ नसतात किंवा जे दहशतवाद माजवतात ते म्लेंच्छ नव्हेतच आणि आम्हाला त्यांच्यात मोजू नका. आणि बावळट हिंदूंना हे खरंच वाटतं.

मग हे लोक ढापलेल्या संपत्तीच्या जोरावर डावे/साम्यवादी/समाजवादी (गोष्टीतला तलाठी) आणि पत्रकार (गोष्टीतले भावंडांच्या बाजूने साक्ष देणारे हावरट गावकरी) यांना ते आपल्या बाजूने वळवून घेतात आणि सगळीकडे हे हरामखोर अशी समजूत करुन देतात की बघा बघा म्लेंच्छांवर किती अत्याचार सुरू आहेत.

आणि मग अशा रीतीने आपल्या संपत्तीसकट आणि बहुसंख्य ठिकाणी जीवानिशी काश्मीर, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश वगैरे राज्यांतून गोष्टीतल्या आजी-आजोबांसारखे हाकलले जाता पण शेवटपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही की तुम्हाला तुमच्याच जागेतून हाकललं जात आहे आणि तुमच्याच हक्काची संपत्ती लुटली जाते आहे.

मग गोष्टीतली ती दोन भावंडं जशी आपल्या आई-वडिलांना जाऊन मिळाली तशाच पद्धतीने हे दहशतवादी आणि शांततेचे ढोंग करणारे म्लेंच्छ एक होतात.

तर मंडळी, येतंय का काही लक्षात? अरे म्हणजे काय! सूज्ञ आहात तुम्ही. आलंच असलं पाहीजे लक्षात.

बोला
पुंडलिक वरदा, हारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव, तुकाराम
पंढरीनाथ महाराज की, जय !
सीताकांत स्मरण, जय जय राम !

मूळ हिंदी लेखकः © श्री अशोक शर्मा  - https://goo.gl/B12S5C
मराठी भाषांतर/रूपांतर:  © मंदार दिलीप जोशी